Wednesday, 25 February 2026

दिनविशेष माहिती - 26 फेब्रुवारी ( Dr. Anandibai Joshi )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आजच्या कार्यक्रमात आपण भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर - आनंदीबाई जोशी
आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखल्या जातात. त्या भारतीय स्त्रीशिक्षणाच्या इतिहासातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षण घेऊन वैद्यकीय पदवी मिळवली आणि भारतीय महिलांसाठी नवा मार्ग खुला केला.
आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी महाराष्ट्रातील कल्याण येथे झाला. त्यांचे मूळ नाव यमुना होते. त्या काळात मुलींच्या शिक्षणाला समाजात फारसे प्रोत्साहन नव्हते. लहान वयातच त्यांचा विवाह गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्‍नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. गोपाळराव हे शिक्षणप्रेमी व प्रगत विचारांचे होते. त्यांनी आनंदीबाईंना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
वयाच्या केवळ १४ व्या वर्षी आनंदीबाईंना मातृत्व आले; परंतु वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे त्यांचे बाळ दगावले. या दु:खद प्रसंगामुळे त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्धार केला, जेणेकरून भारतीय महिलांना योग्य उपचार मिळावेत. त्या काळात स्त्रियांनी परदेशात जाऊन शिक्षण घेणे अत्यंत धाडसी पाऊल मानले जात होते.
गोपाळराव यांच्या पाठिंब्यामुळे आनंदीबाई अमेरिकेत गेल्या. त्यांनी Woman's Medical College of पेंनसिलवानिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतले. १८८६ साली त्यांनी एम.डी. पदवी मिळवली. अशा प्रकारे त्या परदेशातून वैद्यकीय पदवी घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
आनंदीबाईंच्या यशामुळे भारतीय समाजात महिलांच्या शिक्षणाविषयी जागृती झाली. त्यांनी आपल्या धैर्य, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर अनेक अडथळ्यांवर मात केली. त्या केवळ डॉक्टर नव्हत्या, तर स्त्रीशक्तीचे प्रतीक होत्या.
अमेरिकेत शिक्षण घेत असताना त्यांचे आरोग्य खालावले. क्षयरोगामुळे त्यांचे २६ फेब्रुवारी १८८७ रोजी निधन झाले. केवळ २१ वर्षाच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. अल्पायुष्यातही त्यांनी भारतीय इतिहासात अजरामर स्थान मिळवले.
आनंदीबाई जोशी या भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या संघर्षमय जीवनातून आपण ध्येय, परिश्रम आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व शिकतो. शिक्षणामुळेच समाजात परिवर्तन घडू शकते, याचा आदर्श त्यांनी घालून दिला.
आनंदीबाई जोशींनी भारतीय स्त्रीशिक्षणासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी एक आदर्श मानदंड घालून दिला. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून अनेक पुरस्कार व शिष्यवृत्ती दिल्या जातात.
आज डॉ. आनंदीबाई जोशी यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन 🙏

दिनविशेष माहिती - 26 फेब्रुवारी ( Vinayak Savarkar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
मुलांनो हे देशभक्ती गीत ऐकू या.......! 
तुम्हांला माहित आहे का हे गीत कुणी लिहिले आहे ? 
अगदी बरोबर, तर हे गीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिले आहे.
तर आजच्या कार्यक्रमात आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

स्वातंत्र्यवीर सावरकर

विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक, विचारवंत, साहित्यिक आणि राष्ट्रभक्त नेते होते. त्यांना “स्वातंत्र्यवीर सावरकर” म्हणून ओळखले जाते. त्यांच्या धाडसी कार्यामुळे आणि राष्ट्रवादी विचारांमुळे भारतीय इतिहासात त्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे.
विनायक सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरपंत आणि आईचे नाव राधाबाई होते. लहानपणापासूनच त्यांच्यात देशभक्तीची भावना प्रखर होती. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे शिक्षण घेतले. पुढे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले.
इंग्लंडमध्ये असताना त्यांनी ‘अभिनव भारत’ ही गुप्त संघटना स्थापन केली. त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसमरावर “The Indian War of Independence 1857” हे पुस्तक लिहिले, ज्यामुळे ब्रिटिश सरकार सावध झाले. त्यांच्या क्रांतिकारक कार्यामुळे त्यांना अटक करून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना अंदमानातील सेल्युलर जेल येथे कठोर कारावास भोगावा लागला. येथे त्यांनी माझी जन्मठेप नावाचे पुस्तक लिहिले ज्यात अंदमानातील कारावासातील अनुभवांवर आधारित आत्मकथन आहे. त्यांच्या साहित्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वैचारिक बळ मिळाले.
सावरकरांनी “हिंदुत्व” ही संकल्पना मांडली. ते प्रभावी कवी व लेखक होते. “जयस्तुते”, “सागरा प्राण तळमळला” यांसारखी त्यांची देशभक्तीपर गीते आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी सामाजिक सुधारणांवरही भर दिला आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी कार्य केले.
१९२४ मध्ये त्यांची सुटका झाली. पुढे त्यांनी समाजकार्य व राजकीय कार्यात सहभाग घेतला. ते काही काळ हिंदू महासभाचे अध्यक्ष होते.
दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी स्वेच्छामरण (आत्मार्पण) स्वीकारले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे पराक्रमी, विचारशील आणि निष्ठावान राष्ट्रभक्त होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांचे जीवन देशप्रेम, त्याग आणि धैर्य यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे.

आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 🙏

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - विनायक दामोदर सावरकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाने ओळखले जाते.

दुसरा प्रश्न - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला.

तिसरा प्रश्न - अंदमानच्या तुरुंगात असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणते पुस्तक लिहिले ?
बरोबर उत्तर आहे, 

चौथा प्रश्न - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणती गुप्त संघटना स्थापन केली ?
बरोबर उत्तर आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘अभिनव भारत’ ही गुप्त संघटना स्थापन केली.

शेवटचा पाचवा प्रश्न - सावंत्र्यवीर सावरकर यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - सावंत्र्यवीर सावरकर यांचे दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबई येथे निधन झाले. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Monday, 23 February 2026

दिनविशेष माहिती - 25 फेब्रुवारी ( Sir Donald Bradman )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
मुलांनो, तुम्हांला सर्वात जास्त कोणता खेळ आवडतो, सांगा पाहू......
हो... मला पण माहित आहे, तुम्हांला सर्वात जास्त क्रिकेट हा खेळ आवडतो. 
तर आजच्या कार्यक्रमात आपण क्रिकेटचा बादशहा म्हणजे सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

सर डोनाल्ड ब्रॅडमन
सर डोनाल्ड ब्रॅडमन हे क्रिकेट जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक मानले जातात. क्रिकेटच्या इतिहासात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या फलंदाजीची सरासरी आजही एक विक्रम मानली जाते.
सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचा जन्म २७ ऑगस्ट १९०८ रोजी ऑस्ट्रेलियातील कुटामुंड्रा येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची आवड होती. त्यांनी भिंतीवर चेंडू मारून त्यावर सराव करत आपल्या फलंदाजी विकसित केली.
ब्रॅडमन यांनी १९२८ साली ऑस्ट्रेलिया संघाकडून कसोटीत पदार्पण केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत ५२ कसोटी सामने खेळले आणि ६९९६ धावा केल्या. त्यांची कसोटी फलंदाजीची सरासरी ९९.९४ होती, जी आजपर्यंत कोणालाही गाठता आलेली नाही. कसोटी सामन्यातील त्यांची ३३४ ही सर्वोच्च धावसंख्या होती.
१९३० सालच्या इंग्लंड दौऱ्यात त्यांनी एका वर्षात ९७४ धावा करून विक्रम प्रस्थापित केला. त्यावेळी त्यांची खेळी संपूर्ण जगभर गाजली. त्यांना त्यांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे “द डॉन” म्हणून ओळखले जाऊ लागले.
१९४९ साली त्यांना “नाईट” हा किताब देण्यात आला, त्यामुळे ते “सर डोनाल्ड ब्रॅडमन” म्हणून ओळखले जाऊ लागले. ते ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे कर्णधारही होते. क्रिकेटमधील शिस्त, चिकाटी आणि उत्कृष्ट तंत्र यासाठी ते आदर्श मानले जातात. १९५८ साली त्यांनी क्रिकेट खेळाची शास्त्रोक्त माहिती सांगणारा 'दि आर्ट ऑफ क्रिकेट' नावाचे पुस्तक लिहिले.
सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचे २५ फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाने एक महान खेळाडू गमावला.
सर डोनाल्ड ब्रॅडमन हे केवळ महान फलंदाज नव्हते, तर ते चिकाटी, परिश्रम आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक होते. त्यांनी क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम केले आहेत. म्हणूनच त्यांना “क्रिकेटचा बादशहा” म्हणून ओळखले जाते.
आज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - “क्रिकेटचा बादशहा” म्हणून कोणाला ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, सर डोनाल्ड ब्रॅडमन यांना “क्रिकेटचा बादशहा” म्हणून ओळखले जाते.

दुसरा प्रश्न - सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी आपल्या कारकीर्दीत किती कसोटी सामने खेळले ?
बरोबर उत्तर आहे, सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी आपल्या कारकीर्दीत ५२ कसोटी सामने खेळले

तिसरा प्रश्न - सर डोनाल्ड ब्रॅडमन कोणत्या संघाकडून खेळत होते ?
बरोबर उत्तर आहे, सर डोनाल्ड ब्रॅडमन ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळत होते

चौथा प्रश्न - सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव सांगा.
बरोबर उत्तर आहे, दि आर्ट ऑफ क्रिकेट हे पुस्तक सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी लिहिले आहे. 

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या किती होती ?
बरोबर उत्तर आहे - सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची कसोटी सामन्यातील त्यांची ३३४ ही सर्वोच्च धावसंख्या होती.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 24 फेब्रुवारी ( Chhatrapati Rajaram )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण छत्रपती राजाराम महाराज यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

छत्रपती राजाराम महाराज 
छत्रपती राजाराम हे मराठा साम्राज्याचे पराक्रमी व धैर्यवान शासक होते. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकटे चिरंजीव होते. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर झाला. आईचे नाव सोयराबाई होते. लहानपणापासूनच त्यांना शौर्य, प्रशासन आणि युद्धकौशल्य यांचे शिक्षण देण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कठीण परिस्थितीत मराठ्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी राजाराम महाराज यांच्याकडे आली. अत्यंत कठीण परिस्थितीत राजाराम महाराजांनी राज्याची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी त्यांचे वय अवघे १९ वर्षे होते. त्यांनी अत्यंत धैर्याने आणि संयमाने मोगलांविरुद्ध लढा सुरू ठेवला.
औरंगजेबाच्या सैन्याचा वाढता दबाव पाहता राजाराम महाराजांनी महाराष्ट्र सोडून तामिळनाडूमधील जिंजी (गिंजी) किल्ल्यावर आश्रय घेतला. तेथूनच त्यांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली आणि मराठा सरदारांच्या मदतीने गनिमी काव्याच्या पद्धतीने मोगलांविरुद्ध संघर्ष चालू ठेवला. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांसारख्या पराक्रमी सरदारांनी त्यांच्या नेतृत्वाखाली मोठी कामगिरी बजावली.
राजाराम महाराजांचे राज्यकारभाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. त्यांचे नेतृत्व, संयम आणि चिकाटी यामुळे मराठा साम्राज्य टिकून राहिले. त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनीही पुढे मोठ्या धैर्याने राज्यकारभार सांभाळला.
छत्रपती राजाराम यांचे २ मार्च १७०० रोजी सिंहगड येथे निधन झाले. त्यांचे आयुष्य जरी अल्प होते, तरी त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. मराठा साम्राज्य टिकवून ठेवण्यात त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या संघर्षामुळेच पुढे मराठा साम्राज्य अधिक बळकट झाले. त्यांच्या कार्यामुळे इतिहासात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - छत्रपती राजाराम हे कोणाचे चिरंजीव होते ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती राजाराम हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव होते

दुसरा प्रश्न - छत्रपती राजाराम यांच्या आईचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती राजाराम यांच्या आईचे नाव सोयराबाई होते. 

तिसरा प्रश्न - छत्रपती राजाराम यांच्या पत्नीचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती राजाराम यांच्या पत्नीचे नाव महाराणी ताराबाई असे होते.

चौथा प्रश्न - राज्याची सूत्रे हाती घेतली त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज यांचे वय किती होते ? 
बरोबर उत्तर आहे, वयाच्या 19 व्या वर्षी छत्रपती राजाराम महाराज यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन कोठे झाले ?
बरोबर उत्तर आहे - सिंहगडावर दिनांक २ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Saturday, 21 February 2026

दिनविशेष माहिती - 23 फेब्रुवारी ( sant Gadge Maharaj )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण संत गाडगेबाबा यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका बरं का , कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
संत गाडगे महाराज 
संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील महान संत, समाजसुधारक आणि स्वच्छतेचे प्रणेते होते. त्यांचे खरे नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील शेणगाव येथे झाला.
गाडगे महाराज यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांनी कष्ट, प्रामाणिकपणा आणि साधेपणा यांचे संस्कार आत्मसात केले. औपचारिक शिक्षण कमी असले तरी जीवनानुभवातून त्यांनी मोठे ज्ञान मिळवले.
संत गाडगे महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करून लोकजागृती केली. त्यांच्या हातात नेहमी एक खापराचे गाडगे असायचे यावरून त्यांचे नाव गाडगेबाबा असे पटले. ते गावोगावी जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छता, शिक्षण, व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांचा संदेश देत. आपल्या कीर्तनाची सुरुवात ते गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा या वाक्याने करत असतं. 
त्यांच्या कार्याची काही वैशिष्ट्ये म्हणजे 
गावात प्रवेश करण्यापूर्वी स्वतः झाडू घेऊन रस्ते साफ करत असे, अस्पृश्यता आणि जातिभेदाचा विरोध केला, गरिबांसाठी धर्मशाळा, वसतिगृहे व शाळा उभारली, दानातून मिळालेला पैसा समाजकार्यासाठी वापरली.
ते म्हणत, “स्वच्छता हीच खरी पूजा आहे.” त्यामुळे त्यांना स्वच्छतेचे जनक म्हणूनही ओळखले जाते.
गाडगे महाराजांनी समाजातील दुर्गुणांवर प्रहार केला आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांचे कीर्तन अत्यंत प्रभावी व वास्तववादी असे. त्यांनी लोकांना परिश्रम, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले.
संत गाडगे महाराज यांचे अमरावती येथे २० डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने “संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान” सुरू केले आहे. अमरावती येथील विद्यापीठ ला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात आले आहे.
संत गाडगे महाराजांचे जीवन हे साधेपणा, स्वच्छता आणि समाजसेवा यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी आपल्या कृतीतून समाजाला योग्य दिशा दिली. म्हणूनच ते महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील तेजस्वी व्यक्तिमत्त्व मानले जातात.

आज संत गाडगेबाबा यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - संत गाडगेबाबा यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, विदर्भातील शेणगाव येथे संत गाडगेबाबा यांचा जन्म झाला.

दुसरा प्रश्न - संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, डेबूजी झिंगराजी जानोरकर असे संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव होते.

तिसरा प्रश्न - संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनाची सुरुवात कोणत्या वाक्याने करत असतं. 
बरोबर उत्तर आहे, संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनाची सुरुवात गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा या वाक्याने करत असतं. 

चौथा प्रश्न - संत गाडगेबाबा यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे. ?
बरोबर उत्तर आहे, अमरावती येथील विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात आले आहे.

शेवटचा पाचवा प्रश्न - स्वच्छतेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे - संत गाडगेबाबा यांना स्वच्छतेचे जनक म्हणून ओळखले जाते.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 22 फेब्रुवारी ( Lord Bedan powel )

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

लॉर्ड बेडन पॉवेल
लॉर्ड बेडन पॉवेल हे स्काउट चळवळीचे संस्थापक आणि जगभरातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे पूर्ण नाव रॉबर्ट स्टिफेन्सन स्मिथ बेडन पॉवेल असे होते. त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १८५७ रोजी इंग्लंडमधील लंडन येथे झाला.
बेडन पॉवेल यांचे वडील ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते. लहानपणापासूनच त्यांना निसर्ग, साहस, जंगलभ्रमण आणि शिस्तबद्ध जीवन यांची आवड होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ब्रिटिश सैन्यात प्रवेश केला आणि भारत तसेच आफ्रिका येथे सेवा बजावली.
दक्षिण आफ्रिकेतील युद्धादरम्यान त्यांनी दाखविलेल्या शौर्यामुळे ते प्रसिद्ध झाले. सैन्यातील अनुभवातून त्यांना जाणवले की, तरुणांना शिस्त, स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि देशप्रेम यांचे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे.
१९०७ साली त्यांनी इंग्लंडमधील ब्राउनसेया आईसलंड येथे पहिले स्काउट शिबिर आयोजित केले. हा प्रयोग यशस्वी ठरला. त्यानंतर १९०८ मध्ये त्यांनी “स्काऊटिंग फॉर बॉइझ” हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे स्काउट चळवळ जगभर पसरली.
स्काउट चळवळीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे –
शारीरिक, मानसिक व नैतिक विकास
स्वावलंबन व नेतृत्वगुणांची जोपासना
समाजसेवा व देशभक्तीची भावना
बेडन पॉवेल यांच्या कार्यामुळे अनेक देशांमध्ये स्काउट संघटना स्थापन झाल्या. आज जगभर कोट्यवधी विद्यार्थी स्काउट-गाईड चळवळीत सहभागी होत आहेत. त्यांना १९२९ साली “लॉर्ड” हा किताब देण्यात आला.
लॉर्ड बेडन पॉवेल यांचे ०८ जानेवारी १९४१ रोजी केनिया देशातील नयेरी येथे निधन झाले.
लॉर्ड बेडन पॉवेल यांनी तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी उभी केलेली स्काउट चळवळ ही आजही प्रेरणादायी आहे. शिस्त, साहस, सेवा आणि नेतृत्व यांचा संगम त्यांच्या कार्यात दिसून येतो. म्हणूनच ते “स्काउट चळवळीचे जनक” म्हणून ओळखले जातात.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - लॉर्ड बेडन पॉवेल यांनी कोणती चळवळ उभी केली ?
बरोबर उत्तर आहे, लॉर्ड बेडन पॉवेल यांनी स्काउट-गाईड चळवळ उभी केली.

दुसरा प्रश्न - कोणत्या वर्षी बेडन पॉवेल यांना “लॉर्ड” हा किताब देण्यात आला ? 
बरोबर उत्तर आहे, सन १९२९ मध्ये बेडन पॉवेल यांना “लॉर्ड” हा किताब देण्यात आला.

तिसरा प्रश्न - कोणत्या पुस्तकामुळे स्काउट चळवळ जगभर पसरली ?
बरोबर उत्तर आहे, स्काऊटिंग फॉर बॉइझ या पुस्तकामुळे स्काउट चळवळ जगभर पसरली.

चौथा प्रश्न - लॉर्ड बेडन पॉवेल यांनी पहिले स्काउट शिबिर कोणत्या वर्षी आयोजित केले ?
बरोबर उत्तर आहे, सन १९०७ मध्ये लॉर्ड बेडन पॉवेल यांनी पहिले स्काउट शिबिर आयोजित केले

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न -  “स्काउट चळवळीचे जनक” म्हणून कोण ओळखले जातात ?
बरोबर उत्तर आहे - लॉर्ड बेडन पॉवेल हे “स्काउट चळवळीचे जनक” म्हणून कोण ओळखले जातात

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Sunday, 15 February 2026

दिनविशेष माहिती - 21 फेब्रुवारी ( International Mother Language Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन याविषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 
आज २१ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्या भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे.
१९५२ साली बांगलादेशातील विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेसाठी आंदोलन केले आणि बलिदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ १९९९ साली युनेस्कोने २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला.
मातृभाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आपल्या भावना, विचार आणि परंपरा व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे मातृभाषा. संशोधनानुसार, मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांची आकलनशक्ती अधिक वाढते. आपण इंग्रजी किंवा इतर भाषा शिकाव्यात; पण त्याचबरोबर आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणे आणि तिचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे.
भाषावैज्ञानिक संस्थेच्या आकडेवारीनुसार जगात सुमारे ७,००० भाषा बोलल्या जातात. जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे मँडरिन चिनी भाषा आहे तर इंग्रजी ही जगभरात सर्वाधिक देशांमध्ये वापरली जाणारी द्वितीय क्रमांकाची भाषा आहे. तर भारतात १,६०० पेक्षा अधिक भाषा आणि उपभाषा बोलल्या जातात. भारतीय राज्यघटनेने २२ अधिकृत भाषा मान्य केल्या आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बंगाली आणि तिसऱ्या क्रमांकावर आपली मराठी भाषा बोलली जाते. 
चला, आजच्या दिवशी आपण आपल्या मातृभाषेचा सन्मान राखण्याचा आणि तिचे संवर्धन करण्याचा संकल्प करूया.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - युनेस्कोने २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून कोणत्या वर्षी घोषित केला ?
बरोबर उत्तर आहे, १९९९ साली युनेस्कोने २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला.

दुसरा प्रश्न - जगात सुमारे किती भाषा बोलल्या जातात. 
बरोबर उत्तर आहे, जगात सुमारे ७,००० भाषा बोलल्या जातात. 

तिसरा प्रश्न - जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे ?
बरोबर उत्तर आहे, जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे मँडरिन चिनी भाषा

चौथा प्रश्न - भारतीय राज्यघटनेने किती भाषा अधिकृत मान्य केल्या आहेत ?
बरोबर उत्तर आहे, भारतीय राज्यघटनेने २२ भाषा अधिकृत मान्य केल्या आहेत

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - २०११ च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे ?
बरोबर उत्तर आहे - २०११ च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी आहे. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 26 फेब्रुवारी ( Dr. Anandibai Joshi )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण ...