Thursday 17 November 2022

क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त ( Batukeshvar Datt )

क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त


सायमन कमिशन ला विरोध करतांना पंजाब केसरी लाला लजपतराय जखमी झाले आणि त्यातून ते सावरले नाही. अखेर त्यांचा मृत्यू झाला. याचा बदला घेण्यासाठी क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी एक योजना आखली. त्यांना या कामात उत्स्फूर्तपणे व साहसीपणे मदत करणारा एक युवक होता, त्याचे नाव होते बटुकेश्वर दत्त. बटुकेश्वर दत्त एक भारतीय क्रांंतिकारी होते. त्यांनी ८ एप्रिल १९२९ रोजी नवी दिल्लीमधील केंंद्रीय विधिमंडळात भगतसिंग यांच्याबरोबर बॉम्बस्फोट घडवून आणले होते. यासाठी त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली. शिक्षेदरम्यान त्यांनी व भगतसिंग यांनी भारतीय राजकारणाच्या कैद्यांवरील अपमानास्पद वागणुकीविरोधात निषेध करणारे ऐतिहासिक उपोषण केले.
दत्तांना बी.के. दत्त, बट्टू आणि मोहन या नावानेही ओळखले जायचे. त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९१० रोजी बंगालमधील पूर्व बर्दमान जिल्ह्यातील ओरी या गावातील गोठा बिहारी दत्त यांचे घरी झाला. त्यांनी कॉवनपूरमधील पी.पी. एन हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली.
भगतसिंग सारख्या क्रांतिकारकांचा उदय रोखण्याच्या हेतूने ब्रिटीश सरकारने भारतीय संरक्षण कायदा १९१५ (the Defence of India Act 1915) लागू केला, ज्याने पोलिसांना अनेक अधिकार दिले. फ्रेंच अराजकतावाद्यांनी केलेल्या फ्रान्सच्या चेंबर ऑफ डेप्युटीजच्या घटनेपासून प्रेरणा घेऊन भगतसिंघांनी केंद्रीय विधानसभेत बॉम्ब स्फोट करण्यासाठी योजना आखली. सुरुवातीला असे ठरविण्यात आले की बटुकेश्वर दत्त आणि सुखदेव हे बॉम्ब लावतील आणि सिंग युएसएसआरच्या दिशेने प्रवास करतील. तथापि, नंतर योजना बदलली आणि दत्तला सिंह यांच्यासमवेत बॉम्ब लावण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. ८ एप्रिल १९२९ रोजी सिंग आणि दत्त यांनी दर्शदीर्घतेतून धाव घेत विधानसभा परिसरात दोन बॉम्ब फेकले. बॉम्बच्या धुराने हॉल भरले आणि त्यांनी "इन्कलाब जिंदाबाद"च्या घोषवाक्यांचा जयघोष करीत कायद्याचा निषेध करणारी पत्रके फेकायला सुरुवात केली. या पत्रकानुसार दावा केला की केंद्रीय विधानसभेत ठेवण्यात आलेला हा कायदा व्यापार विवादांचा आणि सार्वजनिक सुरक्षा विधेयकाला विरोध करीत आहे आणि त्यात लाला लाजपत राय यांच्या मृत्यूच्या निषेध नोंदवण्यात आला आहे. स्फोटात काही लोक जखमी झाले, पण कुणाचाही मृत्यू झाला नाही. सिंग व दत्तानी हे जाहीर केले कि हे कृत्य नियोजित होते व स्वतःला त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. २० जुलै १९६५ रोजी नवी दिल्ली येथे त्यांचा मृत्यू झाला.

संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Wednesday 16 November 2022

पंजाब केसरी लाला लजपत राय ( Lala Lajapat Ray )


पंजाब केसरी लाला लजपत राय

लाला लजपतराय यांचा जन्म २८ जानेवारी १८३६ रोजी पंजाब मधील धुंढिक येथे झाला. ते पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी योगदान दिले. लाल-बाल-पाल या त्रिकुटापैकी लाल म्हणजे लाला लजपत राय हे होते. ते जहाल मतवादी नेते होते. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली.

लाला लजपतराय यांचे वडील मुन्शी राधाकृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पर्शियनचे शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल होते. १८४९ मध्ये लाला लजपतरायांचा विवाह राधादेवींशी झाला. १८७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपतरायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.

सुरुवातीच्या आयुष्यात लजपतराय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला. १८८० मध्ये, लजपतरायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंसराज आणि पंडित गुरुदत्त यांच्या संपर्कात आले. लाहोरमध्ये शिकत असताना स्वामीदयानंद सरस्वतीच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्यसमाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक, संपादक बनले.
हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले. त्यामुळे त्यांना नौजवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष नव्हती. भारतीय उपखंडातील हिंदू जीवनपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी केल्या. १८८४ मध्ये त्यांच्या वडीलांची बदली रोहतक येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपवून लजपतरायसुद्धा त्यांच्या बरोबर आले. १८८६ मध्ये ते वडीलांच्या बदलीबरोबर हिसारला आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाबू चूडामणींसह लजपतराय हिसारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले.
लहानपणापासूनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची लजपतरायांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हिसार जिल्हा शाखा स्थापन केली. तसेच बाबू चूडामणी, चंदूलाल तयाल, हरीलाल तयाल आणि बालमुकुंद तयाल हे तयाल बंधू, डॉ. रामजीलाल हुडा, डॉ.धनीराम, आर्यसमाजी पंडित मुरारीलाल, शेठ छाजूराम जाट आणि देवराज संधीर यांच्याबरोबर लाला लजपतरायांनी आर्य समाजाची स्थापनासुद्धा केली. काँग्रेसच्या अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची १८८८ आणि १८८९ मध्ये निवड झाली. १८९२ मध्ये उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करत. त्यांनी द ट्रिब्यून सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले.
१८८६ मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना लाहोरमध्ये दयानंद अंग्लो-वैदिक स्कूलची स्थापना करण्यास मदत केली. भारताच्या १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर लाहोरमधील या विद्यालयाचे रूपांतर इस्लामिया कॉलेजमध्ये झाले.
१९१४ मध्ये स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी लजपतरायांनी वकिलीला रामराम ठोकला. ऑक्टोबर १९१७ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क मध्ये भारतीय होमरूल लीगची स्थापना केली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि पंजाबमधील राजकीय निदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर, मे १९०७मध्ये कोणताही खटला न चालवता लाल लजपतरायांची ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. पण त्यांना अटक करून ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे लॉर्ड मिंटो यांनी ठरवल्याने नोव्हेंबरमध्ये त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली.
१९२० साली कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९२१ मध्ये त्यांनी लाहोरमध्ये लोक सेवक मंडळ या ‘ना नफा’ तत्त्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना केली. फाळणीनंतर या संस्थेचे कार्यालय दिल्ली येथे हलवण्यात आले. भारतभरात या संस्थेच्या अनेक शाखा आहेत.
१९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एका आयोगाची स्थापना केली. भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला, कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता. या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व लाला लजपत राया यांनी केले. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले. जखमी होऊनसुद्धा लाला लजपतरायांनी या जमावासमोर भाषण केले. "आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो." हे त्यांचे यावेळचे उद्गार होते. निदर्शनांच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपतराय पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि हृदय विकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

( वरील सर्व माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आली आहे. )


संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
9423625769


पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...