Saturday 21 May 2016

📕📗साहित्य दर्पण 📝🔏

💈💈द्वारा आयोजित 📺📻

📑📃साहित्य सेवा 🖊✏

भाग ::---पहिला (1ला)

खास कविता स्पर्धा
★★★★★★★★
21 मे 2016
वार :::-–-शनिवार
~~~~~~~~~~~~~~~
विषय :---मुक्त कविता
~~~~~~~~~~~~~~~
संयोजक:-आप्पासाहेब सुरवसे
______________________
संकल्पना:--नासा येवतीकर
______________________
परीक्षक ---कवि मारुती खुडे
==================
[5/21, 7:44 PM] Surwase: 
*📚साहित्य दर्पण*📝

             द्वारा आयोजित


आजच्या *साहित्य सेवा* या अनोख्या *खुली कविता* स्पर्धेतील
सहभागी स्पर्धक

01] स्मिता देशपांडे
02 ]जागृती निखारे
03] हणमंत पडवळ
04] विशाल मोरे
05] नरेंद्र मस्के
06] बाबू डिसोजा
07]प्राची देशपांडे
08 ]आप्पासाहेब सुरवसे
09]संगीता भांडवले
10]अनिल लांडगे
11] सुभद्रा खेडकर
11] कुंदा ताई पित्रे
12]प्रविण सानप धुळे
13] वृषाली वानखेड़े
14]शशिकला बनकर
15]स्वाती केळकर
16 ]सुनंदा पाटिल
17] मंजूषा देशमुख
18 ]मीरा खेडकर
19 ] संदीप ढाकणे
20] प्रा .संगीता भालसिंग
21 ]मीना सानप
22] जयश्री पाटिल
23] कल्पना जगदाळे
24]निर्मलाताई सोनी
25] *निलेश आळंदे*
26] निलेश कवडे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन आणि आभार

पहिल्या वहिल्या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आपणां सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार.....!!!

🙏🙏🙏🙏🙏🙏
साहित्य दर्पण
एडमिन कोअर कमिटी
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 9:11 AM] ‪+91 98905 67468‬:
 मुक्त कविता स्पर्धेसाठी :
आक्टोपस :::
केवळ सत्तेसाठी
आमिषे भूलवित
स्वप्नांना झुलवित
अजस्त्र आक्टोपस
गिळत चाललाय
हळुहळू सारेच
सर्व दिशांनी वेढा
घेत काह्यात पूर्ण
करीत नामशेष
आपले विरोधक
सत्तेच्या लालसेने
पिसाटलेला हिंस्र
उपाय थकलेले
गलितगात्र देह
शरणागत पात्र
निव्वळ कारस्थाने
नामोहरमा बुद्धी
खेळी भलती धूर्त
सावध ऐका हाका
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 10:39 AM] ‪+91 96379 91478‬:
मुखवटा माझा

बोलतो जैसा मी
आचरणे तैसा
न कधी आणतो
जगा फसवितो

दाखवितो मी जो
चेहरा जगाला
मुखवटा माझा
रोज सांभाळतो

वाचे निंदा सदा
करतो सज्जनांची
आळवितो गाणी
मुखे दुर्जनांची

उभा जन्म माझा
स्वार्थातच गेला
अंती मृत्यू मात्र
हेलावुन गेला .

© स्मिता देशपांडे ....
       अ.नं .22
साहित्यसेवा मुक्त कविता स्पर्धे साठी.
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 10:47 AM] ‪+91 86980 67566‬: '
ढोल वाजवीत ये घना'

ढोल वाजवीत येरे घना येरे घना
दाटल्या काळया आभाळी
वीज ओढते उभ्या आडव्या रेघा
व्याकुळ जीवा बघुनी फुटू दे रे पान्हा....ढोल..

लई तापली भुई झाली लाही लाही
विसाउनी झाडावर पाखरं वर पाही
चार थेंबाच्या आशेनं रोजचा दिस जाई
हिरमोड नको करु फेड तू दैना....ढोल..

सुकली पानं तशी रानं नि मनं
घोटभर पाण्यासाठी रोनोमाळ वनवन
आटली नदी उदास वाटते
धो धो बरसुनी भिजू दे परगणा......ढोल...

सुकल्या ओठांवर सुकली गाणी
कोरड घशाला डोळयात पाणी
अकांत भुईचा भिडू दे तुला
हिरव्या साजात मला नटू देना.....ढोल...

                          श्री.हणमंत पडवळ
             मु.पो.उपळे(मा.)ता.व जि.उस्मानाबाद.
              मो.  8698067566.
(मुक्त कविता स्पर्धेसाठी.)
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 11:08 AM] ‪+91 73877 37148‬:
📝मुक्त कविता स्पर्धेसाठी📝
     

   ❤अर्थ प्रेमाचा❤
आज पाहीले जेव्हा
तिला,
 खुप वेदना झाल्या मनाला,,
मि  एवढे प्रेम केले
जिला ,
आज ति पाहत सुद्धा नाही मला,,
का ति समजत नाही
मला,
का दूखवते ति माझ्या
मनाला,,

वेड लागलय प्रेमाच
प्रत्येकाला,
अम्रृत समजतात ते
प्रेमाला,,
पण? ? जेव्हा ठेच लागते ना मनाला ,
जहर म्हनतात मग तेच त्याला,
 अरे नका आपल रूद्य
देऊ कोनाला,,
नका नरकात घालू
स्वत:ला ,
काय असते प्रेम हे विचारा मला,,
अर्थ स्पष्ठ करून सांगेल
मि तुम्हाला,
ऐकनार माझ तर वाचवाल स्वत:ला,,

प्रेम हे लाभलय
सर्वांला,
पण
निभवता येत नाही प्रत्येकाला,,
निभवता आले
ज्याला,
खरा प्रेमी म्हनावे लागेल त्याला,,

जेव्हा कळेल हे प्रत्येकाला,,
नविन मार्ग मिळेल या दू:खी जिवनाला,,

📝📝📝📝📝📝
विशाल मोरे
७३८७७३७१४८
@५२
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 11:29 AM] ‪+91 95529 80089‬:
 दान
पत्ता द्या जरा चुकलेल्या सुखांना
तळ आधीच दुःखांनी मांडला आहे ।
जीवदान द्या कोमेजल्या पिकांना
वरुण धरणीवर रुसला आहे ।
उजेड द्या अंधारल्या झोपड्यांना
पुनवेचा चांद ढगाआड लपला आहे ।
वाट द्या नयनांतल्या अश्रुंना
कंठ नरेंद्राचा आज दाटला आहे ।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 11:31 AM] ‪+91 98603 14260‬:
 गृहिणीचा वावर असतो घरात
दिवसभर ती संसारासाठी कष्ट करते
परि तिच्या कष्टांना मोल नसते सारा वेळ घरातच अशी सर्वांची भावना असते

धुणीभांडी फरशीला बाई असते
दिवसभर ही काय करत असते?
 प्रश्न असतो सर्वांच्या मनात
परि कष्टाला तिच्या मोल नसते

आलागेल्यांची उस्तवार करत असते
विन्मुख कुणाला पाठवत नसते
दमणूक होते तरी हसातमुख असते
परि कष्टाला तिच्या मोल नसते

मुलगी,सून ,पत्नी, आई
 सासूची भूमिका निभावत असते
नातवंडाची जबाबदारी घेत असते
हवंनको सारं पहात असते
परि कष्टाला तिच्या मोल नसते

गृहित तिला धरले जाते
"गृहिणी "पदवीधारक ठरते
सारे घर आवरुन ठेवते
 परि कष्टाला तिच्या किंमत नसते

दुखले खुपले सर्वांचे करते
नातीगोती जापत असते
घराला घरपण तिच्यामुळेच असते
परि कष्टाला तिच्या किंमत नसते

घरात असताना कुणालाही
 तिची किंमत कळत नाही
घरापासून दूर जाताच तिची
किंमत सर्वांना कळत असते
 प्राची देशपांडे
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 11:34 AM] ‪+91 98905 67468‬:
 मुक्त कविता स्पर्धेसाठी :
आक्टोपस :::
केवळ सत्तेसाठी
आमिषे भूलवित
स्वप्नांना झुलवित
अजस्त्र आक्टोपस
गिळत चाललाय
हळुहळू सारेच
सर्व दिशांनी वेढा
घेत काह्यात पूर्ण
करीत नामशेष
आपले विरोधक
सत्तेच्या लालसेने
पिसाटलेला हिंस्र
उपाय थकलेले
गलितगात्र देह
शरणागत पात्र
निव्वळ कारस्थाने
नामोहरमा बुद्धी
खेळी भलती धूर्त
सावध ऐका हाका
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 12:17 PM] Surwase:
📝-----कविता ---- 📋

★★आई ★★

शिसारी लागता
आन - पाणी जाईना
व्याकुळ जीव होई
परी काळजी करी सजना ||१||

उदरात उमलते कळी
मारते पाय ठाव घेत
गरा गरा फिरुनिया
आनंद देई स्वर्गवत ||२||

घडावे शिवबा,लहू, फुले ,शाहू
वाचतसे पुस्तक गर्भसंस्कार
रमाई,अहिल्या,सावित्री,जिजाऊ
ऐसे उदरी जन्मावे रत्न वीर ||३||

नऊ महीने नऊ दिवस
कठीण यातना, हाल सोसवत
गर्भवतीस विचारावे चार
पावले चालण्याची किंमत ||४||

सृजनशील स्त्री जन्मा जीवनी
उतराई वाटे तव बनून आई
बाळाचा टै टै टाहो पडतो कानी
धन्य धन्य ती माऊली होई...!!!
|| ५||

✍🏼🖊🖋🎯🖋🖊

श्री. आप्पासाहेब सुरवसे
        लाखणगांवकर
AMKSLWOMIAW
""साहित्य सेवा दर्पण '"
****स्पर्धेसाठी***
   🌹 AK 47 🌹
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 1:40 PM] ‪+91 99234 45306‬:
 मुक्त कविता स्पर्धेसाठी


।।माझी माय।।
पहाटेच्या पा-यामंदी
जवा झाकाळ असते
अंगणात माझी माय
सडासारवण करीते
सारं गाव झोपीत असते
माय गुरांना चारा चारते
सडाशेणाचं सारवण
भिंती पोतिरा ओढीते
दारी रांगोळी काढीते
देवाचा देव्हारा पुजीते
दोन्हीसांज माझी माय
तवा भाकर थापीते
तिच्या तव्यावर जणू
आकाशीचा चांद हासे
दिसभराची थकुन
माय रानातुन येते
चिमुकली कुशीत घेऊन
सुख स्वर्गीचे भोगीते
            .....संगीता भांडवले(१६)
      मु.अ.प्रा.शा.शेंडी ता.वाशी
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 1:42 PM] ‪+91 96896 75050‬:
 साहित्य सेवा मुक्त कविता स्पर्धेसाठी...

‘पाणी वाचवा'

थेंब थेंब पाण्यासाठी,
माऊलीचा आटापिटा।।
भरेना कधी माठ-रांजण,
किती घालूनीयाही खेटा।।

थेंब थेंब पाण्यात कसं,
महत्त्व जीवनाचं दडलयं।।
केल्याने छळ निसर्गाचा,
दर्शन दुष्काळाचं घडलयं।।

घोटभर पाण्याच्या शोधातं,
मायमाऊली फिरे अनवाणी।।
ओळखूनी भविष्यातला धोका,
थेंब थेंब वाचवा रे पाणी।।

थेंब अन् थेंब पाण्याचा,
आता जमिनीत जिरवा।।
पाळाल हा मंत्र तरचं,
राहील जीवनात गारवा।।

✒अनिल लांडगे उंडणगाव,@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050/9021261820
©copy right
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 2:17 PM] Kunda pitre:
साहित्य दर्पण
🍁🍁🍁🍁
मुक्त कविता --- स्पर्धा
✍✍✍✍✍✍
प्रेषक ---- कुंदा पित्रे (46)
=================
==अश्रू==

फक्त दोन अश्रू
  झपाटलेला पाऊस--
छप्पर कललेल्या डबक्यात
डोईवर फाटक्या पदरात
काड्या झालेल्या हातापायात
तपेल्या,कथेल्या छपरांच्या
                         आधारात!
भिजलेला रूपया थरथरणारा हात
                 चटणी मिठाच्या वाटेत
पण अमलींच्या अधिकारात
        असतात फक्त दोन अश्रू!
थरारलेला पाऊस--
बादशाही फरशी, कंच रूजाम्यात
मऊ आयाती वरत्र प्रावरणात
साकळलेल्या दुधा फळांच्या देहात
सजवलेल्या फुलदाण्यात
        जमलेल्या परदेशी संस्कृतित
निळ्या नोटा--
        चायनिज धाब्याच्या शोधात
माणुसपण हरशलेल्या घरकुलात
       असतात फक्त दोन अश्रू!
ढगाळलेला पाऊस---
अनेक चौकोनी कुटुंबात
    ओल्या पानातून
    थिबकणारा थेंब साचतो
   कुंद सांद्रावली हवा साचते
आर्जवी संगीत,
         जमलेली मैफल भावते
निर्लोभी मन ,
           व्याकुळत भिरभिरते
पण, पण पाकोळी प्रेमाचे--
               क्षण नाही गवसत
असतात फक्त दोन अश्रू !
सांगाल कां कुणी ---
            या दोन अश्रूंचा अर्थ ?
       न दिसणा-या अश्रूंचा अर्थ?
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 2:17 PM] ‪+91 94035 93764‬:
 मुक्त कविता स्पर्धेसाठी
🙏  पंढरी🙏
बाई पंढरी पंढरी कोण्या गवंड्यान बांधली
बाई रुख्मिणमाता डाव्या भुजाला मांडली।।
बाई पंढरी पंढरी घोकू नाही वेड्यावाणी चंद्रभागा तुझ पाणी धावा घेत घोड्यावाणी।।
भरली गं च्ंद्रभागा कुणीकड जाती बघा
सा़वळा गं माझा हरि पुलावर उभा।।
बाई पंढरी पंढरी दुरुन दिस काळी निळी ।।
विठ्ठलाच्या माडीवर जनाबाई बुक्का दळी।।
🌺खेडकर सुभद्रा बीड (२०) मो९४०३५९३७६४
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 2:40 PM] ‪+91 94036 17701‬:
साहित्य दर्पण
             🍁🍁🍁🍁

        मुक्त कविता --- पाऊस
          ✍✍✍✍✍✍

    ====================



शब्दात भिजलेला पाउस होता
पावसात भिजलेले दोघे आपण

आणि मनातला ओलावा आजुनही सांगतोय
गेल्या वर्षीच्या पावसाची खूण


भिजलेली पायवाट, भिजलेले ऊन
नव्यानेच पुन्हा फुलत होतो दोघेही, प्रत्येक सर अंगावर घेउन

आता पुन्हा वेध लगाल्येत, त्या ओल्या कस्तुरिचे
नकळत मिठीत घेणार्या, धूर्त शहाण्या पावसाचे



*प्रविण सानप*
*धुळे*
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 2:55 PM] ‪+91 97636 67401‬:
 मुक्त कविता स्पर्धेसाठी

शेतकरी दादा

माझा शेतकरी दादा
लावी मातीचे उटणे
येता सर्वांगाला घाम
आंघोळीने ते नटणे

पिक शेतात लावून
त्याला जिवापाड जपणे
येता पिकाला बहर
लहर सुखसमृद्धिला येणे

ज्वारी बाजरी गहू
आज्जी आजोबा पाहू
ऊस आणि मका
जिवाभावाचा सखा

बटाटा टमाटा काकडी
बहिण धिराची वाकडी
डाळिंब द्राक्षे मैतर प्यारे
परदेशी म्हणती चला रे...

हरभरा चवळी वाल
रांगणार्या लेकरांची
तिरकी चाल
वाटाणा सोयाबीन
जुळी लेकरं गुणवानं

सार्या शिवारी जमले
सोयरे धायरे...
देति जिवाला जीव
मैतर माझे प्यारे

आला अवकाळी पाऊस
केली त्याने नासधूस
झाली गारपीट, उडे त्रेधातिरपीट..
माझं हिरवं शिवार
झालं काळठिक्कर

आसवांचे वाहिले पाट
मन केलं आता घट्ट
करू परत पेरणी
मनं होतील तरणी
सारी देवाची करणी
तोच देईल आधार
नको होउस बेजार



© सौ. शशिकला बनकर, भोसरी
@35
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 3:03 PM] ‪+91 99214 24125‬:
 🌴 आठवण🌴

आठवण तुझी येता*
मन तुझ्यात शिरते
शब्द ह्रदयी दाटते
जिव अलगद कापते**

आठवण तुझी येता*
वाट कालोखी वाटते
नाद मंदीरी घुमते
साथ तुझी ते सांगते**

आठवण तुझी येता*
आसवान्ना जाग येते
न ओंजल अश्रुंची वाहते
सात फेरे ते स्मरते**

आठवण तुझी येता*
सुर पाव्यात विरते
द्रीश्स्ट कु ण।ची लागते
गाठ जन्माची तूटते***

आठवण तुझी येता*
सांज वेली ती भासते
दिशा कुंपणी शोधते
तुझ्याविना मी जगते**

 वृषाली वानखडे*
    अमरावती.
  🙏🏻 स्पर्धेसाठी🙏🏻

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 3:19 PM] ‪+91 98702 51951‬:
मुक्त कविता स्पर्धा
        '-___अनुराग -__

 तू झटकन् जातेस रागावून निघून!
पुन्हा कध्धी येणार नाही,निक्षून सांगून!
उरतो मी एकटाच,घेतो माझ्यामध्ये गुरफटून!
तू हसत नाहीस का बोलत नाहीस,
माझ्याकडे तर पहातच नाहीस,
कारण रागाचा तवंग अजून
      डोळ्यात असतो,
आकाशातला फुगा,खाली यायला
      तयार नसतो!
पण मला माहीत असते,
तुझ्या नजरेचे पक्षी,माझ्याभोवती
     फिरत असतात!
त्यांची होणारी फडफड,
श्वास निश्वासांची धडपड,
बघून मला कीव येते,
तुझी सारी तडफड!
कुठेतरी वाटत असते,
हे सारे संपून जावे!
पण कुणाचा राग काढणे,
मला कधीच जमत नसते;
दिवस असाच जाणार?
   शंकेची काजळी धरते!!
पण,ध्यानीमनी नसता अचानक,
तुझ्या शब्दांची बरसात होते!
"बोलायच नाही का?"
ओठातील माघार थरारून जाते,
राग वितळलेल्या डोळ्यात तुझ्या
         पाणी येते,
त्यात माझ्या एकटेपणाची
आग केंव्हाच विझून जाते!
आग केंव्हाच विझून जाते!!!

स्वाती केळकर, दादर मुंबई २८
*************************
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 3:40 PM] ‪+91 84220 89666‬:
 झोपडीचचयाया नभातून टपटपतो पाऊस
घेतो गाडी मडकी त्यात झेलतो पाऊस

माय वलीचिब माझी शिवारातून परते
तेच धडुते पिळून  लाज अंगाची झाकते

भिजलेला काडीफाटा शिलगता शिलगेना
ऊब घरटयास नाही आग लाकडा लागेना

फुकणीनं फुकताना धूर भरला घरात
 तवा रानीचा पाऊस दिसे मायेच्या  डोयात

एक वला  एक कच्चा घास जाई घशाखाली
वला मायेचा पदर माझी वाकय झालेली

दामिनिचया उजीडात रात   डोयात काढली
झुंजू मुंजू  होताहोता धार पाण्याची  वाढली

सकाळीच उठताना पाहीन चकमक गाव
पाण्यावर  डगमगे माझ्या  झोपडीची नाव

दूर राहीला किनारा गाव राहीलारे दूर
पाण्यामधी मिसळला  माझ्या  आसवांचा पूर


सुनंदा  पाटील
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 3:49 PM] ‪+91 94228 84140‬:
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
  🌹 *मुक्त* *कविता* *स्पर्धेसाठी*🌹

             *पाऊलखुणा*
========================

वाटतात ओळखीच्या,
वाटेवरील ह्या पाऊलखुणा
हसत बागडत असतांना
पडतांना तर कधी
सावरतांना च्या ह्या आठवणी जुन्या,
लडिवाळ त्या हट्टीपणाला
आवरतां ना च्या खुणा,
कधी हसणे तर कधी रडणे
कधी तर नुसतेच रुदनाचे स्वर,
तरी चरचर काळीज तुमचे
फटतांनाचा तो आवाज जुना,
कधी सरले दिस ते आणिक
कधी उमटल्या उभरणीच्या खुणा,
बघता -बघता  कधी परके झाले  ?
आपले सर्व दूर झाले
घरटे मजसाठी दुसरे शोधू लागले ,
का मला म्हणती परकीआता  ?
   भिजविलेले कुंकू लाल त्यात,
  उमटवित गेली मी  माझ्या
पावलांच्या खुणा,
भावले जरी सर्व मनास तुमच्या
मज , आपले पणाचा सूर
गावेना ,
कोण आपले ?आणी कोण परके ?
शब्दां चा ह्या अर्थ कळेना,
या सर्व चालिरितिं मध्ये
अस्तित्व माझे मला मिळेना,
   एक दिवस तो हि आला ---
संपून बाह्य शृंगार गेला
 अस्तित्व माझे संपवून गेला,
 अनंत यातना मज मनी झाल्या,
कुठे सरल्या त्या पाऊल खुणा---
ज्या मला पोरके करुन गेल्या
  ना होते मी लाडकी कुणाची ना होता आता
 सांभाळनारा  कोणी धुरा
  का मला स्वत:चे अस्तित्व नसते?
  जो हि आला तो फक्त हक्क बोलून गेला------
   हक्क बोलून गेला.

=========================
सौ● *मंजुषा* *देशमुख* @४०

         *अमरावती*

        ९४२२८८४१४०
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 4:05 PM] ‪+91 99234 93375‬:
कविता स्पर्धसाठी
****************
दुष्काळ
*******
जेव्हा दुष्काळ पडतो
तेव्हा भेगा जमिनीला पडतात
व कळजाला पडतात
तरी मानवा एक तरी झाड लाव!
विहीरीचे पाणी तळ घाठले
अश्रु कोरडे वाहू लागले
प्राणी पक्षी फिरू लागले
मानवा एक तरी झाड लाव!

डोईवर सुर्य ओकतो
रान पाखरे मुके होतात
गावो गावी खडोपाडी
पाण्यासाठी शुकशुकाट
मानवा एक तरी झाड लाव!

गायी गोठे सपाट झाल्या
कत्तलखाने रंगून गेले
दुभत्या म्हशी मोकाट झाल्या
तर कुणाच्या गळ्यात फाशी
मानवा एक तरी झाड लाव!
   मानवा एक तरी झाड लाव!
***********************
मिरा खेडकर (6)  9923493375
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 4:13 PM] ‪+91 94035 93764‬:
मुक्त कविता स्पर्धेसाठी
🙏  सुख   🙏
सुखातच सर्व काही असत
दुखातही खुप काही असत
फक्त ते समजून घ्यायच असत
दुखात मला खुप काही समजल
सुखात सगळे एकत्र येतात
दुखात मात्र एकट्याला सोडतात
स्वतची जाणीव होते दुखात
कोण आपल असत आणि
कोन आपल नसत यासाठी
दुखाला जवळुन पहाव लागत
माझ्या जीवनातसुखही आली
आणी दुखही आली
तरीपण सुखापेक्षादु खाची
संख्या जास्त होती        
मग मी दुखालाहीआपलस केल
मग सुखही हळुहळु येऊ लागली
मला कळुन चुकल होत
दुखाला सामोर गेल्याशिवाय
सुख येत नसत
दुखातही खुप काही असत
फक्त ते जाणुन घ्ययच असत
फक्त ते जाणुन घ्ययच असत🙏🙏🙏🙏
खेडकर सुभद्रा बीड (२०)मो९४०३५९३७६४
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 4:22 PM] ‪+91 75885 12467‬:
साहित्यसेवा काव्यस्पर्धाकरिता-

📝माझी कविता✍🏻

🌧🌳 दैना 🌳🌧

वाट तुझी पाहताना
जिंदगी उधार झाली
पर तुला मात्र दया
कधीच नाही आली.

डोळ्यातल्या पाण्यानेही
केला आता दुरावा..
संसाराच्या बाजारात
जीव माझा साडंला.

भेगाळल्या भुईपरी
नशीबाच्या फाटल्या रेषा
उन्हाच्या या काहिलीने
मनात जाळ पेटला.

साऱ्या जिंदगीचा मी
असा आक्रोश केला,
पर तुझ्या डोळ्यात
पाण्याचा थेंब नाही आला.

वाट तुझी पाहताना,
आता जीव जाईल रे.
तू नकोच बरसू आता
अश्रुने भिजविल रान रे.

हाल माझे पाहून देवा
येईल का थोडी दया
जगण्याची झाली दैना
मरण तू देईना.

