नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, आपल्यासाठी घेऊन आलोय दिनविशेष माहिती. आजच्या कार्यक्रमात आपण स्वातंत्र्यसैनिक जानकी देवी बजाज यांच्या विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
स्वातंत्र्यसैनिक जानकी देवी बजाज
जानकी देवी बजाज या एक थोर गांधीवादी समाजसेविका, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती जमनालाल बजाज यांच्या पत्नी होत्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला, अस्पृश्यता निवारण, महिला शिक्षण आणि ग्रामसेवेसाठी काम केले
जानकी देवी यांचा जन्म ७ जानेवारी १८९३ रोजी मध्य प्रदेशातील जोरा येथे एका वैष्णव-मारवाडी कुटुंबात झाला
वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी त्यांचा विवाह जमनालाल बजाज यांच्याशी झाला. बजाज उद्योगसमूह हा एक भारतीय बहुराष्ट्रीय समूह आहे ज्याची स्थापना जमनालाल बजाज यांनी १९२६ मध्ये मुंबईत केली होती. प्रमुख कंपनी बजाज ऑटो ही जगातील चौथी सर्वात मोठी दुचाकी आणि तीन-चाकी वाहन उत्पादक कंपनी आहे. लग्नानंतर त्या महाराष्ट्रातील वर्धा येथे आल्या आणि बजाज कुटुंबाच्या श्रीमंत वातावरणात राहू लागल्या, परंतु म. गांधीजींच्या प्रभावामुळे त्यांनी साधे जीवन स्वीकारले. त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय भाग घेतला, ज्यासाठी त्यांना १९३२ मध्ये तुरुंगवासही भोगावा लागला १९२१ मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या त्या मोजक्या महिलांपैकी एक होत्या. त्यांनी चरख्यावर खादी कातणे, अस्पृश्यता नष्ट करणे आणि गोसेवेसाठी मोठे योगदान दिले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी विनोबा भावे यांच्यासोबत भूदान चळवळीत काम केले. महिलांच्या शिक्षणाला आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या मुलाचे नाव कमलनयन बजाज असे होते.
सन १९५६ मध्ये भारत सरकारने त्यांना त्यांच्या समाजसेवेबद्दल प्रतिष्ठित 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित केले.
त्यांनी १९६५ मध्ये 'मेरी जीवन यात्रा' नावाचे आत्मचरित्र प्रकाशित केले. ज्यात त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टीचा उलगडा केलेला आहे.
दिनांक २१ मे १९७९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ ग्रामीण विकासातील योगदानासाठी महिला उद्योजकांना 'जानकीदेवी बजाज पुरस्कार' दिला जातो.
आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने कोटी कोटी प्रणाम 🙏
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - जानकी देवी बजाज यांचा जन्म कोणत्या कुटुंबात झाला
बरोबर उत्तर आहे, जानकी देवी बजाज यांचा जन्म वैष्णव-मारवाडी कुटुंबात झाला.
दुसरा प्रश्न - जानकी देवी बजाज यांचा विवाह कोणाशी झाला ?
बरोबर उत्तर आहे, जानकी देवी बजाज यांचा विवाह जमनालाल बजाज यांच्याशी झाला.
तिसरा प्रश्न - जानकी देवी यांनी लिहिलेल्या आत्मचरित्र पुस्तकाचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, 'मेरी जीवन यात्रा' जानकी देवी यांनी लिहिलेल्या आत्मचरित्र पुस्तकाचे नाव होते.
चौथा प्रश्न - जानकी देवी यांच्या मुलाचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, जानकी देवी यांच्या मुलाचे नाव कमलनयन बजाज असे होते.
शेवटचा पाचवा प्रश्न - भारत सरकारने जानकी देवी यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले ?
बरोबर उत्तर आहे - भारत सरकारने जानकी देवी यांना 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित केले.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment