Saturday, 28 February 2026

जागतिक नागरिक संरक्षण दिवस - 01 मार्च ( World Civil Defence Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आजच्या कार्यक्रमात आपण जागतिक नागरी संरक्षण दिन यां विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

🌍 World Civil Defence Day
जगभरात दरवर्षी १ मार्च रोजी ‘जागतिक नागरी संरक्षण दिन’ साजरा केला जातो. नैसर्गिक आपत्ती, अपघात, युद्धस्थिती किंवा अन्य संकटांच्या काळात नागरिकांचे संरक्षण करणे आणि त्यांना सुरक्षिततेबाबत जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
हा दिवस International Civil Defence Organization (ICDO) या संस्थेच्या पुढाकाराने साजरा केला जातो. १ मार्च १९७२ रोजी या संस्थेची अधिकृत स्थापना झाली. त्यानिमित्ताने हा दिवस ‘जागतिक नागरी संरक्षण दिन’ म्हणून घोषित करण्यात आला.
नागरी संरक्षण म्हणजे आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे जीवित व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी केलेली तयारी व उपाययोजना. यात भूकंप, पूर, आगी, चक्रीवादळ, महामारी, दहशतवादी हल्ले इत्यादी संकटांचा समावेश होतो.
या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे, नागरिकांना प्रथमोपचार व सुरक्षिततेचे प्रशिक्षण देणे, आपत्तीच्या काळात स्वयंसेवकांचे योगदान अधोरेखित करणे, शाळा, महाविद्यालये व कार्यालयांत सुरक्षा सराव (Mock Drill) आयोजित करणे.
भारतात नागरी संरक्षण कार्य गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली चालते. विविध राज्यांमध्ये स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाते. आपत्तीच्या वेळी बचावकार्य, प्रथमोपचार, अन्न-वाटप, लोकांना सुरक्षित स्थळी हलविणे अशी महत्त्वाची कामे केली जातात. राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाईन 112 अशी आहे. रस्त्यावर अपघात झाल्यास 108 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलाविता येते. 
विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे मूलभूत ज्ञान घेणे, शाळेतील सरावात सहभागी होणे आणि संकटाच्या काळात शांतता राखणे आवश्यक आहे. जागरूक नागरिक हा सुरक्षित समाजाचा पाया असतो.
जागतिक नागरी संरक्षण दिन आपल्याला सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देतो. संकटे कधीही येऊ शकतात, परंतु योग्य प्रशिक्षण, सज्जता आणि सामूहिक प्रयत्न यांच्या बळावर आपण त्यांचा सामना करू शकतो. म्हणूनच या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - जगभरात दरवर्षी १ मार्च हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, जगभरात दरवर्षी १ मार्च रोजी ‘जागतिक नागरी संरक्षण दिन’ साजरा केला जातो.

दुसरा प्रश्न - ICDO चे full form सांगा. 
बरोबर उत्तर आहे, International Civil Defence Organization

तिसरा प्रश्न - रस्त्यावर अपघात झाल्यास कोणत्या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावे ?
बरोबर उत्तर आहे, रस्त्यावर अपघात झाल्यास 108 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावे.

चौथा प्रश्न - ICDO या संस्थेची अधिकृत स्थापना केव्हा झाली ?
बरोबर उत्तर आहे, १ मार्च १९७२ रोजी ICDO या संस्थेची अधिकृत स्थापना झाली.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक काय आहे ?
बरोबर उत्तर आहे - राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाईन क्रं. 112 अशी आहे. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 2 मार्च ( Ram Shevalkar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आजच्या कार्यक्रमात आपण साहित्यिक राम शेवाळकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
             प्रा. राम शेवाळकर
राम बाळकृष्ण शेवाळकर हे साहित्यिक, उत्तम कीर्तनकार आणि प्रभावी वक्ते होते. राम शेवाळकर यांचा जन्म २ मार्च १९३१ रोजी अमरावतीतील अचलपूर याठिकाणी झाला. त्यांचे वडील विदर्भात ‘कीर्तनकेसरी’ म्हणून प्रसिद्घ होते. राम शेवाळकर हे आपल्या वडिलांच्या अनुकरणातून लहान वयातच कीर्तने पाठ करून ती सादर करीत. त्यामुळे त्यांच्यात सभाधीटपणा आणि अमोघ वाणी आली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले. त्यांची आई गोपिका यांचे राम शेवाळकर यांच्यावर जीवापाड प्रेम होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अचलपूर येथेच झाले.
पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेड येथील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली. लहानपणापासूनच ते काव्यरचना करीत होते. ‘असोशी’ (१९५६) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर ‘रेघा’(१९६७) आणि ‘अंगारा’ (१९८९) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. निसर्गातील चैतन्याचा आणि सृजनशक्तीचा आविष्कार त्याच्या निरनिराळ्या रूपांतून पाहणे, त्यांना शब्दरूप देणे, हे त्यांच्या कवितेचे लक्षणीय वैशिष्ठ्य होय.
१९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात राम शेवाळकरांचा सहभाग होता.
 ‘पाणियावरी मकरी’ (२००८) हे त्यांचे आत्मचरित्र. त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांत अमेरिकाचा पुरस्कार  ‘मॅन ऑफ द ईयर’ (१९९७), बॉस्टन येथील संस्थे मार्फत साहित्य धुरंधर पुरस्कार,  (१९९७), दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानाचा कुसुमाग्रज पुरस्कार (१९९९) आदींचा समावेश आहे. अशा या थोर साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांचे ३ मे २००९ रोजी नागपूर येथे निधन झाले.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - राम शेवाळकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, राम शेवाळकर यांचा जन्म २ मार्च १९३१ रोजी अमरावतीतील अचलपूर याठिकाणी झाला.

दुसरा प्रश्न - राम शेवाळकर यांना अमेरिकाचा कोणता पुरस्कार मिळाला ?
बरोबर उत्तर आहे, राम शेवाळकर यांना अमेरिकाचा  ‘मॅन ऑफ द ईयर’ पुरस्कार मिळाला. 

तिसरा प्रश्न - राम शेवाळकर यांचा पहिला काव्यसंग्रह कोणता ?
बरोबर उत्तर आहे, असोशी’ (१९५६) हा राम शेवाळकर यांचा पहिला काव्यसंग्रह.

चौथा प्रश्न - १९९४ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरले होते ?
बरोबर उत्तर आहे, १९९४ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गोव्यातील पणजी येथे भरले होते.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - राम शेवाळकर यांचे निधन कोठे झाले ?
बरोबर उत्तर आहे - राम शेवाळकर यांचे ३ मे २००९ रोजी नागपूर येथे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Friday, 27 February 2026

दिनविशेष माहिती - 28 फेब्रुवारी ( National Science Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण राष्ट्रीय विज्ञान दिन यांविषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

सी. व्ही. रमन आणि ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’
भारतीय विज्ञानविश्वात डॉ. सी. व्ही. रमन यांचे नाव अत्यंत गौरवाने घेतले जाते. त्यांनी भौतिकशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण शोध लावला, जो आज “रमन इफेक्ट” या नावाने ओळखला जातो. त्यांच्या या ऐतिहासिक शोधाच्या स्मरणार्थ भारतात २८ फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून साजरा केला जातो.
२८ फेब्रुवारी १९२८ रोजी डॉ. रमन यांनी प्रकाशाच्या विखुरण्याविषयी (Scattering of Light) महत्त्वाचा शोध लावला. एखाद्या पारदर्शक पदार्थातून प्रकाश जात असताना त्याच्या तरंगलांबीमध्ये (wavelength) सूक्ष्म बदल होतो, हे त्यांनी सिद्ध केले. या घटनेला “रमन इफेक्ट” असे नाव देण्यात आले.
या शोधामुळे पदार्थांची रचना आणि गुणधर्म समजून घेण्यास मोठी मदत झाली. आजही रसायनशास्त्र, वैद्यकीय संशोधन, औषधनिर्मिती आणि भौतिकशास्त्रात रमन इफेक्टचा उपयोग केला जातो.
डॉ. रमन यांच्या या अद्वितीय संशोधनासाठी त्यांना १९३० साली भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. विज्ञान क्षेत्रातील हा सन्मान मिळविणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले.
डॉ. रमन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केलेल्या शोधाच्या स्मरणार्थ भारत सरकारने १९८६ पासून २८ फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून घोषित केला. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि संशोधन संस्था येथे विज्ञान प्रदर्शन, प्रकल्प स्पर्धा, व्याख्याने आणि विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
या दिनाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे आणि संशोधनाची प्रेरणा देणे हे आहे.
डॉ. सी. व्ही. रमन यांचा “रमन इफेक्ट” हा शोध भारतीय विज्ञानाच्या इतिहासातील सुवर्णक्षण मानला जातो. त्यांच्या कार्यामुळे भारताचा जागतिक स्तरावर मान उंचावला. “राष्ट्रीय विज्ञान दिन” हा दिवस विज्ञानाचा प्रसार होण्यासाठी आणि नव्या पिढीला संशोधनाची प्रेरणा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून केव्हापासून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला ?
बरोबर उत्तर आहे, १९८६ पासून २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला

दुसरा प्रश्न - नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण होते ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. सी. व्ही. रमन हे नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ.