✍🏻संदीप ढाकणे🎭
📱7588512467
जि.प.प्रा.शा.लिंगदरी
औरंगाबाद.
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 4:32 PM] 25 भालसिंग संगिता:
साहित्य दर्पण

काव्य स्पर्धा

🌷🌷🌷🌷🌷🌷

मोकाट कुत्रे
*********************
भुकेलेले मोकाट कुत्रे
रस्त्यारस्त्यात दिसतात ...
संधी मिळताच दिन-रात्री
तनामनाचे लचके तोड़तात ...

कितीही जपून गेले तरी
कधी कधी अनर्थ घडतात
अशा परिस्थितीत आधी
अबलेलाच दोषी धरतात ...

वेळ आली आता,शेवटी
भटकी कुत्री मारायची ...
घट्ट शृंखला तोडून-मोडून
अबलेला सबला करायची ...

********************
प्रा. सौ.संगिता भालसिंग (25)
अहमदनगर
21में2016
spsfun.com
स्पर्धेत सहभागी रचना
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 4:36 PM] ‪+91 84220 89666‬:
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
मुक्त  काव्य  स्पर्धेसाठी

झोपडीतला पाऊस

झोपडीच्या नभातून, टपटपतो पाऊस
घेतो गाडगी मडकी, त्यात झेलतो पाऊस

माय वलीचिंब माझी, शिवारातून परते
तेच धडुते पिळून,  लाज अंगाची झाकते

भिजलेला काडीफाटा, शिलगता शिलगेना
ऊब घरट्यास नाही, आग लाकडा लागेना

फुकनीनं फुकताना, धूर भरला घरात
तवा रानीचा पाऊस दिसे मायेच्या डोळ्यांत

एक वला एक कच्चा, घास जाई घशाखाली
वला मायेचा  पदर, माझी वाकळ झालेली

दामिनीच्या उजिडात, रात डोळ्यात  काढली
झुंजूमुंजू  होताहोता , धार पाण्याची वाढली

सकाळीच उठताना,  पाही टकमक गाव
पाण्यावर डगमगे, माझ्या  झोपडीची नाव

दूर राहिला किनारा,  गाव राहिला तो दूर
पाण्यामधे मिसळला, माझ्या  आसवांचा पूर !!
__________
सुनंदा पाटील
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 5:46 PM] ‪+91 94237 15865‬: 🕯🕯🕯
दिप🕯🕯🕯

अंतरीचा दिप मालवू नको रे
गीत  विरहाचे ऐकवू नको रे
चाहुल तुझ्या  पाऊलांची
वेड लावी जीवाला
अजुन तिष्ठत उभी
धीर देई मनाला
डाव असा असा अर्ध्यावरी
          मोडू नको रे------
अंतरीचा दिप मालवू नको रे
भाबडी मी मनाची
आहेच स्वप्न वेडी
पंख लावुनी झेप घ्यावी
तुझ्या सवे विहरावे
स्वप्नांची माला अशी तोडू नको रे
अंतरीचा दिप मालवू नको रे
नको चिंता या वेडीची
रात्र आहे सोबतीला
काजव्यांचा नाद रिझवी
माझ्या वेड्या मनाला
अशा कातर वेळी सावलीला
दुर लोटू नको रे-------
अंतरिचा दिप मालवू नको रे
देश रक्षणाचे कर्तव्य
आहे भावनेहुनी थोर
परी रात्रंदिवस मनी घोर
गनिमास सोडू नको स्वैर
तराणे एकले पणाचे छेडू
नको रे------------
अंतरीचा दिप मालवू नको रे

***********************
मुक्तकविता स्पर्धेसाठी
सौ. मीना सानप  बीड@7
मो.नं.--9423715865
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 5:50 PM] ‪+91 99214 24125‬:
🌴 *आठवण*🌴

======================
   *कविता* *स्पर्धेसाठी*

======================

आठवण तुझी येता*
मन तुझ्यात शिरते
शब्द ह्रदयी दाटते
जिव अलगद कापते**

आठवण तुझी येता*
वाट काळोखी वाटते
नाद मंदीरी घुमते
साथ तुझी ते सांगते**

आठवण तुझी येता*
आसवांना जाग येते
न ओंजळ अश्रुंची वाहते
सात फेरे ते स्मरते**

आठवण तुझी येता*
सुर पाव्यात विरते
दृष्ट कुणा ची लागते
गाठ जन्माची तूटते***

आठवण तुझी येता*
सांज वेळी ती भासते
दिशा कुंपणी शोधते
तुझ्याविना मी जगते**

 वृषाली वानखडे* ७५
    अमरावती.
  🙏🏻 स्पर्धेसाठी🙏🏻

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 6:44 PM] ‪+91 99219 67040‬:
🌹मुक्त कविता 🌹
       ★स्पर्धेसाठी★

         *अंकुर*
==================
बीज कुशीत रुजलं
आनंद फार झाला
"तो" का "ती" असेल
जीव  चिंतातुर झाला

घर आनंदून गेलं
करती सारे नवस सायंस
घेती सारे काळजी तिची
"तो"ची साऱ्यास हवसं


गर्भापासूनच विरोध
ना कळे मज अजुन
"मुलगी" नको- नको
मात्र बायको हवी सजून धजुन

एक दिवस असा
स्त्री प्रधान संस्कृतीचा येईल
अन् मग तेंव्हाच
नर भ्रूण हत्या होइलच...!!!!!
******************* ***

सौ. कल्पना जगदाळे-घिगे
           बीड
             @8★
==================
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 6:48 PM] Nirmala soni:
स्पर्धेसाठी...

तू जर आयुष्यात आलीच नसतीस तर...

श्रावण हा बेधुंद होवून बरसला नसता,
गंध फुलांचा चहूकडे दरवळला नसता,
ओढ चंद्राची कुठे मनास राहिली असती,
सागर ही प्रेमवेडा होवून खळाळला नसता...

तू जर आयुष्यात आलीच नसती  तर....

ग्रीष्मांत कधीच वसंत मोहरला नसता,
रेशमी केसात हा मोगरा बहरला नसता,
दुनिया सुरेख स्वप्नांनी सजली नसती,
मग प्रेमात कुणी कधी जिंकला नसता..

 तू जर आयुष्यात आलीच नसती
तर...

निर्मला सोनी.
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 7:01 PM] 234 Nilesh aalande:
सांग ना रे का...??

का रे असं कोण
जवळ येत ईतक्या
स्वत:लाही नसते
परवानगी खोलवर जीतक्या...

का रे असं कोण
होऊ देत नाही परक
एकटे असताना आपण
आठवुन देत सारख...

का रे असं कोण
सोडुन जात हात
विसरुन जातो कसा
जन्मोजन्माची साथ...

का रे असं कोण
विनाकारण सोबतीला येत
कारण नसताना मग
नकळत सोडुन जात...

का रे अस कोण
मनात घरट करत
गरज खरी ज्यावेळी
त्याचवेळी परक करतं..

निलेश सु.
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 7:03 PM] 223 Nilesh kawde:
 स्पर्धेसाठी

माय. . .
दिली सूर्यानं जांभई
त्यानं झाकट पडली. . .
माय घराच्या वाटेनं
वावरातून निंगाली. . .

तिनं कावड खोललं
घरी अंधार दिसला. . .
सांजवेळी देव-यात
एक दिवा पेटविला. . .

टेंबा मातीच्या तेलाचा
सपरीतल्या दारात. . .
माय लावून निंगते
घाई घाई रंदानात. . .

प-हाटीच्या दोन चार
काड्या चुलीले चारते. . .
पोटापुरता चुलीत
तव्हा उबाय पेटते. . .

जव्हा निजते विस्तव
माय मारते फुंकर. . .
जाई धुपट डोयात
तिची भाजते भाकर. . .

दारं खिडक्या सोडून
रंदानातले धुपट. . .
जाई मायच्या डोयात
किती वागते उपट. . .

चांदण्याईची वदर
मस्त बसते पंगत. . .
त्याच उजेडात आमी
खाली बसतो जेवत. . .

तिच्या जुन्या लुगड्याची
घेतो  ओढून वाकय. . .
वाकईच्या उबीमुळे
जाई हिवाळ्याचं भय. . .

माय झाकटी उठून
करे सडा सारवण. . .
विस्तवावानी तापाच्या
तिचं जळते जीवन. . .

