Saturday 18 June 2016

📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊
     द्वारा आयोजित

🗽    साहित्य दरबार    🗽
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

🚩भाग :- ( 9वा )-नववा 🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - 19/06/2016
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
★★★★★★★
*खास वटपौर्णिमेनिमित्त*
††††††††††††††††††
========

*मी आजची सावित्री ; नाही भित्री*

==================
💥 संकल्पना :--↓↓
श्री.आप्पासाहेब सुरवसे,  लाखणगांवकर
**************************
💥 संयोजक --↓↓
श्री ना .सा. येवतीकर
************************
💥 परीक्षक -  *वृषाली वानखडे अमरावती*
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''""""
💥संकलन --
 जी पी पवार पाटिल सर
~~~~~~~~~~~~~~~
💥 ग्राफिक्स - बी. क्रांति सर
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम -

💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे.
💥 लेखाखाली आपले पूर्ण  नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.

💥स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ..

💥 या  स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर  आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक 20 जून 2016 रोजी सायंकाळी 9:00 Pm वाजता मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...

📩 त्यासाठी .

🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे ....

👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973

👤 नासा येवतीकर, धर्माबाद
📱 09423625769

👤 श्री मारुती खुडे सर माहुर
📱09823922702
**********#########***********####$$$*********$$$$$$
[6/19, 11:46 AM] ‪+91 86980 67566‬:
 *मी आजची सावित्री-नाही भित्री*
पुराण कालापासून स्रीयांबाबत समाजाचा दृष्टीकोन चांगलाच आहे असं म्हणता येत नाही.पण कांही ठिकाणी स्रीयांचे चांगले चित्र उभं केलेले आहे.खरं तर स्त्रीयांचे कर्तृत्व हे तेव्हाही चांगलेच होते आजही चांगलेच आहे.तेव्हापेक्षा आज अधीक जोमाने आणि धाडसाने स्त्रीचा वावर दिसतो आहे.'चुल आणि मुल' चा जमाना केव्हाच माघं पडला आहे.मनुसंस्कृतीत आडकलेली प्रवृती स्त्रीयांना हिन वागणूक देत आलीआहे..पडद्यामध्ये स्त्रीयांना ठेऊन हवा तसा
तिचा भोग घेत आलेला समाज विचाराने फार प्रगल्भ झाला आहे असं आजही म्हणता येत नाही. पण आपल्या बुद्धीने आणि जिद्दीने स्त्री पुढे पुढे जात आहे. इंग्रजांचे जुलमी राज्य होते पण सुधारणावादीपण होते हे मात्र नक्की.म्हणूनच
लार्ड बेंटिगच्या प्रयत्नाने आणि राजाराम मोहन राय या भारतीय सुधारकाच्या मेहनतीने जुलमी सती प्रथा बंद झाली. स्त्री स्वातंत्र्यावर जुलमी आणि जाचक असणारी ही प्रथा स्त्रीयांना दुय्यम स्थान दर्शविणारी अशीच होती. पुराणात आणि इतिहासात अनेक स्त्रीया या नावलौकिक आणि कर्तृत्व गाजवून गेल्या आहेत.पण त्यांचा उदोउदो
समाजापुढं हवा तेवढा झाला नाही,होऊ दिला नाही.पुरुषप्रधान संस्कृती आणि पुरुषीअहंकार
नेहमीच स्त्रीयांना दुय्यमस्थानी ठेवत आला आहे. आपल्या मनगटातील नेटानं तिनं दाखवलेला
एखादा पराक्रमही पुरुषांना पचनी पडत नाही.
शिक्षणापासून कोसोदूर असणारी स्त्री केवळ भोग वस्तु म्हणून होती. तिला ना विचाराचे स्वातंत्र्य ना आचाराचे वा बोलण्याचे स्वातंत्र्य होते.रुढी आणि परंपरा जपण्याचे वा त्या सक्तीने पाळण्याचा जणू तिच्यासाठी दंडकच होता.घरातील कर्त्यापुरुषाने घेतलेला निर्णय आणि लादलेली जबाबदारी तिला विनाविरोध निभवावी लागत असे.बालविवाह सारख्या अनिष्ठ रितीने तर बालपण हरपून आणि करपुन जात असे.पुराणात रामाबरोबर सीतेला वनवास भोगावा लागला,उर्मिलेला तर घरी राहून का वनवास सहन करावा लागला....? भर सभेतच द्रौपदीचे वस्त्रहरण,रामाचा सीता त्याग तिची अग्नीपरीक्षा काय काय आणि कशी कशी वागणूक केली आहे स्त्रीबरोबर.भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली त्यातही शत्रुचीं पहिली शिकार स्त्रीच होत आली आहे,अगदी आजही तीच गत आहे.
ज्योतिराव व सावित्रीबाई फुले यांच्या लौकिक प्रयत्नामुळे चित्र बदलत गेलं.पण प्रवृत्तीची मुळं खोल खोल रूतलेल्या समाजाला शिक्षण घेतलेली स्त्री पण रुचेना गेली.भ्रामक कल्पना आणि परंपरेला चिकटलेला माणूस मुलीला जन्म देण्यापासून स्वत:ला रोखू लागला.मुली आईच्या गर्भातच गुदमरु लागल्या...त्या तिथंच मरु लागल्या, त्यांना तिथंच मारले जाऊ लागले... मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर घटला,समाजात असमतोल निर्माण झाला.गुन्हेगरी,बलात्कार अतिप्रसंग,विनयभंग ना ना प्रकार वाढत गेले,चाललेत.हुंड्यासारख्या प्रथा मुलींच्याबापाला
पापेच्या वाटेला घेऊन जातात...हुंडा देऊनही मुलीच्या सुखाची शाश्वती नसते.मग मुलीलाही आपल्या जन्माचं ओझं होतं,स्वत:ला शोधते आणि स्वगत म्हणते.....,
       स्त्री म्हणून
दु:खानं भरलेली दुनिया सारी
पण माझं दु:ख आगळं सर्वापरी
स्त्री म्हणून मी जन्माला आले
आई वडिलांनाही दु:खच झाले...!
   मातेनेच जन्म दिला पुरुष मुलांना
   मग तुच्छ का लेखावे स्त्री मुलींना
   स्त्री म्हणून मी जन्माला आले
   जगण्यातला आनंद विसरुनच गेले....!
वयाआधिच लग्न उरखले
हुंड्यासाठी त्यांनी छळले
स्त्री म्हणून मी जन्माला आले
जीवणात मी कित्येकदा मेले....!
   तोडण्या रुढी श्रृंखला घेते मी पुढाकार
   तेव्हा समाजच करतो माझा धिक्कार
  स्त्री म्हणून मी जन्माला आले
  अन्यायाशिवाय कांही न भोगले..!
फार भोगले फार सोसले
लढण्या आता सिद्ध मी जहाले
भावनेने पेटले स्त्रीत्वाच्या
तोडीन श्रृंखला पुरुष बंधनाच्या..!!
या भावनेचा उद्रेक झालेली आज स्त्री दिसते आहे.सैराट जीवनशैली जगणयाची आस घेऊन पुढं आलेली स्त्री सर्वक्षेत्रात व्यापून राहिलेली स्त्री धाडशीच म्हणावी लागेल.खेळ,शिक्षण,व्यवसाय,संगीत,आकाश,
विज्ञान तंत्रज्ञान कोणतं कोणतं क्षेत्र शिल्लक नाही
जिथं स्त्री पोहचली नाही.जखम बरी होते पण ओरखडा किंवा व्रण शिल्लक राहतो त्या प्रमाणे
स्त्री कितीही पुढं गेली किंवा आकाश कवेत घेतलं तरी दर्जाहिन प्रवृतीना ही गोष्ट पचत नसते..तेव्हा या धाडसी महिला, पोरींच्या जिद्दीला आणि धाडसाला आपण पुरुषांनी ताकद दिली पाहिजे.जी मी दिली आहे......मी स्वाभिमानाने सांगतो आणि वागतो आहे दोन मुलींचा बाप म्हणून....! मला दोन मुलीच आहेत याची खंत नसून अभिमान आहे मला.भयमुक्त जीवन जगण्याचा आपल्याएवढाच मुलीना,आजच्या सावित्रीनां आधिकार आहे.तसं त्या भित्र्या मुळीच
नाहीत पण गरज आहे ती फक्त तुमची आमची विचारसरणी बदलण्याची. तीच्या धाडसाला तुमची ताकद लावण्याची.........कारण ती तर म्हणतेय......"देखना ही चाहते हो मेरी उडान को
तो जरा उंचा करो आसमान कों..|"

               श्री.हणमंत पडवळ
           मु.पो.उपळे(मा.)ता.उस्मानाबाद.
                8698067566.
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******
[6/19, 1:35 PM]
मी आजची सावित्री   नाही भित्री

पुराणामध्ये घडलेल्या एका घटनेमुळे आजचा वटसावित्री पुजनाचा उत्सव सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले आणी तेव्हापासुन ही सावित्री आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठीदेवाकडे प्रार्थना करते जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी देवाला साकडे तो एक श्रध्देचा भाग आहे
        आज स्री ही पुरुषाच्या बरोबरीने काम करते नव्हेनव्हे त्याच्यापेक्षाही जास्त व चांगले काम महिला करते तरीही तीला घरात दुय्यम स्थान का
 आज मुलीचे प्रमाण कमी आहे तीला गर्भातच संपवल जातय आणी त्याचे परिणाम मानवी जिवनावर होत आहेत
    प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत कालचीच बातमी पहा महिला लढाऊ वैमाणिका म्हणुन भारतीय हवाई दलात अवनी भावना व मोहना या तिघीची नियुक्ती झालेली आहे
   आजची सावित्री भित्री नाही आणी ती अन्यायही सहन करु शकत नाही पुर्वी मुलगी म्हटल की चुल व मुल हेच तिच काम अस अलिखीत असायचे  मुलीचा सासरी छळ होत असे पण आता खुप बदल झालेला आहे स्री प्रत्येक क्षेत्रात यशस्वी काम करू लागली आहे ती आता अबला नसुन सबला झालेली आहे
   किती तिचे रुप आई बहिन बायको मुलगी  प्रत्येक ठिकाणची जबाबदारी वेगळी  पण ती न डगमगता सगळ्या जबाबदार्या पार पाडते अशा स्री ला भित्री म्हणायचे का देशाच्या पंतप्रधानापासुन ते शेवटच्या घटकातील महिला हि तेव्हडीच कार्यक्षम आहे
आठ मार्च हा जागतीक महिला दिन या दिवशी कर्तुत्ववान महिलाचा सन्मान केला जातो ती प्रेरणा घेऊन महिला आनखी चांगले काम करतात
   मॉ जिजाऊ नसती तर छत्रपती शिवबा नसते  अशा या नारीला कोनीही अबला समजु नये
    आजही महिलावर अन्याय अत्याचार होतात पण माझे एकच सांगणे आहे आपल्या मुली सक्षम बनवा जीवनातील धोके मुलीना समजुन सांगा वत्या परिस्थीत कस वागायच हे ही तीला सांगा त्याना उगीचच भिती दाखवु नका


खेडकर सुभद्रा त्रिंबकराव बीड
मो नं (९४०३५९३७६४) (२०)
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******

[6/19, 2:37 PM]
🌷साहित्य दर्पण🌷
      व्दारा आयोजित
********************
📗साहित्य दरबार 📗
मी आजची सावित्री --नाही भित्री
🌳🌹🌳🌹🌳🌹🌳
आपण आज पर्यंत दोन सावित्री पाहिल्या आहेत
1]सत्यवानाची सावित्री  2]ज्योतिबाची सावित्री आणि आज पहात आहोत विज्ञान युगातील सावित्री .
 तस पाहिलं तर आख्यायिका  असली तरी सत्यवानाची सावित्री ही भित्री नव्हती कारण यम म्हटले कि आज आपण घाबरतो पण पुरातन काळात सावित्रीने यमा कडुन आपल्या पतीचे प्राण परत मिळवले मग सत्यवानाची सावित्री  हि भित्री नव्हती हे सिद्ध होते.आणि ज्योतिबाच्या सावित्रीने तर कमालच केली समाजाचा अनन्वित छळ सोसुन, समाजाची अवहेलना पत्करुन पतीच्या खांद्याला खांदा लावुन त्यांच्या कार्यात मोलाची मदत करुन अखील स्री जातीला शिक्षणामुळे समाजात मानाच स्थान प्राप्त करुन दिलं
स्रियांची कालची आणि आजची स्थिती पाहता सद्याची स्थिती प्रगतीकडे वाटचाल करणारी दिसुन येते
परंतु काल म्हणजे फार वर्षापूर्वी आपल्या देशात स्रिया पुरुषाच्या बरोबरीने
शिकत होत्या, वेदांचे अध्ययन करीत होत्या याचे दाखाले आपण पुराणात ऐकले आहेत सभेत मोठमोठ्या पंडितांना हरवणार्या गार्गी , मैत्रयी यांची नावे आपल्याला ऐकुन माहित आहेत पण नंतरच्या काळात आपल्या देशावर परकिय आक्रमणे झाली.त्यांच्या पासुन स्रियांचे रक्षण करणे ही गोष्ट प्रामुख्याने जास्त महत्त्वाची होती. त्यासाठी त्यांच्यावर हिंडण्याफिरण्याची, शिकण्यासवरण्याची., घराबाहेर पडण्याची अनेक बंधने घातली गेली.तिला शिक्षणाच्या संधी नाकारल्या गेल्या त्यामुळे चुल आणि मुल हेच तिचे कार्यक्षेत्र बनले. तिचे घरातील स्थान दुय्यम बनले
वास्तविक पाहता स्री आणि पुरुष हे एकमेकापेक्षा वेगळी
त्यांच्यात शारीरिक फरक आहे याचा अर्थ समाजातील त्यांचे स्थान एकमेकापेक्षा कमी जास्त आहे असा नव्हे.
परंतु स्रियांच्या बाबतीत मात्र
पुर्वीपासुनच---पायातली वहाण पायातच बरी---अशी हिनतेची कमी लेखणारी भावना समाजात रुढ झाली .
संत तुकारामांनीआपल्या अंभगात सांगितले आहे कि पायात वहाण नसेल तर आपल्या पायाचे संरक्षण कसे होणार छान वर्णन आहे
पायातली  वहाण समजुन स्री -पुरुष भेदभावाची  सुरुवात घरापासुनच झालेली हे स्पष्ट होते.सार्वजनिक जीवनातही
स्री ला दुय्यम वागणुकीला सामोरे जावे लागले.बायकांना काय समजते,त्यांची अक्कल चुलीपुरती अशाच भावनेतुन महत्वाचा निर्णय घेण्याची संधी कधी दिली जात नसे संधीच दिली गेली नाही तरतिची क्षमता कशी सिद्ध  होणार. या सार्याच्या मुळाशी  स्री ही पुरुषापेक्षा कनिष्ठ दर्जाची असा चुकीचा समज घट्ट रुतलेला दिसुन येतो
                आपल्या देशात इंग्रज आले त्यांच्या बरोबर नवे विचार घेऊन आले.शिक्षणाचे महत्त्व लोकांना कळु लागले त्या काळात त्यांना राज्य कारभारात  मदत करायला माणसे हवीत म्हणुण  का होईना इंग्रजांनी ही शिक्षणाच्या प्रसारासाठी प्रयत्न केले त्याचा परिणाम  स्री शिक्षणावर झाला. स्रियांनी शिकले पाहिजे या साठी समाज सुधारकांनी ही प्रयत्न केले.यातुन स्रियांसाठी वेगळ्या शाळा सुरु झाल्या कारण स्री शिकल्या शिवाय समाज सुधारणार नाहीहे हे समाजातील मुठभर लोकांना पटले परंतु मुठभर लोक म्हणजे समाज नव्हे.
सन १८४८ते१९४७ या पारतंञ्याच्या काळात स्वकीयांनी आणि इंग्रजांनी स्री शिक्षणासाठी विविध समित्यांची स्थापना केली.
१८५४ च्या वुड ने काढलेल्या खलित्यात असे ठाम पणे सांगण्यात आले की,, स्री शिक्षण लोकावर अधिक नैतिक व शैक्षणिक परिणाम  करते त्यामुळे स्री शिक्षणाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.हे चांगले विचार इंग्रजांचे होते समाजात अनिष्ठ रुढी प्रचलित होत्या त्या सर्व स्रियांवर अन्याय होतील अशाच होत्या . केशवपन, सतीची चाल, पडदा पद्धती या सर्व बंद करण्यामध्ये आपल्या देशातील समाज सुधारकांचा महत्वाचा वाटा होता हे नाकारुन चालणार नाही.
"पिता रक्षती कौमार्ये,
भ्राता रक्षति यौवने,
रक्षन्ति स्थविरे पुत्रः न स्रीस्वातंञ्यं अर्हति."
या मनुउक्तीचा अर्थ असा आहे कि जीवनाच्या प्रत्येक वळणावर पुरुषाच्या खांद्यानं तिला आधार द्यावा, तिला जपावं.परंतु याचा अगदी उलटा अर्थ समाजाने लावला
स्री म्हणजे भोगवस्तु, स्री म्हणजे करुणा, स्री म्हणजे अश्रु. लहाणपणीच मुलीनां सांगितलं  जातं मुलांसारख स्वच्छंदी , उन्मत्त वागु नकोस
संध्याकाळी लवकर घरी ये
कोणी चार शब्द बरे वाईट बोलला तर ऐकून घे, उगीचच चार चौघात आपली मतं सांगु नकोस.लहाणपणापासुनच त्या कन्येच्या नाजुक मनावर
गुलामगिरीच्या साखळ्या आवळल्या जायच्या.मुलगी वयात आली की., तिच्या सुखाच्या कल्पनाच हा समाज बदलवुन टाकतो.तिच सुख म्हणजे चांगला पगारदार नवरा, अन् सोन्यामोत्याचे दागिने.म्हणजेच तिच्या बाह्यांगाला नटविण्यामध्ये गुंग असणार्याना आज्ञानाच्या अंधःकारात खित्पत पडलेलं तिच अंतरंग दिसत नव्हतं.
जे आदर्श पुरुष होते त्यानी मात्र स्रियांना मानाचा दर्जा दिलेला आहे. जगज्जेत्या सिंकदराला भारतातुन परतताना प्रथम दर्शन हवे होते, ते त्याच्या आईचे !
शिवरायांना आई म्हणजे देहातील प्राण वाटे , तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे संसाराच सार काय तर ममताळु माय !!

           आज समाज काही अंशी बदलला आहे . स्री शिक्षणामुळे घराबाहेर पडण्याचे स्वातंञ्य तिला मिळालं, विकासाच्या संधीच खतपाणी मिळाल म्हणुण तिनं पाळणा सांभाळून आपलं कार्यक्षेत्र कधी व्हँलेंटिना तेरेश्कोवा म्हणुण अवकाशा यानापर्यत नेले आहे तर कधी
बचेंद्री पाल म्हणुण एव्हरेस्ट सर केलं आहे कधी इंदिरा गांधी बनुन राजकारणातील आपलं वर्चस्व सिद्ध  केलं आहे.तर कधी किरण बेदी च्या रुपानं आपलं नैतिक आणि शारीरिक सामर्थ्य सिद्ध  करुन दाखवल आहे , तर पंकजा मुंडेच्या रुपानं कुठलाही आधार नसताना पित्याचे स्वप्न पुर्ण करण्याच आव्हान स्विकारलेलं आपल्याला दिसत परंतु या बोटावर मोजण्या एवढ्या स्रिया प्रगतशिल असल्यातरी ग्रामीण भागात काय शहरी भागात काय स्रियावर अत्याचार होताना दिसतात परंतु भविष्यकाळ आशावादी आहे . शेवटी जाता जाता काल घडलेलं उदा. सांगते माझी नात ट्युशन वरुन गाडी वर घरी येत होती पोलिस महाशय वर्दीवर समोरुन राँग साईड ने येत होते ,अपघात थोड्यात चुकला .पोलिस महाशय नाती ला म्हणाले गाडी बाजुला घे .पण ती भित्री सावित्री नव्हती तिनेही निर्भीड पणे म्हटले काका तुम्ही राँग साईडने तुमची गाडी बाजुला घ्या.यावरुन स्पष्ट होते आजची सावित्री  भित्री नाही आणि ती कधीच नव्हती .,परंतु समाजाने तिला भित्र बनवलं होतं.
सौ.मीना सानप  बीड @ 7
9423715865
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******

[6/19, 2:41 PM] नासा येवतीकर धर्माबाद
 *सावित्री नको होऊ भित्री*

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता असे संस्कृत मध्ये म्हटले आहे याचा अर्ध ज्या घरात महिलांची पूजा केली जाते तेथेच देव वास् करतो .
 पुरातन काळापासून तर आजपर्यंत महिला ह्या दुय्यम स्थानावर रहिल्या आहेत. पुरुष प्रधान संस्कृती मध्ये महिलांना कधीच महत्वाची जागा मिळाली नाही. रामायण आणि महाभारतातील महिलांना किती त्रास सहन करावे लागले याची माहिती आपणास त्या पात्रातून निदर्शनास येते. मध्ययुगीन काळात राजे महाराजे यांनी सुध्दा महिलांना म्हणावे तसे महत्त्व दिले नाही. तरी राजमाता जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाई सारख्या काही कर्तबगार महिला इतिहासात होऊन गेल्या. इंग्रजाच्या राजवटीत असताना समाजसुधारणेचे वारे जोरात वाहत होती. अनेक महिला पुढे येऊन स्वातंत्राच्या लढ़ा मध्ये पुरुषांच्या बरोबरीने सहभाग घेतला भारत स्वातंत्र होण्यामागे सरोजिनी नायडू अरुणा आसफअली सारख्या महिलांचा सिंहाचा वाटा होता. भारत पूर्ण स्वातंत्र्य झाल्यावर देशातील लोकांना विकसित करण्याचा फार मोठा प्रश्न प्रशासनासमोर आ वासुन उभा होता. लोंकाची निरक्षरता ही प्रामुख्याने मोठी समस्या होती त्यातल्या त्यात महिलांची निरक्षरता. मुलींच्या शिक्षणावर भर देण्यासाठी शासनाने अनेक उपक्रमाची योजना तयार केली आणि त्याची अंमलबजावणी सुध्दा केली. त्यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रात दिसून येतात. असे एकही क्षेत्र शिल्लक नाही ज्याठिकाणी महिला दिसणार नाही त्यामुळे महिलांची खुप प्रगती झाली पण, आज ही महिलावर खुप अत्याचार आणि अन्याय केल्या जाते. ते शिकुन साक्षर झाली मात्र त्या शिक्षणाचा त्यांच्या जीवनात काहीच फायदा नाही असे वाटते. शिक्षणाने माणसाचा विकास होतो याचा अर्थ असा आहे का की शिक्षणाने नोकरी मिळते आणि आपला विकास होतो. नोकरी साठी शिकायचे अशी पध्दत सध्या दिसून येते. कारण शिक्षणाने माणसात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो असे म्हटले जाते. मात्र हे महिलांच्या बाबतीत लागू पडत नाही असे वाटते. याच गोष्टीचा फायदा समाज घेत असतो. म्हणून तिला आजच्या सावित्रीला भित्री समजल्या जाते. आजच्या स्त्रीने हे सर्व बाजूला सारुन वेगळी वाट निवड करने अगत्याचे आहे.

नासा
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******

[6/19, 4:19 PM]
मी आजची सावित्री - नाही भित्री

आज वटसावित्री! जी आपल्या देशात फक्त महाराष्ट्रातच साजरी केल्या जाते.  समाजमाध्यमामधून एक मेसेज दिवसभर फिरेल," बायका कोणालाही गुंडाळतात,आज तर त्या वडालाही गुंडाळतील!" हाच नवरा जन्मोजन्मी मिळावा व नवऱ्याचे आयुष्य वाढावे म्हणून पूजा करणाऱ्या स्त्रियांची पुरुषवर्गाकडून अशी विनोदाच्या स्वरूपात अवहेलना चवीने दिवसभर होणार! आणि हिंदू स्त्रिया  श्रध्देने(?),संस्कृती म्हणून  वडाची पूजा करणार!श्रध्देसमोर प्रश्न निर्माण होण्यामागचे कारण हे की,अनेक कुटुंबात नवरा पत्नीचा शारीरिक,मानसिक छळ वर्षानुवर्षे करत असतो अशांच्या पत्नीदेखील ही पूजा करताना दिसतात. डोळसपणे विचार करणारे सगळे या वास्तवावर  विचार करतील की,पुनर्जन्म आहे का?आणि पुनर्जन्म असेल तर  अशा पूजाअर्चानी हाच नवरा पुन्हा मिळेल का? किंवा अशा पुजाअर्चानी जर नवऱ्याचे आयुष्य वाढले असते तर विधवा स्त्रिया दिसल्या असत्या का?जर इथेही ज्याच्यात्याच्या श्रध्देचा प्रश्न असेल तर अजून काही प्रश्न आपल्याला पडायला हवीत.  ती म्हणजे, बायकोचं आयुष्य वाढावं किंवा हीच बायको जन्मोजन्मी मिळावी म्हणून पुरुषांनी करण्यासाठी  एकही व्रत का नाही? स्त्रीच्या गर्भात बाळ वाढताना आणि त्याला जन्म देताना तर स्त्रीचा पुनर्जन्म होतो असं म्हणतात. मग तो पुनर्जन्म सुरक्षित व्हावा,त्यातून बाळ,बाळंतीण सुखरुप बाहेर पडावी,यासाठी पुरुषाकडे  एखादे व्रत का नाही? मग यावरुन असे समजावे का की,स्त्री ही खऱ्या अर्थाने सबला असून तिला कोणाकडून दयेचे दान किंवा  कोणाच्या प्रार्थनेची गरज नाही परंतु पुरुषाला मात्र त्यांचे आयुष्य वाढवून घ्यायचे असेल,सदैव सुखी रहायचे असेल,सुरक्षित रहायचे असेल तर,त्यांच्या पत्नीने कठोर व्रतवैकल्ये,उपवास वगैरे केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही! यावरुन कोण अबल आहे आणि सबल आहे,यावर विचार करण्याची नितांत गरज आहे,असे मला वाटते.बऱ्याच जणाना वाटेल की,नवऱ्यावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी अशा पूजा करु द्याव्यात. पण नवऱ्यावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी दुसरे मार्ग नाहीत का? ज्योतिबाच्या सावित्रीने नवऱ्यावरचे प्रेम जपले नाही का?  यातून अंधश्रद्धेला खतपाणी आपण घालत नाही का? स्त्रियाना यातून भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळणार असेल तर अशी झाडे घराभोवती लावून वटसावित्री साजरी करावी,जेणेकरून संपूर्ण कुटुंबालाच ऑक्सिजन वर्षभर भरपूर मिळेल. या झाडाची मोठ्या प्रमाणात असलेली मुळ्या पाहून तर घराभोवती हे झाड लावणे आपल्याला उपद्रवी वाटते.
             जोवर स्त्री शिक्षणापासून वंचित होती,धर्मशास्त्राशिवाय इतर शास्त्राशी तिचा संबंध आला नव्हता,विचार करण्याचे स्वातंत्र्यही तिला  नव्हते तोवर अशा  पूजाअर्चात तिने व्यस्त रहाणे ठीक होते. कारण त्याकाळी याशिवाय स्त्रियांना घराबाहेर पडण्याचेही स्वातंत्र्य नव्हते. पण आजच्या  सुशिक्षीत स्त्रीने हे वागणे किती संयुक्तिक आहे? आणि ज्या  पुरुषवर्गासाठी ही  व्रतवैकल्ये चाललीत,त्यांच्या नजरेत व्रतवैकल्ये करणाऱ्या अशा स्त्रियाना काय दर्जा मिळतो?तर पूजापाठाच्या नावाने मूर्खपणा चालला म्हणून टिंगळटवाळी? ज्यातून काहीही साध्य होत नसताना विज्ञानयुगात अशा निरर्थक गोष्टी करण्यात वेळ घालवायचा  म्हटल्यावर लोक टिंगलटवाळी नाही करणार तर काय करणार?? यातून कोणी वृक्षसंवर्धन होते,असे म्हणत असेल तर,खरंच किती स्त्रिया वृक्षारोपण करतात किंवा वडाच्याही झाडाचे संवर्धन करतात? याउलट त्या कोणीतरी लावलेल्या,वाढविलेला प्रचंड मोठा वड पाहून पूजा करतात. कधी या दिवशी स्त्रियांनी वडाचे झाड लावले,असे ऐकले नाही उलट ज्या शहरी स्त्रियांना वडाचे झाड उपलब्ध नाही,अशानी मात्र कोणाकडून तरी वडाची फांदी तोडून त्याची पूजा केलेली नित्य ऐकण्यात आलेले आहे. अर्थातच यादिवशी वृक्षारोपण होत नसून काही ठिकाणी यानिमित्ताने वृक्षतोड मात्र होताना नक्की दिसते.
           आपण महाराष्ट्रातील स्त्रियांनी वारसा पुढे चालवायचा अशा महाराष्ट्रातीलच दोन सावित्री आपल्यापुढे उभ्या राहतात. एक आपल्या पतीच्या विधायक  कार्याला मूर्तस्वरुप देऊन,त्याच्या खांद्याला खांदा लावून,कार्याच्या रुपातून पतीला  लौकिकार्थाने अजरामर करणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले;तर आपल्याला सत्यता किती हे माहीत नसलेली,फक्त कपोलकल्पित आख्यायिकेच्या आधारे ऐकलेली वडाची पूजा करुन नवऱ्याचे प्राण वापस आणणारी सत्यवानाची सावित्री! यापैकी आजच्या स्वतःला आधुनिक म्हणून घेणाऱ्या स्त्रीने कोणाला आदर्शस्थान मानायचे,हे विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज आपल्या आजूबाजूला अनेक समस्या आहेत.शिक्षण घेऊन कर्तबगार झालेल्या स्त्रियांनी ज्योतिबाच्या सावित्रीसारखे समाजासाठी विधायक कामे करायची की कपोलकल्पित सत्यवानाच्या सावित्रीसारखे अंधश्रध्देच्या आहारी जायचे,हा आधुनिक स्त्रीसाठी फार मोठे आव्हान आहे.आज त्याना हे दाखवून द्यावे लागेल की आजची सावित्री भित्री नाही,ती कुठल्याही गैरसमजाला बळी पडणार नाही. स्वतंत्र विचाराची डोळस दृष्टिकोन असणारी सावित्री आहे. कुठल्याही अंधानुकरणामध्ये अडकलेली भित्री सावित्री नाही!
 संगीता देशमुख
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******

[6/19, 4:29 PM]
स्पर्धेसाठी..

मी आजची सावित्री- नाही भित्री

सर्व जण म्हणतात सावित्री घडवा. आजची परिस्थिती पाहता सावित्री घडून ही जाईल पण सत्यवान ...!
  ज्याच्यासाठी हे व्रत करायचे तो कितपत सावित्रीच्या परिक्षेस उतरतो.
सकाळी गेलेला संध्याकाळी कोणत्या परिस्थतीत घरी येईल सांगता येत नाही. दिवसभर राबून कमावलेले पैसे तो दारुभट्टीवर गमावून येतो. ज्याला कुंटूबाची जबाबदारी समजत नाही कर्तव्य समजत नाही त्यालाच सात जन्म तरी का मागावे?
कोणताच हीच पत्नी सात जन्म मिळावी म्हणत नाही. तो तर एकाच जन्मात सात पत्नी मिळवून चुकतो. मग समाजातील सर्व नियम रितीरिवाज स्त्रीयांनीच पाळायचेत का?
वटसावित्री हे व्रत खूप पुरातन काळापासून स्त्रिया करीत आल्यात. तेव्हाच्या स्त्रिया घराबाहेर पडत नव्हत्या. या निमित्ताने का होईना. त्यांना इतर स्त्रियांशी विचारांची देवाण घेवाण करता येई. मनाला समाधान ही लाभत असे.
पण आजच्या काळात स्त्रियांजवळ कीतीसा वेळ राहिलाय? घरातली स्त्री घराबाहेर पडली. पुरुषांच्या बरोबरीने काम करते आहे. जिच्या जवळ कुंटुंबालाच दयायला वेळ नाही ती कधी आणि कशी व्रत वैकल्ये सांभाळणार? ज्या काळात सावित्रीने सत्यवानाला परत आणले ते सतयुग होते. पण आज कलियुग आहे. या युगात ब-याच अंशी लॅप पावलेले आहे.  आजच्या आधुनिक काळात किती सावित्री आपल्या सत्यवानाला परत आणू शकतील शंकाच आहे.
मला वाटते आजची स्त्री इतकी कमजोर नाही. ती स्वावलंबी आहे. नव-यालाच काय ती तर अख्खे कुंटुंब आपल्या हिंमतीवर सांभाळू शकते. व्रत करणे वाईट नाही पण त्यामागचे कारण जोपासत बसणे हे तर अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखे आहे असे मला वाटते.

निर्मला सोनी
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******

[6/19, 4:48 PM]
साहित्य दरबार🖊
     
   💥आयोजित💥

💃मी आजची सावित्री ....

  नाही भित्री💃

         ★स्पर्धेसाठी★
==================

आजचे युग हे स्पर्धेचे युग,संगणकाचे,विज्ञानाचे,नवनविन शोधाचे युग आहे.
म्हणुनच या गतिमान,क्रियाशिल युगात पुरूषाच्या बरोबरीन ही आजची सावित्री या नव युगाच्या दिशांना गवसणी घालतांना दिसत आहे अन् तिच्याकडे पाहूनच मग आपसुकपणे शब्द निघतात कि.....“ आजची सावित्री..  नाही भित्री”

खर पाहता आजची स्री ही चुल नि मुल या व्याख्येतच बांधली जाणारी नाही कारण सत्यवानसावित्री नंतरच्या युगप्रवर्तक,क्रातीज्योती सावित्रीन जी ज्योत आजच्या.आधुनिक सावित्रीकडे दिलीय त्या ज्योतिन तिच जीवन प्रकाशय,प्रगत तर बनलयच पंरतु वेळ पडल्यास त्याच ज्योतीची ती ज्वाला बनुन अन्यायसंहारक देखील बनली आहे.

आजच्या युगातली सावित्रीन अस एकही क्षेत्र नाही की ते तिन काबीज केल नाही...नि यावरुन ती भित्री नाही हेच सिद्ध होत.

-आजची सावित्री आकाशी पोहचली....
-आजची सावित्री वाऱयाशी लढतेय...
-आजची सावित्री समुद्राशी सामना करतेय.....
-आजची सावित्री कंडक्टर बनली....
-आजची सावित्री आँटोवाली बनली.....
-  आजची सावित्री वैमानिक बनली...
एवढेच नाही तर बाळाला
-हदयी कवटाळून पोलीस बनुन गस्तही घालतेय.... तर
कुठे मलाला बनुन शिक्षणासाठी छातीवर गोळया झेलतेय नि मृत्यूला हुलकावनी देवून पुन्हा सावित्री न भित्री बनुन त्याच गोळ्या झाडणाऱयासमोर आपल काम अखंड चालू ठेवतेय. इतकेच नाही तर एका विधानसभेत आजची सावित्री बाळाला छातीशी बिलगुन घेवून स्पीकरचे काम करतांना जगाने पाहिलेय.

मी आजची सावित्री...  नाही भित्री हे सांगतांना अभिमान वाटतोय कारण माझ्या तमाम भगिनी या अहोरात्र तारेवरची कसरत करून कुटूंब रथाच दुसर चाक यथायोग्य बनुन आपला छंद सांभाळत आज ती गौरवान जगत आहे.

माझा सलाम,नमन आजच्या सर्व सावित्रींना🙏🏻🙏🏻🙏🏻

===================
कल्पना जगदाळे@8★ बीड
📲9921967040
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******
===================
[6/19, 5:26 PM]
*मीच खरी सावित्री,
   भित्री तर नाहीच🙏🏻

☝🏻सर्वांचे लेख वैचारिक मांडणी तिल छान च✍🏻👌🏻👌🏻👌🏻

मी 30 वर्षा ची असतांनाच विधवा झाले. माझा मुलगा 3rd ला होता, जीवन साथी कायम च सोडून जान्या च्या वेदना माझ्या पेक्ष्या कोण जानेल.  कितीही भित्री नसली तरी समाज दोन प्रकार चा मी पाहला, सासरी मंडळी चे हेवी दावी सर्व सोसले. नवरा नस्तांना समाज जास्तच पारखायल शिकले, सासुबाई ची खुपच मदत झाली, माझ्या मिस्टर ला माझे पेंटिंग चे खुपच कौतुक होते, इंटर्मिजीएट, एलीमेंट्री क्लास् मी घ्यायची,  आता अनेक क्लास्सेस घेते, मी जे जगते त्याचे सगळ्यांना कौतुक आहे, आज तनिष्का माझा ग्रुप आहे, समाजसेवक म्हणून, अमरावती च्या *महापौर*माझी मैत्रीण च, सर्व मैत्रिणी माझ्या सावित्री🙏🏻माझ्या एकटेपनात साथ देणाऱ्या. अनाथ असेल कुणी तर आम्ही तनिष्का मदतच करणार. त्यात माझ्या सासु सासर्यांची जबाबदारी, मुलाचे शिक्ष ण सर्व एकटी पार पाडत आहे. आज माझे सासरे एडमिट आहे, मी हॉस्पिटल मधे च लिहत आहे, पेंटिंग मधे खुप पुरष्कार मिळवले, जिल्हा स्तरीय, राज्यस्तरीय, समाज सेवे मधे श्री फडणवीस सर चा पण पुरष्कार मिळवला. माझ्या आईने पण20 वर्षीय आधी पुणे प्रबंध1st no, मिळवला. आई, बाबा, मिस्टर कायमची सोडून गेले त, मी मात्र *सावित्री*म्हणुन जगत आहे, माझ्या सासु बाई मला*आजची सावित्री* म्हणतात. चांगले, वाई ट अनुभव सर्व सोस त .माझा जीवन प्रवास चालूच आहे🙏🏻
 
 ☝🏻स्पर्धेसाठी नाही.🇮🇳
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******

[6/19, 5:40 PM] ‪+91 84220 89666‬
स्पर्धेसाठी

मी आजची सावित्री  ??
नाही भित्री
*******************

मला एक अतिशय सुंदर पुस्तक वाचायला मिळाले. त्यात आपल्या परिसरातील सर्व  झाडे, जंगलातील वृक्ष , याची माहिती, उपयोग वाचायला मिळाले.
यात काही वनस्पतींना उल्लेख नव्हता. समुद्र सोप किंवा ज्याला बेशरम म्हणतात, ही वनस्पती विषारी आहे. गुरेही याला तोंड लावत नाही. याचा काय उपयोग?
एका  कार्यक्रमात हा विषय निघाला. एका आदिवासी स्त्रीने
याचा उपयोग सांगितला .नवरा दारू पिऊन आला की बेशरम होऊन, त्या बेशरम माणसाला, बेशरम
च्या फोकानं झोडपून काढायचे.
स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणा-या आम्ही सर्व फक्त साक्षर स्त्रिया आहोत, याचा नव्याने शोध लागला. भित्री नसलेली ती खरी शूर सावित्री होती.
"पिता रक्षति कौमार्ये, भर्ता  रक्षति यौवने" या काळात स्त्री स्वतंत्र नव्हती वगैरे म्हणणारे म्हणोत बापडे, पण त्यावेळी मुलगी, बहीण,पत्नी, आई सुरक्षित होती  हे नाकारता येत नाही.
कारण निसर्गाने जो फरक स्त्री पुरूष यात केलाय, तो मान्य करून पुढील वाटचाल करायला हवी. जरा धाडसाचे  वाटेल, पण लिहिल्यावाचून राहावत नाही, जोपर्यंत स्त्रीवर होणारा बलात्कार हा केवळ अपघात आहे हे  आमचा समाज मान्य करीत नाही तोपर्यंत स्त्रीने घाबरून राहिलेले बरे.
आम्ही समाज सुधारणेच्या केवळ वल्गना करतो. कारण एखादी बलात्कार झालेली मुलगी, आम्हाला सून म्हणून चालते का?
योनीशुचितेच्या कल्पना फक्त स्त्रीच्या बाबतीतच जास्त प्रखर आहेत हे कटू सत्य आहे. स्त्रीने पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून चालावं जरूर, पण शर्यत लावून आज जे धावणे सुरू आहे ते मलातरी पटत नाहीच.
आणि धावणारच असाल तर आगामी धोके लक्षात घेऊनच. नाहीतर बेशरम होऊन जगण्याची तयारी हवी किंवा पुढच्याला बेशरमपणे, बेशरमचा दणका द्यायची ताकद हवी कदाचित हे विषयांतर होत असेल. पण बेडकीनं बैल होण्याची स्वप्न बघू नयेत,असं मला  वाटतं.
यावर काहींची वेगळी प्रतिक्रिया असूच शकते. आमच्या मुलींना काळाची गरज ओळखून चालण्याची ताकद द्यायलाच हवी , पण निसर्गाच्या विरोधात जाऊन नव्हे, तर निसर्गाचा मान ठेवून.
या विषयावर मी अनेक रचना केल्या आणि त्याचे फक्त मुलींच्यासाठी शाळेत, महाविद्यालये , स्त्रियांची मंडळे इथे अनेक  कार्यक्रम केले. उत्तम प्रतिसाद मिळाला. कालच्या एका गज़लेत मी लिहिले आहे
" संरक्षणात  गायी, तेथे वळू न आले"
असो. गोफणीनं आम्ही पाखरं हाकलतो, विषारी कीटकनाशक टाकून पीक वाचवतो , बागायतीला काटेरी कुंपण घालतो. मग पोटच्या पोरीला भित्री  न करता, संभाव्य धोक्यांची कल्पना देऊन तिचं संरक्षण करा, एवढी एक अपेक्षा मी केली तर काही चूक आहे का?
सुनंदा पाटील मुंबई
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******
[6/19, 5:44 PM] ‪+91 98603 14260‬
स्पर्धेसाठी
मी आजची सावित्री -नाही भित्री
***********************
आज वटपौर्णिमा.सत्यवानाचे प्राण हरण करणा-या यमराजाकडून युक्तीवादाने त्याच्याशी जिंकून सावित्रीने
सत्यवानाला, आपल्या पतीला जीवन मिळवून दिले
अशी कथा पुराणात आहे  सावित्रीला प्रणाम.
ज्योतिबांच्या सावित्रीने स्वतः शिकून  समस्त स्त्री जातीला शिक्षणाचे बाळकडू दिले . समाजाचा रोष ओढवला तरी शिक्षणाचे द्वार उघडून दिले तिला प्रणाम.
  आजची स्त्री सुशिक्षित आहे तिला शिक्षणाच्या सर्व वाटा खुल्या आहेत.गृहिणीपदापासून पंतप्रधान राष्ट्रपतीपद सांभाळत आहे.सैन्यातही ती लढत आहे गाडी रिक्षा ट्रक विमान अगदी आंतराळातही ती झेपावली आहे
 डाँक्टर वकील विज्ञानक्षेत्र अगदी राजकारणातही ती अग्रेसर आहे.
  आजची स्त्री चूल,नि मूल एवढेच कार्यक्षेत्र न ठेवता संसार नोकरी मुलेबाळे सर्वच आघाड्यांवर लढत आहे.
  मध्यंतरी एक बातमी वर्तमानपत्रात वाचली.पतीच्या दोन्हिही किडन्या खराब झाल्या अगदी मरणासन्न अवस्था झाली तेव्हा त्याच्या पत्नीने आपली स्वतःची किडनी देऊन त्याला जीवदान दिले ही आधुनिक सावित्रीच नव्हे का?
प्रत्येक गृहिणी ,प्रत्येक पत्नी आपले पती मुलेबाळे सासूसासरे  यांची काळजी करते व घेते प्रसंगी ती स्वतः आजारी पडते पण समस्येला न डगमगता तोंड देते
सहनशीलता हा एक गुण परमेश्वराने बहाल केला आहे.
आजची सावित्रीही खंबीरपणाने मार्ग काढते आहे व्रतवैकल्ये घरासाठी पतीसाठी करते आहे
जन्ममरण कुणाच्याही हाती नसते पण पतीनिधनानंतर आपले दुःख विसरुन मुलाबाळांना कष्ट करुन वाढवताना कितीतरी स्त्रियांना आपण पहातो.शेतकरी आत्महत्या करतात पण शेतकरीण सारे दुःख विसरुन घरासाठी मुलांसाठी फिरुन उभी रहाते हे सावित्रीचेच रुप नव्हे काय?
 प्राची देशपांडे
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******

[6/19, 5:57 PM] ‪+91 97306 89583‬
स्पर्धेसाठी...✍✍✍
     *आजची सावित्री,नाहि भित्री*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
          मित्रांनो,आज वटपौर्णिमा.आजच्या दिवसाचं महत्व आणि पावित्र आपणा सर्वांना ज्ञातच आहे.शतको वर्षापुर्वी सत्यवान आणि सावित्री यांच्या आख्यायीकेवरून आजच्या दिवसाच महत्व ठरविल्या गेल.
हिन्दू संस्कृति मधे या दिवशी वडाला दोरा गुंडाळून सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून स्त्रीया मनोभावे व्रत वैकल्य करतात.
आई सांगते म्हणून तर काहि कुमारिका कन्या सुद्धा होणारा नवरा माहित नसतांना जन्मों जन्मी तोच मिळावा म्हणून निरंकाळ उपवास तापास करतात.
ही *सावित्री* पतिच्या सुखासाठी अहोरात्र झटते,तोच सत्यवान ऐके दिवशी सर्व संसाराचा गाढा *तिच्यावर* सोपवुन निघुन जातो...
मग सुरु होते त्या *सावित्रीचि* खरी परीक्षा...
समाज,सगे सोयरे, नातलग सगळे तिच्या
लाचारीवर हसायला उठतात.अशा वेळी हिच
*सावित्री* डोई चा पदर कंबरेला खोचुन एकटिच चालू लागते....सोबत असतात फक्त मेलेल्या सत्यवानाच्या चार दोन आठवणी आणि रडनारी ती पोरं...
पठिमागे नसतो कुणाचा साथ,नसते कौतुकाचि थाप...दिसतो फक्त काळाकुट्ट अंधार...तरी ति चालत जाते...
         असाच एक व्हिडिओ सध्या वॉट्स ऍपवर फिरतांना दिसला....
शांताबाई यादव हे त्या सावित्रीच नाव.दाढ़ी कटिंग करण्याचा पतिचा व्यवसाय.तीस चाळीस वर्षापुर्वी सुखाने चालत असलेल्या संसाराला नजर लागते आणी तिच्या *सत्यवानाचा* मृत्यु होतो...पाठीमागे बालअवस्थेतिल चार मुली व पत्नी सोडून हा निघुन जातो...एकर भर शेती नाहि की काहीच नाहि...दुःखाच डोंगर वरुन चार मुलिंचा सांभाळ...ड़ोळ्याने दिसतो फक्त दाढ़ी कटिंग चा पतिचा व्यवसाय....ती निर्धार करते आता पतिचा व्यवसाय आपण करायचा,पुरुषांना तोंडात बोटे घालायला लावनारा निर्णय ती घेते...अन् एकटिच चालू लागते... गावातील लोक सुद्धा तिच्या कडे दाढ़ी कटिंग ला येतात...ते फक्त तिची उमेद पाहुन.एका दाढ़ी कटिंग चे विस रुपये मिळायचे...एवढ्यात कसं भागणार म्हणून म्हाशिचे केस काढु लागते...त्याचे शंभर रुपये मिळायचे...
या व्यवसायात कसलीही लाज या सावित्रीने बाळगलि नाहि.याच व्यवसायाने तीने आज चार मुलींची लग्ने केली,आणि स्वतहि आनंदाने एकटिच संसार करीत आहे....
शेतकरयांच ही असच होत मित्रांनो...आपला बळीराजा निसर्गापुढ़े हलबल होऊन आत्महत्येचा निर्णय घेतो,लेकर बाळ उघड़ी पाडून निघुन जातो...मग यातना या सावित्रीला सोसव्या लागतात.तरि हार न मानता ति लढते...
या आधुनिक सावित्रीन्ना माझा मानाचा मुजरा
खरच *आजची सावित्री मुळीच नाहि भित्री*

         ✍प्रणाली काकडे✍
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******

[6/19, 6:01 PM] ‪+91 94213 45341‬
 साहित्य दरबार  मी आजची सावित्री नाही भित्री

सावित्रीचया लेकी आम्ही
कुठेकमी सांगा तुम्ही
गडावरची ती हिरकणी
शिवरायास ती मानीणी
पुर्वी महिलांना मार्गदर्शन नव्हते शिक्षणाचा दर्जा प्राप्त झाला नव्हता
शिक्षणाची आई सावित्री ज्योतिबा फुले हेच खरे माय बाप समाजाच्या प्रवाहाविरूध यांनी शिक्षणाची धगधगती मशाल पेटवली सारा भारत देश शिक्षणाने प्रभावित झाला पण अंधार अत्याचार पिळवणूक केशवपण बालविवाह बालविधवा कुमारीमाता यांचा सुळसुळाट झाला होता तो काळ खुपच धकाधकीच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्कादायक स्थिती चा विचार करता माय सावित्री बाईनी स्त्रि जीवनाचे शिक्षण परिस बिज शोधले आणि स्त्रि शिक्षण संस्था  शाळा उघडण्याचे धाडस दाखवले  म्हणुनच आजची सावित्री
शिक्षणाने उपलब्ध झालेली नोकरी
करून  सत्यवाना सोबत प्राणपणाने लढत आहे बदलता काळ लक्षात घेता प्राण परत आणण्यासाठी  जे बौद्धिक कौशल्य जुन्या सावित्रीने वापरले
त्यापेक्षा जास्त बुद्धी आजही माझ्या कडे आहे हे आजची सावित्री सांगते हेच वास्तव सत्य परिस्थिती लक्षात घेता मान्य करायला हवे आजच्या काळात त्यांनी गगनाला भिडणारी महागाई
वाढली असून त्यांना काही प्रमाणात तरी मदत हातभार लावणार्‍या ओळीत ती आहे
जुन्या परंपरा जोपर्यंत ताज्या आहेत त्याचा आदर ती करणारच
भाव आहे म्हणून देव आहे श्रद्धा प्रयत्न पुवॅक प्रगतीकडे घेऊन जाते तर अंधश्रद्धा अधोगतीकडे घेऊन जाते भारतीय संस्कृती सर्व गोष्टीत लक्षावधीने  सवॅश्रेष्ठ आहे  पतीचे सात गुण जरीआवडले तरी सात जन्म सोबत राहु शकतात म्हणनच
आजही आहे तया परिस्थितीला
सामोरे जाऊन कुटूंब आबाधित आहे विदेशी परंपरा यांचे आनुकरण यामुळे पिठी बिघडत आहे करिता जुन ते सोन म्हणायची वेळ आली आहे शिक्षणासाठी मुलीना घराबाहेर ठेवणे अवघड झाले योग्य वेळी वयात आलेल्या मुलीचे लग्न करणेच योग्य आहे

सौ संगीता सपकाळ (कदम) बीड 9421345341

******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******
साहित्य दरबार - स्पर्धेसाठी - 
आजची सावित्री नाही भित्री - 
एक सावित्री पुराणातली सत्यवानाची तर दुसरी सावित्री इतिहासातली जोतिबांची. स्त्रीत्वाच्या गुणांनी मंडित या सावित्री आजच्या आधुनिक स्त्रीयांना वारसा आहेत. भावना, अवनी, मोहना या भारतीय हवाई दलात दाखल झालेल्या पहिल्या तीन वैमानिक. कुठे स्पर्शली त्यांना भीती? 
स्त्रीयांचा विधायक उर्जा, जबाबदारी जपण्याकडे कल असतो. मूल, परिवार, नोकरी, सामाजिक जबाबदारी सांभाळण्याची कसरत तिला करावी लागते. चाकोरीबद्ध जीवनात विविध भूमिका ती पार पाडते. आजची समाजव्यवस्था स्त्री स्वातंत्र्याच्या बाबतीत उदार होते आहे. हा संक्रमण काळ आहे तिच्यासाठी. पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून ती प्रत्येक क्षेत्रात बरोबरीने उभी राहते आहे. एकल पालकत्व भूमिकेतून देखील आपल्या अपत्याचे संगोपन योग्यरित्या समर्थपणे करते आहे. नव्या जीवनशैलीने तिचे जीवन धकाधकीचे झाले तरी ती प्रत्येक आव्हान पेलते आहे. त्यात यशस्वी होते आहे. अपयशाचे भय तिला नाही. तसेच शीलाची, जीवाची, वित्त, मत्ता  लुबाडले जाण्याच्या भीतीने ती मागे पडत नाही. 
शिक्षणाने तिला स्वतंत्र विचार करण्याची मोकळीक मिळाली आहे. पुरूषसत्ताक जीवनपद्धतीला ती आपल्या कर्तृत्वाने छेद देते आहे. संस्कार, परंपरांचा बागुलबुवा न करता ती विविध आघाड्यांवर एकटी संघर्ष करते आहे. भयाची, बलहिनतेची भावना तिला स्पर्शत नाही. जुन्या कालबाह्य रितीरिवाजांना ती फाटा देते आहे. वैज्ञानिक दृष्टिकोण आल्याने ती प्रश्न विचारू लागली आहे. तिची अंधश्रद्धा गळून पडू लागली आहे. 
पूर्वी मैत्रेयी, गार्गी सारख्या विदुषी तिच्या आदर्श होत्या. आता कल्पना चावला, पी टी ऊषा, इंदिरा गांधी अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान स्त्रीयांचे उदाहरण तिच्या डोळ्यापुढे ठळक उभे आहे. 
मर्यादांचे भय दूर सारून तिने गगनभरारी घेतली आहे. आपले स्त्रीत्व जपताना ती सर्जनशील, संवेदनशील, हळवी असली तरी डोळस झाली आहे. व्यवसायाची नवनवी दालने खुली झाल्याने शारीरिक दुर्बलतेवर मात करून तिचा मुक्त संचार सुरू आहे. भयावर तिने विजय मिळविला आहे. 
आता आकांक्षांपुढती गगन ठेंगणे तिला. 
:बाबू फिलीप डिसोजा 
@39
[[]][[]][[]][[]][[]][[]][[]][[]][[]]
स्पर्धेसाठी 
मी आजची सावित्री   नाही भीत्री 

नमस्कार वटपौर्णिमेच्या सर्वां ना शुभेच्छा .खरंच सर्व पुरुष किती नशीब वाण ज्यांच्या साठी प्रत्येक स्त्री हे व्रत करते .आपली पुरातन संस्क्रुति पती परमेश्वर माननारी आहे .त्यामुळे आज ही स्त्री जिथे असेल तिथे ही पूजा करताना दिसते .मी तरी या मागचे वैद्न्यानीक कारण समजून पूजा करते .सत्य वाणाला सवीत्रीने यमाच्या दारातून परत आणले पण खरंच आज तसा सत्यवान आणि सावित्री रहिली आहे का ?हे विचार करण्याची वेळ आली आहे .काही ठराविक उदा .सोडले तर आजच्या काळात ही स्त्री पूर्णपणे स्वतंत्र नाही च असे म्हणावे लागेल .पूर्वीच्या काळी स्त्री पुरुष समान मानले जात .स्त्रियांचे मौजीबंधनही केले जात असे ..मध्ययुगीन काळात स्त्री ला खूप त्रास झाला .पण आधुनिक युगात तर स्त्री ला जन्मालाच येऊ दिले जात नाही .तरी स्त्री स्वतंत्र झाली असे आपण म्हणतो .पूर्वी पासुनच स्त्री -पिता ,पती ,आणि पुत्र या तीन" प "कारी शब्दात अडकून पडली आहे .लहानपणी पिता ,तरूण पणी पती आणि म्हातारपणी पूत्राच्या इच्छेने जगावे लागते .आजची स्त्री भीतरी मुळीच नाही .त्यामुळे च सर्व क्षेत्रात ती प्रगती करताना दिसते .स्त्रिया सर्व कामे चांगली करतात पण त्यामुळे बरेच पुरुष सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोप्वून अलिप्त होताना दिसतात ..स्त्री ला नौकरी करूनही घरातील सर्व कामे करावी लागतात .तरीही ती न घाबरतासर्व  करते .पण जर स्त्री पुरुषाची सर्व कामे करू शकत असेल तर पुरुषांनी स्त्री चे एखादे काम केले तर काय बिघडते ?पण असे होताना दिसत नाही .स्त्रीला पै पाहुणा बघणे मुलांचा अभ्यास घेणे ई .कामे करताना खूप दमछाक होते .पण त्याची जाणीव असल्याचे पुरुष दाखवत नाहीत .
आपण पाहतो की सर्व ठिकाणी स्त्रिया आपली कामे खूप छान करतात साधी भाजी आणणे, किराणा आणणे ,मुलाच्या तसेच शाळेत पालक सभेस जाणे ही कामे सुधा स्त्रिया जास्त चोखंदळपणे करतात .तसेच नोकरीच्या ठिकाणी सुधा स्त्रिया आपले काम जास्त काळजीने करताना दिसतात .त्यात स्त्री च्या जिवाचे काय हाल होतात हे स्त्री झाल्यावर च कळते .स्त्रीला बाहेरून येऊन घरातील सर्व कामे करावी च लागतात .उलट मी म्हणते की नौकरी करणाऱ्या स्त्रीला घरचे आणि बाहेरचे दोन्ही जास्त करावे लागते .एवढे करून ही बऱ्याच घरात ह्या स्त्री ला सन्मान मिळत नाही .असे दिसते .अजूनही स्त्रीला सासू र वास नाही पण पतीवास सहन करावा लागतो मोठी शहर सोडली तर स्त्री ला आर्थिक स्वातत्र्यं नाही .अहो माझ्यासोबत च्या काही शिक्षिका आज ही अशा आहेत की त्याना त्यांचे पगार ही माहीत नाहीत .कारण ते काम त्यांचे नवरे चोख करतात .खूप स्त्रियांना आर्थीक भावनिक स्वातंत्र्य नसते .पण अपेक्षा चे ओजे मात्र खूप असते .
 ----कविता देशमुख 


[6/19, 7:31 PM]  🏵स्पर्धेसाठी🏵

🏵मी आजची सावित्री ... नाही भित्री....🌹

    स्रियांच्या बाबतीत आजही समाजाचं चित्र फारसं बदललेलं दिसत नाही... अजूनही पुरुष प्रधान संस्कृती आहे म्हटलं तरी चालेल...     ब-याचदा त्याचा प्रत्येय आल्या शिवाय रहात नाही... जेवढी नकारात्मकता आहे तेवढेच सकारात्मक चित्रही पहायला मिळतं..... या लेखातून... सकारात्मकतेविषयीच बोलण्याचा प्रयत्न....
         मी आजची सावित्री ....
मांडता येतात मला माझे विचार...सहजतेनं व्यक्त होता येतं....चांगल्या- वाईटातला कळतो फरक... तुलनात्मकदृष्ट्या. जुन्या रुढी, परंपरांना मी खतपाणी घालत नाही... अंधश्रद्धेचं ओझं माझ्याच्याने पेलवत नाही.....
      सावित्री बाई फुलेंचा आदर्श आहे माझ्यासमोर ....
पूजनीय, वंदनीय आहेत त्या...
प्रत्येक 'स्री' च्या अस्तित्वाची ओळख आहेत त्या....समर्पणाचं, त्यागाचं ज्वलंत उदाहरण आहेत त्या...
कर्तृत्वाची परिसीमा आहेत त्या.... स्री शक्तीचा जागर आहेत त्या... प्रेमाने ओथंबलेली घागर आहेत त्या... जिवंत आहेत त्या आजच्या प्रत्येक सावित्रीच्या मनात... स्वयंपूर्णतेचे, स्वावलंबनाचे, आदर्श जीवनाचे, शिकून- सवरुन स्व- कर्तृत्वाचे ध्वज उभारण्याचे मुर्तीमंत उदाहरण बनून... जळत आहेत ज्योतीस्वरुप...
रुजत आहेत मनामनात 'स्री-शिक्षणाची' प्रेरणा बनून....
         त्या सावित्रीला स्मरते मी नित्य....तिच्या विचारांनी प्रेरित होऊन... प्रकाशमान करते मी माझं संपूर्ण जीवन... माझ्यातील क्षमतांची ओळख मला त्या माता सावित्री मुळेच झाली...त्या आईचा आदर्श समोर ठेवून अजूनच उंचावत आहे माझं आकाश.... मला आजमावण्यासाठी.... खरी उतरत आहे मी... आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर .... यशाचे ध्वज फडकविण्यासाठी अधिर आहे मी.... "स्री शिक्षणाचा" वारसा अविरत जपायचा आहे... प्रत्येक स्रीच्या मनात सावित्री बाई फुलेंची शिकवण जाणिवपूर्वक पेरण्याचा अट्टहास आहे माझा... शिक्षणाने समृद्ध होऊनच... प्रत्येक स्री स्वयंपूर्ण होईल हा विश्वास आहे माझा..
          मी स्वतः स्वयंपूर्ण आहे... बिनधास्त आहे...सर्व जबाबदाऱ्या पेलण्याचं माझ्यात सामर्थ्य आहे...सांभाळता येते मला मर्जी कुटुंबाची... पेलते मी जबाबदारी बाहेरची आणि घरची... स्वतःला सिद्ध करता-करता जपते मी नात्यांना बखुबी...खांद्याला खांदा लावून जोडिदाराच्या...सांभाळते मी धूरा संसाराची ... जपते आईपण... करते योग्यरितीने मुलांचं संगोपन ... घडवते एक चांगलं व्यक्तिमत्त्व भावी पिढीचं...
         अंधश्रद्धेला पडत नाही बळी... खोडून काढते प्रत्येक कल्पना खुळी... चांगली- वाईट नजर मला कळते...वाईट प्रवृत्तीच्या लोकांना शिकवता येतो धडा...
       मान्य आहे मला, स्वप्नवत सारं असणार नाही...पण परिस्थितीशी झुंज देता येते मला...अन्याय सहन करणं रक्तातच नाही माझ्या.... अन्यायाला लगाम घालण्याची मला, अवगत आहे कला...
       सावित्री बाई फुलेंचा वारसा चालवायचा आहे अखंड.... सावित्रीच्या अनेक वारस कन्यांनी उंचावली आहे मान देशाची.... अनेक क्षेत्रात प्राविण्य मिळवत...फडकवले आहे ध्वज यशाचे....कुठल्याच बाबतीत मागे नाही... सोबतीने लढत आहे "आजची सावित्री"... झेप तिची दिवसेंदिवस उंचावत आहे.... सहज अवकाशाला गवसणी घालण्यासाठी .... उडवते ती "फायटर प्लेन" अगदी आत्मविश्वासाने .... बिनधास्तपणे....देशाच्या सीमेवर... लढते आहे देशासाठी.... सलाम तिच्या कर्तृत्वाला .... अशी अनेक क्षेत्र आहेत... जी स्रीयांनी काबीज केली आहेत....काय वर्णावे त्यांचे गुण...???
    सलाम.... सलाम... सलाम.
आजच्या सावित्रीच्या लेकी स्वयंपूर्ण आहेत.... केवळ आणि केवळ सावित्री बाई फुले आणि क्रांतीसुर्य ज्योतिबा फुलेंमुळेच.....

आम्ही सावित्रीच्या लेकी
आम्हांस असे अभिमान 
प्रगत आणि उज्वल भविष्य 
प्रगल्भ आमचा स्वाभिमान ....

- जयश्री अनिल हातागळे 
कोंढवा बुदृक ,पुणे 48
[[]][[]][[]][[]][[]][[]][[]][[]][[]]

[[]][[]][[] संकलन समाप्त [[]][[]][[]




[6/19, 6:13 PM] नासा येवतीकर धर्माबाद:
साहित्य दरबार स्पर्धेत आज सहभागी स्पर्धक
1) हणमंत पडवळ
2) सुन्दरा सानप
3) नासा येवतीकर
4) मीना सानप
5) संगीता देशमुख
6) निर्मला सोनी
7) कल्पना जगदाळे
8) वृषाली वानखडे
9) सुनंदा पाटील
10) प्राची देशपांडे
11) प्रणाली काकडे
12) संगीता सपकाळ
13) बाबू फिलीप डिसोजा 
14) कविता देशमुख 
15) जयश्री अनिल हातागळे 

चुकून कोणाचे नाव राहिल्यास चेक करावे























Tuesday 14 June 2016


opening day



*शाळा प्रवेशोत्सवाचा उत्सव*

जून महीना उजाडला की सर्वत्र शाळा प्रवेशाची धामधुम चालू होते. शहरात या प्रक्रियेसाठी किती हालअपेष्टा सहन करावे लागते याची जाणीव शहरात गेल्याशिवाय येणार नाही. पालक  आपल्या मुलाना चांगल्यात चांगली शाळा मिळावी यासाठी भरपूर प्रयत्न करतात. वाटेल तेवढे पैसे खर्च करण्याची ही त्यांची तयारी असते. काही शाळेत प्रवेशासाठी रांगाच्या रांगा असतात, मुलाच्या प्रवेशासाठी अनेक जण सुट्टी सुध्दा टाकतात. मोठ्या लोकांची शिफारस पत्र लावतात. मुलांच्या प्राथमिक शिक्षणावर लाखो रूपये खर्च करणारे ही पालक आढळून येतात तर एक ही रूपया खर्च न करणारा पालक ही येथे सापडतो. मात्र खेडोपाडी असलेल्या जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील प्रवेश प्रक्रिया वेगळीच असते. गरीबाची शाळा म्हणून या जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेची ओळख आहे ,त्यामुळे या शाळेकडे लोकांचे आकर्षण व्हावे आणि या शाळेत प्रवेश वाढावा यासाठी शासनच्या शालेय शिक्षण विभागाकडून वेगवेगळ्या योजना तयार केल्या जातात उदाहरणार्थ प्रवेश पंधरवडा, लक्षवेधी नमस्कार यासारखे उपक्रम तयार केले जातात आणि त्या अनुषंगाने कार्यवाही केल्यामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या वाढेल अशी प्रशासनाला खात्री आहे.
शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या प्रवेशानिमीत्त प्रवेश उत्सव म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. गावात देशभक्तिपर गीते व नारे देत बालकाची प्रभातफेरी काढणे आणि प्रवेशपात्र मुलांची त्याच्या घराजवळ फूल देऊन स्वागत करून त्याच फेरीतून प्रवेश प्रक्रिया करण्याची योजना खरोखरच मुलाना शाळेत सहजरित्या प्रवेश देऊन जाते. शाळेत आणि परिसरात रांगोळी टाकून वर्ग सजावट केल्यामुळे मुले पहिल्या दिवसापासून उत्साही असतात. शाळेत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देऊन त्यांना त्यांच्या नविन अभ्यासक्रम आणि नविन वर्गशिक्षकाची ओळख करून देणे, हा एक चांगला कार्यक्रम होतो. यावर्षी मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे बहुतांश शाळेवर जुन्या शिक्षकांच्या ठिकाणी नविन शिक्षक आलेले आहेत. त्यांची ओळख करून देणे आणि त्यांचे स्वागत करणे यामुळे सर्वाना उत्साह येईल. पुस्तक वाटप करण्याचा कार्यक्रम गवाकरी समक्ष करून, गेल्या वर्षी अभ्यासात चांगली प्रगती केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकाचा गौरव केल्यास त्याचे फायदे आपणास वर्षभर अनुभवास येतात. शालेय गणवेश वाटप करण्याचा कार्यक्रम सुध्दा याच अनुषंगाने पार पाडल्यास मुले अजुन आनंदुन जातील. अर्थातच शाळेचा पहिला दिवस कोणालाही अवजड वाटू नये ,याप्रकारे खेळीमेेळीच्या वातावरणात पूर्ण केल्यास शाळेत नवागत येणाऱ्या बालकावर अनुकूल परिणाम बघायला मिळतात. याउलट जर चित्र शाळेत पाहायला मिळले तर त्या नव्याने प्रवेश करणाऱ्या मुलांवर प्रतिकूल परिणाम होऊन मूल हळूहळू शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वीच्या काळात शाळेत येणारी मुले सदा रडतच येत होती. आंगणवाडी किंवा बालवाडी नावाचा प्रकार फार कमी होता. मुलाना शाळेचा अजिबात गंध राहत नव्हता. परंतु आज तशी परिस्थिती राहिली नाही , तीन वर्षाच्या मुलापासून शाळेला सुरुवात होत आहे त्यामुळे पहिल्या वर्गात येणारा मुलगा हसत खेळत प्रवेश करीत आहे. या गोष्टीचा विचार करून शासनाने प्रत्येक शाळेला आंगणवाडी किंवा बालवाडी जोडल्यास शाळेच्या गुणवत्तेत आणि शैक्षणिक प्रगतीत नक्कीच वाढ होईल. सर्वाना मोफत शिक्षणाच्या कायदे मध्ये सुधारणा करून सहा ऐवजी तीन ते चौदा वयोगट करणे भविष्यात अत्यंत आवश्यक आहे असे वाटते.
मुलाना प्रवेश करणे या उपक्रमाची जबाबदारी ही शाळाप्रमुख या नात्याने मुख्याध्यापकाची आणि शिक्षकांची तर आहेच शिवाय गावस्तरावरील ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच ,उपसरपंच व इतर सदस्य , महिला बचतगट आणि इतर समित्त्या यानी यात सहभाग घेतले तर उपक्रम पूर्णपणे यशस्वी होईल. गावाच्या विकासासाठी शाळेने पूर्ण प्रयत्न करावे तर शाळेच्या विकासासाठी गावातील प्रत्येक घटकानी मदतीच्या स्वरुपात उभे राहिल्यास गावातील शाळा नावरूपास येण्यास वेळ लागणार नाही.
कोणत्याही कामाची सुरुवात चांगली झाली तर अर्धे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असे म्हटले जाते त्यामुळे शाळा प्रवेशोत्सव आपण सर्वानी अगदी आनंदात आणि उत्साहात सहभागी झालात म्हणजे मुलाना शाळेच्या वातावरणचे दडपण वाटणार नाही आणि त्याच्या मनात शाळेविषयी गोडी निर्माण होईल.

नागोराव सा. येवतीकर 
मु. येवती पो. येताळा
ता. धर्माबाद जि. नांदेड 
09423625769

Sunday 12 June 2016


{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
{{{}}}{{}}संकलन प्रारंभ {{{}}}{}
📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊
     द्वारा आयोजित

🗽    साहित्य दरबार    🗽
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

🚩भाग :- ( 8वा )-आठवा 🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - 12/06/2016
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
★★★★★★★
*शैक्षणिक वर्ष 2016 -2017 सत्राच्या प्रारंभानिमित्त विशेष*
††††††††††††††††††
==================
📝  विषय:- " *माझी शाळा* _किंवा_  *माझ्या आठवणीतील शाळा* "
==================
💥 संकल्पना :--↓↓
श्री.आप्पासाहेब सुरवसे,  लाखणगांवकर
**************************
💥 संयोजक --↓↓
श्री ना .सा. येवतीकर  
************************
💥 परीक्षक -  *सौ. कविता देशमुख -बडवे बीड*
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''""""
💥संकलन --
 जी पी पवार पाटिल सर 
~~~~~~~~~~~~~~~
💥 ग्राफिक्स - श्याम स्वामी सर 
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}

