या ब्लॉग वरील सर्व लेखाचे हक्क सौ.अर्चना नागोराव येवतीकर यांच्याकडे आहेत. परवानगी शिवाय लेख फॉर्वर्ड किंवा प्रकाशित करू नये पाऊलवाट पुस्तकाचे प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते प्रकाशन
Friday, 22 March 2024
जागतिक पुस्तक दिवस ( World Book Day )
Wednesday, 6 March 2024
जागतिक महिला दिन ( World Women's day )
देशातील कोणत्याही उच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश, इतकच नाही तर आशिया खंडातील कोणत्याही देशाच्या सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीश होणाऱ्या पहिल्या महिला, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य म्हणून काम केले आणि तामिळनाडूच्या राज्यपाल म्हणून स्वत:ची छाप उमटवलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे न्यायाधिश फातिमा बिवी. त्या हुशार होत्या आणि त्यांच्या नावावर अनेक विक्रम देखील होते. त्यांच्या जीवनाकडे पाहिले तर दिसून येते की, इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिकुल परिस्थितीत देखील कसे यश मिळवता येते. जगतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या जीवनावर टाकलेला एक प्रकाश.
फातिमा बीवी यांचे पूर्ण नाव मीरा साहिब फातिमा बीवी असे आहे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1927 रोजी रोजी केरळ मधल्या पतनमतिट्टा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मीर साहिब, तर आईचे नाव खदीजा बीबी असे होते.
त्यांचे शालेय शिक्षण पथनामथिट्टा येथील कॅथलिक हायस्कूल येथे झाले. त्यानंतर तिरुअनंतपुरमच्या विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतली. पुढे तिरुवनंतपुरम या शहरातील लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. पदवीच्या पहिल्या वर्षी तिच्या वर्गातल्या फक्त पाच मुलींपैकी ती एक होती. दुसऱ्या वर्षी फातिमासह फक्त तीन मुली उरल्या होत्या. मात्र, त्यावेळी कोणालाच माहीत नव्हते की, फातिमा नावाची ही सामान्य मुलगी भविष्यात इतिहास घडवेल.
6 ऑक्टोंबर 1989 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून निवड झाली. भारतातून एवढ्या मोठ्या पदावर जाणाऱ्या त्या पहिल्या पहिल्या महिला होत्या. 29 एप्रिल 1992 रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या. दरम्यान त्यांनी 1997 ते 2001 या काळात तमिळनाडूच्या राज्यपाल म्हणून देखील काम पाहिलं.
न्यायदानासारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात महिलांना इतका सहज आणि मुक्त प्रवेश नव्हता. त्या काळात फातिमा बिवी यांनी पुरुषी वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात महिलांसाठी संधीची कवाडं उघडली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार आणि अत्यंत बुध्दीमान असलेल्या फातिमा बिवी यांनी एलएलबीमध्ये विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकावले होते. १९५० मध्ये कोल्लम जिल्हा न्यायालयातून फातिमा बिवी यांनी त्यांच्या कायदा क्षेत्रातील करियरला सुरुवात केली. फातिमा बिवी यांची प्रखर बुध्दीमत्ता बघून त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात करियर करावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. आपल्या वडिलांचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. 1950 मध्ये बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. त्या वेळी या परीक्षेत अव्वल ठरणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात फातिमा यांनी वकील म्हणून नोंदणी केली आणि केरळच्या कनिष्ठ न्यायव्यवस्थेत त्यांची प्रॅक्टिस सुरू केली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यापूर्वी फातिमा बीबी न्यायिक सेवांमध्ये कार्यरत होत्या.
14 नोव्हेंबर 1950 रोजी वकील म्हणून त्यांनी काम सुरू केलं. मे 1958 मध्ये तिची केरळ सब-ऑर्डिनेट ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये मुन्सिफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1968 मध्ये त्यांची सबऑर्डिनेट जज म्हणून आणि 1972 मध्ये मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून, 1974 मध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली. 1980 मध्ये प्राप्तिकर अपील न्यायाधिकरणाच्या न्यायिक सदस्य आणि 8 एप्रिल 1983 रोजी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 06 ऑक्टोबर 1989 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 24 एप्रिल 1998 रोजी त्या निवृत्त झाल्या.
भारताचे तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा हे फातिमा बिवी यांच्याविषयी म्हणाले, "संविधान आणि कायद्यांच्या कामकाजाचा त्यांचा अनुभव आणि अंतर्दृष्टी ही मौल्यवान संपत्ती आहे."
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतरही फातिमा बीबी या तामिळनाडूच्या राज्यपाल होत्या. 25 जानेवारी 1997 मध्ये तमिळनाडूच्या राज्यलपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
आपल्या एका मुलाखती दरम्यान फातिमा बीवी यांनी म्हटलं होतं की, सध्या बार आणि बेंच या दोन्ही ठिकाणी अनेक महिला आहेत. पण त्यांचा सहभाग कमी आहे. त्यांचे प्रतिनिधित्व पुरुषांच्या बरोबरीचे नाही. महिलांनी हे क्षेत्र उशिरा निवडल्याचेही एक मोठं कारण त्यामागे आहे. महिलांना न्यायव्यवस्थेत समान प्रतिनिधित्व मिळण्यासाठी वेळ लागेल.
फातिमा यांनी 'द वीक'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, न्यायाधीशांच्या श्रेणीत महिलांची संख्या वाढवण्याची गरज आहे आणि उच्च न्यायव्यवस्थेत महिलांची संख्या वाढवण्यासाठी आरक्षणाचाही विचार करणे आवश्यक आहे.
ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गौरवशाली कार्यकाळात न्यायमूर्ती फातिमा बीवी अतिशय संयमी आणि नेहमी संतुलित होत्या. ती जेव्हा जेव्हा कोणत्याही मुद्द्यावर निर्णय घ्यायला बसायची तेव्हा त्या केसशी संबंधित प्रत्येक लहान-मोठी गोष्ट तिला माहीत असायची. त्या खटल्याचा संपूर्ण इतिहास वाचून ती कोर्टात येत असे.
भारतात ज्या काळात पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा होता, त्या काळात फातिमा यांनी न्यायाधीश होण्याचं स्वप्न पाहिलं होते. जे त्यांनी पूर्ण देखील केलं. 1950 रोजी भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला महिला न्यायाधीश मिळण्यासाठी 39 वर्षांचा कालावधी लागला. 39 वर्षांनंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयात फातिमा बीवी यांना पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून सन्मान मिळाला.
फातिमा बिवी यांच्या जीवनात काही वादग्रस्त निर्णय देखील झाले. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला क्लीन चिट दिल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. त्यामुळे केंद्र सरकारने देखील रोष व्यक्त केला. दरम्यान त्याच वेळी तत्कालीन केंद्रीय कायदा मंत्री अरुण जेटली यांनी त्यांचा राजीनामा देखील मागितला होता.
त्यानंतरच्या निवडणुकांनंतर जयललिता यांचे विधानसभेतील बहुमत स्वीकारल्याच्या वादग्रस्त परिस्थितीत आणि करुणानिधी ज्यांनी त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती, यांच्या अटकेमुळे पुन्हा एकदा वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर मात्र फातिमा यांनी त्यांचे पद सोडले. जयललिता यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाचा बचाव केला. तामिळनाडूच्या तत्कालीन राज्यपाल फातिमा बीवी यांनी 14 मे 2001 रोजी जयललिता यांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने आपल्या घटनात्मक दायित्वाचे पालन न केल्यामुळे राज्यपालांना परत बोलावण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे करण्याचा निर्णय घेतल्यानंतर फातिमा बीवी यांनी राजीनामा सादर केला. माजी मुख्यमंत्री, एम. करुणानिधी आणि दोन केंद्रीय मंत्री, मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांच्या अटकेनंतरच्या घटनाक्रमाचे स्वतंत्र आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन न केल्यामुळे केंद्र सुश्री फातिमा बीवी यांच्यावर नाराज होते. आंध्र प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल डॉ. सी. रंगराजन यांनी त्यांच्या राजीनाम्यानंतर तामिळनाडूचे कार्यकारी राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला. राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी मद्रास विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून देखील काम पाहिलं. त्याचबरोबर त्यांनी केरळ मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य म्हणूनही काम केले होते.
देशभरातील महिलांसाठी फातिमा बीवी या आदर्श राहिल्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या प्रकरणात निकाल दिला. राज्याच्या राज्यपाल या नात्याने त्यांनी राजीव गांधी हत्या प्रकरणातील चार दोषी कैद्यांनी दाखल केलेला दयेचा अर्ज फेटाळला. कैद्यांनी राज्यपालांकडे दयेचे अर्ज पाठवले होते, ज्यात तिला घटनेच्या कलम १६१ (माफी देण्याचा राज्यपालांचा अधिकार) अधिकार वापरण्याची विनंती केली होती.
2018 साली 'स्क्रोल' वेबसाईटशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, "महिलांसाठी बंद असलेलं दार मी उघडलं. न्यायव्यवस्थेच्या उच्च स्तरावर महिला प्रतिनिधित्त्वाची संख्या फारच वाईट आहे. भारतातल्या एकूण लोकसंख्येत निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. मग त्यानुसार भारतीय न्यायव्यवस्थेत निम्म्या जागा महिलांसाठी का नाहीत?" असा सवाल त्या करतात.
गेल्या 71 वर्षांचा विचार केला तर 256 न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात निवडले गेले आणि त्यात केवळ 11 म्हणजे 4.2 टक्के महिला न्यायाधीशांची निवड झालीय. सर्वोच्च न्यायालयात सध्या असलेल्या 34 न्यायाधीशांमध्ये केवळ चार महिला न्यायाधीश आहेत. एकाचवेळी चार महिला न्यायाधीश असण्याचा खरंतर हा विक्रमच आहे. तर भारतातील विविध राज्यांमधील एकूण 25 उच्च न्यायालयांमध्ये 677 न्यायाधीशांपैकी 81 महिला न्यायाधीश आहेत. या 25 पैकी चार उच्च न्यायालयांमध्ये एकही महिला न्यायाधीश नाही. यूकेमध्ये 32 टक्के महिला न्यायाधीश आहेत आणि अमेरिकेत 34 टक्के महिला न्यायाधीश आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयात तीन महिला न्यायाधीश आहेत म्हणजेच एकूण संख्येच्या 15 ते 20 टक्के.
गेल्या डिसेंबरमध्ये भारताचे अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की, लैंगिक अत्याचारासंबंधी खटल्यांमध्ये अधिक समतोल साधणारा विचार करण्यासाठी अधिकाधिक महिला न्यायाधीशांची निवड होणं आवश्यक आहे.
सन १९९० मध्ये फातिमा बिवी यांना डी. लिट आणि महिला शिरोमणी सारखे सन्माननीय पुरस्कार मिळाले. त्यांना भारत ज्योती पुरस्कार आणि यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल (USIBC) जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. 2023 मध्ये त्यांना केरळ प्रभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, जो केरळ सरकारने दिलेला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे.
भारताच्या न्यायव्यवस्थेत लिंगभेदाच्या पलिकडे जाऊन बुध्दीमत्ता, अनुभवाच्या जोरावर आपला ठसा उमटवणाऱ्या आणि महिलांना या क्षेत्राची दारं खुली करणाऱ्या फातिमा बिवी यांचं नाव अजरामर झालं आहे. फातिमा बीवी यांचे 23 नोव्हेंबर 2023 रोजी वयाच्या 96 व्या वर्षी केरळमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यावेळी केरळचे तत्कालीन आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी म्हटलं की, फातिमा बीवी या एक बहाद्दुर महिला होत्या. त्यांच्या नावावर आजवर कित्येक रेकॉर्ड नोंदवण्यात आलेत. त्यांनी आपल्या जगण्यातून दाखवून दिलं आहे की, दृढ इच्छाशक्तीवरुन कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते. आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन .....!
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलन करण्यात आले आहे. )
संकलन - नासा येवतीकर, स्तंभलेखक
9423625769
Monday, 4 March 2024
काटकसर ( katakasar )
Friday, 16 February 2024
छत्रपती शिवाजी महाराज ( Chatrpati Shivaji Maharaj )
शिवजयंती निमित्ताने प्रासंगिक लेख
महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान :- छत्रपती शिवाजी महाराज
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, सर्वांचे स्फूर्तिस्थान आणि रयतेचा जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही असा एक ही व्यक्ती राज्यात शोधून ही सापडणार नाही. आपल्या राज्यातच नाहीतर देशातील अनेक राज्यात व जगातील काही देशांत शिवाजी महाराजांचे कार्य अनेकांना स्फूर्ती व प्रेरणा देत असते. शिवाजी महाराजांकडे इतर साम्राज्यांच्या तुलनेत छोटी पण सुसज्ज आणि शिस्तबद्ध अशी फौज होती. या फौजेमध्ये मुख्यत्वे मराठा आणि कुणबी जातीचे मावळे समाविष्ट होते. शिवाजी महाराज जाणून होते की मुघलांच्या प्रचंड दारुगोळा व तोफखान्यांनी सज्ज असलेल्या फौजेला पारंपारिक युद्धपद्धतीने हरवणे कठीण होते. त्यामुळे महाराजांनी आपली स्वतःची अशी युद्धनीती विकसित केली, ज्यास ' गनिमी कावा' म्हणून ओळखले जाते. आजूबाजूच्या भौगोलिक प्रदेशाची माहिती आणि येथील दऱ्याखोऱ्यांचे सखोल ज्ञान यावर वेगवान फौज आणि शत्रूला अनपेक्षित हल्ले अशा पद्धतींचा वापर शिवरायांनी केला. ही युद्धनीती अतिशय यशस्वी ठरली. मुघलांच्या मोठमोठ्या फौजा शिवरायांच्या छोटेखानी फौजांसमोर निष्प्रभ ठरल्या. शिवाजी महाराजांच्या गनिमी कावाचा अनेक इतिहास संशोधक आजही अभ्यास करतात, यावरून शिवरायांची युद्धनीतीचे महत्व अधोरेखित होते.
पारतंत्र्याच्या काळात स्वतःचे राज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहणे आणि पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण शिवाजी महाराजांनी सवंगडी असलेल्या मावळ्यांना सोबत घेऊन श्री चे राज्य निर्माण केले आणि इतिहास घडविला. एक आदर्श राजा कसा असतो ? आज्ञाधारक पुत्र कसा असावा ? रयतेचा जाणता राजामध्ये कोणते गुण असावेत ? याचे उत्तम उदाहरण म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राकडे पाहतो. सोळाव्या शतकात होऊन गेलेले राजे शिवाजीचे कार्य आज एकविसाव्या शतकात देखील तेवढेच प्रेरक आणि मार्गदर्शक ठरतात. त्यांनी आपल्या जीवनात अनेक चढ-उतार पाहिले, सुखदुःखाचा अनुभव घेतला, जवळच्या व्यक्तीचा विरह सहन केला, अनेक लढाया त्यांनी आपल्या बुद्धीचातुर्य व सहकार्याने जिंकले आहेत.
शहाजी भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळील वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी एका तेजस्वी बाळाचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यात जन्म झाला म्हणून त्या बाळाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. शहाजी महाराजांना नेहमी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असे त्यामुळे त्यांनी राजमाता जिजाऊ आणि बाळ शिवाजी यांची राहण्याची व्यवस्था पुण्यात केली. राजमाता जिजाऊ यांच्या सान्निध्यात चंद्रकलेप्रमाणे बाळ शिवाजी मोठे होत होते. राजमाता जिजाऊ ह्या एक धाडसी आणि स्वाभिमानी स्त्री होती. त्यामुळे त्यांनी बाळ शिवाजीला लहानपणापासून साहसी व धाडसी लोकांच्या कथा व गोष्टी सांगत असत. प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरू मानल्या जातात. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात. मुलांना संस्कारी व धाडसी करायचे असेल तर प्रत्येक स्त्रियांनी राजमाता जिजाऊ यांचे जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेवायला हवे. लहान मुलांना आई जसे शिकवेल तसे ते मूल घडत राहते. म्हणून जीवनात येणारे सुख, दुःख, सोपे, अवघड, कठीण प्रसंगाचे अनुभव लहान मुलांना द्यायला हवे. पण आजकालच्या माता स्वतः अनेक कष्ट व दुःख सहन करतात पण आपल्या लेकराला काडीचा त्रास होऊ देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये त्या विषयीच्या जाणिवा निर्माण होत नाहीत. माता जिजाऊ यांनी आपले स्वतःचे एक राज्य असावे अशी मनोमन इच्छा होती, तशी ती आपली इच्छा त्यांनी शिवाजी महाराजांकडे व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी बाळ शिवाजीला घोड्यावर बसणे, तलवार चालविणे यासारख्या युद्धकला शिकविल्या. आपल्यापेक्षा मोठ्या लोकांसोबत कसे वागावे ? महिलांसोबत आपले वर्तन कसे असावे ? जीवनातल्या सूक्ष्म घटनांचा त्यांच्या बालमनावर संस्कार केले. याच विचारातून शिवाजी महाराजांनी आपल्या बाळ सवंगड्यासह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. खरोखरच तो किती धाडसी निर्णय होता. आपल्या मावळ्यांच्या सहकार्याने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून घेतला. पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळील अनेक महत्त्वाचे किल्ले ताब्यात घेतले. तसं बघायला गेलं तर शत्रू पक्षात कितीतरी सैनिक होते आणि त्यामानाने राजे शिवाजी यांच्याकडे फार तुल्यबळ सैन्य. पण शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे सैन्य यांच्यात जो आत्मविश्वास आणि धमक होती ती शंभर सैनिकाला पुरून उरणारी होती. म्हणूनच त्यांनी अनेक किल्ले जिंकू शकले. त्यांच्या मावळ्यांच्या यादीत सारेच शूर आणि वीर होते. त्यापैकी काही शूर वीर मावळ्यांचा सेनापतीचा उल्लेख केल्याशिवाय शिवाजी महाराजांचे कार्य पूर्णत्वास गेल्यासारखे वाटत नाही.
शिवाजी महाराज यांच्या शूर वीर मावळ्यांच्या यादीत प्रथम नाव स्मरते ते म्हणजे तानाजी मालुसरे यांचे.
तानाजी यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या लग्नाची जोरदार तयारी चालू होती. त्याचवेळी कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करण्याची वेळ आली. त्यावेळी तानाजी यांनी आधी लगीन कोंढण्याचे मग रायबाचे असे सगळ्यांना सांगून लढाईसाठी निघून गेले. कोंढण्यावर शत्रूशी चार हात करतांना तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्याची बातमी महाराजांच्या कानावर गेले त्यावेळी महाराज निःशब्द झाले. त्यांच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडले ते म्हणजे ' गड आला पण सिंह गेला.' तानाजी मालुसरे यांच्यासारखे अनेक मावळ्यांची महाराजवर खूप निष्ठा आणि प्रेम होते म्हणून तर आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले. महाराजांचे जीव वाचले पाहिजे म्हणून स्वतःचे जीव अर्पण करणाऱ्याच्या यादीत बाजीप्रभू देशपांडे यांचे स्मरण करणे अगत्याचे ठरते.
लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे असे म्हणून पन्हाळगडावरून विशालगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घोडखिंडीत बाजीप्रभू यांनी शत्रूला रोखून धरले. जोपर्यंत महाराज गडावर सुखरूप पोहोचत नाहीत तोपर्यंत त्यांनी शत्रूशी चार हात केले. महाराज गडावर पोहोचल्याची तोफ ऐकल्यावरच त्यांनी आपला जीव सोडला. किती ती निष्ठा ! असे जिवाभावाचे मावळे मिळविणे हे खरंच भाग्याची गोष्ट आहे. अफजलखान यांच्या वधाच्या वेळी महाराजांचे अंगरक्षक जिवा महाल तात्काळ धावून गेला म्हणूनच म्हटले जाते होता जीवा म्हणून वाचला शिवा. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे इस्लामी पद्धतीने अंत्यसंस्कार करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली. यावरून शिवाजी महाराजांची आपल्या शत्रूबद्दल असलेला आदर लक्षात येते. शिवाजी महाराजांच्या जीवनात असे अनेक प्रसंग आले ज्यात त्यांच्या मावळ्यांनी आपले जीव अर्पण करून महाराजांचे जीव वाचविले. अनेक शत्रू राज्यांना त्यांनी सळो की पळो करून सोडले. लाखाचा पोशिंदा जगाला पाहिजे असे सर्वांची मनोकामना असायची आणि त्याच विचारातून प्रत्येकजण स्वयंस्फूर्तीने कामाला लागत होते. महाराजांच्या सैन्यात सर्व जाती-धर्माचे व विविध पंथाच्या लोकांचा समावेश होता. सर्वधर्मसमभाव या वृत्तीने महाराजांचे सैनिक कार्य करत असत. राज्यातल्या प्रत्येक व्यक्ती विषयी महाराजांच्या मनात प्रचंड आस्था होती. कोणत्याही व्यक्तीची पिळवणूक होऊ नये, झाडांची कत्तल करू नका, शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान करू नका, स्त्रियांचा सन्मान करा अश्या प्रकारचे आदेश ते आपल्या सैन्याला देत असत यावरून महाराजांची दृष्टी आपल्या लक्षात येऊ शकते. शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी आठ मंत्री असलेले अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. हे मंत्री राजांना राज्यकारभारविषयक कामाविषयी सल्ले देत असे. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. शहाजीराजे व जिजाबाई यांची मुद्रा पारशी भाषेत होती, पण शिवाजी महाराजांनी राजमुद्रेसाठी संस्कृत भाषेचा वापर केला. शिवाजी महाराज दिसायला लहान मूर्ती जरी असली तरी त्यांची कीर्ती खूप महान होती. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा सर्वत्र शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. १६८०च्या एप्रिल महिन्यात वयाच्या ५० व्या वर्षी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम !
- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती पो. येताळा
ता. धर्माबाद जि. नांदेड
पिन - 431809
मोबाईल क्रमांक - 9423625769
Mail ID - nagorao.yeotikar@gmail.com
दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )
सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...
-
कर्मचाऱ्यांच्या जीवनातील एक अनमोल क्षण म्हणजे सेवानिवृत्ती. एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात हसू अशी विपरीत स्थिती यावेळी असते. कभी खुशी, कभी...
-
दीपोत्सवाचा सण : दिवाळी दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळी सणाची आबालापासून वृध्दापर्यंत सर्वानाच चातक पक्ष्य...
-
आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर प्रमुख पाहुणे, आदरणीय गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, आज मी आपल्या समोर भारतमातेचे दोन ...
