Saturday 25 May 2019

अन्न

अन्न म्हणजे पूर्णब्रह्म

अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. यातील अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सजीव धडपडत असतो. अश्मयुगीन काळातील लोक अन्नाच्या भटकंतीत अनेक वर्षे घातली. या अन्नाच्या शोधातच त्यांनी अग्निचा शोध लावला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. गरज ही शोधाची जननी आहे या म्हणीनुसार अश्मयुगीन काळातील माणूस प्राण्याची शिकार करून कच्चे मांस खात असे. याच बरोबर जंगलातील फळे आणि कंदमुळे हे त्यांचे प्रमुख खाद्य होते. अग्निचा शोध लागल्यानंतर हा माणूस प्राणी भाजुन खाऊ लागला. त्याला भाजलेल्या अन्नाची चव माहित झाली तसे प्रत्येक अन्न पदार्थ भाजुन खान्यास सुरुवात केली. पाण्याजवळ वास्तव्य करून राहत असल्यामुळे त्यांनी मग हळू हळू शेती करण्यास सुरुवात केली. शेतातुन आलेल्या अन्नधान्याचा वापर जेवण्यात करता येतो हे कळायला लागल्यावर माणसाचे जेवण्यात सुधारणा होऊ लागली. मग माणूस एकत्र राहू लागले. त्यांचा समूह तयार झाला या समुहाचे एका वस्ती मध्ये रूपांतर व्हायला वेळ लागला नाही. पाहता पाहता गाव आणि नगर त्यानंतर महा नगर ही तयार झाले. अन्नाच्या शोधात आपण आज या स्तरापर्यन्त येऊन पोहोचलो आहोत आणि आज ही आपण त्याच अन्नाच्या शोधात रोजच फिरत असतो. मात्र याच अन्ना विषयी किंवा आहार विषयी आपण खरोखर जागरूक आहोत ? याचा एकदा तरी विचार करीत नाही. मानवाला जीवन जगण्यासाठी किंवा शारीरिक वाढीसाठी अन्नाची गरज असते. म्हणून अन्न मिळविण्यासाठी प्रत्येकजण जीवाचे रान करीत असतो. आज आपण जे काही काबाडकष्ट करीत आहोत ते सर्व या अन्नासाठी नव्हे काय ? आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पोट भर खायला मिळावे म्हणून कुटुंबप्रमुख या नात्याने पुरुष आणि स्त्री दिवस रात्र काम करीत असतात. त्याच केलेल्या कामाच्या मोबदल्यात पैसा मिळतो आणि त्या पैश्यावर घरात लागणाऱ्या अन्नाची पूर्तता करीत असतो. अन्न जर नसेल तर आपल्या पोटाचे नीट पोषण होणार नाही. त्यामुळे प्रत्येक मानवाला मग तो गरीब असो वा श्रीमंत त्याला अन्नाची गरज आहे. भारतात एका बाजूला उपासमारी ने मरणारी माणसे दिसतात तर दूसरी कडे जास्त जेवल्यामुळे पोटाच्या विविध आजाराने त्रस्त माणसे दिसतात हे पाहून मन खिन्न होते. अन्न हे पूर्णब्रह्म आहे त्यामुळे अन्न वाया घालवू नये असे वाडवडील मंडळी नेहमी सांगत असतात. परंतु जेंव्हा एखाद्या कार्यक्रमात जेवणाच्या ठिकाणी जे अन्नाची नासाडी दिसून येते ते पाहून मन फारच उदास होऊन जाते. फार पूर्वी पंगतीत बसून जेवण दिल्या जायचे. त्यामुळे लोकं पोटभर जेवत असत आणि अन्न देखील वाया जात नसे. मात्र जेवण्याच्या बुफे पद्धत आल्यापासून अन्नाची नासाडी वाढलेली आहे. वास्तविक पाहता अन्नाची बचत व्हावी आणि जेवढा लागेल तेवढा लोकांना घेता यावं या उद्देशाने ही पद्धत सुरू झाली मात्र ही पद्धत आज एका वेगळ्याच वळणावर आली आहे. कार्यक्रमात उरलेले अन्न फेकून देण्यापेक्षा समाजातील गोरगरीब आणि गरजू लोकांना दिलेले केंव्हाही चांगले. अन्नाचे महत्व कळाले की माणूस अन्न फेकून देत नाही, हे मात्र खरे आहे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक व प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

आषाढी एकादशी

सकाळी रेडियोवर पं.भीमसेन जोशी यांच्या आवाजातील माझे माहेर पंढरी ,आहे भीम रे त्या तिरी हे गाणे ऐकत ऐकतच उठायचो. लहान असल्यापासून या पंढरीच्या विट्ठलाचे आकर्षण असायाचे त्याला कारण ही तसेच होते. माझे काका वारकरी संप्रदायतील होते ,त्यामुळे ते आषाढी एकादशीला पंढरीची वारी करून परत यायचे आणि येताना आम्हां लहान मुलांसाठी काही आणित असत. त्याचे आम्हाला उत्सुकता असायची. वर्षामागून वर्ष सरले आणि आम्ही मोठे झालो तसे या वारीचे आकर्षण कमी झाले. पण वारी समजू लागलो आणि वारी मध्ये जायचे असेल तर भजन करावे लागते ही अट गावातील चर्चेमधुन ऐकन्यास मिळाले. यामुळे भजन करण्याकडे वळलो .टाळ कधी हातात घेता आले नाही, मात्र हाताने टाळ वाजवायचो आणि भजनी मंडळात सामिल व्हायचो, असे शालेय जीवनात घडले. हे सर्व त्या पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी करायचो. शालेय जीवन संपले आणि महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर या भजना पासून दूर झालो. मात्र पंढरीचे आकर्षण कमी झाली नाही यामागे काय कारण असेल .....?
आषाढी एकादशी ही पंढरीची वारी पावासळ्याच्या तोंडावर येते. वारकरी मंडळी सहसा शेतकरी असतो आणि शेतात आपली पेरणी पूर्ण करून वारी साठी रवाना होत असतो. कधी कधी निसर्ग नियम मोडते आणि पेरणी करायला उशीर होतो. तरी शेतकरी आपली वारी चुकवत नाहीत. या वारीत बरेच काही शिकायला मिळते. मुंगी ज्याप्रमाणे वाटचाल करतात अगदी त्याच प्रकारे वारकरी आपल्या घरातून जथयाच्या जथ्थी निघातात आणि वारीत सामिल होतात. *शिस्त* ही त्यांच्या अंगात असलेली एक अत्यंत महत्वाचे गुण येथे दिसून येते. कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसताना ही वारकरी लोकांची स्वयंशिस्त पाहन्याजोगे असते. स्वतः तयार केलेली शिस्त असल्यामुळे ते मोडन्याचा प्रश्नच येत नाही.
या लोकांमध्ये अजुन एक महत्वाचे गुण दिसून येते ते म्हणजे इतरांना सहकार्य करणे .वारीमध्ये पायी चालत असताना अनेक समस्या निर्माण होतात पण त्याचे काहीच वाटत नाही .कारण वारी मधे लोक एकमेकांना सहकार्य करीत वाटचाल करीत असतात. त्यामुळे कोणालाही समस्या निर्माण झाली तरी त्याचे काही वाटत नाही .प्रेम करीत जा आपणास नक्कीच प्रेम मिळेल द्वेषातुन द्वेष च निर्माण होते याची प्रचिती सुद्धा या निमित्ताने येते .सासरी गेलेल्या मुलीला आषाढी च्या निमित्ताने माहेरी जाण्याचा योग येतो वर्षातील सणांची सुरुवात या सणाने होते जसी तिला माहेराचि ओढ लागलेली असते.

- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद

माझी शाळा

माझी शाळा

मला लहानपणापासून शाळा आवडत होती काय ? या प्रश्नाचे उत्तर कदाचित नाही असेच येईल. मी घरात सर्वात लहान. त्यामूळे सर्वाचे माझ्यावर प्रेम असायचे. खास करून माझी छोटी बहीण. जिच्यामुळे मी शाळेत जायला शिकलो. माझे घर म्हणजे अगदी छोटे दोन रूमचे. वडील शिक्षक होते, पण ते दर आठवड्यास भेटायचे. त्यांच्याजवळ नेहमी एक सायकल आणि छत्री असायची. उन्हाळा पावसाळा असो वा हिवाळा. त्यांच्या विषयी माझ्या मनात नेहमीच आदरयुक्त भीती असायची. त्यांनी मला कधी रागावले नाही पण मनात एक वेगळीच धाक होती. अर्थातच मी पहिली आणि दुसऱ्या वर्गात रडत रडतच गेलो. तिसऱ्या वर्गात मात्र माझ्या सोबत ताई नव्हती कारण ती चौथी पास झाली आणि पुढील वर्ग त्या शाळेत नव्हते. त्यामूळे मला ताई शिवाय शाळेत जावे लागले आणि येथूनच कदाचित शाळेची गोडी लागली. या वर्गात शिकविणारे सर जेंव्हा बाजारात मला भेटतात तेंव्हा त्यांना खूप आनंद होतो हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते. त्यांना आनंदी पाहून माझे ही मन भरून येते. माझ्या पाऊलवाट पुस्तकाचे प्रकाशन झाल्याची बातमी वाचून माझे प्राथमिक शाळेतील शिक्षकानी चारचौघात कौतूक केले तेंव्हा मला जेवढा आनंद झाला त्यापेक्षा किती तरी पटीने माझ्या गुरुजनांना झाला. मी तसा खूप हुशार असा विद्यार्थी नक्कीच नव्हतो पण पहिल्या दहा मध्ये नेहमीच असायचो. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी धर्माबाद या मोठ्या शहरात शिकण्यासाठी आलो. मी खेड्यातून आल्यामुळे मला " ड " वर्गात प्रवेश देण्यात आला. या शाळेची पध्दतच होती की खेड्यातील मुलांचा वर्ग वेगळा ठेवण्याचा, ही शाळेची पध्दत मला कदापिच रुचली नाही तरी मला काही करता येत नव्हते. एक दोन वेळा प्रयत्न केला की अ किंवा ब या तुकडीत प्रवेश द्यावा पण मिळाला नाही. ड तुकडीच्या वर्गात सर्वच प्रकारची विद्यार्थी होती. अर्थातच सर्वगुणसंपन्न असा आमचा वर्ग. या वर्गातील सर्व विद्यार्थी ज्यात मी अभ्यासात वर्गात नेहमीच पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर. घरापासून आणि आईपासून दूर राहताना खूप दुःख वाटायचे. शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर गावाकडे जाण्याची ओढ लागायची. गावाकडील मित्र आणि त्यांच्या सोबत खेळण्याची मजा काही औरच. येथे भरपूर लिहिण्याचा योग आला ज्यामुळे माझे अक्षर लेखन सुधारणा झाली. दररोज जवळपास सर्वच विषयांच्या प्रश्नोत्तर लिहावे लागायचे आणि वही पूर्ण न केल्यास शिक्षा

- नागोराव सा. येवतीकर

ग्रामीण दुष्काळ

ग्रामीण दुष्काळ आणि शहरी झगमगाट

आपण भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वीच्या काळात गेलो तर आपणांस असे दिसून येते की, त्यावेळी ग्रामिण भागात राहणारी संख्या शहरांतील संख्येपेक्षा कमी होते. आर्थिक चलन अस्तित्वात आले नव्हते. लोकं कामांच्या मोबदल्यात धान्य देत असे आणि सर्व धान्य त्याच गावात फिरत रहायचे. सर्व लोकांच्या हाताला काम मिळायचे त्यामुळे कोणी बेरोजगार दिसायचा नाही. एकमेकात प्रेम व सहकार्याची भावना त्यांच्यात असायची. पुढे यांत हळूहळू बदल होत चालले आणि शहरीकरणाचा विस्तार वाढत जाऊ लागला. कामांच्या मोबदल्यात जसे पैसा आला तसे लोकं खेड्यातून शहराकडे धाव घेऊ लागली कारण इथे शहरांत सर्व सुख सोई सुविधा मिळतात आणि तेच खेड्यातून मिळत नाहीत म्हणून खेडी ओस पडायला लागली आहेत. दुष्काळाच्या झळा फक्त ग्रामिण भागातच आहे असे नाही तर शहरांत सुध्दा या दुष्काळाच्या झळ जाणवत असतात. जो झगमगाट शहरांत दिसून येतो तो खूप वरवरचा असतो. ग्रामिण भागातील गरीब शेतकऱ्यांसारखी मंडळी इथे शहरांत सुध्दा तसेच राहतात. पैसा फेक तमाशा देख ही प्रवृत्ती इथे शहरांत आढळून येते. पण खऱ्या माणुसकीची माणसे आज ही खेड्यातूनच सापडतात. शहरीकरण ची संस्कृती खेड्यात न गेलेली बरी. असे दुष्काळ येतात आणि जातात.

- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद

माझी शाळा

माझी शाळा

मला लहानपणापासून शाळा आवडत होती काय ? या प्रश्नाचे उत्तर कदाचित नाही असेच येईल. मी घरात सर्वात लहान. त्यामूळे सर्वाचे माझ्यावर प्रेम असायचे. खास करून माझी छोटी बहीण. जिच्यामुळे मी शाळेत जायला शिकलो. माझे घर म्हणजे अगदी छोटे दोन रूमचे. वडील शिक्षक होते, पण ते दर आठवड्यास भेटायचे. त्यांच्याजवळ नेहमी एक सायकल आणि छत्री असायची. उन्हाळा पावसाळा असो वा हिवाळा. त्यांच्या विषयी माझ्या मनात नेहमीच आदरयुक्त भीती असायची. त्यांनी मला कधी रागावले नाही पण मनात एक वेगळीच धाक होती. अर्थातच मी पहिली आणि दुसऱ्या वर्गात रडत रडतच गेलो. तिसऱ्या वर्गात मात्र माझ्या सोबत ताई नव्हती कारण ती चौथी पास झाली आणि पुढील वर्ग त्या शाळेत नव्हते. त्यामूळे मला ताई शिवाय शाळेत जावे लागले आणि येथूनच कदाचित शाळेची गोडी लागली. या वर्गात शिकविणारे सर जेंव्हा बाजारात मला भेटतात तेंव्हा त्यांना खूप आनंद होतो हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते. त्यांना आनंदी पाहून माझे ही मन भरून येते. माझ्या पाऊलवाट पुस्तकाचे प्रकाशन झाल्याची बातमी वाचून माझे प्राथमिक शाळेतील शिक्षकानी चारचौघात कौतूक केले तेंव्हा मला जेवढा आनंद झाला त्यापेक्षा किती तरी पटीने माझ्या गुरुजनांना झाला. मी तसा खूप हुशार असा विद्यार्थी नक्कीच नव्हतो पण पहिल्या दहा मध्ये नेहमीच असायचो. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी धर्माबाद या मोठ्या शहरात शिकण्यासाठी आलो. मी खेड्यातून आल्यामुळे मला " ड " वर्गात प्रवेश देण्यात आला. या शाळेची पध्दतच होती की खेड्यातील मुलांचा वर्ग वेगळा ठेवण्याचा, ही शाळेची पध्दत मला कदापिच रुचली नाही तरी मला काही करता येत नव्हते. एक दोन वेळा प्रयत्न केला की अ किंवा ब या तुकडीत प्रवेश द्यावा पण मिळाला नाही. ड तुकडीच्या वर्गात सर्वच प्रकारची विद्यार्थी होती. अर्थातच सर्वगुणसंपन्न असा आमचा वर्ग. या वर्गातील सर्व विद्यार्थी ज्यात मी अभ्यासात वर्गात नेहमीच पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर. घरापासून आणि आईपासून दूर राहताना खूप दुःख वाटायचे. शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर गावाकडे जाण्याची ओढ लागायची. गावाकडील मित्र आणि त्यांच्या सोबत खेळण्याची मजा काही औरच. येथे भरपूर लिहिण्याचा योग आला ज्यामुळे माझे अक्षर लेखन सुधारणा झाली. दररोज जवळपास सर्वच विषयांच्या प्रश्नोत्तर लिहावे लागायचे आणि वही पूर्ण न केल्यास शिक्षा

- नागोराव सा. येवतीकर

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...