🌹साहित्य दर्पण ग्रुप व्दारा
आयोजित 🌹
***********************
साहित्य दरबार
***********************
माझी  शाळा
***********************
ही आवडते मज मनापासुनी शाळा
लाविते लळा ही जशी माऊली बाळा
हासर्या फुलांचा बाग जसा आनंदी
ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी
हासुनी हसवुनी सांगुनी गोष्टी
आम्हास आमुचे गुरुजी शिक्षण  देती
हे प्रेम कराया किती भोवती भाऊ
हातात घालुनी हात  तयांच्या राहु
येथेच बंधु प्रेमाचे घ्या धडे
मग देशकार्य करण्याला व्हा खडे
मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा
जी तयार करते देशासाठी बाळा
            हे गीत नुसते गुणगुणले तरी माझ्या बालपणीच्या शाळेचे रुपडे जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहते आणि 50 वर्षापुर्वीचे बालपण आठवते
आज माझे वय 56 वर्षेआहे.
मी मुख्याध्यापिका आहे पण
छे ! बालपण म्हणजे जिवनातील सकाळ,नव्हे नव्हे जीवनातील वसंत ऋतु.जीवन
म्हणजे एक लांबलचक प्रवास
आहे.,खरतर बालपण म्हटले की सर्वात अगोदर आठवते ती "आई" परंतु
दुर्भाग्य याविना का आम्हास नाही आई ." असो.
आगगाडीतल्या प्रवासासारखी अनेक वळणे येतात जीवनप्रवासामध्ये .
बालमनाची नाजुक अवस्था
पक्षानांही लाजवेल अस स्वच्छंदपणे मुक्त विहार !! अन् एके दिवशी शाळेत नाव घालायच हे ऐकले आणि मी
खुप घाबरले, कारण काही बाही ऐकलेलं शाळेबद्दल,
आईने नविन कपडे , दप्तर,
खापराची पाटी, पेन्सिल आणले आणि आमची स्वारी
तयार होऊन निघाली.
                 माझ सारं स्वातंत्र्य हिरावुन घेणारा तो क्षण ! इवल्याशा मनात भीती
आणि आश्चर्य यांचे व्दंव्द
चाललेल, नाव नोंदणी झाली
माझ्या वर्गात मला सोडले,
पण माझं स्वागत बावरलेल्या
चेहऱ्यानी आणि हुंदक्यानी 
झालं काहीनी तर सप्तकात सुर लावला होता.झाडांच्या 
फांदीवर चिमण्या बसाव्यात
तशी पोरे एकमेकांना बिलगुन
बसली होती.तिथे बाजुला माझे गुरुजी उभे होते , पांढरा शुभ्र धोतर ,शर्ट ,डोक्यावर टोपी गोड हसरा चेहरा.
त्यांच्या कडे पाहुनच मला धैर्य आलं.
            आता मात्र माझी नजर आजुबाजुला गेली तो 
काय मज्जाच मज्जा !! रंगीत 
मणी,  चेंडू , खेळणी, गोट्या, 
ठोकळे आणखी बरच काही
खुप खुप  आनंद झाला शाळ मला आवडली पण सवय  नसल्यामुळे कधी एकदा घरी
जाईन अस मला झालं,अशा
प्रकारे माझ्या आयुष्यातील   पहिल वळण.
               आज मी अशा वळणावर येऊन उभी आहे की जिथुन विशाल भविष्य
काळाच क्षितीज पसरलय
ज्याला कधी अंत च नाही
आणि म्हणुण माला वाटतं की
तै माझा शाळेतला पहिला दिवस म्हणजे माझ्या उज्वल,
भविष्याची रम्य पहाट होती .
             काय गमत आहे ज्या शाळेत पहिलीत प्रवेश 
घेताना जी अवस्था होती तीच  अवस्था  दहावी नंतर होती पण फरक केवढा  होता,
येताना  भिती,तर जाताना भक्ती,येताना पाटी कोरी,
जाताना ज्ञानभांडारातील 
अमोल रत्ने शिगोशिग भरली    होती, येताना मातीचा गोळा
जाताना झालं त्याच सुंदर 
शिल्प. ही किमया घडवली
माझ्या गुरुंनी,ही इमारत म्हणजे नुसत्या विटांच्या खोल्या नव्हेत तर ते आहे 
साक्षात मंदिर. मंदिरात असते म्हणून कि काय शाळेत
ही घंटा असते.या  मंदिराच्या 
गाभाऱ्यात केलेले कवितांचे 
पाठांतर,पाढ्यांची आवर्तने,
शब्द भेंड्या,सागरगोट्यांचा
रंगलेला डाव आजही सर्व
आठवते.हीच जागा ती जिथे
ज्ञानेश्वरांची ,चोखामेळ्यांची
संत कबीर.,इंदिरा संत,शांता
शेळके, बालकवी,कुसुमाग्रज
यांची ओळख  इथेच झाली.
इथेच माझी एडीसन,न्युटन
यांच्याशी मैत्री झाली,मानवी
रचना समजली इथेच, चार
भिंतीत बसुन जगाची सफर
केली,जिज्ञासा चेतवली,
फुलवली ती इथेच.सहजीवन 
मी इथे अनुभवले,डबेच काय
सुख-दुःख ही वाटुन घेतले.
रुसवे, फुगवे,भांडण-तंटे,
कट्टी-बट्टी यांनी चविष्ट केलं इथलं जीवन.
 मला वाटतं मी खुप लांबचा
प्रवास केला, मु.अ. पद मिळालं,प्रतिष्ठा मिळाली तरीही मला जमिनीवर पाय
ठेवुनच चालायला आवडतं 
जेंव्हा मी आयुष्याकडे वळुन
पहाते तेंव्हा मला काही गोष्टी
तुम्हाला सांगाव्याशा वाटतात
ते म्हणजे---या जगात कोणतीही गोष्ट सहजासहजी
आणि मोफत मिळत नसते ती
लढुन किंवा कष्ट करुन मिळवावी लागते.कष्ट करण्याचा आपल्याला आनंद
वाटला पाहिजे,कष्ट करुन बाहेर पडणाऱ्या घामाचे मुल्य
सर्वश्रेष्ठ असते म्हणून स्वावलंबी व्हायला शिकलं
पाहिजे शाळेत जे मिळतं ते 
35 मार्कासाठी असतं आणि 
राहिलेले 65 मार्क्स ज्यातुन
जीवन घडत असत ते तुम्हाला
शाळेबाहेर अनुभवातुन मिळवावे लागते.तुम्ही जिद्दीने
लढता तेव्हा  यश तुम्हाला 
शोधित असते.जो दुसऱ्याच्या सावलीत राहतो
तो स्वतःची सावली गमावुन
बसतो.सावलीची किमत उन्हात उभे राहुनच कळते हे झाले मी जिथे घडले त्या शाळेविषयी आणि आता जिथे देशाचा भविष्यकाळ मी घडवते त्या शाळेविषयी थोडसं-----
    "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" या उक्तीचा प्रत्येय सध्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये
येत आहे कृती केली कि यश
मिळते पण त्यासाठी कष्ट करण्याची गरज असते.
माझ्या शाळेत अत्यंत नाविन्यपुर्ण उपक्रम राबवले जातात या उपक्रमाचा वेग थक्क करणारा आहे.एका पणतीने अनेक पणत्या लावता येतात त्याप्रमाणे एका कडून प्रेरणा अनेक जणाकडे,
ज्ञानाच्या ज्योती शाळेमध्ये
उजळण्यास सुरुवात झाली आहे शिक्षण क्षेत्रातील ही क्रांतीची नांदी आहे.
                  शिक्षणाचा मुळ हेतु बालकांच्या अंगभूत कौशाल्याचा विकास करण्या 
करीता पुरक वातावरणाची
निर्मिती करणे व त्या व्दारे बालकांचा सार्वांगिण विकास
साधने य दृष्टीने माझ्या शाळेत प्रयत्न होतात.
कोणत्याही दडपणाशिवाय 
विद्यार्थी कसे अध्ययन करतील हे पहाणे हा ज्ञानरचनावादाचा मुख्य गाभा
आहे.त्या दृष्टीने माझ्या शाळेत विद्यार्थी स्वतः  ज्ञानाची रचना करतात.
कोणतीही संकल्पना जेव्हा समजते,उमगते,पटते तेव्हांच ती खर्या अर्थाने रुजते त्या प्रमाणे ज्ञानरचनावाद नव्याने रुजु पहात आहे.माझ्या शाळेत सहशालेय उपक्रम, दैनंदिन परिपाठ स्पर्धा परीक्षा
तयारी,हस्ताक्षर स्पर्धा,क्रिडा
स्पर्धा,रांगोळी स्पर्धा शाळेसाठी झटणारे सर्व शिक्षक या सर्वांच्या प्रेरणेने व प्रयत्नाने माझी शाळा शिक्षण क्षेत्रासाठी आदर्श ठरत आहे.
ज्याप्रमाणे वर्षभराच्या कष्टानंतर शेतकऱ्यांना धान्याच्या रुपात केलेल्या कष्टाचे गोड फळ मिळते त्या प्रमाणे आम्हां सर्वांना केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसु
लागले.अशा प्रकारे माझ्या शाळेत विद्यार्थी अप्रगत राहणार नाही याची खबरदारी आम्ही सर्व टीम घेत आहोत व शाळा प्रगतीच्या दिशेने कशी वाटचाल करील हे पाहिले जाते.
"गुरु ने दिला ज्ञानरुपी वसा
आम्ही चालवु हा पुढे वारसा."

सौ.मीना सानप बीड  @ 7
9423715865

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}

*शाळेला चाललो आम्ही*

नेमिचि येतो मग पावसाळा या उक्‍तीप्रमाणे जून महिना उजाडला की पावसाळ्याला जशी सुरूवात होते अगदी त्‍याचप्रमाणे मुलांच्‍या शाळेलाही याच महिन्‍यात सुरूवात होते. जसे शेतकरी उन्‍हाळ्यात शेतीची मशागत करून नवीन उत्‍पन्‍न घेण्यासाठी पावसाची जशी चातक पक्ष्‍यांप्रमाणे वाट पाहतो. अगदी तसेच शाळकरी मुले शाळा सुरू होण्‍याच्‍या तारखेकडे, शाळेच्‍या घण घण आवाज करणा-या घंटेकडे आतुरतेने वाट पाहत असतातच. तब्बल दीड ते दोन महिन्याच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज शाळेला सुरुवात होत आहे. उन्‍हाळ्यातील प्रचंड उष्‍णता, गरमी आणि तेवढाच वातावरणातील उकाडा, रोज घरातच बंदीस्‍त राहून, मित्राची ताटातूट झालेली, तेच ते कार्टून बघून सर्व मुलांना याचा ऊब आला असेल आणि शाळा सुरू होण्‍याची ते वाट बघत असतील असे म्‍हणणे आश्‍चर्याचे वाटणार नाही. नवीन शाळा, नवे मित्र , नव्‍या वर्गात प्रवेश करणा-या सर्वच मुलांना शाळेच्‍या पहिल्‍या दिवसाची उत्‍सुकता लागलेली असते. कधी एकदा शाळेत जाईन आणि नव्या मित्रांना नव्या शिक्षकांना भेटेन अशी उत्‍सुकता त्‍यांच्‍या मनात असते त्‍याचमूळे शाळेच्‍या पहिल्‍या दिवसाची आतुरतेने प्रतिक्षा करणारी बच्‍चे कंपनी जाम आनंदात असतात. नवीन मित्रांसोबतच नवी कोरी करकरीत पुस्‍तके त्‍यांना आकर्षित करतात. कधी एकदा पुस्‍तके हातात पडतात असे मुलांना वाटत असते आणि शाळेच्‍या पहिल्‍याच दिवशी मुलांच्‍या हातात पुस्‍तके देण्‍याच्‍या शासनाच्‍या उपक्रमामुळे सुद्धा मुलांना या दिवसापर्यंत वाट पहावीच लागते. पूर्वी जेव्‍हा शाळेतून पुस्‍तक वाटप केल्‍या जात नव्‍हते तेव्‍हा पालक मंडळीकडे तगादा लावून बच्‍चे कंपनी शाळा सुरू होण्‍यापूर्वी बाजारातून पुस्‍तके खरेदी करीत असत तर काही जण जुने पुस्‍तके जवळच्‍या मित्रांकडून अर्ध्‍या किमतीत खरेदी करीत. तो व्यवहार घरातील मोठ्यांना न कळविता देणे घेण्याचा व्यवहार पूर्ण झाल्यावर सांगितले जायचे. त्यामुळे किती पैसा वाचविला याचे सुद्धा गणित करायचो. मात्र त्‍याची मजा आज नक्‍कीच नाही. पुस्‍तके मोफत मिळत असल्‍यामुळे जुन्‍या पुस्‍तकाना कोणी विचारीत नाही, फुकटात मिळणाऱ्या पुस्तकाची त्यांनाअजिबात महत्त्व वाटत नाही आणि बाजारातून खरेदी करण्‍याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. त्‍यामूळे सद्यस्थितीत पुन्‍हा पुन्‍हा वापरा पद्धतीला तिलांजली मिळाली असून वापरा आणि फेका अशी संस्‍कृती उदयास येत आहे, असे वाटते. त्‍यास्‍तव कागद निर्मितीसाठी पर्यावरणावर त्‍याचा अतिरिक्‍त भार पडत आहे, हे निराळेच. 
शाळकरी मुलांसोबतच त्‍याच्‍या पालक वर्गांना सुद्धा शाळा कधी सुरू होते ? याची प्रतिक्षा लागून राहते. दिवसभर मुलांना नियंत्रणात ठेवणे, त्‍यांना कामात व्‍यस्‍त ठेवणे, त्‍यांचे मनोरंजन करणे, त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करणे खरोखरच कठीण काम असल्‍याची जाणीव पालकांना या सुट्टीच्‍या निमित्‍ताने नक्‍कीच झाली असेल यात शंका नाही. त्‍यास्‍तव शाळा सुरू होण्‍याची आतुरता पालक वर्गातही असतेच. सध्‍याच्‍या धावपळीच्‍या व स्‍पर्धेच्‍या युगात पालक आपल्‍या मुलांना वयाच्‍या तीन वर्षापासून शाळेत धाडत असतो. नर्सरी,  एल.के.जी., व यु.के.जी. हे तीन वर्ष शाळा पूर्व तयारीच्‍या नावाखाली मुलांना शाळेत पाठविले जाते. परंतु त्‍यांची खरीखुरी शाळा ही वयाच्‍या सहाव्‍या वर्षी इयत्‍ता पहिली वर्गापासून सुरूवात होते. मुलाचे सहा वर्षे पूर्ण झाल्‍याशिवाय त्‍यास इयत्‍ता पहिल्‍या वर्गात प्रवेश देऊ नये, यामागे शिक्षणतज्ञ मानसिक बाब स्‍पष्‍ट करतात. परंतु पालक या बाबीकडे साफ दुर्लक्ष करीत लहान वयातच मुलांना पहिल्‍या वर्गात प्रवेश देतात. साधारणपणे अशा मुलांना प्रवेश दिल्‍यानंतर याचे परिणाम तीन-चार वर्षानंतर बघावयास मिळतात आणि तोपर्यंत नक्‍कीच उशीर झालेला असतो. त्‍यास्‍तव ज्‍या मुलांची वय प्रवेश समयी सहा वर्षे पूर्ण झाले नाही त्‍यांना पहिल्‍या वर्गात पालकांनी प्रवेश देण्‍याचा हट्ट धरू नये. वयोमानानुसार अभ्‍यासक्रमाची रचना व आराखडा तयार केला जातो व कमी वयाच्‍या मुलांना दरवर्षी वर्ग बदलत गेल्‍यानंतर वरील वर्गाचा अभ्‍यासक्रम झेपत नाही. त्‍यामूळे अशी मुले अभ्‍यासापासून, शाळेपासून, गुणवत्‍तेपासून दुरावण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.  त्‍यांच्‍या मनात शाळा व अभ्‍यास याविषयी भीती निर्माण होते. त्‍यांच्‍या मनात आत्‍मविश्‍वास निर्माण होण्‍याऐवजी न्‍यूनगंड निर्माण होते आणि त्‍याचा कधीच विकास होत नाही. अर्थातच ह्या मुलांना शाळेचा पहिला दिवस काय कोणताच दिवस आकर्षित करू शकत नाही. त्‍यास्‍तव आपल्‍या मुलांना शाळेच्‍या पहिल्‍या दिवसाचेच नाही तर शाळेचे  नेहमीच आकर्षण राहील याकडे शिक्षक आणि पालकानी लक्ष देणे आवश्‍यक आहे.

नागोराव सा.येवतीकर 
मु.येवती, ता.धर्माबाद. 
मो.9423625769

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}

 "माझी शाळा"
ज्ञानदानाच्या पवित्र कार्याला वाहून घेतलेल्या आणि भविष्यातील भारताच्या अधारस्तंभाना
घडविणा-या गुरुजनांना जे आत्मिक समाधान लाभतं ते इतर कोणत्याही क्षेत्रातील नोकरीत लाभत नाही.समोर बसलेले निष्पाप आणि उद्याच्या उज्वल भारताच्या स्वप्नाला डोळयांच्या
बाहूल्यातून चमक दाखवणा-या बालकांना घडवत
असताना मिळणारे समाधान फक्त आणि फक्त शिक्षकाच्याच वाट्याला येऊ शकते.आई वडिलांपेक्षा गुरुजींवर आधिक श्रद्धा आणि विश्वास ठेवणा-या आशाळभूत नजरा जेव्हा गुरुजी म्हणून पारखता येतात, तेव्हा रोमारोमातून
उठणारे तरंग आपणाला तू वेगळा कोणतरी आहेस याची जाणिव करुन देत असतात.हे धन ज्याला सापडते तेच गुरुजी सार्थकतेचे हक्कदार
असतात.
शाळा हे मंदीर या मंदीरातील दैवत विद्यार्थीआणि पुजारी म्हणजे शिक्षक असतो.आपल्या नोकरीच्या काळात अनेक चांगले वाईट अनुभव येत असतात.आपल्याला सर्वच विद्यार्थी लक्षात राहत नाहीत पण काही चुनूक दाखवणारे,गुण दाखविणारे अथवा कधी अवगुण दाखविणारे विद्यार्थी कायम लक्षात राहत असतात.शिक्षक म्हणून काम करत असताना मला माझ्या लहाणपणीची माझी शाळा व माझे शिक्षक मला चांगलेच स्मरणात आहेत.त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाचा पुढे माझ्या समोर असणा-या
मुलांना ज्ञान देण्यासाठी उपयोग झाला,होत आहे.
नोकरी म्हंटलं की या गावात कधी तर दुस-या गावात कधी सतत शळा बदल होत असतो.माझी शाळा म्हणून आठवणीत राहणारी कोणती असं वेगवेगळं सांगता नाही येणार,कारण चांगल्या अनुभवासाठी एखादी तर नको असणा-या एखाद्या अनुभवासाठी दुसरी शाळा आठवणीत राहत असते.आणि खरंतर सर्वच शाळा लक्षात राहतात म्हणण्यास हरकत नाही.पण मला खासकरुन  आठवणीत राहिलेली शळा पुणे जिल्ह्यातील डोंगरी  वेल्हा तालुक्यातील पाबे येथील होय.ही शाळा लक्षात राहण्याचं कारण म्हणजे माझ्या नोकरीची सुरुवात या ठिकाणापासून या शळेपासून झाली. केवळ सुरुवातीची शाळा म्हणून आठवणीत आहे असं नाही.तर ते गाव,तेथील लोक,तेथील माझे सहकारी आणि विशेष म्हणजे तेथील विद्यार्थी.
शाळा म्हणजे फक्त दगड मातीच्या चार भिंतीने बंदिस्त ईमारत नव्हे.चैतन्याचा वास आणि आनंदाचा निवास असते शाळा.मी गावापासून खुप दूर असल्यानं मला फक्त शाळा आणि शाळा यवढंच काम होतं.रविवारीसुद्धा मी शाळेत असायचो,माझे सहकारीसुद्धा शाळेत असायचे.वर्ग सात म्हणजे शाळा सातवी पर्यंत होती पण वर्गखोल्या दोनच होत्या.बाकी वर्ग जवळच असणा-या मंदिरात भरत होते.खेळाला फारच कमी मैदान होते.पण खेळाविषयी आवड असणारी मुलं त्याचाच मनमुराद आनंद घेत असत.ही शाळा आठवणीत राहण्याचं आनखी एक कारण म्हणजे माझा विद्यार्थी किरण श्रीरंग कांबळे हा होय.त्याची जिज्ञासू वृत्ती मला माझे ज्ञान सतत अद्यायावत ठेवायला भाग पाडत असे.रोज नवनविन शंका आणि प्रश्न विचारायचा तो,त्याच्या अभ्यासू वृतीनं तो सर्वांचा आवडता झाला होता. मी त्याचा वर्गशिक्षक असल्यानं मला थोडा जास्तच अभिमान होता त्याचा.त्याच्या सोबतचे सर्व विद्यार्थी नव्हे तर एकूनच सर्व शाळा
आणि आम्ही शिक्षक यांच्यात पिता-पुत्राप्रमाने, माता-पुत्राप्रमाने संबंध होते.कांही कातकरी जमातीची मुलं पण शाळेत होती,त्यांच्या माध्यमातून कातकरी लोकजीवन जवळून पहाता आलं.त्यांच्या चाली, रितीरिवाज ,परंपरा आणि अंधश्रद्धा व त्या आणि  तेथील लोकांचे एकुणच
जीवनमानअनुभवताआलं.शाळेतील सासंकृतिक  कार्यक्रमातून अनेक सामाजीक विषयही मला मांडता आले.विद्यार्थ्याबरोबरच लोकांची सहकार्य भावना,मान सन्मान देण्याची वृतीआणि जिव्हाळा या बाबीमुळे तो भाग तो परिसर ती शाळा कायम स्मरणात राहणार आहे.जास्त पावसाचा असणारा हा भाग,राजगड आणि तोरणागडाचं रोज दर्शन होणारा हा परिसर...सळसळणारे चैतण्य देणा-या
सह्यगिरीच्या रांगा आणि छत्रपतीची पावलोपावली आठवण होणारा प्रदेश कायम आठवत नाही राहिला तरच नवल.या गोष्टीचा आनंद लुटण्याचं भाग्य केवळ त्या शाळेमुळे मला
लाभले.
अधुनिकतेच्या झगमगाटात वावरत असताना मला माझी शाळा आठवण्याचं कारण म्हणजे त्यावेळी शाळा शेणानं सारवावी लागायची.आणि दर शुक्रवारच्या या कार्यक्रमाचं नियोजन फार गंमतीदार असायचं.दोन वर्ग शेण आणायचे एक वर्ग पाणी पुरवठा करायचा तर एक वर्ग सारवन करायचा,कधी कधी यात आमचाही सक्रिय सहभाग असल्यानं लोकांच्या मनात आम्ही घर केलं होतं तर त्यानी आम्हाला केव्हाच जिंकून घेतलं होतं.
माझ्या आठवणीतील माझी पहिली ही शाळा अनेक अर्थाने आजही मला प्रेरणा देते.तिचे स्मरण 
मला आजही उर्जा देते.शिक्षकांना गुरुजी म्हणण्याची तिथली पद्धत,ख-या अर्थानं पेशा शिकवणारी होती.आज मी माझ्या गावी बदलीने परत आलो आहे इकडेे मला सर म्हणून संबोधले जाते.मी गुरुजीचा सर झालो आणि गुरुजी बिरुदातील आनंदाला मुकलो,समाधानाला मुकलो.सरांचा थाट जरी नसला तरी त्याशब्दामुळे गुरुजी असल्यातील आणि सर असल्यातील ठळक भेद कोणास जाणवतही नसेल पण मी अनुवतो आणि जगतो आहे....माझ्या त्या शाळेने
मला माझ्या वरिष्टांकडून शिस्त दिली, विद्यार्थ्याकडून प्रेम मिळालं,लोकांकडून आपुलकी आणि जिव्हाळा मिळाला.मुख्य म्हणजे
खुप मोठा अनुभव मला मिळाला. जो कायम माझ्या सोबत राहणार आहे.


               श्री.पडवळ हणमंत सोपान
        मु.पो.उपळे (मा.)ता.जि.उस्मानाबाद
           8698067566.

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}

🌹स्पर्धेसाठी🌹

===================
       💐माझी शाळा💐
===================

‘माझी शाळा’ म्हटलं की मन कस गोड आठवणीत हुदंडल. अगदीच शाळेत बागडायच ना तसच. मला पहिला दिवस तर आठवत नाही परंतु 4 थी पासुनची माझी शाळा आठवते.
खर तर अस वाटत की बालपणीच वय सुखाच. काय मजा,मस्ती, नुसता धिगांना. सगळ कस डोळ्यासमोरून चाललय अगदी सिनेमा पाहतो ना तसेच.
    शाळा म्हटल पहिला परिपाठच आठवतो. मी शाळेसाठी फारच धडपडी खुप आवड शाळेची. त्यामुळे सगळ्यांच्या अगोदर मी कशी जाईन हित धडपड त्यासाठी काही खायच राहिल तरी चालेल पण नंबर पहिला माझाच कारण जागा पण मग पुढेच मिळेल न. आईवडिल जरी शिक्षक असले तरी तोरा कधी मिरवला नाही.पण मला नि माझ्या मैत्रीणीस पुढे कसे बसता येईल ही फार धडपड.मला आठवत माझ्या जवळच्या मैत्रीणीची बाकी मुलींची कट्टी झाली मग तिच्या एकटीसाठी पूर्ण मुलींशी कट्टी अन एकदा तर तिच्यासाठी एका मुलासही बडवली. अशी आठवणीतील व साठवतील माझ्या शाळेतील पहिली मैत्री.
   हुशारीसोबत थोड्या खोड्याही होत्याच. एकदा एक भन्नाट शक्कल सुचली मग काय अंमलबजावणी ठरली नि काम फत्ते. सरांनी आरोळी निघली नि कोणाचा हा प्रताप.मग काय दोस्ती सोबत दुश्मन जागे झाले नि प्रताप कहानी सुरू “सर कल्पना अन् तिची ही खास मैत्रीण रूख्मीण हिने सर या लाकडी खुर्चीला फट पडलेली खुर्ची आणुन मांडली का तर यावर बसल्यास जोराचा चिमटा बसतो. मलाही बसला सर.”  झालं मग काय उलट्या हावर झडी नि डोळ्याला अश्रूच्या धारा आणि पुन्हा घरी लेक्चर. पण मजा अन् सजा छान होती.
       शाळेतली मजा अन्य कोठेच नाही....................

-कवायतीसाठी पुढे उभे राहण्याची धडपड............

- राष्ट्रीयदिनी जनगनमनसाठीचा सराव.....

-  स्नेहसंमेलनासाठीचा डान्स नि तयारी.......

- उशिरा आल्याची शिक्षा.....

_पास झाल्यावर प्रत्येवर्षी वाटलेले पेढे....

-मैत्रीणीच्या डब्यातला एक घास माझा एक घास तिचा...

-परिक्षा देतांनाची धडधड.....

-रांगोळी,क्रिडा,चित्रकला,शिबर नि अजुन कितीतरी स्पर्धा..........

-अन् शेवटचा तो शाळेचा दिवस टिचर्स डे म्हणुन साजरा केलेला........

 कितीतरी रडलो होतो आम्ही सगळे जणु नवरी चालली सासरी.इतका जीव त्या शाळेत गुंतलेला.वाटायच हे पुन्हा कधी नाही. का संपतीय ही शाळा कायमचीच ?माझी शाळा,माझे शिक्षक,माझ्या मैत्रीणी,माझा वर्ग,माझा बेन्च
हे सारं सारं सुटणार कायमचच. अन् अश्या भरल्या अंतकरणानी शाळेचा निरोप घेतला शेवटचा नि जीवन बदलल. तो सुखद अनुभव पुन्हा नाहीच......

संयोजक नि संकल्पनाकार यांचे आभार पुन्हा त्या आठवणीत थोडस या धकाधकीच्या जीवनात जाऊन जगता आलं.....अशी माझी शाळा तुमच्या समोर मांडता आली पुन्ह: च आभार
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

कल्पना जगदाळे@8★बीड.

📲9921957040.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

{{{}}}{{{}}{{{}}}{{{}}}{{{}}}

🌹स्पर्धेसाठी🌹

मित्रांनो, उन्हाळ्याची मोठी सुट्टी संपून आज सर्व शाळा सुरु होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर "माझी शाळा" हा लेख आपणासाठी. खरे तर प्रत्येक शाळा ही ज्ञानाईच असते. पण प्रत्येकाला माझीच शाळा मोठी वाटत असते. शाळा ती खेङेगावातली असो किंवा शहरातली, शाळा ही शाळाच असते. आपण वयानेच काय सर्वार्थाने कितीही मोठे झालो तरीही शाळेच्या आठवणींमध्ये आपण मस्त रमतो. मला तर आज  माझी शाळा जशीच्या तशी आठवत आहे. हा लेख वाचल्यावर, आपणा सर्वांना सुद्धा शाळेच्या आठवणी येतील. ती शाळा, ते शिक्षक, त्या बाई, ते वर्ग, तो अभ्यास, खेळ, ईत्यादी,.....वाचा आणि घ्या आनंद !


===================
       💐माझी शाळा💐
===================

*गाठली जरी आम्ही, भव्य दिव्य शिखरे,*
*आमुची तू जन्मदात्री, आम्ही तिचीच हो पाखरे,*
*देऊनी बळ पंखी, ती करिते प्रतिपाळा,*
*सर्वांहुनी निराळी, माझी शाळा*

माझे शिक्षण 1ली ते 4थी वेगवेगळ्या शाळेत झाले परंतु ज्या शाळेत मी घडलो ती भगवान विद्यालय बीड...

साधारण 1991 चा जून महिना. बाहेर चिंब पाऊस. पाठीवर दप्तर सोबत गल्लीतील मित्रमंडळी अन् घरापासून पायी जवळपास3 किमी वर शाळा माझे वडील याच शाळेत शिक्षक त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी चेहऱ्यावर भीति नाही 
पाऊस जोर धरत होता तसे पाऊल झपाझप टाकत शाळेत पोहचलोत..
 पांढरा खडू, काळा फळा, निरागस चेहरे, छडी घेतलेल्या बाई, जेवणाचा डब्बा, दप्तर, दगडांच्या भिंती अन् लाकडाचे बाक म्हणजे वर्ग. अन् असे अनेक वर्ग म्हणजे ‘शाळा’  

पुढे पुढे अभ्यास, खेळ, वर्गमित्र, शिक्षक, सर, गृहपाठ या सगळ्या संकल्पना अनुभवू लागलो. सुदैवाने वडिल याच शाळेत शिक्षक असल्याने दहावी पर्यन्त माझी शाळा कायम राहिली,  त्यावेळी शाळा आणि घर यांतील अंतर साधारण 3 किमी होतं, आज ते कितीतरी मैल आहे; उद्या कदाचित एका विश्वाएवढं असेल तरीसुद्धा ‘माझी शाळा’ माझ्याजवळच असेल अगदी माझ्या मनात, अन् हृदयातसुद्धा.

मी धांडेगल्लीतील  ‘ भगवान विद्यालय, बीड’मध्ये कधी प्रवेश केला हे माझे मलाच काय कदाचित शाळेलासुद्धा समजले नाही. एवढे ऋणानुबंध त्या शाळेच्या शिक्षकांसमवेत, भिंतींशी निर्माण झाले होते. एव्हाना घरातील साखरेच्या डब्यापर्यंत हात पोचेल एवढी उंची प्राप्त केली होती, मात्र शाळेत जाण्या-येण्याची, मैदानात खेळण्याची, पळण्याची, पडण्याची उठून पुन्हा पळण्यातील आनंदाची उंची केव्हाच गाठली होती. ती उंची पुन्हा या जन्मात गाठू शकणार नाही.  ज्या दिवशी ‘ माझी शाळा’  या विषयावर स्पर्धेसाठी लिहायचय असा अप्पा सुरवसे सरांचा मेसेज आला; तेव्हापासून मी शाळेच्या जुन्या आठवणीत अगदी रमून गेलो होतो. शाळेची इमारत, तिथला शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद, जन्मदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा, शाळेच्या भिंतीवर असलेली गुणवंतांची नामावली केवळ बोलकीच नव्हती तर सतत प्रेरणादायी अन् काहीतरी करण्याची जिद्द निर्माण करणारी होती. शाळेतील सर्व शिक्षकांना मी हवा तेव्हा हवा तो प्रश्न विचारायचो. अगदी ‘लोकसभेतील शून्य प्रहर म्हणजे काय’ पासून ‘माणूस मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित’ इथंपर्यंत. पण सांगताना आनंद होतो आहे की दरवेळी माझ्या प्रत्येक प्रश्नाचे माझे समाधान होईपर्यंत सर उत्तर देत होते. अगदी कधीकधी नंतर निवांत वेळ देऊनसुद्धा. विद्यार्थ्यांनं केवळ पास होऊन गुणवत्ता प्राप्त करण्यापेक्षा हे कितीतरी अधिक मौल्यवान होतं.
शाळेेचे ग्रंथालय, क्रीडामैदान आजही जसेच्या तसे आठवते.

माझी ‘ भगवान विद्यालय शाळा’ म्हणजे एक विश्व होतं. आजही कुठं 1-2 मिनिटंही उशिर झाला की, शिक्षकांनी शाळेत उशिरा पोचल्यावर मारलेले हातावरचे वळ आठवतात, अन् तेच वेळेवर पोचण्याचं ‘बळ’ देतात.

इयत्ता 6 वीत असताना मराठीच्या  बाईंनी ‘ माझा आवडता खेळ’ या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता. तेव्हा माझ्या निबंधाचं केलेलं कौतुक फार मोलाचं वाटतं. असंच इयत्ता आठवीत असताना हिंदीच्या सरांनी भाषणाच् केलेलं कौतुक आज मला जगातील कोठल्याही पुरस्कारापेक्षा अधिक मौल्यवान वाटतं.

कोणत्याही परिस्थितीत वेळ पाळावी, मुक्या प्राण्यांना अन् झाडांना इजा पोचवू नये, मोठ्यांना आदरानं बोलावं, खूप शिकावं, मोठं व्हावं पण आई-वडिलांना कधी विसरू नये. या संस्कारगोष्टी भगवान विद्यालय शाळेनचं मला दिल्या असं मी नेहमी कौतुकानं सांगत असतो. शाळेत साजरे होणारे गणेशोत्सव, रक्षाबंधन, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ, या गोष्टी दरवर्षी मला खूप आवडायच्या.

 दुर्दैवानं इयत्ता दहावीत तेवढी गुणवत्ता मी प्राप्त करू शकलो नाही, मात्र त्याहीपेक्षा अधिक ‘गुण’ शाळेनं दिल्याचं आठवलं की अक्षरश: मला दाटून येतं. इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम जवळजवळ संपला होता. त्या दिवशी शाळेचा शेवटचा दिवस होता. वर्गशिक्षक परीक्षेबद्दल निरनिराळ्या सूचना देत होते. मात्र, मी माझ्या मनात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करीत होतो. शाळा संपून जगात वावरण्याच्या स्वातंत्र्याचा. शाळेची घंटा वाजली, अन् आम्ही स्वतंत्र झालो. अगदी स्वतंत्र... आता छडी मारणारं कोणी नव्हतं... गृहपाठ झाला का विचारणारं कोणी नव्हतं... पण नंतर हळूहळू लक्षात आलं आपण ‘शाळा’ या विश्वात एवढे स्वतंत्र होतो की उगाच आपण जगाच्या शाळेत उतरलो अन् ‘पारतंत्र्यात’ गेलो. उगाच शाळा संपली... ती शाळा आता कधीच भरणार नाही...


*शेवटी या ओळी आठवतात...*
_शाळेत असताना मधल्या सुट्टिची मजा भारी_
_डब्बा खाऊन खेळत बसायची गम्मत न्यारी_

_काही मुलं पॉकेटमनीतुन विकत घ्यायची काहीसं_
_त्याना पाहून कधी माझंही तोंड व्ह्यायचं एवढुसं_

_लहान मुलांना पैसे न द्यायची शिस्त होती घरात_
_लाडाकोडाची मात्र असायची नित्य बरसात_

_पण वाटे आपणही कधी चटक मटक विकत घ्यावं_
_हातात आईस्क्रीम घेउन मित्रांसोबत मस्त मिरवावं_

_दिसले एकदा मित्राच्या बॅगेतले पैसे उघडे पडलेले_
_मधल्या सुट्टित माझ्याही हाती मग खाऊ आले_

_घराजवळ पोचताच लोक अचानक धावत निघालेले_
_पळणाऱ्या चोराला पकडुन शेवटी बेदम मारलेले_

_जाम टरकली माझी , खिशातले चॉकलेट बोचू लागले_
_सगळे लोकं परत वळुन मला मारणार जणु पटले_

_धुम ठोकली घराकडे , लगेच आईला बिलगलो_
_तिला सगळं खर्र सांगुन खुप खुप रडलो_
_वर्षभर शिकुनही मनाची पाटी कोरी राहून जाते_
_शाळेबाहेरची शाळा नकळत बरंच शिकवून जाते_

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद्



*✍🏻प्रविण सानप*
    *धुळे*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}

✨ माझी शाळा ✨
' सहज मनाच्या संस्कारांना उत्तम आहे शाळा 
म्हणून 'अ,आ,इ,ई' शिकण्या नियमित जा तू बाळा ' 
               माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपल्या शाळेला कधीच विसरू शकत नाही. शिक्षित माणसाच्या जीवनातील अत्यंत संस्कारक्षम काळ हा शाळेतच गेलेला असतो. माता आपल्या बालकाचे संगोपन करते. त्याला चालायला-बोलायला शिकवते. शाळारूपी माता ही बालकाच्या मनावर ठसवते की, "चराति चरतो भग: " - जो चालतो त्याचे भाग्यही त्याच्यासोबत चालते. 
               शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देतांना नयन पटलांवर प्रत्यक्षात तीच... होय माझीच शाळा येऊन उभी राहिली. ज्या शाळेत आईचा हात धरून गेलो त्याच शाळेचा निरोप घेताना मात्र आईचा पदरही पुरेसा पडला नाही. खरचं जगावेगळी होती माझी शाळा... मी त्या शाळेत न शिकता त्या शाळेनेच तिच्या बाहुपाशात घेऊन मला शिकवलं... स्वाभिमानाने जगायला शिकवलं, सुख-दु:खाचा समतोल उपभोग घ्यायला शिकवलं, स्वतः बरोबरच समाजासाठी झटायला शिकवलं, आयुष्याचा खरा अर्थ शिकवलं... खरंच आज मी जे काही आहे ते फक्त अन् फक्त त्या शाळेने रूजवलेल्या संस्कारांमुळेच आहे.  
          . ' छडी वाजे छम छम, विद्या येई घम घम ' या काव्य पक्तींचा पुरेपूर अनुभव मला शालेय जीवनात मिळाला. आमच्या गणिताच्या शिक्षकांचा तो दांडुका आजही नजरेसमोर आला की आजही हात आपोआपच मागे जातो. पण त्याच दांडुक्याने आम्हाला गणितात इतरांपेक्षा खूप समोर नेऊन ठेवलं. तसं आम्हीही होतोच म्हणा तितकेच नटखट, खट्याळ पण अभ्यासात सदैव तत्पर. तास कुठल्याही विषयाचा चालू असो... आम्ही मात्र सदैव आमच्याच धुंदीत. धुंदी होती बालपणाची, बालपणीच्या निरागसतेची.. पण आमच्या शिक्षकांनी अभ्यासा बरोबरच आमच्या कला गुणांनाही वाव देण्याचा सतत प्रयत्न केला. 
              आज मी एका सामाजिक संघटनेचा जबाबदार प्रवक्ता म्हणून महाराष्ट्रभर व्याख्याने देत फिरत असतो. मान-सन्मान मिळतो, चार ओळखी होतात, समाजात हक्काचं आदर मिळतो. पण ह्यामागे सर्वात मोठा वाटा आहे तो माझ्या शाळेचा. शाळेतील चार पोरांसमोर हात-पाय थरथर कापत बोलणा-या लेकराला हजारो जनमाणसांसमोर बेधडक बोलायला शिकवलं. ही शिकवण शाळेतूनच मिळाली. माझ्या शाळेने नुसतं पुस्तकातील धडेच शिकायला लावले नाही तर जीवनाचे धडे देखील शिकवले. आमचे इतिहासाचे शिक्षक म्हणजे जणू शिकवत असतांना थेट इतिहासातच पोहोचायचे. त्यांचा रूबाबही तसाच, आवाजही तितकाच भारदस्त.. त्यांच्या तासात जणू आम्ही स्वतः रणांगणात जावून युध्द लढतोय असं भासायचं... खरंच जगावेगळी होती माझी शाळा.... 
           ज्याप्रमाणे आम्ही शाळेत बागडलो त्याच प्रमाणे जीवनात उभारलोही. हां तशी माझ्या शाळेची इमारत जुनी होती पण तिच्यातील संस्कारांचा विस्तार बराच मोठा होता. काळानुरूप आजघडीला माझ्या शाळेचा चेहरामोहरा भलेही बदलला असेल पण आम्हाला घडवणारी माझी शाळा खरंच निराळी... पाणावलेल्या नयनांनी आज पुन्हा एकदा जावसं वाटतयं माझ्या त्याच शाळेत... मुक्तपणे बागडायला, येथेच्छ मस्ती करायला, तिच्या कुशीत अलगद झोपायला...... 

✎ प्रा. नितीन दारमोड @ 3

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}

साहित्य दर्पण ग्रुप द्वारा   🌹
       साहित्य दरबार स्पर्धा
       🏠  माझी शाळा   🏠
    अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगाव हे माझे माहेर वडील शेतकरी  आईवडील दोघेही अशिक्षित एकत्र कुटुब मोठे काका घरातील कुटुंब प्रमुख इतर दोन्ही भावांनी दादाच्या म्हणण्यानुसार चालायचे मला शिक्षणाची गोडी लागली ती माझ्या पहिल्या शिक्षिका सौ मथुराबाई यांच्यामुळे आजही मी त्याना विसरु शकत नाही कारण त्या माझ्या बाई कमी व आई अधीक होत्या नऊवारी साडी कपाळावर मोठ कुंकू अशा त्या मला माझ्या आईसारख्याच वाटायच्या त्याकाळी खेड्यामध्ये शिक्षणाच एव्हड महत्व नसायचे  सुशिक्षित पिढी म्हटल तर आमची पहिली पिढी आम्हीदोघी बहीणी व दोन भाऊ मी सर्वात मोठी माझे वडील शेतकरी पण त्याना वाटायचे मुलांनी शिकावं
      तेव्हा शाळेत आजच्या सारख्या सोई नव्हत्याआम्हाला कधी नवे पुस्तक मिळत नसायची जुनी पुस्तक घ्यायची शाळेजवळ शेरताटी असायची त्याच्या बुंध्याजवळ बसायचे व एक अनकुचीदार दगड घेऊन त्या चीकाने फाटलेली पुस्तक चीटकावयाची पुस्तकाला कव्हर घालायची ही काम करायचा इतका आनंद वाटायचा
      आज आपण पाहतो मुलांना कशाची पर्वा नाही सगळ काही फुकट मिळतय याचा परिणाम मुलांना त्याच महत्व राहीलेल नाही पुस्तक असो गणवेश असो किंवा शाळेतील खिचडी जेव्हा एखादी गोष्ट किंवा वस्तु आपण विकत घेतो तेव्हा त्याच महत्व पटत असो
माझी शाळा एक आदर्श शाळा होतीबालमनावर जसे संस्कार व्हायला पाहीजेत अगदी तशी भक्कम पायाभरणी माझ्या शिक्षकामुळे माझी झाली    शाळेत विविध उपक्रम घेतले जात असत आणी त्यात मी हिरिरीने भाग घेत असे  आजही तो वर्ग तो बेंच आठवतो आणी पुन्हा एकदा लहाण होऊन शाळेत जाऊन बसावे असे वाटते
       अशी माझी शाळा

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}

-----माझी शाळा----
....................................
ज्ञानाचे मंदिर
ज्ञानाचा सागर
ज्ञानाचे आगर
माझी शाळा
जीवन शिक्षण मंदिर (दहिवली)१ ली ते ४थी
अभिनव ज्ञान मंदिर (कर्जत) 
५वी ते १२वी हायस्कूल
या दोन शिक्षण संस्थांनी, शाळांनी माझे जीवन घडवले.
माझे गुरुजन मातापिता यांनी संस्कार केले.
   त्यामुळेच आज मी या टप्प्यावर येऊन पोहोचलेय.
मराठी माध्यमात शिक्षण झाले पण कुठेही अडले नाही
आमचे शिक्षक आदर्श होते आमच्यासाठी,शिस्त होती माणूसकी होती न्याय होता दयाही होती त्यांच्याठायी.
  हुशार मुलांबरोबर मागच्या बाकावरील मुलांपर्यंत त्यांचे लक्ष असे.
     शाळेची प्रार्थना प्रतिज्ञा राष्ट्रगीत म्हणणे यात आम्ही अग्रेसर असू.मराठी शाळेची एक आठवण सांगते चौथीला स्काँलराशीपला बसले होते मी परिक्षा झाली नि मी पेपर बाईंकडे जमा न करताच घरी नेला आणि कौतुकाने आईला दाखवला बघ मी कसा सोडवलाय सगळा.
तिने कपाळावर हात मारुन घेतला शाळा जवळच होती अजून शाळा सुटायची होती आईने माझे बकोट धरले धावतपळत आम्ही शाळेत पोहोचलो. आईने बाईंना सांगितले की हिने चुकून पेपर घरी आणलाय असा माझा धांदरटपणा.
त्याआधी माँटेसरीतही माझ्या बाईंची तक्रार होती की ही विजू हुशार आहे पण एका जागी बसत नाही अते ज्ञ काढेतोपर्यंत चारी कोपरे फिरुन येते वर्गाचे.
  हायस्कूलमध्ये गेल्यावर मराठीच्या भट बाई हिंदीच्या काळे बाई सःस्कृतचे काळेशास्त्री सर याःची मी विशेषा लाडकी होते
माझे निबंध बाई वर्गात वाचून दाखवायला लावत.चित्रकलेत मात्र कायम सी ग्रेड, आजूनही चित्र जमत नाही.
  शाळेत गँदरिंग समूहगीत यात मी आवर्जून भाग घेत असे.भाषण करणे आवडायचे
परिस्थिती सामान्य होती पण वडील नविन पुस्तके दरवर्षी आणत गणवेश आणि पुस्तके वह्यांचा तो कोरा करकरीत गंध अजूनही मनात रुःजी घालतो .
 अभ्यासात हुशार असल्याने सर्वांची लाडकी होते या दोन्ही शाळेने संस्कारीत केले ते ऋण गुरुऋण कधीच फेडू शकणार नाही ,अजूनही माहेरी गेले की मुलाला गाडी शाळेवरुन घ्यायला सांगते आता शाळेची मोठ्ठी इमारत झालीय ती डोळाभरुन पहाते.
    शाळेचा दुसरा टप्पा जीवनात सुरु झाला माझी मुले शाळेत जाऊ लागली तेव्हा.त्या दोघांचा अभ्यास मला करुन घ्यावा लागला नाही दोघेही जात्याच हुशार ,निते ही मराठी मध्यमातून शिकले तरी मुलागी आज अमेरिकेत सिनिअर साँफ्टवेअर इंजिनिअर आहे नि मुलगा mbaकरतोय दोघेही सुसंस्कारित आहेत
आईवडीलांबरोबरच शाळाही जीवनाची जडणघडण करते
 तिसरा टप्पा शाळेचा मी पाहिलेली अमेरिकेतील शाळा तिथे मी मराठी शिकवायला जात होते नुकतीच परतलेय,
तो अनुभव छानच.आपली मुलेमुली अमेरिकेत स्थायिक होतात तेथे त्यांची मुले इंग्रजीतून बोलतात आपली मराठी भाषा,त्यांच्यात रुजावी मराठी बोलणे संस्कार श्लोक त्यांना यावेत यासाठी तिथल्या मराठी लोकांनी, भारतीय लोकांनी एकत्र येऊन ही शाळा काढलीय तिथे ३ ते १४ वर्षापर्यंतची मुले शिकत आहेत मला तिथली एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली व आवडली ती म्हणजे तिथे मुलांना फक्त नावाने ओळखले जाते .रिया ,निशा ,पराग असे.
परिक्षेला व हजेरीतही नाःवच लिहिले व पुकारले जाते आडनाव नाही यामुळे जातिभेद होत नाही.सर्व मुले एकोप्याने रहातात गोष्टी गाणी, प्रार्थना अभ्यास सारे खेळीमेळीत होते मुलांना न रागावता त्यांच्या कलाने घेतले जाते शिक्षा नाही त्यामुळे मुले खूष,पालकही तेवढीच छान साथ देतात ही शाळा दर रविवारी असायची. माझ्यासाठी हा खूप छान अनुभव होता.
 तिथे गँदरिंग होते त्यात आपले लेझिमचेही सादरीकरण झाले आपले संस्कार त्या मातीत रुजताता हे पाहून मनाला आनंद झाला अशी ही माझी शाळा मी विद्यार्थी असताना माझ्या मुलांची शाळा मी पालक असताना नि परदेशातील मराठी शाळा मी अनुभवलेली एक शिक्षिका म्हणून.
   ही आवडते मज 
मनापासूनी शाळा
लाविते लळा ही 
जसा माऊली बाळा
 प्राची देशपांडे

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}

 📖 माझी शाळा 📖
आजचा विषय सुंदर आणि बरेच काही लिहीण्याची संबंधीत आहे पुर्वीची शाळा विशेष मी ग्रामीण भागातील शाळेचं वर्णन करीत आहे साधारण पन्नास वर्षे आधी ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक एकच आणि शाळेला इमारत सुद्धा नसायची तरी सुद्धा शिक्षकांना आदराने त्याठिकाणी शिक्षणाची गोडी विद्यार्थ्याला लागावी म्हणून प्रयत्न करावे लागायचे आज मात्र या स्पर्धेच्या युगात तेवढे काही दिसत नाही 
जुन महिन्यातील शाळेची घंटा म्हणजे एक प्रकारची जीवन उध्दाराची पहिली वार्निंग आहे जसे मंदिरात गेल्यावर पहिला मान देवाच्या घंटानादाला असतो तेथे आपल्या आत्म्याचे शुद्धीकरण होते आणि शाळेतील घंटानादामुळे जीवनाचे सार्थक होते म्हणुन शिक्षण घेतल्या खेरीज माणसाची प्रगती नाही 
काळ बदलला तसे माणसाची प्रगती होत रहाते आजच्या युगात शिक्षक अत्याधुनिक यंत्रणा कंप्यूटरची गरज नितांत झाली आहे म्हणून प्रत्येक शाळेला डिजिटल बनवण्याचे महान कार्य करणाऱ्या माझ्या गुरुजनांना मानाचा मुजरा प्रत्येक पालकांनी आणि शाळा प्रेमी मित्रांनी शाळेत येऊन शिक्षकांशी संवाद साधला पाहिजे त्यांच्या अडचणी विचारात घेऊन सहकार्य करायला हवे सुसंवादाने  शाळेचाच विकास होत रहातो आणि आपुलकीची भावना निर्माण होत असते म्हणून शिक्षकांना ज्ञान सागराची वाहती गंगा म्हणले जाते ''जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन! भगवंत जाना तया जवळी! !'' म्हणून आज मंदिरा पेक्षा ज्ञान मंदिरांची नितांत गरज आहे आणि त्या मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी पवित्र निर्व्यसनी शिक्षकांची गरज आहे मला आज अभिमानाने सांगावेसे वाटते माझ्या लहान छोट्याश्या गावातील दहावीला शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यामध्ये शाळेमधून  पहिले तीनही क्रमांक पटकावण्याचा मान मिळविला  खुप आनंदाची बाब आहे 
म्हणून गाडगेबाबा म्हणायचे की अंगाला वस्त्र हलके घ्या पण लेकराला शिक्षण शिकवा.
साहित्य दर्पण 
✍🏻_____ गजानन पवार

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}{{{{}}}

 माझी शाळा.......

माझी शाळा...मला यशस्वीपणे जीवन जगण्याची कला शिकवणारी,माझ्या नसानसात अात्मविश्वास ठासून भरणारी,यशाचे वेगवेगळी शिखरे सर करण्यासाठी व स्पर्धेच्या या दुनियेत अापलं वेगळपण सिद्ध करण्यासाठी फडफडणार्‍या माझ्या पंखाला बळ देणारी......
माझी शाळा........

          माझी शाळा शासकिय पोष्ट बेशिक अाश्रम शाळा,मोहपूृर ता.किनवट जि.नांदेड...
गावापासून चार ते पाच किमी.अंतरावर पैनगंगेच्या तीरावर अगदी पाचशे मिटर लांब,उंच अशा महादेव डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात व
उंच उंच टेकड्याच्या 
कुशीत.....

     शाळा कसली गुरुकूलच ते
जिथे सर्वांगीण शिक्षणाचे धडे देवून अष्टपैलू व्यक्तीमत्व घडविणारी जणू नावाजलेली खाणच...
      
        माझे शिक्षण याच शाळेत पहिली ते दहावी पर्यंत झाले...जिथे अाई बापाचा पत्ता नाही.नातेवाईकांचा सहवास नाही अशा या अाश्रमात माझ्या बालमनावर
योग्य असे सुसंस्कार रुजवण्याचे कार्य माझ्या या शाळेने केले......
      माझ्या शाळेतील सर्वच शिक्षक हे शिस्तीचे भोक्ते व अनुशासन पालनास कटिबद्ध असणारे होते..जेवढे कडक शिस्तीचे तेवढेच माया,ममता,प्रेव व करुणेचे सागर होते.....

     अशा या माझ्या अाश्रमातील एक प्रसंग या ठिकाणी मी अभिव्यक्त करणार अाहे...ज्यामूळे माझ्या अायूष्याला खर्‍या अर्थाने योग्य दिशा मिळाली.
मी सहावीत असतानाची गोष्ट
तसा मि वर्गात जेमतेमच होतो..पण खेळ क्रिडा सांस्कृतिक यामध्ये मात्र सर्वांच्यापूढे असायचो..
पण अभ्यासात मात्र मला मनावे तसे यश मिळत नसे..ही गोष्ट माझ्यासवे माझे वर्गशिक्षक श्री दुधे सर यांनाही सतत बोचत असे..मला बर्‍याचवेळा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला...पण माझ्याकडून त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नसे...
      
         परंतु माझ्याकडे इतर चांगले गुण असल्यामूळे त्यांचे माझ्याकडे लक्ष असायचे....
      एके दिवशी गणिताच्या शिक्षकांकडुन सर्वासमक्ष माझा अपमान झाला..तो अपमान माझ्या जिव्हारी लागला...यामूळे मी शाळेतून पळूनच गेलो..पंधरा दिवसांनी मा.दुधे सर माझ्या घरी अाले..व मला शाळेत घेवून गेले..अाणि मला त्यांनी वर्गाच्या माॅनिटर पदाच्या निवडनुकीसाठी उभे राहण्यास सांगितले..अाणि काय अाश्चर्य मी सर्व हुशार मुलांवर मात करुण निवडून अालो..वर्गप्रमुख झालो..अाणि त्यातच दुधे सरांनी जे कोणी पहिल्या क्रमांकाने उतिर्ण होईल त्याला  घड्याळ बक्षिस देण्याचे जाहिर केले...

     मी ठरवले या वर्षी हे बक्षिस अापणच मिळवाये..तसा अात्मविश्वास माझ्यामध्ये सरांनी निर्माण केला...मी तेव्हापासून मागे वळुन पाहिले नाही...
         बारावीपर्यंत पहिल्याच क्रमांकाने उतिर्ण होत गेलो...
अशा माझ्या शाळेला व मला सन्मानजनक जीवन जगण्याचे मूलमंत्र देवून माझ्या अायूष्याला खर्‍या अर्थाने दिशा देणार्‍या माझ्या प्रिय पितृतुल्य गुरुजनांना सन्मानजनक मनःपूर्वक सहृदय प्रणाम...🙏
        

             🎯 मारुती खुडे.

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}

स्पर्धेसाठी 
माझी शाळा 

शाळा म्हटलं की आठवतं बालपण आणि बालपणी शाळेत केलेली मौज, मित्र मैत्रिणी, मस्ती, गप्पा, गोष्टी 
सामुदायिक जेवण, सहल, अभ्यास आणि अजून बरंच काही... 
तर आज मी तुम्हाला माझ्या लहानपणी शाळेत घडलेला एक गमतीदार प्रसंग सांगणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी कधी अचानकपणे असे मजेशीर प्रसंग घडत असतात आणि त्या प्रसंगांची आठवण पुढे आयुष्यभर रहातेच आणि त्या प्रसंगांच्या स्मरणाने मनाचा एक कोपरा नकळत सुखावतो... 
... पैकी असाच एक प्रसंग मी इयत्ता दुसरीत मराठी मुलींच्या शाळेत असताना घडलेला. त्या दिवशी आमच्या शाळेत इन्स्पेक्शन होती. शाळा तपासायला साहेब आले होते. आम्ही सर्व मुली खूप उत्साहात होतो. बाईंनी म्हणजे आमच्या वर्ग शिक्षिका मंचरकर बाई यांनी आम्हाला सांगितले होते, 'साहेबांनी प्रश्न विचारला की, लगेच तुम्ही न अडखळता उत्तर द्या.' साहेब आमच्या वर्गात आले. एकसाथ नमस्ते झाले. बाईंनी साहेबांचे स्वागत केले. मुलींची माहिती दिली : सध्या पटावर किती, हजर किती गैरहजर किती इ. मग साहेबांनी आम्हाला प्रश्न विचारले, त्यापैकी एक प्रश्न होता, "नाती सांगा. आत्या कुणाला म्हणतात ?" 
मी पट्कन बोट वरती केले. साहेब म्हणाले "सांग उत्तर." मी म्हणाले, *आईच्या नणंदेला आत्या म्हणतात. "*
माझे उत्तर ऐकून साहेब चकित झाले. म्हणाले, की" हिने तर नात्यांच्या पलिकडे नाते सांगितले. त्या वेळी साहेबांना वडीलांच्या बहिणीला आत्या म्हणतात, हे उत्तर अपेक्षित होते. अर्थात माझे उत्तरही बरोबर होते. मला तिन आत्त्या आहेत. त्या घरी येणार असल्या की आई मैत्रिणींना सांगायची, "माझी मोठी नणंद येणार आहे, मला लहान नणंदेकडे जायचे आहे." तिचे हे वाक्य ऐकून माझ्या मनावर पूर्णपणे बिंबवले गेले होते की, आत्या म्हणजे आईची नणंद.
नंतर साहेबांनी मला शाबासकी दिली आणि बाईंना विचारले, की "ही मुलगी कोणाची आहे?" बाई म्हणाल्या, "ही आपल्याच शाळेत एक सहशिक्षिका आहेत. सौ. सुंदर खेडकर त्यांची मुलगी आहे ही." 
त्यावर साहेब म्हणाले, "ही मुलगी मोठी झाल्यावर कोणी तरी वेगळीच होईल." 
शाळेत नंतर माझ्या उत्तराची बरीच चर्चा झाली. माझे वय इतके लहान होते की तेव्हा मला निटसे काही कळले नाही, पण आमच्या बाई मात्र माझ्यावर जाम खुश झाल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितले, "शशि पुढच्या वेळेस जेव्हा आपल्या वर्गात इन्स्पेक्शन असेल तेव्हा तू घरी राहू नकोस. नक्की शाळेत ये. तुझ्यामुळे आज शाळेला, वर्गाला साहेबांनी चांगला शेरा दिला."
शाळेत दुसर्‍या दिवशी परिपाठाच्या वेळेस सर्व शिक्षकांनी माझे कौतुक केले. 
आजही इतक्या वर्षांनी लहान पणीच्या शाळेतील आठवणींनी मन आनंदून जाते. 
शाळा म्हणजे संस्कार मंदिर जेथे आपली माणसिक जडणघडण होते, विचारांना दिशा मिळते बाह्य जगात वावरण्यासाठी मनाची तयारी करून घेतली जाते. 
अशी माझी शाळा मला आजही प्रिय आहे. 

लेखिका - सौ. शशिकला बनकर, भोसरी, पुणे 
@35

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}

साहित्य दरबार
भाग 8
"माझी शाळा "
**************
स्पर्धेसाठी
************
"जिल्हा परिषद मराठी कन्या शाळा ",हे नाव एका छोट्याशा खेड्यातील, गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यातील चामोर्शीच्या छोट्याशा शाळेचं. संस्कारमंदीर न म्हणता खूप काही देणा-या शाळेचं. 1962 /63 म्हणजे माझा पहिला वर्ग. बालकमंदीर वगैरे चैन तेव्हा परवडणारी नव्हतीच. उजवा हात डोक्यावरून नेऊन डाव्या कानाला लागला की बखोट धरून शाळेत बसवण्याचा तो काळ होता. अर्थात माझं तसं झालं नाही, कारण बाबा मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक होते. 1ली ते 4थी फक्त 12मुली. झगा घालणारी मी एकटीच. चार पाच जणी परकरी, काही साडीतल्या , आणि दोघीं तर चक्क नऊवारी नेसून शाळेत यायच्या. 
शाळेच्या हाॅलमधे दोन भिंतीशी पहिला दुसरा वर्ग, तर व्हरांड्यात तिसरा चौथा वर्ग भरायचा. 
प्रार्थना झाली की, पाढे सुरू व्हायचे. एक  दोन पासून ते वीस दाहे दोनशे पर्यंत. इयत्तेनुसार. पाढे संपले की वर्गानुसार कविता म्हणायचो. सारंच अगदी तालासुरात. सगळे संत पंत तंत कवी भेटले तेव्हा. म्हणूनच या कवी आणि कवितांचे घट्ट नाते जुळून आले. आजही या सर्व कविता पाठ आहेत, कारण या कवितांनी आमची पाठच सोडली नाही. 
या कवितांनी आमची लहान भावंडं निजवली. कितीतरी अन्योक्ती म्हणून आमच्या भावल्यांची लग्न लावून दिली. हो आणि कवितेच्या भेंड्या खेळताना आजही त्या मला जिंकवून देतात. 
नवीन पुस्तकांची चैन नव्हती. पण नव्या अभ्यासात रमायचा तो रम्य काळ होता. 
राजापुरे  बाई(मुख्याध्यापिका ), नामेवार बाई , वासलवार बाई या तिघींनी आयुष्य भराचे संस्कार केले. 
वर्गात मी पहिली येत असे. पण आंतरशालेय (हा शब्द आत्ताचा) लंगडी, कबड्डी , खोखोमध्ये मी लहान म्हणून घेत नव्हते. आत्ता कळतं तेव्हा सगळ्या खेड्यातल्या शाळांतील मुली अशाच मोठ्या असायच्या. मी आपली संगीत खुर्ची ,स्मरण शक्ती, चमचा लिंबू खेळायचे. झालंच तर नाच गाणं, भाषण यात नंबरात यायची. 
लांडा फ्राॅक, बाॅबकट, जुनं पण ब-यापैकी दप्तर घेऊन मी शाळेत जायचे. इतर मुली मला हसायच्या . कधीच  मैदानी खेळात घ्यायच्या नाही. 
मला खूप गुण मिळाले तरीही चिडवायच्या. दादा आणि बाबा अभ्यास घेतात हे त्यांना खोटंच वाटायचं. म्हणायच्या, तू खोटं बोलतेस. दादा न बा तर शेतावर जातात. 
एकदा खूप  रडवेली होऊन मी घरी आले. काही तरी बिनसलंय हे आईने ओळखलं.बाळ पाळण्यात  झोपलं होतं. मला जवळ घेऊन आई बंगईवर बसली. झोका घेत घेत गाऊ लागली
 "एका तळ्यात होती बदके पिले सुरेख 
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक "
कोणी न त्यास घेई खेळावयास संगें
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनी बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक 

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले 
भय वेड पार त्याचे वा-यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्यांचेच  त्या कळाले तो राजहंस एक "

गाणं संपलं. आईने  मला त्या गाण्याचा अर्थ छान समाजावून सांगितला.
मला त्या नंतर मागे वळून बघावं लागलं नाही.
नंतर5त7 आणि 8ते10वा वर्ग वेगवेगळ्या दोन शाळांमधे झाले. 6व्या वर्गात असताना "सागरा" या शब्दाची विभक्ती संबोधन आहे हे मी एकटीनेच बरोबर सांगितले म्हणून झालेला टाळ्यांचा आवाज मला आजही जगण्याचं बळ देतो. 
काळबांधे सरांनी मला भूगोल असा शिकवला की पुढे सुवर्ण पदक घेऊन मी त्याच विषयांची प्राध्यापक झाले.  
जगण्याचा मार्ग मला या शाळांनी दिला. 9वीत असताना  आमचे मुख्याध्यापक स्व.मुनघाटे सर आम्हाला मराठी शिकवायचे. सहामाही परीक्षेत मी लिहिलेला निबंध त्यांनी पूर्ण शाळेत् वाचून दाखवला आणिां मी भविष्यात लेखिका होईन हे भविष्य वर्तवलं होतं. खरी कविता मी त्यांच्याकडून शिकले. त्यांचेच मार्गदर्शन घेऊन गुणवंत /सुवर्ण पदक विजेती ठरले. 
चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करूनही कुणाला प्रकाश द्यायला हवा हे समजत गेलं.
अनेक घटनांमधून कळत होतं की, कुबड्यांच्या राज्यात बांधेसूद  माणूसही कुरूप ठरतो. हे पुन्हा पुन्हा  नव्याने कळत गेलं.
आज मुलांची मानसिकता ओळखून आम्ही वागायला हवे आहे. आपलं पिल्लू वेगळं आहे का हे वेळीच ओळखले तर पुढील अनेक गंभीर, नको ते, कडवट प्रसंग नक्की टाळता येतील .
तेव्हापासूनच मी मला ओळखायला शिकले. कठीण प्रसंगात ठाम रहायला शिकले. याच गीतानं मला माझी ओळख दिली. 
हीच माझ्या शाळेची नव्हे शाळांची अनमोल भेट आहे.

@@@@@@@@@

सुनंदा पाटील मुंबई

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}

🍁स्पर्धेसाठी🍁

🏚माझ्या आठवणीतील शाळा 🏚

* "शाळा" म्हटले की मुलांमधे आदर्श,संस्कार,प्रेम,
हट्टीपणा,चांगुल पणा, स्वार्थीपणा,द्वेष,खोडकरता,
निरागसता, हे गुण दिसतातच...

पण सोबतच , शिक्षकांबद्दल आदर मात्र अखंड असतो...

"शाळा" आणि "शिक्षक" अखंड एकमेकांची साथ असणारं नातं, कारण मी खानदानी शिक्षकी घरातली, आजी-आजोबा पासून ते आई-बाबा सुद्धा शिक्षक...

तालुका चांदुर बाज़ार मधले गाव "तळवेल", ईथे माझी लाडकी शाळा "जिल्हा परिषद्" मधे माझे ४थी पर्यंत चे शिक्षण, नंतर तिथेच हायस्कूल ला १० वी पर्यंत...कॉलेज पुन्हा अमरावती ला, असा हा शाळे पासून चा प्रवास.....

माझ्या शाळे बद्दल कीती सारे लिहिण्यासारखे आहे.
कारण त्यावेळी "बालमेळावा" राहायचा , पंचायत समिती मधल्या एक ठिकाणी...

शाळे मधल्या शिस्ती सर्व मुलांच्या तोड़पाठ असायच्या...माझेच बाबा H.M. आणि आई शिक्षिका त्याच शाळेवर... बाबा खुपच शिस्तप्रिय , मला वाटायचे शाळा माझ्याच घरची...

"आई-बाबा" ला "आदर्श शिक्षक पुरस्कार" भेटलेला  होता, ते शाळेला मंदिरच समजायचे ...माझ्या शाळे ची प्रसन्नता अजूनही आठवते...
"सर्वपल्ली राधाकृष्णन" यांच्या फ़ोटो समोरची जागा मला न चुकता स्वच्छ करावी लागे नाहीतर बाबां ची ओरड असायची...शाळेच्या सम्पूर्ण आवारा मधील स्वछता तेव्हा एका- एका वर्गा ला करावी लागत असे...

शाळा तपासणी साठी , B.D.O. वगैरे नेहमीच यायचे. त्यांचे मुक्काम आमच्याच् कड़े... ते बाबां  ना नेहमीच म्हणायचे की तुमच्यामुळे शाळा जिवंत झाली...

त्यावेळी "ढ़" मुलांना शिक्षक घरी बोलावून तासंतास येई पर्यंत गिरवायचे, ते ही काम माझ्या आई कडेच. ५ वाजेपर्यंत शाळा व नंतर ६ ते ८ घरी कलकलाट असायचा...

मी कधी उनाड़की वगैरे केलेली आठवत नाही, प्रार्थना झाली की रोज प्रत्येकाला परिपठ वाचावा लागे,एकदा माझा चुकलेला लगेच बाबां  नी छडिने एक लावून दिली. ते मागेच् उभे असायचे , पहिल्यांदा शाळेत माझ्या शिक्षकां जवळ मी रडली ..."तू कधीच चुकत नाही म्हणुन तुझे बाबा तुझ्यावर रागवत नाहि... पण आज परिपाठ चुकलेला होता म्हणून ते रागावले...

तेव्हा ४था वर्ग बोर्ड परीक्षा राहायची, स्वतःचा वर्ग पण सुविचार लिहून सजवला असायचा, माझ्या वर्गाच्या चारही भिंतीं वर ड्राइंग सिट वर सुविचार लिहिण्याचे काम माझेच...

बालपन फारच शिस्तप्रिय गेलेल, दिवळीच्या दिवशी सुद्धा आई बाबा शाळेत येवून शाळेच्या बहेरच्या दरावर "तोरण" चढ़वायचे...एवढे शाळेला जीवापाड़ जपले...अजूनही शाळा तशीच आहे, पण "आई- बाबा " मात्र कायमचे सोडून गेलेंत...त्यांच्या मुळे गावात अजूनही शाळे बद्दल त्यांचा आदर्श सांगण्यात येतो...

या प्रिय शाळेला आणि माझ्या गुरुजनांना शतश: नमन ।।🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

🌹वृषाली  वानखड़े✍🏻
*75*
🌴अमरावती🌴

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}

🍁🍁स्पर्धेसाठी🍁🍁
=====================
      *माझी* *शाळा*
~~~~~~~~~~~~~~~~~~ 
       दि १२/६/२०१६
=====================
  
     काल २६जून ,२६जून म्हंटले कि  कोणत्याही विद्यार्थी किंवा शिक्षका ला त्या दिवशी काय ? किंवा कोणती खास बाब त्या दिवसाची तर झोपेत सुद्धा  'शाळेचा पहिला  दिवस' हेच वैशिष्टय ऐकायला मिळेल.  मी पण एक शिक्षक आणि त्याच नात्याने माझ्या साठी सुद्धा २६ जून हा दिवस तेवढाच महत्वाचा आणि धामधुमिचा होता आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्याच्या दिर्घ सुट्टी नंतर  शाळेच्या पहिल्या दिवशी झालेल्या विविध कार्यक्रमांनी आणि  धावपळी मूळे जाम दमले होते , घरी परत येताच पटापट स्वयंपाक  वगैरे आटोपून लवकर झोपायचे होते ,घरी जेवतांना शाळेच्या पहिल्या दिवसा चा विषय निघालाच मुले म्हणाली  'आई--कसा गेला आज शाळेचा पहिला दिवस ?'  मी पण   'खूप छान'म्हणून उत्तर दिले ,मग मुले म्हणाली 'खूप छान ? मग दमली कशी '?  तेव्हा मुलांना मी म्हणाले थकवा तर आलाच  पण त्या मागे आनंद किती मिळाला हे शब्दात नाहि सांगता यायाचे . छोटे -छोटे गोड , निरागस  विद्यार्थ्यांचे चहरे डोळ्यासमोर येवू लागले आणि त्याचे  बोबडे बोल मी त्यांच्याच भाषेत बोलू लागली , जेवता -जेवता मुले जेव्हा मध्येच मोठयाने हसली तेव्हा माझी तंद्री तुटली आणि मी भानावर आली . आणि लगेच मुलांना म्हणाली जेवा लवकर आणि आवरू दया मला लवकर मी पण झोपणार आज लवकर. सर्व आवराआवर करुन खरच झोपायला गेली आणि पडल्या पडल्या झोप लागली मला.
    नंतर------- स्वप्नात  मी , माझी शाळा, माझ्या शाळेचे दिवस---म्हणजे माझे विद्यार्थी जीवनाचे दिवस ----ती पुस्तके  आणल्यावर कव्हर लावून देतांना बाबा , शाळेचा ड्रेस ठिकठाक करणारी आई आणि ---पेनात ड्रॉपर ने शाई भारतांना मी ----पूर्ण -पूर्ण--अगदि स्पष्ट दिसू लागले सर्व आणि- - आणि  माझी शाळा, माझे सर आणि बाई सर्व दिसू लागले डोळ्यासमोर अगदि एखादा चित्रपट बघावा तसे माझी मैत्रिणी कविता, सुनीता आणि कोण ती---ह शोभा सर्व -सर्व  अगदि त्याचे दप्तरांचे रंग ,मला  शोभा चा खूप खूप आवडणारा फ्रॉक अगदि स्पष्ट दिसत होते मला.
    माझी शाळा  'भारतीय ज्ञानपिठ हायस्कूल ' मला शिकविणारे मुळे सर ,ठाकुर सर आणि माझे सर्वात आवडते सर --जे चित्रकला आणि नृत्य दोन्ही शिकवायचे ते पहुरकर सर ,ठाकुर सर गणित शिकवायचे आणि खेळ पण घेत असत पण मला गणिता साठी नाहि पण खेळ घेत होते न ते सर म्हणून ते पण आवडायचे
आणि मुले सर ---बापरे!!!! इंग्रजी  शिकवायचे ते किती छडया मारायचे ते जितके शब्दांच स्पेलिंग चुकायचे तेवढ्या छडया पण दहाविला मला त्यांच्या मुळेच ७१ मार्क्स मिळाले होते नाहि तर किती मुले फेल झाली होती इंग्रजी मध्ये --बापरे !!!
 माझी शाळा घरा पासुन एक किलोमीटर अंतरावर पण घरून १०:४५ ला निघाली कि बरोबर प्रार्थने ला हजर प्रार्थने नंतर सर्वात आधी वर्गात गेल्यावर सरस्वती स्तवन आणि मग वर्ग सुरु--तेव्हा दर शुक्रवारी  शेवटच्या पिरेडला सरस्वती पूजन व्हायचे आणि ते गुळ-फुटाणे --आ हा हा काय मज्जा यायची ! काय चव  असायची त्याला आणि एकमेकांना मिळालेला प्रसाद बघणे कुणाला जास्त मिळाला आणि कुणाला कमी याचा  अंदाज घेणे आणि चक्क आरतीचे ताट घेवून आरती करण्या साठी   भांडणे सुद्धा, वर्गाची मॉनीटर  म्हणून मग मी जायची सोडवायला भांडाणे आणि माझ्याशीच कट्टी करायच्या दोन-चार मैत्रिणी आणि मग काय ----गट काय पडायचे ,आणि आपल्या गटातली मैत्रीण दुसऱ्या गटात गेली नाहि पाहिजे म्हणून मग ती म्हणेल तसे --तीला लिहून काय द्यायचे तिचे दप्तर उचलायचे आणि खेळतांना ती आउट होवूनही तिचीच बाजू घ्यायची आणि काय काय ? आणि काहीदिवसां नी परत सर्वजणी एकत्र यायचो .
     पण, खूप दिले ह मला माझ्या मत्रिणीं नी खूप वेळा सरां चा मार खाण्या पासून वाचविले मला , मागून शब्दांचे स्पेलिंग सांगून --तोंडावर हात ठेवून ठेवून आणि  बिचाऱ्यां नी स्वत:च मार खाल्ला सरांच्या लक्षात आल्यावर
      खूप गंमतीचे आणि  म्हंटले तर भयानक प्रसंग होते शाळेचे पण आज पण मला एक प्रसंग खूप आठवतो ------मला वाचनाची लहानपणा पासूनच आवड होती  पण त्यानेच मला एकदा वडिलांनी कधी नव्हे ते  रागविले  अर्थात समजाविन्या साठीच-----घरी सर्व भावंडांना  वाचनाची आवड होतीच त्या मुळे वडिलांनी त्या वेळी  'चांदोबा' हे मासिक लावले होतेच ,मला आठवते आता पण मी त्या दिवशी नेहमी प्रमाणे शाळेत जायला निघाली  आणि तेवढयातच सायकल वरुनच  मासिक टाकले घरात  वाटप करणाऱ्याने  आणि  निघून गेला  मी जाता -जाता मासिक  उचलले आणि घरात एकदा डोकावून बघितले की कुणी बघत तर नाहि आहे ना म्हणून  आणि दप्तरात  टाकले आणि निघाली शाळेत .  प्रार्थना झाली वर्गातील सरस्वती स्तवन पण झाले आणि सर वर्गात यायचे  होते म्हणून मी गोष्टी चे पुस्तक काढले आणि लागली वाचायला कारण खूप -खूप  आवडायचे मला ' चांदोबा '
 सर वर्गात आले ,हजेरी झाली , माझे वाचन सुरूच सरांनी इंग्रजी चे पुस्तक काढायला सांगितले  आणि नेहमी प्रमाणे आधी सरां नी लेसन चे वाचन केले आणि मग नंतर आमच्या कडून  तीन-चार लइन्स  वाचन-नेहमीप्रमाणे ,    पण ,माझे लक्ष  सतत खालिच -पुस्तकात ,मी पण थोडी  हुशार म्हणूनच ह सरां च्या  नजरेत ---सरां नी आवाज दिला नेक्स्ट मंजुषा --नेक्स्ट मंजुषा मला माझे 
 नाव ऐकू येताच मी गोंधळली आणिइकडे तिकडे बघू लागली --मैत्रिणी म्हणाल्या उभी राहा --तुला वाचायल     सांगितले  आहे मी उभी राहिली -घाम सुटला आणि खूप घाबरून गेली ,सरांना  वाटले माझा काही तरी गोंधळ होतोय म्हणून सर जवळ आले मला कोणती लाइन सुरु आहे म्हणून सांगायला तर ---------
काय ???
     चक्क माझ्या इंग्रजी च्या पुस्तकात मी  'चांदोबा' वाचून राहिले होते ----सर मला व माझ्या पुस्तकांना घेवून सरळ ऑफिस मध्ये मुख्याध्यापकां कडे  माझे वडिल सुद्धा त्याच शाळेत हेडक्लार्क म्हणून काम करायचे लगेच त्यांना हि पाचारण करण्यात आले माझा कारनामा सांगण्यात आला . तो दिवस आज सुद्धा  आठवतो -------
त्या दिवशी सायंकाळी शाळा सुटल्या नंतर घरी जाण्याची खूप भिती वाटत होत पण, वडिल घरी आल्यावर त्यांनी मला जवळ बसविले आणि समजावून सांगितले  "वाचनाची सवय खूप चांगली पण ,त्याच बरोबर शाळेतील  शिस्ती चे पालन सुद्धा करायलाच पाहिजे ,या नंतर मला अशी कंप्लेंड यायला नको ,घरी आल्यावर वाचायचे होते चांदोबा!!!
    त्या दिवसा पासून ठरविले खरोखरच माझ्या मूळे माझ्या वडिलांना आज ऑफिस मध्ये यावे लागले ,माझी तक्रार ऐकण्या साठी असे पुन्हा करायचे नाहि शिस्त मोडायची नाहि जो पर्यंत मला पूर्ण समज नव्हता तो पर्यंत मला वाईट वाटले आणि राग सुद्धा आला इंग्रजी च्या सरां चा -----पण, जेव्हा दहाविला मी फर्स्ट क्लास मध्ये पास झाले आणि तेच सर घरी भेटायला आले पेढे घेवून त्या वेळी त्यांचे रागविण्याचे कारण समजले मला. 
     सकाळी पाच चा गजर लावला होता गजर वाजला आणि मी एकदम खडबडून जागी झाली , आणि स्वप्न तुटले .पण थोडा वेळ गादिवर तसेच पडून विचार केला की कित्ती दिले न माझ्या शाळेने मला----सर्वच खेळ, कला,नृत्य  आणि शिस्त आणि अनमोल संस्कार
    आज पण कुणी विचारले काय कारवेसे वाटते तर एकच वाटते ---पुन्हा लहान व्हावे पुन्हा शिकायला शाळेत जावे आणि पुन्हा तेच शिक्षक मिळावेत पण मी मात्र या वेळी बदलून खूप  अभ्यास करावा आणि खूप यश मिळवावे.

=====================
*सौ* *मंजुषा* *देशमुख*
@४०📝
            *अमरावती*
          *९४२२८८४१४०*  
~~~~~~~~~~~~~~~~~~

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}

स्पर्धेसाठी 

"माझ्या आठवणीतील शाळा"

      शाळा हा विषय माझ्या तरी आवडीचा आहे पण हल्लीच्या मुलांना कार्टून, व्हिडीओ गेम्स, मोबाईल अशा गोष्टींचं आकर्षण जास्त असल्याचं जाणवतं... अभ्यासाकडे जरा दुर्लक्षच होतं या गोष्टींमुळे.
      खरंच..! लहानपणीचे शाळेतील दिवस, मग महाविद्यालयीन, कॉलेजचे शिक्षण घेतानाचे दिवस हृदयाच्या एका खास कप्प्यात अगदी आवर्जून जपून ठेवलेत.
      बालवाडी, पहिली, दुसरीचं शिक्षण माझं आजोळी झालं... मळेगाव, बार्शी. घर रानात होतं. गम्मत यायची रानातून गावात शाळेत चालत जावं लागायचं. शेताच्या बाजूनेच गावात जाण्यासाठी कच्ची सडक होती....त्या रस्त्याच्या बाजूने बोरं, शेलवट, चिंच, करवंद असा रानमेवा असायचा मग शाळेत जाता-जाता दगड मारून चिंच - बोरं पाडण्याचं ठरलेलं काम. त्यावेळी शाळेत जाण्याचं एक विशिष्ट कारण होतं ते म्हणजे त्यावेळी सुकडी आणि दुधाची एक बाटली आम्हाला शाळेतून मिळायची. बाकी काही आठवत नाही त्या शाळेतलं.... शिक्षकांची नावं वगैरे ...
अजून एक आठवतंय शाळेच्या बाजूचं प्रशस्त मंदीर आणि भली मोठी घंटा... त्या मंदिरात जावून रोज घंटी वाजवण्यासाठी कोणालातरी उचलून घ्या म्हणत घंटी वाजवायची आणि दहावेळा साष्टांग दंडवत घालायचा हे नित्याचं काम. देव पावला की नाही कोणास ठाऊक??
           आई-वडील पुण्यात असल्यामुळे मग मलाही पुण्याच्या म.न.पा च्या शाळेत घालण्यात आले. ती शाळा 
ब-यापैकी आठवणीत राहीली. तिथेही जेमतेम तीन वर्षे शिकले. तिथल्या माझ्या क्लासटिचर आशालता शिंदे मॕडम आठवतात. खुप छान दिसायच्या त्या माझा लाडही खुप करायच्या.अभ्यासात खुप हुशार होते मी... पहिला नंबर यायचा.बरीचशी बक्षिसेही मला त्या शाळेतून मिळाली.
         नवीन को-या वह्यांचा, पुस्तकांचा वास घेणं खुप आवडायचं मला शिवाय नवीन वही व पुस्तकावर सुंदर हस्ताक्षरात अगदी कोरीव काम करत स्वतःचं नाव लिहिणं आजही मला आवडतं.
       खुप चांगले संस्कार झाले त्या शाळेत मानसिक जडण-घडणीला तिथूनच सुरुवात झाली....
          पुन्हा एक नवीन वळण ... घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे मला आणि माझ्या भावाला होस्टेल मध्ये ठेवण्याचे ठरले. त्यासाठी शाळेतून मला शाळा सोडल्याचा दाखला घ्यायचा होता पण मॕडम म्हणाल्या एवढ्या हुशार विद्यार्थीनीला आम्ही दुसऱ्या शाळेत पाठविणार नाही.... पण आईने समजावून सांगितले आणि त्यांनी दाखला दिला.
का कोणास ठाऊक मला खुप भारी वाटले तेव्हा हुशार म्हटले म्हणून, मलाहि नव्हती सोडायची ती शाळा.
          मग, काय माझी रवानगी पुण्यातीलच विश्रांतवाडी येथील बहुजन हिताय विद्यार्थिनी वसतीगृहात झाली. तेथेच जवळ असलेल्या टिंगरेनगर येथील हिमगिरी विद्यालयात प्रवेश मिळाला.
ही शाळा दुमजली व प्रशस्त होती याचा मला खुप आनंद झाला. एवढया मोठ्या शाळेत शिकायचे म्हणून धाकधुकही होती मनात. शिक्षणाची आवड असल्यामुळे या शाळेतही मी माझी ओळख निर्माण केली. खेळाचीही आवड होती मला... या शाळेतूनच मी कबड्डी जिल्हा पातळीवर खेळले.. संघाची मी कॕप्टन होते.. सगळेच शिक्षक त्या शाळेतील आदर्श घेण्याजोगे होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे हे त्या शाळेचे सूत्रच होते जणू. विद्यार्थ्यांचे गुण हेरुन त्यासाठी संधी उपलब्ध करुन दिली जायची...
        एक चांगलं व्यक्तीमत्व घडवलं त्या शाळेने... अशी स्वतःची स्तुती करायला 
आवडेल मला....!!!

---जयश्री हातागळे 
कोंढवा बुदृक 
@66

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}

स्पर्धेसाठी 
लेख – माझी शाळा – भाग ८ वा
प्रेषक – कुंदा पित्रे—(४६)

शाळा म्हटली कि, अगदी राष्ट्रपतीपासुन ते शेतात काम करणारा चार बुक शिकलेला शेतकरी असो. त्यांच्याठायी,त्यांच्या मनात शाळेसाठी एक खास एक बैठक तयार झालेली असते.त्या दिवसांच गुपित आपल्या मनात सांठवत तो आयुष्य आक्रमित असतो.माझ्या आयुष्यात शाळा हा नाजुक कोपरा जपुन ठेवलाय ! पुष्कळजणांच्या आयुष्यात पहिली ते दहावी किवा अकरावी पर्यत सलग एका शाळेत शिक्षण झाले असेल पण मी दोन शाळातून शिकले. पहिली ते सातवी कोकणातील पिटकुली शाळा व पुढे चार वर्षानी गिरगांवातील मुलीची शाळा आठवी ते अकरावी !
गावाच्या शाळेविषयी काय बोलावे ?साठ वर्षापुर्वीचा काळ,गावातील आम्हीच मोठे ,माझ्या वडिलांनीच शाळा स्थापन केलेली व पुढे फायनल पर्यत वाढवलेली. त्यामुळे गावात शिक्षक आले कि, ते त्यांची दुसरीकडे सोय लागेपर्यत आमच्याचकडे रहात असत . त्यामुळे शिक्षकांचा वचक असा कधी वाटलाच नाही. उलट सगळ्या शिक्षक व शिक्षिकाकडून प्रेमच मिळाले. बरं आवाज थोडा बरा म्हणून प्रार्थना,झेंडा वंदनाचे राष्ट्रगीत,शारदोत्सवात भाग हे अगदी ओघानेच येत असे.आमच्या शाळेत शारदेत्सव मोठा दणाक्यात साजरा होई. मग पताका लावून शाळा सजवणं,कार्यक्रमासाठी स्टेज सजविणे,नाच,नाटुकले यांच्या तालमी,देवीची मुर्ती सजविणे, त्यावेळी फुलांना बहर येत असे. मग काय फुलांच्या माळा करणे . हे सारे करताना मैत्रिणी,इतर मुलं जोमाने एकत्र काम करीत असू . पण तेथे कसलंच आकर्षण नसे निव्वळ नितळ पारदर्शी मैत्रीची देवाण घेवाण होत असे. (सैराटनं मन खचून गेले) 
मैत्रीणी सुध्दा जिवाभावाच्या एकीने कै-या आणल्या तर दुसरी तिखट मीट आणणराच.चिंचा पाडायच्या व फ्रॉकात लपवून शाळेच्या मागे जाऊन फस्त करायच्या. किती सुंदर होते जीवन.! नाही कसली चिंता नाही काळजी.सायंकाळी शाळेतून आले की, हातपाय धुऊन ,थोडे खाऊन परवचा म्हणायच्या,अभ्यास करायचा,तेव्हा क्लासेस,शिकवण्या नव्हात्या. आम्हाला अभ्यासाला बस म्हणुन पण सांगावे लागत नसे. अभ्यासात कांही अडचणी असतील तर दुसरे दिवशी मास्तर सोडवून देत असत असा सगळा विश्वास व नेकीचा मामला होता. आणी हो शाळेची मातीच्या जमिनी असत तेव्हा दर आठवडायाला शेणानी सारवणे असायचे. आम्ही सगळे विद्यार्थीच सारवण करीत असू . मी मोठ्या घरची म्हणून सवलत नसे. त्यामुळे आयुष्यात पुढे मोठेपणाचा अहंकार कधी मनाला शिवला नाही. मुलांच्या मनांची मशागत जसे आईवडिल करीत असतात तसेच मुलांना जगात कसं वागाव ,जगाव यात शाळेचाही मोठा वाटा असतो. अर्थात मुलांनी पण शाळेत मिळालेल्या संधीच सोने केले पाहीजे. असंच माझ्या पिटकुल्या शाळेतून सातवीची तालुक्याला जाऊन परीक्षा दिली.तेव्हा माझ्या त्या छोट्या आयुष्यात मोठी घटना घडली !! परीक्षेला चिपळूण येथे गेली असताना कोयनानगरच्या डॉमचे उद्घाटन करायला पंडीत जवाहरलाल नेहरु येणार होते. आम्ही मुलं परीक्षा संपली परतून निघणार होतो पण वडिलांनी निरोप दिला मुलांबरोबर येऊ नको. नेहरुना पाहून ये. मी थांबले आमच्या ओळखीच्या बरोबर कोयनानगरला गेले अगदी जवळून दोन फुटावरुन नेहरु चाचाना पाहिलं केव्हढा भाग्याचा दिवस होता. त्यांच शालीन रुप मी अजुनही विसरु शकत नाही ती डोळ्यात सांठवत माझं गावंच शिक्षम थांबलं कारम पुढे शाळात नव्हती. मुलीना बाहेरगांवी ठेवणे त्या काळाच्या दृष्टीने योग्य नव्हते.
 चार वर्षानी मुंबईत पदार्पण – राहिलेले आठवी ते अकरावी शिक्षण सुरु,वय अठरा चालु.इतर मुली तेरा वर्षाच्या मी साडीत त्या स्कर्टमध्ये पण मी लाजले नाही त्यांच्यात मिसळून गेले. इंग्रजी विषय सोडला तर बाकी सा-या विषयात उत्कृष्ट गुण मिळायचे. आता आपल बाळबोदपण संपलं याची प्रकर्षाने जाणीव झाली. तेव्हा कीतीही कष्ट करुन अकरावी व्हायचेच हे मनाशी ठाम निश्चय केला.तेव्हा क्लासेसनी हळु हळु जीव धरायला सुरुवात केली होती.मला ध्येय गांठायचे होते. तेव्हा दिवस,वार वेळ लक्षात न घेता. अभ्यासात बुडवून टाकले. मैत्री होत्या पण मर्यादित. शाळा ,घर, क्लास हेच जग होते तेव्हा !! तरी देखील वार्षिक उत्सवाला नववीत असताना टिचरांच्या आग्रहामुळे एका एकांकित भाग घेतला. मला वाटतं आनंदीबाई व राघोबादादा यांची एकांकिका होती त्यात आनंदीबाईची भुमिका केली होती. पहिलं बक्षिस मिळाले. पण त्या कला क्षेत्रापेक्षा मला अभ्यास महत्वाचा वाटत होता.परत अभ्यासात झोकून दिले.आमची ही शाळा काही खुप नांवाजलेली नव्हती अकरावी रिर्झल्ट चांगला लागावा म्हणून शाळेने कंम्पलसरी सात ऐवजी आठ विषय घ्यायला लावले. तिथे मात्र मी जरा खटटू झाले. पण तरी सुध्दा साठाला दोन टक्के कमी मिळून उत्तीर्ण झाले. आताच्या नव्वद टक्के प्रमाणेच ते गुण होते. माझे वय २१ होते आणी मी आठवीपासुन विवाहिता होते. 
माझ्या पिटुकल्या शाळेची सय अजूनही मनी दाटते व थोड्या समजत्या वयातील शाळा मनाला ओढ लावते. आपलं जिद्दीपण त्या शाळेत कसं भरभरुन आलं ,त्या शाळेत आपण किती कष्ट घेतले ते गारुड  मनात या वयातही एकटी बसली असताना चलतचित्राप्रमाणे डोळ्यासमोरुन सरकन जातो. मी म्हणते या दोन शाळा मला खुप काही शिकवून गेल्या .
 जय हिंद जय महाराष्ट्र   
कुंदा पित्रे (४६)
दादर,मुंबई २८
९३२४७४२७०६

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}

🌹स्पर्धेसाठी🌹

📝माझी शाळा.....
माझी सध्याची शाळा जि प प्रा शाळा शेंडी ता वाशी जि उस्मानाबाद 
शाळेची वाटचाल....….
जि प प्रा शाळा शेंडी ही दोन शिक्षकी शाळा आहे.इ.१ली-४थी मध्ये २६ विद्यार्थी आहेत.सदर गावची लोकसंख्या ५००असुन गावातील सर्व पालकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती व शेतीपुरक व्यवसाय हेच आहेत.सदर परिसर दुष्काळी पट्ट्यात येत असल्याने शिक्षणाकडे पालकांची उदासीनताच आहे.
     अशाही परिस्थितीतीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तपुर्ण शिक्षण मिळण्यासाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीसच आम्ही दोन्हीही शिक्षक नियोजन करत असतो व त्याप्रमाणे अंमलबजावणी करत असतो.
    मी तीन वर्षापुर्वी या शाळेत बदलुन आले.पुर्वीचे शिक्षक शाळेकडे व विद्यार्थ्यांकडे फारसे लक्ष देत नसत.त्यातच ग्रामीण भागातील पालक,,पाल्यांना देण्यासाठी वेळ नसतो त्यांच्याकडे.माझे काम पाहुनच तीन महिन्याच्या आत गावक-यांनी शाळेला कुलुप लावले.आंम्हाला एक मँडम पुरेशा आहेत ते दोन शिक्षक आंम्हाला नकोत.गावक-यांच्या सतत मागणीमुळे ते माझे दोन बांधव निलंबित झाले व माझ्यावर १-७ वर्ग व मुख्याध्यापिका पदाचा भार येऊन ठेपला.या शाळेचा अध्यापनाचा व इतर शैक्षणिक कामकाजाचा भार मला पेलवेल की नाही ही शंका होती पण माझे पती श्री हरिश रणदिवे यांच्या सहकार्यामुळे मला सतत प्रेरणा मिळत गेली.गेल्या तीन वर्षापासुन मी माझ्या शाळेचे रुपडेच बदलुन टाकलेय.
    'घराची कळा अंगण दाखवते'याप्रमाणे मला शाळेचा उडालेेला रंग स्वस्थ बसु देत नव्हता.शाळेचा परिसर खुप मोठा,रंग नाही, ग्रामीण भाग उदास वाटायचे.दहा वर्ष शहरी भागात नौकरी केलेली त्यामुळे करमक नव्हते,शिवाय मी एकटीच स्टाफ नाही.स्वयंसेवक,प्रेरकांच्या मदतीने एक दीड वर्ष काढली.मी प्रथम माझा वितार काही गांवकरी व विविध समिती सदस्यांना शाळेची रंगरंगोटी बाबत माहीती दिली.सर्व जण लगेच तयार.शाळेचा समोरचा भाग रंगवुन घेतला.बोलक्या भिंती,स्वच्छ व सुंदर परिसर,यामुळेच शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन हळुहळु बदलु लागला.
       ज्ञानरचनावादी पद्धतीने वर्गाची रंगरंगोटी करुन अध्यापणास सुरुवात केली.विद्यार्थी व शिक्षकांनी विविध शैक्षणिक साहित्य तयार केले.गेल्या वर्षी वाशी तालुका ज्ञानरचनावादी जाहीर करताना माझ्या शाळेची निवड केली याचा मला अभिमान वाटतो.अधिकारी व पदाधिकारी यांच्या सतत शाळाभेटी झाल्या.१००हुन अधिक जणांनी ज्ञानरचनावादी वर्गास भेटी दिल्या.
    माझ्या शाळेत राबविलेले विविध उपक्रम.........
     अगदी थोडक्यात........

१.नातं मित्रत्वाचं-------
    शाळेत मुलांसोबत मित्रत्वाचं नाते तसार केल्यास त्याचा निश्चितच चांगला परिणाम जाणवतो.गणित ,इंग्रजी त मुलांना खुप अडचणी येतात.त्या कोणासमोर मांडाव्यात हा प्रश्न मुलांना पडतो.या उपक्रमामुळे मुले शिक्षकांना भेटुन आपली अडचण दुर करु लागली.मुलांची जवळीक तर झालीच पण गुणवत्ता सुद्धा वाढली.

२.रचनावादी परिपाठ------
ज्या शाळेत परिपाठ चांगला होतो तेथे निश्चितच मुलांचे मन रमते.परिपाठ म्हणजे शाळा व जिवन यांना जोडणारा सेतु असतो.दररोज नवीन प्रार्थना व समुहगीते,तिन्ही भाषेतुन प्रतिज्ञा यामुळे मुलांना शाळेत येण्याची गोडी लागली.

३.विद्यार्थी आमचे वाढदिवस त्यांचे-------
सतत कामात असणारी खेड्यातील माणसे अशांना ना मुलांच्या वाढ-दिवसाचे कौतुक ना बक्षिसांचे.मात्र शाळेत मुलांच्या  वाढ-दिवसाच्या तारखा महिनावार  फोटो लावुन वर्गात ठेवल्या.त्यामुळे मुलांना स्वत:ची व मित्राची तारीख माहित झाली. शालेय परिपाठात वाढदिवस साजरे केल्यामुळे मुलांमध्ये आनंद व उत्साह निर्माण झाला.

४.वृक्षाबंधन-------
टाकाऊतुन टिकाऊ जुन्या लग्नपत्रिका विविध आकारात कापुन दोन्ही बाजुला रंगीत दोरे बांधुन पर्यावरण स्नेही  राखी तयार केली.शाळेच्या परिसरात असणा-या झाडांना राखी बांधुन,झाजांची पुजा करुन ,पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली.
------
५.स्टार ऑफ द डे----
६.चॉकलेट फेस अँवॉर्ड----
७.फिरते व तरंग वाचनालय---
८.चला तंत्रस्नेही बनुया---
९.बायोमैट्रिक हजेरी---
१०.पर्यावरण स्नेही होळी---
११.इकोफ्रेंडली गणपती---
१२.कार्यानुभव विविध उपक्रमांची माहीती-- 
   इत्यादी उपक्रम राबवुन माझी शाळा १००% प्रगत आहे.
   ..      संगीता भांडवले(१६)
           वाशी, उस्मानाबाद


{{{}}}{{{}}}{{{}}}{{{{}}}}{{{}}}

नमस्कार सवॅ साहित्य दपॅण टिमला खूप दिवसांनी भेटतेय  सर्वाना 
स्पर्धा साठी सौ संगीता सपकाळ बीड  9421345341

माझी शाळा मी कधीच विसरू शकत नाही कारण ती एक प्रकारची आयुष्य भराची शिदोरी म्हणून काम करत असताना तात
बिजरूपी विचार रूजत अ सतात
ते शाळेत च पूणॅ

 जीवन हे शाळेत घाडते सर बाईख
याचे नखशिखांत निरिक्षण आपण
करत असतो ती व्यक्ती कोण जाणे

आपल्या आयुष्यात काही तरी नवीन गोष्टी शिकायला सांगितले जाते व त्या अनुषंगाने त्या वेळी त्यांनी व्यक्त केली जात असलेलेच
शब्द आपल्या मनात घर करुन त आपण आपल्या भावनानिर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आसतो
शाळा आपण कधीच विसरू शकत नाहीत कारण त्या काळात त्यांनी व्यक्त केली जात अस लेली शब्द आपले जीवन बदलून टाकते माझ्या चित्रा जोश मॅडम  माझे खूप छान कौतुक करायला मागेपुढे पाहत नसत म्हणुन मीही आज खूप छान पदावर कार्यरत आहे

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}

 94234 73472‬:

माझी शाळा कै.चादमलजी लोढा प्राथमिक शाळा चौसाळा. या शाळेत माझे प्राथमिक शिक्षण झाले. ही खाजगी शाळा असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांवर शिक्षक चांगले लक्ष देत असत.मला शाळेत असताना जाधव सर. गायकवाड सर.खाकरे सर तेलप सर. झिरमीरे सर. हे फार छान शिकवायचे ते आजही आठवते. जाधव सर शब्द लिहून पाठ करून घेत..त्यामुळे कधीच विसरणार नाहीत  असे  ईंग्रजी शब्द पाठ होत असत.त्यावेळेला पावसाळ्यात आमची फार फजिती होत  असे मी सुलतापुर येथुन चालत येत होतो.आमच्या शाळेत प्रत्येक वर्षी. नाटक. गाणे  असे संस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात येत  असे..सामुदायिक आत्महत्या केंद्र. हे नाटक फार लोकप्रिय झाले होते. आजही काही लोक मला त्या नाटकातील नावाने चिडवतात. आमच्या शाळेत ज्या शिक्षकांनी कमी पगारावर नोकरी केली. त्याना आचानक जिल्हा परिषदेची नोकरी लागली. ..ते बदलून गेले. .पण ते आमच्या आठवणीत  आजही आहेत. पुढे माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद चौसाला येथे झाले.ही शाळा पण फार छान आहे...या शाळेत असताना भरपूर  आभ्यास करून घेत  असत. आमच्या शाळेने पुढे भरपुर क्लास वन. क्लास टू ऑफिसर तयार केले. माझी जिल्हा परिषद शाळा ही नंबर एकची शाळा  आहे...

{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}}

इंग्रजाळलेलं नाव असलं तरी माझी शाळा मराठीच बरं का...'न्यू इंग्लिश स्कूल जामनेर'.जि.जळगाव(खान्देश).खान गेला पण नाव लावून गेला अन शेक्सपिअर उगाीच म्हणून गेले की नावात काय असतं...हो नां? .असो तर जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांपासून अवघ्या 26 कि.मी.अंतरावर नी कांग नदीच्या काठावर वसलेलं ठिकाण.
     माझ्या शाळेबद्दल काय सांगू नी किती सांगू .आईनंतर माझी प्रिय व्यक्ती म्हणजे हीच शाळा.आईबाबांची बदली झाल्यानं आम्ही तालूक्याला आलो ्न पाचवीच्या द्वितीय सत्रात मी या शाळेत आले.इंग्रजी ओ आकाराची शाळा...बोलक्या भिंती व बोलकेच शिक्षक.पहिल्याच दिवसी पहिल्याच तासात जॉनी जॉनी यस पापा ही कविता शिकले.आमची तुकडी ही सुपरतुकडी होती त्यामूळे उत्तमोत्तम शिक्षक लाभलेत.
 संपूर्ण जिल्ह्यात नावाजलेली शाळा.कुठलचं क्षेत्र दुर्लक्षित झालेलं नव्हतं.दर आठवड्याला हस्ताक्षर स्पर्धा,निबंध स्पर्धा,वत्कृत्व स्पर्धा व्हायच्या.बाळकडू प्यायले ते इथेच जे आजवर पुरतयं.दरवर्षी शाळेचा वाढदिवस साजरा होतो.अनेक दिग्गज व्यक्तींची भेट शाळेतच झाली.बाबासाहेब पुरंदरे...जगदिश खेबुडकरांचा ऑटोग्राफ मी आजवर जपलाय.
      एैसपैस मैदान होतं.अगदी नववीपर्यंत प्रचंड खेळलो.कबड्डी,खोखो,व्हॉलीबॉल माझे आवडते खेळ.एकदा केवळ माझ्या साध्या राईट प्रक्टीसमुळे व्हॉलीबॉल जिंकलो तेव्हा सरांनी कौतूक केलेलं अजून आठवतं.राज्यस्तरीय कबड्डी प्रशस्तीपत्रामुळे माझा डी.एडला नंबर लागला हे ही नसे थोडके.शाळेचे ऋण तर फिटू शकत नाही पण फूल ना फुलाची पाकळी म्हणून गेल्या नोव्हेंबरमधे मी पुढाकार घेवून स्नेहमेळावा घेतला व शाळा व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
       याच शाळेत मिळाले जिवलग मित्र-मैत्रिणी.जवळपास सगळेच आज यशोशिखरावर आहेत.आवर्जून तिळगूळ वाटायचो,राखी बांधायचो,सोबत खेळायचो अन नाचायचो गायचो देखील.नुसतं आठवलं तरी डोळे भरून येतात.
      आमचे शिक्षक निबंधातील शुद्धलेकन तपासायते,जादा वर्ग तासिका घ्यायचे.प्रसंगी रागवायचे.शिस्त तर बापरे...प्रार्थनेला उशिर झाला म्हणजे शिक्षा.आजही त्यामुळेच कुठेही मी वेळेअगोदर पोहोचते.प्रत्येक विज्ञान प्रात्यक्षिक तर प्रयोग शाळेत आवर्जून केलेत व अनुभव घेतले.
       सांस्कृतिक कार्यक्रमात मी नाट्यछटा करायचे.खूप भारी अनूभव यायचा.गर्ल गाईडचे कॅम्प...शेकोटी कार्यक्रम भारावून टाकायचे.इंग्रजी व गणिताचे शिक्षक हे जीव ओतून शिकवायचे.छोटी छोटी चूक दुरूस्त करायचे.
    माझं इंग्रजी हस्ताक्षर थो़डं खराब यायचं.येवले सर म्हटले की जयश्री दररोज एक पान लिहून आण व दाखव. मी एवढे दिवस न चुकता लिहिले की एक दिवस सरच म्हटले आता बस कर.
     एकदा माझा छोटा भाऊ तो तिसरीत असेन प्राथमिक शाळा लागूनच होती.काही कारणास्तव अचानत वर्गात आला व आक्का म्हणून हाक मारून बोलून गेला.मग काय दोन तिन दिवस वर्गात आक्का म्हणून चिडवलं गेलं.
     मी रागीट होते.कधी शिक्षकांशीही कट्टी करायचे.लामखेडे सर म्हणायचेjayshri your range is on the top of your nose.माझं नाक मोठ असल्यानं असेल कदाचीत.हाहाहा.
     निरोप समारंभाला तर रडू आवरतं नव्हतं.त्या दिवशी शिक्षक भरवत होते पण हुंदके आवरतं नव्हते.येत्या2019 ला शाळेचा शंभरावा वाढदिवस आहे.पुन्हा आम्ही भेटणार.बालपणात जाणार व आठवणी भरून आणणार.
...." ही आवडते मज मनापासून शाळा
जशी लावते लळा माऊली बाळा"
........जयश्री पाटील
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
{{{}}}{{{}}} समाप्त {{{}}}{{{}}}
                           ○गजानन पवार पाटील

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...