Wednesday, 11 February 2026

दिनविशेष माहिती - 13 फेब्रुवारी ( sarojini naidu )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण भारताची कोकिळा : सरोजिनी नायडू यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......

भारताची कोकिळा - सरोजिनी नायडू
सरोजिनी नायडू या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य नेत्या, उत्कृष्ट कवयित्री आणि प्रभावी वक्त्या होत्या. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय हे शिक्षणतज्ज्ञ होते आणि आई वरदसुंदरी देवी या बंगाली कवयित्री होत्या. बालपणापासूनच सरोजिनींमध्ये साहित्य, कला आणि समाजसेवेची ओढ दिसून येत होती. वयाच्या १२ व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. 
त्यांनी मद्रास, लंडन व केंब्रिज येथे शिक्षण घेतले. इंग्रजी भाषेतील त्यांच्या कवितांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. The Golden Threshold, The Bird of Time आणि The Broken Wing ही त्यांची प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत. मधुर भाषा, भारतीय जीवनचित्रण आणि देशभक्तीची भावना ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये होती. त्यामुळे त्यांना “भारताची कोकिळा” (Nightingale of India) असे म्हटले जाते.
सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. सत्याग्रह, असहकार चळवळ आणि 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या महिलांच्या हक्कांसाठीही सातत्याने लढल्या आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.
१९२५ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या, ही भारताच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाची घटना होती. स्वातंत्र्यानंतर त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या (१९४७). सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रामाणिकपणा, करुणा आणि देशप्रेम यांचा आदर्श ठेवला.
२ मार्च १९४९ रोजी त्यांचे निधन झाले. सरोजिनी नायडू यांचे कार्य केवळ राजकीयच नव्हे तर साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातही प्रेरणादायी ठरले. भारतीय स्त्रीशक्तीचे प्रतीक म्हणून त्यांचे नाव इतिहासात अजरामर राहील.

आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने कोटी कोटी प्रणाम 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - सरोजिनी नायडू यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, हैद्राबाद येथे सरोजिनी नायडू यांचा जन्म झाला.

दुसरा प्रश्न - सरोजिनी नायडू यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ? 
बरोबर उत्तर आहे, भारताची कोकिळा किंवा नाईटिंगल ऑफ इंडिया या नावाने सरोजिनी नायडू यांना ओळखले जाते.

तिसरा प्रश्न - कोणाच्या नेतृत्वाखाली सरोजिनी नायडू यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला ?
बरोबर उत्तर आहे, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सरोजिनी नायडू यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.

चौथा प्रश्न - सरोजिनी नायडू कोणत्या राज्याचे पहिल्या महिला राज्यपाल बनल्या ?
बरोबर उत्तर आहे, सरोजिनी नायडू ह्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या. 
आणि शेवटचा पाचवा प्रश्न - सरोजिनी नायडू यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - २ मार्च १९४९ रोजी सरोजिनी नायडू यांचे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Tuesday, 10 February 2026

दिनविशेष माहिती - 12 फेब्रुवारी ( Swami Dayanand Sarswati )

        नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण स्वामी दयानंद सरस्वती यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी 
         स्वामी दयानंद सरस्वती नावावर clik करावे. 

स्वामी दयानंद सरस्वती हे भारतातील महान समाजसुधारक, वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करणारे विचारवंत आणि आर्य समाजाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १८२४ रोजी गुजरातमधील टंकारा (जि. मोरबी) येथे झाला. त्यांचे मूळ नाव मूळशंकर होते. संन्यास घेतल्यावर त्यांनी दयानंद सरस्वती असे नाव धारण केले. बालपणापासूनच त्यांना धर्म, साधना आणि सत्याचा शोध याविषयी विशेष जिज्ञासा होती.
लहान वयातच त्यांनी मूर्तिपूजेसंबंधी प्रश्न उपस्थित केले. शिवरात्रीच्या दिवशी मंदिरात उंदराने शिवलिंगावरील नैवेद्य खाल्ला हे पाहून त्यांना “ईश्वर हा सर्वशक्तिमान असतो, मग तो स्वतःचे रक्षण का करू शकत नाही?” असा प्रश्न पडला. यामुळे त्यांनी पारंपरिक अंधश्रद्धांपासून दूर जाऊन सत्याच्या शोधासाठी घरत्याग केला. विविध गुरूंकडून वेद, व्याकरण, योग आणि तत्त्वज्ञानाचे अध्ययन करून त्यांनी वैदिक धर्माचा शुद्ध स्वरूपात प्रसार करण्याचा संकल्प केला.
१० एप्रिल १८७५ मध्ये मुंबई येथे त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. “वेदांकडे परत चला” हा त्यांचा मुख्य संदेश होता. त्यांनी ईश्वर एक आहे, निराकार आहे आणि वेद हे सर्वोच्च प्रमाण आहेत, असे प्रतिपादन केले. जातिभेद, अस्पृश्यता, बालविवाह, अंधश्रद्धा यांना त्यांनी विरोध केला. स्त्रीशिक्षण, विधवाविवाह आणि समाजातील समतेचा त्यांनी पुरस्कार केला. त्यांच्या विचारांचा देशातील सामाजिक आणि धार्मिक जीवनावर मोठा प्रभाव पडला.
स्वामी दयानंद सरस्वती यांनी संस्कृत व हिंदी भाषेत प्रसिद्ध ग्रंथ ‘सत्यार्थ प्रकाश’ लिहिला आहे. या ग्रंथात त्यांनी वेदांचे तत्त्वज्ञान, सामाजिक सुधारणा आणि धर्मातील शुद्धतेचा संदेश सुस्पष्ट मांडला. त्यांच्या प्रभावामुळे देशभरात शिक्षणसंस्था, गुरुकुल पद्धतीची शाळा आणि सुधारणा चळवळी उभ्या राहिल्या. आर्य समाजाने पुढे स्वातंत्र्य चळवळीतही महत्त्वाचे योगदान दिले.
३० ऑक्टोबर १८८३ रोजी अजमेर येथे त्यांचे निधन झाले. सत्य, विवेक, समता आणि राष्ट्रहित या मूल्यांचा प्रचार करणारे स्वामी दयानंद सरस्वती आजही प्रेरणास्थान मानले जातात. त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात आत्मचिंतन, सुधारणा आणि नवचैतन्य निर्माण झाले, हे त्यांचे अमूल्य योगदान होय.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - स्वामी दयानंद सरस्वती यांचे जन्मनाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, मूळशंकर असे स्वामी दयानंद सरस्वती यांचे जन्मनाव होते.

दुसरा प्रश्न - स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली ?
बरोबर उत्तर आहे, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली.

तिसरा प्रश्न - स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय होते ? 
बरोबर उत्तर आहे, सत्यार्थ प्रकाश असे स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव होते.

चौथा प्रश्न - स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणता संदेश दिला होता ?
बरोबर उत्तर आहे, वेदांकडे परत चला” हा मुख्य संदेश स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला होता.

शेवटचा पाचवा प्रश्न - स्वामी दयानंद सरस्वती यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - ३० ऑक्टोबर १८८३ रोजी अजमेर येथे स्वामी दयानंद सरस्वती यांचे निधन झाले. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिनविशेष ( Importance day in January )

जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिवस
प्रत्येक दिनविशेष माहितीसाठी Mazishala You Tube चॅनेल पाहावे. त्यासाठी link खाली दिले आहे 
Mazishala you tube चॅनेल 
01 - डॉ. शांती स्वरूप भटनागर पुण्यतिथी 
02 - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुण्यतिथी 
03 - सावित्रीबाई फुले जयंती 

05 - श्रीपाद नारायण पेंडसे जयंती 
06 - बाळशास्त्री जांभेकर जयंती 
07 - जानकीदेवी बजाज जयंती 
08 - लॉर्ड बेडन-पॉवेल पुण्यतिथी 
09 - डॉ. हरगोविंद खुराना जयंती 
10 - दत्ताजी शिंदे पुण्यतिथी 

12 - राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती 
13 - राकेश शर्मा जयंती 
14 - भूगोल दिनांक 
15 - खाशाबा जाधव जयंती 
16 - न्यायमूर्ती महादेव रानडे पुण्यतिथी 
17 - दत्तात्रय रामचंद्र कापरेकर जयंती 

19 - जेम्स वॅट जयंती 
20 - अपा शेर्पा जयंती 
21 - कवी माधव ज्यूलियन जयंती 
22 - समर्थ रामदास स्वामी 
23 - नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती 
24 - डॉ. होमी जहागीर भाभा पुण्यतिथी 

26 - प्रजासत्ताक दिन
27 - जनरल अरुणकुमार वैद्य जयंती 
28 - लाला लाजपत राय पुण्यतिथी 
29 - थॉमस पेन जयंती 
30 - महात्मा गांधी पुण्यतिथी 
31 मेजर सोमनाथ शर्मा जयंती

Monday, 9 February 2026

दिनविशेष माहिती - 11 फेब्रुवारी ( thomas Edison )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी 

नावावर clik करावे. 
थॉमस अल्वा एडिसन हे जगप्रसिद्ध अमेरिकन संशोधक आणि उद्योजक होते. त्यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यातील मिलान येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सॅम्युएल एडिसन व आईचे नाव नॅन्सी एडिसन होते. लहानपणी त्यांचे औपचारिक शिक्षण कमी झाले असले तरी आईच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी स्वतः अभ्यास करून विज्ञानाची गोडी निर्माण केली.
एडिसन यांनी आयुष्यभर सुमारे १००० पेक्षा अधिक शोधांचे पेटंट घेतले. अथक प्रयत्नाने त्यांनी विद्युत बल्बचा शोध लावला व व्यावहारिक उपयोगी प्रकार विकसित केल्यामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. याशिवाय फोनोग्राफ (ध्वनिमुद्रक), चलचित्र कॅमेरा, टेलिग्राफ सुधारणा, आणि विद्युत वितरण प्रणाली यांसारखे अनेक महत्त्वाचे शोध त्यांनी लावले. त्यांच्या शोधांमुळे मानवाचे दैनंदिन जीवन अधिक सोयीचे व आधुनिक झाले. त्यांनी जगातील पहिली औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा स्थापन केली. 
एडिसन यांचे कार्यपद्धती अत्यंत मेहनतीची होती. “मी अपयशी झालो नाही; मी फक्त १०,००० मार्ग शोधले जे काम करत नाहीत, अपयश म्हणजे "First Attempt In Learning” हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य त्यांच्या चिकाटीचे दर्शन घडवते. माणूस सकारात्मक असला की त्याच्या हातून होणाऱ्या गोष्टीसुद्धा सकारात्मक आणि भव्यदिव्य असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. त्यांनी न्यू जर्सी येथील मेनलो पार्क येथे संशोधन प्रयोगशाळा स्थापन केली, जी जगातील पहिली औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा मानली जाते.
जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिकवणाऱ्या या महान संशोधकाचा मृत्यू १८ ऑक्टोबर १९३१ मध्ये झाला. त्यांनी दिलेल्या शोधांमुळे विज्ञान, उद्योग आणि मानवजीवनावर अमिट ठसा उमटवला आहे. म्हणूनच त्यांना “आधुनिक विद्युत युगाचा जनक” असेही म्हटले जाते. त्यांच्या जीवनातून परिश्रम, चिकाटी आणि नवकल्पनांची प्रेरणा मिळते.

आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने या महान संशोधकाला विनम्र अभिवादन 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ रोजी झाला.

दुसरा प्रश्न - विद्युत बल्बचा शोध कोणी लावला ? 
बरोबर उत्तर आहे, थॉमस अल्वा एडिसन ने विद्युत बल्बचा शोध लावला.

तिसरा प्रश्न - थॉमस अल्वा एडिसन हे कोणत्या देशाचे संशोधक होते ?
बरोबर उत्तर आहे, थॉमस अल्वा एडिसन हे अमेरिकेचे संशोधक होते ?

चौथा प्रश्न - थॉमस अल्वा एडिसन यांना काय म्हटले जाते ?
बरोबर उत्तर आहे, थॉमस अल्वा एडिसन यांना “आधुनिक विद्युत युगाचा जनक” असेही म्हटले जाते.

शेवटचा पाचवा प्रश्न - थॉमस अल्वा एडिसन यांचा मृत्यू केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे - १८ ऑक्टोबर १९३१ रोजी थॉमस अल्वा एडिसन यांचा मृत्यू झाला.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Sunday, 8 February 2026

दिनविशेष माहिती - 10 फेब्रुवारी ( Narhar Kurundkar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी 

नावा वर clik करावे. 
नरहर कुरुंदकर हे आधुनिक मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे विचारवंत, समीक्षक व प्रभावी वक्ते होते. त्यांनी मराठी साहित्याला तर्कशुद्ध विचार, निर्भीड मतप्रदर्शन आणि समाजाभिमुख दृष्टिकोन दिला. त्यांच्या लेखनातून विवेक, चिकित्सक बुद्धी आणि मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी प्रकर्षाने दिसून येते.
नरहर कुरुंदकर यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी परभणी जिल्ह्यातील ( सध्या हिंगोली जिल्हा ) नांदापूर येथे झाला. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव. प्राथमिक शिक्षण वसमतला झाल्यानंतर ते त्यांच्या मामाच्या घरी हैदराबादला गेले आणि तिथं त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. साधारणतः अकराव्या वर्षापासून कुरुंदकरांनी लिखाणाला सुरुवात केली. त्यांचे शिक्षण वाचन, चिंतन आणि अध्ययनप्रधान वातावरणात झाले. त्यांनी नांदेड येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेजचे प्राचार्यपद भूषविले होते. विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.
आपल्या अध्यापनातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची सवय लावली. व्याख्यानांमधून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि साहित्यिक विषयांवर स्पष्ट व ठाम भूमिका मांडली. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ते काम करत. किशोरवयीन अवस्थेतच ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात उतरले होते. या लढ्याच्या निमित्ताने त्यांना अनेक मोठ्या लोकांना जवळून पाहता आलं.
त्यांचे लेखन विशेषतः निबंध आणि समीक्षा या प्रकारांत महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी परंपरेचा आदर राखत आधुनिक विचारांना स्थान दिले. भावनावश लेखनापेक्षा तर्क, विवेक आणि वस्तुनिष्ठता यांवर त्यांनी भर दिला. त्यामुळे त्यांचे लेखन वाचकांना विचार करायला प्रवृत्त करते. 
‘साहित्य आणि समाज’, ‘विचार आणि विवेक’ यांसारखी त्यांची पुस्तके मराठी वैचारिक साहित्यात मोलाची मानली जातात. त्यांच्या निबंधांतून सामाजिक वास्तवाचे भान, मानवी मूल्यांची जाणीव आणि लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदेड शहरात २०१० मध्ये त्यांच्या नावाचे ’नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ स्थापन करण्यात आले.त्यांची मुलगी श्यामल पत्की या प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष होत्या. त्यांच्या धार आणि काठ या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे.
१० फेब्रुवारी १९८२ साली त्यांचे निधन झाले; मात्र त्यांच्या विचारांची परंपरा आजही मराठी साहित्यात जिवंत आहे. विवेकशील विचार, निर्भीड लेखनशैली आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांमुळे नरहर कुरुंदकर हे मराठी साहित्यातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.
आज नरहर कुरुंदकर यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांना त्रिवार वंदन !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - नरहर कुरुंदकर हे कोणत्या शाळेत शिक्षक म्हणून काम पाहिले ? 
बरोबर उत्तर आहे, नांदेड येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात नरहर कुरुंदकर यांनी शिक्षक म्हणून काम पाहिले.

दुसरा प्रश्न - नरहर कुरुंदकर हे कोणत्या कॉलेजचे प्राचार्यपद भूषविले होते ? 
बरोबर उत्तर आहे, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेजचे प्राचार्यपद भूषविले होते. 

तिसरा प्रश्न -  ’नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ स्थापना कोठे करण्यात आली ?
बरोबर उत्तर आहे, नांदेड येथे  ’नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ स्थापना करण्यात आले.

चौथा प्रश्न - नरहर कुरुंदकर यांच्या कोणत्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे ?
बरोबर उत्तर आहे, नरहर कुरुंदकर यांच्या धार आणि काठ या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे.

शेवटचा पाचवा प्रश्न - नरहर कुरुंदकर यांचे मूळ गाव कुरुंदा कोणत्या जिल्ह्यात येते ?
बरोबर उत्तर आहे - नरहर कुरुंदकर यांचे मूळ गाव कुरुंदा हिंगोली जिल्ह्यात येते.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 09 फेब्रुवारी ( बाबा Amte )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण पद्मविभूषण बाबा आमटे यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......

      पद्मविभूषण बाबा आमटे

बाबा आमटे हे थोर समाजसेवक, मानवतावादी कार्यकर्ते आणि गांधीवादी विचारांचे प्रचारक होते. कुष्ठरोगग्रस्त, अपंग, आदिवासी आणि वंचित घटकांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे समाजात करुणा, समता आणि सेवा यांची मूल्ये दृढ झाली.
बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव मुरलीधर देविदास आमटे असे होते. बाबा आमटेंना लहानपणी चित्रपट फार आवडायचे. बाबा आमटे लहानपणापासून स्वतंत्र विचारांचे होते. बाबा आमटेंनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यावर काही काळ वकिलीही केली. मात्र समाजातील दुःख, अन्याय आणि उपेक्षा पाहून त्यांनी सामाजिक सेवेला आपले जीवन समर्पित केले. कुष्ठरोगग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वरोरा येथे आनंदवन आश्रमाची स्थापना केली. याठिकाणी कुष्ठरोग्यावर उपचार, शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मान यांची सोय करून रुग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील केले. भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केले.
त्यांनी भारत जोडो यात्रा, नर्मदा बचाव आंदोलन यांसारख्या जनआंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि सामाजिक न्यायासाठी आवाज उठवला. त्यांच्या पत्नी साधना आमटे, तसेच मुले डॉ. विकास आमटे व डॉ. प्रकाश आमटे यांनीही त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेला.
बाबा आमटे यांना त्यांच्या अद्वितीय सेवेसाठी पद्मश्री, पद्मविभूषण, जमनालाल बजाज पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, महाराष्ट्र भूषण अवार्ड यांसारखे अनेक सन्मान मिळाले. बाबा आमटे यांचा दिनांक ९ फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले.
बाबा आमटे यांचे जीवन हे करुणा, त्याग आणि मानवसेवेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या कार्यामुळे लाखो वंचितांना नवी आशा आणि सन्मानाचे जीवन मिळाले, आणि ते भारतीय समाजसेवेचे उज्ज्वल प्रतीक म्हणून सदैव स्मरणात राहतील.
आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - बाबा आमटे यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी झाला.

दुसरा प्रश्न - बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय होते ? 
बरोबर उत्तर आहे, मुरलीधर देविदास आमटे असे बाबा आमटे यांचे पूर्ण नाव होते.

तिसरा प्रश्न - कुष्ठरोगाने ग्रस्त रुग्णासाठी स्थापन केलेल्या आश्रमाचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे,  कुष्ठरोगाने ग्रस्त रुग्णासाठी स्थापन केलेल्या आश्रमाचे नाव आनंदवन आश्रम होते.

चौथा प्रश्न - बाबा आमटे यांच्या पत्नीचे नाव सांगा.
बरोबर उत्तर आहे, बाबा आमटे यांच्या पत्नीचे नाव साधना आमटे 

शेवटचा पाचवा प्रश्न - बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्प कोठे सुरु केले ?
बरोबर उत्तर आहे - भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Saturday, 7 February 2026

दिनविशेष माहिती - 17 फेब्रुवारी

वासुदेव बळवंत फडके

वासुदेव बळवंत फडके (4 नोव्हेंबर 1845 – 17 फेब्रुवारी 1883) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्य क्रांतिकारक मानले जातात. त्यांनी सशस्त्र संघर्षाच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आणि स्वराज्याचा संदेश समाजात पोहोचवला. त्यांच्या कार्यामुळे पुढील क्रांतिकारक चळवळींना प्रेरणा मिळाली.
फडके यांचा जन्म महाराष्ट्रातील शिरूर तालुक्यात झाला. शिक्षणानंतर त्यांनी सरकारी नोकरी केली; परंतु अन्यायकारक धोरणांमुळे सामान्य जनतेची होणारी पिळवणूक पाहून त्यांनी क्रांतिकारक मार्ग स्वीकारला. त्यांनी तरुणांचे संघटन करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव घडवण्याचा प्रयत्न केला.
1879–80 च्या काळात त्यांनी दरोडे, शस्त्रसाठा आणि गुप्त हालचालींमधून क्रांतिकारक कार्य केले. ब्रिटिशांनी त्यांना अटक करून काळ्या पाण्याची शिक्षा दिली आणि अंदमान येथे कारावासात ठेवले. तेथेच 1883 साली त्यांचे निधन झाले.
वासुदेव बळवंत फडके यांचे जीवन हे धैर्य, त्याग आणि देशप्रेमाचे प्रतीक आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीची पहिली ठिणगी पेटवणारे म्हणून इतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे.

दिनविशेष माहिती - 13 फेब्रुवारी ( sarojini naidu )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !  मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण भ...