Sunday 21 November 2021

शाळेचा पहिला दिवस ( 1st Day School )

प्रिय शिक्षक मित्रांनो, 
 🙏 नमस्कार

आपल्यासाठी एक खास उपक्रम आहे. आपण सध्या शिक्षक म्हणून कार्य करीत असाल किंवा सेवानिवृत्त देखील झाला असाल. 
पण आपली शिक्षक म्हणून नेमणूक झाल्यावर शिक्षक म्हणून

शाळेचा पहिला दिवस
याविषयी काही आठवणी आपणांस इतरांना सांगायचं आहे. चला तर मग आपल्या आठवणी 500 शब्दमर्यादेत मला खालील क्रमांकावर whatsapp वर पाठवा. 

● आपल्या आठवणी text स्वरूपात पाठवावे. 

● सोबत त्यावेळेचा एखादा फोटो असेल तर पाठवावे. 

● पासपोर्ट आकाराचा आपला फोटो पाठवावे. 

● आपल्या सर्वांच्या सहकार्याने जमल्यास संकलित सर्व लेखांचा एक सुंदर पुस्तक काढू या.


◆ आपण या उपक्रमास भरभरून प्रतिसाद द्याल ह्या अपेक्षेसह आपल्या लेखाची प्रतीक्षा आहे. 

आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

आपल्या शिक्षक मित्रांपर्यत ही पोस्ट जरूर पाठवावे. Share plz
•••••••••••••••••••••••••••••••••••••
माझ्या नोकरीची पहिली शाळा

पावसाळ्याचे दिवस होते. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. सकाळी सातची वेळ आणि मी साखर झोपेत होतो. तशी घरातील फोनची घंटी वाजली ट्रिन ट्रिन, बाबानी फोन उचलले. तिकडून माझे मोठे बंधू बोलत होते त्यांनी म्हटले की, मला शिक्षकांची नोकरी लागली. हे ऐकून मला खुप आनंद झाला पण थोड्या वेळात कळले की, किनवट तालुका मिळाला. हे ऐकल्याबरोबर मी खिन्न झालो. किनवटला मी नोकरी करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती. कारण किनवट म्हणजे पूर्ण जंगली परिसर, त्यातल्या त्यात नक्षलवादी विजयकुमार यांच्या सर्व कारवाया मी वाचून होतो. घरापासून 200 किमी दूर या सर्व बाबीचा विचार करताना अंगावर काटा उभा राहायचा. त्यामुळे किनवट तालुक्यात नोकरी करणार नाही यावर मी ठाम राहिलो. पाच-सहा दिवस उलटले. घरातल्या सर्वानी माझी समजूत काढली. जाऊन फक्त रुजू होऊन ये त्यानंतर आपण एका महिन्यात बदली करू असा विश्वास दाखविला त्यामुळे मी जाण्यास तयार झालो. अखेर 10 ऑगस्ट रोजी किनवटला जाण्यास सकाळी निघालोत दुपारी बारा-एक वाजेपर्यंत किनवटला पोहोचलोत आणि पंचायत समिती मध्ये पत्र दिलोत. सोबत बाबा होतेच. त्यादिवशी ऑफिस मध्ये गटशिक्षणाधिकारी साहेब नसल्यामुळे लॉजवर रात्र काढावे लागले. त्या ठिकाणी माझा वर्गमित्र चंद्रकांत नोमुलवारची भेट झाली तेंव्हा थोडे बरे वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ऑफिस गाठले. त्या दिवशी दुपारी अनंतवाडी संकुलातील प्राथमिक शाळा अजनी या शाळेचे आदेश मिळाले. त्याच ऑफिसमध्ये एक दोघांना या शाळेविषयी आणि केंद्राविषयी विचारणा केली असता ते गाव कोणालाही माहित नव्हते. माझं काळीज धस्स केलं. इथल्या लोकांना हे गाव माहित नाही, कोणत्या जंगलात आहे की, असा विचार मनात डोकावला. तेंव्हा स्वतः गटशिक्षणाधिकारी साहेब श्री शिवाजीराव खुडे यांनी त्या गावाची माहिती दिली, अंनतवाडीला कुपटी असे म्हणतात हे त्यांनी सांगितले आणि बस स्टैंडला जा तेथे तुम्हाला गाडी मिळेल त्या गाडीने तुमच्या शाळेच्या फाट्यावर उतरा. मी आणि बाबा निघालो. बस स्टैंडवर बरोबर अडीच वाजता दत्तमांजरी बस लागली. त्या बसमध्ये बसलो आणि बस शाळेच्या रस्त्याने झाडे मागे टाकित, धुरळा उडवित जाऊ लागली. मी प्रत्येक गाव आणि परिसर पाहू लागलो तसे मला धडकी भरु लागली. लोकांचे राहणीमान, त्यांचे बोलणे, वागणे सर्व वेगळे वाटत होते. कारण मी यापूर्वी कधी ही हा भाग बघितला नव्हता. अखेर माझ्या शाळेचे गाव आले. आम्ही खाली उतरणार तोच त्या शाळेचे मुख्याध्यापक बसमध्ये चढले. त्यांनी परत त्याच बसमध्ये बसायला सांगितले. त्यापुढच्या वझरा शे.फ. गावात आम्ही उतरलो. आमची सर्व कहाणी सांगितली. ते खरंच आम्हांला देवमाणूस वाटला कारण त्यांनी त्या दिवशी त्यांच्या घरीच राहायला आणि झोपायला जागा दिली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 ऑगस्टला मुख्याध्यापक, बाबा आणि मी सकाळी सकाळी शाळेवर जाण्यास निघालो. तोच हा सुवर्ण दिवस, ज्या दिवशी माझ्या नोकरीला सुरुवात झाली. सर्व परिसर पाहून माझ्या मनात विलक्षण भीती भरली होती. मुख्य रस्त्यापासून दोन किमीमध्ये शेताशेतातून त्या शाळेला रस्ता होता. आजुबाजुला जंगल, खुप भीती वाटत होती. मनात पक्का निर्धार केलो की, काही झाले तरी येथे नोकरी करायचे नाही. आत्ता नाही तर पुढील वेळी आपणांस नक्की नोकरी मिळेल. अर्धा तासाच्या पायपीटनंतर शाळेत पोहोचलो. जेमतेम 50 कुटुंब असलेले ते गाव. सर्व घरे सागवानच्या लाकडापासून बांधलेले, मातीचा लेप, एक किंवा दोन घरे पक्की होती. शाळा नशिबाने एकच खोली होती पण पक्की होती. सर्व चिमुकली मुले मुख्याध्यापकांची वाट पाहत उभी होती. ती मुले मला वेगळीच दिसू लागली. आपल्याकडची गोरी गोमटी आणि टापटीप स्थिती मधील मुले माझ्या डोळ्यासमोर होती. बाबांना आणि मला ती मुले निरखुन पाहू लागली. तो दिवस असा तसा संपला. सायंकाळी बाबा गावाकडे निघुन गेले. मी मुख्याध्यापकाच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहिलो. दोन दिवसांनी स्वातंत्र्य दिवस होता. तो दिवस झेंडावंदन करून घरी जाण्याचा नियोजन बाबांनी सांगून गेले होते म्हणून मी झेंडावंदन झाले की दुपारच्या बसने माझ्या गावी घरी आलो. घरी यायला रात्र झाली. घरी आल्यावर रात्रभर रडत बसलो आणि निर्णय दिला की मी त्या शाळेवर नोकरी करणार नाही. दोन दिवस घरी राहण्याची सुटी घेतलो होतो. पण पाच दिवस संपले मी शाळेला गेलोच नाही. पाचव्या दिवशी रात्री परत घरातील सर्वानी मला समजावून सांगितले. नोकरीचे मला काही वाटत नव्हते. माझ्या अभ्यासावर आणि मेहनतीवर मला विश्वास होता. मी कसे ही करून नोकरी मिळवू शकतो याची खात्री होती. ( पण आज वाटत आहे की, मी खरंच खूप मोठी चूक करणार होतो. ) पण बाबांना ही मिळालेली नोकरी सुटु नये असे वाटत होते. सात दिवसानंतर परत एकदा बाबामाझ्या सोबत आले. त्यांनी मला एक खोली घेऊन दिली, सर्व साहित्य घेऊन दिले, त्यांनी दोन दिवस माझ्यासोबत राहिले. मी एकदा तिथे रूळलो की बाबा परत गावी निघून गेले. हळूहळू मला त्या शाळेचा आणि परिसराचा लळा लागला आणि मी त्या दुर्गम शाळेत पाच वर्ष सेवा दिली. त्या शाळेने मला जीवनातील अनेक कडू-गोड अनुभव दिले. त्या गावातील मंडळी मला आज ही आठवतात, आमचे अध्यक्ष रमेश, जायभाये परिवार, अंगणवाडीचे भंडारे ताई, माझे मुख्याध्यापक डी. बी. शेख, बालाजी रेनगुंटवार, जगन्नाथ दिंडे, माधव बाभळे, मोरेश्वर गायधने, अहमद मुल्ला, तेंव्हाचे केंद्राचे मुख्याध्यापक व्ही. बी. सोरते, अशोक गायकवाड, संजय कांबळे, संजय कळसकर, मारोती चोंडीकर, केरबा उमाटे,मंगेश हानवते, दिगंबर शेंगेपलू, स्व. सुभाष कराड, असे अनेक चांगले जिवाभावाचे मित्र दिले. माहूर शहरात ज्यांच्या घरी किरायाने राहत होतो ते सुभाष जाधव आणि परिवार यांचा स्नेहही स्मरणात आहेच. कुपटी गावात ज्यांनी मला त्यांच्या कुटुंबात एका परिवारातील सदस्यांसारखे प्रेम दिले ते संपूर्ण टेकाळे परिवार, ज्यांच्या घरी किरायाने होतो ते डॉ. सातव परिवार आणि कदम परिवार यांनी खरा आधार दिला. रिकामा वेळ गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्यात घालवत असे. त्या सर्व मित्रांची आज ही आठवण कायम स्मरणात आहे. यापैकी कोणाला ही विसरणे अशक्य आहे. आज मला राहून राहून वाटते की, कदाचित तेंव्हा मी त्या शाळेला धुडकावलो असतो तर आज मी जसा आपणास दिसतो आहे तसा राहिलो नसतो, नक्की वेगळाच भेटलो असतो. माझ्या पहिल्या शाळेची ही आठवण मी जीवनभर विसरु शकत नाही. आज 12 ऑगस्ट रोजी माझ्या नोकरीला 21 वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने केलेली एक आठवण
  1. - नागोराव सा. येवतीकर
    प्राथमिक शिक्षक
    मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड

  2. •••••••••••••••••••••••••••••••••••
19/11/2001

... शाळेचा पहिला दिवस.!
जि प नांदेड ची प्रा शा करोडी ची ऑर्डर मिळाली आणि आनंदाने मोठ्या दादाने 18 तारखेस उमरखेड येथे रूम घेऊन दिली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी नागचौकात येऊन शाळेला जाण्यासाठी काही ऑटो, जीप मिळते का पहायला लागलो,तर कळले तिकडे जाण्यासाठी आपल्याला दोनच साधन आहेत. एक तर पायी किंवा सायकलवर! त्यावेळी मोटार सायकल थोडी दुर्मिळच होती.
... पर्याय नव्हता , सायकल टॅक्सी दुकानाशिवाय!
  ...खरी मजा इथून सुरू झाली.
.... टॅक्सी दुकानवाला ओळख नसल्यामुळे सायकल द्यायला तयार नाही.! ... आणि ओळखीचे तर कुणीच नव्हते पूर्ण शहरात!
      काय करावे कळेना... शेवटी त्यांना माझी नेमनुक ऑर्डर, मार्कमेमो असली सगळी कागदपत्रे त्यांना दाखविली...शेवटी हो नाही म्हणता म्हणता ते दुकानदार तयार झाले! पण त्यांनी अट घातली,की एक मार्कमेमो त्यांनी ठेऊन घेतला, सायकल संध्याकाळी परत आणून दिल्यावर परत देणार!..आणि 8 तासाचे 20 रुपये  लागतील असे सांगितले... मला पर्याय नव्हता..

.... ती टॅक्सी त्यादिवशी नेली ... परत शाळा सुटल्यावर परत केली.. त्यावेळी मी जॉईन झालेल्या शाळेतील माझे ज्येष्ठ सहकारी श्री पठाण सर यांनी त्या सायकल वाल्यास ओळख करून दिली आणि माझा मार्क मेमो परत घेतला...

... त्या दिवशी आमचे मोठे बंधू गजूदादास ही हकीकत STD बूथ वरून फोन करून सांगितली आणि रोज 20 रुपये म्हणजे खूप खर्च होईल !
  ... दादा दुसऱ्या दिवशी आले आणि ही सायकल घेऊन दिली !... सायकलचा प्रश्न तर सुटला आणि त्यापेक्षा रेंजर सायकल वापरण्यास मिळण्याचा आनंद खूप झाला!!

.... खरं सांगतो त्यानंतर मोटारसायकल , कार  घेतल्या बदलल्या पण जो आनंद 20 नोव्हेंबर2001 रोजी मिळाला तसला आनंद पुन्हा नाही!! 

...ही सायकल ,आणि मी जॉईन झाल्यानंतर पहिल्यांदा ज्या बॅच ला शिकविले ती बॅच आठवणीत असते नेहमीच!!

.......इतर वाहनांच्या पावत्या कुठे पडल्या असतील, पण 20 वर्षांपासून जपून ठेवलीय ही पावती !!
    .... या पावतीसोबत माझ्या जि प मधील सेवेला 20 वर्ष पूर्ण !!! 😊😊

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...