Friday 14 August 2020

भारतीय स्वातंत्र्य दिन 2020

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त 
स्वलिखित लेख, कविता आणि लघुकथा

Independent Day

        भारत देश महान

विविध पंथ धर्म नि जातीचे लोकं
येथे नांदतात गुण्यागोविंदाने छान
नाना लहान सहान प्रांताने बनला देश
गर्वाने म्हणू माझा भारत देश महान

भारताला लाभली गौरवशाली परंपरा
पाहिले अनेक क्रांतीवीर नि शूरवीरा
त्यांचे नाव घेता वाटे आम्हा अभिमान
गर्वाने म्हणू माझा भारत देश महान

आमच्या अज्ञानाचा फायदा घेउनी
दीडशे वर्षे राज्य केले इंग्रजांनी
चलेजाव लढ्याने जागा झाला स्वाभिमान
गर्वाने म्हणू माझा भारत देश महान

गुलामगिरी समूळ नष्ट करण्यासाठी
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी
अनेकांनी दिले आपल्या प्राणांचे बलिदान
गर्वाने म्हणू माझा भारत देश महान

अनेकांचे कष्ट अखेर आले फळाला
स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्टला
एकमुखाने गाऊ भारतमातेचे गुणगान
गर्वाने म्हणू माझा भारत देश महान

