Friday, 22 March 2024

जागतिक पुस्तक दिवस ( World Book Day )

📚 जागतिक पुस्तक दिनानिमित्त एक विचार 📚

एक पुस्तक लिहिण्यासाठी हजार पुस्तक वाचावी लागतात. 

वाचत राहा, लिहीत राहा
जगण्याचा आनंद घेत राहा

- नासा येवतीकर, स्तंभलेखक


शाळा आणि शिक्षक ई बुक वरील प्रतिक्रिया
नमस्कार
आपण प्रकाशित केलेले श्री ना सा येवतीकर यांचे. 'शाळा आणि शिक्षक ' हे ई पुस्तक वाचण्यात आले. आपले आणि लेखक यांचे अभिनंदन....
अतिशय उत्कृष्ट अशी रचना आपण केलेली आहे.
माझ्या शुभेच्छा कम प्रस्तावनेस स्थान दिल्याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो. धन्यवाद
- नागेश सू. शेवाळकर, 
सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा जेष्ठ साहित्यिक, पुणे.

आदरणीय येवतीकर सर,
सर आपली शिक्षण क्षेत्रातील  तळमळ आपणाला स्वस्थ  बसू देत नाही.. आपल्या मधील नाविन्यतेचा खूप चांगला प्रयत्न म्हणजे हे ई बुक शाळा आणि शिक्षक...
मान्यवरांच्या शुभेच्छा मध्येच आपले आणि आपल्या कार्याचे मोठेपण दिसून येते.... सचित्र असलेले हे ई बुक शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरेलच यात काही शंका नाही. शाळेच्या परिपाठासाठी अत्यंत मार्गदर्शक असलेले फ्रेश मॉर्निंग बुलेटिन हे सदर आपण सुरु करुन आधीच सर्व महाराष्टातील सामान्य शिक्षकांचे मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे...आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग भरारीसाठी तसेच शाळा आणि शिक्षक या पुस्तकासाठी  आपणास खूप खूप शुभेच्छा..

- ज्ञानेश्वर माठे

खूपच सुंदर लेखन... संग्राह्य अंक. ....ई बुकचा नाविन्यपूर्ण आणि अनोखा प्रयोग आपण सादर करून साहित्य क्षेत्रातील यशस्वी प्रयोग राबवित आहात. आपल्या लेखणीला सलाम... आणि खूप खूप शुभेच्छा 

- विनायक हिरवे, प्राथमिक शिक्षक, कोल्हापूर

पुस्तक- परिचय

*शाळेतील विविध बाबींवर प्रकाश टाकणारे ई बुक*

*" शाळा आणि शिक्षक "*

शिक्षक होणे हे सर्वांचे काम नाही. शिक्षकांची निवड करतांना नुसते डीएड, बिपीएड, बीएड इ.  असून चालत नाही तर मुळात शिक्षणाची आवड ही असली पाहिजे. निरंतर वाचन, मनन आणि चिंतनाची आवड असली पाहिजे. शिक्षण पेशा हा व्यवसाय नसून ते मातीला योग्य प्रकारे वळण देऊन चांगल्या, सुंदर, सुबक व अप्रतिम असे व्यक्तीमत्व घडविण्याचे एक साधन आहे. हे आपण सर्वांनीच समजून घेतले पाहिजेत. शिक्षणाचा बाजार मांडून सरकारने फार मोठी चुक केलेली आहे . काॅपी म्हणजे कलंक या सदरात लेखक नासा येवतीकरांनी काॅपी करण्याने अभ्यासू मुलांवर व शिक्षणावर कसा दुष्परिणाम होतो हे समजावून सांगितलेले आहे. शिक्षक आनंदी तर मुले आनंदी. हे सत्य असले तरी आनंद हा माणसांच्या प्रवृत्तीवर अवलंबून असतो. यासाठी शिक्षकाचे स्वास्थ्य हा सुध्दा महत्वाचा भाग आहे. मुलांचे व शिक्षकांचे स्वास्थ्य चांगले रहाण्यासाठी शरीराला व्यायाम हा दररोजचा असला पाहिजे. याकडे सरकारने व शिक्षकवर्गांनी पुर्णतः  पाठ फिरविलेली आहे. याचा वाईट परिणाम मुलांच्या आरोग्यावर, स्वास्थावर व पर्यायाने शिक्षणावर होतो आहे. आॅनलाईन कामात गुरफटलेला शिक्षक ही कल्पनाच चुकीची आहे. शिक्षकाचे काम मुलांवर चांगले संस्कार करणे, मुलांचे स्वास्थ्य घडविणे आणि देशासाठी स्वयंपूर्ण असे नागरिक घडविणे हे आहे. आॅनलाईन कामावर पुर्णतः बहिष्कार हवा. कारण रेकार्ड ठेवणे हे कारकूनाचे काम आहे न की शिक्षकांचे हे सरकारने समजून घेतले पाहिजे. मोबाईल डिजीटल शाळा ही काळाची गरज आहे. डिजीटल शाळा याचा अर्थ नविनतम तंत्रज्ञान प्रणाली व्यवहारात आणून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानात भर घालणे होय. यासाठी तरूण शिक्षकांची टीम तयार करून त्यांचे मार्फत डिजीटल तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार केला गेला पाहिजे. याचा अर्थ जुने ते सर्व टाकावू असा होत नाही. दोन्हीचा समन्वय आवश्यक आहे. राष्ट्रगीत, राष्ट्रभक्ती ही अंतःकरणातून निर्माण झाली पाहिजे न की बळजबरीने. यासाठी नासा येवतीकर सर म्हणतात तसे प्रत्येक सरकारी कार्यक्रमात, शाळा, महाविद्यालय व सरकारी कार्यालयात राष्ट्रगीताचा मान हा राखला गेलाच पाहिजे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्रगीताचा अपमान होता कामा नये. कारण प्रथम राष्ट्र अंतीम राष्ट्र हेच ख-या नागरिकाचे लक्षण ठरते आहे. यात व्यक्तीगत स्वार्थ आड  येता कामा नये. 
        नासा येवतीकरांचे लेखन हे विस्तृत असून सर्व विविधांगी विषयावर नेहमी लेखणी ही चालत असते. ही कौतुकास्पद बाब ठरते आहे. नासा सरासारख्या लोकशिक्षकाची समाजाला खरी गरज आहे, विशेषतः ग्रामीण भागाला. शाळेशी निगडित प्रत्येक घटकांनी आणि प्रत्येक शिक्षकांनी नासा येवतीकर लिखित शाळा आणि शिक्षक हे ई बुक आवर्जून एकदा तरी वाचावे. हे ई बुक nagorao26@gmail.com येथे विनंती पाठविल्यास विनामूल्य उपलब्ध होईल.  लिखाण असेच चालू रहावे हीच सदिच्छा !

मिलिंद मधुकरराव गड्डमवार, 
' मधु कुंज ' आसिफाबाद रोड,शिवाजीनगर वार्ड क्र. ९
तह- राजुरा जिल्हा-चंद्रपूर(म. रा.) पिन कोड- ४४२ ९०५
भ्र.क्र. ९५११२१५२००

“शाळा आणि शिक्षक” पुस्तकाबद्दल माझे अभिप्राय 
एस. एम. रचावाड, मु. पो.पाळज
ता. भोकर जि. नांदेड 

पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर या पुस्तकाबद्दल माझे अभिप्राय व या पुस्तकातील काही बाबी जे की माझा मनावर प्रभावित केले त्यांचा थोडक्यात आढावा मी लिखित स्वरूपात मा़ंडत आहे.           
 टिप:
        माझा या लिखाणात चुका व विसंगती आढळून आल्यास क्षमस्व !
माझे काही विचार आपल्या विचारांशी जुळत नसल्यास ते माझे वैयक्तिक मत समजावे, याबद्दल क्षमस्व.
 मला आपली “शाळा आणि शिक्षक”   E-Book  वाचण्यास उपलब्ध करुन दिल्याबद्दल व माझे अभिप्राय मांडण्यास अनुमती दिल्याबद्दल आपणांस खूप खूप धन्यवाद.  
                
आदरणीय, 
ना.सा सर आपल्या लिखाणाने मी खूप प्रभावित झालो. आपल्या लिखाणातून मला तूमची विद्यार्थाप्रती, समाजाप्रती असलेली निष्ठा, प्रेम, तळमळ, धडपड व सामाजिक बांधिलकी याची प्रचीती मला वेळोवळी दिसून आली. तुमच्या प्रत्येक लिखाणातून काहीना  काही संदेश वाचकांना मिळत असतो, व ते शैक्षणिक सुधारणा बाबतीत असो वा सामाजिक जागृती असो आणि राष्ट्रभक्ती पर असो. तुमचे लिखाण म्हणजे वाचकांसाठी विचारांचा एक खजिनाच असतो, वाचक वाचनात एवढे मग्न होतात की वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. तुमच्या या कर्तृत्वाला माझा सलाम. तुमच्या या लिखाणाच्या कार्यातून भविष्यात असेच सामाजिक जागृती, सामाजिक बांधिलकी व शैक्षणिक सुधारण्याचे कार्य घडत राहो त्याचबरोबर वाचकांना आदर्श शिक्षक, आदर्श विद्यार्थी व आदर्श व्यक्तिमत्व कसे घडवता येईल व ते कसे टिकवून ठेवता येईल यासाठी असेच सदैव प्रेरणा वाचकांना मिळो. तुमच्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा. 
            तुमचे हे कार्य व धडपड पाहून मला कधीकधी प्रश्न पडतो की आजकाल किती शिक्षक व सरकारी कर्मचारी आपली जबाबदारी अगदी कर्तव्यदक्षरित्या व प्रामाणिकपणे पार पाडतात ? अगदी फार कमी. आज प्रत्येकजण एवढा स्वार्थ बनत चालला आहे की अगोदर स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची सुधारणा लवकरात लवकर कशी होईल त्यासाठी भ्रष्ट मार्गाने आपली जबाबदारी विसरून कमीत कमी वेळेत पैसा कमवून मोठा कसा होता येईल हेच पाहत आहे. त्यामुळे पैसा, संपत्ती व वैयक्तिक स्वार्थ हेच सर्वश्रेष्ठ मानणारे हे मनुष्य मानवता, नीतिमत्ता व सामाजिक बांधिलकी या नीती तत्त्वापासून दुरावत चाललेला आहे. आणि पूर्णपणे असंवेदनशील बनत चालला आहे. परिणामी नात्यानात्यांमधील विश्वास, शिष्यांचा गुरुप्रती असलेला विश्वास, आई-वडिलांचा(वृद्ध) मुलाप्रती असलेला विश्वास, लोकांचा लोकांवरती असलेला विश्वास, विद्यार्थ्यांचा/ समाजाचा शिक्षणावरती असलेला विश्वास आणि समाजाचा सरकारवरती असलेला विश्वास हळूहळू कमी होत असताना दिसून येते. प्रत्येकाने जर पैसा, संपत्ती हेच सर्वश्रेष्ठ न मानता नीतिमत्ता, मानता व सामाजिक बांधिलकी याची जाण ठेवून आपापल्या क्षेत्रात अगदी प्रामाणिकपणे, कर्तव्यदक्षतेने काम केल्यास स्वतःला पैसा बरोबर आनंद व समाधान प्राप्त होऊन जीवन अधिक सुखी व आनंदी होईल. परिणामी स्वहित बरोबरच समाज आणि देशाचे हित व कल्याण होईल. आणि भारत एक विश्वसनीय राष्ट्र निर्माण होऊन सुजलाम-सुफलाम बनेल.
            आपल्या  “शाळा आणि शिक्षक” या पुस्तकातील खालील बाबी जे की मला खूप आवडले व माझ्या मनावर खूप प्रभावित केले त्यांचा थोडक्यात आढावा व त्यावर माझे काही वैयक्तिक मत या ठिकाणी मांडत आहे. 
१) कॉपी करणे करणे म्हणजे एक कलंक :
            खरोखरच कॉपी करणे म्हणजे एक कलंक व स्वतःच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा होय. नकला मारून पुढे  जाणे म्हणजे लोकांना आपली प्रगती वाटते परंतु ही प्रगती तात्पुरत्या स्वरुपाची असते. दीर्घकाळासाठी भविष्यात ही प्रगती अधोगती असते. तेच जर व्यक्ती स्वतःच्या मेहनतीने, जिद्दीने नकला न मारता पुढे गेलेला असेल तर त्याचा आत्मविश्वास प्रचंड असते. त्याचे निर्णयक्षमता भक्कम असते. व तोच स्पर्धेत टिकू शकतो व आपले भविष्य उज्ज्वल बनवू शकतो.
            यासंदर्भात माझं स्वतःच एक उदाहरण या ठिकाणी सांगतो. आमच्या वेळेस दहावी-बारावीला खूप नकला चलायचे. गावाकडील बरेच विद्यार्थी धर्माबाद अर्जापूरला बारावीला ॲडमिशन घेण्यासाठी जायचे व तेथे बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन डी.एड लागले जायचे. माझं सुद्धा तेच स्वप्न होतं म्हणून मी सुद्धा धर्माबादला बारावी सायन्सला ॲडमिशन घेतलो. बारावी परीक्षेच्या वेळेस तेव्हा दोन सेंटर असायचे एक एलबीएस महाविद्यालय व दुसरी जिजामाता शाळा. माझा परिक्षा सेंटर जिजामाता शाळेवर आला होता. हेडगार्ड म्हणून कॉमर्स विभागाचे जगनमोहन सर खूप कडक स्वभावाचे होते. नकला चालूच  दिले नाहीत. माझ्यासोबत जिजामाता शाळेत परिक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे डीएड स्वप्न धुळीस मिळाले. मी ७५ टक्के ची अपेक्षा केली असता केवळ मला ६३ टक्केच मिळाले. तेच माझासोबतचे काही मित्र एलबीएस महाविद्यालयात आलेली ७५ ते ८० टक्के घेऊन डीएड गेलेत. त्यावेळेस पहिल्यांदाच मी नशिबाला दोष देत खूप निराश झालो होतो. खूप काही आपण गमावलं व आपलं शैक्षणिक करिअर संपलं असं वाटलं माझ्या त्या कोमल मनाला. अशा निराश अवस्थेत मी डि.बी कॉलेज भोकर येथे ॲडमिशन घेतलो. डि.बी कॉलेज मध्ये बी.ए च्या प्रथम वर्षापासून माझ्या जीवनाला एक नवीन कलाटणी मिळाली होती. चांगले अनुभवी प्राध्यापक व त्यांचे मार्गदर्शन आणि शिकवण, Strict Examination पद्धती,स्वतःची मेहनत व जिद्द या बळावर माझा आत्मविश्वास भक्कम होत गेली. डि.बी कॉलेज हे माझ्या जडणघडणीत फार मोलाचा वाटा आहे तर पुणे विद्यापीठ माझा सर्वांगीण विकास व यशात फार मोठा वाटा आहे.
            माझ्या जीवनात  जे काही यश-अपयश, जय-पराजय व वाईट प्रसंग आलेत ते चांगल्यासाठीच आलेत असे मला आज वाटते. त्यातून मला खूप काही शिकायला भेटले व माझे मन खूप खंबीर व जिद्दी बनले. आज मी जे यश संपादन केले त्याचे श्रेय हे मला भूतकाळात अपयशातून मिळालेल्या प्रेरणा यांस जातो.
२) आयुष्यातील महत्त्वपूर्ण वळण:
             आयुष्यातील महत्त्वपूर्ण वळण हे व्यक्तीच्या जीवनातील यशाच्या वाटेत फार मोलाचे आहे. जसे एकादा कारागीर एकादी वस्तू तयार करताना जसा आकार तो देत असतो तशी ती वस्तू आकार घेऊन बनत असते तसेच विद्यार्थी भविष्यात कसा आकार घेतो व कसा घडतो हे सुद्धा त्याला वेळोवेळी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती मिळालेल्या महत्त्वपूर्ण वळणावरच अवलंबून असते. हे वळण त्याला आई-वडील, शिक्षक, मित्र, सभोवतालचे वातावरण यांच्याकडून मिळालेल्या संस्कार, आचार-विचार व शिक्षण यावर अवलंबून असते.

३) सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा विकास:
              सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अवगत असलेले क्रीडा कौशल्य, कला कौशल्य दिसून येते. पण हे काही काळाकरता म्हणजे प्रजासत्ताक दिन सारख्या सोहळ्यानिमित्त मात्र ठरते. त्यानंतर त्यांना कोणीच प्रोत्साहन करीत नाही. शिक्षक व पालक जर खरोखरच विद्यार्थ्यांच्या अंगी लपलेले हे कला कौशल्य व क्रीडा कौशल्य गुण ओळखून व त्या गुणांना वाव देऊन प्रोत्साहित करीत राहिले तर विद्यार्थी कमीत कमी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पर्यंत मजल मारू शकतात व आपली कर्तत्व सिद्ध करून दाखवतात. मी माझे असे काय मित्र पाहिले आहे की जे कलागुण संपन्न व क्रीडा गुण संपन्न असताना देखील प्रोत्साहन व मार्गदर्शन अभावी ते मागे राहिलेत. म्हणून शिक्षक, प्राध्यापक व पालक यांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. खरोखरच एखाद्या विद्यार्थ्यांच्या अंगी तसे अवगत गुण असतील तर त्याला वाव देऊन त्याला पुढे जाण्यास प्रोत्साहीत करावे अन्यथा टॅलेंट  नष्ट पावते व सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा म्हणावं तेवढा विकास होणार नाही.
४) लोकसहभागातून शाळा विकास:
           आपण म्हटल्याप्रमाणे शाळेच्या विकास कार्यात जेवढी शिक्षकमंडळी, विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे तेवढीच गावातील लोकांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे. या विकासकार्यात या सर्वांचा सुरेख संगम असेल तरच शाळा नुसती शाळा नसून एक विश्वासाचं केंद्र निर्माण होईल. आणि चांगले प्रतिभावंत, गुणी व यशस्वी विद्यार्थी घडतील.
           ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की शाळेच्या विकासात गावातील लोकांचा सहभाग हा निष्क्रिय असतो. काही शाळांमध्ये तर कित्येक वर्षानुवर्षे अपुरे शिक्षक, अपुऱ्या पायाभूत सुविधा ह्या समस्या प्रकर्षाने दिसून येतात. ही परिस्थिती असताना गावातील प्रतिष्ठित लोकं, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक याबाबतीत काहीच हालचाल व लक्ष करीत नाहीत. तसेच ही गावकरी मंडळी शाळेच्या संबंधित वेगवेगळ्या उपक्रमात देखील भाग घेत नाहीत. या सर्व गोष्टींस कारणीभूत आहे त्यांची मानसिकता, त्यांना वाटते  “ठेविले अनंते तैसेची रहावे”.  यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होते.
            हे बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकांनी आपली मानसिकता बदलायला हवी. आजचा विद्यार्थी हे उद्याचे देशाचे भावी आधारस्तंभ होय याची जाणीव प्रत्येकांना असायला हवी. शासनाने सुद्धा शाळेच्या विकासात लोकांचा सहभाग जास्तीत जास्त कसे वाढवता येईल यांकरिता वेगवेगळे उपक्रम राबवून जनजागृती घडवून आणले तर अधिक चांगले होईल.
५) लिहीण्याला पर्याय नाही:
          लोकांच्या मानसिक, आर्थिक व सामाजिक स्थितीत बदल घडवून आणायचे तर 'कलम व लिखाण’ यांची ताकद व महत्त्वाची भूमिका याबद्दल आपण मांडलेले विचार हे क्रांतिकारी, प्रभावकारक आणि मनाला  खूप स्पर्श करणारे आहेत. 
          तुमच्या पुस्तकात उल्लेखीत केलेले शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते युसुफजई यांचे संदर्भ व त्यांचे  वाक्य “मला पुस्तक व पेन द्या  मी जगात क्रांती घडवून आणीन” हे ह्रदयाला स्पर्श करणारे क्रांतीकारी विचार आहेत. यावरून मला पेनच्या ताकदीची कल्पना माझा डोक्यात आली.                                               
या पेनच्या सामर्थाबद्दल मला इंग्रजीतले एक म्हण आठवत, “The  pen is mightier than the sword” याचा अर्थ “पेन तलवारपेक्षा अधिक शक्तिशाली आहे”.  
 ६) शाळेला भिंती:
              शाळेला संरक्षण भिंत असले तर शाळेतील सुरक्षितता बऱ्याच प्रमाणात टिकून राहते. तसेच विद्यार्थी सुरक्षितपणे ज्ञानार्जन करू शकतात.  शाळेची सुरक्षितता राखणे ही सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. नुसत्या भिंती असून चालत नाही तर शिक्षक, मुख्याध्यापक व गावातील लोकांचा शाळाप्रती असलेली मानसिकता बदलायला हवी. शाळा विषयी आपुलकी व माझी शाळा ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे. तरच शाळेचा परिसर व शांततेला भंग पोहोचू शकत नाही व शाळा खरोखरच सुरक्षित आहे आणि मुलं सुरक्षितपणे ज्ञानार्जन करू शकतात असं म्हणता येईल.
७)एकच ध्यास ; वाचण्यास विकास:
              विद्यार्थ्यांचे भवितव्य हे त्यांनी विद्यार्थी जीवनात कमावलेल्या ज्ञानार्जनावर अवलंबून असते. हे ज्ञानार्जन त्यांनी वाचन,चिंतन व सराव यातून प्राप्त करीत असतो. 
              शालेय पुस्तकांच्या अभ्यासासोबत अवांतर वाचनाचे सवय किती महत्वाचे असते याबद्दल आपले विचार खूप परिणामकारक व प्रभावी आहेत. खरंच व्यक्ती अवांतर वाचन केल्यामुळे त्याला व्यवहार ज्ञान व वेगवेगळ्या थोर व्यक्तींचे  अनुभव शिकायला भेटते. या अनुभवातूनच व्यक्ती घडत असतो. 
              अलीकडे मुबाईल व टीव्ही या मिडीयाच्या प्रभावामुळे वरचेवर वाचन व वाचक मंडळी कमी होताना दिसून येते. यामुळे मुलं निर्बुद्ध , अविचारी व अकार्यक्षम बनत चालला आहे. ज्यांच्या घरी  मुलांना जेवढ्या जास्त luxurious (चैनीच्या) सुविधा मिळतात तेथे मुलं अभ्यासात आळशी व अकार्यक्षम बनताना दिसून येतात. याउलट जेथे सुविधांचा अभाव व गरिबी असते त्यांची मुलं अधिक होतकरू, हुशार निघतात. व ते जीवनात यशस्वी होतात. कारण त्यांना पर्याय नसतो. आपली जिद्द, मेहनत, धडपड व सराव या बळावर ते पुढे जात यश प्राप्त करतात. जर व्यक्ती परिस्थितीने कितीही गरीब असले तरी जर मनात प्रकट महत्वकांक्षा, जिद्द, मेहनत करण्याची वृत्ती असेल तर तो कितीही प्रतिकूल परिस्थितीत देखील आपला मार्ग शोधत असतो. म्हणूनच म्हणतात ना “गरज ही शोधाची जननी आहे” म्हणून. समाजात असे अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर दिसून येतात की, गरीब घरचे मुलं देखील आता चांगल्या मोठमोठ्या पदावर पोहोचत आहेत व जीवनात यश प्राप्त करत आहेत, याउलट श्रीमंतांची मुलं ज्यांच्या  येथे सुविधांचा वर्षाव असतो व त्यांना कोणत्याही बाबतीत काहीच कमतरता नसते अशी मुलं रस्त्यावर फिरताना दिसतात. म्हणून मुलांना जमेल तेवढे कमीत कमी luxurious(चैनीच्या) सुविधा व फाजील लाड करावे. सध्याच्या काळात यशस्वी होण्यासाठी short cut मार्ग कुठेच नाहीये, म्हणून त्यांना मेहनत व परिस्थतीची जाणीव करुन द्यायला हवे. त्यांना नुसत्या यशस्वी झालेल्या व्यक्तीचे जीवनचरित्र वाचण्यास देण्याऐवजी जर अपयशातून व शून्यातून वर येऊन यशस्वी झालेल्या व्यक्तीचे जीवनचरित्र वाचण्यास दिल्यास व त्यांचा आदर्श घालून दिल्यास बराच फरक पडू शकतो व ते प्रेरणादायी ठरते.
८) मुलांच्या प्रगतीसाठी:
                मुलांचे प्रगती व यश त्यांना मिळालेल्या योग्य वेळच्या योग्य मार्गदर्शनांवर अवलंबून असते. आपण पाहतो की ग्रामीण भागातील मुलं बऱ्याच वेळेस confused असतात की दहावी-बारावी नंतर काय करायच ? आपली क्षमता व कौशल्यानुसार क्षेत्र निवड न केल्यामुळे नंतर ते भविष्यात पश्चात्ताप करीत बसतात. तेव्हा सगळी वेळ निघून गेलेली असते. म्हणून पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची क्षमता व आवड ओळखून त्यांना वेळीच प्रोत्साहित केले तर तशी परिस्थिती उद्भवणार नाही. प्रत्येक वर्षी शाळेत दहावी - बारावी नंतर करिअर संदर्भात मार्गदर्शन व Seminar  चे आयोजन करावेत.
              आपण सांगितल्याप्रमाणे जर पालक स्वतःच्या मुलांच्या शिक्षण व करिअर बाबतीत जागरूक असेल तर त्यांची मुले नक्कीच हुशार व होतकरू निघतात हे वास्तव आहे. पण ग्रामीण भागात बहुतांश पालक या बाबतीत शून्य असतात. त्यांच मत असं बनलेलं असतं की शिकून कोणाला नोकऱ्या लागणार आहेत, ही नकारात्मक भावना मनात पक्की भरलेली असते. पण शिक्षण हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे साधन आहे याची त्याला काहीच जाणीव नसते. काही पालक तर आपल्या मुलांना सर्रासपणे शेतीच्या कामात राबवून घेतात. त्यामुळे मुलांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होऊन    link तुटत असते. मुलगा अर्ध्यावर शिक्षण सोडून गेले तरी त्यांना काहीच काळजी नसते. म्हणून ही परिस्थिती बदलायची असेल तर गावातील शिक्षक, सुशिक्षित पालक व यशस्वी व्यक्ती यांनी मिळून सामूहिकतेने गावात शिक्षणविषयक जागृती निर्माण करायला हवी.  शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यात सामंजस (Mutual understanding) असायला हवे. शिक्षक आपले व्यक्तिमत्त्व, आचार-विचार हे आदर्श ठेवायला हवे. कारण बहुतांश वेळेस विद्यार्थी शिक्षकांचे गुण जसेच्या तसे अनुकरण व आचरणात आणीत असतात.
९) राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती:
                  आपण मांडलेले “राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती” याविषयी विचार खूप प्रेरणादायी आहेत. सध्याच्या या धावपळीच्या युगातील परिस्थिती पाहता या विषयी अधिक जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. ही  राष्ट्रभक्ती टिकवून ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तसेच व्यक्ती राष्ट्रभक्ती असल्याचा केवळ दिखावा न करता ते अंतकरणात व आचरणात आणली पाहिजे. देशातील प्रत्येक ठिकाणची सार्वजनिक सरकारी मालमत्ता ही माझी आहे ही भावना ठेवून त्यास कसल्याही प्रकारचे नुकसान पोहोचणार नाही याची सर्वांनी काळजी हवी. देशातील जनतेवर, जवानांवर(सैनिक), साधनसामुग्रीवरती, भूभागावरती सदैव प्रेम बाळगायला हवीत. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज चे मान-सन्मान राखायला हवी. प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात न चुकता राष्ट्रगीत गायले जावेत. तरच खरी राष्ट्रभक्ती निर्माण होईल.

१०) शिक्षक आनंदी तर मुले आनंदी:
               आपण सांगितल्याप्रमाणे शिक्षकांना जर त्यांच्या सोयीनुसार शाळा मिळाली तर त्यांचे अध्यापन देखील चांगले होऊ शकते हे बर्‍याच प्रमाणात खरे आहे. पण अल्ली ग्रामीण भागातल्या शाळेतील काही शिक्षकांकडे पाहता अशी परिस्थिती दिसून येते की, त्यांना शाळा अगदी घराजवळ असेल तर त्या संधीचा ते गैरवापर करतात. उदा. जसे की ते घराकडची कामे, शेती व इतर व्यवसाय बघत शाळा करतात. त्यामुळे वाचन व शाळेतील उपस्थिती कमी होऊन आपल्या शिकवणीतून म्हणावा तेवढा पूर्ण न्याय ते विद्यार्थ्यांना देऊ शकत नाहीत. तेच जर  अशा शिक्षकांना घरापासून दूरवर असलेल्या गावी बदली झाल्यास त्यांना शाळा शिवाय दुसरीकडे लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही.
११) वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने:
                याबाबतीत आपण सांगितलेले विचार मला खूप आवडले. खरंच, ज्ञान मिळवण्याचे “वाचन” हे एक उत्तम साधन आहे. ज्याचे वाचन, चिंतन अधिक त्यांचे विचार, आत्मविश्वास व निर्णयक्षमता अधिक प्रभावी. असे असले तरी, किती वाचले यापेक्षा काय व कसे (किती आत्मसात केले) हे महत्त्वाचे. सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येते की, व्यक्ती या सोशल मीडियाला addict होऊन जास्तीत जास्त वेळ त्यावर तो  करत आहे. या वाढत्या प्रभावामुळे वाचन, वाचक मंडळी, दर्जात्मक लिखाण फार कमी होत चाललेला आहे. हे सोशल मीडियाचे फार मोठे दुष्परिणाम व शोकांतिका आहे.
             अध्यापन प्रक्रिया जर पूर्णपणे ऑनलाईन झाल्यास शालेय व महाविद्यालयीन जीवनाला अतिशय खराब दिवस येतील असे मला वाटते. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी उलट आळशी, अकार्यक्षम बनतील.
            सध्या शाळेतील ऑनलाइन संबंधित भेडसावणारी समस्या पाहता  या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने प्रत्येक शाळेत प्रशिक्षित संगणक शिक्षक पूर्णवेळ तत्त्वावर नेमावा. असे केल्याने तो शाळेला पूर्णवेळ देऊन अधिक मन लावून काम करेल.
            सध्याची देशाची परिस्थिती पाहता  ‘लोकसंख्या’ ही जलद गतीने वाढत असताना दिसून येते. ही लोकसंख्या वाढ म्हणजे देशाच्या विकासातील फार मोठी समस्या व त्रासदायक आहे. देशाची मर्यादित भूभाग क्षेत्र, मर्यादित साधनसामग्री, मर्यादित विकासाची साधने लक्षात घेता लोकसंख्या वाढीला वेळीच नियंत्रणात आणणे ही काळाची गरज आहे. व ती सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
                                                       - एस. एम. रचावाड, मु. पो.पाळज
ता. भोकर जि. नांदेड

