दिनविशेष माहिती कार्यक्रम
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात तुम्ही ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनःपूर्वक स्वागत करतो.
आज 25 जुलै मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी, लेखक आणि प्रभावी वक्ते कवी वसंत बापट जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.
चला तर मग ऐकू या ......
कवी वसंत पुरुषोत्तम बापट यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.
वसंत बापट हे मराठीतील प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक, प्राध्यापक आणि उत्कृष्ट वक्ते होते. त्यांच्या कवितांमध्ये देशप्रेम, समाजप्रेम, मानवता, निसर्गप्रेम आणि प्रेरणादायी विचारांचा सुंदर संगम आढळतो. त्यांनी महाराष्ट्रभर काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम करून मराठी कवितेला लोकमान्यता मिळवून दिली.
त्यांनी अनेक गाजलेली देशभक्तिपर आणि प्रेरणादायी गीते लिहिली. त्यांपैकी "उत्तुंग आमुची उत्तर सीमा", "सैन्य चालले पुढे" आणि "राकट देशा, कणखर देशा" ही गीते विशेष प्रसिद्ध आहेत. आज सुद्धा ही गीते विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय उपक्रम आणि देशभक्तीपर प्रसंगी आवर्जून सादर केली जातात.
मुंबईतील महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. त्यांच्या साहित्यसेवेबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले.
१७ सप्टेंबर २००२ रोजी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या कविता, गीते आणि साहित्य आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, कवी वसंत बापट यांचे जीवन आपल्याला देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, साहित्यप्रेम आणि सतत ज्ञानार्जन करण्याची प्रेरणा देते. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपणही चांगले नागरिक बनण्याचा संकल्प करूया.
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - कवी वसंत बापट यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, कवी वसंत बापट यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला.
दुसरा प्रश्न - भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले ?
बरोबर उत्तर आहे, सन 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन झाले.
तिसरा प्रश्न - राकट देशा, कणखर देशा" ही प्रसिद्ध गीत कोणी लिहिले ?
बरोबर उत्तर आहे, राकट देशा, कणखर देशा" ही प्रसिद्ध गीत कवी वसंत बापट यांनी लिहिले
चौथा प्रश्न - वसंत बापट यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून कोठे कार्य केले. ?
बरोबर उत्तर आहे, मुंबईतील महाविद्यालयात वसंत बापट यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्य केले.
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - वसंत बापट यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - १७ सप्टेंबर २००२ रोजी वसंत बापट यांचे निधन झाले.
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
धन्यवाद!