Monday, 29 March 2021

29/03/2021 maan

सांग तुझ्या मनात आहे तरी काय
येता जाता मला पाहतोस काय ?
डोळ्याने असा खुणावतोस काय ?
न बोलता मला कळेल तरी काय ?
सांग तुझ्या मनात आहे तरी काय ?

मोबाईलवर कॉल करून बोलत नाय
हॅलो हॅलो म्हटलं तरी उत्तर देत नाय
आवाज ऐकण्या फोन करतो की काय ?
सांग तुझ्या मनात आहे तरी काय ?

आजकाल तुझे पत्र कोरेच येतात
कुणी तरी वेडा आहे असं समजतात
किती दिवस असेच चालणार हाय
सांग तुझ्या मनात आहे तरी काय ?

गुपचूप सांग कोणी ऐकणार नाय
तुझ्यावर कोणी रागावणार नाय
अशी संधी पुन्हा कधी मिळणार नाय
सांग तुझ्या मनात आहे तरी काय ?

 - नासा येवतीकर, धर्माबाद
   *9423625769*

🌿 🌹 🍃 🌹 ☘️  🍀

Sunday, 28 March 2021

29/03/2021 rang

*..... रंग झाले मी ......*

चिंब झाले मी, दंग झाले मी
मित्रांसंगे खेळून, गुंग झाले मी

रंग झाले मी, भंग झाले मी
इंद्रधनुष्याचे सप्तरंग झाले मी

अभंग झाले मी, गंध झाले मी
फुलाफुलातील सुगंध झाले मी

अंग झाले मी, संग झाले मी
प्रवचनातून सत्संग झाले मी

मंद झाले मी, तंग झाले मी
तुझ्या हातातील पतंग झाले मी

छंद झाले मी, धुंद झाले मी
तुझ्या प्रेमात बेधुंद झाले मी

तरंग झाले मी, तवंग झाले मी
सत्यमेवसाठी दबंग झाले मी

आरंभ झाले मी, प्रारंभ झाले मी
श्री गणेशाने शुभारंभ झाले मी

 - नासा येवतीकर, धर्माबाद
   *9423625769*

🌿 🌹 🍃 🌹 ☘️  🍀

*...... रंग ........*
रंग लावू प्रेमाचा
रंग देऊ स्नेहाचा
रंग बांधू नात्याचा
रंग मनी हर्षाचा
रंग टाकू उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
रंग हा धुलीवंदनाचा

- नासा येवतीकर, धर्माबाद
    9423625769 

( पिरॅमिड रचना )

           हे 
          रंग
       आपल्या
       जीवनात
      सुखसमृद्धी
    निरोगी आयुष्य
   तुम्हा प्रदान करो

- नासा येवतीकर, धर्माबाद
 9423625769

चारोळी ... सप्तरंग 
लाल हिरवा काळा पिवळा
सप्तरंगात गेले मिसळून
आकाशाचा निळा रंग ही
विविध रंगात गेला न्हाऊन

- नासा येवतीकर, धर्माबाद

holi karu yaa

होळी करू या 
होळी करू या दुर्गुणाची
होळी करू या संशयाची
होळी करू या कुविचारांची
होळी करू या द्वेषाची
होळी करू या आळसाची
होळी करू या कपट बुद्धीची
होळी करू या वासनेची
होळी करू या लालसेची
होळी करू या मत्सरेची
होळी करू या व्यसनाची
होळी करू या वाईट संगतीची
होळी करू या वाईट बाबींची

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

उन्हाळ्यात घेऊ या काळजी

उन्हाळ्यात घेऊ या काळजी 
मागील तीन दिवसांपासून कमाल तापमान वाढत असून सध्या पारा थेट ३८-४० अंशापर्यंत सरकल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी उन्हात बाहेर न पडता घरात किंवा ज्याठिकाणी सावली आहे अश्या ठिकाणी विश्रांती करणे आवश्यक आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरात थांबलेलेच बरे राहील. कारण अश्या तीव्र उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हात बाहेर निघताना छत्री, पांढरा रुमाल सोबत असणे आवश्यक आहे. लहान मुलांना शक्यतो बाहेर घेऊन जाणे टाळावे. शाळेत जाणारी मुले 12 च्या आत घरात येतील असे वेळापत्रक तयार करावे. शालेय मुलांनी स्वतः आजारी पडणार नाही याची काळजी जरूर घ्यावी. बाहेर पडताना सोबत थोडे पाणी नेहमी असू द्यावे कारण या वातावरणात आपल्या शरीरातील पाणी कमी त्यामुळे डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्याचसोबत जास्तीत जास्त पाणी पीत राहावे. या काळात शक्यतो फ्रीजमधील पाणी पिणे टाळावे. त्यापेक्षा नैसर्गिक थंड पाणी करून पाणी पीत राहावे. दुपारच्या वेळी विश्रांती घ्यावे. उन्हाचा त्रास सहन करण्यापेक्षा त्याची काळजी घेतलेली केव्हाही बरे. म्हणून आपण ही काळजी घ्या आणि इतरांना काळजी घ्यायला सांगू या. 

- नागोराव सा. येवतीकर
विषय शिक्षक, धर्माबाद, 9423625769

कविता - आलाय उन्हाळा

ऋतूमध्ये बदल झाला की
हवामानात देखील बदल होते
हिवाळ्याचा गारवा संपला की
हवेतील उष्णता जाणवू लागते

उन्हाचा चढत चाललाय पारा
उन्हाळ्याची लागली चाहूल
बाहेरच्या उष्णतेला पाहून
घराबाहेर पडत नाही पाऊल

आला उन्हाळा आरोग्य सांभाळा
बाहेर जातांना रुमाल बांधा डोक्याला
भरपूर पाणी प्या आराम करा
उन्हात न फिरता उष्माघात टाळा

सकाळ सायंकाळ कामे करा
दुपारच्या वेळी थोडं आराम करा
शरीराला येऊ देऊ नये थकवा
आरोग्याची काळजी घ्या जरा

- नासा येवतीकर, धर्माबाद
   9423625769


Saturday, 27 March 2021

28/03/2021 H O L I

होळी रे होळी
होळी आली रे बघ होळी आली
विविध रंगाची झोळी घेऊन आली

मनातला राग काढून टाका
सांगत आला आहे लाल रंग
सकारात्मक विचार करून वाग
बोलतो आहे हिरवा हिरवा रंग
तुझ्या विचारात क्रांती करण्या आली
होळी आली रे बघ होळी आली

सर्वाना आपल्यात सामावून घे 
संदेश देत आहे बघ निळा रंग
इतरांच्या दुःखाचे निवारण कर
आदेशाने सांगतो आहे काळा रंग
तुझ्या वागण्यात बदल करण्या आली
होळी आली रे बघ होळी आली

न डगमगता संकटाला तोंड दे
प्रेरणा देत आहे तुला केसरी रंग
प्रगतीसाठी अविरत चालत राहा
प्रोत्साहित करतोय पिवळा रंग
तुला जागे करण्या करिता आली
होळी आली रे बघ होळी आली

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

28/03/2021

जुन्या चालीरितीचे आजच्या परिस्थितीमध्ये महत्व
लहान असतांना घरातले वाडवडील मंडळी काही गोष्टी आवर्जून करायला सांगायचे त्याचे महत्व आज कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून जी काळजी घेत आहोत, ती काळजी फार पूर्वीपासून आपल्या देशात घेतल्या जात होती याची प्रचिती येते. 
बाहेरून एखादा व्यक्ती मग ते घरातील सदस्य असो वा पाहुणे घरात येत असेल तर त्याला सर्वप्रथम हातपाय धुण्यास सांगितले जाते. ग्रामीण भागात आज ही हात पाय धुण्याची जागा ही घरात प्रवेश करण्यापूर्वीच असते. घरातल्या मुलानी बाहेर खेळून आले की, आई त्यांना हातपाय धुतल्याशिवाय घरात येऊ देत नाही. त्यामागे कारण हेच असू शकते की, बाहेरील कोणते जीवजंतू घरात प्रवेशित करू नये आणि त्याचा त्रास इतरांना होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जायची. 
घरात बाळंतपण झालेली असेल तर आई सर्वाना बजावून सांगत असे की, हातपाय धुतल्याशिवाय कोणीही बाळाजवळ येऊ नये. त्याचे ही कारण तसेच होते, लहानसे बाळ जीवजंतूला लवकर बळी पडतात, त्यांच्याकडे प्रतिकारशक्ती देखील खूप कमी असते. म्हणून प्रत्येक घरातली आई अशी काळजी घेत. 
कुणाच्या अंत्यविधीला जाऊन आले की, अंघोळ केल्याशिवाय घरात प्रवेश करणे त्याज्य होते. अंत्यविधी ह्या प्रक्रियामध्ये अनेक जीवजंतू आसपासच्या परिसरात वावरतात आणि अंत्यविधीमध्ये सहभागी झालेल्या सर्वाना त्याचा संपर्क होऊन घरात जीवजंतू येऊ नये म्हणून अंत्यविधी करून आल्यावर अंघोळ करण्याची प्रथा योग्य वाटते. 
त्यानंतर महिलांच्या मासिक पाळीच्या वेळी पाच दिवस सर्वांपासून वेगळे राहणे यात देखील असेच काही कारण आहे असे वाटते. आज आपण ज्या पद्धतीने विलगिकरण पद्धत पाहत आहोत ते काही अंशी येथे लागू पडत असेल असे वाटते. संसर्ग आणि संपर्कातुन प्रसार पावणारे रोगांचे फैलाव रोखण्यासाठी एकमेकांपासून दूर राहण्याशिवाय पर्याय नाही. 
जुने जाणते लोकं काही प्रथा किंवा चालीरिती पाळत असत, त्याचे शास्त्रीय कारण त्यांना कदाचित माहीत नसेल पण जीवजंतू, विषाणू, सूक्ष्मजीव घरात येऊ नये म्हणून ते फार पूर्वीपासून काळजी घेत आले आहेत. तेंव्हा आपणही साध्या साध्या बाबी काळजीपूर्वक करू या. कोरोनासारख्या विषाणूला हद्दपार करण्यासाठी नियमित हातपाय धुणे, परक्याशी संपर्क न करणे, घराबाहेर न पडणे, शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, मास्कचा वापर करणे इत्यादी बाबी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी पाळलेच पाहिजे.

- नासा येवतीकर

27/03/20021 CORONA

कोरोनाची आठवण 
लॉकडाऊन संचारबंदी जनता कर्फ्यु
गेल्यावर्षी हे शब्द कानावर नवे होते 
लोकांमध्ये होती ताणतणाव व भीती
त्याची आठवण ही आज नको वाटते

एका वर्षात संपून जाईल कोरोना
असे सामान्य लोकांना वाटत होते
कोरोनाने ज्यांना करोडपती केले
त्यांना हे संपूच नये असे वाटते होते

म्हणूनच पुन्हा त्याच तारखेला पहा
कोरोनाव्हायरसची दुसरी आली लाट
घरी राहा सुरक्षित राहा ह्याच संदेशाने
भारतीय लोकांची उगवत आहे पहाट

सर्दी पडसे डोकेदुखी आणि ताप
तसे पाहिलं तर सामान्यच आहे आजार
कोरोनाची लक्षणे देखील याच सारखी
म्हणून साध्या सर्दीनेही होतोय बेजार

कोरोनाची मुळात आठवण येऊच नये
म्हणून स्वतःला कामात गुंतवून घ्यावे
वेळच यावर रामबाण औषध आहे
संकटाची ही वेळ घरी बसून टळू द्यावे

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...