Tuesday 30 June 2020

सोशल मीडियातील संकलित जोक्स


सोशल मिडियातील व्हायरल जोक्स

यावर्षीच्या प्रारंभीच जगात कोरोना व्हायरसने सर्वाना चक्रावून सोडले आहे. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, मास्क, सॅनिटायझर या शब्दांची जनमाणसात चर्चा खूप होऊ लागले. तसं तर या महारोगाने सारेच चिंताग्रस्त झाले आहेत. तरी देखील आपली मानसिक स्थिती चांगली राहावे आणि नेहमी हसत राहावे म्हणून या काळात कोरोना आणि त्याच्याशी संबंधित जे विनोद जोक्स सोशल मीडियात व्हायरल झाली आहेत. ते पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी भाषेत वाचून मनसोक्त हसू या आणि आपल्या डोक्यावरील थोडीशी चिंता व काळजी दूर करू या.  

🥴😜😂😅😁😂🤔
कहरच झाला जेंव्हा आमची कामवाली मावशी म्हणाली तुमचा सगळ्याचा  कोरोना रिपोर्ट दाखवा ; मग येते कामाला

🥴😜😂😅😁😂🤔
पप्या :- गण्या, शाळेला कवा रे ?
गण्या : - अजून कूटं लगेच ..?
महापूर आहे की अजून...

🥴😜😂😅😁😂🤔
मेलेली सासू सुनेच्या स्वप्नात आली आणि सुनेला मास्क लावलेला बघून बघून खूप हसून म्हणाली " तुझं तोंड मी बंद करू शकले नाही पण या कोरोनाने करून दाखवलं" 

🥴😜😂😅😁😂🤔
एका लग्नाच्या कार्यालयात एका माणसाला मुलीकडचे विचारतात, 
"तुम्ही वर पिता का?" 

उत्तर : तसं काही नाही. खाली व्यवस्था केली असेल तर खाली येऊन पितो, मला काही प्रॉब्लेम नाही

🥴😜😂😅😁😂🤔
एक माणूस कोरोना मधून नीट झालता.. 
तर त्याने त्याच्या गाडीच्या मागे लिहिले होत... 
माजी कोरोना पॉझीटीव्ह.....  
ड्राइवरने विचारलं तर तो म्हणाला कि ह्याच्या मुळे पोलीस गाडी आडवत नाहीत.... कागद मागत नाहीत.... लायसन पण मागत नाहीत.

🥴😜😂😅😁😂🤔
ह्या वर्षी पहिल्यांदाच अस झालय की कोरोनामुळे माझी युरोप टुर रद्द झाली ........
नाही तर दरवर्षी ....... पैशांमुळे रद्द करावी लागायची...... 

🥴😜😂😅😁😂🤔
SBI बेंक मेंं नया अकाउंट खुलवाने गया..

तो ऑफीसर ने कहा..
"KYC के लिये 2 फोटो जमा करवानी पड़ेगी"
मास्क के साथ
औऱ.. 
मास्क के बगैर!

🥴😜😂😅😁😂🤔
सर्व पुरुषांसाठी 
घरात करायचे अत्यंत महत्वाचे आसन 

'हो' कारासन 

🥴😜😂😅😁😂🤔
आयुष्य म्हणजे इंग्लिश 
मुव्ही सारखं झालाय.... 
चालू तर आहे पण काय
चाललंय ते कळतच नाही...

🥴😜😂😅😁😂🤔
आज हाथ पर बैठी मक्खी को फूंक मारकर उड़ाने की बहुत कोशिश की, पर वो नहीं उड़ी...
फिर एक भाई साहब ने बताया मास्क हटा लीजिए पहले 

🥴😜😂😅😁😂🤔
द्वापार युगात श्री कृष्णाने
द्रौपदीला दिले अक्षय पात्र... त्यातील अन्न कधीच संपत नव्हते.

कलियुगात कोरोना ने 
महिलांना दिले बेसिन पात्र.. ज्यातील भांडी कधीच संपत नाहीत..!!

🥴😜😂😅😁😂🤔
स्थळ : अर्थात पुणे

पुणेरी टेलरची नवीन डोके दुखी...

गिऱ्हाईक म्हणतंय... "उरलेल्या कपड्यात मास्क शिवून द्या"

🥴😜😂😅😁😂🤔
लॉकडाऊन उठल्यावर नवरा बायको मुलाच्या शाळेत पेरेंट्स  मिटिंगसाठी जातात.
बायको टिचरशी बोलते व नवऱ्याची ओळख करून देते.
'मी ओळखते ह्यांना', टीचर हसत सांगतात
बायको, संशयाने, विचारते,
'कसे ओळखता? आज पहिल्यांदाच आलेत शाळेत.'
टीचर. ....'हो, पण ऑनलाइन क्लासेस घेताना रोज घर झाडताना, पुसताना दिसायचे!' 

🥴😜😂😅😁😂🤔
बायकोला तर कळायचंच बंद झालंय,
वास सॅनिटायझरचा येतोय की दारूचा..

🥴😜😂😅😁😂🤔
WHO चा मोठा खुलासा...
भारतात 75% लोक कोरोनामुळे नव्हे तर  उधारी मुळे "मास्क" लावुन फिरत आहेत....!!!!

🥴😜😂😅😁😂🤔
आज शेजारीणने  आपला मुलगा गुल्लू ची दृष्ट काढण्यासाठी मिर्चीचा उपयोग केला 
आणि ...
जसं हि मिर्च्या चुलीत घातल्या पुऱ्या गल्लीतले लोक खोकायला लागले 
मग काय 
स्वास्थ विभागवाले आले 
आणि आज पुरी गल्ली 
" क्वारंटाईन " आहे 

🥴😜😂😅😁😂🤔
शेजारच्या वहिनी बायकोला म्हणाल्या, " भाऊजी हुशार आहेत. माझ्या चेहऱ्यावर मास्क असूनही मला ओळखलं व हसले सुद्धा ! "

आता घरातलं लॉकडाऊन आणखी कडक झालंय ...

🥴😜😂😅😁😂🤔
यावर्षीचा उन्हाळ्या फार कठीण गेला....

 ही माहेरी गेली नाही
आणि
ती माहेरी आली नाही

🥴😜😂😅😁😂🤔
कोरोना वाली कॉलर ट्यून सगळ्यांनी ऐकली असेलच ना, चला तर यात शाब्दिक बदल करूया 
 
फक्त कोरोनाच्या जागी बीवी (बायको) असे बोला 

बीवी के साथ आज पूरा देश लड़ रहा है लेकिन याद रखे हमे बीवी से लड़ना है ससुरालियों से नही, उसके साथ भेदभाव ना करे बल्कि उसकी देखभाल करे, बीवियों से बचने के लिए जो हमारी ढाल है जैसे साला-साली,साडूभाई, दोस्त इनका सम्मान करें, इन्हे पूरा सहयोग दे इन योद्धाओ की करो देख भाल तो देश जीतेगा बीवी से हर हाल.
अगदी त्याच स्वरात वाचले तरच मजा येईल. 

🥴😜😂😅😁😂🤔
पत्नी : सुबह सुबह छत पर क्यों जा रहे हो ????
पति : विटामिन डी के लिए
पत्नी : नहीं मिलेगी, उसका ऑफिस चालू हो गया है

🥴😜😂😅😁😂🤔
आज साखर सोडून एक महीना पूर्ण झाला...
रोज नाश्त्यापूर्वी पाच किलोमीटर वेगात चालणं  आणि मग कमीत कमी वीस मिनिटं योगासनं  करणं हे रूटीन झालं आहे.. 
ना चहा, ना कॉफी.... केवळ फळं आणि हिरव्या ताज्या भाज्या त्या पण ऑर्गेनिक.... 
दुपारी दोन पोळ्या आणि भाजी..... संध्याकाळी थोड़े ड्राय फ्रूट आणि  सीझनल फळं....
अल्कोहोल तर पूर्ण  बंद केलंय. 
सगळ्या वाईट सवयी सोडल्यात....
आता फक्त.... खोटं बोलण्याची सवय गेली की झालं.

🥴😜😂😅😁😂🤔
यूपी, बिहारी लोक त्यांच्या राज्यात जाऊन परत मुंबईत पण आले . . . . . 
महाराष्ट्रीयन  माणसे अजून फोन करूनच विचारतात  की .. . . . 
रस्त्यात पोलीस अडवतात का ? 
🥴😜😂😅😁😂🤔
लग्नाच्या पंगतीत जेवायला बसलो होतो.. तोंडावरचा माझा N-95 मास्क बाजूला काढून ठेवला...
एक जण आला आणि
द्रोण समजून त्याच्यात बटाटयाची भाजी टाकून गेला..

