Saturday 9 December 2017

मानवी हक्क दिन

🔰 माझे हक्क आणि माझे  कर्तव्य 🔰

लहानपणी मला सर्वात जवळची आणि चांगली गोष्ट वाटायची ते म्हणजे माझा हक्क. मला माझी हवी असलेली वस्तू मिळायलाच हवे असे वाटायचे. बालपणीच्या वयात प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी रडणे हा एक चांगला पर्याय असायचा. रडून ती वस्तू मिळविताना दुसऱ्याच्या हक्काची गोष्ट आपण हिसकावुन तर घेत नाही ना याचा जरा सुध्दा विचार केला जात नव्हता. पण जसजसे वय वाढत गेले आणि आणि हक्क म्हणजे काय ? याची परिचीती आली आणि कळू लागले आपल्या हक्कासोबत कर्तव्याची जाणीव जेंव्हा झाली तेंव्हा हक्काने ज्या गोष्टी मिळवायला पाहिजे त्यावर सुध्दा आत्ता हक्क न सांगता समायोजन करण्याचे शिकलो. दुसऱ्याच्या हक्कातील वस्तु हिरावून घेतल्याने आपणाला तो आनंद मिळत नाही जो आनंद आपली वस्तू इतरांना वाटण्यात मिळते. हक्काची जाणीव झाली की माणूस सर्वात पहिल्यांदा कर्तव्याकडे वळतो. ज्यांना जाणीव होत नाही ते फक्त हक्कासाठी नेहमी लढत राहतात. हक्काची मागणी करतांना कर्तव्याला विसरून चालणार नाही. मी या देशाचा घटक असल्यामूळे देशाने मला काही हक्क दिले आहेत त्याच सोबत काही कर्तव्य सुध्दा आहेत. मला चांगले शिक्षण मिळावा, शुध्द पाणी मिळावा, वीज, आरोग्य आणि मूलभूत सुविधा मिळण्याचा मला हक्क आहे. त्याच बरोबर हे हक्क मिळविण्यासाठी आपले कर्तव्य काय आहेत. आपण एक जागरूक नागरिक होऊन प्रत्येक पाऊल जागरूकतेने टाकणे आपले कर्तव्य आहे. आपण आपले कर्तव्य विसरून चालल्यामुळे आज अशी विपरित परिस्थिती बघायला मिळत आहे. त्यामुळे माझे हक्क काय आहे हे तर आपणांस माहिती पाहिजेच शिवाय कर्तव्य सुध्दा आपण कधीही विसरू नये असे वाटते.

- नासा येवतीकर, धर्माबाद

Friday 8 December 2017

जनसेवेतच ईश्वराचीही सेवा

जनसेवेतच ईश्वराचीही सेवा

माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करताना दिसून येतात. सुखाचा वेळी कशाचीही आठवण न करता खा, प्या, मजा करा अशी माणसे दुःखाच्या वेळी, कठीण समयी देवाचे स्मरण करतात. वर्षातून कमीतकमी एकदा तरी आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला जाण्याची प्रत्येकाला आवश्यकता भासते. याशिवाय इतरही प्रसिद्ध क्षेत्रांना भेटी देण्याचे नियोजन प्रत्येक जण करीत असतो. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात सगळीकडेच देव-देवतांच्या निवासस्थानी यात्रा व जत्रा यांच्या निमित्ताने भाविक भक्तांचा महापूर ओसंडलेला दिसतो. विशेषतः जत्रा पाहूनच अनेक जण दर्शन सोहळ्याचा बेत ठरवितात असे वाटते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे यात्रेच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. अशा गर्दीच्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वर्षापूर्वी मांढरदेवीच्या यात्रेत भाविकांच्या चेंगराचेंगरी अनेकांना आपला जीव गमवावे लागले होते. त्यास्तव अमुक यात्रेच्या वेळीच देवाचे दर्शन घेतल्यास ईश्वर प्राप्ती होते का ? गर्दीतल्या प्रचंड भाविकांकडे पाहून पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर नाही असेच येते. म्हणूनच यात्रा वगळून इतर वेळी दर्शन घेतले तर बिघडते कुठे ? गर्दीत अगदी पाच-सहा तास ताटकळत उभे राहून दर्शन घेतल्याने ईश्वर प्राप्ती तर होणारच नाही शिवाय वृद्ध व बालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो, हे वेगळेच. माणसात देव शोधणारा संत म्हणजे संत गाडगेबाबा म्हणतात की, देव दगडात नाही, त्याची पुजा करू नका. देव माणसात आहे, म्हणून त्यांची सेवा करा. कारण जनसेवेतच ईश्वराचीही सेवा दडलेली आहे. म्हणून देवळात, मंदिरात गर्दी करण्यापेक्षा समाजातील दीन-दुबळ्या, रंजले-गांजले असहाय-अनाथ लोकांची सेवा करावी. ईश्वराच्या देवदर्शनासाठी दूरवर गेल्याने जो आनंद मिळत नाही, तो आनंद गरजू, गरीब लोकांना मदतीचा हात देऊन सेवा केल्यास नक्कीच मिळू शकते. अनेक महात्म्यांनी जनसेवेतच ईश्वरसेवा मानून कार्य केले म्हणूनच ते महान बनले. आपणही त्या तत्त्वाचा अवलंब करून ईश्वराचा मागे न धावता जनसेवा करीत राहावे, असे वाटते

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Wednesday 6 December 2017

कानमंत्र

*शाळेने तारला संसार*

सर वर्गात आले. हजेरी घेतली. सर्वांनी आपापल्या गृहपाठाच्या वह्या टेबलावर ठेवल्या. सरांनी सर्व वह्या तपासून कोणाचे काय चुकले हे सांगत वही परत करत होते. नाव घेऊन बोलावत होते आणि वही देत होते. शेवटी गृहपाठाची वही कोण आणले नाही त्यांना उभे राहायला सांगितले. तसे वर्गातील मीना, लता, सुरेश, आणि ज्योती उभे राहिले. एका-एकाने कारणे सांगायला सुरुवात केली. जसे ही ज्योतीचा नंबर आला की, ती काही सांगण्याच्या अगोदरच रडायला सुरु केली. तशी ज्योती ही चौथ्या वर्गातली अत्यंत हुशार, प्रामाणिक आणि रोज गृहपाठ पूर्ण करणारी मुलगी होती. त्यामुळे ती का रडत होती हेच सरांना कळेना. सरांनी तिला खूप समजावून सांगितल्यावर ती चूप झाली. तास संपला. मध्यंतरची बेल झाली.  सर वर्गाबाहेर गेले. तशी ती सरांच्या मागे मागे गेली. सर ऑफिसमध्ये गेले तशी ती पण ऑफिसमध्ये गेली. परवानगी घेऊन आत गेली आणि सराजवळ जाऊन पुन्हा एकदा रडत रडत म्हणाली, " सर, रात्री माझ्या घरी माझ्या आई-बाबाचे भांडण झाले. बाबाने आईला खूप मारलं आणि सकाळी उठून घर सोडून जा असे म्हणाले. सकाळ झाली. आई उठली आणि पहिल्या गाडीला जाण्यासाठी मला आणि सोमाला घेतली आणि निघाली. पण माझे मन होत नव्हते. मी आईला खोटे बोललो की, आज शाळेत परीक्षा आहे. तेवढी परीक्षा देऊन येतो आणि दुपारच्या गाडी ला जाऊ या. बाबाने या गोष्टीला मान्यता दिली. पण आत्ता आई येणार आहे दुपारच्या गाडीला घेऊन जाण्यासाठी " असे म्हणत ती अजून रडू लागली. सरांना काही सुचेना. तिला रडू नको गप्प होय म्हणून शांत केले आणि सर म्हणाले, " मग आत्ता काय करायचं ? " तेंव्हा ती भरल्या गळ्याने म्हणाली, " सर मला कोठे हि जायचे नाही, येथेच शाळा शिकायचे आहे, तुम्ही सांगा कि, बाबाला समजावून ..!" सरांसमोर खूप मोठा प्रश्न पडला. काय करावे कळेना. तरी तिला " ठीक आहे " असे बोलून वर्गात जाऊन बसण्यास सांगितले. दुपारची वेळ झाली. मुले सर्व जेवायला बसली होती. ज्योती आणि सोमा देखील जेवायला बसले होते. तेवढ्यात त्यांची आई शाळेत आली. रात्रभर रडून रडून डोळे खोल गेले होते, अंगावर मळकट कपडे होते, केसं विस्कटलेले होते, भूक लागलेली आहे हे स्पष्ट जाणवत होते, तिची स्थिती पाहून सरांना कसे तरी वाटले. सकाळपासून पोटात अन्नाचा कण देखील नव्हता. सरांनी तिला ऑफिस मध्ये बोलावलं. खिचडी शिजवणाऱ्या मावशीला सांगून पहिल्यांदा तिला जेवायला दिलं. ती जेवायला तयार होईना तेंव्हा खूप वेळ समजाविल्यानंतर कशी तरी दोन घास जेवली. त्या दरम्यान तिच्याकडून रात्री घरात काय घडलं याचा इतिवृत्तात ऐकून घेतला. तोपर्यंत मुलांचे देखील जेवण झाले. सरांनी म्हटले की, ज्योती आणि सोमा तुमच्या सोबत येत नाही असे बोलत होती काय करणार ? तिला खूप मोठा प्रश्न पडला. काय करावे हेच कळेना. सर म्हणाले अजून थोडा वेळ इथेच बसा मी ज्योतीच्या बाबाला बोलावून घेतो. पाचव्या वर्गातील माधवला बोलून घेऊन ज्योतीच्या बाबाला सरांनी शाळेत बोलाविले म्हणून निरोप पाठविला. थोड्याच वेळात ते शाळेत आले. त्याच्या चेहऱ्यावर अजून ही तो राग दिसत होता. सरांनी त्याला बसायला सांगितले. अगदी शांतपणे सरांनी ज्योती आणि सोमाच्या शिक्षणाविषयी त्याच्याशी चर्चा केली. ज्योतीच्या गृहपाठाच्या वह्या, तिची प्रगती हे सारे सांगितले. ती जर आई सोबत गेली तर तिची आणि सोमाची शाळा बुडेल. आत्ता राहिले फक्त तीन-चार महिने त्यानंतर उन्हाळी सुट्या लागतात. तेंव्हा पुढील निर्णय एका-दोन महिन्यानंतर तुम्हाला काय घ्यायचे ते घ्या. असे म्हणून सरांनी ज्योतीच्या आईला घरी पाठविले, बाबांनी रागातच होकार दिले. आत्ता ज्योतीच्या डोळ्यात अश्रू होते, ते आनंदाचे. तिने सरांचे आभार व्यक्त केले. त्यावेळी सरांनी ज्योतीला जवळ बोलावून घेऊन एक कानमंत्र दिला. ते म्हणाले, तुझे आई-बाबा एकत्र रहावे असे वाटत असेल तर तुला खूप अभ्यास करून शिष्यवृत्तीच्या परीक्षेत यश मिळवायला हवे. तुझ्या हातात तीन चार महिने आहेत. ज्योतीला सुद्धा सरांचा कानमंत्र पटला. त्यादिवशी पासून ती खूप अभ्यास करू लागली. शिष्यवृत्ती परीक्षा जवळ येऊ लागली तशी तिचे काळीज धडधड करू लागले. अखेर परीक्षा संपली. शाळेची परीक्षा देखील संपली. तीन महिन्याचा करार देखील संपला. शाळेला सुट्या लागल्या. ज्योती, सोमा आणि त्यांची आई माहेरी निघून गेल्या. सरांसमोर खूप मोठा प्रश्न होता. ज्योतीला दिलेला कानमंत्र काम करेल काय ? याची काळजी लागली होती. शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लागला आणि काय आश्चर्य ज्योती या परीक्षेत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीधारक बनली होती. त्यानिमित्त जिल्हास्तरावर तिचा आई बाबा सोबत सन्मान केला जाणार होता. पण ज्योतीला प्रश्न पडला की, कोणा सोबत जाऊ. गावात सर्वानी ज्योतीच्या वडिलांचे खूप कौतुक करून अभिनंदन केले. पोरीने बापाचे नाव काढलं असे म्हणू लागली. हे सगळं ऐकून आणि पाहून त्याला राहवले नाही. ज्यादिवशी सत्कार करायचा दिवस होता त्यादिवशी तो सकाळीच उठला आणि पहिल्या गाडीने सासरवाडीला गेला. सकाळी सकाळी बाबाला पाहून ज्योतीला रडूच कोसळले. ती धावत धावत जाऊन बाबांच्या गळ्यास पडली. बाबांनी तिचे अभिनंदन केले. सोमा त्याची आई, ज्योती आणि तिचे बाबा सर्वजण तयार झाले आणि सत्कार घेण्यासाठी जिल्ह्याला गेले. त्याठिकाणचा सत्कार समारंभ पाहून त्यांचे डोळ्याचे पारणे फिटले. परत सासरवाडीला जाऊन एक दोन दिवस राहून तेथील पाहुणचार घेऊन सर्व गावी परत आले. शाळेला सुरुवात झाली. ज्योती पुढच्या वर्गात गेली होती पण पुढील वर्ग त्या शाळेत नव्हते म्हणून ती टीसी नेण्यासाठी बाबाला घेऊन आली. पण सरांनी आईला बोलावून आणल्याशिवाय टी सी मिळणार नाही असे म्हटल्यामुळे लगेच आईला बोलावून घेतले. शाळेत ज्योतीच्या आई बाबांचा सत्कार करण्यात आला. तेंव्हा ज्योतीच्या बाबांनी एकच वाक्य बोलले, " पोरीच्या शाळेने आमचा संसार तारलं " त्यावेळी ज्योती सरांकडे पाहू लागली. सरांना त्यांचा कानमंत्र कामाला आला याचा आनंद वाटत होता.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

कानमंत्र

*शाळेने तारला संसार*

सर वर्गात आले. हजेरी घेतली. सर्वांनी आपापल्या गृहपाठाच्या वह्या टेबलावर ठेवल्या. सरांनी सर्व वह्या तपासून कोणाचे काय चुकले हे सांगत वही परत करत होते. नाव घेऊन बोलावत होते आणि वही देत होते. शेवटी गृहपाठाची वही कोण आणले नाही त्यांना उभे राहायला सांगितले. तसे वर्गातील मीना, लता, सुरेश, आणि ज्योती उभे राहिले. एका-एकाने कारणे सांगायला सुरुवात केली. जसे ही ज्योतीचा नंबर आला की, ती काही सांगण्याच्या अगोदरच रडायला सुरु केली. तशी ज्योती ही चौथ्या वर्गातली अत्यंत हुशार, प्रामाणिक आणि रोज गृहपाठ पूर्ण करणारी मुलगी होती. त्यामुळे ती का रडत होती हेच सरांना कळेना. सरांनी तिला खूप समजावून सांगितल्यावर ती चूप झाली. तास संपला. मध्यंतरची बेल झाली.  सर वर्गाबाहेर गेले. तशी ती सरांच्या मागे मागे गेली. सर ऑफिसमध्ये गेले तशी ती पण ऑफिसमध्ये गेली. परवानगी घेऊन आत गेली आणि सराजवळ जाऊन पुन्हा एकदा रडत रडत म्हणाली, " सर, रात्री माझ्या घरी माझ्या आई-बाबाचे भांडण झाले. बाबाने आईला खूप मारलं आणि सकाळी उठून घर सोडून जा असे म्हणाले. सकाळ झाली. आई उठली आणि पहिल्या गाडीला जाण्यासाठी मला आणि सोमाला घेतली आणि निघाली. पण माझे मन होत नव्हते. मी आईला खोटे बोललो की, आज शाळेत परीक्षा आहे. तेवढी परीक्षा देऊन येतो आणि दुपारच्या गाडी ला जाऊ या. बाबाने या गोष्टीला मान्यता दिली. पण आत्ता आई येणार आहे दुपारच्या गाडीला घेऊन जाण्यासाठी " असे म्हणत ती अजून रडू लागली. सरांना काही सुचेना. तिला रडू नको गप्प होय म्हणून शांत केले आणि सर म्हणाले, " मग आत्ता काय करायचं ? " तेंव्हा ती भरल्या गळ्याने म्हणाली, " सर मला कोठे हि जायचे नाही, येथेच शाळा शिकायचे आहे, तुम्ही सांगा कि, बाबाला समजावून ..!" सरांसमोर खूप मोठा प्रश्न पडला. काय करावे कळेना. तरी तिला " ठीक आहे " असे बोलून वर्गात जाऊन बसण्यास सांगितले. दुपारची वेळ झाली. मुले सर्व जेवायला बसली होती. ज्योती आणि सोमा देखील जेवायला बसले होते. तेवढ्यात त्यांची आई शाळेत आली. रात्रभर रडून रडून डोळे खोल गेले होते, अंगावर मळकट कपडे होते, केसं विस्कटलेले होते, भूक लागलेली आहे हे स्पष्ट जाणवत होते, तिची स्थिती पाहून सरांना कसे तरी वाटले. सकाळपासून पोटात अन्नाचा कण देखील नव्हता. सरांनी तिला ऑफिस मध्ये बोलावलं. खिचडी शिजवणाऱ्या मावशीला सांगून पहिल्यांदा तिला जेवायला दिलं. ती जेवायला तयार होईना तेंव्हा खूप वेळ समजाविल्यानंतर कशी तरी दोन घास जेवली. त्या दरम्यान तिच्याकडून रात्री घरात काय घडलं याचा इतिवृत्तात ऐकून घेतला. तोपर्यंत मुलांचे देखील जेवण झाले. सरांनी म्हटले की, ज्योती आणि सोमा तुमच्या सोबत येत नाही असे बोलत होती काय करणार ? तिला खूप मोठा प्रश्न पडला. काय करावे हेच कळेना. सर म्हणाले अजून थोडा वेळ इथेच बसा मी ज्योतीच्या बाबाला बोलावून घेतो. पाचव्या वर्गातील माधवला बोलून घेऊन ज्योतीच्या बाबाला सरांनी शाळेत बोलाविले म्हणून निरोप पाठविला. थोड्याच वेळात ते शाळेत आले. त्याच्या चेहऱ्यावर अजून ही तो राग दिसत होता. सरांनी त्याला बसायला सांगितले. अगदी शांतपणे सरांनी ज्योती आणि सोमाच्या शिक्षणाविषयी त्याच्याशी चर्चा केली. ज्योतीच्या गृहपाठाच्या वह्या, तिची प्रगती हे सारे सांगितले. ती जर आई सोबत गेली तर तिची आणि सोमाची शाळा बुडेल. आत्ता राहिले फक्त तीन-चार महिने त्यानंतर उन्हाळी सुट्या लागतात. तेंव्हा पुढील निर्णय एका-दोन महिन्यानंतर तुम्हाला काय घ्यायचे ते घ्या. असे म्हणून सरांनी ज्योतीच्या आईला घरी पाठविले, बाबांनी रागातच होकार दिले. आत्ता ज्योतीच्या डोळ्यात अश्रू होते, ते आनंदाचे. तिने सरांचे आभार व्यक्त केले. त्यावेळी सरांनी ज्योतीला जवळ बोलावून घेऊन एक कानमंत्र दिला. ते म्हणाले, तुझे आई-बाबा एकत्र रहावे असे वाटत असेल तर तुला खूप अभ्यास करून शिष्यवृत्तीच्या परीक्षेत यश मिळवायला हवे. तुझ्या हातात तीन चार महिने आहेत. ज्योतीला सुद्धा सरांचा कानमंत्र पटला. त्यादिवशी पासून ती खूप अभ्यास करू लागली. शिष्यवृत्ती परीक्षा जवळ येऊ लागली तशी तिचे काळीज धडधड करू लागले. अखेर परीक्षा संपली. शाळेची परीक्षा देखील संपली. तीन महिन्याचा करार देखील संपला. शाळेला सुट्या लागल्या. ज्योती, सोमा आणि त्यांची आई माहेरी निघून गेल्या. सरांसमोर खूप मोठा प्रश्न होता. ज्योतीला दिलेला कानमंत्र काम करेल काय ? याची काळजी लागली होती. शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लागला आणि काय आश्चर्य ज्योती या परीक्षेत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीधारक बनली होती. त्यानिमित्त जिल्हास्तरावर तिचा आई बाबा सोबत सन्मान केला जाणार होता. पण ज्योतीला प्रश्न पडला की, कोणा सोबत जाऊ. गावात सर्वानी ज्योतीच्या वडिलांचे खूप कौतुक करून अभिनंदन केले. पोरीने बापाचे नाव काढलं असे म्हणू लागली. हे सगळं ऐकून आणि पाहून त्याला राहवले नाही. ज्यादिवशी सत्कार करायचा दिवस होता त्यादिवशी तो सकाळीच उठला आणि पहिल्या गाडीने सासरवाडीला गेला. सकाळी सकाळी बाबाला पाहून ज्योतीला रडूच कोसळले. ती धावत धावत जाऊन बाबांच्या गळ्यास पडली. बाबांनी तिचे अभिनंदन केले. सोमा त्याची आई, ज्योती आणि तिचे बाबा सर्वजण तयार झाले आणि सत्कार घेण्यासाठी जिल्ह्याला गेले. त्याठिकाणचा सत्कार समारंभ पाहून त्यांचे डोळ्याचे पारणे फिटले. परत सासरवाडीला जाऊन एक दोन दिवस राहून तेथील पाहुणचार घेऊन सर्व गावी परत आले. शाळेला सुरुवात झाली. ज्योती पुढच्या वर्गात गेली होती पण पुढील वर्ग त्या शाळेत नव्हते म्हणून ती टीसी नेण्यासाठी बाबाला घेऊन आली. पण सरांनी आईला बोलावून आणल्याशिवाय टी सी मिळणार नाही असे म्हटल्यामुळे लगेच आईला बोलावून घेतले. शाळेत ज्योतीच्या आई बाबांचा सत्कार करण्यात आला. तेंव्हा ज्योतीच्या बाबांनी एकच वाक्य बोलले, " पोरीच्या शाळेने आमचा संसार तारलं " त्यावेळी ज्योती सरांकडे पाहू लागली. सरांना त्यांचा कानमंत्र कामाला आला याचा आनंद वाटत होता.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Tuesday 5 December 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त


सगरोळी येथे करण्यात येणाऱ्या भाषणाचा संपादित अंश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वाचन संस्कृती

शाळेत शिकत असताना गुरुजी सर्व मुलांना विचारतात की मोठे होऊन तुम्हाला काय व्हायचे आहे ? मुले सुद्धा आपल्या अपेक्षेप्रमाणे ठराविक उत्तर देतात. काही जण डॉक्टर होऊ म्हणतात तर काही इंजिनियर होऊ म्हणतात. ज्याच्या त्याच्या बौध्दिक कुवती नुसार मी हे होईन आणि मी ते होईन असे आपले स्वप्न सांगतात. पण कुणी मी माणूस होईन असे म्हणणार नाही. कारण माणूस होण्यासाठी जी बुध्दिमत्ता लागते ती डॉक्टर आणि इंजिनियरच्या पलीकडची आहे. आज समाजात जेवढे ही  डॉक्टर आणि इंजिनियर किंवा मोठ्या पदावरील व्यक्ती आहेत त्यांच्याजवळ कुठेच माणुसकी नावाची वस्तु दिसून येत नाही. कारण त्यांनी कधी माणूस होण्याचा साधा प्रयत्न देखील केला नाही. म्हणून मुलांनी प्रथम माणूस व्ह्ययला शिकणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र नुसते वाचन करून चालणार नाही तर त्यांच्या त्या चरित्रावरुन आपल्या ही वागण्यात बोलण्यात बदल झाला पाहिजे. त्यांनी आपल्या जीवनात किती कष्ट उपसले, किती त्रास सहन करावा लागला. असे म्हणतात की टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही. असाच त्रास आयुष्यभर सोसले, सहन केले म्हणूनच आज त्यांचे नाव सर्वांच्या मुखात आहे. " शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा " असा संदेश देणारे महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती थोडक्यात जाणुन घेत असताना त्या कार्यातून  आपणास कोणती प्रेरणा मिळते ? आपल्या जीवनात त्याचा अंगीकार कसा करावा याचा विचार आपण त्यानिमित्ताने करावयाचे आहे. रामजी आणि भिमाईच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेश मधील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव त्यांच्या आईच्या नावा वरुन भीमराव असॆ ठेवण्यात आले होते. परंतु भारतातच नाही तर परदेशात सुध्दा ते बाबासाहेब या नावानेच परिचित होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव लहान असताना म्हणजे वयाचे पाच वर्षे असताना त्यांची आई देवाघरी गेली. तेंव्हा त्यांच्या आत्याने त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली. त्यांचे ऋण आयुष्यभर त्यांच्या सोबत होते.  त्यांचे वडील रामजी हे उद्योगी, महत्वाकांक्षी आणि शिस्तीने वागणारे होते. लष्कराच्या शाळेत शिकून लष्कराच्याच शाळेत नोकरी करीत होते. ते सुभेदार मेजर या पदापर्यंत पोहोचले होते. शिक्षणाविषयी त्यांचे वडील जागरूक होते, त्यामुळे त्यांनी भीमरावाच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष दिले. जागरूक पालक त्यातल्या त्यात वडील असतील तर ते आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देतील. तेच याठिकाणी दिसून आले. कुटुंबामध्ये आई किंवा वडील यापैकी कोणी तरी एक जण शिक्षणाविषयी जागरूक आस्था ठेवणारा असला पाहिजे. कोणत्याही समाजाची उन्नती, त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबुन आहे. समाजामध्ये राहणारे कुटुंब जर शिक्षणात रुची ठेवणारा असेल तरच प्रगती होते याची जाणीव त्यांना प्रथमपासून होती. म्हणून किती ही त्रास सहन करावा पण घरातील कोणी अशिक्षित राहू नये याची काळजी कुटुंबप्रमुखाने घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच शिक्षणाच्या बाबतीत डॉ. आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे त्याचे जो कुणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाने माणसाचे डोळे उघडतात, कुणी फसवू शकत नाही. शिक्षण हे एक दुधारी अस्त्र आहे ज्याचा वापर वेळप्रसंगी करता येतो. याची जाणीव खुद्द रामजी यांना तर होतीच शिवाय बाबासाहेबांना ही त्याचे महत्त्व कळायाला वेळ लागला नाही. बाबासाहेब लहानपणापासूनच जिद्दी स्वभावाचे होते. एखादी गोष्ट पूर्ण करायची म्हटले की, ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडायचे नाही. आपण फुकट वेळ घालवायचा नाही, झटून अभ्यास करायचा ही वडीलांची लहानपणीची शिकवण त्यांनी संपूर्ण जीवनभर अवलंबिले. घरात वडील मंडळी कशी वागतात ? बोलतात ? आणि चालतात या सर्व बाबीचा परिणाम घरातील लहान सहान मुलांवर होत असतो. परंतु बहुतांश जण या बाबीचा गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत. घरातील वातावरण तणावाचे, वादाचे किंवा संस्कारी नसेल तर मुलांवर कोणते संस्कार होतील ? मुले खरेच चांगले निपजतिल काय ? याचा कुठे तरी विचार करणे आवश्यक आहे. आजुबाजुला घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टीकडे बाबासाहेबांचे बारकाईने लक्ष असॆ. या सर्व घटना आणि घडामोडी मधून ते घडत गेले. आपले मूल सुद्धा असेच घडत असते. त्यामुळे त्यांना योग्य वातावरण मिळवून देणे हे प्रत्येक पालकांची जबाबदारी नव्हे काय ? बाबासाहेबांना लहानपणापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. शाळेत शिकत असताना त्यांना स्वतःच्या गोणपाटावर बसावे लागायचे, तसेच शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या हौदेला हात लावण्याची परवानगी नव्हती. शाळेत चपरासी उपस्थित असेल तरच पिण्यासाठी पाणी मिळत असॆ अन्यथा तसेच घरी जावे लागत असॆ. ओंजळीने पाणी प्यावे लागत असॆ. सर्व मित्रांसोबत एकत्र बसण्याची परवानगी नव्हती. किती ही तहान लागली तरी माठात हात घालून पाणी पिण्याची परवानगी नव्हती. याचा त्या लहान मनावर खोल परिणाम झाला असेल. त्याच चिंतनातून अनेक बाबी त्यांनी जगासमोर मांडले आहे. लहानपणी त्यांच्या जीवनात आलेल्या या कटू अनुभव आणि दाहकता त्यांच्या मनाला चटके देऊन गेली. यातूनच बाबासाहेब घडत गेले. आज ही जेथे वेदना आहे तेथे नक्की सुख आहे. वेदनेनंतर येणाऱ्या सुखाचे महत्त्व आईलाच समजून येऊ शकते. तसे आपल्या जीवनात देखील वेदना असायलाच पाहिजे. परंतु आज प्रत्येकजण वेदनाविरहित जीवन जगु पाहत आहे. जरासा सुध्दा त्रास न होता मला सर्व काही मिळायला हवे ही संकल्पना आज कुटुंबात फोफावत चालली आहे. असे कटु प्रसंग आपणास खुप काही शिकवून जातात. म्हणून वेदना पाहून पळून जाण्यात काही अर्थ नाही हे त्यांच्या आयुष्यावरुन लक्षात येते. याच अशा कटु प्रसंगांतून शिकवण घेऊन त्यांनी सन 1927 मध्ये इतिहासात खूपच प्रसिध्द असलेला महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, येथूनच त्यांच्या लढ्यास प्रारंभ झाला असॆ म्हणण्यास काही हरकत नसावी. जर त्यांच्या जीवनात असे प्रसंग आले नसते तर काय झाले असते ? याचा विचार कधी केलो आहोत काय ? अर्थात त्याचे उत्तर नाही असे येते. 
माणसाच्या स्पर्शाने माणूस बाटतो आणि बाटलेला माणूस पशुच्या मुत्राने शुध्द होतो अशी विचारसरणी असलेला धर्म असु शकतो का ? असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. समाजातील काही लोकांना अस्पृश्य किंवा दलित म्हणून दूर केल्या जात असत. त्या समाजातील लोकांना मंदिरात जाण्यास मज्जाव केला जात असे या सर्व बाबीची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी नाशिकचा काळाराम मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी लढा दिला आणि त्यात ते यशस्वी सुध्दा झाले. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला, त्या लोकांचा उध्दार करणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणिव ज्यांना आहे ते धन्य होत असॆ ते मानीत. खरोखरच त्यांच्या या विचारांची आज खरी गरज आहे. स्वतःचा समाज आणि जमात यांच्याविषयी ज्यांच्या मनात तळमळ राहत नाही, त्यास जगण्याचा खरा अर्थ ही कळत नाही. बाबासाहेबांना स्वतःच्या समाजाविषयी व जातीविषयी खूप तळमळ होती. लोकांची दयनीय अवस्था पाहून त्यांना अस्वस्थ वाटायचे. लहानपणी बाबासाहेबांना ज्या ज्या गोष्टीचा त्रास झाला, तो तो त्रास समाजातील इतर बांधवांना होऊ नये यांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. शेवटी सनातन्यांच्या या अवमानी वृत्तीला कंटाळून बाबासाहेबांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे धर्मांतराचा. कदाचित त्यांच्या मनात तो विचार आला असता की नाही माहित नाही परंतु काही लोकांच्या हीन वागणुकीमुळे बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृशच नव्हे तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही असा त्यांचा ठाम निश्चय झाला होता. बाबासाहेबांना बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण , सदाचार , समता , स्वातंत्र्य व बंधुतेचा वाटला, बौद्ध धर्माचे त्यांना लहानपणापासून खूप आकर्षण होते. ह्याच धर्माच्या आधाराने आपल्या लोकांचा विकास साधता येतो म्हणून विजयादशमीच्या पर्वावर दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षा भूमीवर हजारों अनुयाया सोबत बौद्ध धर्माचा जाहिररित्या स्विकार केला.  मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असे सांगताना “साऱ्या भारताला मी बौद्धमय करीन ” अशी गगनभेदी भीमगर्जना केली.
देशांतील अतिगरीब आणि अति मागास असलेल्या लोकांना शिक्षणाचे महत्व त्यांनी पटवून दिले. शिक्षणानेच समाज परिवर्तन होऊ शकते असे त्यांचे मत होते. शिक्षण प्राप्त झाल्याने मनुष्य विचाराने समृद्ध होतो. माणसाला काय  चांगले आणि काय वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा , शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. म्हणूनच लोकांनी शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले आणि स्वतःसोबत आपल्या परिवाराचा पर्यायाने समाजाचा विकास साधला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले म्हणून त्यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असॆ म्हटले त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. यांसाठी त्यांनी १९४६ मध्ये पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरु केले. समाजातील तळागाळातील मुलांच्या शिक्षणाची सोय त्यांनी केली. राष्ट्रहिताचे व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय, असे त्यांचे म्हणणे होते. प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असून त्याला स्वतःला एक अस्मिता आहे. याची जाणिव प्रत्येकाना होणे गरजेचे म्हणूनच ते एका जातींतल्या लोकांना नाही तर समस्त लोकाना उद्देशून म्हटले आहे की, गुलामाला गुलाम असल्याची जाणिव करून द्या तो नक्की बंड करून उठेल. याच अर्थातून माणसाला माणूस म्हणून ओळख देण्याचा प्रयत्न सुध्दा त्यांनी केला. म्हणूनच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान आहेत. गौतम बुध्दाच्या शिकवणीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असॆ गौतम बुध्दानी जे म्हटले त्याचा बाबासाहेबानी आयुष्यभर पालन केले. त्यांचे पुस्तक वाचनावर विशेष प्रेम होते, त्यांना वाचण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे सदानकदा ते वाचन करताना आढळून येत असत. एकदा वाचन करीत बसले की सर्व काही विसरून जात असत. दिवसातील 18 - 18 तास अभ्यास करायचे. या वाचनामुळेच त्यांच्या ज्ञानात भरमसाठ वाढ होत गेली. वाचन किती महत्वाचे आहे हे त्यांच्या जीवन चरित्रावरुन लक्षात येते. आपल्याकडे एक म्हण आहे वाचाल तर वाचाल. हेच त्यांनी सिध्द करून दाखविले आहे. वाचनाने माणूस समृद्ध होतो, विचार कक्षा रुंदावतात, माणूस प्रगल्भ बनतो म्हणून वाचनाकडे विशेष लक्ष असणे अत्यंत आवश्यक आहे हे त्यांच्या जीवन अभ्यासावरुन कळते. त्यांचे घर राजगृह अनेक पुस्तकाने भरून गेले होते. त्यांच्या मृत्यूच्या वेळी 50 हजार पुस्तके होती. त्यांनी अनेक पुस्तकांचा अभ्यास केला आणि विविध विषयांवर 53 पुस्तके लिहली. त्यांची कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द या दोन गोष्टीमुळे स्वतःचा, समाजाचा, आणि भारताचा कायापालट झाला असॆ म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण त्यांनी दोन वर्ष अकरा महीने सतरा दिवस अहोरात्र विविध देशाच्या कायद्याचा अभ्यास करून भारताची घटना संविधान तयार केली. त्याच घटनेवर आज भारत देश सुरक्षित असून प्रगतशील राष्ट्रांच्या यादीमध्ये भारत अगदी वरच्या स्थानावर आहे. त्यांच्यामुळेच आज देशांतील प्रत्येक व्यक्तीला हक्काने जीवन जगता येतो. आपल्यावर अन्याय होत आहे असॆ वाटल्यास न्यायालयाद्वारे प्रत्येकाला न्याय मिळविता येतो. समता, बंधूता आणि समानता या राष्ट्रीय मूल्यांची जोपासना या घटनेद्वारे केल्या जाते. म्हणूनच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असॆ म्हटले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घालून आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली . त्यांनी मनुष्यमात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले संपूर्ण ज्ञान आणि माहितीच्या बळावर रंजल्या-गांजल्या जनतेच्या, शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या तसेच स्त्री वर्गाच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून योग्य रस्ता दाखविले आणि मानवतेची दिव्यज्योत निर्माण केले. त्यांनी फक्त काही लोकांचाच उध्दार केला नसून समस्त भारतीय लोकांना आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी वाव दिलेली आहे. ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती सर्वाना नेहमीच प्रेरक ठरते. या महामानवाचे कार्य म्हणजे समाजासाठी व देशासाठी एक दिशादर्शक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. . ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच बाबासाहेबांनी  दिला. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत, भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत. संपूर्ण आशिया खंडात सर्वप्रथम ज्यांनी अर्थशास्त्रात डबल डाँक्टरेट मिळवल आहे. ज्यांच्या Problem of The Rupy या ग्रंथातुन "भारतीय रिजर्व बँक" ची स्थापना करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतासह संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगातील ६५ पेक्षा अधिक देश दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी करतात.महाराष्ट्र सरकारने १४ एप्रिल २०१७ पासून आंबेडकर जयंती ही ज्ञान दिवस म्हणून राज्यभरात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अश्या महान अर्थतज्ज्ञाची आज जयंती त्यानिमित्त त्यांच्या अंगी असलेले एखादे गुण तरी आपल्या अंगी बाणण्याचा प्रयत्न केल्यास खऱ्या अर्थाने त्यांची जयंती आपल्या लक्षात राहील. महामानवाच्या पावन स्मृतिस कोटी कोटी विनम्र अभिवादन !

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक नांदेड जिल्हा परिषदेत उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...