Saturday, 28 February 2026

जागतिक नागरिक संरक्षण दिवस - 01 मार्च ( World Civil Defence Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आजच्या कार्यक्रमात आपण जागतिक नागरी संरक्षण दिन यां विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

🌍 World Civil Defence Day
जगभरात दरवर्षी १ मार्च रोजी ‘जागतिक नागरी संरक्षण दिन’ साजरा केला जातो. नैसर्गिक आपत्ती, अपघात, युद्धस्थिती किंवा अन्य संकटांच्या काळात नागरिकांचे संरक्षण करणे आणि त्यांना सुरक्षिततेबाबत जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
हा दिवस International Civil Defence Organization (ICDO) या संस्थेच्या पुढाकाराने साजरा केला जातो. १ मार्च १९७२ रोजी या संस्थेची अधिकृत स्थापना झाली. त्यानिमित्ताने हा दिवस ‘जागतिक नागरी संरक्षण दिन’ म्हणून घोषित करण्यात आला.
नागरी संरक्षण म्हणजे आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे जीवित व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी केलेली तयारी व उपाययोजना. यात भूकंप, पूर, आगी, चक्रीवादळ, महामारी, दहशतवादी हल्ले इत्यादी संकटांचा समावेश होतो.
या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे, नागरिकांना प्रथमोपचार व सुरक्षिततेचे प्रशिक्षण देणे, आपत्तीच्या काळात स्वयंसेवकांचे योगदान अधोरेखित करणे, शाळा, महाविद्यालये व कार्यालयांत सुरक्षा सराव (Mock Drill) आयोजित करणे.
भारतात नागरी संरक्षण कार्य गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली चालते. विविध राज्यांमध्ये स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाते. आपत्तीच्या वेळी बचावकार्य, प्रथमोपचार, अन्न-वाटप, लोकांना सुरक्षित स्थळी हलविणे अशी महत्त्वाची कामे केली जातात. राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाईन 112 अशी आहे. रस्त्यावर अपघात झाल्यास 108 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलाविता येते. 
विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे मूलभूत ज्ञान घेणे, शाळेतील सरावात सहभागी होणे आणि संकटाच्या काळात शांतता राखणे आवश्यक आहे. जागरूक नागरिक हा सुरक्षित समाजाचा पाया असतो.
जागतिक नागरी संरक्षण दिन आपल्याला सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देतो. संकटे कधीही येऊ शकतात, परंतु योग्य प्रशिक्षण, सज्जता आणि सामूहिक प्रयत्न यांच्या बळावर आपण त्यांचा सामना करू शकतो. म्हणूनच या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - जगभरात दरवर्षी १ मार्च हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, जगभरात दरवर्षी १ मार्च रोजी ‘जागतिक नागरी संरक्षण दिन’ साजरा केला जातो.

दुसरा प्रश्न - ICDO चे full form सांगा. 
बरोबर उत्तर आहे, International Civil Defence Organization

तिसरा प्रश्न - रस्त्यावर अपघात झाल्यास कोणत्या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावे ?
बरोबर उत्तर आहे, रस्त्यावर अपघात झाल्यास 108 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावे.

चौथा प्रश्न - ICDO या संस्थेची अधिकृत स्थापना केव्हा झाली ?
बरोबर उत्तर आहे, १ मार्च १९७२ रोजी ICDO या संस्थेची अधिकृत स्थापना झाली.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक काय आहे ?
बरोबर उत्तर आहे - राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाईन क्रं. 112 अशी आहे. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 2 मार्च ( Ram Shevalkar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आजच्या कार्यक्रमात आपण साहित्यिक राम शेवाळकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
             प्रा. राम शेवाळकर
राम बाळकृष्ण शेवाळकर हे साहित्यिक, उत्तम कीर्तनकार आणि प्रभावी वक्ते होते. राम शेवाळकर यांचा जन्म २ मार्च १९३१ रोजी अमरावतीतील अचलपूर याठिकाणी झाला. त्यांचे वडील विदर्भात ‘कीर्तनकेसरी’ म्हणून प्रसिद्घ होते. राम शेवाळकर हे आपल्या वडिलांच्या अनुकरणातून लहान वयातच कीर्तने पाठ करून ती सादर करीत. त्यामुळे त्यांच्यात सभाधीटपणा आणि अमोघ वाणी आली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले. त्यांची आई गोपिका यांचे राम शेवाळकर यांच्यावर जीवापाड प्रेम होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अचलपूर येथेच झाले.
पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेड येथील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली. लहानपणापासूनच ते काव्यरचना करीत होते. ‘असोशी’ (१९५६) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर ‘रेघा’(१९६७) आणि ‘अंगारा’ (१९८९) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. निसर्गातील चैतन्याचा आणि सृजनशक्तीचा आविष्कार त्याच्या निरनिराळ्या रूपांतून पाहणे, त्यांना शब्दरूप देणे, हे त्यांच्या कवितेचे लक्षणीय वैशिष्ठ्य होय.
१९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात राम शेवाळकरांचा सहभाग होता.
 ‘पाणियावरी मकरी’ (२००८) हे त्यांचे आत्मचरित्र. त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांत अमेरिकाचा पुरस्कार  ‘मॅन ऑफ द ईयर’ (१९९७), बॉस्टन येथील संस्थे मार्फत साहित्य धुरंधर पुरस्कार,  (१९९७), दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानाचा कुसुमाग्रज पुरस्कार (१९९९) आदींचा समावेश आहे. अशा या थोर साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांचे ३ मे २००९ रोजी नागपूर येथे निधन झाले.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - राम शेवाळकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, राम शेवाळकर यांचा जन्म २ मार्च १९३१ रोजी अमरावतीतील अचलपूर याठिकाणी झाला.

दुसरा प्रश्न - राम शेवाळकर यांना अमेरिकाचा कोणता पुरस्कार मिळाला ?
बरोबर उत्तर आहे, राम शेवाळकर यांना अमेरिकाचा  ‘मॅन ऑफ द ईयर’ पुरस्कार मिळाला. 

तिसरा प्रश्न - राम शेवाळकर यांचा पहिला काव्यसंग्रह कोणता ?
बरोबर उत्तर आहे, असोशी’ (१९५६) हा राम शेवाळकर यांचा पहिला काव्यसंग्रह.

चौथा प्रश्न - १९९४ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरले होते ?
बरोबर उत्तर आहे, १९९४ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गोव्यातील पणजी येथे भरले होते.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - राम शेवाळकर यांचे निधन कोठे झाले ?
बरोबर उत्तर आहे - राम शेवाळकर यांचे ३ मे २००९ रोजी नागपूर येथे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Friday, 27 February 2026

दिनविशेष माहिती - 28 फेब्रुवारी ( National Science Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण राष्ट्रीय विज्ञान दिन यांविषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

सी. व्ही. रमन आणि ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’
भारतीय विज्ञानविश्वात डॉ. सी. व्ही. रमन यांचे नाव अत्यंत गौरवाने घेतले जाते. त्यांनी भौतिकशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण शोध लावला, जो आज “रमन इफेक्ट” या नावाने ओळखला जातो. त्यांच्या या ऐतिहासिक शोधाच्या स्मरणार्थ भारतात २८ फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून साजरा केला जातो.
२८ फेब्रुवारी १९२८ रोजी डॉ. रमन यांनी प्रकाशाच्या विखुरण्याविषयी (Scattering of Light) महत्त्वाचा शोध लावला. एखाद्या पारदर्शक पदार्थातून प्रकाश जात असताना त्याच्या तरंगलांबीमध्ये (wavelength) सूक्ष्म बदल होतो, हे त्यांनी सिद्ध केले. या घटनेला “रमन इफेक्ट” असे नाव देण्यात आले.
या शोधामुळे पदार्थांची रचना आणि गुणधर्म समजून घेण्यास मोठी मदत झाली. आजही रसायनशास्त्र, वैद्यकीय संशोधन, औषधनिर्मिती आणि भौतिकशास्त्रात रमन इफेक्टचा उपयोग केला जातो.
डॉ. रमन यांच्या या अद्वितीय संशोधनासाठी त्यांना १९३० साली भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. विज्ञान क्षेत्रातील हा सन्मान मिळविणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले.
डॉ. रमन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केलेल्या शोधाच्या स्मरणार्थ भारत सरकारने १९८६ पासून २८ फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून घोषित केला. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि संशोधन संस्था येथे विज्ञान प्रदर्शन, प्रकल्प स्पर्धा, व्याख्याने आणि विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
या दिनाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे आणि संशोधनाची प्रेरणा देणे हे आहे.
डॉ. सी. व्ही. रमन यांचा “रमन इफेक्ट” हा शोध भारतीय विज्ञानाच्या इतिहासातील सुवर्णक्षण मानला जातो. त्यांच्या कार्यामुळे भारताचा जागतिक स्तरावर मान उंचावला. “राष्ट्रीय विज्ञान दिन” हा दिवस विज्ञानाचा प्रसार होण्यासाठी आणि नव्या पिढीला संशोधनाची प्रेरणा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून केव्हापासून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला ?
बरोबर उत्तर आहे, १९८६ पासून २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला

दुसरा प्रश्न - नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण होते ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. सी. व्ही. रमन हे नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ.

तिसरा प्रश्न - डॉ. सी. व्ही. रमन यांनी शोध लावलेल्या प्रयोगाचे नाव काय ? 
बरोबर उत्तर आहे, रमन इफेक्ट डॉ. सी. व्ही. रमन यांनी शोध लावलेल्या प्रयोगाचे नाव होते. 

चौथा प्रश्न - डॉ. सी. व्ही. रमन यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार देण्यात आला ? 
बरोबर उत्तर आहे, १९३० यावर्षी डॉ. सी. व्ही. रमन यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - रमन इफेक्टचा शोध केव्हा लावण्यात आला ?
बरोबर उत्तर आहे - २८ फेब्रुवारी १९२८ रोजी रमन इफेक्टचा शोध लावण्यात आला.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Wednesday, 25 February 2026

दिनविशेष माहिती - 27 फेब्रुवारी ( Kusumagraj )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

कुसुमाग्रज
कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक अजरामर कवी, नाटककार व साहित्यिक होते. त्यांचे खरे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे होते. मराठी काव्य आणि नाटक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या लेखनातून देशप्रेम, मानवतावाद, स्वातंत्र्याची ओढ आणि सामाजिक जाणीव व्यक्त होते.
कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे बालपण नाशिक येथे गेले. लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती. शिक्षण घेत असतानाच त्यांनी लेखनास सुरुवात केली.
कुसुमाग्रजांनी कविता, नाटके, कथा, कादंबऱ्या अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले. त्यांची काही प्रसिद्ध साहित्यकृती विशाखा काव्यसंग्रह, नटसम्राट प्रसिद्ध नाटक, हिमरेषा, आंधळा
त्यांच्या कवितांमध्ये स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि मानवतेचा संदेश दिसून येतो. विशाखा या काव्यसंग्रहामुळे ते विशेष प्रसिद्ध झाले. त्यांना तात्यासाहेब या नावानेही ओळखले जाते. 
कुसुमाग्रज हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते सामाजिक जाणीव असलेले विचारवंत होते. त्यांनी समाजातील अन्याय, विषमता आणि अंधश्रद्धांविरुद्ध आवाज उठविला. त्यांच्या लेखनातून मानवतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश मिळतो.
त्यांना मराठी साहित्यातील सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार इ.स. १९८७ मध्ये प्राप्त झाला. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे ते दुसरे साहित्यिक होते. तसेच त्यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले.
कुसुमाग्रज यांचे निधन १० मार्च १९९९ रोजी झाले.  ‘कुसुमाग्रज’  यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी, 2013 रोजी घेण्यात आला.
कुसुमाग्रज हे मराठी साहित्याचे तेजस्वी नक्षत्र होते. त्यांच्या लेखनातून समाजाला प्रेरणा, दिशा आणि जागृती मिळाली. मराठी भाषेचा गौरव वाढविण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे.
आज मराठी भाषा गौरव दिन त्यानिमित्ताने सर्वाना खूप खूप शुभेच्छा आणि कवी कुसुमाग्रज यांना विनम्र अभिवादन 🙏

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - कुसुमाग्रज खरे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, कुसुमाग्रज खरे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे होते. 

दुसरा प्रश्न - कुसुमाग्रज लिखित प्रसिद्ध नाटकाचे नाव सांगा.
बरोबर उत्तर आहे, कुसुमाग्रज लिखित प्रसिद्ध नाटकाचे नाव आहे नटसम्राट 

तिसरा प्रश्न - कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

चौथा प्रश्न - कुसुमाग्रज यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले ?
बरोबर उत्तर आहे, सन १९८७ मध्ये कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला ?
बरोबर उत्तर आहे - कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 26 फेब्रुवारी ( Dr. Anandibai Joshi )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आजच्या कार्यक्रमात आपण भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर - आनंदीबाई जोशी
आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखल्या जातात. त्या भारतीय स्त्रीशिक्षणाच्या इतिहासातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षण घेऊन वैद्यकीय पदवी मिळवली आणि भारतीय महिलांसाठी नवा मार्ग खुला केला.
आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी महाराष्ट्रातील कल्याण येथे झाला. त्यांचे मूळ नाव यमुना होते. त्या काळात मुलींच्या शिक्षणाला समाजात फारसे प्रोत्साहन नव्हते. लहान वयातच त्यांचा विवाह गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्‍नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. गोपाळराव हे शिक्षणप्रेमी व प्रगत विचारांचे होते. त्यांनी आनंदीबाईंना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
वयाच्या केवळ १४ व्या वर्षी आनंदीबाईंना मातृत्व आले; परंतु वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे त्यांचे बाळ दगावले. या दु:खद प्रसंगामुळे त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्धार केला, जेणेकरून भारतीय महिलांना योग्य उपचार मिळावेत. त्या काळात स्त्रियांनी परदेशात जाऊन शिक्षण घेणे अत्यंत धाडसी पाऊल मानले जात होते.
गोपाळराव यांच्या पाठिंब्यामुळे आनंदीबाई अमेरिकेत गेल्या. त्यांनी Woman's Medical College of पेंनसिलवानिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतले. १८८६ साली त्यांनी एम.डी. पदवी मिळवली. अशा प्रकारे त्या परदेशातून वैद्यकीय पदवी घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
आनंदीबाईंच्या यशामुळे भारतीय समाजात महिलांच्या शिक्षणाविषयी जागृती झाली. त्यांनी आपल्या धैर्य, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर अनेक अडथळ्यांवर मात केली. त्या केवळ डॉक्टर नव्हत्या, तर स्त्रीशक्तीचे प्रतीक होत्या.
अमेरिकेत शिक्षण घेत असताना त्यांचे आरोग्य खालावले. क्षयरोगामुळे त्यांचे २६ फेब्रुवारी १८८७ रोजी निधन झाले. केवळ २१ वर्षाच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. अल्पायुष्यातही त्यांनी भारतीय इतिहासात अजरामर स्थान मिळवले.
आनंदीबाई जोशी या भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या संघर्षमय जीवनातून आपण ध्येय, परिश्रम आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व शिकतो. शिक्षणामुळेच समाजात परिवर्तन घडू शकते, याचा आदर्श त्यांनी घालून दिला.
आनंदीबाई जोशींनी भारतीय स्त्रीशिक्षणासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी एक आदर्श मानदंड घालून दिला. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून अनेक पुरस्कार व शिष्यवृत्ती दिल्या जातात.
आज डॉ. आनंदीबाई जोशी यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन 🙏

दिनविशेष माहिती - 26 फेब्रुवारी ( Vinayak Savarkar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
मुलांनो हे देशभक्ती गीत ऐकू या.......! 
तुम्हांला माहित आहे का हे गीत कुणी लिहिले आहे ? 
अगदी बरोबर, तर हे गीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिले आहे.
तर आजच्या कार्यक्रमात आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

स्वातंत्र्यवीर सावरकर

विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक, विचारवंत, साहित्यिक आणि राष्ट्रभक्त नेते होते. त्यांना “स्वातंत्र्यवीर सावरकर” म्हणून ओळखले जाते. त्यांच्या धाडसी कार्यामुळे आणि राष्ट्रवादी विचारांमुळे भारतीय इतिहासात त्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे.
विनायक सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरपंत आणि आईचे नाव राधाबाई होते. लहानपणापासूनच त्यांच्यात देशभक्तीची भावना प्रखर होती. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे शिक्षण घेतले. पुढे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले.
इंग्लंडमध्ये असताना त्यांनी ‘अभिनव भारत’ ही गुप्त संघटना स्थापन केली. त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसमरावर “The Indian War of Independence 1857” हे पुस्तक लिहिले, ज्यामुळे ब्रिटिश सरकार सावध झाले. त्यांच्या क्रांतिकारक कार्यामुळे त्यांना अटक करून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना अंदमानातील सेल्युलर जेल येथे कठोर कारावास भोगावा लागला. येथे त्यांनी माझी जन्मठेप नावाचे पुस्तक लिहिले ज्यात अंदमानातील कारावासातील अनुभवांवर आधारित आत्मकथन आहे. त्यांच्या साहित्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वैचारिक बळ मिळाले.
सावरकरांनी “हिंदुत्व” ही संकल्पना मांडली. ते प्रभावी कवी व लेखक होते. “जयस्तुते”, “सागरा प्राण तळमळला” यांसारखी त्यांची देशभक्तीपर गीते आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी सामाजिक सुधारणांवरही भर दिला आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी कार्य केले.
१९२४ मध्ये त्यांची सुटका झाली. पुढे त्यांनी समाजकार्य व राजकीय कार्यात सहभाग घेतला. ते काही काळ हिंदू महासभाचे अध्यक्ष होते.
दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी स्वेच्छामरण (आत्मार्पण) स्वीकारले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे पराक्रमी, विचारशील आणि निष्ठावान राष्ट्रभक्त होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांचे जीवन देशप्रेम, त्याग आणि धैर्य यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे.

आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 🙏

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - विनायक दामोदर सावरकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाने ओळखले जाते.

दुसरा प्रश्न - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला.

तिसरा प्रश्न - अंदमानच्या तुरुंगात असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणते पुस्तक लिहिले ?
बरोबर उत्तर आहे, 

चौथा प्रश्न - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणती गुप्त संघटना स्थापन केली ?
बरोबर उत्तर आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘अभिनव भारत’ ही गुप्त संघटना स्थापन केली.

शेवटचा पाचवा प्रश्न - सावंत्र्यवीर सावरकर यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - सावंत्र्यवीर सावरकर यांचे दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबई येथे निधन झाले. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Monday, 23 February 2026

दिनविशेष माहिती - 25 फेब्रुवारी ( Sir Donald Bradman )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
मुलांनो, तुम्हांला सर्वात जास्त कोणता खेळ आवडतो, सांगा पाहू......
हो... मला पण माहित आहे, तुम्हांला सर्वात जास्त क्रिकेट हा खेळ आवडतो. 
तर आजच्या कार्यक्रमात आपण क्रिकेटचा बादशहा म्हणजे सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

सर डोनाल्ड ब्रॅडमन
सर डोनाल्ड ब्रॅडमन हे क्रिकेट जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक मानले जातात. क्रिकेटच्या इतिहासात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या फलंदाजीची सरासरी आजही एक विक्रम मानली जाते.
सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचा जन्म २७ ऑगस्ट १९०८ रोजी ऑस्ट्रेलियातील कुटामुंड्रा येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची आवड होती. त्यांनी भिंतीवर चेंडू मारून त्यावर सराव करत आपल्या फलंदाजी विकसित केली.
ब्रॅडमन यांनी १९२८ साली ऑस्ट्रेलिया संघाकडून कसोटीत पदार्पण केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत ५२ कसोटी सामने खेळले आणि ६९९६ धावा केल्या. त्यांची कसोटी फलंदाजीची सरासरी ९९.९४ होती, जी आजपर्यंत कोणालाही गाठता आलेली नाही. कसोटी सामन्यातील त्यांची ३३४ ही सर्वोच्च धावसंख्या होती.
१९३० सालच्या इंग्लंड दौऱ्यात त्यांनी एका वर्षात ९७४ धावा करून विक्रम प्रस्थापित केला. त्यावेळी त्यांची खेळी संपूर्ण जगभर गाजली. त्यांना त्यांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे “द डॉन” म्हणून ओळखले जाऊ लागले.
१९४९ साली त्यांना “नाईट” हा किताब देण्यात आला, त्यामुळे ते “सर डोनाल्ड ब्रॅडमन” म्हणून ओळखले जाऊ लागले. ते ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे कर्णधारही होते. क्रिकेटमधील शिस्त, चिकाटी आणि उत्कृष्ट तंत्र यासाठी ते आदर्श मानले जातात. १९५८ साली त्यांनी क्रिकेट खेळाची शास्त्रोक्त माहिती सांगणारा 'दि आर्ट ऑफ क्रिकेट' नावाचे पुस्तक लिहिले.
सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचे २५ फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाने एक महान खेळाडू गमावला.
सर डोनाल्ड ब्रॅडमन हे केवळ महान फलंदाज नव्हते, तर ते चिकाटी, परिश्रम आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक होते. त्यांनी क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम केले आहेत. म्हणूनच त्यांना “क्रिकेटचा बादशहा” म्हणून ओळखले जाते.
आज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - “क्रिकेटचा बादशहा” म्हणून कोणाला ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, सर डोनाल्ड ब्रॅडमन यांना “क्रिकेटचा बादशहा” म्हणून ओळखले जाते.

दुसरा प्रश्न - सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी आपल्या कारकीर्दीत किती कसोटी सामने खेळले ?
बरोबर उत्तर आहे, सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी आपल्या कारकीर्दीत ५२ कसोटी सामने खेळले

तिसरा प्रश्न - सर डोनाल्ड ब्रॅडमन कोणत्या संघाकडून खेळत होते ?
बरोबर उत्तर आहे, सर डोनाल्ड ब्रॅडमन ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळत होते

चौथा प्रश्न - सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव सांगा.
बरोबर उत्तर आहे, दि आर्ट ऑफ क्रिकेट हे पुस्तक सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी लिहिले आहे. 

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या किती होती ?
बरोबर उत्तर आहे - सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची कसोटी सामन्यातील त्यांची ३३४ ही सर्वोच्च धावसंख्या होती.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 24 फेब्रुवारी ( Chhatrapati Rajaram )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण छत्रपती राजाराम महाराज यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

छत्रपती राजाराम महाराज 
छत्रपती राजाराम हे मराठा साम्राज्याचे पराक्रमी व धैर्यवान शासक होते. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकटे चिरंजीव होते. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर झाला. आईचे नाव सोयराबाई होते. लहानपणापासूनच त्यांना शौर्य, प्रशासन आणि युद्धकौशल्य यांचे शिक्षण देण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कठीण परिस्थितीत मराठ्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी राजाराम महाराज यांच्याकडे आली. अत्यंत कठीण परिस्थितीत राजाराम महाराजांनी राज्याची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी त्यांचे वय अवघे १९ वर्षे होते. त्यांनी अत्यंत धैर्याने आणि संयमाने मोगलांविरुद्ध लढा सुरू ठेवला.
औरंगजेबाच्या सैन्याचा वाढता दबाव पाहता राजाराम महाराजांनी महाराष्ट्र सोडून तामिळनाडूमधील जिंजी (गिंजी) किल्ल्यावर आश्रय घेतला. तेथूनच त्यांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली आणि मराठा सरदारांच्या मदतीने गनिमी काव्याच्या पद्धतीने मोगलांविरुद्ध संघर्ष चालू ठेवला. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांसारख्या पराक्रमी सरदारांनी त्यांच्या नेतृत्वाखाली मोठी कामगिरी बजावली.
राजाराम महाराजांचे राज्यकारभाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. त्यांचे नेतृत्व, संयम आणि चिकाटी यामुळे मराठा साम्राज्य टिकून राहिले. त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनीही पुढे मोठ्या धैर्याने राज्यकारभार सांभाळला.
छत्रपती राजाराम यांचे २ मार्च १७०० रोजी सिंहगड येथे निधन झाले. त्यांचे आयुष्य जरी अल्प होते, तरी त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. मराठा साम्राज्य टिकवून ठेवण्यात त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या संघर्षामुळेच पुढे मराठा साम्राज्य अधिक बळकट झाले. त्यांच्या कार्यामुळे इतिहासात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - छत्रपती राजाराम हे कोणाचे चिरंजीव होते ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती राजाराम हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव होते

दुसरा प्रश्न - छत्रपती राजाराम यांच्या आईचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती राजाराम यांच्या आईचे नाव सोयराबाई होते. 

तिसरा प्रश्न - छत्रपती राजाराम यांच्या पत्नीचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती राजाराम यांच्या पत्नीचे नाव महाराणी ताराबाई असे होते.

चौथा प्रश्न - राज्याची सूत्रे हाती घेतली त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज यांचे वय किती होते ? 
बरोबर उत्तर आहे, वयाच्या 19 व्या वर्षी छत्रपती राजाराम महाराज यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन कोठे झाले ?
बरोबर उत्तर आहे - सिंहगडावर दिनांक २ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Saturday, 21 February 2026

दिनविशेष माहिती - 23 फेब्रुवारी ( sant Gadge Maharaj )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण संत गाडगेबाबा यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका बरं का , कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
संत गाडगे महाराज 
संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील महान संत, समाजसुधारक आणि स्वच्छतेचे प्रणेते होते. त्यांचे खरे नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील शेणगाव येथे झाला.
गाडगे महाराज यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांनी कष्ट, प्रामाणिकपणा आणि साधेपणा यांचे संस्कार आत्मसात केले. औपचारिक शिक्षण कमी असले तरी जीवनानुभवातून त्यांनी मोठे ज्ञान मिळवले.
संत गाडगे महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करून लोकजागृती केली. त्यांच्या हातात नेहमी एक खापराचे गाडगे असायचे यावरून त्यांचे नाव गाडगेबाबा असे पटले. ते गावोगावी जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छता, शिक्षण, व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांचा संदेश देत. आपल्या कीर्तनाची सुरुवात ते गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा या वाक्याने करत असतं. 
त्यांच्या कार्याची काही वैशिष्ट्ये म्हणजे 
गावात प्रवेश करण्यापूर्वी स्वतः झाडू घेऊन रस्ते साफ करत असे, अस्पृश्यता आणि जातिभेदाचा विरोध केला, गरिबांसाठी धर्मशाळा, वसतिगृहे व शाळा उभारली, दानातून मिळालेला पैसा समाजकार्यासाठी वापरली.
ते म्हणत, “स्वच्छता हीच खरी पूजा आहे.” त्यामुळे त्यांना स्वच्छतेचे जनक म्हणूनही ओळखले जाते.
गाडगे महाराजांनी समाजातील दुर्गुणांवर प्रहार केला आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांचे कीर्तन अत्यंत प्रभावी व वास्तववादी असे. त्यांनी लोकांना परिश्रम, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले.
संत गाडगे महाराज यांचे अमरावती येथे २० डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने “संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान” सुरू केले आहे. अमरावती येथील विद्यापीठ ला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात आले आहे.
संत गाडगे महाराजांचे जीवन हे साधेपणा, स्वच्छता आणि समाजसेवा यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी आपल्या कृतीतून समाजाला योग्य दिशा दिली. म्हणूनच ते महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील तेजस्वी व्यक्तिमत्त्व मानले जातात.

आज संत गाडगेबाबा यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - संत गाडगेबाबा यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, विदर्भातील शेणगाव येथे संत गाडगेबाबा यांचा जन्म झाला.

दुसरा प्रश्न - संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, डेबूजी झिंगराजी जानोरकर असे संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव होते.

तिसरा प्रश्न - संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनाची सुरुवात कोणत्या वाक्याने करत असतं. 
बरोबर उत्तर आहे, संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनाची सुरुवात गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा या वाक्याने करत असतं. 

चौथा प्रश्न - संत गाडगेबाबा यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे. ?
बरोबर उत्तर आहे, अमरावती येथील विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात आले आहे.

शेवटचा पाचवा प्रश्न - स्वच्छतेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे - संत गाडगेबाबा यांना स्वच्छतेचे जनक म्हणून ओळखले जाते.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 22 फेब्रुवारी ( Lord Bedan powel )

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

लॉर्ड बेडन पॉवेल
लॉर्ड बेडन पॉवेल हे स्काउट चळवळीचे संस्थापक आणि जगभरातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे पूर्ण नाव रॉबर्ट स्टिफेन्सन स्मिथ बेडन पॉवेल असे होते. त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १८५७ रोजी इंग्लंडमधील लंडन येथे झाला.
बेडन पॉवेल यांचे वडील ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते. लहानपणापासूनच त्यांना निसर्ग, साहस, जंगलभ्रमण आणि शिस्तबद्ध जीवन यांची आवड होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ब्रिटिश सैन्यात प्रवेश केला आणि भारत तसेच आफ्रिका येथे सेवा बजावली.
दक्षिण आफ्रिकेतील युद्धादरम्यान त्यांनी दाखविलेल्या शौर्यामुळे ते प्रसिद्ध झाले. सैन्यातील अनुभवातून त्यांना जाणवले की, तरुणांना शिस्त, स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि देशप्रेम यांचे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे.
१९०७ साली त्यांनी इंग्लंडमधील ब्राउनसेया आईसलंड येथे पहिले स्काउट शिबिर आयोजित केले. हा प्रयोग यशस्वी ठरला. त्यानंतर १९०८ मध्ये त्यांनी “स्काऊटिंग फॉर बॉइझ” हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे स्काउट चळवळ जगभर पसरली.
स्काउट चळवळीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे –
शारीरिक, मानसिक व नैतिक विकास
स्वावलंबन व नेतृत्वगुणांची जोपासना
समाजसेवा व देशभक्तीची भावना
बेडन पॉवेल यांच्या कार्यामुळे अनेक देशांमध्ये स्काउट संघटना स्थापन झाल्या. आज जगभर कोट्यवधी विद्यार्थी स्काउट-गाईड चळवळीत सहभागी होत आहेत. त्यांना १९२९ साली “लॉर्ड” हा किताब देण्यात आला.
लॉर्ड बेडन पॉवेल यांचे ०८ जानेवारी १९४१ रोजी केनिया देशातील नयेरी येथे निधन झाले.
लॉर्ड बेडन पॉवेल यांनी तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी उभी केलेली स्काउट चळवळ ही आजही प्रेरणादायी आहे. शिस्त, साहस, सेवा आणि नेतृत्व यांचा संगम त्यांच्या कार्यात दिसून येतो. म्हणूनच ते “स्काउट चळवळीचे जनक” म्हणून ओळखले जातात.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - लॉर्ड बेडन पॉवेल यांनी कोणती चळवळ उभी केली ?
बरोबर उत्तर आहे, लॉर्ड बेडन पॉवेल यांनी स्काउट-गाईड चळवळ उभी केली.

दुसरा प्रश्न - कोणत्या वर्षी बेडन पॉवेल यांना “लॉर्ड” हा किताब देण्यात आला ? 
बरोबर उत्तर आहे, सन १९२९ मध्ये बेडन पॉवेल यांना “लॉर्ड” हा किताब देण्यात आला.

तिसरा प्रश्न - कोणत्या पुस्तकामुळे स्काउट चळवळ जगभर पसरली ?
बरोबर उत्तर आहे, स्काऊटिंग फॉर बॉइझ या पुस्तकामुळे स्काउट चळवळ जगभर पसरली.

चौथा प्रश्न - लॉर्ड बेडन पॉवेल यांनी पहिले स्काउट शिबिर कोणत्या वर्षी आयोजित केले ?
बरोबर उत्तर आहे, सन १९०७ मध्ये लॉर्ड बेडन पॉवेल यांनी पहिले स्काउट शिबिर आयोजित केले

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न -  “स्काउट चळवळीचे जनक” म्हणून कोण ओळखले जातात ?
बरोबर उत्तर आहे - लॉर्ड बेडन पॉवेल हे “स्काउट चळवळीचे जनक” म्हणून कोण ओळखले जातात

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Sunday, 15 February 2026

दिनविशेष माहिती - 21 फेब्रुवारी ( International Mother Language Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन याविषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 
आज २१ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्या भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे.
१९५२ साली बांगलादेशातील विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेसाठी आंदोलन केले आणि बलिदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ १९९९ साली युनेस्कोने २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला.
मातृभाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आपल्या भावना, विचार आणि परंपरा व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे मातृभाषा. संशोधनानुसार, मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांची आकलनशक्ती अधिक वाढते. आपण इंग्रजी किंवा इतर भाषा शिकाव्यात; पण त्याचबरोबर आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणे आणि तिचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे.
भाषावैज्ञानिक संस्थेच्या आकडेवारीनुसार जगात सुमारे ७,००० भाषा बोलल्या जातात. जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे मँडरिन चिनी भाषा आहे तर इंग्रजी ही जगभरात सर्वाधिक देशांमध्ये वापरली जाणारी द्वितीय क्रमांकाची भाषा आहे. तर भारतात १,६०० पेक्षा अधिक भाषा आणि उपभाषा बोलल्या जातात. भारतीय राज्यघटनेने २२ अधिकृत भाषा मान्य केल्या आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बंगाली आणि तिसऱ्या क्रमांकावर आपली मराठी भाषा बोलली जाते. 
चला, आजच्या दिवशी आपण आपल्या मातृभाषेचा सन्मान राखण्याचा आणि तिचे संवर्धन करण्याचा संकल्प करूया.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - युनेस्कोने २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून कोणत्या वर्षी घोषित केला ?
बरोबर उत्तर आहे, १९९९ साली युनेस्कोने २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला.

दुसरा प्रश्न - जगात सुमारे किती भाषा बोलल्या जातात. 
बरोबर उत्तर आहे, जगात सुमारे ७,००० भाषा बोलल्या जातात. 

तिसरा प्रश्न - जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे ?
बरोबर उत्तर आहे, जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे मँडरिन चिनी भाषा

चौथा प्रश्न - भारतीय राज्यघटनेने किती भाषा अधिकृत मान्य केल्या आहेत ?
बरोबर उत्तर आहे, भारतीय राज्यघटनेने २२ भाषा अधिकृत मान्य केल्या आहेत

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - २०११ च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे ?
बरोबर उत्तर आहे - २०११ च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी आहे. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 20 फेब्रुवारी ( Govind Pansare )

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण कॉ. गोविंद पानसरे यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

     कॉ. गोविंद पानसरे
कॉ. गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजवादी विचारवंत, लेखक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९३३ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार या गावी गरीब कुटुंबात झाला. गरीब कष्टकऱ्यांच्या परिवारात ते वाढले. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नगरपालिकेत शिपाई म्हणून आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात प्रोफेसर म्हणून ही काम केले. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि वकिली देखील केली. अनेक वर्षे कोल्हापुरातील वकीलांच्या संघटनेचे ते अध्यक्ष होते. 
कॉ. पानसरे शालेय जीवनापासूनच सामाजिक चळवळींकडे आकर्षित झाले होते. सुरुवातीला राष्ट्र सेवा दल व त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. दहा वर्षांसाठी ते भाकपचे महाराष्ट्र सेक्रेटरी होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्ती चळवळीत ते सहभागी होते. तडजोड न करता समाजातील सर्वांत जास्त शोषित लोकांच्या हक्कांसाठी लढणारे ते कार्यकर्ता होते. ते कष्टकऱ्यांच्या शेकडो संघर्षांमध्ये सहभागी झाले व अनेकांचे नेतृत्वदेखील केले, विशेषतः असंघटित क्षेत्रांतील कामगार, शेतमजूर, घरकामगार, ऑटोरिक्षा युनियन, दूध उत्पादक, झोपडपट्टी रहिवासी, इत्यादी. कोल्हापुरमधील टोलविरोधी आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते या आंदोलनात अग्रभागी होते.
गोविंद पानसरे यांनी अंधश्रद्धा, जातीयवाद आणि सामाजिक विषमता यांविरोधात ठाम भूमिका घेतली. ते प्रभावी वक्ते होते. त्यांच्या भाषणांतून सामाजिक समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानिक मूल्ये यांचा प्रचार केला जात असे. 
त्यांचे सर्वात गाजलेले प्रसिद्ध पुस्तक म्हणजे शिवाजी कोण होता ? या पुस्तकात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोककल्याणकारी आणि धर्मनिरपेक्ष दृष्टीकोनातून मांडले आहे. हे पुस्तक मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आणि अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले. हे पुस्तक आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे चे खरे दर्शन घडवते.
दिनांक १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी आपल्या पत्नीसमवेत मॉर्निंग वॉकसाठी गेले असता, काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर काही दिवस उपचार सुरू असताना दिनांक २० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात मोठी शोककळा पसरली.
कॉ. गोविंद पानसरे हे प्रखर बुद्धीचे, तत्त्वनिष्ठ आणि समाजहितासाठी झटणारे नेते होते. त्यांच्या कार्यातून समाजात विचारस्वातंत्र्य, समता आणि न्याय यांची जाणीव निर्माण झाली. आजही त्यांचे कार्य आणि विचार समाजाला प्रेरणा देत आहेत. २००२ मध्ये कोल्हापूर महापालिकेने त्यांना कोल्हापूर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.

आज कॉ. गोविंद पानसरे यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला सादर प्रणाम !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - गोविंद पानसरे प्रोफेसर म्हणून कोठे काम केले ?
बरोबर उत्तर आहे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात गोविंद पानसरे हे प्रोफेसर म्हणून काम केले

दुसरा प्रश्न - गोविंद पानसरे यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते ?
बरोबर उत्तर आहे, शिवाजी कोण होता ? हे गोविंद पानसरे यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. 

तिसरा प्रश्न - कोल्हापूर महापालिकेने त्यांना कोल्हापूर भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी दिले ?
बरोबर उत्तर आहे, २००२ मध्ये कोल्हापूर महापालिकेने त्यांना कोल्हापूर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.

चौथा प्रश्न - गोविंद पानसरे हे कोणत्या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते ?
बरोबर उत्तर आहे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे गोविंद पानसरे हे सक्रिय कार्यकर्ते होते. 

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - गोविंद पानसरे यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - गोविंद पानसरे यांचे दिनांक 20 फेब्रुवारी 2015 रोजी मुंबईत निधन झाले

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 19 फेब्रुवारी ( Chatrapti Shivaji Maharaj )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक : छत्रपती शिवाजी महाराज
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती तर आईचे नाव जिजाऊ होते. राजमाता जिजाऊंनी त्यांना रामायण-महाभारताच्या कथा सांगून स्वाभिमान, धैर्य आणि धर्मनिष्ठा यांचे संस्कार दिले. दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युद्धकला आणि प्रशासनकौशल्य आत्मसात केले. शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत तुळजाभवानी होते.
त्या काळात भारतावर परकीय सत्तेचे वर्चस्व होते. सामान्य जनतेवर अन्याय होत होता. अशा वेळी शिवाजी महाराजांनी “हिंदवी स्वराज्य” स्थापण्याचा निर्धार केला. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला तो म्हणजे तोरणा. छत्रपती शिवाजी महाराज यांना तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, हंबीरराव मोहिते, नेताजी पालकर, येसाजी कंक, जीवा महाला, कान्होजी जेधे, शिवा काशीद असे अनेक जीवाला जीव देणारे मावळे मिळाले. त्यामुळे रायगड, प्रतापगड, पुरंदर, सिंहगड, असे अनेक किल्ले जिंकले. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजानी बलाढ्य अफजलखानाचा वध केला. गनिमी काव्याच्या तंत्राने बलाढ्य शत्रूंवर विजय मिळवला. शिवाजी महाराज हे केवळ एक शूर योद्धे नव्हते, तर ते आदर्श राज्यकर्ते आणि लोकनायक होते. 
महाराजांचे राज्य हे लोकाभिमुख होते. त्यांनी शिस्तबद्ध लष्कर, सक्षम आरमार आणि न्यायप्रिय प्रशासन उभे केले. स्त्रियांचा सन्मान राखणे आणि सर्व धर्मांचा आदर करणे हे त्यांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्य होते. ६ जून १६७४ रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांना "जाणता राजा" म्हणून ओळखले जाते. स्वराज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी ८ मंत्र्यांचे अष्टप्रधान मंडळ तयार केले. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांचा जन्मदिवस सर्वत्र शिवजयंती म्हणून साजरी केली जाते.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिनांक ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर निधन झाले. 
मुलांनो, शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला ध्येय, स्वाभिमान आणि संघटनशक्ती यांचे महत्त्व शिकवते. त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून आपणही प्रामाणिक, धैर्यवान आणि राष्ट्रनिष्ठ नागरिक बनूया.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्यावर झाला ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्यावर झाला ?

दुसरा प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या पहिल्या किल्याचे नाव काय ? 
बरोबर उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या पहिल्या किल्याचे नाव तोरणा किल्ला.

तिसरा प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी कोणाचा वध केला ? 
बरोबर उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी बलाढ्य अफजलखानाचा वध केला ? 

चौथा प्रश्न - "जाणता राजा" म्हणून कोणास ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांना "जाणता राजा" म्हणून ओळखले जाते.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजानी पारशी भाषेऐवजी कोणत्या भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले ?
बरोबर उत्तर आहे - स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजानी पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 18 फेब्रुवारी ( Gopal Hari Deshamukh )


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
गोपाळ हरी देशमुख हे महाराष्ट्रातील प्रख्यात समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते. त्यांना “लोकहितवादी” या टोपणनावाने ओळखले जाते. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, रूढी-परंपरा आणि अन्यायकारक प्रथा यांच्यावर कठोर टीका करून समाजजागृतीचे कार्य केले.
गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८२३ रोजी पुण्यात एका वतनदार घराण्यात जन्म झाला. त्यांचे मूळ आडनाव 'सिद्धये' होते, तर घराण्यातील वतनामुळे 'देशमुख' हे नाव प्रचलित झाले. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेतले. त्यांना मराठी, संस्कृत तसेच इंग्रजी भाषेचे ज्ञान होते. ते स्वभावाने प्रखर बुद्धिमान व चिकित्सक वृत्तीचे होते. समाजातील दोष दूर करून लोकांमध्ये प्रबोधन घडवून आणणे हेच त्यांचे ध्येय होते.
त्यांनी 'प्रभाकर' साप्ताहिकातून लिहिलेल्या 'शतपत्रां' द्वारे तत्कालीन भारतीय समाजातील जातिभेद, बालविवाह, बहुपत्नीत्व अशा अनिष्ट रूढींवर कठोर टीका केली. या पत्रांमुळे त्यांना 'लोकहितवादी' म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या काळात समाजात प्रचलित असलेल्या अनेक चुकीच्या समजुतींवर त्यांनी तर्कशुद्ध विचार मांडले. त्यामुळे काही लोकांनी त्यांचा विरोधही केला; परंतु त्यांनी आपल्या विचारांपासून माघार घेतली नाही.
गोपाळ हरी देशमुख यांनी स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे, त्यांना समान हक्क मिळाले पाहिजेत, असे त्यांचे ठाम मत होते. तसेच त्यांनी विधवा पुनर्विवाहाला समर्थन दिले. त्यांच्या लेखनामुळे समाजात नवीन विचारांची जागृती झाली.
वयाच्या २१ व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले. पुढे त्यांनी न्यायाधीश म्हणूनही प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या कार्यामुळे त्यांना समाजात मानाचे स्थान मिळाले. 
त्यांनी पानिपतचा युद्ध, कलयुग, जातिभेद, लंकेचा इतिहास यांसारखी पुस्तके लिहिली. ते केवळ लेखक नव्हते, तर कृतीशील समाजसुधारक होते.
गोपाळ हरी देशमुख यांचे ९ ऑक्टोबर १८९२ रोजी निधन झाले. त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढील समाजसुधारकांवरही पडला. त्यांनी महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाची बीजे रोवली.
अशा या लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचे जीवन आपल्याला सत्य, न्याय आणि समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा देते. त्यांच्या कार्यामुळे ते महाराष्ट्राच्या इतिहासात सदैव स्मरणात राहतील.

आज गोपाळ हरी देशमुख यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपणनावाने ओळखले जाते.

दुसरा प्रश्न - गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या भाषेचे ज्ञान होते ?
बरोबर उत्तर आहे, गोपाळ हरी देशमुख यांना मराठी, संस्कृत तसेच इंग्रजी भाषेचे ज्ञान होते

तिसरा प्रश्न - गोपाळ हरी देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, गोपाळ हरी देशमुख यांचे मूळ आडनाव 'सिद्धये' होते.

चौथा प्रश्न - गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लेखन केले ?
बरोबर उत्तर आहे, गोपाळ हरी देशमुख यांनी 'प्रभाकर' साप्ताहिकातून लेखन केले.

शेवटचा पाचवा प्रश्न - लंकेचा इतिहास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? 
बरोबर उत्तर आहे - लंकेचा इतिहास या पुस्तकाचे लेखक गोपाळ हरी देशमुख आहेत. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 17 फेब्रुवारी ( Vasudev Fadke )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

वासुदेव बळवंत फडके
ब्रिटिश सरकार विरुद्ध सर्वात पहिल्यांदा आंदोलन करणारे आणि भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविणारे आद्य क्रांतीकारक म्हणजे वासुदेव बळवंत फडके. 
त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८४५ रोजी रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावी झाला. लहानपणापासूनच कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवार बाजीचे प्रशिक्षण मिळाले. त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना प्रबळ होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला ते रेल्वे विभागात नोकरीस होते, नंतर ते इंग्रजाच्या लष्करी विभागात कारकून पदावर नियुक्त झाले. परंतु इंग्रज सरकारच्या अन्यायकारक कारभारामुळे त्यांना तीव्र वेदना होत होत्या. भाकरीसाठी चाकरी करणार नाही असे म्हणत त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि इंग्रज सरकारच्या विरोधात जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली. विशेषतः १८७० च्या दशकात भयंकर दुष्काळ पडला. त्यात हजारो लोक उपासमारीने मृत्यूमुखी पडले. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती, तरीही इंग्रज सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ही परिस्थिती पाहून वासुदेव फडके यांच्या मनात स्वराज्य स्थापनेची ज्वाला प्रज्वलित झाली.
वासुदेव फडके यांनी ठरवले की, अन्याय सहन करण्यापेक्षा त्याविरुद्ध लढा देणे आवश्यक आहे. त्यांनी शेतकरी, धनगर, कोळी आणि इतर वंचित समाजघटकांना एकत्र करून सशस्त्र पथक तयार केले. त्यांनी इंग्रजांच्या सरकारी खजिन्यांवर धाड टाकून मिळालेला पैसा गरजू लोकांसाठी वापरला. त्यांचा उद्देश वैयक्तिक लाभ नव्हता, तर भारताला परकीय सत्तेतून मुक्त करणे हा होता. म्हणूनच त्यांना भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हटले जाते. वासुदेव फडके हे दत्तात्रयाचे उपासक होते. त्यांनी दत्त महात्म्य नावाचा सात हजार ओव्याचा ग्रंथ लिहिला. 
ब्रिटिश सरकार त्यांच्या कार्यामुळे घाबरले आणि १८७९ साली त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना अरेबिया येथील एडन येथील कारागृहात पाठविण्यात आले. तेथेही त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. कठोर कारावास आणि हालअपेष्टा सहन करत असतानाच १७ फेब्रुवारी १८८३ रोजी त्यांचे निधन झाले. १९८४ साली भारतीय टपाल खात्याने वासुदेव फडके यांचे चित्र असलेले ५० पैश्याचे तिकीट प्रकाशित केले. 
फडके यांचे जीवन आपल्याला शिकवते की, देशासाठी त्याग आणि धैर्य आवश्यक असते. त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी आयुष्य अर्पण केले. त्यांच्या बलिदानामुळेच पुढील क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली आणि स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र झाला.
आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे जगत आहोत, ते अशा महान क्रांतिकारकांच्या त्यागामुळेच. चला, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपणही देशप्रेम, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांचा अंगीकार करूया.
आज वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - वासुदेव फडके यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, वासुदेव फडके रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावी वासुदेव फडके यांचा जन्म झाला.

दुसरा प्रश्न - वासुदेव फडके यांना काय म्हटले जाते ?
बरोबर उत्तर आहे, वासुदेव फडके यांना भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हटले जाते.

तिसरा प्रश्न - वासुदेव फडके यांना ब्रिटिश सरकारने केव्हा अटक केली ?
बरोबर उत्तर आहे, १८७९ साली वासुदेव फडके यांना ब्रिटिश सरकारने अटक केली.

चौथा प्रश्न - अटक झाल्यानंतर वासुदेव फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवण्यात आले
बरोबर उत्तर आहे, अटक झाल्यानंतर वासुदेव फडके यांना एडन येथील कारागृहात ठेवण्यात आले

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - वासुदेव फडके यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - १७ फेब्रुवारी १८८३ रोजी वासुदेव फडके यांचे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Saturday, 14 February 2026

दिनविशेष माहिती - 16 फेब्रुवारी ( Thorale Madhavrao Peshave )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आजच्या कार्यक्रमात आपण मराठा साम्राज्याचे कर्तबगार आणि दूरदर्शी नेतृत्व असलेले श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांची माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे 
 
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचा जन्म १६ फेब्रुवारी १७४५ रोजी झाला. ते नानासाहेब पेशवे यांचे पुत्र होते. पेशवे माधवराव पेशवे हे त्यांच्या उदारतेसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते गरिबांना पैसे, अन्न, कपडे आणि जमीन दान करायचे. त्यांच्याकडून दान घेण्यासाठी दूरदूरून लोक येत असत. त्यांच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नसे. प्रत्येकाला जे हवे होते ते नक्कीच मिळायचे.
१४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठा साम्राज्याची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळली होती आणि जनतेमध्ये निराशा पसरली होती. अशा कठीण वेळी, केवळ १६ वर्षांच्या वयात माधवरावांनी पेशव्यांची जबाबदारी स्वीकारली.
माधवरावांनी सर्वप्रथम प्रशासनात शिस्त आणली. त्यांनी महसूल व्यवस्था सुधारली, लष्कराची पुनर्रचना केली आणि सरदारांमध्ये एकोपा निर्माण केला. त्यांच्या पराक्रमामुळे आणि कुशल नेतृत्वामुळे मराठा साम्राज्याने पुन्हा उत्तर भारतात आपला प्रभाव निर्माण केला. १७६१ ते १७७२ पर्यंत म्हणजे अकरा वर्षे त्यांनी पेशवाई सांभाळली. या अकरा वर्षाच्या काळात त्यांनी मराठेशाहीचा सुवर्णकाळ पुन्हा आणला.
माधवराव पेशवे यांनी 'राक्षसभुवन'च्या लढाईत निजामावर विजय मिळवून मराठ्यांची ताकद दाखवून दिली. म्हैसूरच्या हैदरअलीचा वारंवार पराभव करून आपला वचक निर्माण केला.
त्यांच्या कारकिर्दीत न्याय, शिस्त आणि पारदर्शकता यांना महत्त्व होते. त्यांनी वैयक्तिक स्वार्थापेक्षा राज्यहिताला प्राधान्य दिले. ते कठोर शिस्तप्रिय होते आणि त्यांनी मराठी साम्राज्याला पुन्हा एकदा 'सर्वोच्च शक्ती' म्हणून उभे केले
थोरले माधवराव हे मराठी इतिहासातील 'छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचे' सर्वात कर्तबगार प्रशासक आणि मुत्सद्दी नेते मानले जातात.
दुर्दैवाने, पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे १८ नोव्हेंबर १७७२ रोजी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी क्षयरोगाने त्यांचे निधन झाले, परंतु अल्पायुष्यात त्यांनी केलेले कार्य अजरामर आहे.
माधवराव पेशवे यांचे जीवन आपल्याला सांगते की, संकट कितीही मोठे असले तरी योग्य नेतृत्व, आत्मविश्वास आणि चिकाटी यामुळे परिस्थिती बदलता येते. चला, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपण कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि देशभक्त नागरिक बनण्याचा संकल्प करूया.


मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - माधवराव पेशवे हे कोणाचे पुत्र होते ?
बरोबर उत्तर आहे, माधवराव पेशवे हे नानासाहेब पेशवे यांचे पुत्र होते.

दुसरा प्रश्न - माधवराव पेशवे यांनी कोणत्या वयात पेशव्यांची जबाबदारी स्वीकारली ?
बरोबर उत्तर आहे, १६ वर्षांच्या वयात माधवराव पेशवे यांनी पेशव्यांची जबाबदारी स्वीकारली.

तिसरा प्रश्न - माधवराव पेशवे यांनी कोणत्या लढाईत निजामचा पराभव केला ?
बरोबर उत्तर आहे, राक्षसभुवनच्या लढाईत माधवराव पेशवे यांनी निजामचा पराभव केला

चौथा प्रश्न - माधवराव पेशवे यांनी किती वर्षे पेशवाई सांभाळली ?
बरोबर उत्तर आहे, अकरा वर्षे माधवराव पेशवे यांनी पेशवाई सांभाळली

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - माधवराव पेशवे यांचे कोणत्या आजाराने निधन झाले ?
बरोबर उत्तर आहे - क्षयरोगाने माधवराव पेशवे यांचे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 15 फेब्रुवारी ( Sant Sevalal Maharaj )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

          संत सेवालाल महाराज
संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत, संत आणि समाजसुधारक होते. सेवालाल महाराजांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी गुत्तीबल्लारी कर्नाटक राज्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिमा नाईक राठोड आणि आईचे नाव धरमळी माता असे होते. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर धार्मिक व संस्कारशील वातावरणाचा प्रभाव टाकला, ज्यामुळे पुढे त्यांनी समाजजागृतीचे कार्य केले.
त्या काळात बंजारा समाज भटक्या स्वरूपात जीवन जगत होता. समाजात अज्ञान, अंधश्रद्धा आणि काही वाईट प्रथा प्रचलित होत्या. त्यांनी समाजाला शिक्षण, स्वच्छता आणि नीतिमत्तेचा मार्ग दाखवला. त्यांनी स्त्रियांना अधिकार मिळवून देण्यासाठी व व्यसनमुक्तीसाठी कार्य केले. संत सेवालाल महाराजांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे महान कार्य केले.
लहानपणापासूनच त्यांच्यात आध्यात्मिकता आणि सेवा वृत्ती दिसून येत होती. ते अत्यंत साधेपणाने जीवन जगत आणि लोकांमध्ये राहून त्यांना नैतिकतेचे धडे देत. 
ते म्हणत कसाईन गावढी मत वेचो. अर्थात खाटीकला गाय विकू नका. 
पशू प्राण्यावर प्रेम करा हा त्यांचा मुख्य संदेश होता. त्यांनी बळीप्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले.
संत सेवालाल महाराजांनी बंजारा समाजात एकोपा आणि संघटन निर्माण करण्यावर भर दिला. त्यांनी लोकांना सत्य, प्रामाणिकपणा, अहिंसा आणि परस्पर प्रेम यांचा संदेश दिला.
त्यांनी बंजारा बोलीभाषेत भजने, लोकगीताच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. त्या काळी निरक्षर असूनही त्यांनी लोकांना ज्ञानाचा मार्ग दाखवला
त्यांच्या शिकवणुकीमुळे बंजारा समाजात नैतिक व सामाजिक जागृती झाली.
संत सेवालाल महाराजांनी ईश्वरभक्ती आणि सत्कर्म यांचा समन्वय साधला. त्यांनी लोकांना केवळ पूजा-अर्चा नव्हे तर चांगले आचरण आणि सेवाभाव यांचे महत्त्व पटवून दिले. “समाजाची सेवा हीच खरी पूजा” असा त्यांचा संदेश होता.
दरवर्षी १५ फेब्रुवारी रोजी त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि मध्यप्रदेश या राज्यांत मोठ्या प्रमाणावर मिरवणुका, भजन-कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांच्या नावाने मंदिरे आणि स्मारके उभारण्यात आली आहेत.
संत सेवालाल महाराजांचे जीवन हे समाजसेवा, एकता आणि नैतिकतेचे प्रतीक आहे. त्यांनी बंजारा समाजाला स्वाभिमान आणि योग्य दिशा दिली. आजही त्यांचे विचार समाजाला प्रेरणा देतात. दिनांक ४ डिसेंबर १८०६ रोजी त्यांचे निधन झाले. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे त्यांची समाधी आहे, ज्याला बंजारा समाज 'काशी' मानतात.
त्यांच्या शिकवणुकीतून आपण सेवा, सदाचार आणि बंधुभाव यांचे महत्त्व शिकायला हवं. 🙏
आज संत सेवालाल महाराज यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांचे स्मरण करून समाजहिताचे कार्य करण्याचा संकल्प करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. 🙏


मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - संत सेवालाल महाराज यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, गुत्तीबल्लारी कर्नाटक राज्यात संत सेवालाल महाराज यांचा जन्म झाला

दुसरा प्रश्न - संत सेवालाल महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, भीमा नाईक राठोड असे संत सेवालाल महाराज यांच्या वडिलांचे नाव होते.

तिसरा प्रश्न - संत सेवालाल महाराज यांनी कोणत्या बोलीभाषेत भजने, लोकगीताच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले ?
बरोबर उत्तर आहे, संत सेवालाल महाराज यांनी बंजारा बोलीभाषेत भजने, लोकगीताच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. 

चौथा प्रश्न - संत सेवालाल महाराज यांची समाधी कोठे आहे ?
बरोबर उत्तर आहे, वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांची समाधी आहे

शेवटचा पाचवा प्रश्न - पोहरादेवीला बंजारा समाज काय मानतो ?
बरोबर उत्तर आहे - पोहरादेवीला बंजारा समाज 'काशी' मानतात.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - महाशिवरात्री ( Mahashivratri )

🌺 महाशिवरात्री
महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र व महत्त्वाचा सण आहे. हा सण भगवान शिव यांच्या आराधनेसाठी साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भक्त मोठ्या श्रद्धेने उपवास, पूजा व जागरण करतात.
महाशिवरात्रीचे महत्त्व
पुराणांनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. तसेच या दिवशी शिवांनी तांडव नृत्य केले, असेही मानले जाते. त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. महाशिवरात्रीला शिवभक्त मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतात आणि "ॐ नमः शिवाय" हा मंत्र जपतात.
पूजा आणि विधी
या दिवशी भक्त उपवास करतात आणि रात्रभर जागरण करतात. शिवलिंगावर दूध, पाणी, बेलपत्र, धतूरा व फुले अर्पण केली जातात. बेलपत्र हे भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानले जाते. अनेक ठिकाणी कीर्तन, भजन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
भारतामध्ये काशी, उज्जैन, सोमनाथ इत्यादी ठिकाणी महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विशेषतः काशी विश्वनाथ मंदिर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
उपसंहार
महाशिवरात्री हा सण भक्ती, श्रद्धा आणि संयम यांचा संदेश देतो. हा सण आपल्याला चांगले विचार, सत्य आणि सदाचार यांचे पालन करण्याची प्रेरणा देतो. भगवान शिवांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभो, हीच प्रार्थना. 🙏

Friday, 13 February 2026

दिनविशेष माहिती - 14 फेब्रुवारी ( Sanjeevani Marathe )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो..
मुलांनो तुम्हांला हे गीत आठवते का ? ( Audio) हे गीत कुणी लिहिलं आहे ? हे तुम्हांला माहित आहे काय ? 
तर हे गीत मराठीतील प्रसिद्ध कवयित्री संजीवनी मराठे यांनी लिहिलं आहे, तर आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ या. तयार आहात ना तुम्ही........!
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......

मराठी साहित्यातील बहुआयामी कवयित्री : संजीवनी मराठे

मराठी साहित्यात अनेक प्रतिभावान कवयित्रींनी आपल्या लेखणीतून समाजमनाला स्पर्श केला आहे. त्या प्रतिभावान कवयित्रींपैकी एक म्हणजे संजीवनी मराठे. त्यांच्या काव्यातून स्त्रीमनातील कोमल भावना, निसर्गप्रेम, तसेच सामाजिक जाणीवा प्रभावीपणे व्यक्त झालेल्या दिसतात. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९१६ रोजी पुण्यात झाला. लहानपणापासूनच प्रतिभावान
संजीवनी रामचंद्र मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली आणि मॅट्रिकनंतर वडिलांनी त्यांच्या कवितांचा 'काव्यसंजीवनी' संग्रह प्रकाशित केला. त्यांना बा. भ. बोरकर, पद्मा गोळे आणि गजानन वाटवे यांसारख्या साहित्यिकांचा सहवास लाभला, ज्यामुळे त्यांची प्रतिभा बहरली. त्यांच्या आयुष्यातील अनुभव, निरीक्षणे आणि समाजातील बदल यांचा प्रभाव त्यांच्या कवितांवर स्पष्टपणे दिसून येतो.
संजीवनी मराठे या मुख्यतः कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या कवितांमध्ये स्त्रीभावविश्व, प्रेम, करुणा, निसर्ग, तसेच सामाजिक वास्तव यांचे सुंदर चित्रण आढळते. त्यांच्या रचनांमध्ये साधी, सुबोध आणि प्रभावी भाषा वापरलेली दिसते. त्यामुळे त्यांच्या कविता सर्वसामान्य वाचकांनाही सहज समजतात. त्यांच्या काही कवितांमध्ये स्त्रीच्या आत्मसन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा प्रभावी स्वर उमटतो. त्यांनी स्त्रीच्या मनातील भावना अत्यंत संवेदनशीलतेने मांडल्या आहेत.
संजीवनी मराठे यांनी कविता, गीते, बालसाहित्य, अनुवाद आणि संपादन केले. 'बरं का गं आई' आणि 'हसू बाई हसू' या कवितासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
बालकवितांमध्ये निसर्ग, उत्सव, नातेसंबंध आणि देशभक्ती यांचे वैविध्य आहे; उदा. 'टाळी वाजली कड कड कड' सारख्या ओळी लहानांना भुरळ घालतात.
स्वतः गायिका असल्याने कविसंमेलनांत त्या आपल्या कविता सुरेल आवाजात गायच्या. गायनासोबत त्यांना चित्रकलादेखील आवडीचा विषय होता. 
त्यांच्या कवितांमध्ये उत्साह, सकारात्मकता आणि जीवनाचा आस्वाद सदैव असतो.
शालेय अभ्यासक्रमात अमर
'माय मराठी', 'मी पंथती' सारख्या कविता आहेत आणि आजही गायल्या जातात. संजीवनी मराठे यांचे १ एप्रिल २००० रोजी निधन झाले.
संजीवनी मराठे यांनी आपल्या काव्यलेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घातली. त्यांच्या कवितांमुळे वाचकांच्या मनात संवेदनशीलता आणि सकारात्मक विचारांची जागृती होते. मराठी कवयित्रींमध्ये त्यांचे स्थान आदराचे आहे.
आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या लेखणीला सादर प्रणाम 🙏


मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म कोठे झाला ? 
बरोबर उत्तर आहे, विद्येचे माहेरघर पुण्यात कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म झाला. 

दुसरा प्रश्न - वडिलांनी प्रकाशित केलेल्या कविता संग्रहाचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, 'काव्यसंजीवनी' हा कवितासंग्रह त्यांच्या वडिलांनी प्रकाशित केला.

तिसरा प्रश्न -  'हसू बाई हसू' या कवितासंग्रहांला कोणता पुरस्कार मिळाला ?
बरोबर उत्तर आहे,  'हसू बाई हसू' या कवितासंग्रहांला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

चौथा प्रश्न - माय मराठी ही कविता कुणी लिहिली ?
बरोबर उत्तर आहे, कवयित्री संजीवनी मराठे यांनी माय मराठी ही कविता लिहिली. 

शेवटचा पाचवा प्रश्न - गायनासोबत त्यांना अन्य कोणता विषय आवडीचा होता ?
बरोबर उत्तर आहे - गायनासोबत त्यांना चित्रकलादेखील आवडीचा विषय होता. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Wednesday, 11 February 2026

दिनविशेष माहिती - 13 फेब्रुवारी ( sarojini naidu )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण भारताची कोकिळा : सरोजिनी नायडू यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी link 


सरोजिनी नायडू या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य नेत्या, उत्कृष्ट कवयित्री आणि प्रभावी वक्त्या होत्या. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय हे शिक्षणतज्ज्ञ होते आणि आई वरदसुंदरी देवी या बंगाली कवयित्री होत्या. बालपणापासूनच सरोजिनींमध्ये साहित्य, कला आणि समाजसेवेची ओढ दिसून येत होती. वयाच्या १२ व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. 
त्यांनी मद्रास, लंडन व केंब्रिज येथे शिक्षण घेतले. इंग्रजी भाषेतील त्यांच्या कवितांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. The Golden Threshold, The Bird of Time आणि The Broken Wing ही त्यांची प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत. मधुर भाषा, भारतीय जीवनचित्रण आणि देशभक्तीची भावना ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये होती. त्यामुळे त्यांना “भारताची कोकिळा” (Nightingale of India) असे म्हटले जाते.
सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. सत्याग्रह, असहकार चळवळ आणि 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या महिलांच्या हक्कांसाठीही सातत्याने लढल्या आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.
१९२५ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या, ही भारताच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाची घटना होती. स्वातंत्र्यानंतर त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या (१९४७). सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रामाणिकपणा, करुणा आणि देशप्रेम यांचा आदर्श ठेवला.
२ मार्च १९४९ रोजी त्यांचे निधन झाले. सरोजिनी नायडू यांचे कार्य केवळ राजकीयच नव्हे तर साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातही प्रेरणादायी ठरले. भारतीय स्त्रीशक्तीचे प्रतीक म्हणून त्यांचे नाव इतिहासात अजरामर राहील.

आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने कोटी कोटी प्रणाम 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - सरोजिनी नायडू यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, हैद्राबाद येथे सरोजिनी नायडू यांचा जन्म झाला.

दुसरा प्रश्न - सरोजिनी नायडू यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ? 
बरोबर उत्तर आहे, भारताची कोकिळा किंवा नाईटिंगल ऑफ इंडिया या नावाने सरोजिनी नायडू यांना ओळखले जाते.

तिसरा प्रश्न - कोणाच्या नेतृत्वाखाली सरोजिनी नायडू यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला ?
बरोबर उत्तर आहे, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सरोजिनी नायडू यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.

चौथा प्रश्न - सरोजिनी नायडू कोणत्या राज्याचे पहिल्या महिला राज्यपाल बनल्या ?
बरोबर उत्तर आहे, सरोजिनी नायडू ह्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या. 
आणि शेवटचा पाचवा प्रश्न - सरोजिनी नायडू यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - २ मार्च १९४९ रोजी सरोजिनी नायडू यांचे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Tuesday, 10 February 2026

दिनविशेष माहिती - 12 फेब्रुवारी ( Swami Dayanand Sarswati )

        नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण स्वामी दयानंद सरस्वती यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी 
         स्वामी दयानंद सरस्वती नावावर clik करावे. 

स्वामी दयानंद सरस्वती हे भारतातील महान समाजसुधारक, वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करणारे विचारवंत आणि आर्य समाजाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १८२४ रोजी गुजरातमधील टंकारा (जि. मोरबी) येथे झाला. त्यांचे मूळ नाव मूळशंकर होते. संन्यास घेतल्यावर त्यांनी दयानंद सरस्वती असे नाव धारण केले. बालपणापासूनच त्यांना धर्म, साधना आणि सत्याचा शोध याविषयी विशेष जिज्ञासा होती.
लहान वयातच त्यांनी मूर्तिपूजेसंबंधी प्रश्न उपस्थित केले. शिवरात्रीच्या दिवशी मंदिरात उंदराने शिवलिंगावरील नैवेद्य खाल्ला हे पाहून त्यांना “ईश्वर हा सर्वशक्तिमान असतो, मग तो स्वतःचे रक्षण का करू शकत नाही?” असा प्रश्न पडला. यामुळे त्यांनी पारंपरिक अंधश्रद्धांपासून दूर जाऊन सत्याच्या शोधासाठी घरत्याग केला. विविध गुरूंकडून वेद, व्याकरण, योग आणि तत्त्वज्ञानाचे अध्ययन करून त्यांनी वैदिक धर्माचा शुद्ध स्वरूपात प्रसार करण्याचा संकल्प केला.
१० एप्रिल १८७५ मध्ये मुंबई येथे त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. “वेदांकडे परत चला” हा त्यांचा मुख्य संदेश होता. त्यांनी ईश्वर एक आहे, निराकार आहे आणि वेद हे सर्वोच्च प्रमाण आहेत, असे प्रतिपादन केले. जातिभेद, अस्पृश्यता, बालविवाह, अंधश्रद्धा यांना त्यांनी विरोध केला. स्त्रीशिक्षण, विधवाविवाह आणि समाजातील समतेचा त्यांनी पुरस्कार केला. त्यांच्या विचारांचा देशातील सामाजिक आणि धार्मिक जीवनावर मोठा प्रभाव पडला.
स्वामी दयानंद सरस्वती यांनी संस्कृत व हिंदी भाषेत प्रसिद्ध ग्रंथ ‘सत्यार्थ प्रकाश’ लिहिला आहे. या ग्रंथात त्यांनी वेदांचे तत्त्वज्ञान, सामाजिक सुधारणा आणि धर्मातील शुद्धतेचा संदेश सुस्पष्ट मांडला. त्यांच्या प्रभावामुळे देशभरात शिक्षणसंस्था, गुरुकुल पद्धतीची शाळा आणि सुधारणा चळवळी उभ्या राहिल्या. आर्य समाजाने पुढे स्वातंत्र्य चळवळीतही महत्त्वाचे योगदान दिले.
३० ऑक्टोबर १८८३ रोजी अजमेर येथे त्यांचे निधन झाले. सत्य, विवेक, समता आणि राष्ट्रहित या मूल्यांचा प्रचार करणारे स्वामी दयानंद सरस्वती आजही प्रेरणास्थान मानले जातात. त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात आत्मचिंतन, सुधारणा आणि नवचैतन्य निर्माण झाले, हे त्यांचे अमूल्य योगदान होय.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - स्वामी दयानंद सरस्वती यांचे जन्मनाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, मूळशंकर असे स्वामी दयानंद सरस्वती यांचे जन्मनाव होते.

दुसरा प्रश्न - स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली ?
बरोबर उत्तर आहे, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली.

तिसरा प्रश्न - स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय होते ? 
बरोबर उत्तर आहे, सत्यार्थ प्रकाश असे स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव होते.

चौथा प्रश्न - स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणता संदेश दिला होता ?
बरोबर उत्तर आहे, वेदांकडे परत चला” हा मुख्य संदेश स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला होता.

शेवटचा पाचवा प्रश्न - स्वामी दयानंद सरस्वती यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - ३० ऑक्टोबर १८८३ रोजी अजमेर येथे स्वामी दयानंद सरस्वती यांचे निधन झाले. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिनविशेष ( Importance day in January )

जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिवस
प्रत्येक दिनविशेष माहितीसाठी Mazishala You Tube चॅनेल पाहावे. त्यासाठी link खाली दिले आहे 
Mazishala you tube चॅनेल 
01 - डॉ. शांती स्वरूप भटनागर पुण्यतिथी 
02 - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुण्यतिथी 
03 - सावित्रीबाई फुले जयंती 

05 - श्रीपाद नारायण पेंडसे जयंती 
06 - बाळशास्त्री जांभेकर जयंती 
07 - जानकीदेवी बजाज जयंती 
08 - लॉर्ड बेडन-पॉवेल पुण्यतिथी 
09 - डॉ. हरगोविंद खुराना जयंती 
10 - दत्ताजी शिंदे पुण्यतिथी 

12 - राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती 
13 - राकेश शर्मा जयंती 
14 - भूगोल दिनांक 
15 - खाशाबा जाधव जयंती 
16 - न्यायमूर्ती महादेव रानडे पुण्यतिथी 
17 - दत्तात्रय रामचंद्र कापरेकर जयंती 

19 - जेम्स वॅट जयंती 
20 - अपा शेर्पा जयंती 
21 - कवी माधव ज्यूलियन जयंती 
22 - समर्थ रामदास स्वामी 
23 - नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती 
24 - डॉ. होमी जहागीर भाभा पुण्यतिथी 

26 - प्रजासत्ताक दिन
27 - जनरल अरुणकुमार वैद्य जयंती 
28 - लाला लाजपत राय पुण्यतिथी 
29 - थॉमस पेन जयंती 
30 - महात्मा गांधी पुण्यतिथी 
31 मेजर सोमनाथ शर्मा जयंती

Monday, 9 February 2026

दिनविशेष माहिती - 11 फेब्रुवारी ( thomas Edison )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी 

नावावर clik करावे. 
थॉमस अल्वा एडिसन हे जगप्रसिद्ध अमेरिकन संशोधक आणि उद्योजक होते. त्यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यातील मिलान येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सॅम्युएल एडिसन व आईचे नाव नॅन्सी एडिसन होते. लहानपणी त्यांचे औपचारिक शिक्षण कमी झाले असले तरी आईच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी स्वतः अभ्यास करून विज्ञानाची गोडी निर्माण केली.
एडिसन यांनी आयुष्यभर सुमारे १००० पेक्षा अधिक शोधांचे पेटंट घेतले. अथक प्रयत्नाने त्यांनी विद्युत बल्बचा शोध लावला व व्यावहारिक उपयोगी प्रकार विकसित केल्यामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. याशिवाय फोनोग्राफ (ध्वनिमुद्रक), चलचित्र कॅमेरा, टेलिग्राफ सुधारणा, आणि विद्युत वितरण प्रणाली यांसारखे अनेक महत्त्वाचे शोध त्यांनी लावले. त्यांच्या शोधांमुळे मानवाचे दैनंदिन जीवन अधिक सोयीचे व आधुनिक झाले. त्यांनी जगातील पहिली औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा स्थापन केली. 
एडिसन यांचे कार्यपद्धती अत्यंत मेहनतीची होती. “मी अपयशी झालो नाही; मी फक्त १०,००० मार्ग शोधले जे काम करत नाहीत, अपयश म्हणजे "First Attempt In Learning” हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य त्यांच्या चिकाटीचे दर्शन घडवते. माणूस सकारात्मक असला की त्याच्या हातून होणाऱ्या गोष्टीसुद्धा सकारात्मक आणि भव्यदिव्य असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. त्यांनी न्यू जर्सी येथील मेनलो पार्क येथे संशोधन प्रयोगशाळा स्थापन केली, जी जगातील पहिली औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा मानली जाते.
जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिकवणाऱ्या या महान संशोधकाचा मृत्यू १८ ऑक्टोबर १९३१ मध्ये झाला. त्यांनी दिलेल्या शोधांमुळे विज्ञान, उद्योग आणि मानवजीवनावर अमिट ठसा उमटवला आहे. म्हणूनच त्यांना “आधुनिक विद्युत युगाचा जनक” असेही म्हटले जाते. त्यांच्या जीवनातून परिश्रम, चिकाटी आणि नवकल्पनांची प्रेरणा मिळते.

आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने या महान संशोधकाला विनम्र अभिवादन 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ रोजी झाला.

दुसरा प्रश्न - विद्युत बल्बचा शोध कोणी लावला ? 
बरोबर उत्तर आहे, थॉमस अल्वा एडिसन ने विद्युत बल्बचा शोध लावला.

तिसरा प्रश्न - थॉमस अल्वा एडिसन हे कोणत्या देशाचे संशोधक होते ?
बरोबर उत्तर आहे, थॉमस अल्वा एडिसन हे अमेरिकेचे संशोधक होते ?

चौथा प्रश्न - थॉमस अल्वा एडिसन यांना काय म्हटले जाते ?
बरोबर उत्तर आहे, थॉमस अल्वा एडिसन यांना “आधुनिक विद्युत युगाचा जनक” असेही म्हटले जाते.

शेवटचा पाचवा प्रश्न - थॉमस अल्वा एडिसन यांचा मृत्यू केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे - १८ ऑक्टोबर १९३१ रोजी थॉमस अल्वा एडिसन यांचा मृत्यू झाला.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

जागतिक नागरिक संरक्षण दिवस - 01 मार्च ( World Civil Defence Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण ...