या ब्लॉग वरील सर्व लेखाचे हक्क सौ.अर्चना नागोराव येवतीकर यांच्याकडे आहेत. परवानगी शिवाय लेख फॉर्वर्ड किंवा प्रकाशित करू नये पाऊलवाट पुस्तकाचे प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते प्रकाशन
Saturday, 13 March 2021
14/03/2021
Friday, 12 March 2021
13/03/2021
Thursday, 11 March 2021
jeevan saar
जीवनाचे सार
आपले जीवन आहे क्षणभंगूर
त्यात असतो इतरांचाही वाटा
समाजप्रिय झालेला आहे माणूस
मग कसा जगू शकेल तो एकटा
मदत करावे सख्या जीवलगांना
कसलाही स्वार्थ न ठेवता मनात
मदत करण्याचा हेतू असावा स्वच्छ
कुठलेच गैरसमज नसावे परस्परांत
समजूतदार आपली माणसं नेहमी
सर्वच गोष्टी समजून घेत असतात
काहीजण समजून उमजून न घेता
बारीक त्याचे कीस पाडतात
नात्यांच्या धाग्यात इथे आहे मेख
गैरसमजुतीने स्वकीयांना दुखावतो
अविवेकीपणे बोलतो घालून पाडून
आपुलकी संपते मग दुरावा निर्माण होतो
हल्ली तर सर्व नाते पैशात अडकलेली
गरिबांच्या घराकडे कुणी पाहतही नाही
छोट्या छोट्या गोष्टीवरून मानापमान
मनात राग ठेवून अपमान करत राही
आजकाल कुंटुबातील प्रेम नि जिव्हाळा
सगळं काही विरळ होत चाललंय
हसत हसत बोलण्याची जुनी पद्धत
कुटुंबातून आता लुप्त होत चाललंय
किती दिवस जगणार नाही याची शाश्वती
सोबत काय घेऊन जाणार माहीत नाही
तरी प्रत्येकजण धावतो आहे पैश्यामागे
कोणावर कोणाचे कसलेही बंधन नाही
रोज एक दिवस संपतो आयुष्यातील
वाढदिवसागणिक आयुष्य संपत जाते
आपले वय वाढते तसे चिंताही वाढते
कुटुंबाची घराची काळजीने मन खंगत जाते
आयुष्य म्हणजे नुसते पळणे नाही
बांधून घ्यावी अनुभवाची शिदोरी
मिळवावे प्रेम, आदर नि सन्मान
आनंदच आनंद करू मग जगण्यावरी
जीवनात सुख दुःखाचे रंग हवेत
पाण्याच्या प्रवाहासारखे मुक्त जगावं
निराशेमध्ये असते लपलेली आशा
त्याच आशेच्या ऊर्जेची वाट बघावं
आपली माणसं असावी जवळ
दुःखात डोळ्यांत अश्रू घेऊन पाहणारी
जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होतांना
आनंदाच्या क्षणी डोळे भरून बघणारी
पैसा समृद्धी भरभराट झाली खूप
पण पाहायला नसतील माणसं आपली
त्याच्यासारखा दरिद्री तोच असेल
ज्याच्या नसेल कोणी आपला वाली
- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769
12/03/2021
जागतिक जल दिन ( World Water Day )
22 मार्च - जागतिक जल दिन त्यानिमित्ताने लेख जल है तो कल है पाणी म्हणजे जल किंवा नीर असे ही म्हटले जाते. सजीवांन...
-
दीपोत्सवाचा सण : दिवाळी दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळी सणाची आबालापासून वृध्दापर्यंत सर्वानाच चातक पक्ष्य...
-
संतुलित आहार - नागोराव सा. येवतीकर , मु. येवती ता. धर्माबाद अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा...
-
शिक्षकांना स्वातंत्र्य असावे देशाचे भवितव्य शाळेतून घडत असते कारण येथेच देशाचा भावी आधारस्तंभ बनणारा विद्यार्थी शिक्षण घेत असतो....