Monday 5 December 2022

भारतीय शास्त्रज्ञ ( Indian Scientist )

भारतातील काही महान गणिततज्ञ आणि शास्त्रज्ञ

      भारतीय गणितज्ञ - आर्यभट्ट

जगाला सर्वात आधी शून्याची ओळख देणारे महान भारतीय खगोलशास्त्री आणि गणितज्ञ म्हणजे आर्यभट्ट. त्यांना खागोलशास्त्रात आणि गणितामध्ये एक विशेष आवड होती, त्यांनी गणितामध्ये सुद्धा बरेचसे सूत्र शोधून काढले आहेत. १५ एप्रिल १९७५ साली आर्यभट्ट यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त भारताने “आर्यभट्ट” नावाचा पहिला उपग्रह अवकाशात सोडला.
 
                
            भारतीय शास्त्रज्ञ - सर सी. व्ही. रामन
( जन्म :-  7 नोव्हेंबर1988 मृत्यू :- 21 नोव्हेंबर 1970 )

सी.व्ही.रमण हे आधुनिक भारतातील एक महान वैज्ञानिक होते.. ‘रमण प्रभाव’ (Raman Effect) हा त्यांच्या संशोधनांला 1930 साली नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलं. 28 फेब्रुवारी 1928 साली सी.व्ही.रमण यांनी ‘रमण इफेक्ट‘ चा शोध लावला होता. म्हणून या दिवसाला भारत सरकारने दरवर्षी ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यांना 1954 साली भारताच्या सर्वोच्च अश्या ‘भारतरत्न’ देऊन गौरव करण्यात आला.
                 
             भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. हरगोविंद खुराना
( जन्म :- 19 ऑक्टोबर 1910  मृत्यू :- 09 नोव्हेंबर 2011 )

डॉ. हरगोविंद खुराना यांना सन १९६८ साली अनुवांशिक संहिताची भाषा समजण्यासाठी आणि प्रथिने संश्लेषणातील भूमिका याबद्दल नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते भारतीय वंशाचे तिसरे व्यक्ती होते. सन १९६९ साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

                       
           भारतीय शास्त्रज्ञ - सुब्रह्मण्यम चंद्रशेखर
( जन्म :-  9 जानेवारी 1922 मृत्यू :- 21 ऑगस्ट1995  )
सन १९६८ साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यांना एस. चंद्रशेखर म्हणून सुद्धा ओळखले जाते. 
त्यांना ‘ताऱ्यांची रचना आणि उत्पत्ती’च्या शोधासाठी १९८३ साली नोबेल पारितोषिक मिळालेले आहे.


                   
         भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. होमी भाभा
( जन्म :-  30 ऑक्टोबर 1909 मृत्यू :- 24 जानेवारी 1966  )

यांना भारतीय अनुशास्त्राचे जनक म्हटल्या जाते. यांच्याद्वारे भारतात अणु उर्जेच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे.
सन १९५४ साली भारत सरकार तर्फे पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


                        
भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
( जन्म :-  15 ऑक्टोबर 1931 मृत्यू :- 27 जुलै 2015  )

भारतीय क्षेपणास्त्राचे जनक,  पहिल्या स्वदेशी क्षेपणास्त्राचे श्रेय डॉ. कलाम यांना जाते.
वर्ष 1997 मध्ये भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन गौरविण्यात आले.
सन 2001 मध्ये भारताच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. 


                   
        भारतीय गणितज्ञ - श्रीनिवास रामानुजन
( जन्म :-  22 डिसेंबर 1887  मृत्यू :- 26 एप्रिल 1920  )

रामानुजन यांना गणित आणि इंग्रजी या दोन विषयांची विशेष आवड होती. रामानुजन यांनी ३५०० पेक्षाही जास्त गणिताची प्रमेय लिहिलेली होती. 



                
             भारतीय शास्त्रज्ञ - विक्रम साराभाई
( जन्म :-  12 ऑगस्ट1919  मृत्यू :- 30 डिसेंबर 1971  )

भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेचे जनक आणि भारतातील अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. विकर्म साराभाई यांनी अहमदाबाद येथे साकारलेल्या रिसर्च सेंटर मधून सन १९७५ साली आपल्या देशांतील पहिला अंतरीक्ष उपग्रह ‘आर्यभट्ट’  अवकाशात सोडण्यात आला. सन १९६६ साली पद्मभूषण पुरस्कार आणि सन १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार

                    
      भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ - डॉ. जगदीशचंद्र बोस
( जन्म :-  30 नोव्हेंबर 1858  मृत्यू :- 23 नोव्हेंबर 1937  )

डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली तसेच वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. ते एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. 

                               
              
      भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. शंकर आबाजी भिसे 
(जन्म :- 29 एप्रिल 1867  मृत्यू :- 07 एप्रिल 1935 ) 

हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते. सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती. आगगाडीच्या स्वयंचलित दरवाजाचा शोध त्यांनीच लावला. अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ 


                       
 भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. वसंत गोवारीकर
(जन्म :- 25 मार्च 1933  मृत्यू :- 03 जानेवारी 2015 ) 

भारतात विज्ञानाचा पाया रचणारे, पहिला भारतीय अग्निबाण बनवणारे, इस्रो संस्था प्रमुख महान शास्त्रज्ञ, खतांचा जागतिक ज्ञानकोश निर्मिती करणारे व पंतप्रधान विज्ञाम सल्लागार म्हणून कार्य केले. 


                            
भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. जयंत नारळीकर
                (जन्म :- 19 जुलै 1938 ) 

सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.



       रघुनाथ अनंत माशेलकर

रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म १ जानेवारी १९४३मध्ये गोवा या राज्यातील माशेल गावात झाला. त्यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते.. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) या संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. बासमती तांदूळ आणि हळदीचे पेटंट मिळविले. भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार मिळाले आहेत. 

संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

सौजन्य :- इंटरनेट

धन्यवाद .........!

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...