Tuesday 25 April 2017

नासा नावात जादू ........

कल्पतरू सम तो

नासा नावात जादू ........

स्व-अनुभवावरून संपूर्ण जग पारखता येते, हे मी स्वतः सिध्द करते. स्वतंत्र जीवन जगत असतांना अनेक व्यक्तींचे अनेक अनुभव आलेत. पण त्यातील काही त्यांच्या वर्तणुकीमुळे नजरेतून उतरल्या, तर काही व्यक्ती माझ्या जीवनाच्या दिशा-दर्शक गुरुवर्य झाल्यात त्यामुळे मला त्या एकप्रकारे कल्पतरु समानच आहेत. त्यापैकीच एक म्हणजे नासा सर

ही गोष्ट साधारणपणे एका वर्षापूर्वीची आहे. त्यास मी अविस्मरणीय असे म्हणेन साहित्य सेवा देणारा ग्रुप साहित्य दर्पण याला मी जुळले, त्यातील साहित्यकांचा एकमेकांबद्दल आदर बघून मी अलगद भारावून गेले. कारण इंटरनेट मुळे बरेच काही आमचे सखी ग्रुप पण उदयास आले होते. मनामनातील संवेदना नेटच्या माध्यमातून देवाण-घेवाण सहज होत असते.
पण या अनोख्या साहित्य दर्पण या ग्रुप मध्ये साहित्य सेवा ही स्पर्धांच्या माध्यमातून घेतली जाते, त्यामुळे सर्वांची प्रगल्भ लेखणी नजरेत खेळते आणि मनात रुजते देखील. साहित्यकांच्या रचना उच्चांक निदर्शनास येत असतात. मी या ग्रुप मध्ये नवीन असतांनाच पहिल्याच दिवशी मला अचानक एक मेसेज दिसला, तो असा होता ' शक्यतोवर स्पर्धेत सर्वांनी भाग घ्यावा, लेखनासाठी सर्वांना शुभेच्छा आणि खाली लिहिले होते  नासा .
मला या नासा शब्दाविषयी आणि नावाविषयी फार कुतूहल वाटले आणि आश्चर्य पण. नजरे समोर NASA म्हणजे National Aeronautics and Space Administration असे दिसू लागले. पण या  नावामुळे मी जास्त संभ्रमात पडले हे नक्की. या सरांचे नाव नासा कसे ? हे नंतर मी ग्रुप मध्ये माझ्या सखी स्नेहींना विचारून शोधून काढले.
हेच ते नासा सर साहित्य ग्रुपचे ऍडमीन आहेत हे तोवर कळून चुकले होते. कारण हे नासा सर खूप कमी वेळा ग्रुपवर दिसायचे, अगदी मोजक्या शब्दात सहज उत्तर देऊन ते सर्वांच्याच मनात रुजले होते. कारण मी त्यांच्या नावामुळे आधीच प्रेरित झाले होते, त्यातील त्यांची विचारशक्ती पुन्हा मला वेड लाऊन गेली. पण तरीही मी त्यांच्या नावाचा विचार करू लागले नी अखेर एके दिवशी त्यांच्या मित्राकडून संपूर्ण नाव कळले. ते असे नासा म्हणजे नागोराव सायन्ना येवतीकर असे. खरोखर हा योगायोग म्हणावे लागेल त्यांचे नावातील पहिले अक्षर आणि वडिलांच्या नावतील पहिले अक्षर मिळून सुंदर असे टोपणनाव तयार झाले.
ओळख नसतांनाही या व्यक्तीने माझ्या मनात अलगद वडील भाऊ असे नाते स्थान मिळवले ते एका साहित्य दरबार वैचारिक लेखस्पर्धेने. साहित्य दर्पण वर लेख स्पर्धा होती, पण माझा लेख मी जसा स्पर्धेकरिता दिला तेव्हा ते काहीच बोलले नाही, पण स्पर्धा संपल्यावर नेमके टाईप करतांना कुठे चुका होतात, कुठे जास्त स्पेस नको, मुद्देसूद लेख कसा हवा याबद्दल त्यांनी मला वैयक्तिक मार्गदर्शन केले. नंतर मी त्यांच्या प्रत्येक लेख-मांडणीचे निरीक्षण केले तर सर्व लेख खुपच सुंदर आणि वाचनीय असतात. त्यांचे लिखाण खरोखर अप्रतिम, कौतुक करायचे तेही नासा सराचे हे काही मनाला पटले नाही. कारण त्यांची लेखणी कौतुक करण्यापलीकडे आहे. हे मी वारंवार त्यांच्या लेखणीतून अनुभवत आले. माझ्या चुका त्यांनी मला वेळीच दाखवल्यामुळे मी आज माझ्या  लेखणीमध्ये समाधानी आहे. अधुन मधून केव्हाही काही माहिती घ्यायची असेल तर ते वेळोवेळी मार्गदर्शन देखील करतात. त्यांचे एक वाक्य माझ्या मनात घर करून बसलेले आहे ते म्हणजे, ' जे सत्य लिहायचे ते बिनधास्त लिहा ' असे हे माझे गुरूवर्य कधी वडीलबंधु झाले हे मला देखील कळले नाही.
ह्याच नासाबंधु विषयी सर्व काही कौतुकास्पद घडत गेले. ते आमच्या साहित्य दर्पण मध्ये सर्वांचे आवडते व्यक्ती देखील आहेत असे म्हणतांना माझ्या मनात कुठलीच शंका नाही. रोज सकाळी प्रसिद्ध होणाऱ्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिन जे की सकाळी जसे पेपर घरी येऊन पडते तसे रोज सकाळी सात वाजता प्रत्येकांच्या व्हाट्सएप्प वर ही पोस्ट ते न चुकता गेल्या दीड वर्षापासून अविरत करीत आहेत. असे त्यांच्या मित्र परिवार कडून कळले. यात ते त्या दिवसाची दिनविशेष पासून ते ताज्या बातम्या , सुविचार, बोधकथा, विचारधारा, गुगली आणि आजचा वाढदिवस द्वारे सर्वाना वाढदिवस ची माहिती असे मनाला वेधणारे लेखन ते रोज लिंकद्वारे देत असतात. लेखन स्पर्धाद्वारे नवनवीन उपक्रम ते घेत असतात, अचानक ग्रुप वर संवेदना ई प्रकाशन करून सर्वाना सरप्राईज दिले आणि सर्वांना लेखनास प्रोत्साहित केले. एकाच व्यक्तीबद्दल आपण एवढे यश संपादन करतांना पुन्हा एका आशेने बघत आहोत, की ही व्यक्ती नेमकी कुठेतरी थांबेल का ? पण नाही थांबणार कारण दिवस-रात्र एक करून ह्या व्यक्तीने समाजाचा सखोल अभ्यास केला, नी सर्व बाबीचा अभ्यास अजूनही चालूच आहे. दिवसाचा एकही मिनिट वाया न घालवणारे हे नासा बंधु नेमके कोणते शिखर गाठणार ? मी याच विचारात असताना मी सहज एके दिवशी प्रश्न केला की तुम्ही तुमच्या जीवनात लिखाणाला सुरुवात कधी केली? तर ते म्हणाले कि दहावीत असतांना पहिला लेख लिहिला, की दहावीची परीक्षा कशी वाटली ? तेव्हा पासून या प्रगल्भ लेखकाचा खरा श्रीगणेशा झाल्याचे समजत आहे.
अश्या या सर्वगुणसंपन्न वडील बंधुला मी अजूनही प्रत्यक्षात भेटलेली नाही. तीच एक खंत आहे, परमेश्वर लवकरच ही भेट घडवेल कारण येत्या काही दिवसात याच सरांच्या कल्पनेतून साकार केलेला पुस्तक प्रकाशन चा सोहळा नांदेड नगरीत होणार आहे. त्यावेळी नक्की भेट होईल असा मला विश्वास नाही तर खात्री आहे.
कारण त्यांच्या शाब्दिक आधाराने सुद्धा कोणाचेही जीवन वळणावर येईल असे हे नासा व्यक्तीमत्व आहे. त्यांचे 2016 या एका वर्षात प्रकाशित लेखाची संख्या शंभरच्या वर गेली असून आतापर्यंत त्यांच्या प्रकाशित लेखाची संख्या 300 पर्यंत पोहचलेली आहे. अजूनही मला त्यांच्या विषयी खूप काही जाणून घ्यायचे आहे, कारण माझ्या काळजात प्रभावीतेज म्हणून ते अखंड राहणार. ही प्रतिभावंत व्यक्ती मला बहीण मानतात, हीच माझी अनमोल कमाई.
नासा बंधूंचे अगदी जवळचे मित्र क्रांती बुद्धेवार आपल्या शब्दात सांगतात की नासा म्हणजे जीव ओतणारे प्रतीक. मित्रत्व म्हणजे काय असते ? हे नासा कडून शिकावे. 40 कि.मी. वरून नासा फक्त मित्राच्या आग्रहखातर निजामबादला येतो, नी मनसोक्त बोलतो, एखाद्या सुगरणीला आणि फाइव स्टार नामांकित हॉटेलला लाजवेल असे रुचकर पदार्थ हेच नासा बंधु करतोय. क्रांती म्हणतात कि त्यांचे हस्ताक्षर बघून माझ्या अक्षरांनी अलगद वळण घेतले. काय हे अफाट क्रांतीमय नासा. कसे आणि किती कौतुक करायचे हे शब्दात सांगणे कठीण.
मी तर या वडील बंधूंचे कौतुक करणार नाही कारण माझे जीवन बदलायला शब्दांच्या पलीकडे या वडील बंधूंचा शाब्दिक आधार तोच माझ्या यशाचा किरण. उत्तम लेखक, कवी, मार्गदर्शक, वृत्त निवेदक, गायक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या माझ्या या वडील बंधुला आज वाढदिवसा निमित्त उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना अखंड करते.

- वृषाली वानखडे, अमरावती

Monday 24 April 2017

पत्र लेखन ते स्तंभलेखन चा प्रवास

वृत्तपत्रातून नियमित स्तंभलेखन करणारे नागोराव सा. येवतीकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे वर्गमित्र संतोष कंदेवार यांनी घेतलेला त्यांच्या कार्याचा लेखाजोखा

शीर्षक - * पत्र लेखन ते स्तंभलेखन चा प्रवास *

Hide quoted text

गेल्या 20 ते 22 वर्षापासून वृत्तपत्र क्षेत्रात सातत्याने नियमितपणे सामाजिक, कौटुंबिक, आणि शैक्षणिक क्षेत्रावर आधारित स्तंभलेखन करणारे, सोशल मीडिया मध्ये नासा या टोपणनावाने सुप्रसिद्ध असलेले प्राथमिक शिक्षक नागोराव सा. येवतीकर यांचा आज 41 वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा लेखाजोखा. 
नासा यांचा जन्म 26 एप्रिल 1976 रोजी आंध्र आणि महाराष्ट्र राज्यांच्या सीमारेषेवरील " येवती " या छोट्याशा गावांत झाला. त्यांचे वडील जिल्हा परिषदच्या शाळेत प्राथमिक शिक्षक होते तर आई घर कामाकडे लक्ष देत असे. तसे पाहिले तर त्यांचा छोटा परिवार दोन भाऊ आणि दोन बहिणी. परिवारात ते शेवटचे, त्यामूळे आई वडील बहीण भाऊ या सर्वांचेच लाडके म्हणण्यास हरकत नाही. घरात कोणत्याच वस्तुची चणचण भासत नव्हती. सर्व काही आनंदात होते. त्यांची मातृभाषा तेलगु असून ही त्यांनी मराठी भाषेकडे विशेष लक्ष देऊन त्यांनी भाषेवर विशेष प्रभुत्व मिळविले आहे. त्याचमुळे ते आज या क्षेत्रात काही तरी नवीन करून दाखवू शकतात. वास्तविक पाहता त्यांच्या घरात किंवा गावात कोणी साहित्यिक वा लेखक झाले नाहीत. पण शालेय जीवनातील विविध अनुभवाच्या आधारावर त्यांनी साहित्य क्षेत्रात पाऊल टाकले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय असे आहे. 
त्यांचे प्राथमिक शिक्षण येवती येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाले तर माध्यमिक शिक्षण धर्माबादच्या हुतात्मा पानसरे हायस्कूल मध्ये झाले. पानसरे शाळेत शिकत असताना येथील काही चांगल्या शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे त्यांना लिहिण्याची प्रेरणा मिळत गेली. सु्रुवात फक्त 10 ओळी लिहिण्याने झाली. इयत्ता दहावी वर्गात शिकत असताना त्यांच्या नावावर पहिला लेख प्रकाशित झाला त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याठिकाणी जी प्रेरणा मिळाली ती आजतागायत चालूच आहे. आज ते विविध विषयावर अभ्यासपूर्ण आणि वैचारिक लेख लिहून समाज प्रबोधनाचे कार्य करीत असतात. नांदेडच्या यशवंत महाविद्यालय मध्ये त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षक पूर्ण केले. येथील प्रा. जगदीश कदम यांच्या मराठी विषयांच्या शिकवणीमुळे त्यांच्या लेखनकलेला एक नवी दिशा मिळाली.  गेल्या 20 - 22 वर्षांमध्ये त्यांनी भरपूर लेखन केलेले असल्यामुळे वृतपत्राच्या क्षेत्रात त्यांचे नाव आदरपूर्वक घेतल्या जाते. एवढे असूनही ते आपल्या व्यवसायाशी कधीही प्रतारणा केली नाही. जिल्हा परिषदमध्ये सन 1998 मध्ये प्राथमिक शिक्षक या पदावर माहूर तालुक्यात पाच वर्षे सेवा करून सन 2003 मध्ये धर्माबाद तालुक्यांत आपल्या स्वतःच्या तालुक्यांत परतले. विद्यार्थ्याच्या गळ्यातील ताईत बनण्यासारखे त्यांचे काम शाळेवर असते असे त्यांचे सहकारी तर सांगतातच याशिवाय गावातील लोकं सुध्दा त्यांच्याविषयी असेच उद्गार काढतात यावरून त्यांची शैक्षणिक क्षेत्रांतील कामगिरी समजून येते. प्रत्येक विषयांचा अभ्यास असल्यामूळे प्रशासकीय बाजू सुध्दा अगदी व्यवस्थितरित्या सांभाळतात त्यामूळे अधिकारी वर्गाशी ही त्यांचा संबंध खूपच चांगले आणि विश्वासपात्र असे आहे. सर्वांशी प्रेमाने वागणे आणि बोलणे या त्यांच्या वैशिष्ट्यमुळे त्यांनी आजपर्यंत एक ही मित्र तोडले नाही तर जोडतच गेले. आज त्यांचा मित्र परिवार आणि संपर्क पाहिले तर ते लक्षात येते. गरजू लोकांना मदत करण्याची त्यांची वृत्ती असल्यामुळेच त्यांची साद माणुसकीची संपत्ती सहयोग ते संपत्ती दान या अभियानाचे लातूर विभाग समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 
*त्यांना आजपर्यंत विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी जे काही कार्य करीत राहिले ते पुरस्कार मिळावे या उद्देशाने अजिबात केले नाही. परंतु त्यांचे कार्यच असे होते की पुरस्कार त्यांच्याकडे धावत आले.
1996 मध्ये ज्यावेळी ते बाराव्या वर्गात शिकत होते त्यावेळी त्यांनी मुंबई नागरिक नशाबंदी सप्ताह समिती कडून पोस्ट कार्ड स्पर्धेत सहभाग घेतले आणि त्यांना महात्मा गांधीजी च्या जयंती निमित्ताने गुणगौरवार्थ प्रमाणपत्र देण्यात आले. 
सन 2000 मध्ये महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण संस्था राज्य साधन केंद्र औरंगाबाद साहित्य निर्मिती विभागाकडुन अंबाजोगाई येथील राज्यस्तरीय लेखक शिबिरात आणि उदगीर येथील नवसाक्षर साहित्य निर्मिती शिबिरात त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांची लेखनकला विकसित होण्यास सु्रुवात झाली. सन 2007 मध्ये अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ मुंबई यांचेकडून उत्कृष्ट लेखनाबद्दल प्रसिद्ध लेखिका श्रीमती विजया वाड यांच्या हस्ते राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांच्या जीवनात पुन्हा एक टर्निंग पॉइंट आला ते म्हणजे सन 2008 मध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून आयोजित जीवन शिक्षण लेखन कार्यशाळेत नांदेड जिल्ह्यातून त्यांना सहभागी होण्याची नामी संधी मिळाली. त्या शिबिरात त्यांना लेखनाचे अनेक प्रकारचे मार्गदर्शन नामवंत लेखक मंडळीकडून मिळाले, जसे कवी विठ्ठल वाघ, माधव राजगुरु, रा. ग. जाधव इत्यादी ज्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या लेखनाला वेगळी दिशा मिळाली. याच शिबिराचा पहिला परिणामकारक फायदा सन 2009 मध्ये दिसून आला. यावर्षीच्या 08 मे जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त 
नांदेडच्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आणि तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्या हस्ते सन्मानपत्रासह प्रदान करण्यात आले.
पुण्याच्या जीवन शिक्षण प्रणाली तर्फे आयोजीत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत त्यानी सहभाग घेतला.  
प्रशासनाने यांच्या कार्याची दखल घेऊन डिसेंबर 2014 मध्ये पंचायत समिती धर्माबाद कार्यालयाने गुरु गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यांचे हे कार्य अविरतपणे चालूच आहे. जानेवारी 2015 मध्ये घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत पहिल्या शंभरा त स्थान मिळाल्यामुळे त्यांना 2000 रू. ची ग्रंथ भेट मंडळाकडुन देण्यात आली.आणि नुकतेच ऑक्टोबर 2015 मध्ये डॉ. A P J अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत त्यांना  उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. शाळेत विद्यार्थ्यासाठी सुध्दा त्यांची नेहमीच धडपड चालूच असते. याच धडपडीतून त्यांनी 
शाळेत विद्यार्थ्याना सोपे वाटावे म्हणून " प्रश्न आमचे अन् उत्तर ही आमचे ह्या राबविलेल्या उपक्रमाला जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक तर  मिळालेच शिवाय त्या उपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. 
सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते यवतमाळ येथे त्यांची विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी उपयुक्त असे " पाऊलवाट " नावाचे पुस्तक जानेवारी 2016 मध्ये प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर ते " संवेदना - मनामनातील " या दुसऱ्या पुस्तकाच्या निर्मिती साठी प्रयत्न करीत आहेत. 
लहान मुलांसाठी विविध प्रकारची कोडे तयार करणे आणि मुलाकडुन ते सोडवून घेतात त्यामुळे मुलांची शब्दसंपत्ती वाढण्यास मदत होते. 
सोशल मीडियात सुध्दा यांचा वावर लक्ष वेधून घेणारी असते. फेसबुक, whatsapp, ट्विटर आणि हाइक यासारखी सोशल मीडिया मध्ये जनतेला उपयुक्त असेल अशीच माहिती ते पोस्ट करतात. रोज सकाळी 7 वाजता पोस्ट होणारी फ्रेश मॉर्निंग बुलेटीनची सोशल मीडियातील माणसे चातक पक्ष्यांप्रमाणे वाट पाहत बसतात. एखाद्या दिवशी बुलेटीन पोस्ट झाली नाही तर लोकं त्यांना प्रश्न विचारून तंग करतात. आज त्यांची ही सेवा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली असून शालेय मुलांना डोळ्यासमोर ठेवून केलेले हे उपक्रम आत्ता अत्यावश्यक बनले आहे. याशिवाय लोकाना वाचण्याची गोडी लागावी म्हणून विविध ग्रुप च्या माध्यमातून वैचारिक लेख, कविता, चारोळी इत्यादी स्पर्धेचे आयोजन करून त्यांची माहिती सर्व लोकाना कळावी यांसाठी तेwww.nasayeotikar.blogspot.com या वेबसाईटवर प्रकाशित करीत असतात. 
अश्या या अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या नासा येवतीकर यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून अजून नवनवीन साहित्य निर्मिती होवो, उज्वल भविष्य घडविणारी विद्यार्थी तयार होवो आणि दूसरे पुस्तक लवकरच वाचकास वाचण्यासाठी मिळो हीच यानिमित्ताने प्रेमपूर्वक सदिच्छा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नासा येवतीकर यांना 09423625769 या क्रमांकावर शुभेच्छा द्या.

शब्दांकन - संतोष कंदेवार, मुख्य लेखाधिकारी 
               नांदेड - वाघाळा महानगरपालिका 
             

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...