तिसरा प्रश्न - डॉ. सी. व्ही. रमन यांनी शोध लावलेल्या प्रयोगाचे नाव काय ? 
बरोबर उत्तर आहे, रमन इफेक्ट डॉ. सी. व्ही. रमन यांनी शोध लावलेल्या प्रयोगाचे नाव होते. 

चौथा प्रश्न - डॉ. सी. व्ही. रमन यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार देण्यात आला ? 
बरोबर उत्तर आहे, १९३० यावर्षी डॉ. सी. व्ही. रमन यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - रमन इफेक्टचा शोध केव्हा लावण्यात आला ?
बरोबर उत्तर आहे - २८ फेब्रुवारी १९२८ रोजी रमन इफेक्टचा शोध लावण्यात आला.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Wednesday, 25 February 2026

दिनविशेष माहिती - 27 फेब्रुवारी ( Kusumagraj )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

कुसुमाग्रज
कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक अजरामर कवी, नाटककार व साहित्यिक होते. त्यांचे खरे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे होते. मराठी काव्य आणि नाटक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या लेखनातून देशप्रेम, मानवतावाद, स्वातंत्र्याची ओढ आणि सामाजिक जाणीव व्यक्त होते.
कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे बालपण नाशिक येथे गेले. लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती. शिक्षण घेत असतानाच त्यांनी लेखनास सुरुवात केली.
कुसुमाग्रजांनी कविता, नाटके, कथा, कादंबऱ्या अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले. त्यांची काही प्रसिद्ध साहित्यकृती विशाखा काव्यसंग्रह, नटसम्राट प्रसिद्ध नाटक, हिमरेषा, आंधळा
त्यांच्या कवितांमध्ये स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि मानवतेचा संदेश दिसून येतो. विशाखा या काव्यसंग्रहामुळे ते विशेष प्रसिद्ध झाले. त्यांना तात्यासाहेब या नावानेही ओळखले जाते. 
कुसुमाग्रज हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते सामाजिक जाणीव असलेले विचारवंत होते. त्यांनी समाजातील अन्याय, विषमता आणि अंधश्रद्धांविरुद्ध आवाज उठविला. त्यांच्या लेखनातून मानवतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश मिळतो.
त्यांना मराठी साहित्यातील सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार इ.स. १९८७ मध्ये प्राप्त झाला. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे ते दुसरे साहित्यिक होते. तसेच त्यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले.
कुसुमाग्रज यांचे निधन १० मार्च १९९९ रोजी झाले.  ‘कुसुमाग्रज’  यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी, 2013 रोजी घेण्यात आला.
कुसुमाग्रज हे मराठी साहित्याचे तेजस्वी नक्षत्र होते. त्यांच्या लेखनातून समाजाला प्रेरणा, दिशा आणि जागृती मिळाली. मराठी भाषेचा गौरव वाढविण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे.
आज मराठी भाषा गौरव दिन त्यानिमित्ताने सर्वाना खूप खूप शुभेच्छा आणि कवी कुसुमाग्रज यांना विनम्र अभिवादन 🙏

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - कुसुमाग्रज खरे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, कुसुमाग्रज खरे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे होते. 

दुसरा प्रश्न - कुसुमाग्रज लिखित प्रसिद्ध नाटकाचे नाव सांगा.
बरोबर उत्तर आहे, कुसुमाग्रज लिखित प्रसिद्ध नाटकाचे नाव आहे नटसम्राट 

तिसरा प्रश्न - कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

चौथा प्रश्न - कुसुमाग्रज यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले ?
बरोबर उत्तर आहे, सन १९८७ मध्ये कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला ?
बरोबर उत्तर आहे - कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 26 फेब्रुवारी ( Dr. Anandibai Joshi )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आजच्या कार्यक्रमात आपण भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर - आनंदीबाई जोशी
आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखल्या जातात. त्या भारतीय स्त्रीशिक्षणाच्या इतिहासातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षण घेऊन वैद्यकीय पदवी मिळवली आणि भारतीय महिलांसाठी नवा मार्ग खुला केला.
आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी महाराष्ट्रातील कल्याण येथे झाला. त्यांचे मूळ नाव यमुना होते. त्या काळात मुलींच्या शिक्षणाला समाजात फारसे प्रोत्साहन नव्हते. लहान वयातच त्यांचा विवाह गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्‍नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. गोपाळराव हे शिक्षणप्रेमी व प्रगत विचारांचे होते. त्यांनी आनंदीबाईंना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
वयाच्या केवळ १४ व्या वर्षी आनंदीबाईंना मातृत्व आले; परंतु वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे त्यांचे बाळ दगावले. या दु:खद प्रसंगामुळे त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्धार केला, जेणेकरून भारतीय महिलांना योग्य उपचार मिळावेत. त्या काळात स्त्रियांनी परदेशात जाऊन शिक्षण घेणे अत्यंत धाडसी पाऊल मानले जात होते.
गोपाळराव यांच्या पाठिंब्यामुळे आनंदीबाई अमेरिकेत गेल्या. त्यांनी Woman's Medical College of पेंनसिलवानिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतले. १८८६ साली त्यांनी एम.डी. पदवी मिळवली. अशा प्रकारे त्या परदेशातून वैद्यकीय पदवी घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
आनंदीबाईंच्या यशामुळे भारतीय समाजात महिलांच्या शिक्षणाविषयी जागृती झाली. त्यांनी आपल्या धैर्य, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर अनेक अडथळ्यांवर मात केली. त्या केवळ डॉक्टर नव्हत्या, तर स्त्रीशक्तीचे प्रतीक होत्या.
अमेरिकेत शिक्षण घेत असताना त्यांचे आरोग्य खालावले. क्षयरोगामुळे त्यांचे २६ फेब्रुवारी १८८७ रोजी निधन झाले. केवळ २१ वर्षाच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. अल्पायुष्यातही त्यांनी भारतीय इतिहासात अजरामर स्थान मिळवले.
आनंदीबाई जोशी या भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या संघर्षमय जीवनातून आपण ध्येय, परिश्रम आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व शिकतो. शिक्षणामुळेच समाजात परिवर्तन घडू शकते, याचा आदर्श त्यांनी घालून दिला.
आनंदीबाई जोशींनी भारतीय स्त्रीशिक्षणासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी एक आदर्श मानदंड घालून दिला. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून अनेक पुरस्कार व शिष्यवृत्ती दिल्या जातात.
आज डॉ. आनंदीबाई जोशी यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन 🙏

दिनविशेष माहिती - 26 फेब्रुवारी ( Vinayak Savarkar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
मुलांनो हे देशभक्ती गीत ऐकू या.......! 
तुम्हांला माहित आहे का हे गीत कुणी लिहिले आहे ? 
अगदी बरोबर, तर हे गीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिले आहे.
तर आजच्या कार्यक्रमात आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

स्वातंत्र्यवीर सावरकर

विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक, विचारवंत, साहित्यिक आणि राष्ट्रभक्त नेते होते. त्यांना “स्वातंत्र्यवीर सावरकर” म्हणून ओळखले जाते. त्यांच्या धाडसी कार्यामुळे आणि राष्ट्रवादी विचारांमुळे भारतीय इतिहासात त्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे.
विनायक सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरपंत आणि आईचे नाव राधाबाई होते. लहानपणापासूनच त्यांच्यात देशभक्तीची भावना प्रखर होती. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे शिक्षण घेतले. पुढे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले.
इंग्लंडमध्ये असताना त्यांनी ‘अभिनव भारत’ ही गुप्त संघटना स्थापन केली. त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसमरावर “The Indian War of Independence 1857” हे पुस्तक लिहिले, ज्यामुळे ब्रिटिश सरकार सावध झाले. त्यांच्या क्रांतिकारक कार्यामुळे त्यांना अटक करून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना अंदमानातील सेल्युलर जेल येथे कठोर कारावास भोगावा लागला. येथे त्यांनी माझी जन्मठेप नावाचे पुस्तक लिहिले ज्यात अंदमानातील कारावासातील अनुभवांवर आधारित आत्मकथन आहे. त्यांच्या साहित्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वैचारिक बळ मिळाले.
सावरकरांनी “हिंदुत्व” ही संकल्पना मांडली. ते प्रभावी कवी व लेखक होते. “जयस्तुते”, “सागरा प्राण तळमळला” यांसारखी त्यांची देशभक्तीपर गीते आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी सामाजिक सुधारणांवरही भर दिला आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी कार्य केले.
१९२४ मध्ये त्यांची सुटका झाली. पुढे त्यांनी समाजकार्य व राजकीय कार्यात सहभाग घेतला. ते काही काळ हिंदू महासभाचे अध्यक्ष होते.
दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी स्वेच्छामरण (आत्मार्पण) स्वीकारले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे पराक्रमी, विचारशील आणि निष्ठावान राष्ट्रभक्त होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांचे जीवन देशप्रेम, त्याग आणि धैर्य यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे.

आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 🙏

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - विनायक दामोदर सावरकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाने ओळखले जाते.

दुसरा प्रश्न - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला.

तिसरा प्रश्न - अंदमानच्या तुरुंगात असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणते पुस्तक लिहिले ?
बरोबर उत्तर आहे, 

चौथा प्रश्न - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणती गुप्त संघटना स्थापन केली ?
बरोबर उत्तर आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘अभिनव भारत’ ही गुप्त संघटना स्थापन केली.

शेवटचा पाचवा प्रश्न - सावंत्र्यवीर सावरकर यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - सावंत्र्यवीर सावरकर यांचे दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबई येथे निधन झाले. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Monday, 23 February 2026

दिनविशेष माहिती - 25 फेब्रुवारी ( Sir Donald Bradman )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
मुलांनो, तुम्हांला सर्वात जास्त कोणता खेळ आवडतो, सांगा पाहू......
हो... मला पण माहित आहे, तुम्हांला सर्वात जास्त क्रिकेट हा खेळ आवडतो. 
तर आजच्या कार्यक्रमात आपण क्रिकेटचा बादशहा म्हणजे सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

सर डोनाल्ड ब्रॅडमन
सर डोनाल्ड ब्रॅडमन हे क्रिकेट जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक मानले जातात. क्रिकेटच्या इतिहासात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या फलंदाजीची सरासरी आजही एक विक्रम मानली जाते.
सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचा जन्म २७ ऑगस्ट १९०८ रोजी ऑस्ट्रेलियातील कुटामुंड्रा येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची आवड होती. त्यांनी भिंतीवर चेंडू मारून त्यावर सराव करत आपल्या फलंदाजी विकसित केली.
ब्रॅडमन यांनी १९२८ साली ऑस्ट्रेलिया संघाकडून कसोटीत पदार्पण केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत ५२ कसोटी सामने खेळले आणि ६९९६ धावा केल्या. त्यांची कसोटी फलंदाजीची सरासरी ९९.९४ होती, जी आजपर्यंत कोणालाही गाठता आलेली नाही. कसोटी सामन्यातील त्यांची ३३४ ही सर्वोच्च धावसंख्या होती.
१९३० सालच्या इंग्लंड दौऱ्यात त्यांनी एका वर्षात ९७४ धावा करून विक्रम प्रस्थापित केला. त्यावेळी त्यांची खेळी संपूर्ण जगभर गाजली. त्यांना त्यांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे “द डॉन” म्हणून ओळखले जाऊ लागले.
१९४९ साली त्यांना “नाईट” हा किताब देण्यात आला, त्यामुळे ते “सर डोनाल्ड ब्रॅडमन” म्हणून ओळखले जाऊ लागले. ते ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे कर्णधारही होते. क्रिकेटमधील शिस्त, चिकाटी आणि उत्कृष्ट तंत्र यासाठी ते आदर्श मानले जातात. १९५८ साली त्यांनी क्रिकेट खेळाची शास्त्रोक्त माहिती सांगणारा 'दि आर्ट ऑफ क्रिकेट' नावाचे पुस्तक लिहिले.
सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचे २५ फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाने एक महान खेळाडू गमावला.
सर डोनाल्ड ब्रॅडमन हे केवळ महान फलंदाज नव्हते, तर ते चिकाटी, परिश्रम आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक होते. त्यांनी क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम केले आहेत. म्हणूनच त्यांना “क्रिकेटचा बादशहा” म्हणून ओळखले जाते.
आज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - “क्रिकेटचा बादशहा” म्हणून कोणाला ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, सर डोनाल्ड ब्रॅडमन यांना “क्रिकेटचा बादशहा” म्हणून ओळखले जाते.

दुसरा प्रश्न - सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी आपल्या कारकीर्दीत किती कसोटी सामने खेळले ?
बरोबर उत्तर आहे, सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी आपल्या कारकीर्दीत ५२ कसोटी सामने खेळले

तिसरा प्रश्न - सर डोनाल्ड ब्रॅडमन कोणत्या संघाकडून खेळत होते ?
बरोबर उत्तर आहे, सर डोनाल्ड ब्रॅडमन ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळत होते

चौथा प्रश्न - सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव सांगा.
बरोबर उत्तर आहे, दि आर्ट ऑफ क्रिकेट हे पुस्तक सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी लिहिले आहे. 

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या किती होती ?
बरोबर उत्तर आहे - सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची कसोटी सामन्यातील त्यांची ३३४ ही सर्वोच्च धावसंख्या होती.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

जागतिक नागरिक संरक्षण दिवस - 01 मार्च ( World Civil Defence Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण ...