Saturday 7 May 2016

खास शालेय मुलांसाठी तयार करण्यात आलेले शब्दकोडे


आपल्या मुलांकडून नक्की सोडवून घ्या आणि सुट्टीचा आनंद घेऊ या.

कोडे कसे वाटले हे 09423625769 या whatsapp क्रमांकावर जरूर कळवा.
धन्यवाद






















Monday 2 May 2016

चर्चा -  ग्रामिण भागातील शैक्षणिक समस्या



* साद माणुसकीची अभियानाचे संकल्पक हरीश बुटले -
सुप्रभात
आजच्या दिवसाचे महत्वाचे काम
ग्रामीण भागातील शिक्षणाच्या 25 समस्यांची यादी करायची आहे. सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे.

साद माणुसकीची
समाजिकता अभियान विषयी

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक  आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा सहभाग असलेल्या राज्यव्यापी अभियानात शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, आणि वृद्धसेवा या क्षेत्रात कार्य केले जाणार आहे.

या अभियानातील शिक्षण विषयक कामाला पहिल्या टप्प्यात सुरुवात होणार असून प्रत्येक जिल्ह्यातील तालुकानिहाय शिक्षकांची फळी खेडोपाड्यातील होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणविषयक समस्या आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत.

खेडोपाडी शिक्षणविषयक अपडेट्स पोहोचविण्याचे काम "तुम्ही आम्ही पालक" मासिकाच्या माध्यमातून केले जाणार असून या अभियानाचे ते vehicle आहे.

आपल्यापैकी ज्यांना आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यातील शैक्षणिक कामासाठी योगदान द्यायचे असल्यास आपण कोणत्या प्रकारचे योगदान देऊ शकाल ते आम्हाला कळवू शकता.

राज्यभरातील खेडोपाड्यातून शहरात स्थायिक झालेल्या प्रत्येक सफल अश्या नागरिकाला आपल्या गावाकडील समस्यांकडे लक्ष देण्यासाठी सामाजिक अभियानात सामील होण्यासाठी माणुसकीची साद घालत आहोत.


* वाहतुकीची गैरसोय.
* अपुऱ्या भौतिक सुविधा.
* अनुपस्थित विद्यार्थी
* ग्रामिण भागात काम करण्यास  नाखुष असणारे शिक्षक / त्यामुळे ग्रामिण भागात रिक्त राहणारी पदे.
1.पालकांची मानसिकता
2.रोजगार समस्या
3.उदरनिर्वाह प्रश्न
4.शिक्षणाप्रती असलेले अज्ञान
* आर्थिक अडचणी मुळे राहणारे अपुरे शिक्षण
हुशार पण गरीब मुलावर येणारी जबाबदारी ,पालक व्यसनी असणे,घरातील वातावरण तणावयुक्त असणे,हुशार मुलगी असूनही कमी वयात लग्न करणे पालकांना तिच्या शिक्षणाचा बोजा वाटणे इ अनेक समस्यांशी संघर्ष करुन् शिक्षण घेणे अवघड आहे...त्यावर साद माणुसकीची परिवार नक्कीच उपाय शोधेल...

पालकांचे अज्ञान,
गरीबी
आणि
शिक्षणाविषयीची अनस्था

जी समस्या आपण सुचविलेली आहे त्या समस्येविषयी 10 ओळी विवेचन करावं म्हणजे ती समस्या स्पष्ट होईल आणि आज संध्याकाळी ग्रामीण शिक्षणाच्या समस्या या विषयावर एक चांगले टिपण तयार होईल. मग त्यावरील कोणत्या समस्यांना प्राधान्य द्यायचं आणि त्यांच्या उपायांसाठी आपण आपल्या परीने काय करू शकू त्याचा action प्लॅन तयार करून कामाला लागू.

ग्रामीण भागात मुलांच्या शिक्षण पूर्ण होण्यासाठी अनंत अडचणी येतात. त्यांतील प्रामुख्याने म्हणजे मुलांच्या पालकाची आर्थिक बाजू. शासन सर्व शिक्षा अभियान च्या माध्यमांतून इयत्ता आठवी वर्गापर्यंत मोफत शिक्षण देत आहे. त्यामूळे पालकांना या वर्गापर्यंत काही अडचण येत नाही. परंतु त्यापुढील शिक्षणासाठी पालकांना अडचण निर्माण होते. पुस्तकाची खरेदी, वह्या, दफ्तर, शालेय गणवेष, आणि इतर खर्च यामूळे शेतकरी असलेले पालक ऐन बी - बियाणे खरेदीच्या मोसमात शालेय खरेदी करू शकत नाहीत असे चित्र दरवर्षी निदर्शनास येते. यावर आपणांस काही तोडगा काढता येईल काय ? नवव्या आणि दहाव्या वर्गात शिकणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या हुशार मुलांना प्रति विद्यार्थी 1000 रू. च्या किमतींचे वस्तु मदत स्वरूपात देता येईल काय यावर जरूर विचारविमर्श करण्यात यावा आणि तय बाबत चे निकष चर्चेमधुन तयार करावे. ही नम्र विनंती.

तसेच अजून एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे.

तालुकास्तरावर गरीब मुलांसाठी
" अभ्यासिका वर्ग " चालविणे

यांवर ही चर्चा केल्यास काही तरी मार्ग सापडेल
बहुतांश मुलांना रात्रीच्या वेळी अभ्यास करतांना अडचणी निर्माण होतात. कुणाच्या घरी विद्युत सुविधा नसते. कुणाच्या घरी मार्गदर्शन करण्यासाठी कोणी उपलब्ध नसतात अश्या सर्व मुलांसाठी ही दोन तासाची अभ्यासिका खूप काही देऊ शकते.

माणसांच्या अडचणी समजून घेऊन त्यांवर तोडगा काढणे हीच आहे खऱ्या अर्थाने साद माणुसकीची असे वाटते

प्रवेशासाठी दिली जाणारी प्रलोभने
ईयत्ता ५ व ८ च्या प्रवेशाकरीता माध्यमिक शिक्षकांकडून विविध प्रकारची प्रलोभणे दिली जातात. त्यामूळे ग्रामीण विभागातील पालक मुलांच्या शिक्षणापेक्षा पैश्याला जास्त महत्व देतात. अक्षरशःदाखल्याचा व्यापार  सूरु आहे.यामूळे असेही लक्षात येते की काही गरीब पालक याला बळी पडतात.दाखल्याची फी आकारल्या जात नसतांना पालक माध्यमिक शिक्षकांकडुन रोख रकमेची मागणी करतात.माध्यमिक शाळेला पटसंखेची असणारी अट कमी होणारी विद्यार्थी संख्या हे मुळ कारण.

Gramin palakachi  shaishanik udasinta

Mulasathi apurya soyi
Suvidha

पालकाचे बेरोजगारी मुले शहरा कड़े धाव घेतात त्यामुळे मुलांची जबाबदारी ते घरातील म्हातार्या मानसाकडे सोपवून जातात आई वडिलांचे पुरशे लक्ष्य नसल्यामुळे अशी मुले कमी वयात व्यस्नधीनतेकड़े वळतात्।त्यांच्या शालेय गरजाकडे लक्ष्य राहत नाही शाळेत अस्थपूर्वक माहिती घेऊन लक्ष्य दिल्या गेले नहीं तर शाळा नकोशो वाटते अशी मुले नीट  समायोजन करू शकत नाही
सर यावर्षी दुष्काळमुले ही समस्या जास्त प्रमाणात जाणवत आहे


पालकाना  गावातरोजगार उपलब्ध नसने त्यामुळे होणारे स्थलांतर

आरोग्याच्या कारणाभावि विद्यार्थी गैरहजर राहतात।


वीटभट्टवर किंवा बांधकाम या ठिकाणी स्वस्त आणि दिर्घकाळ काम करणारे मजूर म्हणून परप्रांतीय लोक काम करतात त्यानां मातृभाषेतून शिक्षण नाही त्या  अभावी ते वंचित राहतात.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या :-
१. पालक त्यांच्या दैनंदिन कामात विद्यार्थ्यांना गुंतवतात.
त्यामुळे त्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र राहत नाही.
२.अनेक मुलींची विवाह इयत्ता ८ते १०वी मध्येच होतात.परिणामी त्यांचे शिक्षण थांबते.
३.गावात पुढील शिक्षणाची सोय नसेल तर शाळेत नियमितता राहत नाही.


बर्‍याच वेळा असे होते  ग्रामिण भागातील मुले शिक्षकांशी मनमोकळेपणे बोलायला घाबरतात . मग त्याच्या अभ्यासातील शंकाचे निरसन होत नाही . म्हणून ते शाळेत जायला घाबरतात , किंवा कंटाळा करतात

१   online चे काम करायला लावताना शालेत computer व साधने नसने
२ कोणतेहि आर्थिक लेखेविशयी प्रशिक्षन न देता १००% काम देण्याची अपेक्षा करणे
३ शालेतील सुविधा पूर्ण करणेकरिता शासनाकडून वारंवार मदत मागूनही  निव्वल समाज सहभागावर विसंबून राहणे
४ mobile teacher व विषयतज्ज्ञा चे कोणतेहि सहकार्य न मिलता फक्त कागदे काले करते

ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना पालकांच्या व्यसनाधिनतेमुळे  योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि दुर्लक्ष  :—
   मी ज्या कार्यक्षेत्रात काम करत आहो तेथील विद्यार्थी हुशार  असूनहि पालकांच्या व्यसनाधिनतेमुळे त्या  मुलांना आवश्यक पुस्तके व शैक्षणिक सुविधा  पुरविल्या जातनाही (शासनाच्या सुविधावगळता) तसेच योग्य मार्गदर्शन  मिळत  नाही.G.D.Yedme

ग्रामिण भागातील शिक्षण विषयक समस्या-
1)विद्यार्थांच्या ग्रुहपाठाकडे पालकांचे दुर्लक्ष.
2)शैक्षणिक जाणिवेचा अभाव.
3)शैक्षणिक साहित्याचा अभाव.

ग्रामीण भागात प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाविषयी पालकांमध्ये गैरसमज मोठया प्रमाणात पसरविल्या जात आहे.
उदा. इंग्रजी माध्यम

शिक्षणातील सकारात्मक बदल 100% शिक्षक स्विकारत नाही.

मुलांना जीवनकौशल्ये, मुल्ये यांचे शिक्षण मिळत नाही.

CBSE curriculum  should b followed in zp  schools to compete convent in rural area

ग्रामीण भागातील मुलांना प्राथमिक शिक्षणानंतर पुढील टप्प्यावर  योग्य मार्गदर्शन मिळत नाही.

Yogy margdarsha krunhi palak durlaksh krtat


ग्रामीण भागातील विद्यार्ध्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण परिणामकारक मिळत नाही . पालक आपल्या पाल्याविषयी शिक्षणाबाबत जागरूक नाही.

1वर्ग 1शिक्षक पाहिजे
पूर्वप्राथमिक वर्ग शाळेत सुरू करने आवश्यक
50पट असलेली शाळा तिथे 1स्वच्छता करणारी व्यक्ति पाहीजे
उपक्रम नियोजन पाहिजे
शाळा सुरू झाल्या पासून 100%शिक्षक हजर.कोणतेही प्रशिक्षण नको
पालक लक्ष देत नाही

मराठीतून शिक्षण पाहीजे

सर्वात महत्वाचे म्हणजे अधिकृत मुख्याध्यापक पाहिजेत - हेमंत

पुर्व प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळेला जोड़ने आवश्यक आहे

पालकांना माटरूंभाषेतुन शिक्षण घेण्याचे महत्व सम्जौन  आवश्यक आ

मुख्ययाध्यापक पद हे शिक्षकाव्यतिरिक्त असले पाहिजे - हेमंत

ग्रामीण भागत मुलांमध्ये अभ्यास करण्याची सवय नाही

वाचनाची आवड कमी झाली

केबल tv मुळे मुल अभ्यास करत नाही

खुप शाळांना wall compound सुद्धा नाही।

अंगणवाडी मधून सुध्दा चांगले शिक्षण मिळायला पाहिजे, आपल्या मुलांना 3 वर्षापासून अंगणवाडी त जात असला तरी काहीच .शिकवले जात नाहि म्हणून पाया कच्चा राहतो

ग्रामीण भागत मजूर वर्ग असल्यामुळे मुलांकरिता वेळ देत नाही

एंग्रजि माध्यमातून शिक्षण घेताना येणाऱ्या अड्चनिमुले मुलांचा योग्य विकास होत नाहि असे दिसून येते

शिक्षक नी बदल स्विकार केला पाहीजे

समानता आवश्यक आहे
गणवेष शिष्यव्रुत्ति other योजना

खेळणी साहित्य प्रतेक शाळेला पाहीजे

Workbook आवश्यक

मुले लहान आहे पण समजतात

समस्या पुष्कळ आहेत, प्रत्येकाच्या प्रमाणे त्याचा प्राधान्य क्रम वेगळा असेल,मला असे वाटते की पालकांचे निरक्षर असणे ही मोठी समस्या असू शकते, पालक शिक्षित नसल्यामुळे त्यांना शाळा खेळ वाटते, गेले काय नाही गेले काय त्यांना काहीही फरक पड़त नाही. घरी येउनहि ते मुलांना काहीही विचारत किव्हा सांगत नाही की तू आज काय नवीन शिकला.

शैक्षणिक साहित्य साठी मुलांना अनुदान पाहिजे

2. सर्व शिक्षा अभियानातून class 8 पर्यन्त मुलांना सर्व गोष्टी free मिळतात पण त्या नंतर खर्च वाढत जातो.शाळा खर्चिक आहे असे पालकांना वाटते, मग ते त्या मुलांना शाळे ऐवजी कामाला पाठवने पसंद करतात जेनेकरून शिक्षणाचा खर्च वाचेल व् 2 पैसे मिळतील

Gramin bhagat anek pratibhavan vidhyarthi aahe parantu 8th nantar tyanha yogya margadarshan milatnaslyamule pudhil pravas thamto


Aata aaplya z.p.madhe semi aahe aaplya shaletun pudhchya  shalet  semi nahi tr  students ni kay karaych

गणेश वालवे जि.प.शाला तरोडा प.स.कारंजा.जि वर्धा.
1.पायल चवारे .शैशणिक मदत हवी.
2 परिस्थितीमुळे शिकू शकत नाही. दारूमुळे घरात भांडण होतात.
3.मुलाना चांगल्या सवयी बाबत मार्गदर्शन हवे.
4.मु अ नी वर्ष भराने नियोजन करायला हवे.
5.सवॅ शिशकाची शाळेतर्फे मिटींग
जरूरी.
5 विद्यार्थ्यांसाठी विवीध शिबिरे घेण्यात यावी.
6.शालेला मदतनीस असावे मुंबई. मु.अ.साठी.
7.शिशकाना फवत शिकविणयाचे काम करू द्यावे.
8.शिशकानी शाळेत मिसळून राहावे.
9.परतेक वर्गात संगणक द्यावे
10 निवडणूक कामे देवू नयेत मुलावर परीणाम होतो
11.शालेय अभ्यासक्रम कमी करण्यात यावा.
12. विद्यार्थी शिकविण्यात भर देण्यात यावा.
13.पालक सभा दर महिन्यात घेण्यात   यावी शाळेत
14 क्षुल्लक कारणावरून शिक्षकाला जबाबदार धरू नये
15.शिक्षकाचे अडचणी बाबत चर्चा खुले चर्चा सत्र घेण्यात यावे.
16. उन्हाळी सत्र पुर्ण सुगीचे असावे.
17. निकाल बनविने किचकट नसावे.
18.शिक्षकांचे पगार एक तारखेलाच झाले पाहिजेत.
19. पदवीधर व सहाय्यक शिक्षक असा भेदभाव शाळेत नसावा.
20. एका वर्गाला एक शिक्षक असावा
21. काम करतांना शिक्षकाच्या मानसिकतेचा (दोन वर्गाला एक शिक्षक ) विचार करण्यात यावा.
22.शिक्षकानी आपल्या पेशाला जपावे.
24 शिक्षकाच्या सभेला सभागृह व बसायला बेंच असावे.
25.शिक्षक पुरस्कार योग्य शिक्षकाला मिळावा.


* आज च्या घडीला ग्रामीण  व स्लम भागातील विद्यार्थी  शिक्षनात रस कमी घेतात इतर वाईट गोष्टीकडे जास्त वळतांना दिसतात  उदा.व्यसन करणे अश्यावेळी माझे मते एखादे गाव किंवा एरिया ठरवून तेथील पालक व विद्यार्थ्यां मध्ये योग्य विचारांची पेरणी करण्यासाठी विविध उपक्रम आपल्या समूहातर्फे राबवू शकतो  उदा. सुसंस्कार शिबीर व वर्षभर प्रभावीपणे त्या गोष्टींचा

* पाठपुरावा करण्यासाठी योग्य आखणी व्हावी

* त्यामुळे एकाच ठिकाणी जरी कार्य झाले तरी त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आल्यास इतर ठिकाणी आपोआप बदल दिसू शकतो व या कार्याची समाजात चर्चा होऊन आणखीही काही उपयुक्त लोक अभियानात जोडता येतील

* अनेक शाला मध्ये पुरेशा भेोतिक सुविधा नाहीत केवल कागदोपत्रि दाखवल्या जातात त्यामुले पालक , विद्यार्थी सरकारी शाला कडे पाठ फिरवतात

1)ग्रामीण भागात प्रत्येक विषय वार व वर्गाला शिक्षक असावे
2)प्रशिक्षण कमी असावे
3)गरीब विद्यार्थी यांना गणवेष मोफत असावे
4)शिक्षकांना शिकवू द्यावे etar kamala जूम्पू नये
5)नीर्व्य्सनी असावे विद्यार्थी समोर आदर्श वर्तन असावे
6)ग्रामीण भागात zp नी convent school काढावे किंवा अंगणवाडी चे upgradation करावे


* अनेक होतकरु विद्यार्थी अार्थिक परिस्थितिमुले मागे राहतात

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...