काम करता करता
तिची राह्यते न्याहरी. . .
माय वावरात जाते
भूक ठेवुनिया घरी. . .
. . . निलेश कवडे अकोला

======================
★★★★★समाप्त ★★★★★
~~~~~~~~~~~~~~~~~~


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


* जीवघेणा प्रवास *

आजकाल प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. प्रवासाला निघलेला व्यक्ती सुखरूप घरी परत आल्यावर घरातले सर्व सदस्याचे जीव भांड्यात पडल्यासारखे होते. हायवे चे रस्ते तर जणू अपघाताचे माहेरघरच बनले आहेत. दररोज किती तरी अपघात होतात आणि कित्येक लोकांचे जीव जातात याची काही गिनती नसते. इकडे छोट्या रस्त्यावर सुध्दा अपघात घडतात पण त्यांची संख्या फारच कमी असते. हे एका दृष्टीकोनातून चांगली बाब आहे. वास्तविक पाहता अपघात घडण्यासाठी फार छोटी घटना कारणीभूत असते आणि क्षणाचा फरक असतो. काही क्षणात म्हणजे आपल्या मेंदूला कळायच्या आत अपघात घडत असतो.  अपघात घडून गेल्यानंतर असे केल्यामुळे तसे झाले माझी काही चूक नव्हती समोरचाच मला येऊन धडकला असे स्पष्टीकरण सुध्दा ऐकायला मिळते. असे काही बोललेले ऐकायला मिळते. मात्र अपघातामुळे झालेली हानी कधीच भरून निघत नाही हे विसरून चालणार नाही.
त्यामुळे प्रवासाला जाताना काही गोष्टीची काळजी आपण स्वतः घ्यावी ज्यामुळे अपघात घडण्याची संख्या कमी होईल आणि आपल्यासह इतरांचे प्राण सुध्दा सुखरूप राहतील.
सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपण आपल्या खाजगी वाहनाने प्रवास करण्यापेक्षा सार्वजनिक वाहनांचा वापर करावा उदा. रेल्वे आणि बस. या वाहनांतून केलेला प्रवास सुरक्षित आणि सुखदायक असतो. हे प्रथमतः जाणून घ्यावे. बहुतांश जण आपली स्टेटस आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी सार्वजनिक वाहने शक्यतो टाळतात. प्रवासात आपल्या जवळ असलेल्या सामानाची उचल आणि ठेव त्रासदायक असते म्हणून काही लोकं खाजगी वाहनांचा वापर करताना दिसून येतात. तर काही लोकं आपला प्रवास लवकर व्हावा म्हणून खाजगी वाहनांच्या मागे धावतात. मात्र या आपल्या घाईमुळे काय नुकसान होते याची जराशी देखील कल्पना आपण करीत नाही. त्यामूळे असे जीवघेणे अपघात घडलेले दिसून येतात.
बस किंवा रेल्वे या वाहनांतून प्रवास करतांना आपण किती विश्वासाने प्रवेश करतो तेवढा विश्वास अन्यत्र पहायला मिळत नाही. या वाहनांचे सुध्दा अपघात घडतात पण त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असते. हे वाहन चालक जबाबदारीपूर्वक वाहन चालवितात. त्यांच्याजवळ ती क्षमता असल्याचा पुरावा म्हणजे परवाना असतो. त्याशिवाय त्यांना वाहन चालविण्यासाठी दिले जात नाही. याउलट चित्र खाजगी वाहनांत प्रवास करतांना आढळून येते. वास्तविक पाहता वाहन चालविण्याऱ्याच्या हातात वाहनांत बसलेल्या सर्व प्रवाशांचे जीव असतात या गोष्टीची जाणिव प्रथमतः त्या वाहन चालकास असली पाहिजे. याच गोष्टीची कमतरता खाजगी वाहनांतून प्रवास करतांना आढळून येते आणि वाहनाच्या वेगावर कसल्याही प्रकारचे नियंत्रण न ठेवता वाहन चालवितात आणि इतरांच्या जिवांसाठी यमदूत बनतात.
नुकतेच तेलंगण राज्यात म्हैसा या गावाजवळ झालेल्या ऑटो आणि टिप्परच्या धडकेत 13 जण जागीच ठार झालेत. या अपघातात एकाच कुटूंबातील 9 जण ठार झाले. संपूर्ण कुटुंब या अपघातात संपले. या अपघातात चूक कोणाची होती ? हे तपासणी अंती समोर येईलच परंतु अपघातात गेलेले ते जीव परत येणार आहेत का ? त्या घराला लागलेले कायमचे कुलुप उघडल्या जाणार काय ? हा अपघात रात्रीच्या वेळी घडला. आजपर्यंतच्या अपघाताचा अभ्यास केल्यास ही बाब प्रकर्षाने समोर येते की, रात्री दहाच्या नंतर अपघातास सु्रुवात होते आणि पहाटेच्या वेळी संपतात. म्हणून शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा. वाहनचालक पूर्ण ओळखीचा असेल तरच त्या वाहनांतून प्रवास करावा किंवा ओळखीच्या वाहन चालकाचा शोध घेऊन प्रवास करावा. सलगपणे प्रवास न करता दर दोन तीन तासाला थोडा वेळ चहा पाणी किंवा विश्रांती साठी थांबावे. त्यामूळे चालकाच्या डोळ्यांवरचा ताण कमी होतो. डोळ्यावर ताण येईपर्यंत वाहन चालविणे हे अत्यंत धोक्याचे असते. त्यामुळे वाहन चालकास विश्रांतीची अत्यंत गरज असते याची जाणिव आपणाला असली पाहिजे. बहुतांश वेळा प्रवाशांच्या घाईमुळे अपघात होत असतात कारण त्यांना घाई असते आणि त्या घाईत ते वाहन चालकास कुठेही विश्रांती देत नाहीत. मग त्याचे रुपांतर एका मोठ्या अपघातात होते. लग्नाचा विधी किंवा इतर कार्यक्रमासाठी ट्रक, टेंपो किंवा ऑटोमध्ये लोकं दाटीवाटीने बसतात. आपल्या जिवाची पर्वा न करता उन्हातान्हात प्रवास करतात. हे ही धोक्याचे नव्हे काय ? घराबाहेर पडल्यानंतर बऱ्याच बारीकसारीक गोष्टी लक्षात ठेवून वागणे आपल्यासाठी खूपच हितकारक असतात. म्हणूनच शेवटी एवढेच सांगावे वाटते, की जीवन अनमोल आहे, आपल्या कुटुंबाला आपली खरी गरज आहे, याबाबीचा विचार करून जीवघेणा प्रवास करण्याचे टाळावे.
© नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद

Friday 20 May 2016

Comman sense

कॉमन सेन्स . . . . ?

मित्राचे वडील आजारी असल्यामुळे दवाखान्यात जाण्याचा योग आला. तसे दवाखान्यात जायचे म्हटले की अंगावर काटा उभा राहतो. आजच्या  वैद्यकीय बाबींवर होणारा खर्च बघून डोळे गरागरा फिरण्याची वेळ येते तर आजारातुन सावरलेला व्यक्ती दवाखान्याचे बिल पाहून पून्हा त्याच दवाखान्यात भरती होतो की काय अशी भीती वाटते. असो दवाखान्यात आम्ही मित्रांच्या वडिलांची भेट घेतली. त्यांच्याशी गप्पा मारल्या ते ही फारच हळू आवाजात कारण तिथे हळू बोला अशी पाटी दिसत होती आणि आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. ज्याठिकाणी आजारी लोकांची नोंदणी होते त्याठिकाणी बसलेला मुलगा आणि त्याचे वागणे पाहून खूपच राग आला. कारण त्याच्या डोक्यावर भिंती ला मोबाईलवर बोलु नका असा संदेश असणारी पाटी झळकत होती आणि हा आपल्या मोबाईलवर मोठमोठ्याने हसत, हातवारे करीत कुणाशी तरी बोलत होता. दवाखान्यात संपूर्ण शांतता होती आणि त्याच्या आवाजाने शांततेचा भंग होत होता. पण सांगावे कोणाला. त्याच ठिकाणी रुग्णाला भेटण्यासाठी येणारे व्यक्ती असे बोलले असते तर ही मंडळी लगेचच हटकले असते. असा विचार करीतच दवाखान्याच्या बाहेर पडलो. असे का घडले असेल ? तर त्या मुलाला कॉमन सेन्स नावाची वस्तू त्याच्याजवळ नव्हती म्हणून तसा तो विक्षिप्त वागत होता. असे मनाची समजूत घातली.
कॉमन सेन्स म्हणजे काय ? जी व्यक्ती वेळ, काळ, परिस्थिती नुसार स्वतःचे वर्तन ठेवते तिला कॉमनसेन्स आहे असे म्हणतात तर जे याविरूध्द राहतात किंवा वागतात त्यांना नॉनसेन्स म्हणतात. तारक मेहता का उल्टा चष्मा या विनोदी मालिकेत जेठालाल गडा त्याची पत्नी दया हिला वारंवार नॉनसेन्स म्हणत असतो कारण बहुतांश वेळा तिचे वागणे जेठालाल गडा यांस आवडत नसते त्यामुळे तो तिला तसे म्हणतो. पण ती खरोखरंच नॉनसेन्स नसते उलट तिच्याजवळ कॉमन सेन्स भरपूर असते. असो
जीवनामध्ये सहसा असे घडत राहते, समोरून येणारी व्यक्ती आपणांस आवडत नाही त्यामूळे आपण त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यांच्यात काही तरी कॉमन सेन्सच्या गोष्टीची उणीव असते आणि त्याचा त्रास अर्थातच आपणाला होतो. उदाहरण पहायचे असेल तर एखाद्या व्यक्तीला विनाकारण बोलायची खूपच सवय असते. बोलतांना इतरांचे काही ऐकायचे नाही आणि स्वतःचे बोलणेच सत्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचे
समोरचा व्यक्ती ऐकण्याच्या मूड मध्ये नसेल तरी आपले रडगाणे चालूच ठेवायचे मग अश्या लोकांना कॉमन सेन्स कमी असणारच आणि या लोकाना जाणूनबुझुन लोकं टाळणार नाही तार काय करणार ?
आपण कॉमन सेन्स ठेवून काम करावे म्हणजे नेमकं काय करावे आणि कोणत्या ठिकाणी कसे वागावे याचे भान ठेवले की कोणी आपणांस नॉनसेन्स ( मूर्ख ) म्हणणार नाही.
सहसा खालील बाबतीत आपण कॉमन सेन्स ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
आपण पाहूण्याच्या घरी गेल्यावर अगदी आपल्या घरी वावरल्यासारखे वागू नये. पाहूणचार अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण होतोच नक्की फक्त प्रतीक्षा करावी लागते त्यामूळे थोडं धीर धरावा त्यातच तर शहाणपणा असतो.
आपल्याकडे कार्यक्रम करण्याची सूत्र दिल्यानंतर त्याठिकाणी मनाला वाटेल तसे बडबड करू नये. आपणच जास्त हुशार आहोत या व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींपेक्षा असा विचार आपल्या मनात कधीच येऊ देऊ नये. आपल्या सूत्रसंचलनाने कार्यक्रम उठून दिसावा असे बोलावे. पण सहसा असे ज्याठिकाणी घडत नाही तेथे सरळ ऐकायला मिळते सूत्रधारने सगळा कार्यक्रम पाण्यात टाकला.
रस्त्यांचे जे काही नियम आहेत त्याचे पालन करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या विक्षिप्त वागण्यामुळे इतरांना त्रास होतो आणि योग्य वागल्यास सर्व काही सुलभ आणि योग्य चालते.
प्रवास करताना मी एक भारतीय या नात्याने वागावे.  गाडीत कचरा न करणे, गोंधळ न करणे, आपल्या वागण्याचा इतरांना त्रास होऊ न देणे, सर्वांशी प्रेमाने वागणे या लहान सहान गोष्टी लक्षात ठेवुन वागणे म्हणजेच कॉमन सेन्स होय.
आपणाला साजेल आणि शोभेल असे कपड़े वापरणे. आपण कोणत्या कार्यक्रमात जात आहोत यावरून कपड़े वापरणे महत्वाचे असते
आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले आणि आपले घर अस्वच्छ दिसले तर आलेल्या पाहूण्याना कसे तरी वाटते आणि आपणाला सेन्स नसल्याची जाणिव होते. त्यामूळे घरातील प्रत्येक विभागात साफसफाई आणि स्वच्छता स्पष्ट दिसून आली पाहिजे
आपल्या घरातील tv किंवा इतर संगीत साधनांचा आवाज किती मोठा असावा याबद्दल ही आपणाला जाण असणे आवश्यक आहे असे वाटते. आपल्या घरी एखादा कार्यक्रम असला की आपण रात्रभर मोठ्या आवाजात संगीत, गाणे लावावे का याचा विचार करून वागणाऱ्या लोकांची समाजात मान राहते.
लग्नप्रसंगी खास करून तरुण मंडळी नवरदेवाचे मित्र एवढा वेळ नाचतात की लग्नाची वेळ सारूनी तासभराचा काळ उलटतो तरी ही मुले सैराट होऊन झिंगाट नाचत असतात. त्यास काय म्हणावे ?
विशिष्ट गाणे ऐकण्याचा काही वेळ असतो. सकाळच्या प्रहरी dj चे गाणे लावले तर सर्वच जण आपणाला मुर्खात गिनती करतात. तेच जर भावगीत, भक्तीगीत, श्लोक असे गाणे लावल्यास कोणी काही म्हणणार नाही. त्याचमुळे गाणे निवडताना सुध्दा सेन्सची गरज भासते.
बिरबल हा हजरजबाबी होता, त्याच्याकडे विनोदबुध्दी होती म्हणून तो प्रत्येक संकटावर हसत हसत तोंड देत असे आणि त्याचे उत्तर सुध्दा शोधून काढत असे. संकटाला न घाबरता आपले संतुलन बिघडू न देता जे उत्तरे शोधतात त्यांचे जीवन सफल होते. त्यामूळे नेहमी हसतमुख राहण्याची सवय लागते. असे व्यक्ती प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात आणि सतत दुःखी राहाणाऱ्या माणसाचा सहवास कोणालाही नको वाटते
कोणाच्या अंत्ययात्रेसाठी गेल्यावर अगदी गंभीरपणे रहावे लागते. बहुतेक जण अंत्ययात्रेत लग्नाच्या कार्यक्रमात गप्पा मारल्यासारखे गप्पा मारतात, मोबाईलची रिंग टोन जोरात वाजले जाते, मोबाईलवर जोरजोरात बोलतात अश्या वागण्यामुळे आपले सेन्स इतरांना लगेचच कळते.
शाळेत विद्यार्थ्याना शिकविताना शिक्षकांनी आपले मोबाईलवरचे बोलणे शक्यतो टाळायाला पाहिजे. आपले मोबाईल सायलंट मोडवर ठेवून आपले अध्यापन कार्य संपल्यावर बोलावे हे आहे कॉमन सेन्स. पण सहसा असे चित्र फार कमी बघायला मिळते. आत्तातर स्मार्ट फोन डिजिटल मोबाईल मिशन स्कूल संकल्पनेमुळे शासनाने सरळ वर्गात मोबाईल वापरण्याची परवानगी दिली आहे. त्याचा फायदा मुलांना कितपत होतो तो एक संशोधनाचा भाग राहील. परंतु वर्ग अध्यापनात आपल्या मोबाईलचा त्रास मुलांना होऊ न देणे यांत सेन्स आहे हे लक्षात घ्यावे.
कार्यालयीन वेळेचा वापर कार्यालयासाठी वापरणे
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नये अश्या सूचना असतात त्याचे पालन करणे आपले सर्वाचे कर्तव्य असते आणि ते पालन करावे पण त्याच ठिकाणी आपण वारंवार चुका करतो
वरील गुण नसणाऱ्या व्यक्तीमध्ये समयसूचकता नसते त्यामुळे ते गोंधळून जातात मन एकाग्र करू शकत नाहीत, त्यांच्यात आत्मविश्वास कमी जाणवतो, शिस्तीचा सुध्दा अभाव दिसून येतो.
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद

Monday 16 May 2016

बलमजूरी






* बालमजूरी कशी संपेल ? *

बालपण ही प्रत्येक व्यक्तींच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे. परंतु सर्वांचेच बालपण सुखांत, आनंदात किंवा मजेत जातात असे नाही. संत तुकाराम महाराज यांनी बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा असे म्हटले आहे. पण समाजात वावरताना जे चित्र नजरेस पड़ते ते फारच  भयानक आहे. सकाळी सूर्यकिरण धरतीवर पडत ही नाही की घराबाहेर एक चिरकणारा आवाज कानावर पडतो. त्या आवाजानेच जाग येते म्हटले तरी काही वावगे नाही. " ताई, शिळं काही असेल तर वाढ. " असे ओरडणारे पोरं त्यांचं बालपण काय म्हणत असेल ! आपल्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी हे पोरं दारोदारी भीक मागत फिरतात आणि मिळालेली भीक आपल्या कुटुंबासह वाटून खातात. सूर्य डोक्यावर चढायला लागला की हेच पोरं उकिरडे शोधत फिरतात. मिळेल ती वस्तू आपल्या थैलीमध्ये भरतात आणि सर्व वस्तू नेऊन भंगार वालेल्या विकून मिळेल त्या पैशात काही खरेदी करून खातात. यांना बालमजुरी म्हणावे काय ? हा त्यांच्या पोटाचा प्रश्न असतो ज्याची सोडवणूक स्वतः त्यांनाच करावी लागते. शिक्षण नावाची वस्तू तर त्यांच्यापासून कोसो दूर असते. शाळा म्हणजे काय असते ? या बाबींचे त्या मुलांना सोडा घरातील कोणालाच त्यांची कल्पना नसते आणि शाळेत आपणाला शिकण्याची संधी मिळते याची सुध्दा त्यांना कल्पना नाही हे त्यांना प्रत्यक्षात भेटल्यावर लक्षात येते. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याचे शासनाने ठरविले. त्यानुसार सर्वेक्षण चे आराखडे व वेळापत्रक तयार करण्यात आले. संपूर्ण गाव, वाडी, तांडे, शहरातील गल्ल्या सर्व सर्वेक्षण केल्यावर शाळाबाह्य संख्या म्हणावी तेवढी निघाली. शाळाबाह्य आणि बालकामगार हे एकमेकास पूरक आहेत. जे बालकामगार आहेत ते शाळाबाह्य आहेत. किंवा शाळाबाह्य राहण्यामागे काम करणे ही त्यांची मजबूरी आहे. शाळेत अनुपस्थित राहाणाऱ्या मुलांच्या घरी शिक्षक जेंव्हा कारणे समजून घेण्यासाठी भेट देतात तेंव्हा पालकांचे उत्तर ऐकून हसावे की रडावे हेच कळत नाही. काही पालक म्हणतात की शेताकडे बघायला कोणीच नाही. आज मजूरदार मिळणे अवघड झाले किंवा मजूरदाराला देण्याएवढे पैसे नाहीत त्यामुळे याला सोबत घेतो. उद्या नक्की पाठवितो शाळेला असे म्हणून शिक्षकाची बोळवण केली जाते. पण त्या मुलांची उद्या कधीच उजाडत नाही आणि तो शाळेला येत नाही. यांस बालमजुरी म्हणावे का ? घरातील लहान भावंडाची सांभाळ करणे, स्वयंपाक करणे, धूणी भांडी करणे इत्यादि कामासाठी मुली मधुनच शाळा सोडतात हे प्रत्यक्षात भेट दिल्यावर समजते. शेतात काम करणाऱ्या किंवा मजुरी करणाऱ्या लोकांसाठी थोडीशी मदत सुध्दा आभाळाएवढी मोठी वाटते. आई वडीलांच्या कामात मदत करणाऱ्या मुलांना बालमजूर म्हणता येईल काय ? त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या पालकांवर आजपर्यंत कुठे करवाई झाल्याचे ऐकिवात नाही. कारण घरच्या कामात मदत करणे हे बालमजुरी या व्याख्येत बसत नाही असे वाटते. मात्र ती मुले कायमची शिक्षणापासून दूर होतात, शाळाबाह्य होतात, त्यांचे जीवन अंधकारमय होते यावर काही पर्याय मिळेल काय ?

यानंतर आपण अश्या क्षेत्राकडे वळणार आहोत. ज्यांना शाळेचा अजिबात गंध नाही. पालकांना शिक्षणाचे महत्व माहीत नाही, ते कधी शाळेलाच गेले नाहीत ते आपल्या मुलांना काय शाळेत पाठवणार ?
अश्या लोकांच्या घरी जेंव्हा सर्वेक्षण करणारी मंडळी पोहोचली तेंव्हा त्यांना काय अनुभव आला असेल ? फारच विचित्र अनुभव याठिकाणी मिळाला. यापूर्वी सर्वेक्षण करणारे कर्मचारी एक दोन वेळा येऊन गेले होते. त्यामुळे तिसर्यांदा जेंव्हा सर्वेक्षण करणारी मंडळी त्यांच्या गल्लीत गेल्याबरोबर पालकांचा मोठा आवाज ऐकू आला " शाळेत घेऊन जाणारी माणसे आलीत रे पोरं हो लपुन बसा " खूपच आश्चर्य वाटलं की हे माणसे असे का बोलत आहेत. मागील वेळेस असाच एक माणूस आला आणि त्यांनी येथील पाच - सहा पोरं घेऊन गेला. त्यांना माहीत नाही की ती पोरं आज तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या शाळेत शिकत असतील पण त्यांना वाटते की ही माणसे आपले पोरं घेऊन जात आहेत आणि त्यांच्या पोटाचा प्रश्न अनुत्तरित राहत होता असे त्यांच्याशी संवाद केल्यावर कळले. तेथे शालेय वयातील बरीच मुले दिसत होती पण पालक सहकार्य करीत नव्हते त्याठिकाणी काय करता येणार ? हा एक मोठा प्रश्न आहे. मागे काही दिवसाखाली एक बातमी वाचण्यात आली की फासेपारधीच्या मुलांसाठी मतीन भोसले नावाचा व्यक्ती प्रश्नचिन्ह नावाच्या माध्यमांतून मुलांचे शिक्षण पूर्ण करीत आहे. ना सरकारची मदत ना त्यांच्याजवळ गडगंज संपत्ती आहे. फक्त समाजातील काही दानशूर व्यक्तीच्या मदतीने ते प्रकल्प राबवित आहेत. मूठभर धान्य, एक वही, एक पेन एवढीच आपली मदत या भटक्या मुलांच्या जीवनात प्रकाश पसरू शकते. या  मुलांना आपल्या नियमित शाळेत प्रवेश दिल्यानंतर ते शिकणार नाहीत हे ही सत्य आहे. याचा सुध्दा अनुभव एका शाळेत आला. एका भीक मागणाऱ्या पोराला वयानुसार शाळेत प्रवेश देण्यात आले. पण त्यांच्याजवळ कोणीच बसायला तयार होईना. त्याच्या अंगाचा पूर्ण वास येत असल्यामूळे ती मुले त्यांना दूर करीत होती. दुपारी जेवणाच्या वेळी सुध्दा तोच अनुभव आला. मग काय दोन तीन दिवसांनी ती मुले स्वतःहून शाळेत न येण्याचा निश्चय केला.
शिक्षणातून समानतेचे धडे शिकविले जावे हे अगदी सत्य आहे. मात्र मुलांना जे डोळ्यांना दिसते त्यात काय बदल करता येणार ? त्याऐवजी प्रश्नचिन्ह सारखे प्रकल्प राबविण्यासाठी काही संस्था पुढे येणे गरजेचे आहे. आणि समाजातील लोकांनी सुध्दा अश्या प्रकल्पाला सढळ हाताने मदत करणे गरजेचे आहे. एखाद्या देवाला रक्कम दान केल्याने खरंच पुण्य मिळते की अश्या सेवाभावी संस्थेला मदत केल्याने पुण्य मिळते याचा विचार करण्याची आज खरी वेळ आहे. देवाच्या नावाने संपूर्ण गावाला भंडारा खाऊ घालण्यापेक्षा या गरीब लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविली आणि त्याना खाऊ दिले तर जास्त पुण्य मिळेल. एखाद्या भूखेल्या व्यक्तीला जेऊ घातल्यानंतर जे समाधान मिळते कदाचित ते लाख रू देवाला दान केल्या नंतर ही मिळणार नाही. त्यामूळे समाजातील दानशूर व्यक्तीनी यावर एकवेळ जरूर विचार करावे असे वाटते. हॉटेलात, वीटभट्टीवर, किंवा इतरत्र काम करणारे चौदा वर्षांखालील मुले बालकामगार म्हणून आपणांस ठळकपणे दिसून येतात मात्र वर उल्लेख केलेले अशी बरीच मुले आहेत जे की अप्रत्यक्षरित्या बालकामगारच नव्हेत का ? अश्या बालकामगार बालमजुरांची संख्या भरपूर आहे. यांवर काही उपाययोजना करता येईल काय आणि बालमजुरी कशी संपविता येईल याचा प्रशासनासह समाजातील सर्व घटकांनी गंभीरतापूर्वक विचार करणे अगत्याचे आहे. बालमजुरी किंवा बालकामगार आणि शाळाबाह्य मुले हा कधीच न संपणारा विषय आहे. तसेच ही समस्या फक्त भारतातच नव्हे तर जगाला भेडसावणारी समस्या आहे.
@ नागोराव सा. येवतीकर
     मु. येवती ता. धर्माबाद
    09423625769

Sunday 15 May 2016

जागतिक कुटुंब दिवस निमित्ताने लेख 

" वसुदेव कुटुंबकम "

कुटुंब म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते एक असे चित्रं ज्यात आजी आजोबा आई वडील भाऊ बहीण काका काकू आणि इतर मंडळी असा जवळपास दहा ते पंधरा लोकांचा समूह. या कुटुंबात वावरत असताना मिळतो अनेक गोष्टीचे संस्कार जसे की वडिलांनी एखादी वस्तू घरात आणली असेल तर ती सर्वांनी मिळून मिसळून खावी. यामूळे मुलांवर समानता या मूल्यांची नकळत रुजवण होते. घरात वाडवडिलांचा वावर असल्यामुळे घरातील सर्वच जण दबक्या आवाजात संवाद करतात. म्हणजे नवरा बायको, भाऊ बहीण यांच्यात होणारे भांडण किंवा धुसफुस ला आळा बसतो. कोणी मोठ्या आवाजात बोलत नाही. घरातील सर्व कामे विभागली जातात. ज्यांना जे काम जमते ते काम कुणी सांगण्याच्या अगोदर केली जातात. काही जण तर वडील मंडळीकडून शाबासकी मिळविण्यासाठी पुढे पुढे येऊन काम करतात. जणू त्यांचामध्ये स्पर्धा लागली असेल. घरातल्या प्रत्येक बाबींवर नियंत्रण असते. ते मग खरेदी करण्याचे असेल वा कुठे गावाला जायचे असेल. प्रत्येक गोष्ट वडील मंडळींना विचारूनच करावे लागते त्यामूळे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चैन किंवा ऐश आरामच्या बाबीला एकप्रकारे लगाम घातल्या जाते. एकत्रित कुटुंब पध्दतीमुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या घडतात. लहान मुलांना घरातील आजी अन् आजोबा व्यवस्थितरित्या सांभाळ करतात. त्यांना रामायण महाभारत इसापनीती किंवा इतर गोष्टी सांगतात. आजी गाणे ऐकवते त्यामूळे मुले भविष्यात चांगले व्यक्ती बनू शकतात. परंतु सध्याच्या नवीन पध्दतीमधील जोडप्याना असे एकत्र कुटुंब पध्दत म्हणजे डोक्याला ताप वाटत असते. वधूपिता आपल्या मुलीसाठी स्थळ शोधत असताना प्रत्येक गोष्टीची चौकशी करतो त्यात हे पण विचारपूस करतो की लग्नानंतर मुलगा कोठे राहणार आहे ? मुलगा स्वतंत्र राहणार असेल तरच वधूपिता लग्नासाठी होकार देतो अन्यथा नाही. यांत त्या वधूपित्याची काय चूक असते. आपल्या मुलीला सासरी जास्त कष्ट पडू नये, तिने सुखात रहावे याच विचारात प्रत्येक वधूपिता असतो. ज्यावेळी आपल्या मुलांच्या लग्नाची वेळ येते तेंव्हा मात्र हाच वधू पिता सासरी आलेल्या मुलीला नावे ठेवतो. माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केली. सासू सासऱ्या सोबत राहिले तर हिला जास्त काम करावे लागते म्हणून तिच्या घरांच्या लोकांनी आमचं नातं तोडून काढलं असा आव आणतात. परंतु प्रत्यक्षात त्यांची सु्रुवात माझ्याकडून झाली याचा मात्र विचार केला जात नाही. याच विचार शैलीतून आज एकत्रित असलेली कुटुंब पध्दती विभक्त झाली आहेत. हम दो हमारे दो किंवा आम्ही दोघे राजा - राणी, नको आमच्यात कोणी या ही भावना दिवसेंदिवस बळावत चालली आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. कदाचित या गोष्टीची चिंता कोणी करीत नाहीत किंवा त्यांची जाणिव त्यांना अजून झाली नाही. आपल्या आई वडिलांपासून विभक्त राहून खरेच आपल्या कुटुंबाची प्रगती होते काय ? या गोष्टीचा गंभीरतापूर्वक विचार केल्यास नाही हेच उत्तर येते. मात्र तरी सुध्दा वेगळी चूल मांडण्याचा अट्टाहास कधी बायकोकडून तर कधी नवऱ्याकडून होते. यांत कोणाचा दोष आहे ? यांपेक्षा याची झळ आपल्या लेकरांना लागते हे आपण कधीच विचार करीत नाहीत.विभक्त कुटुंबात राहणारी मुले सहसा एकलकोंडी होतात. प्रत्येक गोष्ट मागितली की मिळते त्यामुळे हट्टी होतात. घरात आणलेली वस्तू आपलीच, त्याच्यावर आपलाच जास्त अधिकार आहे या सवयीमुळे  त्याच्यात स्वार्थी भावना खोलपर्यंत रुजते. त्यांच्यावर आजीच्या गाणी आणि आजोबांच्या गोष्टी ऐवजी टीव्ही वरील अश्लील व बिभत्स गोष्टीचे संस्कार होतात. समाजात काही अनैतिक बाब घडली की आपणंच बोलून मोकळे होतो काय ही आजकालची पोरं. काहीच मॅनर नाहीत. सर्वाना समान हक्क या कायद्याने आज स्त्रिया पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत, रोजगार करीत आहेत आणि मिळेल ती नौकरी ही करीत आहेत. घरातील नवरा बायको दोघे पण आज आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवीत आहेत. ही आनंदाची बाब आहे, यांत शंकाच नाही. मात्र नौकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडल्यावर चिमुकली लेकरे दुसऱ्याच्या हाती सोपवली जाते. तेंव्हा त्यांच्याकडून कोणत्या संस्काराची आपण अपेक्षा करणार ? अश्या वेळी नक्कीच आपणास आजी आजोबांची क्षणभर का होईना आठवण आल्याशिवाय राहणार नाही. घराघरात नवरा - बायको यांच्या वादविवाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यवसान घटस्फोटमध्ये होण्याचे प्रमाण वाढण्यामागे सुध्दा ही विभक्त कुटुंब पध्दत कारणीभूत आहे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. घरातील नवरा बायकोच्या भांडणाचे प्रतिकूल परिणाम मुलांच्या भविष्यावर होतो. रात्री भांडण झाले की दिवस उगवला की बाई माहेरी जाते, जाताना सोबत लेकरांना घेऊन जाते. पण लेकरांची शाळा बुडेल, त्याचा अभ्यास राहून जाईल या गोष्टीचा विचार ते कदापिच करणार नाहीत. शहरांत अश्या घटना फार कमी घडत असतील मात्र ग्रामिण भागात असे प्रकार सर्रास घडतात.बायको म्हणेल तसा नवरा ऐकावेच लागते किंवा नवरा म्हणेल तसे बायकोला ऐकावेच लागते असे चित्रं या राजा राणी च्या कुटुंबात दिसून येते. अश्या कुटुंबात एकमेकास विरोध झाला की भांडण होणार हे ठरलेलं आहे. परंतु जर राजा व राणी दोघेही सामंजस्यपणाने एकमेकाला समजून घेऊन संसार केल्यास त्यांच्या एवढा सुखी जगात शोधूनही सापडणार नाहीत.
आजची कुटुंब व्यवस्था कशी ही असेल आणि आपण एकत्रित असो वा विभक्त कुटुब पध्दती मध्ये राहत असो आपल्या लेकरांसाठी वर्षातून किमान एक दोन वेळा तरी काही ना काही कारणांनी एकत्र आले पाहिजे
मौजमस्ती केली पाहिजे
यामुळे मुलांवर योग्य संस्कार होतात जे की किती ही पैसा खर्च केला तरी विकत मिळणारी वस्तू नव्हे त्यासाठी आपण आपल्या वागणूकीत बदल केला पाहिजे. सुखी कुटुंबात सर्व लोकं एकमेकाना समजून घेऊन राहतात म्हणूनच ते दूर दूर राहून सुध्दा सुखी राहतात. त्यांच्याजवळ काही जादूटोणा नाही की मंत्र तंत्र नाही. चला आपण ही सर्वच जण या गोष्टीचा अंगीकार करू आणि संपूर्ण देश वसुदेव कुटुंबकम म्हणजेच सुखी कुटुंब करू या

- नागोराव सा. येवतीकर,
  शिक्षक व स्तंभलेखक, धर्माबाद

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...