Sunday, 29 March 2026

दिनविशेष माहिती - 30 मार्च ( Rajasthan Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 30 मार्च हा राजस्थान स्थापना दिवस त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण राजस्थान या राज्याविषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

         राजस्थान स्थापना दिवस
भारताच्या पश्चिम भागात वसलेले राजस्थान हे क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठे राज्य आहे. ३० मार्च १९४९ रोजी विविध संस्थानांचे एकत्रीकरण होऊन राजस्थान राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे दरवर्षी ३० मार्च हा दिवस राजस्थान स्थापना दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
स्वातंत्र्यपूर्व काळात राजस्थानमध्ये जयपूर, जोधपूर, बिकानेर, उदयपूर इत्यादी अनेक लहानमोठी संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने या संस्थानांचे एकत्रीकरण करून एकसंध राज्य निर्माण करण्याचा निर्णय घेतला. दिनांक ३० मार्च १९४९ रोजी राजस्थान राज्य अस्तित्वात आले.
राजस्थान हे आपल्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेसाठी प्रसिद्ध आहे. राजस्थानचे घुमर लोकनृत्य खूप प्रसिद्ध आहे. तसेच रंगीबेरंगी पोशाख, दागिने आणि वाळवंटी जीवनशैली हे सर्व जगभर आकर्षणाचे केंद्र आहे. राजस्थानी खाद्यसंस्कृतीत दाल-बाटी-चूरमा विशेष प्रसिद्ध आहे. हिंदी व राजस्थानी ही राजस्थानमधील प्रमुख बोलली जाणारी भाषा आहेत. राजस्थान मधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे भारतातील एक प्रमुख व्याघ्रप्रकल्प म्हणून गणले जाते. राजस्थानमध्ये उंट हा रोजच्या जीवनात वापरला जाणारा प्राणी आहे.
राजस्थान स्थापना दिवस हा केवळ राज्याच्या निर्मितीचा दिवस नसून एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. राज्यातील लोक आपली परंपरा जपण्यासाठी आणि पुढील पिढ्यांना तिची ओळख करून देण्यासाठी हा दिवस साजरा करतात.
राजस्थानमध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले, राजवाडे आणि वाळवंटी प्रदेश आहेत. जयपूर, उदयपूर, जोधपूर आणि जैसलमेर ही शहरे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. राजस्थानची राजधानी जयपूरला गुलाबी शहर किंवा “पिंक सिटी” म्हणून ओळखले जाते तसेच जंतर मंतर व हवामहलसाठी देखील जयपूर प्रसिद्ध आहे. जैसलमेरची “गोल्डन सिटी” पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. विविधतेत एकता आणि परंपरेचे जतन यांचे सुंदर उदाहरण म्हणजे राजस्थान होय. या दिवसाच्या निमित्ताने आपणही भारताच्या सांस्कृतिक वैभवाचा अभिमान बाळगूया.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - राजस्थान राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
बरोबर उत्तर आहे, 30 मार्च 1949 रोजी राजस्थान राज्याची निर्मिती झाली.

दुसरा प्रश्न - राजस्थानची राजधानी कोणती ?
बरोबर उत्तर आहे, जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. 

तिसरा प्रश्न - राजस्थानचे कोणते लोकनृत्य खूप प्रसिद्ध आहे ?
बरोबर उत्तर आहे, राजस्थानचे घुमर लोकनृत्य खूप प्रसिद्ध आहे. 

चौथा प्रश्न - राजस्थानमध्ये रोजच्या जीवनात वापरला जाणारा प्राणी कोणता आहे. ?
बरोबर उत्तर आहे, राजस्थानमध्ये उंट हा रोजच्या जीवनात वापरला जाणारा प्राणी आहे.

शेवटचा पाचवा प्रश्न - क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
बरोबर उत्तर आहे - क्षेत्रफळानुसार राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Friday, 27 March 2026

दिनविशेष माहिती - 28 मार्च ( Guru Angad dev )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 28 मार्च शीख धर्माचे दुसरे गुरु अंगद देव यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण गुरु अंगद देव यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

शीख धर्माचे दुसरे गुरु अंगद देव

शीख धर्मातील महान गुरुंपैकी गुरु अंगद देव यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. ते शीख धर्माचे दुसरे गुरु होते. त्यांचा जन्म 31 मार्च 1504 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांचे मूळ नाव ‘भाई लहणा’ असे होते. शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु म्हणजे गुरु नानक देव यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन गुरु अंगद देव यांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले आणि पुढे तेच शीख पंथाचे दुसरे गुरु झाले.
गुरु अंगद देव यांनी आपल्या आयुष्यात समाजसेवा, शिक्षण आणि समानतेचा संदेश दिला. त्यांनी सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र आणून मानवतेचा विचार रुजवला. त्यांच्या कार्यातील सर्वात मोठे योगदान म्हणजे गुरुमुखी लिपीचा प्रसार होय. या लिपीमुळे सामान्य लोकांनाही ज्ञान मिळणे सोपे झाले आणि शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब सर्वांपर्यंत पोहोचले.
त्यांनी शारीरिक व मानसिक विकासावरही भर दिला. मुलांमध्ये शिक्षणाबरोबरच व्यायामाची सवय लागावी म्हणून त्यांनी व्यायामशाळा सुरू केल्या. समाजातील अंधश्रद्धा, भेदभाव आणि अन्याय यांना त्यांनी विरोध केला. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सेवा या मूल्यांचा त्यांनी प्रचार केला.
दिनांक 28 मार्च 1552 रोजी त्यांचे निधन झाले. गुरु अंगद देव यांच्या कार्यामुळे शीख धर्म अधिक बळकट झाला. त्यांचे जीवन आपल्याला सेवा, समानता आणि शिक्षण यांचे महत्त्व शिकवते. त्यामुळे त्यांची पुण्यतिथी आपल्याला प्रेरणा देणारा आणि आदर्शांचा विचार करण्याचा दिवस ठरतो. 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - गुरु अंगद देव यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, गुरु अंगद देव यांचा जन्म 31 मार्च 1504 रोजी पंजाबमध्ये झाला.

दुसरा प्रश्न - शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु कोण होते ? 
बरोबर उत्तर आहे, गुरु नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु होते. 

तिसरा प्रश्न - गुरुमुखी लिपीचा प्रसार कोणी केला ?
बरोबर उत्तर आहे, गुरु अंगद देव यांनी गुरुमुखी लिपीचा प्रसार केला. 

चौथा प्रश्न - शीख धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता ?
बरोबर उत्तर आहे, गुरु ग्रंथ साहिब हा शीख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - गुरु अंगद देव यांचे निधन केव्हा झाले ? 
बरोबर उत्तर आहे - दिनांक 28 मार्च 1552 रोजी गुरु अंगद देव यांचे निधन झाले. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Thursday, 26 March 2026

दिनविशेष माहिती - 27 मार्च ( Yuri गगरीन )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 27 मार्च पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले अंतराळवीर युरी गागरीन यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने 
 आजच्या कार्यक्रमात आपण युरी गागरीन यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर – युरी गागरीन 
मानवाच्या जिज्ञासू स्वभावामुळे त्यांनी नेहमीच आकाशाकडे पाहून अंतराळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना यश देणारे पहिले अंतराळवीर म्हणजे यूरी गागरिन होय. त्यांनी 12 एप्रिल 1961 रोजी अंतराळात जाऊन पृथ्वीची प्रदक्षिणा करून मानव इतिहासात एक नवा अध्याय लिहिला.
यूरी गागरिन यांचा जन्म 9 मार्च 1934 रोजी सोवियत युनियन मधील एका छोट्या गावात झाला. त्यांचे बालपण अत्यंत साध्या कुटुंबात गेले. लहानपणापासून त्यांना विमान उडवण्याची खूप आवड होती. त्यांनी शिक्षण पूर्ण करून वैमानिक प्रशिक्षण घेतले आणि पुढे अंतराळवीर म्हणून त्यांची निवड झाली.
12 एप्रिल 1961 हा दिवस मानवजातीसाठी ऐतिहासिक ठरला. या दिवशी गगारिन यांनी वोस्टॊक वन या अंतराळयानातून अवकाशात झेप घेतली. त्यांनी सुमारे 108 मिनिटांत पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण केली. अंतराळात गेलेले ते पहिले मानव ठरले. अंतराळातून त्यांनी “पृथ्वी खूप सुंदर दिसते” असे उद्गार काढले, जे आजही प्रसिद्ध आहेत.
गागरिन यांच्या या यशामुळे अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठी क्रांती घडली. त्यांच्या कामगिरीमुळे जगभरातील वैज्ञानिकांना प्रेरणा मिळाली आणि अंतराळ स्पर्धेला वेग आला. अनेक देशांनी अंतराळ मोहिमा सुरू केल्या आणि नवीन संशोधनाला चालना मिळाली.
दुर्दैवाने, 27 मार्च 1968 रोजी विमान अपघातात यूरी गगारिन यांचे निधन झाले. मात्र त्यांचे कार्य आणि योगदान आजही अमर आहे. त्यांच्या सन्मानार्थ 12 एप्रिल हा दिवस “आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस” म्हणून साजरा केला जातो.
यूरी गगारिन यांनी मानवाला अंतराळाच्या नव्या युगात प्रवेश करून दिला आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने युरी गागरीन यांना विनम्र अभिवादन 🙏

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - यूरी गागरिन यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, यूरी गागरिन यांचा जन्म 9 मार्च 1934 रोजी सोवियत युनियन मधील एका छोट्या गावात झाला. 

दुसरा प्रश्न - यूरी गागरिन यांना लहानपणापासून कशाची आवड होती ? 
बरोबर उत्तर आहे, यूरी गागरिन यांना लहानपणापासून विमान उडवण्याची खूप आवड होती. 

तिसरा प्रश्न - यूरी गागरिन यांनी किती मिनिटांत पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण केली ?
बरोबर उत्तर आहे, यूरी गागरिन यांनी त्यांनी सुमारे 108 मिनिटांत पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण केली. 

चौथा प्रश्न - यूरी गागरिन यांनी अंतराळातून कोणते उद्गार काढले ?
बरोबर उत्तर आहे, यूरी गागरिन यांनी अंतराळातून “पृथ्वी खूप सुंदर दिसते” असे उद्गार काढले.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - यूरी गगारिन यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - 27 मार्च 1968 रोजी विमान अपघातात यूरी गगारिन यांचे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Tuesday, 24 March 2026

दिनविशेष माहिती - 25 मार्च ( Vasant Govarikar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
आज 25 मार्च अर्थात अवकाश संशोधन व हवामान क्षेत्रातील महान शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांची जयंती त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण डॉ. वसंत गोवारीकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर
भारत देशात अनेक महान शास्त्रज्ञ झाले, ज्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यापैकी एक प्रमुख नाव म्हणजे डॉ. वसंत गोवारीकर. ते एक प्रतिभावान शास्त्रज्ञ, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ होते.
डॉ. वसंत गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील इंजिनियर होते. लहानपणापासूनच त्यांना विज्ञान आणि संशोधनाची आवड होती. त्यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने उच्च शिक्षण पूर्ण केले. लंडनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स आणि डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. विज्ञान क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
ते विशेषतः अवकाश संशोधन क्षेत्राशी संबंधित होते. त्यांनी थुंबा येथील भारताच्या अवकाश संशोधन संस्थेत म्हणजेच ISRO मध्ये महत्त्वाची भूमिकाjw बजावली. भारताच्या उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी रॉकेट तंत्रज्ञानाच्या विकासातही महत्त्वाचे कार्य केले. डॉ. वसंत गोवारीकर हे मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते.
वसंत गोवारीकर यांनी केवळ अवकाश क्षेत्रातच नव्हे तर हवामानशास्त्र आणि पावसाच्या अंदाजाबाबतही संशोधन केले. त्यांनी ‘मॉन्सून मॉडेल’ विकसित करून पावसाचा अंदाज अधिक अचूक करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्यामुळे शेती आणि अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला.
त्यांनी शिक्षण क्षेत्रातही मोठे योगदान दिले. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आणि विज्ञानाची आवड निर्माण केली. ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल भारतीय खगोल मंडळाच्या वतीने आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला होता. भारत सरकारच्या वतीने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे सन्मान देऊन गौरविण्यात आले होते. ते भारतातील नामांकित शास्त्रज्ञांपैकी एक मानले जातात. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दिनांक ०२ जानेवारी २०१५ रोजी मृत्यू झाला. 
वसंत गोवारीकर यांचे जीवन आपल्याला कष्ट, जिद्द आणि ज्ञानाची महती शिकवते. आज डॉ. वसंत गोवारीकर यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम ! 🙏

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - डॉ. वसंत गोवारीकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. वसंत गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला.

दुसरा प्रश्न - डॉ. वसंत गोवारीकर यांना लहानपणापासूनच कशाची आवड होती ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. वसंत गोवारीकर यांना लहानपणापासूनच विज्ञान आणि संशोधनाची आवड होती.

तिसरा प्रश्न - पावसाचा अंदाज अचूक व्यक्त करण्यासाठी डॉ. वसंत गोवारीकर यांनी कोणते मॉडेल तयार केले ?
बरोबर उत्तर आहे, पावसाचा अंदाज अचूक व्यक्त करण्यासाठी डॉ. वसंत गोवारीकर यांनी मान्सून मॉडेल तयार केले.

चौथा प्रश्न - भारतीय खगोल मंडळाच्या वतीने डॉ. वसंत गोवारीकर यांना कोणता पुरस्कार देण्यात आला होता ? 
बरोबर उत्तर आहे, भारतीय खगोल मंडळाच्या वतीने डॉ. वसंत गोवारीकर यांना आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला होता. 

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - डॉ. वसंत गोवारीकर यांचा मृत्यू केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे - दिनांक ०२ जानेवारी २०१५ रोजी पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉ. वसंत गोवारीकर यांचा मृत्यू झाला. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Monday, 23 March 2026

दिनविशेष माहिती 24 मार्च ( TB )

    नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 24 मार्च अर्थात जागतिक क्षयरोग दिवस तेव्हा आजच्या कार्यक्रमात आपण क्षयरोग या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

     जागतिक क्षयरोग दिन – 24 मार्च
जागतिक स्तरावर आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध दिवस साजरे केले जातात. त्यापैकी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. हा दिवस क्षयरोग ज्यास आपण (TB) या नावाने ओळखतो, याचा मुख्य उद्देश क्षयरोगाबद्दल (TB) जागरूकता निर्माण करणे आणि या आजाराचे निर्मूलन करणे हा आहे.
या दिवसाचा इतिहास डॉ. रॉबर्ट कोच यांच्याशी जोडलेला आहे. डॉ. रॉबर्ट कोच यांनी 24 मार्च 1882 रोजी क्षयरोगाचा जंतू (Mycobacterium tuberculosis) शोधून काढले. त्यांच्या या शोधामुळे क्षयरोगाच्या निदान आणि उपचाराला मोठी मदत झाली. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.

क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे. तो मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो, परंतु शरीरातील इतर अवयवांना देखील बाधित करू शकतो. हा आजार संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकताना हवेत पसरतो. सतत खोकला, वजन कमी होणे, ताप येणे, रात्री घाम येणे ही त्याची मुख्य लक्षणे आहेत.
World Health Organization (WHO) च्या मते, क्षयरोग हा अजूनही जगातील मोठ्या आरोग्य समस्यांपैकी एक आहे. विशेषतः विकसनशील देशांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.
क्षयरोग टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करायला हवे जसे की, स्वच्छता राखणे, पौष्टिक आहार घेणे, खोकताना तोंड झाकणे, वेळेवर तपासणी व उपचार करणे, BCG लसीकरण घेणे.
दरवर्षी या दिवसासाठी वेगवेगळी संकल्पना (Theme) दिली जाते, ज्याद्वारे लोकांमध्ये जागरूकता वाढवली जाते. सरकार व विविध आरोग्य संस्था मोफत तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देतात.
शेवटी, क्षयरोग हा घातक असला तरी योग्य माहिती, वेळेवर निदान आणि उपचार यांच्या मदतीने त्यावर नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहून स्वतःचे व समाजाचे आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे.
“क्षयरोगमुक्त भारत” हे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - जागतिक क्षयरोग दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?
बरोबर उत्तर आहे,  24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो.

दुसरा प्रश्न - क्षयरोग ज्यास आपण कोणत्या नावाने ओळखतो ?
बरोबर उत्तर आहे, क्षयरोग ज्यास आपण (TB) या नावाने ओळखतो.

तिसरा प्रश्न - क्षयरोगाचा जंतूचा शोध कोणी लावला ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाचा जंतूचा शोध लावला.

चौथा प्रश्न - डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाचा जंतूचा शोध केव्हा लावला ?
बरोबर उत्तर आहे,  रॉबर्ट कोच यांनी 24 मार्च 1882 रोजी क्षयरोगाचा जंतू शोधून काढला.
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - WHO चे full form सांगा.
बरोबर उत्तर आहे - World Health Organization (WHO)

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Sunday, 22 March 2026

दिनविशेष माहिती - 23 मार्च ( Shahid Diwas )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 23 मार्च अर्थात शहीद दिवस त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण भारतीय स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्या क्रांतीवीरांची माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

         23 मार्च - शहीद दिवस 
भारताचा स्वातंत्र्यलढा हा त्याग, बलिदान आणि देशप्रेमाची प्रेरणादायी गाथा आहे. या लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा शूर वीरांच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून वीरांना वंदन केले जाते. 
23 मार्च 1931 हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना ब्रिटिश सत्तेने फाशी दिली. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत बलिदान दिले आणि संपूर्ण देशाला प्रेरणा दिली.
या घटनेमागे एक महत्त्वाचा इतिहास आहे. पंजाब केसरी म्हणून ओळखले जाणारे लाला लाजपत राय हे एक महान राष्ट्रभक्त नेते होते. 1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करत असताना ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रामाप्रसाद बिस्मिल यांच्या “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है।” ह्या गीताने अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली. लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी ब्रिटिश अधिकारी सॉन्डर्सवर हल्ला केला. ही घटना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली.
भगतसिंग हे अत्यंत धाडसी आणि विचारशील क्रांतिकारक होते. त्यांनी “इन्कलाब जिंदाबाद” ही घोषणा देऊन तरुणांना जागृत केले. राजगुरू आणि सुखदेव यांनीही त्यांच्या सोबत निडरपणे स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.
शहीद दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली जाते.
हा दिवस आपल्याला शिकवतो की स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही, तर अनेक वीरांच्या बलिदानातून मिळाले आहे. त्यामुळे आपण आपल्या देशाबद्दल निष्ठा आणि कर्तव्यभावना ठेवली पाहिजे.
शहीद दिवस हा प्रेरणादायी दिवस आहे. लाला लाजपत राय यांच्या त्यागापासून ते भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानापर्यंतचा हा इतिहास आपल्याला देशप्रेम, धैर्य आणि त्याग यांचे मूल्य शिकवतो. त्यांच्या आदर्शांवर चालणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना ब्रिटिश सत्तेने कोणत्या तारखेला फाशी दिली ?
बरोबर उत्तर आहे, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना ब्रिटिश सत्तेने 23 मार्च 1931 रोजी फाशी दिली.

दुसरा प्रश्न - सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले ?
बरोबर उत्तर आहे, सन 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आले

तिसरा प्रश्न - पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, लाला लाजपत राय यांना पंजाब केसरी म्हणून ओळखले जाते.

चौथा प्रश्न - सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करत असताना कोणाचा मृत्यू झाला ?
बरोबर उत्तर आहे, सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करत असताना लाला लाजपत राय यांचा मृत्यू झाला.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - भगतसिंग यांनी कोणती घोषणा देऊन तरुणांना जागृत केले ?
बरोबर उत्तर आहे - भगतसिंग यांनी “इन्कलाब जिंदाबाद” ही घोषणा देऊन तरुणांना जागृत केले. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Saturday, 21 March 2026

जागतिक कविता दिवस - 21 मार्च ( World Poem Day )

     जागतिक कविता दिनानिमित्त 
" मनातील भावनांना वाट मोकळे करून देणारे शब्द म्हणजे कविता "

।। शुभेच्छा ।।

कवींच्या कवितेला शुभेच्छा
कवयित्रींच्या कवनाला शुभेच्छा
वारकरीच्या भजनाला शुभेच्छा
कबिरांच्या दोह्याला शुभेच्छा

तमाशातल्या लावणीला शुभेच्छा
नाटकातील पद्याला शुभेच्छा
चित्रपटातील गाण्याला शुभेच्छा
शाहिराच्या पोवाड्याला शुभेच्छा

तुकारामाच्या अभंगाला शुभेच्छा
ज्ञानेश्वरांच्या ओव्याला शुभेच्छा
एकनाथांच्या भारुड्याला शुभेच्छा
रामदासांच्या दासबोधाला शुभेच्छा

महात्मा फुलेंच्या अखंडला शुभेच्छा
सावित्रीबाईंच्या बावनकशीला शुभेच्छा
काव्य रचणाऱ्या कवीमनाला शुभेच्छा
काव्य वाचणाऱ्या वाचकांना शुभेच्छा 

- नासा येवतीकर, येवती
ता. धर्माबाद जि. नांदेड 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
।। कविता ।।

शब्द हेच धन शब्द हेच मन
शब्दामुळेच जिवंत आहे तन

कवितेतील शब्द बोलाविते मला
कवितेतील शब्द जगविते मला

कवितेमध्येच गुंतला माझा प्राण
कवितेनेच दिलाय मान सन्मान

- नासा येवतीकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
।। कविता ।।

शब्दांमागून शब्द आले
मनात आले लिहीत गेलो
अनुभवाचे काही विचार
काव्यामधून व्यक्त केलो

कमी शब्दांत जास्त विचार
कवितेतून होतो साकार
आपल्या मनातील भावनांना
कवी कवितेतून देतो आकार

शब्द हेच त्यांचे धन
शब्द हीच त्यांची संपत्ती
शब्दांचे भाव जोडले की
होते नव्या कवितेची उत्पत्ती

कविता वाचायला सोपी पण
समजायला अवघड असते
शब्दांमधून उतरलेल्या भावना
कवींचे हळवे मन सांगते

- नासा येवतीकर, 9423625769
21 मार्च 2020 @ 08:02 pm
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
।। कविता ।।

कविता कशी करावी ?
साधी करावी, सोपी करावी
दुसऱ्यांना समजेल अन
उमजेल अशी करावी

कविता कोठे करावी ?
घरात करावी, बाहेर करावी
ज्याठिकाणी सुचत असेल
त्याठिकाणी लगेच करावी

कविता कोणावर करावी ?
आई वर करावी
बायको वर करावी
जीवापाड प्रेम करणाऱ्या
जुन्या प्रेयसीवर करावी

कविता का करावी ?
मन समाधानासाठी करावी
कुणाचे तरी दुःख दूर
सारण्यासाठी करावी

- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
जागतिक कविता दिनानिमित्त सर्व कवी व कवयित्री यांना मनापासून शुभेच्छा ....!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगणे कसे असावे ? 

जगतात किडे मुंगी ही
जगण्याला अर्थ असावे
आपले जगणे कसे असावे ?

कोणी आठवण काढेल
आपले काम असे असावे
आपले जगणे कसे असावे

चार माणसात नाव निघेल
आपले वागणे असे असावे
आपले जगणे कसे असावे ?

कुणालाही दुखावणार नाही
आपले बोलणे असे असावे
आपले जगणे कसे असावे ?

डोक्यात उच्च विचार ठेवावे
आपले राहणे असे असावे
आपले जगणे कसे असावे ?

शंभर दिवस शेळी होण्यापेक्षा
एक दिवस सिंहासारखे जगावे
आपले जगणे कसे असावे ?

- नासा येवतीकर, येवती
ता. धर्माबाद जि. नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कविता - जीवनगाणे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
........ कविता ........

जो तो उठतो नि करतो कविता
म्हणतो सर्वाना कशी वाटली कविता

चार दोन शब्दाची करतो कविता
म्हणतो माझा प्राण आहे कविता

कवींचे मन सांगत असते कविता
कवींच्या भावना कळवते कविता

मनोरंजनासाठी वाचावी का कविता ?
विरंगुळा म्हणून लिहावी का कविता ?

सर्वाना हवीहवीशी वाटते कविता
मनातल्या भावना व्यक्त करते कविता

- नासा@26
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आज जागतिक कविता दिवस त्यानिमित्ताने दोन शब्द .......
साहित्यिक मित्रांनो, कुणाचे साहित्य चोरी करू नका. इतरांचे साहित्य आवडले असेल तर प्रामाणिकपणे त्यांच्या नावासकट पुढे पाठवत राहावे. स्वनिर्मिती मध्ये जो आनंद असतो तो आनंद साहित्य चोरी करून आपल्या नावाने publish करण्यात कधीच नसते. म्हणून सध्याच्या काळात जी साहित्याची चोरी जे की फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ती थांबवू या, एवढीच विनंती .........!

जागतिक कविता दिनानिमित्त वरील कविता आवडली तर मनातून शुभेच्छा द्या 
....... धन्यवाद ....

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769



Wednesday, 18 March 2026

दिनविशेष माहिती - 20 मार्च ( World Sparrow Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 20 मार्च अर्थात जागतिक चिमणी दिवस त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण चिमणी या पक्ष्याविषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

        जागतिक चिमणी दिवस

World Sparrow Day हा दिवस दरवर्षी २० मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे चिमण्यांचे संरक्षण करणे आणि लोकांमध्ये त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. एकेकाळी घराच्या अंगणात आणि शहरांमध्ये सहज दिसणारी चिमणी आज अनेक ठिकाणी दिसेनासी झाली आहे. म्हणून ग. दि. माडगूळकर यांचे गाणे या चिमण्यांनो, परत फिरा रे.... घराकडे आपुल्या..... हे आजच्या दिवसाला तंतोतंत लागू होते.
निसर्गाची ओळख आपणाला प्रथम चिमणीपासूनच होते. एक घास चिऊचा... सांगतच आपली आई आपणास एक-एक घास भरवते. लहानपणी याच चिमणीला पाहून आपणाला खूप खूप आनंद ही होत असे, नाही का !
पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी पाळला गेला. याची सुरुवात भारतातील Nature Forever Society या संस्थेने केली. या उपक्रमामागे भारतीय पर्यावरणप्रेमी Mohammed Dilawar यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी चिमण्यांचे संरक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती केली.
चिमणी हा एक छोटा आणि सुंदर पक्षी आहे. चिमणीचा रंग साधारणतः तपकिरी व करडा असतो. ती मानवी वसाहतीच्या आसपास, घरांच्या छपरांमध्ये किंवा झाडांवर घरटे बांधते. चिमणी प्रामुख्याने धान्य, किडे आणि बिया खाते. चिमणी पर्यावरणासाठी उपयुक्त आहे कारण ती किडे खाऊन संतुलन राखते. तिचा चिवचिवाट खूप मधुर असतो. तिच्यामुळे कोणाचे नुकसान होत नाही.
विशेषतः House Sparrow ही प्रजाती भारतात मोठ्या प्रमाणावर आढळते. मात्र वाढते शहरीकरण, अंगणाची कमतरता, झाडांची कमी झालेली संख्या आणि घरांच्या रचना यात बदल झाल्यामुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे.
जागतिक चिमणी दिवस आपल्याला निसर्ग आणि पक्ष्यांचे महत्त्व समजावून देतो. चिमण्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपण झाडे लावणे, घरट्यांची व्यवस्था करणे आणि पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे यासारखे छोटे प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - चिमणीचा आवाज कसा असतो ?
बरोबर उत्तर आहे, चिव चिव हा चिमणीचा आवाज आहे. 

दुसरा प्रश्न - पहिला जागतिक चिमणी दिवस केव्हा पाळला होता ?
बरोबर उत्तर आहे, पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी पाळला गेला.

तिसरा प्रश्न - जागतिक चिमणी दिवस उपक्रमामागे कोणाचे मोठे योगदान आहे ?
बरोबर उत्तर आहे, जागतिक चिमणी दिवस उपक्रमामागे भारतीय पर्यावरणप्रेमी Mohammed Dilawar यांचे मोठे योगदान आहे.

चौथा प्रश्न - चिमणीचा रंग कसा असतो ?
बरोबर उत्तर आहे, चिमणीचा रंग साधारणतः तपकिरी व करडा असतो.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - या चिमण्यांनो, परत फिरा रे...... हे गीत कुणी लिहिले ?
बरोबर उत्तर आहे - या चिमण्यांनो, परत फिरा रे...... हे गीत कवी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले आहे. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Tuesday, 17 March 2026

दिनविशेष माहिती - 18 मार्च ( Rudolf Diesel )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण डिझेल इंजिनचा शोध लावणारे संशोधक रुडॉल्फ डिझेल यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

              रुडॉल्फ डिझेल
रुडॉल्फ डिझेल हे जर्मन अभियंता आणि संशोधक होते. त्यांनी डिझेल इंजिन या महत्त्वपूर्ण शोधाचा शोध लावला. त्यांच्या या शोधामुळे वाहतूक, उद्योग आणि शेती क्षेत्रात मोठी क्रांती घडली.
रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म १८ मार्च १८५८ रोजी पॅरिस येथे झाला. त्यांचे आई-वडील जर्मन वंशाचे होते. लहानपणापासूनच त्यांना विज्ञान आणि यंत्रांबद्दल खूप उत्सुकता होती. पुढे त्यांनी जर्मनीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.
त्या काळात वापरल्या जाणाऱ्या इंजिनांची कार्यक्षमता कमी होती. त्यामुळे कमी इंधनात जास्त शक्ती निर्माण करणारे इंजिन तयार करण्याचा विचार रुडॉल्फ डिझेल यांनी केला. अनेक वर्षांच्या प्रयोगांनंतर त्यांनी १८९७ साली पहिले यशस्वी डिझेल इंजिन तयार केले. या इंजिनात इंधन जाळण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे ते अधिक शक्तिशाली आणि किफायतशीर ठरले.
डिझेल इंजिनचा वापर पुढे ट्रक, बस, जहाजे, रेल्वे आणि विविध यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्यामुळे उद्योग आणि वाहतूक क्षेत्राचा विकास अधिक वेगाने झाला.
रुडॉल्फ डिझेल यांचे १९१३ मध्ये निधन झाले. त्यांच्या शोधामुळे आजही जगभरातील लाखो वाहने आणि यंत्रे कार्यरत आहेत.
रुडॉल्फ डिझेल हे महान संशोधक होते. त्यांच्या डिझेल इंजिनाच्या शोधामुळे आधुनिक उद्योग आणि वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळाले. म्हणूनच त्यांचे नाव विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात कायम आदराने घेतले जाते.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म १८ मार्च १८५८ रोजी पॅरिस येथे झाला. 

दुसरा प्रश्न - रुडॉल्फ डिझेल यांनी कशाचा शोध लावला ?
बरोबर उत्तर आहे, रुडॉल्फ डिझेल यांनी डिझेल इंजिनचा शोध लावला. 

तिसरा प्रश्न - रुडॉल्फ डिझेल यांना लहानपणापासूनच कशाची उत्सुकता होती ?
बरोबर उत्तर आहे, रुडॉल्फ डिझेल यांना लहानपणापासूनच विज्ञान आणि यंत्रांबद्दल खूप उत्सुकता होती. 

चौथा प्रश्न - डिझेल इंजिनवर चालणाऱ्या काही यंत्राची नावे सांगा.
बरोबर उत्तर आहे, बस, ट्रक, ट्रॅक्टर, जेसीबी, बुलडोझर, जहाज, रोड रोलर, आणि डिझेल कार 

शेवटचा पाचवा प्रश्न - रुडॉल्फ डिझेल यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - रुडॉल्फ डिझेल यांचे २९  सप्टेंबर १९१३ मध्ये निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Monday, 16 March 2026

दिनविशेष माहिती - 17 मार्च ( Kalpna Chavala )

               नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

               कल्पना चावला
कल्पना चावला या अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिली महिला होती. त्यांच्या धाडस, मेहनत आणि जिद्दीमुळे त्या जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरल्या.
कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी हरियाणातील करनाल येथे झाला. त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय होते, आणि त्यांच्या वडिलांचा छोटा व्यवसाय होता. लहानपणापासूनच कल्पना यांना आकाश आणि तारे यांच्याबद्दल विशेष आकर्षण होते. रात्रीच्या वेळी त्या तासन्तास आकाशाकडे पाहत आणि तार्‍यांबद्दल स्वप्ने पाहत. त्यांच्या या स्वप्नांनीच त्यांना भविष्यात अंतराळवीर बनण्यासाठी प्रेरित केले. त्यांचे कुटुंबीय त्यांच्या या उत्साहाला नेहमीच पाठिंबा देत असे, ज्यामुळे त्यांना आपले ध्येय निश्चित करण्यात मदत झाली.
त्या लहानपणापासून अत्यंत हुशार आणि मेहनती होत्या. त्यांना गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये विशेष आवड होती. 
कल्पना यांनी चंदीगड येथील पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये पदविका प्राप्त केली, ज्यामुळे त्यांना अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याची संधी मिळाली. त्यांनी आपल्या शिक्षणादरम्यान अनेक अडचणींचा सामना केला, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. १९८८ मध्ये, कल्पना यांनी कोलोराडो विद्यापीठातून एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये पीएच.डी. पूर्ण केली. त्यांनी अनेक संशोधन प्रकल्पांवर काम केले, ज्यामुळे त्यांना नासा नॅशनल ऐरोनौटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९९४ मध्ये, कल्पना यांची नासाच्या अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी होती. 
१९९७ मध्ये, कल्पना यांना त्यांच्या पहिल्या अंतराळ मोहिमेची संधी मिळाली. २००३ मध्ये, कल्पना यांना दुसऱ्या अंतराळ मोहिमेची संधी मिळाली. त्या कोलंबिया अंतराळ यानाच्या STS-107 मोहिमेत सहभागी होत्या. ही मोहीम १६ जानेवारी २००३ रोजी सुरू झाली. १६ दिवस चाललेल्या या मोहिमेत त्यांनी अंतराळात सुमारे ३८२ तास घालवले आणि पृथ्वीभोवती २५५ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. पण दुर्दैवाने १ फेब्रुवारी २००३ रोजी पृथ्वीवर परत येताना कोलंबिया अंतराळ यानाचा अपघात झाला आणि त्यातील सात अंतराळविरांचा मृत्यू झाला. त्यात कल्पना चावलाचाही समावेश होता. 
कल्पना यांचे जीवन म्हणजे एका सामान्य मुलीने असामान्य यश मिळवण्याची कहाणी आहे. 
आज कल्पना चावला यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - कल्पना चावला यांचा कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी हरियाणातील करनाल येथे झाला. 

दुसरा प्रश्न - अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिली महिला कोण ?
बरोबर उत्तर आहे, अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिली महिला होती.

तिसरा प्रश्न - कल्पना चावला यांना कोणत्या विषयांमध्ये विशेष आवड होती ?
बरोबर उत्तर आहे, गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये कल्पना चावला यांना विशेष आवड होती. 

चौथा प्रश्न - कल्पना चावला यांना पहिल्या अंतराळ मोहिमेची संधी केव्हा मिळाली ?
बरोबर उत्तर आहे, कल्पना चावला यांना १९९७ मध्ये पहिल्या अंतराळ मोहिमेची संधी मिळाली.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - कल्पना चावला यांचा मृत्यू झाला ?
बरोबर उत्तर आहे - कोलंबिया अंतराळ यानाच्या अपघातात दिनांक १ फेब्रुवारी २००३ रोजी कल्पना चावला यांचा मृत्यू झाला. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Sunday, 15 March 2026

दिनविशेष माहिती - 16 मार्च ( Malhar Rao Holkar

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण मल्हारराव होळकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर

मल्हारराव होळकर हे मराठा साम्राज्यातील एक पराक्रमी सरदार आणि होळकर घराण्याचे संस्थापक होते. त्यांच्या शौर्य, कर्तृत्व आणि दूरदृष्टीमुळे मराठा साम्राज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला.
मल्हारराव होळकर यांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील होळ या गावात धनगर समाजातील खंडोजी होळकर आणि सीताबाई होळकर यांच्या पोटी झाला. गावावरून त्यांचे नाव होळकर असे झाले. बालपणापासूनच मल्हारराव धाडसी, कष्टाळू आणि युद्धकौशल्यात पारंगत होते. मल्हारराव तीन वर्षाचे असताना वडिलांचे मृत्यू झाले. त्यामुळे ते आपल्या आईसोबत मामाच्या गावी खानदेशात तळोदे येथे गेले. त्यामुळे मामाकडेच मल्हाररावांना लष्करात नोकरी मिळाली. १७२० मधील पेशवे-निजाम संघर्षात मल्हाररावांची कामगिरी पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या लक्षात आली. बाजीरावांनी मल्हाररावांचे धाडस पाहून त्यांना स्वतःच्या घोड-दळात घेतले. त्यामुळे मल्हाररावांच्या जीवनास कलाटणी मिळाली. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना लवकरच मोठे पद मिळाले. मल्हाररावांनी उत्तर भारतात अनेक मोहिमा केल्या आणि मराठा साम्राज्याचा प्रभाव वाढविण्यात मोठी भूमिका बजावली. मल्हाररावांनी त्यांच्या आयुष्यात लहानमोठ्या एकंदर बावन्न लढाया मध्ये भाग घेतला.
मल्हारराव होळकर यांनी मध्य भारतातील इंदूर परिसरात आपले राज्य मजबूत केले. त्यामुळे होळकर घराण्याचा पाया भक्कम झाला. मल्हाररावांच्या पत्नी गौतमीबाई यांच्यापासून झालेले एकुलते एक पुत्र म्हणजे खंडेराव. दीगजवळच्या कुंभेरीच्या वेढ्यात तोफेचा गोळा लागून खंडेराव मरण पावले. त्यावेळी त्यांची सुन अहिल्याबाई होळकर यांना सती जाण्यापासून मल्हाररावांनी परावृत्त केले आणि राज्याची सर्व धुरा त्यांच्यावर टाकली. अहिल्याबाई होळकर यांनी अतिशय न्यायी आणि उत्तम प्रकारे कारभार चालवला.
मल्हाररावांनी १७६३ मधील राक्षसभुवनच्या लढाईत माधवरावांसोबत निजामाचा पराभव करून पानिपतच्या पराभवाने खचलेल्या मराठा मंडळास संजीवनी दिली. मल्हारराव होळकर हे फक्त शूर योद्धेच नव्हते तर कुशल प्रशासकही होते. त्यांनी प्रजेची काळजी घेतली, व्यापार आणि शेतीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांना लोकांचा मोठा आदर मिळाला.
२० मे १७६६ रोजी मल्हारराव होळकर यांचे निधन झाले. परंतु त्यांच्या शौर्यपूर्ण कार्यामुळे त्यांचे नाव मराठा इतिहासात कायम अजरामर झाले आहे.
आज मल्हारराव होळकर यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांना कोटी कोटी प्रणाम ! 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - मल्हारराव होळकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, मल्हारराव होळकर यांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील होळ या गावात झाला.

दुसरा प्रश्न - मल्हारराव होळकर यांच्या एकुलता एक मुलाचे नाव काय होते ? 
बरोबर उत्तर आहे, मल्हारराव होळकर यांच्या एकुलता एक मुलाचे नाव खंडेराव असे होते.

तिसरा प्रश्न - मल्हारराव होळकर यांच्या सूनबाईचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, मल्हारराव होळकर यांच्या सूनबाईचे नाव अहिल्यादेवी होळकर असे होते

चौथा प्रश्न - मल्हाररावांनी किती लढाया मध्ये भाग घेतला ?
बरोबर उत्तर आहे, मल्हाररावांनी त्यांच्या आयुष्यात लहानमोठ्या एकंदर बावन्न लढाया मध्ये भाग घेतला.

शेवटचा पाचवा प्रश्न - मल्हारराव होळकर यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - मल्हारराव होळकर यांचे २० मे १७६६ रोजी निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Friday, 13 March 2026

दिनविशेष माहिती - 14 मार्च ( Albert Einstein )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

             अल्बर्ट आईनस्टाईन
 अल्बर्ट आईनस्टाईन हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी आधुनिक भौतिकशास्त्राच्या विकासात मोठे योगदान दिले. त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडून आली. त्यामुळे ते जगातील सर्वात महान शास्त्रज्ञांपैकी एक मानले जातात.
अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म १४ मार्च १८७९ रोजी जर्मनीतील उल्म शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हर्मन आईनस्टाईन आणि आईचे नाव पॉलीन आईनस्टाईन होते. लहानपणी ते शांत आणि विचारशील स्वभावाचे होते. त्यांना गणित आणि विज्ञान विषयांची विशेष आवड होती.
आईनस्टाईन यांनी आपले शिक्षण स्वित्झर्लंडमधील झुरिच येथील पॉलिटेक्निक संस्थेत घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ स्विस पेटंट कार्यालयात नोकरी केली. नोकरी करत असतानाच त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण संशोधनकार्य केले.
१९०५ हे वर्ष आईनस्टाईन यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या वर्षाला “चमत्कारिक वर्ष” असेही म्हणतात. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाचे शोध मांडले.
त्यांपैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे सापेक्षतावादाचा सिद्धांत (Theory of Relativity). यामध्ये त्यांनी E = mc² हे प्रसिद्ध सूत्र मांडले. या सूत्रानुसार ऊर्जा आणि वस्तुमान यांचा संबंध स्पष्ट केला गेला.
त्यांनी प्रकाशाच्या स्वरूपावरही संशोधन केले आणि फोटोइलेक्ट्रिक परिणाम याचे स्पष्टीकरण दिले.
अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या महान संशोधनासाठी त्यांना १९२१ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती झाली.
आईनस्टाईन अत्यंत साधे आणि विनम्र स्वभावाचे होते. त्यांना संगीताची विशेष आवड होती आणि ते व्हायोलिन वाजवत असत. ते शांतता, मानवता आणि विज्ञानाच्या प्रगतीसाठी आयुष्यभर प्रयत्नशील राहिले.
अल्बर्ट आईनस्टाईन यांचे निधन १८ एप्रिल १९५५ रोजी अमेरिकेतील प्रिन्स्टन येथे झाले. त्यांच्या संशोधनामुळे आधुनिक विज्ञानाला नवे दिशा मिळाली.
Pi Day हा गणिताशी संबंधित एक विशेष दिवस आहे. हा दिवस दरवर्षी १४ मार्च (3/14) रोजी साजरा केला जातो. कारण गणितातील महत्त्वाचा स्थिरांक π (पाय) याची किंमत साधारणपणे 3.14 इतकी असते. म्हणून 3/14 ही तारीख पायच्या मूल्याशी जुळते आणि हा दिवस “Pi Day” म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे १४ मार्च हा महान शास्त्रज्ञ Albert Einstein यांचा जन्मदिवसही आहे, त्यामुळे या दिवसाला आणखी विशेष महत्त्व आहे.
अल्बर्ट आईनस्टाईन हे जगातील महान शास्त्रज्ञ होते. त्यांची आज जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 🙏


मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म १४ मार्च १८७९ रोजी जर्मनीतील उल्म शहरात झाला.

दुसरा प्रश्न - अल्बर्ट आईनस्टाईन यांना कोणत्या विषयांची विशेष आवड होती ?
बरोबर उत्तर आहे, अल्बर्ट आईनस्टाईन यांना गणित आणि विज्ञान विषयांची विशेष आवड होती.

तिसरा प्रश्न - अल्बर्ट आईनस्टाईन यांना कोणता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ?
बरोबर उत्तर आहे, अल्बर्ट आईनस्टाईन यांना १९२१ या वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

चौथा प्रश्न - दरवर्षी १४ मार्च हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे,  दरवर्षी १४ मार्च हा दिवस पाय डे म्हणून साजरा केला जातो

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - अल्बर्ट आईनस्टाईन यांचे निधन कोठे झाले ?
बरोबर उत्तर आहे - अल्बर्ट आईनस्टाईन यांचे १८ एप्रिल १९५५ रोजी अमेरिकेतील प्रिन्स्टन येथे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Thursday, 12 March 2026

दिनविशेष माहिती - 13 मार्च ( Nana Fadanavis )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. 

आजच्या कार्यक्रमात आपण मराठा साम्राज्याचे चाणक्य नाना फडणवीस यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

                नाना फडणवीस
नाना फडणवीस हे मराठा साम्राज्यातील अत्यंत कुशल राजकारणी, मुत्सद्दी आणि प्रशासक होते. त्यांचे मूळ नाव बाळाजी जनार्दन भानू असे होते. मराठा साम्राज्याच्या प्रशासनात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि मुत्सद्देगिरीमुळे त्यांना “मराठा साम्राज्याचे चाणक्य” असे म्हटले जाते.
नाना फडणवीस यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जनार्दन भानू होते. लहानपणापासूनच नाना फडणवीस अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी प्रशासन, राजकारण आणि अर्थकारभाराचे उत्तम शिक्षण घेतले.
नाना फडणवीस यांनी पेशव्यांच्या दरबारात महत्त्वाची भूमिका बजावली. ते पेशवा माधवराव प्रथम यांच्या काळात प्रशासनात पुढे आले. त्यांनी राज्याच्या अर्थकारभाराची जबाबदारी अत्यंत कुशलतेने सांभाळली.
पेशवा नारायणराव यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यावर संकट आले. त्या वेळी नाना फडणवीस यांनी इतर सरदारांच्या मदतीने बारभाई मंडळ स्थापन केले आणि राज्यकारभार सांभाळला. त्यांच्या मुत्सद्देगिरीमुळे मराठा साम्राज्य टिकून राहिले.
नाना फडणवीस अत्यंत चतुर आणि दूरदृष्टीचे राजकारणी होते. त्यांनी इंग्रज, निजाम आणि इतर शक्तींशी संबंध ठेवताना अत्यंत सावध आणि कुशल धोरण अवलंबले. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे मराठा साम्राज्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहिला.
नाना फडणवीस हे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय व्यक्ती होते. त्यांनी राज्याच्या हितासाठी आयुष्यभर परिश्रम घेतले. त्यांची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध होती.
नाना फडणवीस यांचे १३ मार्च १८०० रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली.
 मराठा साम्राज्यातील अत्यंत प्रभावी आणि बुद्धिमान मुत्सद्दी मराठा साम्राज्याचे चाणक्य नाना फडणवीस यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने कोटी कोटी प्रणाम.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - नाना फडणवीस यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, नाना फडणवीस यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला.

दुसरा प्रश्न - नाना फडणवीस यांचे मूळ नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, नाना फडणवीस यांचे मूळ नाव बाळाजी जनार्दन भानू असे होते. 

तिसरा प्रश्न - बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि मुत्सद्देगिरीमुळे नाना फडणवीस यांना काय म्हटले जाते ?
बरोबर उत्तर आहे, बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि मुत्सद्देगिरीमुळे नाना फडणवीस यांना “मराठा साम्राज्याचे चाणक्य” असे म्हटले जाते.

चौथा प्रश्न - नाना फडणवीस यांनी इतर सरदारांच्या मदतीने कोणते मंडळ स्थापन केले ?
बरोबर उत्तर आहे, नाना फडणवीस यांनी इतर सरदारांच्या मदतीने बारभाई मंडळ स्थापन केले.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - नाना फडणवीस यांचे निधन कोठे झाले ?
बरोबर उत्तर आहे - नाना फडणवीस यांचे १३ मार्च १८०० रोजी पुणे येथे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Wednesday, 11 March 2026

दिनविशेष माहिती - मार्च ( Dinvishesh - March )

मार्च महिन्यातील सर्व दिनविशेष एकत्रित 
फक्त दिनांकावर clik करावे आणि त्या दिवसाचे महत्व जाणून घ्यावे. 












या दिनविशेष माहिती उपक्रमा विषयी आपले अभिप्राय खालील Feedback वर clik करून द्यावे. 


धन्यवाद.......! 

आपलाच 
नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 12 मार्च ( Yashwantrao Chavhan )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आजच्या कार्यक्रमात आपण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

              यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारतातील एक दूरदृष्टीचे राजकारणी होते. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील देवगड (कराड परिसर) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बळवंतराव चव्हाण आणि आईचे नाव विठाबाई चव्हाण होते. लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या आईने अत्यंत कष्ट करून त्यांचे संगोपन केले आणि शिक्षण दिले.
यशवंतराव चव्हाण तरुणपणापासूनच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. त्यांनी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. या आंदोलनामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. स्वातंत्र्यलढ्यातील या योगदानामुळे त्यांना लोकांचा मोठा आदर मिळाला.
स्वातंत्र्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळाली.
मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांनी शिक्षण, शेती, सहकार चळवळ आणि औद्योगिक विकास यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचा मजबूत पाया घातला गेला.
यशवंतराव चव्हाण यांनी केंद्र सरकारमध्येही अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. ते भारताचे संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री
या पदांवर कार्यरत होते. त्यांनी देशाच्या संरक्षण आणि विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले.
यशवंतराव चव्हाण हे उत्तम लेखकही होते. त्यांनी काही पुस्तके लिहिली. त्यांपैकी “कृष्णाकाठ” हे आत्मचरित्र विशेष प्रसिद्ध आहे. या पुस्तकातून त्यांच्या जीवनप्रवासाची माहिती मिळते.
निधन
यशवंतराव चव्हाण यांचे निधन २५ नोव्हेंबर १९८४ रोजी नवी दिल्ली येथे झाले. त्यांच्या कार्यामुळे ते महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे नेते म्हणून स्मरणात आहेत.
यशवंतराव चव्हाण हे दूरदृष्टीचे, लोकाभिमुख आणि प्रामाणिक नेते होते. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विचारांतून आजही अनेकांना प्रेरणा मिळते.
आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती त्यानिमित्ताने कोटी कोटी प्रणाम 🙏

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
बरोबर उत्तर आहे, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.

दुसरा प्रश्न - यशवंतराव चव्हाण यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील देवगड (कराड परिसर) येथे झाला. 

तिसरा प्रश्न - यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेल्या आत्म चरित्राचे नाव सांगा. 
बरोबर उत्तर आहे - कृष्णाकाठ” हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांनी लिहिले आहे. 

चौथा प्रश्न - महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?
बरोबर उत्तर आहे, १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - यशवंतराव चव्हाण यांचे निधन कोठे झाले ?
बरोबर उत्तर आहे, यशवंतराव चव्हाण यांचे निधन २५ नोव्हेंबर १९८४ रोजी नवी दिल्ली येथे झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Tuesday, 10 March 2026

दिनविशेष माहिती - 11 मार्च ( Chatrpati Sambhaji Maharaj )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

छत्रपती संभाजी राजे भोसले
छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती. ते अत्यंत पराक्रमी, विद्वान आणि स्वाभिमानी राजे म्हणून इतिहासात ओळखले जातात. कठीण परिस्थिती मध्ये ही त्यांनी मराठा साम्राज्याचे रक्षण केले आणि मुघल सम्राट औरंगजेब याच्या विरोधात धैर्याने लढा दिला.
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ पुत्र होते. त्यांच्या आईचे नाव सईबाई होते. लहानपणीच त्यांची आई वारल्यामुळे त्यांचे संगोपन प्रामुख्याने राजमाता जिजाबाई यांच्या देखरेखीखाली झाले.
संभाजी महाराज अत्यंत बुद्धिमान होते. त्यांना संस्कृत, फारसी आणि मराठी भाषांचे चांगले ज्ञान होते. त्यांनी लहान वयातच राजकारण, युद्धकला आणि प्रशासनाचे शिक्षण घेतले.
इ.स. १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले. राज्याभिषेकानंतर त्यांनी मुघल, सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्याविरुद्ध धैर्याने संघर्ष केला.
मुघल सम्राट औरंगजेबाने मराठा साम्राज्य संपविण्याचा प्रयत्न केला, पण संभाजी महाराजांनी त्याला कठोर प्रतिकार केला. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा साम्राज्य टिकून राहिले.
संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते तर ते विद्वानही होते. लहानपणीच कवी कलश, महाकवी भूषण यांसारख्या विद्वानांच्या संपर्कात आल्याने संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत ’बुधभूषण’ हा ग्रंथ, तर ब्रज भाषेत ’नायिकाभेद’, ’नखशिख’ आणि ’सातसतक’ हे ग्रंथ लिहिले.
इ.स. १६८९ मध्ये संगमेश्वर येथे मुघल सैन्याने संभाजी महाराजांना पकडले. औरंगजेबाने त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकला, पण संभाजी महाराजांनी आपल्या धर्माचा आणि स्वाभिमानाचा त्याग करण्यास नकार दिला. म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर असे ही म्हटले जाते.
त्यामुळे औरंगजेबाने ११ मार्च १६८९ रोजी तुळापूर येथे त्यांची क्रूर हत्या केली. त्यांच्या या बलिदानामुळे ते इतिहासात महान आणि अजरामर ठरले.
अतिशय हुशार, कर्तबगार, दूरदृष्टी, अनेक विद्या व कलांचे जाणकार व सर्वगुणसंपन्न असेच छत्रपती संभाजी महाराज यांचे व्यक्तिमत्त्व होते. अवघ्या ३२ वर्षांचे अवघे आयुष्य लाभलेले युवराज म्हणजे संभाजीराजे. त्यांचे पराक्रम, धैर्य आणि बलिदान आजही भारतीय इतिहासात प्रेरणादायी मानले जाते. ‘स्वधर्मे निधनो श्रेय: परधर्मो भयावह:’ चे आजन्म पालन करून मृत्यूस सामोरे जाणार्‍या धर्मवीर साहित्यमेरू शंभूराजांची आज पुण्यतिथी त्यानिमित्त शब्दकुसुमांजली ...

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.

दुसरा प्रश्न - छत्रपती संभाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होते ? 
बरोबर उत्तर आहे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज 

तिसरा प्रश्न - छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत बुधभूषण हा ग्रंथ लिहिला ?

चौथा प्रश्न - हिंदू धर्माचा त्याग करण्यास नकार दिल्याने छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर काय म्हटले जाते ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्यास नकार दिल्यामुळे धर्मवीर असे म्हटले जाते.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - मुघल सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना कोठे पकडले होते ?
बरोबर उत्तर आहे - संगमेश्वर येथे मुघल सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना पकडले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Sunday, 8 March 2026

दिनविशेष माहिती - 10 मार्च ( Mangesh Padgaonkar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
मुलांनो हे गीत ऐकू यां.... सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? 
हे गीत कुणी लिहिलं आहे ? माहित आहे का तुम्हांला........
तर हे गीत कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलं आहे तर आजच्या कार्यक्रमात आपण कवी मंगेश पाडगावकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

कवी मंगेश पाडगावकर

मंगेश पाडगांवकर हे मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय आणि मान्यवर कवी होते. त्यांच्या कवितांमध्ये प्रेम, निसर्ग, जीवनातील साध्या-सुंदर भावना आणि सामाजिक जाणीवा यांचे अत्यंत सुंदर चित्रण दिसते. साधी, गेय, नादमय आणि हृदयस्पर्शी शैली ही त्यांच्या कवितेची विशेषता होती. त्यामुळे त्यांच्या कविता सर्वसामान्य लोकांमध्येही खूप लोकप्रिय झाल्या.
मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केशव तर आईचे नाव रखमाबाई असे होते. लहानपणापासूनच त्यांना साहित्य आणि कवितेची आवड होती. त्यांनी आपले उच्च शिक्षण मुंबई येथे घेतले. पुढे त्यांनी काही काळ महाविद्यालयात अध्यापनही केले.
मंगेश पाडगावकर यांनी मराठी साहित्यात मोठे योगदान दिले. त्यांनी प्रेमकविता, बालकविता, गीत, अनुवाद आणि ललित लेखन अशा विविध प्रकारचे साहित्य निर्माण केले. त्यांच्या कवितांमध्ये साधेपणा, गोडवा आणि भावनांची खोली दिसून येते. त्यांच्या अनेक कवितांवर आधारित गीते मराठी संगीत विश्वात अत्यंत लोकप्रिय झाली. त्यांनी लिहिलेलं ' या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' हे गीत प्रत्येकजण गुणगुणल्याशिवाय राहत नाहीत. 
त्यामुळे ते केवळ कवीच नव्हे तर उत्कृष्ट गीतकार म्हणूनही ओळखले जातात. सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याशिवाय मंगेश पाडगावकर यांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांनी अनेक बालकविता आणि अनुवादित साहित्य देखील लिहिले आहे. 
मंगेश पाडगावकर यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. भारत सरकारकने त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला तर महाराष्ट्राने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. हे सन्मान त्यांच्या साहित्यिक योगदानाची पावती देतात.
टप टप करति आंगावरति प्राजक्ताची फुले
अश्या सुंदर नादमय रचना लिहिणाऱ्या कवी मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वात कधी ही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली.
मंगेश पाडगावकर आज आपल्यात नसले तरी त्यांचे साहित्य, कविता, गीते आपण नेहमी ऐकत असतो. मराठी साहित्य विश्वात त्यांचे कार्य अविस्मरणीय असे आहे. 
आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्य रचनेला त्रिवार सलाम 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - मंगेश पाडगावकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे झाला.

दुसरा प्रश्न - कोणत्या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ?
बरोबर उत्तर आहे, सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

तिसरा प्रश्न - कवी मंगेश पाडगावकर यांना भारत सरकाररने कोणता पुरस्कार देऊन सन्मान केला ?
बरोबर उत्तर आहे, कवी मंगेश पाडगावकर यांना भारत सरकारकने पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानकेला.

चौथा प्रश्न - सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? हे गीत कुणी लिहिले ?
बरोबर उत्तर आहे, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? हे गीत कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिले.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - कवी मंगेश पाडगावकर यांचे निधन कोठे झाले ?
बरोबर उत्तर आहे - कवी मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी मुंबई येथे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Saturday, 7 March 2026

दिनविशेष माहिती - 09 मार्च ( Kavi Yashwant )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण कवी यशवंत यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढारकर)

कवी यशवंत हे मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी होते. त्यांनी “यशवंत” या टोपणनावाने कविता लिहिल्या आणि मराठी कवितेला नवे सौंदर्य व भावस्पर्शी शैली दिली. त्यांच्या कवितांमध्ये प्रेम, देशभक्ती, सामाजिक जाणीव आणि मानवी भावना यांचे सुंदर चित्रण आढळते. त्यामुळे ते मराठी साहित्यातील महत्त्वाचे कवी मानले जातात.
कवी यशवंत यांचे पूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढारकर असे होते. त्यांचा जन्म ९ मार्च १८९९ रोजी सातारा जिल्ह्यातील तारळे (किंवा चाफळ परिसर) येथे झाला. सांगलीतील सिटी हायस्कूलमधून डिपार्टमेंट स्कूल फायनलच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. पुढे ते पुणे येथे नोकरीसाठी गेले. नोकरी करत असताना त्यांनी मराठी साहित्याचा अभ्यास केला. कवी माधव ज्यूलियन यांच्या सहवासात त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. पुण्यात राहात असताना ते ‘रविकिरण मंडळ’ या कवींच्या गटाशी जोडले गेले. या मंडळातील कवींनी महाराष्ट्रात काव्यवाचन कार्यक्रमांद्वारे मराठी कवितेचा प्रसार केला. यशवंत यांचा आवाज मधुर असल्यामुळे त्यांच्या काव्यवाचनाला मोठी लोकप्रियता मिळाली. कवी यशवंत यांना महाराष्ट्र कवी म्हणून गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते. काव्य ही एक उपासना आहे, ते एक व्रत आहे, अशी त्यांच्या मनाची धारणा होती. 
त्यांच्या कवितांमध्ये भावनांची तीव्रता, ओजस्वीपणा आणि साधी-सोप्या भाषेचा वापर दिसतो. त्यामुळे सामान्य लोकांनाही त्यांची कविता सहज समजते.
कवी यशवंत यांनी अनेक काव्यसंग्रह लिहिले. याशिवाय त्यांनी मुलांसाठीही काही कविता लिहिल्या. त्यांची घायाळ ही अनुवादीत कादंबरी खूप प्रसिद्ध झाली. सन १९२२ मध्ये लिहिलेल्या "आई' या कवितेतील गोडवा आजही कायम आहे. ते म्हणतात, 
आई म्हणोनि कोणी
आईस हाक मारी,
ती हाक येई कानी
मज होय शोककारी.
स्वामी तिन्ही जगांचा 
आईविना भिकारी
या ओळींमध्ये कवी यशवंत यांनी आईचे प्रेम, माया आणि तिचे महत्त्व अतिशय भावपूर्ण पद्धतीने व्यक्त केले आहे.
कवी यशवंत यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक सन्मान मिळाले. त्यांना ‘राजकवी’ हा किताब देण्यात आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा सन्मान दिला. सन १९५० मध्ये मुंबईत भरलेल्या ३३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 
कवी यशवंत यांचे २६ नोव्हेंबर १९८५ रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांनी आपल्या कवितांद्वारे मराठी साहित्य समृद्ध केले.
कवी यशवंत हे मराठी काव्यविश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी कवी होते. त्यांच्या कवितेत मानवी भावना, राष्ट्रप्रेम आणि समाजजीवनाचे वास्तव दिसते. साधी, गेय आणि भावस्पर्शी शैली ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे मराठी साहित्यात त्यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - कवी यशवंत यांचे पूर्ण नाव सांगा.
बरोबर उत्तर आहे, कवी यशवंत यांचे पूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढारकर असे होते.

दुसरा प्रश्न - कवी यशवंत कोणत्या संस्थानाचे राजकवी होते ?
बरोबर उत्तर आहे, कवी यशवंत बडोदा संस्थानाचे राजकवी होते.

तिसरा प्रश्न - खूप प्रसिद्ध झालेली कवी यशवंत यांनी अनुवादीत केलेल्या कादंबरीचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, घायाळ ही कवी यशवंत यांनी अनुवादीत केलेली कादंबरी खूप प्रसिद्ध झाली.

चौथा प्रश्न - सन १९५० मध्ये ३३ वे मराठी साहित्य संमेलन कोठे भरले होते ? 
बरोबर उत्तर आहे, सन १९५० मध्ये ३३ वे मराठी साहित्य संमेलन मुंबई येथे भरले होते. 

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - कवी यशवंत यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे - कवी यशवंत यांचा जन्म ९ मार्च १८९९ रोजी सातारा जिल्ह्यातील तारळे (किंवा चाफळ परिसर) येथे झाला.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

जागतिक महिला दिन - 08 मार्च ( World Womens Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण जागतिक महिला दिन याविषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

🌸 International Women's Day - जागतिक महिला दिन (८ मार्च)

दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन जगभरात साजरा केला जातो. हा दिवस स्त्रियांच्या अधिकारांचे, कर्तृत्वाचे आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण करून देणारा आहे. स्त्री-पुरुष समानता, महिलांचे हक्क आणि त्यांचे सशक्तीकरण याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक महिला दिनाची सुरुवात १९०८ साली अमेरिकेत झाली. त्या वेळी महिलांनी कामाचे तास कमी करावेत, चांगला पगार मिळावा आणि मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आंदोलन केले. त्यानंतर १९१० साली डेन्मार्कमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत दरवर्षी महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पुढे १९७५ साली संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृतपणे ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून मान्यता दिली.
समाजाच्या प्रगतीत महिलांचा मोठा वाटा आहे. शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, कला, उद्योग इत्यादी अनेक क्षेत्रांत महिलांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. तरीही अनेक ठिकाणी महिलांना भेदभाव, अन्याय आणि असमानतेला सामोरे जावे लागते. त्यामुळे महिला दिन हा स्त्रियांच्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा आणि समानतेचा संदेश देण्याचा दिवस आहे.
भारतातील अनेक महिलांनी समाजासाठी प्रेरणादायी व महान कार्य केले आहे.
छोटे बाळ पाठीशी बांधून इंग्रजाच्या विरुद्ध लढा देणारी झांशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व प्रेरणादायी व्यक्तिमत्व राजमाता जिजाऊ, ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून मुलींच्या शिक्षणाची चळवळ उभी केली अशी 
भारतातील पहिली महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, हिंदू मंदिरांची बांधणी आणि जीर्णोद्धार करणारी न्यायप्रिय राज्यकर्ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला अंतराळवीर, ज्यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल करणारी कल्पना चावला, जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदके जिंकून भारताचा गौरव वाढविणारी भारतीय महिला बॉक्सर मेरी कोम, भारतातील पहिली महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून भारताला अनेक पदके मिळवून देणारी भारताची प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा, ज्यांनी हजारो गाणी गाऊन भारतीय संगीताला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली अशी भारताची गानकोकिळा लता मंगेशकर, ज्यांनी शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा क्षेत्रात मोठे कार्य केले असे प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला बछेंद्री पाल आणि भारतातील पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू 
यांसारख्या अनेक महिलांनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करून मोठे यश मिळवले आणि देशाचा गौरव वाढवला आहे. यासोबतच घरोघरी दिवसरात्र राबणाऱ्या गृहिणीचे योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या महान कार्यामुळे आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणा मिळते.
जागतिक महिला दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नसून महिलांना समान हक्क, सन्मान आणि संधी देण्याची आठवण करून देणारा दिवस आहे. समाजाच्या विकासासाठी स्त्री-पुरुष समानता आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने महिलांचा आदर करावा, त्यांना शिक्षण व संधी द्याव्यात आणि त्यांचे सशक्तीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
✅ “जिथे स्त्रीचा सन्मान होतो, तिथेच समाजाची खरी प्रगती होते.”
 “स्त्रीशक्ती हीच राष्ट्रशक्ती” हे या दिवसाचे खरे सार आहे. समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचा सन्मान आणि सहभाग आवश्यक आहे. 🌷
जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनीना खूप खूप शुभेच्छा .......!

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - जागतिक महिला दिनाची सुरुवात कोठे झाली ?
बरोबर उत्तर आहे, जागतिक महिला दिनाची सुरुवात अमेरिकेत झाली.

दुसरा प्रश्न - भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून कोणास ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, आनंदीबाई जोशी यांना भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखले जाते ,

तिसरा प्रश्न - अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला अंतराळवीर कोण ?
बरोबर उत्तर आहे, कल्पना चावला अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला अंतराळवीर होय. 

चौथा प्रश्न - भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या ?
बरोबर उत्तर आहे, सरोजिनी नायडू  हे भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - मेरी कोम ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
बरोबर उत्तर आहे - मेरी कोम ही खेळाडू बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Friday, 6 March 2026

सच्चिदानंद हिराचंद वात्सायन जयंती - 7 मार्च ( Adney )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हिंदी साहित्यिक सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

सच्चिदानंद हिरानंद वात्सायन (अज्ञेय)
सच्चिदानंद हिरानंद वात्सायन हे ‘अज्ञेय’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले हिंदी साहित्यातील नामवंत कवी, कादंबरीकार, पत्रकार, संपादक आणि विचारवंत होते. आधुनिक हिंदी साहित्यात ‘नवकाव्य’ चळवळीचे ते एक प्रमुख प्रवर्तक मानले जातात.
त्यांचा जन्म ७ मार्च १९११ रोजी उत्तर प्रदेशातील कुशीनगर (त्या काळी देवरिया जिल्हा) येथे झाला. त्यांचे वडील पुरातत्त्वज्ञ असल्यामुळे लहानपणी त्यांना विविध ठिकाणी राहण्याची संधी मिळाली. त्यांनी विज्ञान शाखेत शिक्षण घेतले; परंतु पुढे त्यांची ओढ साहित्याकडे वळली.
तरुणपणी त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. क्रांतिकारक कार्यात सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. तुरुंगातील काळात त्यांनी लेखनास सुरुवात केली.
अज्ञेय यांनी कविता, कादंबरी, कथा, निबंध आणि संपादन या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. त्यांची एक रचना 
यह दीप अकेला जलता है,
अँधियारा दूर भगाता है।
जो खुद जलकर रोशनी दे,
वही जग को राह दिखाता है।
अश्या अनेक सुंदर रचना प्रसिद्ध आहेत. 
त्यांची ‘शेखर : एक जीवनी’ ही प्रसिद्ध कादंबरी हिंदी साहित्यातील मैलाचा दगड मानली जाते.
‘हरी घास पर क्षणभर’, ‘आँगन के पार द्वार’ यांसारख्या काव्यसंग्रहांनी आधुनिक काव्याला नवे रूप दिले.
त्यांच्या लेखनात व्यक्तिस्वातंत्र्य, अंतर्मनातील संघर्ष, निसर्गप्रेम आणि तत्त्वचिंतन यांचा प्रभाव दिसून येतो.
अज्ञेय यांनी ‘तार सप्तक’ या काव्यसंग्रहाचे संपादन करून नवोदित कवींना व्यासपीठ दिले. आधुनिकतेचा विचार, प्रयोगशीलता आणि भाषेतील नवता हे त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य आहे.
त्यांना सन १९७९ साली ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांचे ४ एप्रिल १९८७ रोजी निधन झाले.
सच्चिदानंद हिरानंद वात्सायन (अज्ञेय) हे आधुनिक हिंदी साहित्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या साहित्याने हिंदी काव्य आणि कादंबरीला नवे दिशा-दर्शन दिले. प्रयोगशीलता आणि विचारांची खोली यामुळे ते आजही वाचकांना प्रेरणा देतात.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - सच्चिदानंद हिरानंद वात्सायन हे कोणत्या टोपणनावाने प्रसिद्ध होते ? 
बरोबर उत्तर आहे, सच्चिदानंद हिरानंद वात्सायन हे ‘अज्ञेय’ या टोपणनावाने प्रसिद्ध होते. 

दुसरा प्रश्न - सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांचा जन्म ७ मार्च १९११ रोजी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे झाला.

तिसरा प्रश्न - सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांची हिंदी साहित्यातील मैलाचा दगड ठरलेली प्रसिद्ध कादंबरी कोणती ?
बरोबर उत्तर आहे, ‘शेखर : एक जीवनी’ ही सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांची हिंदी साहित्यातील मैलाचा दगड ठरलेली प्रसिद्ध कादंबरी आहे.

चौथा प्रश्न - सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांनी कोणत्या काव्यसंग्रहाचे संपादन करून नवोदित कवींना व्यासपीठ दिले ?
बरोबर उत्तर आहे, सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांनी ‘तार सप्तक’ या काव्यसंग्रहाचे संपादन करून नवोदित कवींना व्यासपीठ दिले. 

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
बरोबर उत्तर आहे - सन १९७९ मध्ये सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Wednesday, 4 March 2026

राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस - 6 मार्च ( National Dentist Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस याविषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

🦷 National Dentist Day - राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस
दरवर्षी 6 मार्च रोजी राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस साजरा केला जातो. हा दिवस दंतचिकित्सकांच्या मेहनतीला आणि योगदानाला सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. दंतचिकित्सक केवळ दातांची देखभालच करत नाहीत, तर तोंडाच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतात. तोंडाचे आरोग्य हे संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
दात हे केवळ अन्न चावण्यासाठी नसून, बोलताना उच्चार स्पष्ट होण्यासाठी, चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी, पचन क्रिया सुलभ करण्यासाठी आणि एकूण आरोग्यासाठीही दातांची महत्त्वाची भूमिका असते. लहान मुलांमध्ये साधारणपणे 20 दात असतात, ज्याला दुधाचे दात म्हटले जाते. तर प्रौढ माणसाला 32 दात असतात. 
दातांची योग्य काळजी न घेतल्यास दातांना किड लागणे, हिरड्यांचे आजार, दुर्गंधी आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. 
दंतचिकित्सक (Dentist) म्हणजे दाताचे डॉक्टर हे दात आणि तोंडाच्या आजारांचे निदान, उपचार आणि प्रतिबंध करतात.
दातांची तपासणी व स्वच्छता करतात. 
किडलेले दात भरणे, दात उपटणे किंवा रूट कॅनल उपचार, दात सरळ करण्यासाठी ब्रेसेस लावणे, तोंडाच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करणे, दाताच्या डॉक्टरांचे कार्य आरोग्यसेवेतील अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. 
मुलांनो, आपण आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी ?
दिवसातून किमान दोन वेळा दात स्वच्छ केले पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी. गोड पदार्थ खाल्याने आपले दात किडके होऊ शकतात. म्हणून गोड पदार्थ कमी प्रमाणात खावेत. दर सहा महिन्यांनी दाताच्या डॉक्टरांकडे तपासणी करावी. स्वच्छतेची सवय लहानपणापासून लावावी. दात निरोगी असतील तर शरीरही निरोगी राहते. त्यामुळे दातांची योग्य काळजी घेणे आणि दंत चिकित्सकांच्या सल्ल्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
राष्ट्रीय दंत चिकित्सक दिनानिमित्त दंतचिकित्सकांच्या सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली जाते तसेच तोंडाच्या स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाते. “स्वच्छ दात, निरोगी जीवन” हा संदेश या दिवसातून दिला जातो. हा दिवस लोकांना दातांचे आरोग्य जपण्यासाठी प्रेरणा देतो. दंतचिकित्सक हे केवळ वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ नसतात, तर लोकांच्या आत्मविश्वासाचे आणि सुंदर हास्याचे शिल्पकार असतात.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 
पहिला प्रश्न - दरवर्षी 6 मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, दरवर्षी 6 मार्च रोजी राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस साजरा केला जातो.

दुसरा प्रश्न - लहान मुलांच्या दाताला काय म्हणतात ?
बरोबर उत्तर आहे, लहान मुलांच्या दाताला दुधाचे दात म्हणतात.

तिसरा प्रश्न - प्रौढ माणसाला किती दात असतात ?
बरोबर उत्तर आहे, प्रौढ माणसाला 32 दात असतात. 

चौथा प्रश्न - दिवसातून किमान किती वेळा दात स्वच्छ केले पाहिजे ?
बरोबर उत्तर आहे, दिवसातून किमान दोन वेळा दात स्वच्छ केले पाहिजे.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - गोड पदार्थ कमी प्रमाणात का खावे त्याचे कारण सांगा. 
बरोबर उत्तर आहे - गोड पदार्थ खाल्याने आपले दात किडके होऊ शकतात. म्हणून गोड पदार्थ कमी प्रमाणात खावेत.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 30 मार्च ( Rajasthan Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आज 30 मार्च हा राजस्थान...