Wednesday, 14 September 2022

गौरव गाथा ( gourav Gatha kavita )

            *।। गौरव - गाथा ।।*


मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील कथा
स्वातंत्र्य सेनानीची ऐकू या गौरव गाथा

लढ्याचे नेतृत्व केले स्वामी रामानंद तीर्थ
मुक्तीसंग्राममुळे मिळाला जीवनाला अर्थ

लढ्यातील पहिले हुतात्मे खरे
असे हुतात्मा गोविंदराव पानसरे

मूर्ती लहान पण कीर्ती महान
साहेबराव बारडकरांचे काम छान

शेळके घराण्यातील दगडाबाई
राणी लक्ष्मीबाई सम केली लढाई

लोकांच्या मनात ज्यांनी केला जागर
वैजापूरचे भाऊराव पाटील मतसागर

भूमिगत बनून सर्वत्र फिरत राहिले पाय
डॉ. ताराबाई बनल्या सर्व अनाथांची माय

लोकांवर अत्याचार केला रझाकाराने
प्रत्येकजण पेटून उठला जनजागृतीने

निजामाविरोधी गावोगावी लढा झाला
अखेर मराठवाडा मुक्त झाला

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

No comments:

Post a Comment

दिनविशेष माहिती - 16 मार्च ( Malhar Rao Holkar

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण ...