Thursday 8 June 2023

पंढरीची वारी ( Pandhari Wari )

          पंढरीची वारी

तुकोबांची गाथा । ज्ञानोबाचे ज्ञान । 
नामाचे भजन । मुखी असे ।।

समर्थांचे श्लोक । नाथाचे भारुडे ।
चोखा मेळा घडे । संगतीत ।।

पहाटे काकडा । सायं हरीपाठ । सज्जनाची गाठ । कीर्तनात ।।

सावळा विठ्ठल । उभा तो पंढरी ।
चंद्रभागे तिरी । वाट पाही ।।

हरीचा तो भक्त । भजनात दंग ।
गातसे अभंग । रातदिन ।।

पायी दिंडी चाले । आषाढी कार्तिकी । 
हरी नाम मुखी । घरोघरी ।।

मन हे चंचल । नसे जरा स्थिर ।
वाहे सैरभैर । चहूकडे ।।

श्रावण मासात । पावसाचा जोर । 
जिवा लागे घोर । हर एक ।।

नको ती काळजी । करू नको चिंता ।
विठ्ठलच आता । मदतीला ।।

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

Wednesday 7 June 2023

विद्यार्थी लाभाच्या योजना ( Vidyarthi Labhachya Yojana )

01) शालेय पोषण आहार योजना ज्याचे सध्याचे नाव प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना

उद्देश्य - विद्यार्थ्यांची गळती कमी करणे आणि कुपोषण थांबवणे. 

इ. 1 ली ते 8 वी पर्यंत शिकणा-या शासकीय, निमशासकीय, खाजगी-अनुदानित शाळाांमधील सर्व विद्यार्थ्यांना यांचा लाभ मिळतो. ही योजना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहाराव यांनी 22/11/1995 पासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जून 2002 पासून शिजवलेले अन्न देण्यास सुरुवात झाली. 

शासकीय आदेशाप्रमाणे इ. 1ली ते 5 वी साठी 100 ग्रॅम ताांदूळ, तर इ. 6 वी ते 8 वी = 150 ग्रॅम ताांदूळ या प्रमाणात अन्न शिजवले जाते. 


02) मुलींचा उपस्थिती भत्ता 

उद्देश्य - दुर्बल घटकातील मुलींना शाळेत येण्यास प्रोत्साहन मिळावे. आणि शिक्षणातील सातत्य टिकावे. मुलींचे गळतीचे प्रमाण कमी होऊन उपस्थितीचे प्रमाण वाढविणे. 

1) इ. 1 ली ते 4 थी पर्यंतच्या आदिवासी क्षेत्रातील व  दारिद्र्यरेषेखालील सर्व मुली. 

2) आदिवासी क्षेत्राबाहेरील अनु.जाती, अनु.जमाती, नवमुक्त जाती/भटक्या जमातीच्या मुलींना. 3) किमान उपस्थिती 75 टक्के असणाऱ्या मुलींना प्रतिदिन एक रुपया याप्रमाणे मुलींचा उपस्थिती भत्ता दिला जातो. 

4) वर्षभरातील एकूण कार्यदिनापैकी 220 रु. अनुज्ञेय आहे. 

5) ही योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी म्हणजे 03 जानेवारी 1992 रोजी सुरू करण्यात आली. 


3) मोफत पाठ्यपुस्तक योजना

 इ. 1 ली ते 8 वी पर्यंत शिकणाऱ्या खाजगी अनुदानित, शासकीय, निमशासकीय शाळेतील सर्व विद्यार्थी. या योजनेसाठी पात्र आहेत. 

उद्देश्य - ई. 1ली ते 8 वी मध्ये शिकणारे बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये. शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे


04) मोफत गणवेश योजना

 इ. 1 ली ते 8 वी पर्यंत शिकणाऱ्या शासकीय, निमशासकीय शाळेतील सर्व विद्यार्थी. *अनु.जाती, अनु.जमाती व दारिद्र्यरेषेखालील सर्व मुले. वार्षिक दोन गणवेशाकरिता 600 रु. प्रति लाभार्थी याप्रमाणे अनुदान मिळते. 

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोफत गणवेश 

*इ. 1 ली ते 4 थी मध्ये शिकणाऱ्या खाजगी अनुदानित, शासकीय, निमशासकीय शाळेतील अल्पसंख्याक विद्यार्थी. वार्षिक दोन गणवेशाकररता 400 रु. प्रती लाभार्थी


आदिवासी विद्यावेतन 

आदिवासी मुलींमधील गळती थांबवण्यासाठी प्रोत्साहन भत्ता

विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षित करणे व प्रोत्साहन देणे. 

1) इ. 5 वी ते 10 वी चे विद्यार्थी. 2) अदिवासी / बिगर आदिवासी क्षेत्रातील सर्व आदिवासी विद्यार्थी (पालकाचे उत्पन्न एक लाख पेक्षा कमी असावे.)

3) किमान 75 टक्के उपस्थिती 4) चांगली वर्तणूक व समाधानकारक प्रगती. मुले 500/- मुली 600/-

5) योजना सन २००३-०४ पासून सुरु करण्यात आली आहे. 


6) आदिवासी स्वर्णजयंती शिष्यवृत्ती 

विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षित करणे व प्रोत्साहन देणे. 

1) सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळामधील इ. 1 ली ते 10 वी च्या अनु.जमातींचे विद्यार्थी. 2) पालकाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी. 3) विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बॅंकेतील खाते अनिवार्य. इ. 1 ली ते 4 थी = 1000/- इ. 5 वी ते 7 वी = 1500/- इ. 8 वी ते 10 वी = 2000/-


अस्वच्छ व्यवसायाचे काम करणा-या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती 

* मुलांना शिक्षण प्रवाहात आणणे. * शिक्षणाची सोय करणे. इ. 1 ली ते 10 वी मध्ये शिकणारे अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांची मुले. 110 रु.प्रति माह प्रति लाभार्थी(10 महिने फक्त) व 750 रु. वार्षिक अनुदान. एकूण=1850 रु.


समाज कल्याण विभागाकडून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती


उद्देश्य - मुलींची गळती थांबणे . 

इ. 5 वी ते 10 वी तील अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त-भटक्या, अनुसूचित जाती फक्त मुली. 

इ. 5 वी ते 7 वी = 60 रु. दरमहा

ही योजना 1995-96 मध्ये सुरू झाली तर  

इ. 8 वी ते 10 वी = 100 रु. दरमहा (फक्त 10 महिन्याकरिता)

ही योजना 2002-2003 मध्ये सुरू झाली. 


सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना ( 1990 पासून सुरू झाली ) तत्कालीन शिक्षण संचालक वि वि चिपळूणकर यांनी ह्या उपक्रमाची सुरुवात केली. 

आर्थिक / दुर्बल घटकातील विद्यार्थांना मदत करणे. आर्थिक / दुर्बल घटकातील विद्यार्थांना शाळा व्यवस्थापन समितीची सभेत पूर्व परवानगी घेणे, उपस्थिती 75 टक्के. 30 रु. दरमहा (फक्त 10 महिने)



अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत बस प्रवास ( 13 ऑगस्ट 1996 रोजी शासकीय परिपत्रक काढण्यात आले. )

मुलींना शिक्षण प्रवाहात आणणे.

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला प्रेरणा देणे 

1) इ. 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थिनी पुढे चालून ही योजना बारावी पर्यंतच्या मुलींसाठी करण्यात आली. 2) गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसेल तरच लाभ. 3) 75 टक्के उपस्थिती अनिवार्य राहत्या गावापासून शाळेपर्यांचा बस प्रवास मोफत.


राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थांना नुकसान भऱपाई देणे. विद्यार्थाचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास / मृत्यू झाल्यास. मृत्यू = 75000 रु., कायम अपंगत्व = 50000 रु., एक अवयव / डोळा निकामी झाल्यास = 30000 रु.



पूर्व माध्यमिक /माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे. इ. 4 थी व 7 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ताधारक विद्यार्थी. पुढील 3 वर्षासाठी शिष्यवृत्तीचा लाभ इ. 4 थी = 750 रु. प्रति वर्ष (5वी, 6वी, 7वी), इ. 7 वी = 1000 रु. प्रति वर्ष (8वी, 9वी, 10वी)


मुलींची सैनिकी शाळा - 

राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा पिरंगुट जि. पुणे येथे आहे. 

* मुलींना सैनिकी शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करणे. 

* मागासवर्गीय मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनीत प्रवेश मिळवणे. 

* शिस्त, आत्मविश्वास, देशभक्ती, नेतृत्व विकसित करणे. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.

* 1997 मध्ये सुरू झालेली, महाराष्ट्रातील मुलींसाठीची पहिली आणि देशातील दुसरी मिलिटरी स्कूल

*इयत्ता सहावी वर्गात येथे प्रवेश मिळतो. बौद्धिक व शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाते. 


मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृह 

मागासवर्गीय मुलामुलींना शिक्षण घेता येणे. मागासवर्गीय मुलामुलींना प्रस्ताव सादर करणे. --------



शासकीय विद्यावेतन 

ग्रामीण, होतकरू, हुशार चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे व दर्जेदार शिक्षण देणे. स्पर्धा परीक्षा (गुणवत्ता निकषांनुसार इ. 5 वीत प्रवेश) --------



राजमाता जिजाऊ सायकल वाटप 

मुलींना माध्यमिक शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे. 

1)दुर्गम / अति दुर्गम / झोपडपट्टी / गलीच्छ वस्तीतील मुलींना प्राधान्य. 2) इ. 7 वीत किमान 45 टक्के गुण (अट) 3) दारिद्रय रेषेखाली असणे आवश्यक. प्रत्येकी एक सायकल इ. 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना.



अल्पसंख्यांक प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती 

अल्पसंख्यांक मुलांना शिक्षणास प्रोत्साहित करणे. 

1) मुस्लीम, ख्रिचन, बौद्द, शीख, पारसी धर्मातील विद्यार्थी 2) शासकीय / नीमशासकीय, मानयताप्राप्त खाजगी शाळामधील अल्पसंख्यांक विद्यार्थी 3) 50 टक्के पेक्षा जास्त गुण आवश्यक 4) एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न 5) एका कुटुंबातील दोनच विद्यार्थांना शिष्यवृत्ती 6) 30 टक्के शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव. प्रति वर्षाला 1000 रु. पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात.



अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता 

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी, उपस्थथती किमान 75 टक्के. 2 रु. प्रतिदिन


शालेय आरोग्य तपासणी 

* मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे. 

* विद्यार्थांना संदर्भसेवा पुरवणे. 

इ. 1 ली ते 8 वी चे सर्व विद्यार्थी वर्षातून एकदा तपासणी



अपंग शिष्यवृत्ती 

अपंग विद्यार्थांना शैक्षणिक प्रवाहात आणणे. 

1) इ. 1 ली ते 12 वी चे अपंग विद्यार्थांना 2) 40 टक्के पेक्षा जाथत अपंगत्व प्रमाणपत्र आवश्यक. समाजकल्याण विभागाकडून इ. 1 ली ते 4 थी = 600 रु. प्रति वर्ष , इ. 5 वी ते 7 वी = 750 रु. प्रति वर्ष, इ. 8 वी ते 10 वी = 1000 रु. प्रति वर्ष.


राष्ट्रीय प्रज्ञा शोध (N.T.S.) 

शिष्यवृत्ती प्रज्ञावान विद्यार्थाचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे. 

1) इ. 10 वी चे विद्यार्थी - राष्ट्रीय प्रज्ञा शोध (N.T.S.) राष्ट्रीय स्तर परीक्षेत गुणवत्ता यादीत येणे आवश्यक. 2) देशात फक्त 1000 विद्यार्थी निवडले जातात. एन. सी. ई. आर. टी कडून 1) इ. 11 वी ते 12 वी = 1250 रु. दरमहा, 2) पदवीपूर्व शिक्षण व पदव्यूत्तर शिक्षणासाठी = 2000 रु. दरमहा, 3) पी.एच.डी विद्यार्थासाठी विद्यावीठ अनुदान आयोगाच्या नियमाप्रमाणे



राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी(N.M.M.S.) शिष्यवृत्ती 

आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यायांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना इ. 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत करणे. 

1) इ. 8 वी चे विद्यार्थी 2) पालकाचे वार्षिक उत्पन्न 150000 पेक्षा कमी असावे. 3) संबधित परीक्षेतील गुणवत्ता यादी व सामाजिक आरक्षणाप्रमाणे निवड एन. सी. ई. आर. टी./मानव सांसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली कडून 1) 12 वी पर्यंत = 500 रु. दरमहा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु ( Droupadi Murmu )

 आदिवासी नायिका : द्रौपदी मुर्मु
भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक व भारतीय सशस्त्र दलांचे सरसेनापती (कमांडर-इन-चीफ) असतात. भारतातील सर्वोच्च आणि अत्यंत महत्वाचे पद म्हणजे राष्ट्रपती. अश्या या पदावर आजपर्यंत डॉ. राजेंद्र प्रसाद ते रामनाथ कोविंद असे चौदा राष्ट्रपती या देशाने पाहिले आणि अनुभवले. पंधरावे राष्ट्रपती म्हणून सुश्री द्रौपदी मुर्मु यांनी जुलै 2023 मध्ये शपथ घेतल्या. ओरिसा राज्यातील मयुरभंज जिल्ह्यातील उपरबेडा या छोट्याश्या गावात आदिवासी जमातीत जन्मलेल्या सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या भारताच्या सर्वोच्च अश्या राष्ट्रपती पदावर विराजमान होतांना प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटत होता. सोशल मीडियात चर्चेत नसलेले, प्रसिद्धी ज्योतात नसलेले, शांत व्यक्तिमत्त्व अचानक लोकांच्या समोर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व भाजपा पक्षाने केले. तेव्हा सुश्री द्रौपदी मुर्मु कोण आहेत ? त्यांचा जन्म कोठे झाला ? त्यांचे शिक्षण कुठपर्यंत झाले ? त्यांचे जीवन कसे आहे ? असे प्रश्न सामान्य नागरिकांना पडणार यात शंकाच नाही. सामान्य नागरिकांच्या याच प्रश्नांना उत्तर मिळावे आणि भारताचे पहिले आदिवासी महिला राष्ट्रपती सुश्री द्रौपदी मुर्मु यांची माहिती सर्वांना व्हावी या निर्मळ हेतूने लेखक विनोद पंचभाई यांनी सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु हे चरित्र पुस्तक वाचकांसमक्ष ठेवले आहे.
 मराठी साहित्य क्षेत्रात विनोद पंचभाई यांचे नाव सर्वदूर पोहोचले आहे ते त्यांच्या लेखनशैलीमुळे. समाजातील सर्व स्तरावरील वाचकांसाठी ते लिहितात. चरित्र लेखन आणि रहस्यमय कथा लिहिण्यात त्यांचा खूप मोठा हातखंडा आहे. हॉटेल हवेली ही त्यांची रहस्यमय कादंबरी खूप गाजलेली आहे. त्याचसोबत त्यांनी बालसाहित्य देखील लिहिले आहे. भारताचे आजपर्यंत झालेले राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भारतीय शास्त्रज्ञ यांच्यावर देखील त्यांचे पुस्तकं प्रकाशित झाले आहेत. विनोद पंचभाई हे अभ्यासपूर्ण लेखन करतात, त्यासाठी त्यांना अनेक पुस्तकांचे वाचन, खूप भटकंती आणि टिप्पणी लिहून ठेवावे लागतात. त्यांच्या पुस्तकावरून त्यांनी केलेले चिंतन आणि मनन हे सारं लक्षात येते.
भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती सुश्री द्रौपदी मुर्मु यांच्याविषयी सोशल मीडियात कुठेच काही माहिती उपलब्ध नव्हती. कारण त्या प्रसिद्धीपासून कोसो दूर राहत होत्या. त्यांचा स्वभाव म्हणजे नेकी कर दर्या में डाल. कधी त्यांना आपल्या कामाची प्रसिद्धी व्हावी असे वाटले नाही की त्यांनी गवगवा केली नाही. अगदी शांत चित्ताने, मन लावून आणि पक्षप्रमुखाने दिलेली जबाबदारी नेटाने पूर्ण करीत राहिल्या. सन 1999 मध्ये पहिल्यांदा ते राजकारणात उतरल्या आणि नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय सेवेला प्रारंभ केल्या आणि अवघ्या 23 वर्षाच्या कारकिर्दीत देशाच्या सर्वोच्च अश्या पदावर विराजमान झाल्या. अर्थातच हे सहजासहजी घडले नाही किंवा कोणती जादू झाली नाही. तर यामागे सुश्री द्रौपदी मुर्मु यांची पक्षश्रेष्ठीशी असलेली निष्ठा, जनतेसोबत असलेले प्रेमपूर्वक संबंध आणि समाजातील तळागाळातील आपल्या जमातीच्या आदिवासी लोकांच्या समस्येची जाण ठेवून त्यांनी केलेले निस्वार्थ काम या साऱ्याचे एकत्रित फळ म्हणजे राष्ट्रपती पद होय. लेखकांनी याविषयी आपल्या पुस्तकात संदर्भासहित सुंदर अशी माहिती दिलेली आहे. ते वाचतांना सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या अजून महान ठरतात.
भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाविषयी बोलतांना म्हणतात की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्याचे जो कोणी प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाने माणसाला ज्ञान मिळते, ज्ञानामुळे माणूस विचार करू लागतो आणि त्याला जीवन जगण्याचे कौशल्य मिळते. भारतीय शिक्षणतज्ज्ञ महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून थांबले नाही तर तळागाळातील गरीब लोकांच्या मुलां-मुलींसाठी शाळा सुरू केल्या. त्यांच्या मते घरातील एक पुरुष शिकला तर फक्त तोच शिकतो आणि घरातील एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंबाला ती शिकविते. समाजातील मुलींना शिकविण्यासाठी महात्मा फुले यांनी स्वतःच्या पत्नीला अगोदर शिकविले आणि शिकविण्यासाठी तयार केले. याचाच आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून सुश्री द्रौपदी मुर्मु यांनी आपले कार्य केले. त्यांच्या गावात फक्त सातवी वर्गापर्यंत शिक्षण घेण्याची सुविधा. त्यापुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना गाव सोडणे गरजेचे होते. घरची परिस्थिती आणि सामाजिक स्थिती या दोन्ही संकटाशी दोन हात करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्या गावातून शिक्षण घेणारी सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या पहिल्या होत्या. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते, त्यामुळे त्यांनी संघर्ष केला पण शिक्षण सोडले नाही. आपण जसे शिकलो तसे समाजातील इतर मुली देखील शिकल्या पाहिजे यासाठी त्यांनी अगदी निस्वार्थपणे शिकविण्याचे कार्य केले. लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला जे अनुभव येतात ते अनुभव त्यांना देखील आले पण त्यांनी समाजासाठी व देशासाठी उंबरठा ओलांडून शिकविण्याचे काम केले. हे त्यांचे पहिले धाडसी पाऊल होते जे की, राष्ट्रपती होण्यासाठी कारणीभूत ठरले म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
माणसाच्या जीवनात अनेक चढ-उतार येत असतात. जीवनात सुख आणि दुःखांचा पाठशिवणीचा खेळ चालूच असतो. सुख मिळाले म्हणून हरखून जाऊ नये आणि दुःख मिळाले म्हणून स्वतःला संपवून टाकू नये. प्रत्येक गोष्टीचा सामना करीत, त्या प्रसंगाशी दोन करीत जीवन जगण्यात खरी मजा आहे. सुश्री द्रौपदी मुर्मु या आज राष्ट्रपती पदावर दिसत आहेत, ही खरोखरच आनंदाची व अभिमानाची बाब आहे. पण त्यांनी आपल्या जीवनात कोणत्या संकटाला तोंड दिले आणि काय दुःख पचविले ? हे जर एकदा त्यांच्या अंतरंगात डोकावून पाहिलं तर ते किती महान आहेत ? याची प्रचिती येते. शालेय शिक्षण पूर्ण करण्यात त्यांना खूप कष्ट सोसावे लागले, लग्न झाल्यानंतर ही त्यांनी निस्वार्थपणे एक ही रुपया पगार न घेता शिकविण्याचे काम केले. ऐन उमेदीच्या काळात, घरात सुख आणि आनंद नुकतेच प्रविष्ठ झालेले असताना पाच वर्षात चार मोठे धक्के त्यांना बसले. पहिल्यांदा मोठ्या मुलांचा मृत्यू, नंतर लहान मुलांचा मृत्यू त्यानंतर पती देखील सोडून गेले. याच दुःखाच्या काळात लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. जवळजवळ सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या ढासळल्या होत्या. पण त्यांच्या एकुलत्या एक मुलीने त्यांना सावरले, प्रजापिता ब्रह्मकुमारी यांनी आध्यात्मिकची जोड देऊन त्यांना ध्यानधारणा करण्यास प्रवृत्त केले. असे म्हणतात की, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही. या सर्व गोष्टीचा अनुभव सुश्री द्रौपदी मुर्मु यांना अनुभवावे लागले.
लेखक विनोद पंचभाई यांनी अति परिश्रम, अनेक संदर्भ पुस्तक वाचून, सुश्री द्रौपदी मुर्मु यांच्या संपर्कात व सहवासात आलेल्या  लोकांच्या भेटी घेऊन, प्रत्यक्षात सुश्री द्रौपदी मुर्मु यांच्या जन्मगावी उपरबेडा येथे भेट देऊन हे अप्रतिम असे पुस्तक लिहिले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक नागेश शेवाळकर यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. रमेश भारताल यांनी सुश्री द्रौपदी मुर्मु यांचे सुंदर चित्र पुस्तकावर रेखाटले आहे. पुणे येथील दुर्वा एजन्सीजने हे पुस्तक प्रकाशित केले असून त्याची किंमत फक्त 250 रु. आहे. भारत आजपर्यंतचे देशाचे राष्ट्रपती आणि त्यांचा स्वभाव कसा होता ?सुश्री द्रौपदी मुर्मु यांची निवड कशी झाली ? इतर सर्व राष्ट्रपती पेक्षा सुश्री द्रौपदी मुर्मु यांचे जीवन कसे वेगळे आहे ? याची माहिती जाणून घेण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने विशेष करून महिलांनी हे पुस्तक जरूर वाचावे असे वाटते. त्यासाठी आपण लेखक विनोद पंचभाई यांच्या 9923797725 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून पुस्तकाची प्रत मागवून घ्यावे. भविष्यात लेखकांच्या हातून असेच अप्रतिम पुस्तक वाचकांस वाचण्यास मिळत राहो ही सदिच्छा आणि पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा ......!

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवावे. 

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...