Tuesday 30 January 2024

अशोक सराफ ( Ashok Saraf )

*चेहऱ्यावरील हावभावाने विनोद निर्माण करणारा अभिनेता - अशोक सराफ*


अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून अवघ्या हिंदुस्थानाला परिचीत आहे. मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. अशोक सराफ यांना चार फिल्मफेअर मराठी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत . त्यांना मराठी चित्रपटसृष्टीतील महानायक  अर्थात  'सर्वोत्तम अभिनेता', अशोक सम्राट किंवा मामा असे संबोधले जाते. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर यांच्यासोबत त्यांनी मराठी विनोदी चित्रपटांची मालिकाच केली.

अशोक सराफ हे मुळचे बेळगाव या गावचे पण त्याचा जन्म मुंबईतील चिखलवाडी येथे ४ जून १९४७ रोजी झाला. त्यांचे बालपणही येथेच गेले. ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांच्या नावावरून त्यांचे नाव "अशोक" ठेवण्यात आले. त्यांचे शिक्षण डी. जी. डी. या विद्यालयात झाले. अभिनयाची आवड असल्याने वयाच्या अठराव्या वर्षापासूनच अभिनयास सुरुवात केली. शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या व्यावसायिक नाटकापासून त्यांनी रंगमंच्यावर प्रवेश केला. यानंतर दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार मधील इरसाल पोलीस, राम राम गंगाराम मधील म्हमद्या खाटिक यांसारख्या बहुरंगी भूमिका त्यांनी साकारल्या. त्यांनी आपले कामाचे क्षेत्र मर्यादित न ठेवता त्यांनी विनोदी, खलनायक तसेच गंभीर पात्रेही पडद्यावर साकार केली आणि त्यातून आपली वेगळी शैली निर्माण केली. ऐंशीच्या दशकात अशोक आणि लक्ष्या या जोडीने रुपेरी पडद्यावर धमाल उडवून दिली. अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, दे दाणादाण यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी मराठी प्रेक्षक वर्गास पोटभरुन हसवले. अशोक सराफांच्या अभिनय उभारुन यायला दिग्दर्शक सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारेही तितकेच साथीदार आहेत. अशोक सराफांचे काही उल्लेखनिय चित्रपट नवरी मिळे नव-याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा, एक उनाड दिवस, शुभमंगल सावधान, आई नंबर वन, नवरा माझा नवसाचा आजही लोकांच्या मनात घर करुन आहेत. मराठी चित्रपटासोबत त्यांनी हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. अजय देवगण सोबत सिंगम चित्रपटातील त्यांची छोटी भूमिका देखील आठवणीत राहून जाते. शाहरुख व सलमान खान यांच्या सोबत करण-अर्जुन मधील भूमिका देखील प्रेक्षक विसरू शकत नाहीत.

पत्नी अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ बरोबर त्यांनी स्वत:ची निर्मिती संस्था चालू केलेली आहे. त्याद्वारे काही मालिकांची निर्मिती त्यांनी केली आहे. टिव्ही मालिकांमध्ये त्यांची सर्वात गाजलेली मालिका म्हणजे ’हम पांच’. अशोक सराफांनी चित्रपट संख्या कमी केलेली असली तरी प्रेक्षक अजूनही त्यांच्या नवीन चित्रपटांच्या प्रतिक्षेत असतात.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ याना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले. अशोक सराफ यांच्या प्रत्येक चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अभिनंदन .....!

संकलन :- नासा

Monday 29 January 2024

महात्मा गांधीजी प्रश्नमंजुषा ( Mhatma Gandhi )

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याविषयी प्रश्नमंजुषा


01. महात्मा गांधीजी यांचे पूर्ण नाव काय होते ? - मोहनदास करमचंद गांधी

02. महात्मा गांधीजी यांचा जन्म केव्हा झाला ? - 02 ऑक्टोबर 1869

03. महात्मा गांधीजी यांचा जन्म कोठे झाला ? - पोरबंदर ( गुजरात )

04. महात्मा गांधीजी यांच्या आईचे नाव काय होते ? - पुतळीबाई

05. महात्मा गांधीजी यांच्या पत्नीचे नाव काय होते ? - कस्तुरबा

06. महात्मा गांधीजी हे कस्तुरबा यांना कोणत्या नावाने बोलावत असत ? - बा

07. महात्मा गांधीजी यांनी आपले वकिलीचे शिक्षण कुठून पूर्ण केले ? - लंडन विद्यापीठ

08. महात्मा गांधीजी यांनी दक्षिण आफ्रिकेत किती वर्षे राहिले ? - 21 वर्षे

09. महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरू कोण होते ? - गोपाळ कृष्ण गोखले

10. महात्मा गांधीजी यांच्या जीवनातील भारतातील पहिला यशस्वी लढा कोणता होता ? - चंपारण्य सत्याग्रह

11. कोणत्या घटनेच्या निषेधार्थ महात्मा गांधीजी यांनी कैसर-ए-हिंद पदवीचा त्याग केला ? - जालियनवाला बाग हत्याकांड

12. महात्मा गांधीजी यांचा मृत्यू केव्हा झाला ? - 30 जानेवारी 1948

13. 30 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात कोणता दिवस म्हणून ओळखला जातो ? - हुतात्मा दिन

14. महात्मा गांधीजी यांची समाधी कोठे आहे ? - राजघाट ( दिल्ली )

15. कस्तुरबा गांधी यांची समाधी कोठे आहे ? - आगा खान पॅलेस, पुणे

16. महात्मा गांधीजी यांना महात्मा ही उपाधी कुणी दिली ? - गुरुदेव रवींद्रनाथ टागोर

17. महात्मा गांधीजी यांना राष्ट्रपिता म्हणून कोणी संबोधन केले ? - नेताजी सुभाषचंद्र बोस

18. सत्याचे प्रयोग ही आत्मकथा कोणाची आहे ? - महात्मा गांधी

19. महात्मा गांधीजी यांना संपूर्ण भारतात अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ? - बापू

20. महात्मा गांधीजी यांच्या मुखातून निघालेले शेवटचे शब्द काय ? - हे राम

संकलन :- नासा येवतीकर, मुख्याध्यापक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Sunday 28 January 2024

प्रश्नमंजुषा उत्तरे

कोण होईल ज्ञानपती 2024
प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा 

उत्तरे :- 
01) उजव्या 
02) श्री नरेंद्र मोदी
03) प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी
04) नेताजी सुभाषचंद्र बोस
05) लोकमान्य टिळक
06) सरदार वल्लभभाई पटेल
07) सिंदखेडराजा
08) 30 जानेवारी
09) खाशाबा जाधव
10) ब्रेल लुई
11) वारा
12) आयझक न्यूटन
13) गाय
14) जय जय महाराष्ट्र माझा
15) कुस्ती
16) परमवीर चक्र
17) ऊन
18) नोबेल पुरस्कार
19) कल्पना चावला
20) साबण
21) स्वामी रामानंद तीर्थ  
22) रझाकार  
23) निजाम 
24) दगडाबाई शेळके 
25) नांदेड 
26) हैद्राबाद 
27) स्वामी रामानंद तीर्थ 
28) 17 सप्टेंबर1948 
29) डॉ. ताराबाई परांजपे 
30) अर्जापूर 
31) पोलो ऑपरेशन 
32) औरंगाबाद 
33) 17 सप्टेंबर 
34) सरदार वल्लभभाई पटेल 
35) कासीम रझवी 
36) वसंतदादा पाटील 
37) उर्दू 
38) गोदावरी 
39) 08  
40) 565
41) दिल्ली
42) मुंबई
43) द्रौपदी मुर्मु
44) श्री नरेंद्र मोदी
45) श्री एकनाथ शिंदे
46) पंडीत जवाहरलाल नेहरू
47) डॉ. राजेंद्र प्रसाद
48) श्रीमती इंदिरा गांधी
49) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
50) 15 ऑगस्ट

- नासा येवतीकर, मुख्याध्यापक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

प्रश्नमंजुषा 2024 ( Republic Day )

कोण होईल ज्ञानपती 2024 ( प्रजासत्ताक दिनानिमित्त )
प्रश्नमंजुषा स्पर्धा - जानेवारी 2024
विद्यार्थ्यांचे नाव -                                                                                           वर्ग :-

शाळेचे नाव - 
------------------------------------------------------------------------------------------------------------
सूचना - दिलेल्या चार पर्यायापैकी योग्य पर्यायावर टीक करावे. एका प्रश्नाला एक गुण असेल. 

1. चालतांना रस्त्यांच्या कोणत्या बाजूने चालावे ? 
1)    डाव्या            2)    उजव्या               3)    मधोमध             4)  यापैकी नाही

 2. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात कोणी मार्गदर्शन केले ? 
1)  श्री एकनाथ शिंदे              2)  श्रीमती द्रौपदी मुर्मु                3) श्री नरेंद्र मोदी        4) श्री देवेंद्र फडणवीस

3. या मातीच्या पुण्याईचा या गीताचे कवी कोण  ? 
1)   प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी     2)   कवी राजा बढे         3)  लक्ष्मण माने               4) कुसुमाग्रज

4. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जय हिंद असा नारा कोणी दिला ? 
1)  पंडित नेहरू          2)  महात्मा गांधी          3)  लोकमान्य टिळक          4) नेताजी सुभाषचंद्र बोस

5. केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ? 
1)   महात्मा गांधी        2)  लोकमान्य टिळक          3)   महात्मा फुले           4) पंडित नेहरू

6.  लोहपुरुष असे कोणास म्हटले जाते ? 
1) महात्मा गांधी             2)  लोकमान्य टिळक          3)  सरदार पटेल            4)  पंडित नेहरू

7. राजमाता जिजाऊ यांचा जन्म कोठे झाला ? 
1)    पुणे             2)   शिवनेरी                3)   सातारा              4) सिंदखेडराजा

8. हुतात्मा दिन कधी असतो  ? 
1)   26 जानेवारी            2)   03 जानेवारी                3)  30 जानेवारी               4) 12 जानेवारी

9. पहिले भारतीय ऑलिम्पिक विजेते कोण ? 
1)   विजयकुमार दहिया      2)   खाशाबा जाधव        3)  सायना नेहवाल      4) राज्यवर्धन सिंह राठोड

10. ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला ? 
1)   आयझॅक न्यूटन        2)   एडिसन         3)  लुई पाश्चर           4) ब्रेल लुई

11. खालीलपैकी कोणता वनस्पतीचा अवयव नाही  ? 
1)   मूळ              2)   पान                3)   वारा              4) खोड

 12. गुरुत्वाकर्षण चा शोध कोणी लावला ? 
1)   आयझॅक न्यूटन        2)   एडिसन         3)  लुई पाश्चर           4) ब्रेल लुई

13. खालीलपैकी गटात न बसणारा ओळखा ? 
1)   वाघ              2)  सिंह                 3)  कोल्हा               4) गाय

14. खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते ? 
1) खरा धर्म      2) जय जय महाराष्ट्र माझा    3)  हा देश माझा    4) बलसागर भारत होवो

15. विजयकुमार दहिया कोणत्या खेळांशी संबंधित आहे ? 
1)  हॉकी               2)      खो-खो             3)  कबड्डी               4)  कुस्ती

16. लान्सनायक अल्बर्ट एक्का यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे ? 
1)  भारतरत्न           2)  परमवीर चक्र               3)  पद्मविभूषण                4) पद्मश्री

17. खालीलपैकी झाडापासून आपणांस काय मिळत नाही ? 
1)   लाकूड              2)   सावली                3)  फळ               4) ऊन

18. डॉ. जगदीशचंद्र बोस यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे ? 
1)  भारतरत्न पुरस्कार      2) परमवीर चक्र पुरस्कार       3) नोबेल पुरस्कार          4) पद्मविभूषण पुरस्कार

19. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण ? 
1)   कल्पना राठोड           2)   कल्पना चावला           3) जुही चावला          4) सुनीता चावला

20.  खालीलपैकी प्रथमोपचार पेटीत नसलेली वस्तू कोणती ? 
1)   आयोडीन           2)   साबण              3)  इंजेक्शन               4)  कात्री

21. हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्याचे नेतृत्व कोणी केले ? 
1)   महात्मा गांधी              2)  स्वामी विवेकानंद                 3)   स्वामी रामानंद तीर्थ                 4) गोविंदभाई श्रॉफ

 22. कासीम रझवी यांच्या सैन्याचे नाव काय होते ?
1)   सरकार               2)   सरदार             3)   रझाकार               4)  निजामकार

23. हैद्राबाद संस्थानावर कोणाचे राज्य होते ?
1)   औरंगजेब               2)  बादशाह                    3)  निजाम                  4)  शिवाजी महाराज

24. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून कोणास ओळखले जाते ? 
1)  दगडाबाई शेळके              2) ताराबाई मोडक                   3)  ताराबाई परांजपे                   4) अनुताई वाघ

25. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे ? 
1)   औरंगाबाद             2)  नांदेड                  3)  परभणी               4) लातूर

26. स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा कोणत्या संस्थानात होता ? 
1)  काश्मीर              2)  जुनागढ                    3)  हैद्राबाद            4) यापैकी नाही

27. नांदेड एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ? 
1)    महात्मा गांधी              2)  स्वामी विवेकानंद                 3)   स्वामी रामानंद तीर्थ                 4) गोविंदभाई श्रॉफ

28. हैद्राबाद संस्थान भारतात केव्हा विलीन झाले ? 
1)   17 सप्टेंबर 1949       2)    17 सप्टेंबर 1948           3)   17 सप्टेंबर 1947                     4)  17 सप्टेंबर 1950

29. निवडुंगाची फुले हे पुस्तक कोणी लिहिले  ? 
1)   दगडाबाई शेळके              2) ताराबाई मोडक                   3)  ताराबाई परांजपे                   4) अनुताई वाघ

30. हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या हत्या कोणत्या ठिकाणी झाली ? 
1)   धर्माबाद             2)   अर्जापूर            3)  अर्धापूर            4) बिलोली

31. निजाम सरकारवर कारवाई करणाऱ्या ऑपरेशनचे नाव काय होते ?
1)  सोलो ऑपरेशन              2)  पोलो ऑपरेशन        3)  खोलो ऑपरेशन           4) डोलो ऑपरेशन

32. मुक्ती स्तंभ कोठे बांधण्यात आले आहे ? 
1)   औरंगाबाद              2)  हैद्राबाद                3)  निजामाबद                4) धर्माबाद

33. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 
1)   15 सप्टेंबर       2)    15 ऑगस्ट           3)   26 जानेवारी                     4)  17 सप्टेंबर

34. हैद्राबाद मुक्तीसंग्राम वेळी भारताचे गृहमंत्री कोण होते  ? 
1)   पंडीत नेहरू              2) सरदार वल्लभभाई पटेल      3)  डॉ. राजेंद्र प्रसाद      4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

35. निजामच्या सेनापतीचे नाव काय होते ? 
1)  कासीम अली        2)  मीर उस्मान           3)  कासीम रझवी          4)  अब्दुल कासीम

36.  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्याचा निर्णय कोणत्या मुख्यमंत्र्यांनी घेतला ? 
1)  शंकरराव चव्हाण        2)  वसंतदादा पाटील           3)  वसंतराव नाईक          4)  विलासराव देशमुख

37. निजाम सरकारमध्ये शिक्षणाची भाषा कोणती होती ? 
1)  तेलगू        2)  इंग्रजी           3)  उर्दू         4)  मराठी

38. मराठवाड्यातून कोणती नदी वाहते ? 
1)  गंगा        2)  गोदावरी           3)  कृष्णा          4)  चंद्रभागा

39.  हैद्राबाद संस्थानात मराठवाड्यातील किती जिल्ह्याचा समावेश होता ? 
1)  07        2)  09           3)  08          4)  10

40. स्वातंत्र्यापूर्वी भारतात एकूण किती संस्थाने होती ? 
1)  665        2)   565          3)  562          4)  546

41.  खालीलपैकी भारताची राजधानी कोणती ?
1) मुंबई         2) दिल्ली       3) नागपूर           4) कलकत्ता

42. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे ?
1) मुंबई         2) जपान        3) न्यूयॉर्क         4) इंग्लंड

43. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत ?
1) श्री रामनाथ कोविंद     2) द्रौपदी मुर्मु        3) नरेंद्र मोदी    4) एकनाथ शिंदे

44. भारताचे पंतप्रधान कोण आहेत ?
1) श्री रामनाथ कोविंद     2) द्रौपदी मुर्मु       3) नरेंद्र मोदी    4) एकनाथ शिंदे

45. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
1) श्री रामनाथ कोविंद     2) द्रौपदी मुर्मु    3) नरेंद्र मोदी    4) एकनाथ शिंदे

46. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर     2) डॉ. राजेंद्र प्रसाद   3) पंडीत जवाहरलाल नेहरू  4) श्रीमती इंदिरा गांधी

47. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर   2) डॉ. राजेंद्र प्रसाद    3) पंडीत जवाहरलाल नेहरू   4) श्रीमती इंदिरा गांधी

48. भारताचे पहिले महिला पंतप्रधान कोण होते ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर   2) डॉ. राजेंद्र प्रसाद    3) पंडीत जवाहरलाल नेहरू    4) श्रीमती इंदिरा गांधी

49. भारतीय घटनेचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर    2) डॉ. राजेंद्र प्रसाद    3) पंडीत जवाहरलाल नेहरू    4) श्रीमती इंदिरा गांधी

50. भारत देश केव्हा स्वतंत्र झाला ?
1) 17 सप्टेंबर    2) 26 जानेवारी     3) 15 ऑगस्ट      4) 01 मे

वरील प्रश्नांची उत्तरे चेक करण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. 


धन्यवाद .......!

संकलन :- नासा येवतीकर, मुख्याध्यापक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

मराठी सिनेमा आणि प्रेक्षक ( Marathi Cinema )

मराठी सिनेमा आणि प्रेक्षक


भारतात चित्रपटाची निर्मिती करणारे पहिले व्यक्ती म्हणजे  दादासाहेब फाळके हे होत. महाराष्ट्रातील सन 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र नावाचा मूकपट त्यांनी तयार केला. म्हणून त्यांना मराठी चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हणतात. मराठी चित्रपटानेच सिनेसृष्टी प्रारंभ झाली, त्यामुळे मराठी सिनेमाला फार मोठा इतिहास आहे. त्यानंतर बाबुराव पेंटर सारख्या दिग्दर्शकाने मराठी सिनेमाला वैभव मिळून दिले. त्याकाळी पौराणिक कथा, मराठ्यांच्या इतिहासातील घटना, प्रसंग तसेच रोजच्या जीवनातील हलकेफुलके प्रसंग यावर आधारित चित्रपट तयार होत होते. त्यामुळे प्रेक्षक वर्ग त्या चित्रपटांकडे आकर्षिला जात होता. समाजात बदलणाऱ्या काळाचे ठसे चित्रपटातून व्यक्त होत असल्यामुळे चित्रपट आणि लोकांमध्ये एक प्रकारचा जिव्हाळा होता. त्याचसोबत चित्रपट बनविणे हा त्या लोकांचा एक छंद होता. त्याकडे त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून कधीही पाहिले नाही.
भारतीय चित्रपट सृष्टीचा श्री गणेशा मराठी माणसाने व मराठी सिनेमाने जरी झाला असेल तरी, मराठी सिनेमाचा विकास त्या गतीने झाला नाही. सन 1931 मध्ये हिंदीतील आलम आरा या चित्रपटाची निर्मिती झाली आणि आपला मराठी माणूस हळूहळू मराठी चित्रपटापासून दुरावत गेला. मराठीमध्ये सुद्धा एकापेक्षा एक चांगल्या चित्रपटांची निर्मिती झाली. आचार्य अत्रे यांनी श्यामची आई चित्रपटा द्वारे मराठी सिनेमाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. श्वास या मराठी चित्रपटाने ऑस्कर वारी करून आली. यावरून आजही मराठी सिनेमा जिवंत आहे याचा विश्वास वाटतो. एवढेच नाही तर त्यास राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. कला ही भाषेमध्ये अडकून राहणारी नाही त्यामुळे मराठीतील कलाकार इतर भाषांच्या चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी करतात असे वाटते, परंतु तसे काही नाही. आपल्या मराठी सिनेमाला नेहमीच प्रेक्षकांची संख्या कमी असते कारण सतत रटाळ पटकथा, तेच ते विषय आणि तेच कलाकार घेऊन कमी बजेटमध्ये सिनेमा तयार केल्या जातात. त्यामुळे प्रेक्षक वर्ग मराठी सिनेमाकडे पाठ करतात. शंभर पैकी जे एक दोन चित्रपट चांगले तयार होतात त्यांची अवस्था  गव्हासोबत किडे रगडणे यासारखी होऊन जाते.
मराठी सिनेमासाठी मध्यंतरीचा काळ हा चांगला होता. सचिन पिळगावकर, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, रंजना जोशी, जयश्री गडकर या मराठी कलाकाराने प्रेक्षकांची नाडी ओळखून चित्रपट तयार केले. त्यामुळे मराठी सिनेमा बघायला प्रेक्षक मिळत होता. अलका कुबलच्या माहेरची साडी या सिनेमाने कित्येक महिलांच्या डोळ्यांत अश्रू उभे केले. चांगल्या कलाकृतीला प्रेक्षक केव्हाही दाद देतात. त्यास्तव निर्मात्यांनी सर्वस्व पणाला लावून सिनेमा तयार करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे पण तसे अभावानेच बघायला मिळते. प्रदीर्घ विश्रांतीनंतर सचिन व सुप्रिया या जोडीने नवरा माझा नवसाचा हा चित्रपट घेऊन आले. विषयाची मांडणी आणि हलकेफुलके विनोद यामुळे लोकांनी हा सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतले. मकरंद अनासपुरे व सिद्धार्थचा दे धक्का सर्व प्रेक्षकांना खरंच धक्का देऊन गेला. मैत्री वरचा दुनियादारी चित्रपट हा एका वेगळ्या जगात घेऊन जातो. लैला-मजनू, सोहनी-महिवाल, हीर-रांझा ही प्रेमी युगुल जोडी जशी आपल्या प्रेमकथेसाठी प्रसिद्ध आहे तेवढीच प्रसिद्धी नागराज मंजुळे यांनी सैराट या मराठी चित्रपटात आर्चि-परश्याची जोडी प्रसिद्ध केली.
मराठी चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाहीत ही ओरड काही खरी नाही. सिनेसृष्टीतील लोकांकडे काहीतरी वेगळे करण्याची जिद्द, तीव्र इच्छाशक्ती, आगामी दृष्टिकोन, नवनवीन कल्पना अमलात आणण्याची इच्छा असेल तर नजीकच्या काळात मराठी सिनेमा सुद्धा दमदार पाऊल टाकेल. मराठी पाऊल पडती पुढे असे म्हणायला त्या ठिकाणी संधी मिळणार यात शंका नाही. मराठी सिनेमा जेमतेम 50 70 लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंतच गल्ला जमा करतो. म्हणून निर्माते मंडळी सुद्धा कमी बजेटचे चित्रपट तयार करतात. अशा विपरीत काळात डबल सीट चित्रपटाने आठवडाभरात पाच कोटी रुपयांचा गल्ला जमा करून दाखविला आहे, हे नोंद घेण्यासारखे आहे. भविष्यात मराठी सिनेमा वाचविण्यासाठी आपण सर्वचजण मराठी चित्रपट जरूर पाहूया आणि थिएटरवाल्यांनी सुद्धा प्रत्येक तिकिटामागे सवलत देण्याची प्रथा मराठी चित्रपटांसाठी सुरू करावी जेणेकरून प्रेक्षक चित्रपट गृहाकडे आकर्षिले जातील. मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत. मराठी सिनेसृष्टी जिवंत ठेवणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे.

 
- नासा येवतीकर, स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...