Monday 5 December 2022

अस्ट्रोनॉमी ( Astronomy )

सूर्यमाला व त्यातील विविध ग्रहांची माहिती फोटोसह

                      सूर्यमाला 
सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह आहेत. सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस (हर्षल) व नेपच्यून (वरुण). प्लूटो हा त्याच्या शोधापासून (म्हणजेच १९३० पासून) सूर्यमालेतील नववा ग्रह मानला जातो.


                सूर्य


सूर्य दर सेकंदाला चार कोटी टन हायड्रोजन अणुइंधन वापरतो. सूर्य सतत जळत राहतो. सूर्याचे तापमान हजारो अंश सेल्सिअस आहे. सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सूर्यमालेतील इतर ग्रह हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. हा सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे.सूर्यापासून पृथ्वीचे सरासरी अंतर जवळजवळ १५ कोटी किलोमीटर किंवा ९ कोटी ३० लाख मैल आहे. सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर पोचायला ८.३ मिनिटे लागतात. या प्रकाशाच्या ऊर्जेमुळे प्रकाश-संश्लेषण नावाची एक जैव-रासायनिक अभिक्रिया होते. ही अभिक्रिया पृथ्वीवरील जीवनाचा आधार आहे. सूर्याचा पृष्ठभाग हायड्रोजन, हेलियम, लोह, निकेल, ऑक्सिजन, सिलिकॉन, सल्फर, मॅग्निशिअम, कार्बन, नियॉन, कॅलशियम, क्रोमियम आदी घटकांपासून झाला आहे. यापैकी हायड्रोजनचे प्रमाण ७४% आणि हेलियमचे २४% आहे.
                 
               01) बुध ग्रह

बुध हा सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह आहे. त्याचे सूर्यापासूनचे अंतर ५७, ९०९१७५ किलोमीटर आहे. बुध त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ८८ दिवसात पूर्ण करतो. आकाराने हा एक छोटा ग्रह आहे. सूर्याच्या फारच जवळ असल्याने दुर्बिणीतून फार क्वचित दिसतो. त्याला कोणतेही नैसर्गिक उपग्रह नाहीत.


                 02) शुक्र ग्रह

सूर्यमालेमध्ये शुक्र हा सूर्यापासून बुधानंतर, आणि पृथ्वीअगोदर येणारा क्रमाने दुसरा ग्रह आहे. जरी सर्व ग्रहांच्या भ्रमणकक्षा लंबगोलाकार असल्यातरी शुक्राची भ्रमणकक्षा जवळजवळ वर्तुळाकार आहे. याचा व्यास १२,१०४ कि. मी. एवढा आहे. शुक्र देखील अंतर्वर्ती ग्रह आहे. यामुळेच शुक्रदेखील आपल्याला आकाशात फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच दिसतो. या ग्रहावर वातावरण अतिशय दाट असल्यामुळे सूर्याचा शुक्रावर पडलेला प्रकाश मोठ्याप्रमाणात परावर्तित होतो. म्हणून शुक्र आपल्याला इतर ग्रहांपेक्षा अधिक तेजस्वी दिसतो.

                  03) पृथ्वी ग्रह


पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला 'निळा ग्रह' असेही म्हणतात. जिथे जीवन आहे, अशी पूर्ण विश्वात ही एकमेव ज्ञात जागा आहे . आपण याच पृथ्वीवर राहतो. पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० कि.मी. एवढे आहे.



                  04) मंगळ ग्रह


मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असे सुद्धा म्हटले जाते. तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साइडमुळे मिळाला आहे. हा एक खडकाळ ग्रह (terrestrial planet) असून त्यावरील वातावरण विरळ आहे. ऑलिम्पस मॉन्स ही मंगळावर असलेली ज्वालामुखी आपल्या सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखी आहे.



                05) गुरू ग्रह
             
गुरू (Jupiter) हा अंतरानुसार सूर्यापासून पाचव्या स्थानावर असलेला सूर्यमालेमधील आकाराने सर्वांत मोठा ग्रह आहे. गुरू ग्रह हा मुख्यत्वेकरून हायड्रोजन व थोड्या प्रमाणात हेलियमचा बनला आहे. गुरूला कमीतकमी ६३ उपग्रह आहेत. यापैकी चार मोठ्या उपग्रहांचा शोध गॅलिलियोने १६१० मध्ये लावला होता.




               06) शनी ग्रह
             
सूर्यमालेतील ग्रहांमध्ये शनी (Saturn) हा सूर्यापासून सहाव्या स्थानावर आहे. त्याचे बरेचसे वस्तुमान वायूंमुळे असून हा सूर्यमालेतील आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. शनीभोवती बर्फ व आंतरिक्ष कचऱ्यापासून बनलेली कडी आहेत. गुरू ग्रहापेक्षा लहान असला तरी हा त्याच्या भोवताली असलेल्या देखण्या कड्यांमुळे अधिक प्रसिद्ध आहे. शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: २९ वर्ष लागतात.


                  07) युरेनस ग्रह

युरेनस हा सूर्यमालेमध्ये सूर्यापासून सातव्या क्रमांकावर असलेला ग्रह आहे. हर्शल पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. तो बराचसा वायूंचा बनलेला आहे. तो व्यासानुसार तिसरा आणि वस्तुमानानुसार चौथा ग्रह आहे. युरेनस ग्रह पृथ्वीच्या तुलनेत अनेक पटींनी मोठा आहे. पृथ्वीपासून त्याचे अंतर २.८ अब्ज कि.मी. आहे. युरेनसला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पुरी करण्यास ८४ वर्ष लागतात. नासाच्या "व्हॉयेजर २" या यानाने युरेनस ग्रहाला भेट दिली आहे. आधुनिक काळात शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. सर विल्यम हर्शल यांनी हा ग्रह १३ मार्च १७८१ला शोधल्याची घोषणा केली. युरेनसला हिंदी-मराठीत अरुण म्हणतात.

              08) नेपच्यून ग्रह


नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून आठवा व सूर्यमालेतील सर्वांत बाहेरचा ग्रह आहे. या ग्रहाला हिंदीत व मराठीत वरुण असे म्हणतात. नेपच्यूनचा शोध ४ ऑगस्ट १९६४ रोजी लागला. हा ग्रह दुर्बिणीनेच पाहता येतो.स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास यास साधारणतः १९ दिवस लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास 
 १६५ वर्षे लागतात.




                    चंद्र उपग्रह   
             
चंद्र पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वी व चंद्रामधील अंतर ३,८४,४०३ कि.मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ३० पट आहे.  चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालण्याकरीता २७.३ दिवसांचा कालावधी लागतो. तसेच चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्यातील भौमितिक स्थानांमुळे दर २९.५ दिवसांनी चंद्राच्या कलांचे एक आवर्तन पूर्ण होते. चंद्राने बऱ्याच वर्षांपासून पृथ्वीला लघुग्रहांपासून संरक्षण केले आहे. 
चांद्र मास हा तीस दिवसांचा असतो, तर चांद्र वर्ष ३६० दिवसांचे. हे सूर्याधारित सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. सूर्यवर्षाच्या बरोबर येण्यासाठी साधारणपणे सुमारे दर ३३ महिन्यांनी अधिक चांद्रमास येतो. त्यातूनही राहिलेली तफावत दूर करण्यासाठी सुमारे १९ किंवा १४१ वर्षांनी क्षयमास येतो.

संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, जि. नांदेड
9423625769

भारतीय शास्त्रज्ञ ( Indian Scientist )

भारतातील काही महान गणिततज्ञ आणि शास्त्रज्ञ

      भारतीय गणितज्ञ - आर्यभट्ट

जगाला सर्वात आधी शून्याची ओळख देणारे महान भारतीय खगोलशास्त्री आणि गणितज्ञ म्हणजे आर्यभट्ट. त्यांना खागोलशास्त्रात आणि गणितामध्ये एक विशेष आवड होती, त्यांनी गणितामध्ये सुद्धा बरेचसे सूत्र शोधून काढले आहेत. १५ एप्रिल १९७५ साली आर्यभट्ट यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त भारताने “आर्यभट्ट” नावाचा पहिला उपग्रह अवकाशात सोडला.
 
                
            भारतीय शास्त्रज्ञ - सर सी. व्ही. रामन
( जन्म :-  7 नोव्हेंबर1988 मृत्यू :- 21 नोव्हेंबर 1970 )

सी.व्ही.रमण हे आधुनिक भारतातील एक महान वैज्ञानिक होते.. ‘रमण प्रभाव’ (Raman Effect) हा त्यांच्या संशोधनांला 1930 साली नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलं. 28 फेब्रुवारी 1928 साली सी.व्ही.रमण यांनी ‘रमण इफेक्ट‘ चा शोध लावला होता. म्हणून या दिवसाला भारत सरकारने दरवर्षी ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यांना 1954 साली भारताच्या सर्वोच्च अश्या ‘भारतरत्न’ देऊन गौरव करण्यात आला.
                 
             भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. हरगोविंद खुराना
( जन्म :- 19 ऑक्टोबर 1910  मृत्यू :- 09 नोव्हेंबर 2011 )

डॉ. हरगोविंद खुराना यांना सन १९६८ साली अनुवांशिक संहिताची भाषा समजण्यासाठी आणि प्रथिने संश्लेषणातील भूमिका याबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते भारतीय वंशाचे तिसरे व्यक्ती होते. सन १९६९ साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

                       
           भारतीय शास्त्रज्ञ - सुब्रह्मण्यम चंद्रशेखर
( जन्म :-  9 जानेवारी 1922 मृत्यू :- 21 ऑगस्ट1995  )
सन १९६८ साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यांना एस. चंद्रशेखर म्हणून सुद्धा ओळखले जाते. 
त्यांना ‘ताऱ्यांची रचना आणि उत्पत्ती’च्या शोधासाठी १९८३ साली नोबेल पारितोषिक मिळालेले आहे.


                   
         भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. होमी भाभा
( जन्म :-  30 ऑक्टोबर 1909 मृत्यू :- 24 जानेवारी 1966  )

यांना भारतीय अनुशास्त्राचे जनक म्हटल्या जाते. यांच्याद्वारे भारतात अणु उर्जेच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे.
सन १९५४ साली भारत सरकार तर्फे पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


                        
भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
( जन्म :-  15 ऑक्टोबर 1931 मृत्यू :- 27 जुलै 2015  )

भारतीय क्षेपणास्त्राचे जनक,  पहिल्या स्वदेशी क्षेपणास्त्राचे श्रेय डॉ. कलाम यांना जाते.
वर्ष 1997 मध्ये भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन गौरविण्यात आले.
सन 2001 मध्ये भारताच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. 


                   
        भारतीय गणितज्ञ - श्रीनिवास रामानुजन
( जन्म :-  22 डिसेंबर 1887  मृत्यू :- 26 एप्रिल 1920  )

रामानुजन यांना गणित आणि इंग्रजी या दोन विषयांची विशेष आवड होती. रामानुजन यांनी ३५०० पेक्षाही जास्त गणिताची प्रमेय लिहिलेली होती. 



                
             भारतीय शास्त्रज्ञ - विक्रम साराभाई
( जन्म :-  12 ऑगस्ट1919  मृत्यू :- 30 डिसेंबर 1971  )

भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेचे जनक आणि भारतातील अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. विकर्म साराभाई यांनी अहमदाबाद येथे साकारलेल्या रिसर्च सेंटर मधून सन १९७५ साली आपल्या देशांतील पहिला अंतरीक्ष उपग्रह ‘आर्यभट्ट’  अवकाशात सोडण्यात आला. सन १९६६ साली पद्मभूषण पुरस्कार आणि सन १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार

                    
      भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ - डॉ. जगदीशचंद्र बोस
( जन्म :-  30 नोव्हेंबर 1858  मृत्यू :- 23 नोव्हेंबर 1937  )

डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली तसेच वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. ते एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. 

                               
              
      भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. शंकर आबाजी भिसे 
(जन्म :- 29 एप्रिल 1867  मृत्यू :- 07 एप्रिल 1935 ) 

हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते. सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती. आगगाडीच्या स्वयंचलित दरवाजाचा शोध त्यांनीच लावला. अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ 


                       
 भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. वसंत गोवारीकर
(जन्म :- 25 मार्च 1933  मृत्यू :- 03 जानेवारी 2015 ) 

भारतात विज्ञानाचा पाया रचणारे, पहिला भारतीय अग्निबाण बनवणारे, इस्रो संस्था प्रमुख महान शास्त्रज्ञ, खतांचा जागतिक ज्ञानकोश निर्मिती करणारे व पंतप्रधान विज्ञाम सल्लागार म्हणून कार्य केले. 


                            
भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. जयंत नारळीकर
                (जन्म :- 19 जुलै 1938 ) 

सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.



       रघुनाथ अनंत माशेलकर

रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म १ जानेवारी १९४३मध्ये गोवा या राज्यातील माशेल गावात झाला. त्यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते.. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) या संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. बासमती तांदूळ आणि हळदीचे पेटंट मिळविले. भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार मिळाले आहेत. 

संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

सौजन्य :- इंटरनेट

धन्यवाद .........!

Sunday 4 December 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. B R Ambedkar )

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी लिहिलेले कविता व वैचारिक लेख. 

निळ्या अक्षरावर क्लीक करून वाचावे. 

शिका, संघटित व्हा ....



।। विनम्र अभिवादन ।।

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...