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Wednesday 12 August 2020

22 years

*सेवेची बावीस वर्षे*
मी 12 ऑगस्ट 1998 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनी केंद्र अनंतवाडी ता. माहूर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झालो. याठिकाणी आलेला अनुभव स्वतंत्र लिहिलेला आहे. येथील मुख्याध्यापक डी. बी. शेख यांचे मनोमनी खूप आभार मानतो. त्यांनीच मला खरा आधार दिला होता. येथे पाच वर्षे एक महिना नोकरी केल्यानंतर 13 सप्टेंबर 2003 रोजी धर्माबाद तालुक्यात माझी बदली झाली. त्यामुळे धर्माबाद पंचायत समितीमध्ये हजर झालो. माझा वर्गमित्र सुधाकर चिलकेवार प्राथमिक शाळा पांगरी येथे प्राथमिक शिक्षक पदावर होता. मी धर्माबाद तालुक्याचा रहिवासी असून देखील हे गाव मला माहित नव्हते. पण मित्र असल्यामुळे त्या गावाची मागणी केली आणि पांगरी या शाळेवर रुजू झालो.  येथील अनुभव देखील किनवट पेक्षा कमी नव्हता. जुन्नी, पांगरी, राजापूर आणि बाचेगाव ही गावे म्हणजे मिनी किनवट होती. ना बससेवा ना टेलिफोन .. बाप रे आज ही ते दिवस आठवले की अंगावर काटा उभा राहतो. त्यावेळी साईनाथ बोदलोड सर हे मुख्याध्यापक होते तर शेख खलील सर, सुधाकर चिलकेवार आणि माझा डी. एड. चा मित्र बाबू बनसोडे असे चौघेजण तिथे कार्यरत होते. मी त्याठिकाणी पाचवा व्यक्ती गेलो. सात वर्ग पाच शिक्षक असे जास्त काळ राहिलं नाही, थोड्याच दिवसात खलील सरची बदली झाली आणि आम्ही चारजण झालोत. याच शाळेवर कोलोड सर, वडजे सर, पंचलिंग सर, पठाण सर, सूर्यवंशी सर यांचा ही काही काळासाठी संबंध आला होता. याच शाळेवर असतांना मुख्याध्यापक पद देखील सांभाळण्याचा योग आला होता. येथील गावकरी, पालक आणि विद्यार्थी खूप सहकार्य केले. त्यामुळे हे दिवस खूप आनंदात गेले. पांगरी येथे आठ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ऑगस्ट 2011 यावर्षी तालुका अंतर्गत बदलीने जिल्हा परिषद हायस्कुल करखेली येथे रुजू झालो. येथे मिळालेला अनुभव मला पुढील जीवनात कामी आले. या शाळेत नोकरी करतांना मुख्याध्यापक निरडी सर, राचमाळे सर, हामंद सर, ठक्कुरवार सर, कांडले सर, गंगासागरे सर, अनीसुर रहमान, सौ. पाठक मॅडम, असे अनेक चांगले शिक्षकमित्र मिळाले. ज्यांच्यामुळे अनेक शैक्षणिक उपक्रम राबविणे सोपे गेले. ऑनलाइन बदली पोर्टलच्या अगोदर समुपदेशन पद्धतीने माझी म्युच्युअल बदली बिलोली तालुक्यातील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली येथे जून 2016 मध्ये झाली. माझा माहूर येथे रूममेट असलेला मित्र जगन्नाथ दिंडे त्या ठिकाणी कार्यरत आहे म्हणून मी त्या शाळेची निवड केली. पण दुर्दैवाने एका वर्षात दिंडे सर त्या शाळेवर अतिरिक्त ठरले आणि त्यांची बदली झाली. मला तिथे एकाकीपणा वाटत होता. मात्र येथील मुख्याध्यापक बी. एच. भोजराज सर आणि आय. एच. झंपलकर सर यांची अनमोल साथ मला मिळाली. भोजराज सरांची बदली झाल्यानंतर आलेल्या सौ. नीता दमकोंडवार मॅडम यांचे सहकार्य ही विसारण्यासारखे नाही. चिरली येथील विद्यार्थी, पालक, गावकरी आणि परिसर यातून मला नेहमीच आनंद मिळत होता. माझ्या मनातील  अनेक उपक्रम मला येथे करता आले व उपक्रमशील शिक्षक म्हणून सर्वत्र ओळख ही झाली. विषय शिक्षकांच्या समुपदेशन प्रक्रियेत मी सप्टेंबर 2019 मध्ये धर्माबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत भाषा विषय शिक्षक म्हणून रुजू झालो. येथील मुख्याध्यापक एम. एन. कागेरू सर, सहकारी शिक्षक हिमगिरे सर, सय्यद सर, सौ. जोशी मॅडम, श्रीमती बेहरे मॅडम, सौ. चंदा मॅडम यांच्या सहकार्याने दिवस आनंदात सरत आहेत. 
या बावीस वर्षाच्या काळात अनेक चढ उतार आले. दरवर्षी एक वेगळा अनुभव मिळत गेला. सन 1998 ते 2020 या बावीस वर्षांत अनेक जिवाभावाचे शिक्षक मित्र मिळाले. काही मार्गदर्शक अधिकारी लाभले. साहित्याच्या क्षेत्रात अनेक साहित्यकांची ओळख झाली. शाळा करत करत साहित्याचा मळा देखील सांभाळता आले. मध्यंतराच्या काळात एक-दोन वर्षे ऑफिसला देखील काम करण्याचा अनुभव मिळाला. त्याचा फायदा एवढा झाला की, प्रशासकीय बाबी कळू लागल्या. सकारात्मक मन निर्माण होण्यास मदत मिळाली. चांगले अधिकारी लाभले. येथूनच अनेक मित्रांचा फौजफाटा तयार करू शकलो. मुलांना अध्यापन करण्यासोबत माझ्या आवडत्या छंदाकडे कधीही दुर्लक्ष केलो नाही. त्याचमुळे वैचारिक लेखांचे सात, एक कवितासंग्रह, आणि एक कथासंग्रह असे एकूण नऊ ई साहित्य पुस्तकाची निर्मिती करू शकलो. आपल्या सर्वांचे प्रेम, सहकार्य, प्रोत्साहन आणि मार्गदर्शनामुळे मला हे जमले आहे. यापुढे ही माझ्या हातून विद्यार्थी हिताचे आणि देशाच्या हिताचे काम होवो अशी प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. यानिमित्ताने आपण दिलेल्या शुभेच्छा स्वीकार करतो. धन्यवाद ...!

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...