Thursday 2 November 2017

कथा - बदल्याचा बळी

जरूर वाचा, reply द्या आणि share करा

*बदल्याचा बळी*

आज भगवानराव गुरुजींच्या छातीमध्ये त्रास होत होता म्हणून जीवनछाया हॉस्पिटलमध्ये त्यांना एडमिट करण्यात आले. सविता मैडम त्याही खुपच चिंताग्रस्त होत्या. त्यांना ही कुठे त्याच  हॉस्पिटलमध्ये एडमिट करावे लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांचे दोन चिमुकली मुले मुलगा प्रवीण सातव्या वर्गात तर मुलगी प्रणिता चौथ्या वर्गात शहरातल्या इंग्रजी शाळेत शिक्षण घेत होती. भगवानराव गुरुजीं शहराच्या जवळच्या एका खेड्यातील प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत होते तर सविता मैडम त्याच शहरातल्या जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून गेल्या पाच वर्षापासून कार्यरत होत्या. पण सरल पोर्टलद्वारे ऑनलाइन बदल्या करण्याचा शासनाचा निर्णय जाहिर झाल्यापासून दोघांचेही मन अस्वस्थ होते. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये बदल्याचा हंगाम असतो आणि हजार एक बदल्या होऊन शाळा सुरु होण्यापूर्वी सर्वजण सेटल होऊन जातात. पण यावर्षी शासनाने सर्वाच्या बदल्या केल्या पण प्राथमिक शिक्षकांचे बदल्या केल्या नाही. त्यामुळे त्यांना हुरहुर लागली होती. त्यातल्या त्यात रोज एक नविन बातमी कानावर येत असल्यामुळे दिवसेंदिवस त्यांची काळजी देखील वाढत होती. आज ही असेच एक बातमी व्हाट्सअपवर वाचायला मिळाली अन भगवानराव गुरुजींची छाती भरून आली. सविता मैडम शहरातल्या शाळेत असल्यामुळे त्यांची बदली होणार हे निश्चित झाले होते. कारण कुणी तरी त्यांची जागा मागितली होती. असे कळले होते.  त्यासाठी त्यांनी आपल्या आवडीचे वीस गावे ऑनलाइन भरून दिली. मात्र पती-पत्नी एकत्रीकरण त्यांनी नाकारले होते. हीच बाब त्यांना नेहमी खटकत होती. आज एक बातमी वाचण्यात आली की, दिलेली माहिती खोटी आढळल्यास संबंधित दोषी शिक्षकांना निलंबित करण्यात येईल. ही बातमी वाचल्यापासून गुरुजीं अधिक चिंतातुर झाले होते. कारण त्यांनी पती-पत्नी एकत्रीकरण नको असे स्विकार केले होते. त्यांना कोणी तरी वेगळीच माहिती सांगितली होती की, तुम्ही दोघे शिक्षक असताना ही तुम्ही पती-पत्नी नको स्विकार केलात हे चूक आहे. गुरुजींला काहीच कळेना. बाहेर मित्रांसोबत बसले की याच विषयावर चर्चा चालायचे. वीस गावातुन एकही गाव मिळाले नाही तर कोठे ही  कोणत्याही गावी फेकतात म्हणून तुम्ही पती-पत्नी स्विकार केले असते तर निदान दोघांना एकच शाळा किंवा जवळ जवळच्या शाळेचे गाव मिळाले असते. या बदल्यामुळे अनेक चर्चा त्यांच्या कानावर पडत होते त्यामुळे त्यांची बीपी आणि शुगर कमी जास्त होत होते. जेवण कमी झाले होते, झोप कमी झाली होती. एवढेच काय त्यांचे इतराशी बोलणे देखील कमी झाले. चार महिन्याच्या काळात त्यांचे जवळपास दहा किलो वजन कमी झाले असेल. घरात सगळीकडे चिंता आणि काळजीचे वातावरण होते. कोणीही कोणास पूर्वीसारखे प्रेमाने बोलत नव्हते. मुले देखील आपली शाळा, ट्यूशन आणि होमवर्क यात गुंग राहायची. आज होणार उद्या होणार म्हणत म्हणत दिवाळी आली पण बदल्या काही झाले नाहीत. त्यांच्या घरातील दिवाळी देखील अशी तशीच झाली. मुलांनी यावर्षी प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करायची म्हणून बाजारातून एकही फटाका विकत घेतला नाही. सविता मैडमने देखील कोणताच दिवाळी फराळ तयार केला नाही. दिवाळी साजरी करण्यात कोणाला ही आनंद वाटत नव्हता. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रातभर जागरण करून भगवानराव गुरुजींनी सविता मैडमचा बदलीचा अर्ज भरला. पहाटे पहाटे ही अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली अन भगवानराव गुरुजींला डोळा लागला. तासभराची डुलकी झाली असेल तोच बाहेर फटाके फुटण्याचा आवाज आल्यामुळे त्यांची झोप उडाली. त्या दिवशीही दिवसभर याच बदल्याच्या चर्चा सर्वत्र चालू होत्या. पेपरामध्ये देखील अर्धे पान लिहून आले. बदल्यामुळे काय होते आणि काय नाही याची धसकी भगवानराव गुरुजींना लागली. अखेर व्ह्ययचे तेच झाले, गुरुजीं या धसकीतून काही बाहेर आलेच नाहीत. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये एडमिट मध्ये पण तबीयतमध्ये काही सुधारणा झाली नाही. त्या दिवशी कुठून तरी एक बातमी त्यांच्या कानावर गेली. ती बातमी ऐकून त्यांची दिल की धडकन अजुन वाढली. ती अशी वाढली की कायमची बंद झाली आणि सविता मैडम विधवा झाल्या. बदल्यामुळे शिक्षकांची मानसिकता योग्य राहत नसेल तर या बदल्या काय कामाच्या असे लोक चर्चा करू लागली. बदल्या होईल तेंव्हा होईल मात्र त्यामुळे एका शिक्षकांस आपल्या जिवाला मुकावे लागले त्याचे काय अशी ही चर्चा लोकांमध्ये होऊ लागली.

( वरील कथा पूर्णपणे काल्पनिक असून, कथेत आलेली नावे आणि प्रसंग पूर्ण काल्पनिक आहे. यदा कदाचित या कथेनुरूप प्रसंग आपल्या जीवनाशी निगडित असेल तर तो योगायोग समजावे. )

थेट वेमुलवाडाहून ( तेलंगना ) लिहिलेली

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...