Saturday 24 October 2015

🔺लेक वाचवा ; लेक शिकवा 🔺
                    - नागोराव सा. येवतीकर 

कॉलेजला जाण्यासाठी एसटीच्या पासचे २६० रुपये पैसे नाहीत, वडिलांना आपल्या लग्नाची चिंता आहे, या कारणावरून लातूर जिल्ह्यातील जढाळा गावातील स्वाती विठ्ठल पिटले या विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हे वर्तमानपत्रातील बातमी वाचून खूप दुःख झाले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने वडिलांच्या नावे पत्र लिहून ठेवले. 'माझ्या मरणाचं कारण एवढंच आहे की, माझ्या बसचा पास संपला होता म्हणून आठ दिवस कॉलेजला गेले नाही. आईने कोणाकडून उसने पैसे घेऊन मला पास काढण्यासाठी दिले. त्यानंतर मी कॉलेजला गेले. रोजरोजचे हे टेन्शन असह्य होत आहे,' एवढेच नाही तर तिने पुढे पत्रात म्हटले आहे की,'आई-वडील इतके काबाडकष्ट करतात आणि देव त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ देत नाही. पप्पा मी तुमची परेशानी समजू शकते. आजकाल तुमच्या चेहऱ्यावर खुशी दिसत नाही. मला माहिती आहे, तुम्ही जास्त टेन्शन कोणत्या गोष्टीचं घेता. हेच ना, की तुमच्या दोन मुली लग्नाला आल्यात,' असेही स्वातीने या पत्रात लिहिले आहे. खरोखरच मुलीच्या बापाला खूपच टेंशन असते. गरीब शेतकरी किंवा शेतमजूर यास जर दोन्ही मुली असतील तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च आणि त्यानंतर तिच्या लग्नाच्या खर्चाचा विचार केल्यास टेंशन तर येणारच यात शंका नाही. त्यातल्या त्यात येथील लग्नाच्या पध्दतीने तर वधुपित्याची एकप्रकारे अग्निपरीक्षा होते. वर पक्षाला द्यावयाची वरदक्षिणा म्हणजे हुंडा आणि लग्नात करायचा मानपान याच्या खर्चामुळे वधूपित्याचे अक्षरश: कंबरडे मोडते. त्यात गेल्या दोन - तीन वर्षापासुन निसर्गाची साथ बरोबर नव्हती त्यामुळे सर्वच शेतकरी चिंतातूर होते. स्वातीच्या वडिलांनी २५ हजार रुपये खर्चून टोमॅटोचे पीक लावले होते. ते जळून गेले. त्यातच मळणी यंत्राचे हप्ते थकले. बँकेचा तगादा सुरू होता. त्यात मुलांना शिकवायचे कसे आणि घर चालवायचे कसे, असे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. ही सारी परिस्थिती पाहून स्वाती खचून गेली आणि तिने जीवनयात्रा संपविली.
आजपर्यंत दुष्काळी परिस्थितीचे चटके शेतकरी यांना लागत होते त्यामु़ळे त्यांच्या आत्महत्या हा एक चिंतेचा विषय होता. याची थोड्या फार प्रमाणात महिलांना सुध्दा जाणवू लागले होते परंतु सध्या दुष्काळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण संकटात सापडले आहे. औरंगाबादमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरून दैनंदिन खर्चासाठी पैसे मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण सोडण्याच्या बेतात आहेत. अशी स्थिती प्रत्येक शहरात दिसून येत आहे. मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत सुध्दा काही चांगले चित्र पाहण्यास मिळत नाही. गावात ज्या वर्गापर्यंत शाळा आहे त्याच वर्गापर्यंत शाळा शिकावे अशी बंधने मुलीवर असतात त्यामुळे ते पुढील शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. काही जागरूक पालक आपल्या मुलींना शिकविण्यासाठी गावाबाहेर पाठवीतात परंतु त्याना अनेक दिव्यसंकटातून मार्ग काढावा लागतो. शासन मुलींच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवली आहे आणि राबवित ही आहे. मात्र वीस ते पंचवीस वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या योजना त्यात काहीच बदल न करता जशास तशी राबविली जात आहेत.  महागाई एवढी वाढलेली असताना योजनेत काहीच बदल झाला नाही किंवा बदल करण्यात आला नाही. त्यामुळे ही मदत मुलींच्या पालकासाठी तोकडे ठरत आहे. तरी त्यात काही प्रमाणात बदल केल्यास मुलींच्या पालकांना खूप मोठा दिलासा मिळेल.
** 1 ली ते 4 थी वर्गात शिकणाऱ्या मुलींसाठी त्यांच्या दररोज च्या उपस्थिती नुसार उपस्थिती भत्ता दिली जाते. ती फारच तोकडी म्हणजे 1 रू. प्रति दिवस याप्रमाणे आहे त्या ऐवजी 5 रू. केल्यास मुलींच्या पालकांना खरी मदत मिळेल
आणि ते मुलींना शालेय इतर साहित्य खरेदी करू शकतील.

** इयत्ता 5 वी  ते 7 वी वर्गात शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती भत्ता 60 रू. प्रति महीना असे 10 महिन्यांचे 600 रू. मिळतात. त्या ऐवजी सरसकट सर्वच मुलींना 200 रू. केल्यास मुलींच्या पालकांना खरी मदत मिळेल
आणि मुलींचे उच्च शिक्षण चालू राहील.

** इयत्ता 8 वी  ते 10 वी वर्गात शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती भत्ता 100 रू. प्रति महीना असे 10 महिन्यांचे 1000 रू. मिळतात. त्या ऐवजी सरसकट सर्वच मुलींना 300 रू. केल्यास मुलींच्या पालकांना खरी मदत मिळेल

** अहिल्याबाई होळकर मोफत बस पास योजना पदवी पर्यंत करावी त्यामुळे मुलींच्या शिक्षणात वाढ होईल
**
 शहरी पेक्षा ग्रामीण मुलींच्या शिक्षणाची हेळसांड जास्त होते म्हणून विशेष करून ग्रामीण मुलींच्या शिक्षणाला अधिकचे प्राधान्य देण्यात यावे
** प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी इयत्ता 5 वी ते 10 वी साठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय च्या धर्तीवर 150 मुलींसाठी निवासी वस्तीगृह निर्माण करावेत ज्यामुळे गरीब मुली शिकू शकतील
आणि त्याचा ताण मुलींच्या पालकांवर राहणार नाही.

** " मानव विकास मिशन" अंतर्गत 1ली ते 12 वी पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी मुलींना मोफत पुस्तके ,पास ,वर्षातून कमीतकमी 4 गणवेश आणि मासिक 300 रू. विद्यावेतन देण्यात यावे यामध्ये प्राथमिक ,उच्च प्राथमिक , माध्यमिक ,उच्च माध्यमिक असे टप्पे पाडण्यात यावेत

** एकंदरीतच ग्रामीण भागात बालविवाहचे प्रमाण लक्षणीय आहे .त्यातच 12 वी पर्यंतचे शिक्षण योग्य त्या सोयी सवलती सह आणि अनिवार्य केल्यास, एक तर 18 वर्षापर्यंत शिक्षण होईल आणि मुलींची शारीरिक आणि मानसिक सोबतच सर्वांगीण विकास होईल. आणि त्यातूनच एक सशक्त सबला नारी  आणि कर्तव्यदक्ष महिला म्हणून ती मुलगी तिच्या भावी जीवनात यशस्वी होईल. तेंव्हा कुठे  लेक वाचवा आणि लेक शिकवा उपक्रम खऱ्या अर्थाने राबविली असे म्हणता येईल.

Friday 23 October 2015

** विचार मंथन ** ग्रुप आयोजित
** काव्य मंथन विषय - पौर्णिमा **
** दिनांक : 23 ऑक्टोबर 2015

********************************
चांद मातला नभात
रात पुनवेची आली
साजनाच्या भेटीसाठी
माझी काया आसुसली
* अरविंद कुलकर्णी
( स्पर्धेसाठी नाही )
********************************
पाहुनी तुझा चेहरा,
मन माझं वेडावलं....
पौर्णिमेच्या चंद्रा समं,
तेज तुजला लाभलं....

      @ उत्कर्ष देवणीकर...
**************************************

💥 पौर्णिमा 💥

पौर्णिमेच्या रात्री
चांदण्यांची बरसात
माझ्या सुखी जीवनी
भेटली तुझी साथ
🔺 नासा, धर्माबाद 🔺
**************************************

पुनवेचा चांद अन
दर्याला आला पुर
एका लाटेसरशी
माझ्या नाखव्याला नेल दुर

अरविंद कुलकर्णी
**************************************

तुझ्यासवे मी असेल सखये,
जेंव्हा गगनी पूर्ण चंद्रमा.
दावीन तयाला तुझा चेहरा,
धरतीवरली रूप पौर्णीमा.
सुधीर काटे
**************************************

नजर तुझी झुकलेली
गोर्या गालावर लालीमा
बाहूत अलगद माझ्या आला
तुझा पौर्णिमेचा मुखचंद्रमा
* अरविंद कुलकर्णी
( स्पर्धेसाठी नाही )
********************************
------पौर्णिमा------
       
पौर्णिमेच्या रात्रि,
होते चांदणे टिपुर.....
माझ्या स्वप्नी आली,
प्रियतमा वाजवत नृपुर...

🔵WARANKAR G🔵
      👉नांदेड👈
********************************
सय येता तुझी , प्रिया
दाह होतो रे मनाचा
पोळते हे चांदणे
त्यात हा चंद्र पौर्णिमेचा
* अरविंद कुलकर्णी
( स्पर्धेसाठी नाही )
********************************
तुझ्यासवे मी असेल सखये,
जेंव्हा गगनी पूर्ण चंद्रमा.
दावीन तयाला तुझा चेहरा,
धरतीवरली रूप पौर्णीमा.

डॉ.सुधीर काटे...निगडी,पुणे
********************************
तूच भवानी , रेणूकामाता
अगाध तुझा महीमा ।
तुझी कृपा घेउन आली
कोजागरी पौर्णिमा ।
* अरविंद कुलकर्णी
( स्पर्धेसाठी नाही )
********************************
टिपूर चांदणे शितलता
सुखद सहवास तमा.
जागवत सारे सुखात राहू
कोजागिरीची पौर्णीमा.

डॉ.सुधीर काटे
********************************
तुच माझी सखी
 अन् माझी रती
पोर्णीमेच्या चंद्राहुनही
 प्रेमळ तुझी मजवर प्रिती
संपत
********************************
तू ही अधिर मी ही अधिर
वेळ चालला धिमा ।
प्रतिपदेच्या चंद्राची
होईल कधी ग पौर्णिमा ।
* अरविंद कुलकर्णी
( स्पर्धेसाठी नाही )
********************************
पौर्णिमा===स्पर्धासाठी
================
==प्रेषक-- कुंदा पित्रे==
-------------------------------
चांदणी रात मनात रमली
कि,तुझे नि माझे मैत्र आगळे
टिपुर पुनव उरातच घुसली
कि,अद्वैताचे रूपच वेगळे
********************************
⚪     पौर्णिमा     ⚪
बारा महिन्याचे बारा
प्रत्येक पौर्णिमा महत्वाची
दुधात साखर पडे ती
पौर्णिमा कोजगिरीची
🔺 नागोराव सा. येवतीकर
     मु. येवती ता. धर्माबाद 🔺
( स्पर्धेसाठी )

********************************
नभी उभा सखा चंद्रमा
वाट बघताना पौर्णिमेची..!
आतुरलेल्या चांदन्या सह,
शुभ्र वस्त्र परिधान कलेची..!!
✏ ----------- जी.पी
********************************
रात्र पौर्णिमेची अशी..
विरहात मज पोळते...
आठव निरोप देताना..
पाखराचेही मनं बोलते...

   - सौ.कस्तुरी.
********************************
जीवनीचा खेळ खरा
अमावस कधी पौर्णिमा..!
पाठशिवणीचा मेळ सारा
हास्य वदनी मुखी चंद्रमा..!!
✏ - - - - - - - जी.पी
(स्पर्धे साठी नाही )
********************************
वेडी झाली चांदणी
पाहून चंद्र पौर्णिमेचा..!
उमटली प्रतिमा नभातून,
आठवता दिन कोजागिरीचा..!!
✏ - - - - - - - - - जी.पी
( स्पर्धे साठी नाही )
********************************
सागरास ओढ पौर्णिमेची
शिंपीते जळी  चंदेरी सडा
चांदव्यासंगे मस्ती लाटांची
संगे खेळण्या  येती चांदण्या
अंजना कर्णिक
********************************
चारोळी स्पर्धा
         पौर्णिमा

मनाजोगती होवो वृष्टी
धन धान्याची  संतुष्टी ।
पौर्णिमेचे आनंद गाणे
उमटो बळिराजा ओठी ॥
            डाॅ. शरयू शहा.
********************************
घडो सहवास कोजागिरी
पौर्णिमा थाटात घरी आली..!
लाजली गाली कळी चांदणीची,
 मुखावरि हास्य करून गेली..!!
✏ - - - - - - - - जी.पी
( स्पर्धे साठी नाही )
********************************
ही शरदातील पौर्णिमा
कि प्रभा तव कांतीची
देखणा अति मुखचंद्रमा
ऊताविळ धीट प्रितीची।
अंजना
********************************
जेव्हा केव्हा अपुल्या देशात
नीतीस्वच्छतासत्याचे दर्शन
तेव्हाच होईल खर्या अर्थाने
भारत पौर्णिमा असे हे वर्णन
                  डाॅ.शरयू शहा.
********************************
वाईटाला जाळते  ती होळी पौर्णिमा
सांगे गुरूची महती आषाढ
पौर्णिमाऊत्सव..........।
नवरंगाचे दीवस संपले
वास्तवाचे  येवो आता भान
देव्यांचे विर्सजनझाले
अन सर्वत्र खरकटी घाण।

गणपती नवरात्र दिवाळी
ईद ऊलफित्र वा नाताळ
अख्ख् शहर  कचराकुंडी
अन रोगराईला आमंत्रण।

सण म्हणजे  ध्वनीप्रदुषण
ऊत्सवाचा वेडा ऊन्माद
याचे ही एक राजकारण
कधी होणार परिर्वतन?

ऊत्सवातून जूळतात मनं
कधी भडकतात दंगली
संस्काराच विसरून भान
माणसं होतात जंगली।
अंजना कर्णीक
********************************
✏✒काव्यमंथन ✏✒
 🚩चारोळी स्पर्धा🚩        
 💥पौर्णिमा💥                      
नवरात्रीची पौर्णिमा ती कोजागिरी |                      
दीपावलीची ती पौर्णिमा त्रिपुरारी ||                  
 ख्रिसमस नाताळी असते ती मार्गशिरी |                      
पौष पौर्णिमेस म्हणती शांकभरी  ||                            
----------------------------------------------
आप्पासाहेब सुरवसे , लाखनगांवकर.
********************************
चारोळी स्पर्धा--
पौर्णिमा - -

चंद्र येतो पूर्ण भराला
  कोजागिरी पौर्णिमेला
    हवेतच की सहस्त्र नेत्र
      अवघे सौंदर्य टिपायला
                 डाॅ. शरयू शहा.
********************************
शाकंभरी पौर्णिमा
माया धरतीची।
शारद  पौर्णिमा
चंदेरी रातीची।
होळी पौर्णिमा
वाइटास जाळी।
पुनव कोजागिरी
लक्ष्मी नभी आली।
अंजना कर्णिक
********************************
चारोळी स्पर्धा
पौर्णिमा - -

चिंता काळजी विवंचनाचे
राहू  केतू  ग्रासत असती
पुरुषार्थाची होता पौर्णिमा
सर्व अडचणी  दूर  होती
             डाॅ. शरयू शहा.
********************************
चांदण्या खेळगडी
कॅप्टन पुनवेचा चांद
आकाशीच्या अंगणी
पोचले लाटांच गान।
अंजना
********************************
चारोळी स्पर्धा - -
पौर्णिमा - -

जीवनसाथी गेला सोडून
प्राण कसा हा तगमगतो ।
पौर्णिमेच्या चांदण्यातही
जीव कसा पोळून निघतो ॥
               डाॅ. शरयू शहा.
********************************
किती सूदंर चारोळी
प्रत्येकाची न्यारी
मी वाचून झालो मंत्रमुग्ध
ही चारोळी स्पर्धा आहे प्यारी

ही रात्र अंधारी
नाही कूठे चंद्रमा
फिरतो मी बेभान
कूठे माझी पौर्णिमा
- हुसेन शेख

********************************
पायतळी जरी अंगार
मनी  करुणेची पोर्णिमा
ज्ञानदेव क्षमेचा सागर
दिवा ज्ञानाचा ऊजळला.
अंजना कणिक
********************************
संत सज्जनांची कृपा
धवल चांदणे पौर्णिमेचे
गीत गायन भक्तीने
चभगवताचे पांघरावे चांदणे!
अंजना
********************************
💥💥काव्यमंथन💥💥
📍🚩चारोळी स्पर्धा 🚩📍

 🌙🌜चारोळी स्पर्धा🌜🌙

पुनवचा चांद लय भारी
माझी प्रीति तुझ या वरी
समजून घे गं सजने सणावारी
 महागाई ने घेतली गगन भरारी
 ------------------------
आप्पासाहेब सुरवसे , लाखनगांवकर   .
********************************
स्पर्घेसाठी --
तारुण्य सरले, आली आता पन्नाशी,
पौर्णिमेचा चंद्र आला तुझ्या डोई
आणि त्याचे रुपेरी चांदणे
स्पर्धा करतेय् माझ्या केसांशी ....!
 -सुजाता

********************************
शांत चंद्र होता साक्षीला
तुझी माझी प्रित सजली
त्या पौर्णिमेच्या रात्रीला
उगा नियतीनं फारकत केली
कुंदा पित्रे
********************************
निशीगंधाच  बेभान फुलणं
  सुगंधी लाट  पौर्णिमेला
शरदपुनवेच  शुभ्र चांदणं
अन प्रीति ऐन भराला ।
अंजना
********************************
ही रात्र पौर्णिमेची
हा वेगळा रुप चंद्रमा..!
कलेवराची सुंदर मोहक,
भान विसरे चांदण प्रेमा..!!
✏ - - - - - - - जी.पी
( स्पर्धे साठी नाही )
********************************
शुभ्र तुझी कांती,
कोमल तुझी काया,
पूनवेचा चंद्र ही आला,
मुखदर्शन करावया.
      संदीप,नांदेड.
********************************
अमावास्येचा चंद्र,
कलेकलेने वाढला,
सखे,तुझे वदन,
मज पौर्णिमेचा चंद्र भासला.
     संदीप,नांदेड .
********************************
⚪   पौर्णिमेचा महिमा  ⚪

बारा महिन्याचे बारा
प्रत्येक पौर्णिमा महत्वाची
महिमा पाहूया गडे
प्रत्येक पौर्णिमेची

हनुमान जयंती असे
चैत्र पौर्णिमेला
बुध्द पौर्णिमा येतो
वैशाख महिन्याला

ज्येष्ठ महिन्यात
महिलांची वटपौर्णिमा
आषाढ महिन्यात
शिष्य करे गुरुपौर्णिमा

नारळी पौर्णिमा येते
श्रावण महिन्यात
कोजगिरी म्हणते
आश्विन महिन्यात

कार्तिक महिन्यात
गुरु नानक जयंती
मार्गशीर्ष मध्ये येतो
देवाची दत्त जयंती

पौष महिन्यातील
पौर्णिमा शाकंभरी
शेवटच्या फाल्गुनात
दुर्गुणाची होळी

🔺 नागोराव सा. येवतीकर
     मु. येवती ता. धर्माबाद 🔺
( स्पर्धेसाठी नाही )
********************************
पूनवेच्या कोजागीरी,
केशरयुक्त दूध,
शोधित होतो चंद्र त्यात,
पण प्रिये,दिसले तुझे मुख.
          संदीप,नांदेड.
********************************
पौर्णिमेच्या राती,
चंद्र,तारकांची आरास,
खुलले तुझे सौंदर्य,
प्रवेशीली जेव्हा माझ्या घरास.
     संदीप,नांदेड .
********************************
पौर्णिमेच्या रातीने,
चंद्र,तारकांच्या साक्षीने,
मागतो मी तुला,
तुझ्याच वतीने .
संदीप,नांदेड .
********************************
चारोळी स्पर्धा
पौर्णिमा - -

बाळराजा जेव्हा
        येतो घराशी ।
पौर्णिमेचा चंद्रच
      अपुल्यापाशी ॥
           डाॅ. शरयू शहा.
********************************
अंधारात फिरलो वन वन
पाहाण्यास चंद्रमा
फार फिरलो पण मज
घरात भेटली पौर्णिमा
* शेख हुसेन , हडोळती ( लातूर )
********************************
पौर्णिमेचा चंद्र,
आज वेगळाच भासला,
जणू तारकांच्या मालेने,
गगनीं स्वयंवर मांडिला.
       संदीप,नांदेड .
********************************
पौर्णिमा== प्रेषक  ==कुंदा पित्रे
ज्ञानोबांच्या पौर्णिमेत
सारी मराठी नहाली
पैसाचा खांब मनांत
तुका गाथा सावली

Monday 19 October 2015

वडिलांची सजग भूमिका 

ऑफ पिरियड

श्रध्दा आणि अंधश्रध्दा 

T V न पाहण्याचा संकल्प 


वाचकिया


सौजन्य : नासा
❗: : महाराष्ट्रातील ब्लॉगर टिचर
संकलन
❗ संकलनकर्ता- श्री. सुहास श्रीरंग कोळेकर
zpprimaryschoolkayre.blogspot.in


💻ब्लाॅगर टीचर्स महाराष्ट्र 💻या व्हॉटस अँप ब्लॉगिंग ग्रुपवर असलेले ब्लॉगर टिचर .....

❗श्री. दिपक जाधव
सारोळा कासार अ नगर
www.dipakjadhav888.blogspot.in

❗श्री. संजय पुलकुटे

Www.lmcschools.blogspot.in
Www.lmcschool3.blogspot.in
Www.tcrschool.blogspot.in
Www.tcrschool2.blogspot.in
Www.maazishala.blogspot.in

❗श्री. ज्ञानदेव नवसरे
प्राथ शिक्षक जि प नाशिक
www.dnyanvahak.blogspot.in

❗श्री. गजानन सोळंके
Mirkhel124.blogspot.in

❗श्री. उमेश खोसे
www.umeshkhose.blogspot.in

❗श्री. सुनिल आलूरकर
www.zpguruji.com


🎉 श्री काशिद ए.एस.
गोठोस नं.१,कुडाळ,सिंधुदुर्ग
mahazpschoollive.bloggspot.com/

❗श्री. गजानन बोढे बोढे,सहशिक्षक,जि.प.प्रा.शा.भानुसेवस्ती ता.सिल्लोड जि.औरंगाबाद.
http://www.misulabhak.blogspot.in

❗श्री. सुहास श्रीरंग कोळेकर
जि प शाळा ,कायरे
ता पेठ,जि नाशिक
www.zpprimaryschoolkayre.blogspot.in

❗श्री. राजकिरण चव्हाण
srujanshilshikshak.blogspot.in

❗श्री. राजेंद्र मोरकर
www.rajumorkar.blogspot.in

❗श्री. भरत पाटील
 माळीनगर ता.मालेगाव
http://bhartpatil.blogspot.in


❗श्री. नागेश (नागजी) टोणगे,
जि.प.हायस्कुल मस्सा (खं.) ,
ता. कळंब जि. उस्मानाबाद.
 gurumauli11.blogspot.in


❗श्री. राम राघोजी माळी
जि. प. केंद्रशाळा मुळगाव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे.
www.ramrmali.blogspot.in

❗श्री. आनंद नांदुरकर
जि प शाळा जळगांव नहाटे
ता अकोट जि अकोला
www.zpschooljalgaonnahate.blogspot.in


❗Mr.Sachin vitthalrao shelke
http://zppsmugaon.over-blog.com

❗श्री. शंकर जाधव
shankarjadhav555.blogspot.in


❗श्री. सचिन कडलग, जालना
elearningzp.blogspot.in


❗श्री. अशोक निवृत्ती तळेकर
प्रा.शिक्षक ता.डहाणू  जि.पालघर
👉http://ashoktalekar.blogspot.in/                                                                                                          

❗श्री. संतोष दहिवळ
www.santoshdahiwal.in

❗Shri. Mundhe d d
zpschoolparatwadi.blogspot.in

❗Shri. Govardhan Khambait

Blog address
zpschooljale27201105801peint.blogspot.com
govardhankhambait.blogspot.in

❗Shri. Rajendra pandit
rajendrapandit.blogspot.in

❗श्री. रविंद्र नादरकर
http://ezpschool.blogspot.in/            
❗Shri. Shankar. JADHAV
shankarjadhav55.blogspot.in

❗श्री. आनंद नांदुरकर
जि प शाळा जळगांव नहाटे
ता अकोट जि अकोला
www.zpschooljalgaonnahate.blogspot.in

❗Shri. Pathan  Aadam Khan
Asst.Teacher
Zp devgad
Dist sindhudurg
Zpurduschooldhalavli.blogspot.in

❗ श्री. लक्ष्मण सावंत
http//laxmansawant.blogspot.in

 ❗ श्री. संतोष थोरात
z.p.pri.school, bondarmal
tal-peth, dist-nashik
www.dnyansanjivani.blogspot.in

❗ श्री. शशिकांत फारणे
shashikantfarne.blogspot.in

❗ Shri. Ganesh Satimeshram
zpteacher.weebly.com

❗श्री. खंडागळे सर
khandagaletejal.com

❗श्री. लक्ष्मण वाठोरे
lakshmanwathore.in

❗श्री. रोहोकले सर
mahazpschool.blogspot.in

❗श्री. तानाजी सोमवंशी
tanajisomwanshi.in

❗श्री. हिरोज तडवी
hirojtadvi.blogspot.in

❗श्री. सोमनाथ वाळके
somnathwalke.in

❗श्री. विक्रम अडसुळ
www.krutishilshikshak.blogspot.in

❗श्री. मंगेश मोरे
mangeshmmore.blogspot.in

❗श्री. रमेश वाघ
rameshwagh.blogspot.in

❗श्री. महेश शहाजी लोखंडे
ता.कराड जि.सातारा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) कराड
 http://zppsshindemalasharadnagar.blogspot.com/
पंचायत समिती कराड
http://pskarad.blogspot.com/

❗श्री. निलेश इंगळे
जि प शाळा पारवा
ता. पुसद  जि .यवतमाळ
zpparvaschool.wordpress.com

❗श्री. अशोक फुंदे
शाळा -जि प.प्रा शाळा उभिधोंड.    ता पेठ जि नाशिक zpschoolubhidhond.blogspot.in

❗ श्री. संतोष बोडखे: zppschangdevnagar.blogspot.com
 काम सुरू आहे.

❗श्री. निकाळजे घनश्याम अर्जून ,
जि.प.केंद्रशाळा जोगमोडी, ता.पेठ, जि. नाशिक
zpprischooljogmodi.blogspot.com

❗श्री. हरीदास भांगरे
haridasbhangare.blogspot.com

❗श्री. समाधान शिकेतोड
shikshansanvad.blogspot.com

❗श्री.दिपक बेलवले .
jyotideepakbelawale.blogspot.in

❗श्री. उमेश कोटलवार
hasatkhelatshikshan.blogspot.in

❗श्री. बालाजी मुंडलोड
chhayamundlod.blogspot.in

❗श्री. अरुण सेवलकर
arunsevalkar.blogspot.com

❗श्री. बालाजी केंद्रे
जि प शाळा सोजडबार ता अक्कलकुवा जि नंदुरबार
मुळ गाव लातूर
www.aamhishikshak.blogspot.in

❗श्री. प्रविण डाकरे
Https://pravindakare.blogspot.com


❗ श्री. राजेश्वर पिल्लेवार
ssaparbhani.blogspot.com
rajeshwarpillewar.edublog.org

❗ श्री. रंगनाथ कैले
rangnathkaile.blogspot.com

❗ श्री. रोशन फलके shikshanmarathi.blogspot.com/
आनंदी शिक्षण

❗ श्री. रविंद्र राऊत
जि प प्राथ शाळा देमनवाडी ता कर्जत जि अहमदनगर
demanwadi.blogspot.in

❗ श्री . रवि कोळी सर
जि.प.प्राथमिक शाळा जळू
ता.एरंडोल जि.जळगाव
http://ravikoli.blogspot.com/

❗ श्री. राजु खाडे
khaderaju.blogspot.com

❗ श्री. बालाजी जाधव
www.balajijadhav.in

❗ श्री. रविंद्र भापकर
www.ravibhapkar.in

❗ श्री. समीर लोणकर
zppsjamadadewasti.blogspot.in

❗Shri. Rameshvar Gaikwad  www.zppsganeshwadi.blogspot.com

❗ Shri. Subhash ingle
www.zppsharatkheda.blogspot.com
                                                                    ❗Shri. Anand Anemwad
 http://anandanemwad.blogspot.com/

❗श्री. शाम गिरी
www.zpvenkatitanda.blogspot.com

❗श्री. नागोराव येवतीकर
nasayeotikar.blogspot.com

❗Shri. Syed asif iqbal
HM zp kharepatan tal.kankavli dist.sindhudurg
www.zppskharepatankazi.blogspot.com

❗श्री. तानाजी सोमवंशी
tanajisomwanshi.blogspot.com

❗श्री. भिमा अंदूरे सर. ..
जि.प.प्रा.शा.चिकणगाव
ता.अंबड जि.जालना
Zppschikangaon.blogspot.com

❗श्री. रमेश वाघ
मुक्तचिंतन
rameshmwagh.Blogspot.in

❗श्री. गजानन सोळंके
 Mirkhel123.blogspot.in

❗श्री. शफी सर,ढाणकी
shafisk.wordpress.com

❗श्री. सतिश भोसले सर,बीड
satishbhosale01.blogspot.in

❗ श्री. इब्राहिम चौधरी ,
उमरगा ,उस्मानाबाद
www.guruwarya.blogspot.in

❗श्री. विशाल घोलप, बीड
www.crcpachegaon.blogspot.in
www.aadharprakalpa.blogspot.in

❗श्री. राम सालगुडे
www.ramsalgude.in

🌹: श्री.संदीप वाघमोरे
www.dhyasg.in

💻श्री  निलेश ग्यानोबा इंगळे
जि प शाळा  पारवागाव
ता पुसद जि यवतमाळ
Zpparvaschool.blogspot.com
Zpparvaschool.wordpress.com

💻  आसिफ मौला शेख
मूळ गाव:मु.पो.सिद्धापूर ता:मंगळवेढा
जिल्हा:सोलापूर
शाळा:ज्ञान प्रबोधन विद्यालय,सोलापूर.
pvdnyan.blogspot.in
zpschoolkandalgaon.blogspot.in
तसेच QR CODE तयार केलेला आहे .

💻 श्री प्रसादराजे सर,अकोला
versatileteachers.blogspot.in


📝श्री डाकरे जयदिप दत्तात्रय      जि.प.प्राथमिक शाळा सडादाढोली  ता.पाटण जि.सातारा       jaydipdakare.blogspot.com

🆕 श्री प्रमोद महामुनि
जि प प्रा शाळा,हिवरा,ता.भूम,जि.उस्मानाबाद
eshikshakbhoom.blogspot.com


💻 श्री सुरज शिकलगर
Z.p. school Khandobachiwadi Tal -Palus , Dist ~Sangli
http://eschool4u.blogspot.in

💻 श्री हेमंत मोरे
चाळीसगाव
प्राथमिक आश्रमशाळा राजदेहरे
 http://hemantmore444.blogspot.in

🎉 श्रीमती शुभांगी पोहरे
http://mlmpsubhashmaidan.blogspot.in/2015/10/blog-post.html

🚦श्री  मनोज पटने
जी प प्रा शाळा थड़ी पिम्पलगाव
ता. सोनपेठ जी. परभणी
http://manojpatne.blogspot.in

💾 श्री धम्मानंद बागडे,जळगाव
Zpprimaryschoolkarki.blogspot.in

🛃 श्री सुदाम साळुंके ,
शाळा पेमदरा (आणे)ता.जुन्नर जि.पुणे salunkeguruji.blogspot.in
kendraane.blogspot.in
zpschoolpemdara.blogspot.in

Sunday 18 October 2015

महिलांच्या प्रगतीत पुरुषांची भूमिका 

विचारधारा भाग - 2
आपल्याला काय वाटत ! आपली मुले चांगली व्हावी, यशस्वी व्हावीत असे प्रत्येक पालकाला वाटत,पण आपण एक सुजाण पालक म्हणून त्यासाठी काय करतो ? आज आपल्या मुलांना वयाची ३ वर्ष पूर्ण होत नाही तर आपण नर्सरी /पाळणाघरात टाकून मोकळे.आपण आपला किती आणि कसा वेळ देतो आपल्या मुलांसाठी ह्याचा कधी विचार केला का ? पोटच्या मुलांना प्रेम देण्याइतका वेळ जर आज पालकांकडे नसेल तर !! "पालक असणं वेगळ आणि सुजाण पालक होणे वेगळ" आजच्या काळात पालक होणे हे एक घडणे आहे...
बालकाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासात कुटूंब खुप जबाबदार आहेतच..
- शाम वैजनाथ स्वामी
हिंगोली

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण आणि शिक्षण हक्क कायदा यामुळे मुलींना प्राथमिक शिक्षण होईपर्यंत फार अडचण येत नाही.खरी समस्या सुरु होते उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेताना.
         'शिकून सवरून तरी काय करणार, लग्नच तर करायचे आहे..पुरे आता शिक्षण' हा ग्रामीण भागातील पालकांचा एकमुखी आवाज मुलींच्या शिक्षणातील मोट्ठा अडसर आहे.हे चित्र सार्वत्रिक आहे..
         दहावी नंतर उच्च शिक्षणासाठी बाहेर शहरात ठेवण्यास किंवा जाणे येणे करण्यास आजही ग्रामीण भागातील पालक तयार होत नाहीत..मात्र हे चित्र बदललं पाहिजे..पालकांचाच मुलींवर विश्वास नसेल तर आपणच इतरांना तसा विचार करायला संधी देत असतो हे वास्तव पालकांनी समजून घ्यायला हवं..
शहरी भागात हे प्रमाण थोडं कमी आहे कारण शिक्षणाच्या संधी उपलब्ध असतात..पण महाविद्यालयीन शिक्षणाच्या बाबतीत शहरी पालक सुद्धा काहीसे उदासीन असतात..मुलाच्या उच्च  शिक्षणासाठी घरदार गहाण ठेवणारा पालक मुलींच्या शिक्षणाचा तितक्याच तोलामोलाने विचार करत नाही हे आजचे वास्तव आहे..
        आज शिक्षणात, नोकरीत ,स्पर्धा परिक्षांत अगदी समुद्री तळातील संशोधना पासून तर अवकाश संशोधना पर्यंत मूली कुठेच कमी नाहीत..अग्रेसरच आहेत..यावर्षीच यूपीएससी परीक्षेत भारतातून प्रथम आलेल्या पहिल्या चारही महिलाच आहेत..महाराष्ट्रातूनही अबोली नरवणे प्रथम आली आहे..त्यांच्या यशात आईवाडिलांचा मोठा वाटा असल्याचं त्या अभिमानानं सांगतात..
         पालकांनीच मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे अन तिला उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले पाहिजे..

जरुरी नहीं रौशनी चिरागों से ही  हो ,
बेटियां भी घरमे उजाला करती हैं ।।

राजेश वाघ..
जिल्हा परिषद हायस्कूल बुलडाणा

नमस्कार...

मित्रहो,
        आजच्या काळात आपणास सर्वच क्षेत्रात मुली आघाडीवर दिसत आहेत.आपणास वाटते की मुलींनी पण शिक्षणात खुप प्रगती केली आहे.  हो ! हे खरं आहे.  मुलींना देखील आज शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. संपूर्ण जगात मुंलींच्या शिक्षणाचा प्रसार वाढतोय तरी पण खंत वाटते मित्रहो , की आजही खेड्या गावांत मुलींच्या शिक्षणाकडे जाणिवपुर्वक दूर्लक्ष केल्या जात आहे. खेड्यातील पालक मुलींच्या शिक्षणाकडे विचारपुर्वक लक्ष देत नाहीत.  असे का?
मुली ह्या सर्व क्षेत्रात आघाडीवर असताना त्याच्यावर हा अन्याय का?  मी तर म्हणतो की पालकांनी मुलींच्या शिक्षणाकडे ही जाणिवपुर्वक लक्ष दिले पाहीजे. वर्तमान कालीन पालक देखील पुर्वजांप्रमाणे मुलींचे बालवयात विवाह न करता त्यांनाही शिक्षणाची संधी द्यावी. आजही खेड्यातील पालक कॉलेज तर सोडाच हो माध्यमिक शाळेत पाठविण्यास संकोच करतात. या पालकांना आपल्या मुलींवर विश्वास नसतो का? की हे पालक मुद्दाम स्त्री शिक्षणाच्या विरोधात असतात? की हे पालक स्त्री शिक्षणाबद्दल अजाणते आहेत?  या गोष्टीचा विचार केल्यास मला वाटते

""स्त्री जन्मा ही तुझी कहाणी  ! ह्दयी अमृत नयनी पाणी""  म्हणून मला वाटतं मुलींच्या शिक्षणाबाबतीत पालकांनी विचार करावा.

  "मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी"
माझी सर्व पालकांशी एवढीच विनंती आहे की,
सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, यांचा तरी आदर्श मुलींसमोर ठेवुन आपल्या मुलींच्या शिक्षणाची दखल घ्यावी.


धन्यवाद..

संतोष गंगुलवार ,कासराळी.
हु.गो.पानसरे महाविद्यालय अर्जापुर..बिलोली.

📚📚📚📚📚📚📚📚📚

  🙏. विचारधारा भाग दोन 🙏

📚विषय ----- मुलींच्या शिक्षणात पालकांची भुमिका 📚

मुली खूप हुशार असतात !! पण त्यांना पुढे शिक्षणाची संधी मिळत नाही !! त्यांना पुढे शिकविले जात नाही !!
का ???? मुलींना शाळेत पाठविले जात नाही तर का ??
याचा आपण कधी विचार केलाय ?
हो केलाय मग कारण काय ??
कारण मुळातच स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान आहे. पण कशामुळे ? तर खालील कारणांमुळे 👇
🌀 अनिष्ट रूढी व परंपरा ,
🌀 अंधश्रद्धा व निरक्षरता,
🌀 स्वतः ला कमी लेखण्याची वृत्ती ,
🌀 पुरुषप्रधान संस्कृती .
जर आपल्याला मुलींना फुलवायचं असेल, तिला माणुस म्हणून जगायला शिकवायचं असेल तर आपणास हे आवर्जून करावचं लागेल.

👭 तिला शिक्षणाची व आरोग्याची समान संधी ,
👭 आचाराचे व विचाराचे समान स्वातंत्र्य ,
👭 आहारात व कामात समान वागणूक ,
👭 आणि महत्वाचे म्हणजे समान दर्जा ' निर्णयाचा ' द्यावा लागेल .

आणि हे सर्व शिक्षणावाचून येणार नाही. आणि मुलीच्या शिक्षणात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे "पालक". पालकांना आपल्या विचारांना कृती ची जोड द्यावी लागेल पालकांच्या सहभागानेच मुलींच्या शिक्षणाची टक्केवारी वाढणार, १००% पटनोंदणी होणार.
पण----------------------------------------
🔷शिक्षणात पालकांचा सहभाग कसा असावा ???
🔷सहभागाची पध्दती कोणती असावी ???
या गोष्टी ची दखल घेणे गरजेचे आहे. मुलींच्या शिक्षणात पालकांचा सहभाग हा दोन प्रकारे घेता येतो ,1⃣ शाळेबाबत 2⃣ घराबाबत

पालकांनी मुलीच्या शिक्षणाबाबत खालील भुमिका घेणे आवश्यक आहे.
🔷शाळेबाबत 🔷
👭 घरकामाचा भार मुलीवर न टाकता तिने वेळेवर शाळेत जावे याकरीता कुटूंबात जाणिव निर्माण करणे.
👭 शैक्षणिक व शिक्षणेतर उपक्रमात सहभागी होण्यासाठी संधी द्यावी जेणेकरून मुलींना भावी आयुष्यात फायदा होईल .
👭 शाळेचा अभ्यास व गुणवत्ता वाढ या संबंधी मुलींशी बोलावे.
👭 अभ्यासासाठी सक्ती व बंधने या पेक्षा समजावणे व योग्य समज देणे.
👭 मैत्रिणी कोण ? कुठे राहतात ? त्यांची कौटूंबिक माहिती काय ? यांची माहिती पालकांना असावी .
👭 शाळेशी व शिक्षकांशी वैयक्तिक संपर्क ठेवल्याने पालक समर्थ बनतात.
👭मुलींबद्दलचा संशय , गैरसमज ,राग, खोटेपणाचा आरोप टाळणे .
🔷घराबाबत 🔷
👭 मुलींना समतोल व सकस आहार देणे. शारिरीक स्वच्छतेविषयी आग्रह धरणे .
👭वेळेच्या योग्य उपयोगावर देखरेख ठेवणे .
👭 मुलींसाठी घरामधे मनमोकळे वातावरण असावे , शाळा , शिक्षक , अभ्यास इत्यादी विषयांवर खूली चर्चा करून मुलींना प्रोत्साहन द्यावे .
👭 मुलींची उपजत आवड लक्षात घेऊन छंद जोपासण्यास मदत करावी.
👭 दुरदर्शन वरील कार्यक्रम पाहण्या संबंधीचे मार्गदर्शन करावे. पालकांनी ही सर्व बंधने पाळावीत .

 🔷पालकांनी मुलींचे मित्र व मार्गदर्शक बनून
मुलींच्या शिक्षणात आपली भुमिका पार पाडावी व तिच्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा. जेणेकरून पर्यायाने समाजाचा व राष्ट्राचा विकास साधला जाईल.🔷




👭👭👭👭👭👭👭👭👭




ज्योती बोंदरे, प्राथमिक शिक्षिका, नागपूर

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


🎯🎯 मुलींच्या शिक्षणात पालकाची भूमिका 🎯🎯


भारताची जगात एक वेगळेपण
असलेला सांस्कृतिक देश म्हणुन ओळख आहे; आज नाही तर फार पूर्वीपासूनच .
आर्यामध्ये पितृसत्ताक कुटुंबव्यवस्था होती तरीही स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते. त्यावेळी लोपमुद्रा, गार्गी, घोषा, अपाला इत्यादी विदुषी स्त्रिया होत्या.
पण नंतरच्या काळात धार्मिक व
शिक्षण क्षेत्रातून त्यांची हकालपट्टी झाली व स्त्रियांची
स्थिति खालावली.
भारतात ज्यावेळी स्त्रियांना चूल व मुल शिवाय बाहेर पडायची
परवानगी नव्हती त्याच काळात सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले हे जोडप देवदूताप्रमाणे लोकांचा रोष पत्करून शिक्षण क्षेत्रात जोमाने कार्याला लागले. लोकांनी काही सुखासुखी हे कार्य होऊ दिले नाही; कुणी शेण  फेकले तर कुणी चिखल सुद्धा फेकले पण शिक्षण हे जणू त्यांच्या रक्तातच होत. एवढं होऊन ही त्यांनी आपल कार्यात खंड पडू दिले नाही तर उलट जोमाने सुरू ठेवले.
म्हणजे स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सूर्योदय  झाला होता असे म्हणायला काही हरकत नाही.
पण आज जगाची बदलती परिस्थिती पाहता आपण मुलींच्या शिक्षणात पालक म्हणून कितपत योगदान देतो हे
पाहणे महत्त्वाचे ठरते.
कारण आज भारतात मुलीचे शिक्षण पूर्ण न होण्याची काही कारणे आहेत.
पाहिले म्हणजे मुलीचे शिक्षण एवढे महत्त्वाचे वाटत नाही किंवा महत्त्व देत नाहीत.
मुलगी शिक्षण घेवून काय करणार, ती 10 वीच्या वर्गात जाण्याच्या अगोदरच बापाला तिच्या शिक्षणाची नाही तर लग्नाची चिंता लागते.
एक मुलगी शिकली तर तिच्या मुळे पूर्ण कुटुंब सुधारते, सुशिक्षित  होते.
घरात जुन्या चालीरीतींप्रमाणे  वातावरण ठेवले जाते. मुलाना  शिक्षणासाठी बाहेरगावी जाता येते पण मुलीना तशी परवानगी
मिळत नाही.
तिच्यासाठी घरात मोकळे वातावरण नसते एका चौकटीत
तिला वावरावे लागते. आज तसे  पाहिले  तर जवळ जवळ सर्वच  क्षेत्रात मुली आघाडीवर आहेत.
मुलींच्या प्रगतीच्या संदर्भातील
बातम्या ऐकून, प्रगती पाहून सुद्धा पालकांच्या मनातील न्यूनगंड दूर होत नाही याला दुर्दैव म्हणावे लागेल.
राजमाता जिजाऊ, रणरागिनी राणी लक्ष्मीबाई, वयाच्या 9 व्या
वर्षापासून मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार
करणाऱ्या अहिल्याबाई होळकर
या एक आदर्श राज्यकर्त्या स्त्रिया होत्या. त्या तशा काळात
त्यांना कुणीतरी आधार दिला मार्गदर्शन केल म्हणून आज त्या
आपल्यासाठी आदर्श उदाहरण  आहेत.
आज आपल्या पाल्यांना मार्गदर्शनाची, आधाराची, त्यांना समजून घेण्याची, आदर्श उदाहरण देऊन त्यांचे मनोबल खंबीर करण्याची गरज आहे.
आज विविध क्षेत्रात भारतीय स्त्रिया आघाडीवर आहेत. जसे की चंद्रा नुई, सी ई ओ पेप्सिको,
किरण बेदी पहिली महिला आई पि एस, मायावती माजी मुख्यमंत्री उत्तरप्रदेश, जयललिता विद्यमान मुख्यमंत्री  तमिळनाडु, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,..........
अशी बरीच उदाहरण आहेत  पालकांनी (आपण सुद्धा लेख वाचनारा प्रत्येक जण) यातून बोध घेवून आपल्या पाल्यांसाठी
त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी

सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घेतले तर एक उच्च दर्जाची संस्कारीत, आदर्श जीवन  जगणारी पिढी तयार व्हायला वेळ लागणार नाही.
     
            धन्यवाद....!

👤 बाबाराव रा. पडलवार
      ता. मुखेड जि. नांदेड


शिक्षण म्हणजे मुल स्वतः शिकले पाहिजे .

आपण बलजबरीने आपले विचार मुलीच्या मनावर लादु नये

पालकाने एक मार्गदर्शक म्हणून भुमिका बजावली पाहिजे.


मुलगी शिकत असताना तीला तीच्या वयानुरुप मित्र मैत्रीणी सोबत आपले मन मोकळे करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे




आपण समाजाचे देणे लागतो याची जान करुन देने
तीच्या आरोग्याची काळजी
तिच्यावर करावयाचे संस्कार



गजानन सोळंके परभणी

🌹मुलीच्या शिक्षणात पालकांची भूमिका🌹
 मित्रांनो, कोणत्याच पालकाला वाटत नाही की आपल्या मुलीने न शिकावे उलट मुलगी स्वतःच्याच पायावर उभी कशी राहील याकडेच पालकाचे लक्ष राहते. आज समाजात जी थोडीफार स्री पुरूष समानता दिसतेय ती फक्त पालकांनी आपल्या मुलीला योग्य शिक्षण देऊन स्वतःच्याच पायावर उभी केल्यामुळे दिसत आहे.असे मला वाटते .आपल्या समाजात 3500 जाती आहेत काही जाती अजूनही दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत. त्यांच्यासाठी तर मुलीचे लग्न हीच मोठी जबाबदारी असते व ते दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात मग्न असतात.तरीदेखील आता बरेचसे पालक शिक्षणाप्रती जागरूक होत आहेत. त्यामुळे येणारा काळ हा मुलीचाच आहे .

पंकज भदाणे नंदुरबार


📚 विचारधारा भाग 2 📚
🙍 मुलींच्या शिक्षणात पालकांची  भूमिका🙍

      विषय खुप साधा  व सोपा वाटतो पण खरच खुप विचार करायला लावणारा की  "मुलींच्या शिक्षणात पालकांची भूमिका"!!!

 जिच्या  जन्मावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतो "ती" च्या शिक्षणाचा विचार तर खुप दूर राहिला. "नकोशी" अशी '"ती"....तिला काय शिकवणार हा समाज ????
       आज काळ थोडा बदलला  आहे (?), असे जरी असले तरी मुलींच्या शिक्षणाबाबत ची उदासीनता तितक्या प्रमाणात कमी झाली असे नाही. मुलभुत अधिकाराच्या नावाखाली  मुलींना प्राथमिक शिक्षण मिळते पण पुढे काय ?? तिच्या शिक्षणविषयी आवडीचा विचार करणारे फार कमी आढ़ळतील. याला कारण केवळ पालकांची उदासीनता नाही तर संपूर्ण समाजाची उदासीनता म्हणणे उचित ठरावे.
       ज्या प्रमाणे समाजात विविध घटना घड़तात , तसेच समाजाची मुलीबाबतची  संकुचित विचार प्रवृती ही बदलत नाही तो पर्यंत मुलींच्या शिक्षणाचा मार्ग हा खड़तरच राहील असे मला वाटते. मुलींच्य्या शिक्षणात पालकांबरोबर  समाजाची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे .समाजातील घडमोडीचा परिणाम हा आपल्या दैनंदिन जीवनवर होत असतो , बहुतेक त्यामुळेच की काय मुलींच्य्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असवा.
त्याच बरोबर आपली परंपरा, पालकांची आर्थिक परिस्थिती ही देखील महत्वाची कारणे आहेतच "ती" च्या शिक्षणात अडथळा निर्माण करणारी..
      पण मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांची शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी वयाची मर्यादा असावी ???? त्या लग्नानंतर शिकु शकत नाहीत का ?  जर महात्मा ज्योतिबा फूलेनी त्यांच्या पत्नीला शिकवले व त्या "सावित्रीबाई" देशाच्या पहिल्या शिक्षिका ठरल्या ... त्या प्रमाणे समाजात अजुन ज्योतिबा फुले निर्माण का नाही होत ? मुलींच्या  शिक्षणात पालकांची भूमिका फार महत्वाची आहेच पण जर आजच्या काळात त्याना आपले भवितव्य घड़वायचे असेल तर त्याना त्यांच्या जोड़ीदाराची देखील "साथ" मिळणे तितकेच महत्वाचे वाटते...


सौ.वैशाली रविंद्र गर्जेपालवे
D.ed,B.A,B.ed,M.A,B.sc(2 nd year)*
शहापुर,ठाणे
 
    शेवटी पद्व्या लिहिन्याचा एकच हेतु की  मी लग्नान्तर अजुन शिकते त्या प्रमाणे आपण हि आपल्या जोडीदाराच्या शिक्षनाच्या आवडीचा जरूर विचार करवा. तरच बहुतेक  आपण  "ती" च्या शिक्षणात केवळ पालकांची भूमिका महत्वाची नसून आपण ही थोडा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करावा अशी अभिलाषा!!!!!
🙏🏻धन्यवाद🙏🏻

गावाला शाळेचा अभिमान असावा 

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...