🥴😜😂😅😁😂🤔
स्वतःचे सॅनिटायजर असेल तर एकदाच पिचीक..
दुस-याचे असेल तर
पिचिक..... पिचीक...... पिचीक ......

🥴😜😂😅😁😂🤔
सलूनमध्ये दाढी करायला परवानगी नाही. पण गालावरची कटिंग करायची आहे असे सांगू शकतो का ?
🥴😜😂😅😁😂🤔
एक शंका
संतूरच्या हेंड वॉश ने कोरोनाचे विषाणू तरुण तर होत नसतील ना 
🥴😜😂😅😁😂🤔
लग्नसोहळ्यात नियमापेक्षा जास्त वऱ्हाडी जमल्याने नवरदेवावर गुन्हा दाखल 
पोलिसांनी दम भरल्यावर "पुढील वेळेस असं करणार नाही" अशी नवरदेवाची कबुली 
🥴😜😂😅😁😂🤔
70 साल में पहली बार शराब खुलेआम..
और
चाय छुप-छुप कर बेचीं जा रही है,
वाकई में देश बदल रहा है

🥴😜😂😅😁😂🤔
शाळा सुरू झाल्यावर गुरुजींची नविन डोकेदुखी.
सर...याने मास्क काढला!
सर...हा माझ्या मास्कला हात लावतोय!
सर...हा माझ्या समोर शिंकला!
सर...मी मास्क धुवुन आणु?
सर...याने माझे सॅनिटायजर सांडवले!
सर...मला खोकला येतोय घरी जावु!

😁😁😁😁😁
आप लोगों ने कभी नोटिस किया है...??
जब से covid-19 आया है, तब से....
Close up का ad. आना बंद हो गया है।
पास आओ, पास आओ, पास आओ ना......!!

🥴😜😂😅😁😂🤔
गरजेपेक्षा जास्त वेळ थांबलात तर लोक तुमची इज्जत करत नाहीत! 

कोरोनालाच बघा, मार्चमध्ये जी इज्जत होती ती आता आहे का?

🥴😜😂😅😁😂🤔
इस 😷👈इमोजी को पता था कि कोरोना आने वाला है 
पर  😆 इसने बताया नहीं

आणि शेवटचा विनोद म्हणजे या सर्व विनोदाचा कळस होय. 

🥴😜😂😅😁😂🤔
मैं आप लोगों का हंसा हंसा कर जो रोज खून बढ़ता हूं
दुनियावालों आप इसे भी एक तरह का  "ऑनलाइन रक्तदान" समझना 😋😀😀

सर्व विनोदबुद्धीने वाचावेत, मनावर काही न घेता. सारे जोक्स मन लावून वाचल्याबद्दल धन्यवाद. 

संकलन :- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

Monday 29 June 2020

ये तो बस ट्रेलर है

ये तो बस ट्रेलर है ....।

नुकतेच एमपीएससीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले. त्यात अनेक गरीब कुटुंबातील मुलांमुलींनी यश मिळवीत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यासारख्या उच्च पदावर शिक्कामोर्तब केले. याच परीक्षेत काही विद्यार्थ्यांना अपयश मिळाले म्हणून आत्महत्या केल्याच्या घटना देखील वाचण्यास मिळाले. स्पर्धा परीक्षेत यश मिळाले नाही म्हणून आत्महत्या करण्याचा पर्याय निवड करणे हे कधी ही योग्य मार्ग नाही. आजकाल स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी अनेक युवक पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाले की याच्या तयारीसाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद सारख्या शहराकडे धाव घेतात. नावाजलेल्या आणि प्रसिद्ध अश्या अकॅडमी मध्ये प्रवेश मिळविला म्हणजे आपण स्पर्धा परीक्षेत नक्की यश मिळवितो असे त्यांना खात्री वाटते. पण आपल्या यशात कोणतेही अकॅडमी हे निमित्त मात्र असते त्यात खरी मेहनत ही आपलीच असते. त्यासाठी जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मेहनत करण्याची युवकांनी तयारी ठेवायला हवी. असे म्हणतात की सर्व सुख सोयी उपलब्ध असलेल्या मुलांना अभ्यासाची सोयरसुतक नसते आणि ज्यांना एक वेळचे खायला मिळत नाही असे विद्यार्थी मात्र दिवसरात्र एक करून अभ्यास करतात आणि जिद्द व चिकाटीने यश पदरात घेतात. गरिबीचे चटके खाल्लेले व दारिद्र्य जवळून पाहिलेल्या युवकांना परिस्थिती बदलण्याचा ध्यास लागतो मग त्यांना कामाचा अजिबात त्रास होत नाही. यावेळी एमपीएससीच्या परीक्षेत पास झालेले अनेक परीक्षार्थी खूप गरीब घरातले आहेत. त्यांना मिळालेले यश हेच अधोरेखित करते. ते गरीब होते, त्यांना परिस्थिती बदलायची होती आणि त्यासाठी अभ्यास केल्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच नव्हता. अशी परिस्थितीच माणसाला काही तरी करून दाखविण्याची संधी देते. म्हणून मी गरीब आहे, माझ्याने काही होत नाही ही भाषा कोणत्याच युवकांना शोभून दिसत नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांची कमवा आणि शिका ही योजना अंगीकारून जो पुढील शिक्षण घेत राहतो तो जीवनात नक्की यश मिळवू शकतो. आपल्या अंगात कोणती कौशल्ये आहेत ? आपण कोणत्या क्षेत्रात यश मिळवू शकतो ? आपल्या शिक्षणाचा कल कोणता ? या सर्व बाबी ज्याना कळते तोच योग्य मार्गाने जाऊ शकतो. म्हणून सर्वप्रथम स्वतःला ओळखायला शिका. कल लक्षात न घेता आज असे अनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना दिसतात, मग त्यांच्यात नाउमेद व निरुत्साह निर्माण होतो. लोकं काय म्हणतील ? आई-वडील काय म्हणतील ? सारे मित्र मला हसतील असे वेगवेगळे विचार मनात आणून आत्महत्येसारखा मार्ग ते स्वीकार करतात. पण त्यापूर्वी एक वेळ विचार करत नाहीत की ही स्पर्धा परीक्षा पास झालो नाही म्हणजे सर्व संपले असे मुळीच नाही. कदाचित तुम्हाला एखादे उद्योग बोलावत असेल. एखादे काम तुम्हांला खुणावत असेल याबाबीचा विचार करणे आवश्यक आहे. एका उच्चशिक्षित युवकाला कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली नाही. तो खूप हताश झाला आणि त्याने कोंबड्या पाळण्याचा उद्योग सुरू केला. सुरुवातीला अनेकांनी त्याच्या या उद्योगाला हसले. पण त्याने तिकडे कानाडोळा केला. हळूहळू त्याचा व्यवसाय वाढू लागला. काही महिन्यात त्याच्या व्यवसायाला भरभराटी आली आणि हजारो रुपयांत खेळणारा तो लाखो रुपयांचा मालक झाला. नंतर करोडपती ही झाला. बरे झाले मी प्राध्यापक झालो नाही. नसता दुसऱ्याची चाकरी करत राहिलो असतो असे तो मनाशी म्हणाला. कोणत्याही घटनेमागे काही ना काही कारण लपलेले असते म्हणून यश मिळाले नाही म्हणून लगेच नाउमेद होऊन गैरमार्ग स्वीकारणे कधीही कोणाच्याही हिताचे नाही. म्हणून नोकरीच्या शोधात असलेल्या माझ्या तमाम बेरोजगार युवक-युवतींना कळकळीची विनंती की कठोर मेहनत करत चला, आज ना उद्या यश तुमच्या पायाशी लोळण घातल्याशिवाय राहणार नाही. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि प्रतीक्षा या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवून वाटचाल सुरू ठेवा. जीवन खूप सुंदर आहे आणि तुमची तर जस्ट सुरुवात आहे. ये तो सिर्फ ट्रेलर है, फिक्चर अभि बाकी है मेरे दोस्त.....!

- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

Sunday 28 June 2020

लॉकडाऊन नंतरचे जीवन

लॉकडाऊन नंतरचे जीवन

कोरोना व्हायरसमुळे देशात मार्चच्या शेवटच्या सप्ताहापासून देशात संचारबंदी करण्यात आली आणि त्यानंतर लॉकडाऊन घोषित करण्यात आले. शाळा, महाविद्यालय, कार्यालये, उद्योगधंदे आणि कारखाने बंद करून सर्वचजण घरात कैद झाले. सुमारे सत्तर दिवस सारेचजण लॉकडाऊन झाले होते. यामुळे अनेकांचे हालबेहाल झाले. हातावर काम करून जगणाऱ्या लोकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला म्हणून जून महिन्यात अनलॉक जाहीर करण्यात आले. हळूहळू आर्थिक परिस्थिती पूर्व पदावर येतांना दिसू लागली मात्र कोरोना बाधितांची संख्या गुणाकाराच्या पटीत वाढणे काही थांबले नाही. हजारोच्या संख्येने रुग्ण वाढू लागली ही चिंतेची बाब आहे. म्हणून लॉकडाऊन उठवल्यानंतर प्रत्येकाचे जगणे समजदारपूर्वक असणे गरजेचे आहे. जे की सध्या दिसत नाही. आजमितीला भारतात साडे पाच लाख नागरिक कोरोना रोगाने बाधित झाले आहेत तर महाराष्ट्रात जवळपास दीड लाखच्यावर रुग्णसंख्या झालेली आहे. दरदिवशी जवळपास पाच हजाराच्या संख्येत रुग्ण वाढत आहेत.  म्हणून प्रत्येक नागरिकांनी कोरोना होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, यावर विचार करणे आवश्यक आहे.
अत्यंत महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. आपल्या कामाचे महत्व आपणच जाणून घ्यावे लागेल. बिनकामाचे बाहेर फिरणे शक्यतो टाळलेच पाहिजे. बाहेर जाणे गरजेचे असेल तर तोंडावर मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नये याची काळजी स्वतः घेणे आवश्यक आहे. त्याचसोबत ज्याठिकाणी आपण जात आहोत त्याठिकाणी शारीरिक अंतर ठेवून आपले काम पूर्ण करावे. कोणालाही हस्तांदोलन करणे टाळावे. दुरूनच नमस्कार करावा. सॅनिटायझरचा वापर करावा ज्यामुळे हातावर कोणतेही किटाणू राहणार नाहीत. घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवून घरात प्रवेश करावे. त्याचसोबत होईल तेवढे गर्दीच्या ठिकाणी जाऊच नये. लग्न किंवा इतर कौटुंबिक प्रसंगात जाणे टाळावे. आजपर्यंत जे काही संसर्ग वाढले यात या सोहळ्याचा मोठा वाटा दिसून येत आहे. या सर्व बाबीची काळजी स्वतः घेऊन वागलो तर आपल्या सोबत इतरांचा जीव देखील आपण वाचवू शकतो. त्याचसोबत सर्वात महत्वाचे म्हणजे आपले मन नेहमी सकारात्मक दिशेने विचार करण्यात गुंतवून ठेवावे. रोज सकाळी हलकासा व्यायाम आणि मेडिटेशन केल्याने मन प्रसन्न असते. पालकांनी मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते की काय अशी भीती मनात न बाळगता शाळा व महाविद्यालये सुरू करण्याचा अट्टाहास करू नये. कोरोना आटोक्यात येण्यापूर्वी शाळा व महाविद्यालये सुरू झाली तर खूप मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या परिस्थितीत विचार केल्यास जोपर्यंत लस किंवा औषध मिळणार नाही तोपर्यंत आपली मुले शाळा व महाविद्यालयात पाठविणे म्हणजे मुलांना संकटाच्या खाईत ओढल्यासारखे होईल. एखाद्या वर्षाने विद्यार्थ्यांचे काही जास्त प्रमाणात नुकसान होणार नाही, त्यामुळे मनात कसलाही किंतु परंतु भावना आणू नये. आज ना उद्या हे संकट टळेल असा विश्वास मनात निर्माण करून आपले रोजचे जीवन जगत राहिले पाहिजे. लॉकडाऊन नंतर आपण जरासे दुर्लक्ष करून वागलो तर त्याची शिक्षा आपल्यासह अनेकांना भोगावे लागेल एवढं मात्र खरे आहे.

- नागोराव सा. येवतीकर, मु. येवती ता. धर्माबाद, 9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...