या ब्लॉग वरील सर्व लेखाचे हक्क सौ.अर्चना नागोराव येवतीकर यांच्याकडे आहेत. परवानगी शिवाय लेख फॉर्वर्ड किंवा प्रकाशित करू नये पाऊलवाट पुस्तकाचे प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते प्रकाशन
Saturday, 7 December 2019
एकच ओळखपत्र
Friday, 6 December 2019
स्मार्ट बॉय : काळाची गरज
*स्मार्ट बॉय : काळाची गरज*
हैदराबादच्या हायटेक सिटी मध्ये डॉ. प्रियांका रेड्डी हिच्यावर चार नराधमांनी आमनुषपणे अत्याचार करून पुरावा नष्ट करण्याचा हेतूने तिला जिवंत जाळले.
भारतात हे पहिलेच प्रकरण आहे असे ही नाही. यापूर्वी देखील अश्या अनेक घटना घडल्या आहेत मग त्यात निर्भया प्रकरण असेल किंवा असिफा प्रकरण. यात माणुसकीला काळिमा फासणारी कृत्य घडलेले आहे. अश्या लोकांना एकदम कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे पण त्यापूर्वी हे असे का घडत आहे, यावर ही चिंतन होणे अपेक्षित आहे. नवतरुण युवक असे मार्ग का अंगिकारत आहे ? यावर ही संशोधन व्हायलाच हवे. अश्या घटनांचा विरोध करण्यासाठी मुलीने स्वतः ला तयार केले पाहिजे. कराटे शिकले पाहिजे, मुलांना प्रतिकार करता येईल असे काही केले पाहिजे, अर्थात स्मार्ट गर्ल व्हायला पाहिजे असा एक सुर सध्या सर्वत्र ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. त्याऐवजी आपल्या घरातील मुलांना स्मार्ट बॉय करायला पाहिजे यावर कुठे ही चर्चा होतांना दिसत नाही. मुलांना नैतिकतेचे धडे शिकविले तर ही नामुष्की नक्कीच येणार नाही. त्यासाठी प्रशासन देखील तेवढेच कठोर कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
घरातून नैतिकतेचे शिक्षण -
आपल्या घरात असलेल्या मुलांना सर्वप्रथम नैतिकता शिकवायला हवी. कोणासोबत कसे वागावे, बोलावे ? याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. पालकांनी वाढत्या वयाच्या मुलांसोबत मित्रासारखे संबंध ठेवून त्यांच्याशी संवाद करत राहणे आवश्यक आहे. दहाव्या उत्तीर्ण झाले की आज मुलांना मोबाईल आणि गाडी याची आवश्यकता भासत आहे. या दोन वस्तू दिल्याशिवाय तो पुढील शिक्षण घेणार नाही असे स्पष्टपणे बोलतांना दिसत आहेत. या दोन गोष्टी मुळेच आजची मुले अनैतिक मार्गाकडे वळत आहेत. गाडी आणि मोबाईल म्हटलं की पॉकेटमनी देखील आलेच. आजकाल पालकांकडे पैसा ही मुबलक प्रमाणात असल्याने ते ही मुलांना पॉकेटमनी देत राहतात. याचे विपरीत परिणाम पाहायला मिळते. सध्या मोबाईलवर अनेक प्रकारचे वेबसाइट उपलब्ध आहेत जे की, या युवकांना वाईट मार्गावर घेऊन जातात. मित्रपरिवारामध्ये हळूहळू ही बाब गंभीर वळण घेत जाते. काही खराब मित्रांच्या संगतीमुळे मुलगा वाईट बाबीकडे वळायला लागतो. उरलेल्या पैश्यातून मग त्याला दारू पिणे, सिगारेट ओढणे, तंबाखू खाणे, मुलींच्या मागे लागणे यासारखे घाणेरडे व्यसन लागतात. या वयातील मुले मग एका संधीची वाट पाहत असतात. ज्याप्रकारे जंगलात शिकारी आपल्या शिकारच्या शोधात असतो अगदी तसेच. म्हणूनच आपल्या घरातील मुले या वेगळ्या वळणावर जाणार नाहीत याची काळजी प्रत्येक पालकांनी घेणे आवश्यक आहे. घरातली मुलगी सात च्या आत घरात राहावे असे वाटते तर मुलगा रात्री किती वाजता ही आलेले आपणांस चालते, यात पहिल्यांदा बदल करणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी राक्षसांचा संचार असतो आणि या कचाट्यात मुलगी येऊ नये याची काळजी जसे आपण घेतो तशीच काळजी पालकांनी मुलांच्या बाबतीत देखील घ्यायला हवी. मुलांचा मोबाईल दर आठ दिवसांनी किंवा अधूनमधून कधी ही न सांगता तपासून घ्यायलाच हवे. याची मुलांच्या मनात भीती असेल तर तो मागेपुढे विचार करू शकतो. मुलांना देत असलेल्या प्रत्येक पैश्यांचा हिशेब देखील घ्यायलाच हवं आणि सोबत त्यांच्या मित्रांची देखील एकदा ओळख करून घ्यावी. या सगळ्या गोष्टी पालक म्हणून आपण कटाक्षाने करत असू तरच आपली मुलं स्मार्ट बॉय होऊ शकतात.
प्रशासनाने कडक व्हावे - असे अनैतिक प्रकार थांबविण्यासाठी प्रशासन अगदी कडक भूमिका घेणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी गाडीवर फिरणारे युवक दिसले तर त्यांची कसून चौकशी व्हायलाच पाहिजे. एक दोन वेळा अशी चौकशी झाली तर रात्रीच्या वेळी फिरायला हे युवक कचरतील. मोठ्या शहरात रात्रीच्या वेळी काही युवक मंडळी शाळेच्या मैदानात किंवा उघड्यावर जेथे रात्रीला कोणीच येत नाही अश्या निर्मनुष्य ठिकाणी चार पाच मित्र मिळून कॉकटेल पार्टी करतात. ह्या बाबीवर पोलीस प्रशासन नियंत्रण आणू शकते. रात्री सात ते दहा या वेळांत एकदा पेट्रोलिंग केलं की अश्या गोष्टीवर आळा बसू शकतो. ह्या वयातील मुले नशेच्या धुंदीत असे दुष्कृत्य करतात. त्यावेळी त्यांचे डोके सैतानाचे बनलेले असते. त्याचसोबत ह्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षाच दिली पाहिजे तसा वटहुकूम देखील काढण्यात आला आहे. पण त्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. कायद्याची भीती मनात बसल्याशिवाय ही मंडळी घाबरणार नाहीत. चांगल्या घरातील आणि सुसंस्कारी घरातील मुले असे दुष्कृत्य सहसा करत नाहीत. ज्या मुलांकडे लक्ष देण्यास कोणी वालीच नसतो, अश्या मुलांकडून असे कृत्य होते. म्हणून समाजातील अश्या मुलांचा शोध घेणे आवश्यक आहे. ज्यांच्या हाताला काही कामधंदा नसते अशी मुले गैर मार्गाला लागतात. म्हणून प्रत्येक गावात आणि शहरातील वॉर्डात रिकामटेकडे मुलांचा शोध घेऊन त्यांच्यावर पाळत ठेवणे ही गरजेचे आहे. कमी वयोगटातील मुले काही ठिकाणी गैरवर्तन करत असतील तर त्यांना वेळीच अटकाव करणे गरजेचे आहे हे हैद्राबादच्या घटनेतुन शिकायला मिळते. भारत देश महिलांसाठी असुरक्षित देश आहे ही काळिमा प्रशासनाच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. अशी घटना यापुढे घडणार नाही याची काळजी देशातील प्रत्येकाने देखील घेणे गरजेचे आहे, असे वाटते. ( लेख लिहीत असतांनाच हैद्राबादच्या त्या चार नराधमाचे एंकौंटर झाले अशी बातमी कानावर धडकली. )
- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
www.nasayeotikar.blogspot.com
रानमेवा - बोरं
खास करून हिवाळा ऋतूमध्ये अनेक फळे खाण्यासाठी उपलब्ध होतात जसे जांभ आणि बोरं. ही दोन्ही फळं खाल्याने सर्दी आणि खोकला होण्याचा धोका असतो म्हणून पालक वर्ग मुलांना हे फळं खान्यापासून मज्जाव करतात. तरी देखील मुलं चोरी चोरी चुपके चुपके खातातच. सायंकाळच्या वेळेला जेंव्हा शिंक येते त्यावेळी आई बरोबर ओळखते आणि बोरं किंवा जांभ खाल्लं का ? म्हणून जोरात बोलते. लहान मुलांना खास करून आवडणारे फळ म्हणजे बोरं. जंगलातील हा रानमेवा. झिझिफस मॉरीटिएना नावाच्या जातकुळातील हे फळ असून ते भारतात बोर नावाने प्रचलित आहे. याशिवाय ते ‘जुजुबी’, ‘चायनीज डेट्स’ किंवा ‘चायनीज अॅपल’ या नावांनीही ओळखलं जातं. तसं पाहिलं तर गावालगत बोराचे अनेक झाडं असतात. ज्या झाडांची बोरं आंबट असतात त्या झाडाकडे सहसा कोणी फिरकत नाही. मात्र ज्या झाडांची बोरं गोड असतात त्या झाडाजवळ अनेक मुलं गोळा होत असतात. काही जणांच्या मालकीची देखील ही झाडं असतात त्यामुळे ते या झाडांची रखवाली करतात. ग्रामीण भागात वृद्ध मंडळी सहसा या झाडांची रखवाली करताना दिसून येतात. काही मंडळी टोपल्यात ती बोरं जमा करतात आणि गावात विक्री करतात. शाळेतील लहान मुले ही त्यांची खास गिऱ्हाईक होत. अनेक वेळा शाळेत मुले बोरं खातात आणि बोराच्या वर्गात टाकतात त्यामुळे शिक्षक मुलांवर खूप रागावतात. ते कितीही रागावले तरी मुलांचा बोरं खाण्याचा सिलसिला काही बंद होत नाही. बोरं विशिष्ट उग्र वासामुळे पटकन लक्षात येते. याचा उपयोग लोणचं टाकण्यासाठी सुद्धा केला जातो. ज्या ऋतूत जी फळं येतात ती फळं खाल्याने त्याचा वर्षभर फायदा होतो असे आयुर्वेद सांगते. म्हणून ही फळं खायलाच हवी. गोड बोरं, आंबट बोरं आणि खारका बोरं असे काही बोराचे प्रकार आहेत. काही बोरं म्हातारी बोरं म्हणून देखील ओळखले जातात. कच्चे बोरं हिरव्या रंगाचे तर पिकलेले बोरं तपकिरी रंगात दिसून येतात. सहसा हिरव्या रंगाच्या बोरात किडे असत नाहीत मात्र पिकलेल्या बोरात किडे असण्याची शक्यता असते म्हणून ती बोरं बघून खावं लागते. बोरं हे खास करून मुलांपेक्षा मुलींना खूप आवडते. बोरीवरून काही गावांचे नाव देखील वाचायला मिळते. तर काही म्हणी आणि वाक्प्रचार देखील आहेत. ज्या गावच्या बाभळी, त्याच गावच्या बोरी. सध्या संकरित बोरं जे की जांभासारखे मोठे आहेत. त्यात गावरान बोराची चव नक्कीच मिळत नाही. हिवाळ्यात येणारी ही बोरं काही कुटुंबाची रोजगार ठरत असते. म्हणून कोणाच्या डोक्यावर बोराची टोपली दिसत असेल तर नक्की त्या बोराची चव चाखून बघायलाच हवी. जी मजा गावरान बोरं खाऊन मिळते ती मजा त्या संकरित बोरात नक्कीच मिळणार नाही. आज ही बोरं बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटणार हे मात्र नक्की.
बोरं खाण्याचे अनेक फायदे आहेत.
कर्करोगासारख्या आजारापासून शरीराचं संरक्षण करण्याचं काम करतं. कर्करोगाला प्रतिकार करणा-या पेशी वाढवण्याचं काम करतं.
यात भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असल्यामुळे ते अँटिऑक्सिडंट म्हणूनही काम करतं.
ताण हलका करण्याची क्षमतादेखील या फळात आहे.
सर्दी किंवा शीतज्वरापासून बचाव होण्यास मदत होते. एक चमचा बोराचा रस आणि काळी मिरी यांचं सेवन केल्यास सर्दीपासून संरक्षण होतं.
अतिसार, थकवा तसंच भूक न लागणे आदी विकारांवरही हे अतिशय गुणकारी आहे.
बोर खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते.
त्वचा कोरडी होणे, काळवंडणे याचबरोबर सुरकुत्या येणे यासारखे विकार कमी करण्यास मदत करतं. त्वचेचं तारुण्य टिकवण्याची क्षमता यात आहे.
अस्थमा आणि मधुमेहाचा त्रास असल्यांनी बोरं आवर्जून खावी. रक्तातील साखर नियंत्रित राखण्याचं काम बोर करतं.
वजन कमी करण्यासही हे मदत करते.
‘अ’ जीवनसत्त्व असल्यामुळे नियमित बोर खाल्ल्यास पचनशक्ती सुधारते.
कॅल्शिअम आणि फॉफ्सरसचं प्रमाण अधिक असल्यामुळे हाडं आणि दातांच्या मजबुतीसाठी हे उत्तम आहे.
- नासा येवतीकर
Thursday, 5 December 2019
शेती दिवस
Wednesday, 4 December 2019
एक राष्ट्र, एक रेशनकार्ड
Monday, 2 December 2019
करू नका
. ।। करू नका ।।
प्रेमाने बोलत रहा असे करू नका वाद
जीवनात चांगल्या गोष्टीना करू नका बाद
पती-पत्नीनी नेहमी रहावे एकोप्याने
वाद वाढतील असे करू नका संवाद
संसारात सदा चढ-उतार येतच राहतात
जीवनातल्या कटु प्रसंगाना करू नका याद
मानवी जन्म आहे श्रेष्ठ मिळणार नाही पुन्हा
जीवन आहे अनमोल असे करू नका बरबाद
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
कविता - पाऊस
।। पाऊस ।।
आभाळ दाटले बघ नभी
होईल भरपूर बरसात
पाऊसधारा अंगावर झेलू
मनसोक्त नाचू या पाण्यात
वादळवारे लगेच सुटतील
ढगे पळतील वेगात
छत्रीविना पाऊस पाहू
भिजुन जाऊया पाण्यात
पडला जोराचा पाऊस
साचले पाणी खड्यात
कागदाची होडी करू या
वाहून जाऊ द्या पाण्यात
थांबला एकदाचे पाऊस
खेळूया झिम्मड पाण्यात
एकमेकावर पाणी उडवू
खेळ आलाय पहा रंगात
- नासा येवतीकर, धर्माबाद
आधार ( Aadhar )
आधार जीवनाचा सौंदर्य संस्कृत भाषेत एक श्लोक आहे आधारो हि जीवनस्य, संकटे दीपकः स्मृतः। साहाय्यं कुरु सर्वेषां, भव जीवनसंगतः॥ आधा...
-
दीपोत्सवाचा सण : दिवाळी दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळी सणाची आबालापासून वृध्दापर्यंत सर्वानाच चातक पक्ष्य...
-
संतुलित आहार - नागोराव सा. येवतीकर , मु. येवती ता. धर्माबाद अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा...
-
शिक्षकांना स्वातंत्र्य असावे देशाचे भवितव्य शाळेतून घडत असते कारण येथेच देशाचा भावी आधारस्तंभ बनणारा विद्यार्थी शिक्षण घेत असतो....