Monday 7 October 2019

दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा

*दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा*

आश्विन शुद्ध दशमी हा दिवस दसरा सण पाळला जातो. आश्विन शुद्ध प्रतिपदेलादेवीच्याघटांची स्थापना केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे केले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते.
अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा, आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची, यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायचा हा दिवस म्हणजे दसरा.
दसरा ह्या सणांचं मोठ्या उत्साहाने स्वागत होते. हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी करणे, नवे करार करणे, नव्या योजनांच्या प्रारंभ इत्यादी चांगल्या गोष्टी केल्या जातात. घर, गाडी, बंगला, खरेदी केला जातो. सोन्या - चांदीचे दागिने केले जातात. नवे व्यवसाय चालू केले जातात. नवी नाटके, चित्रपट ह्यांचे मुहुर्त होतात. पुस्तकं प्रकाशित केली जातात.
ह्या दिवशी घरोघरी गोड जेवण, मिष्टान्नाचा बेत केला जातो. संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची, त्यांच्या पाया पडायचे आणि लाख मोलाचे आशिर्वाद घ्यायचे ते ही ह्याच दिवशी. देवीने महिषासुराचा वध केला तो याच दिवशी, भगवान श्रीरामाने रावणाचा पराभव केला तो आजच्या दिवशीच, पांडवानी आपला वनवासी संपवून आजच्या दिवशी युद्धसाठी शस्त्रे हातात घेतली असे अनेक आख्यायिका या सणाशी निगडित सांगितले जाते. प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात. तर काही लोकं यापासून गळ्यातील हार तयार करून आपल्या नातलगांना गळ्यात टाकतात. खरे सोने टाकून घेणे त्यांना कधी शक्यच होत नाही म्हणून प्रतिकात्मक सोने परिधान करतात. 
आपट्याच्या पानाला सोन्याचं मोल का आणि कसं आलं ह्याबद्दल जी एक कथा सांगितली जाते, ती अशी की 
फार फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे एक गुरू आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. बराच मोठा शिष्यवर्ग त्यांचेकडे वेदाभ्यास, शास्त्राभ्यास करीत होता. एकदा काय झालं. गुरू वरतंतू ह्यांचेकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कौत्स नावाच्या शिष्याने त्यांना विचारले – गुरूजी ! तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले. शहाणे केले, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी ? त्यावर गुरु वरतंतू म्हणाले, “बाळ कौत्सा, अरे ज्ञान हे दान करायचे असते. त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो. अरे तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हीच माझी गुरुदक्षिणा ! ” पण कौत्स मात्र ऐकेनाच, सारखा मी काय देऊ? असे विचारू लागला, मग गुरु म्हणाले, “मी तुला चौदा विद्या शिकवल्या म्हणून तू मला चौदा कोटी सुवर्ण मोहरा दे.” कौत्साला वाटलं की आपण एवढं धन सहज कमवू पण प्रत्यक्षात ते जमेना. मग कौत्स रघुराजाकडे गेला आणि त्यांना चौदा कोटी सुवर्ण मोहरांची मागणी केली. पण रघुराजाने त्या आधीच आपली सर्व संपत्ती दान केली होती. दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही म्हणून राजानं कौत्साला ‘तू तीन दिवसांनी ये’ असं सांगितलं.
रघुराजानं कुबेराकडे वसुलीसाठी निरोप पाठवला. धन येईना, मग रघुराजाने युद्धाची तयारी केली. ही वार्ता इंद्राला कळली. इंद्र घाबरला, त्यानं कुबेराला रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षांवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडायची आज्ञा दिली. दुसरे दिवशी रघुराजाला त्या सुवर्ण मुद्रांच्या पावसाची गोष्ट कळली. त्यानं स्वतः त्या मुद्रांचा ढीग पहिला. दारी आलेल्या कौत्साला ‘हवं तेवढं धन घे’ म्हटलं पण त्याने गुरुदक्षिणे पुरतेच धन घेतले. बाकीच्या सर्व सुवर्णमुद्रा राजानं प्रजेला वाटल्या. लोकांना आपट्याच्या झाडाखाली ते धन मिळालं तो दिवस दसऱ्याचा होता. त्या प्रसंगाची आठवण म्हणून आपट्याच्या पानाला ह्या दिवशी सोनं म्हणून देतात-घेतात. ह्या दिवशी शस्त्र पूजा सुद्धा करतात. पाटीवर सरस्वती काढून तिची पूजा करतात. पराक्रमाचा आनंद देण्या-घेण्याचा परस्परांत प्रेम वाढवण्याचा हा एक सुंदर दिवसाचा सण म्हणजे दसरा. या दिवशी बऱ्याच ठिकाणी रावणाच्या पुतळ्याला दहन केले जाते. एक प्रतिकात्मक क्रिया होय, ज्यातून संदेश दिला जातो की, आपल्या मनातील वाईट प्रवृत्तीला जाळून टाका किंवा नष्ट करा. ग्रामीण भागात ह्या दिवशी गावातील काही प्रतिष्ठित मंडळी ढोल ताशे वाजवत गावाच्या सीमेवर ईशान्य दिशेला जाऊन त्याठिकाणी शमीच्या झाडाचे पूजन करतात. त्याच ठिकाणी सोनं लुटण्याचा कार्यक्रम संपन्न होतो. गावात येऊन प्रत्येक देवतेला ते लुटलेले सोने अर्पण केले जाते मग स्वतःच्या घरी आल्यावर घरात त्यांचे कुंकू लावून स्वागत केले जाते आणि घरातल्या देवाला ते सोने अर्पण केले जाते. एकमेकांना प्रेम वाटण्याची एक सुंदर कल्पना या दसरा सणाच्या माध्यमातून दिला आहे. काही लोकं आपल्या पूर्वजांना आठवण करीत दसरा सणाच्या अगोदर मानाई नावाचा सण करतात. ज्यात वाडवडिलांना नवे कपडे चढविले जातात तर दसऱ्याच्या दिवशी लहान मुलांना नवे कपडे दिले जातात. एकूणच कुटुंबात सुखाचे, समृद्धीचे आणि आनंदाचे वातावरण तयार करण्यासाठी हा सण येतो. म्हणून म्हणावेसे वाटते.
भारतात विविध भागात दसरा सण साजरा होतो. 
उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो. यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतील नाट्यविशेष उत्तर भारतात प्रचलित आहे. नऊ दिवस चालू असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणाचा मोठा पुतळा उभारून तो दहन केला जातो. कुलू शहरात दसरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. या दिवशी रघुनाथजी यांच्या पूजनाने मिरवणुकीची सुरुवात केली जाते.
छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने दसरा सण साजरा होतो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो. भगवान रामाने रावणावर मिळविलेला विजय याला या भागात महत्व दिले जाते.
महाराष्ट्रात कातकरी आणि आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्र, वाहने यांना फुलांच्या माळा घालतात. 
आंध्र प्रदेश, तामिळनाडूकर्नाटक येथे नऊ दिवसात दर तीन दिवशी देवीच्या एकेका रुपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. धन , धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची ही उपासना असते. लोक एकमेकाना मिठाईआणि वस्तू भेट देतात. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे. तेलंगणा प्रदेशात दसरा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. यानिमित्ताने शाळा आणि महाविद्यालयाना 15 दिवस सुट्या देखील दिले जाते. 
महाराष्ट राज्यातील कोल्हापूर म्हणजे करवीर संस्थान हे अंबाबाई देवतेच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. येथील दसरा सोहळाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथील ऐतिहासिक दसरा चौकात हा सोहळा संपन्न होतो. शाहू महाराजांचे वारस या कार्यक्रमात सहभागी होतात. संध्याकाळी भवानी मंडपातून मिरवणुकीला प्रारंभ होतो. विविध वाद्ये, तोफांचे आवाज, वाद्य पथके, सनई चौघडे, हत्ती घोडे यांची शोभायात्रा निघते. सर्व नागरिक या कार्यक्रमाचा आनंद घेतात. शमीचे पूजन, मंत्रोच्चार आणि शाहू महराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले जाते.
नांदेड शहरात देखील हा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. शीख धर्माचे दहावे गुरू गोविंदसिंग यांच्या तख्त सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारा तर्फे पारंपरिक आणि ऐतिहासिक दसरा सणाच्या निमित्ताने दसरा हल्ला महल्लाची शहरातील चौकात मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीत निशानसाहिब, कीर्तनकार, जथे, भजन मंडळी, गतका जथे, घोडे, बँड पथक, आणि पंजाबहुन खास करून आलेल्या काही पथकांचा यात समावेश असतो. यात ते विविध खेळ, तलवारीच्या कसरती दाखवितात. गुरुद्वारामध्ये अरदास झाल्यानंतर दुपारी मिरवणुकीला सुरुवात होते. शहरातील गुरुद्वारा चौकात पारंपरिक हल्लाबोल प्रात्यक्षिक कार्यक्रम पार पडतो. दसऱ्याच्या निमित्ताने नांदेडच्या गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर साहिब येथे मिरवणुकीची परंपरा गेल्या सुमारे तीनशेहुन अधिक वर्षाची आहे. त्याला अनुसरून दसरा दरम्यान गुरुद्वारेत श्री चंन्डीसाहेब पाठ केला जातो. या पाठाचा समारोप दसऱ्याच्या दिवशी दुपारी केला जातो. दिवसभर गुरुद्वारेत दर्शनाचा कार्यक्रम चालू असतो आणि दर्शनासाठी देशभरातून अनेक शीख बांधव नांदेड शहरात एक दोन दिवसांपूर्वीच दाखल होतात. या दिवशी दिवसभर लंगर चालू असतो जेथे मोठ्या प्रमाणात अन्नदानाचे कार्यक्रम चालू असतात. तसेच यानिमित्ताने ऐतिहासिक शस्त्रांची देखील पूजा केली जाते. नांदेड शहरातील दसरा गुरुद्वारामुळे जगभर प्रसिद्ध झाले आहे.

या सणाविषयी म्हणूनच म्हटले जाते
दसरा सण मोठा
नाही आनंदाला तोटा
आला आला दसरा
आता दुःख सारे विसरा

संकलन - नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक तथा शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद
ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Sunday 6 October 2019

दसरा सण मोठा

*दसरा सण मोठा*

दसऱ्याच दुसरं नाव आहे विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची आणि लुटवायची हा दिवस.
दसरा ह्या सणांचं मोठ्या उत्साहाने स्वागत होते. हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांच्या प्रारंभ इ. चांगल्या गोष्टी केल्या जातात. घर, गाडी, बंगला, खरेदी केला जातो. सोन्या - चांदीचे दागिने केले जातात. नवे व्यवसाय चालू केले जातात. नवी नाटके, चित्रपट ह्यांचे मुहुर्त होतात. पुस्तकं प्रकाशित केली जातात.
ह्या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत केला जातो. संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची. त्यांच्या पाया पडायचे आणि लाख मोलाचे आशिर्वाद घ्यायचे ते ही ह्याच दिवशी.
आपट्याच्या पानाला सोन्याचं मोल का आणि कसं आलं ह्याबद्दल जी एक कथा सांगितली जाते, ती अशी की 
फार फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे एक गुरू आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. बराच मोठा शिष्यवर्ग त्यांचेकडे वेदाभ्यास, शास्त्राभ्यास करीत होता. एकदा काय झालं. गुरू वरतंतू ह्यांचेकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कौत्स नावाच्या शिष्याने त्यांना विचारले – गुरूजी ! तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले. शहाणे केले, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी ? त्यावर गुरु वरतंतू म्हणाले, “बाळ कौत्सा, अरे ज्ञान हे दान करायचे असते. त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो. अरे तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हीच माझी गुरुदक्षिणा ! ” पण कौत्स मात्र ऐकेनाच, सारखा मी काय देऊ? असे विचारू लागला, मग गुरु म्हणाले, “मी तुला चौदा विद्या शिकवल्या म्हणून तू मला चौदा कोटी सुवर्ण मोहरा दे.” कौत्साला वाटलं की आपण एवढं धन सहज कमवू पण प्रत्यक्षात ते जमेना. मग कौत्स रघुराजाकडे गेला आणि त्यांना चौदा कोटी सुवर्ण मोहरांची मागणी केली. पण रघुराजाने त्या आधीच आपली सर्व संपत्ती दान केली होती. दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही म्हणून राजानं कौत्साला ‘तू तीन दिवसांनी ये’ असं सांगितलं.
रघुराजानं कुबेराकडे वसुलीसाठी निरोप पाठवला. धन येईना, मग रघुराजाने युद्धाची तयारी केली. ही वार्ता इंद्राला कळली. इंद्र घाबरला, त्यानं कुबेराला रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षांवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडायची आज्ञा दिली. दुसरे दिवशी रघुराजाला त्या सुवर्ण मुद्रांच्या पावसाची गोष्ट कळली. त्यानं स्वतः त्या मुद्रांचा ढीग पहिला. दारी आलेल्या कौत्साला ‘हवं तेवढं धन घे’ म्हटलं पण त्याने गुरुदक्षिणे पुरतेच धन घेतले. बाकीच्या सर्व सुवर्णमुद्रा राजानं प्रजेला वाटल्या. लोकांना आपट्याच्या झाडाखाली ते धन मिळालं तो दिवस दसऱ्याचा होता. त्या प्रसंगाची आठवण म्हणून आपट्याच्या पानाला ह्या दिवशी सोनं म्हणून देतात-घेतात. ह्या दिवशी शस्त्र पूजा सुद्धा करतात. पाटीवर सरस्वती काढून तिची पूजा करतात. पराक्रमाचा आनंद देण्या-घेण्याचा परस्परांत प्रेम वाढवण्याचा हा एक सुंदर दिवसाचा सण म्हणजे दसरा. या दिवशी बऱ्याच ठिकाणी रावणाच्या पुतळ्याला दहन केले जाते. एक प्रतिकात्मक क्रिया होय, ज्यातून संदेश दिला जातो की, आपल्या मनातील वाईट प्रवृत्तीला जाळून टाका किंवा नष्ट करा. ग्रामीण भागात ह्या दिवशी गावातील काही प्रतिष्ठित मंडळी ढोल ताशे वाजवत गावाच्या सीमेवर जाऊन त्याठिकाणी शमीच्या झाडाचे पूजन करतात. त्याच ठिकाणी सोनं लुटण्याचा कार्यक्रम संपन्न होतो. गावात येऊन प्रत्येक देवतेला ते लुटलेले सोने अर्पण केले जाते मग स्वतःच्या घरी आल्यावर घरात त्यांचे कुंकू लावून स्वागत केले जाते आणि घरातल्या देवाला ते सोने अर्पण केले जाते. एकमेकांना प्रेम वाटण्याची एक सुंदर कल्पना या दसरा सणाच्या माध्यमातून दिला आहे. काही लोकं आपल्या पूर्वजांना आठवण करीत दसरा सणाच्या अगोदर मानाई नावाचा सण करतात. ज्यात वाड वडिलांना नवे कपडे चढविले जातात तर दसऱ्याच्या दिवशी लहान मुलांना नवे कपडे दिले जातात. एकूणच कुटुंबात सुखाचे, समृद्धीचे आणि आनंदाचे वातावरण तयार करण्यासाठी हा सण येतो. म्हणून म्हणावेसे वाटते.

दसरा सण मोठा
नाही आनंदाला तोटा
आला आला दसरा
आता दुःख सारे विसरा

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक तथा शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद
ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...