माझे फेसबुक मित्र नाशिकचे वैभव तुपे यांनी माझ्या ई बुक चे केलेले परीक्षण आपल्यासमोर ठेवत आहे. 
पुस्तकाचे नाव : मी एक शिक्षक
लेखक : ना. सा. येवतीकर (प्राथमिक शिक्षक)
प्रकाशक : ई-साहित्य प्रतिष्ठान

शिक्षण क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या एकूणच बऱ्यावाईट घडामोडींमुळे चांगल्या शिक्षकांची जी काही घुसमट होतेय, ती घुसमट या पुस्तकातून लेखकाने नेमकेपणाने व्यक्त केली आहे. 'काय काम असते शिक्षकांना?' या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हे पुस्तक आहे. महाराष्ट्राच्या तळागाळात अगदी प्रतिकूल परिस्थितीही ज्ञानदानाचे पवित्र काम प्रामाणिकपणे करणाऱ्या शिक्षक बांधवांमधील बहुसंख्य शिक्षक आज तणावाखाली काम करत आहेत. अगदी शिक्षक म्हटले की लोकांना हसू येते, विनोद सुचतात इतकी शिक्षकांची अवस्था वाईट झाली आहे.
खरं तर मुलांना शिकवणे, चांगले संस्कार देणे हे शिक्षकांचे मुख्य काम! पण त्यासाठी शिक्षकांना वेळच मिळतांना दिसत नसल्याची परिस्थिती यंत्रणेने निर्माण करून ठेवली आहे. विशेषतः जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची अवस्था तर फारच वाईट झाली आहे.  त्यात पुन्हा आणखी नव्याने वाहू लागलेल्या 'डिजिटल' वाऱ्याची भर आता पडली आहे. संगणकाच्या युगात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे उपयुक्त असले तरी गुरुजींसाठी मात्र ही दुहेरी डोकेदुखी ठरू पाहतेय. खरं तर तंत्रज्ञानाचा वापर कमी वेळात जास्त काम व्हावे यासाठी अपेक्षित आहे, पण या डिजिटल आणि ऑनलाईनच्या नादात गुरुजींची कामे कमी होतांना दिसत नाहीत, उलट कामासाठी लागणार वेळ कमी होण्याऐवजी वाढलाय. कामाचा व्याप वाढलाय आणि त्यामुळे तणाव सुद्धा प्रचंड वाढलाय! अगदी उदाहरणच द्यायचे  झाले तर अमरावतीच्या विजय नकाशे सरांचे देता येईल. चिखलदऱ्यासारख्या अति-अतिदुर्गम भागात चांगले काम करणाऱ्या नकाशे सरांच्या शाळेला पंचायत राज समितीने भेट दिली, त्यावेळी हिशोबात तीस किलो तांदूळ कमी आढळला होता.  ही गोष्ट तशी क्षुल्लक वाटत असली तरी नकाशेंना याच कारणावरून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आणि तो तणाव सहन न होऊन त्यांनी शाळेतच आत्महत्या केली. हे फक्त उदाहरण आहे. अशा अजूनही काही शिक्षक बांधवांनी यंत्रणेच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारलाय! कुठे हिशोबात तांदूळ कमी भरला म्हणून, कुठे शाळेचे बांधकाम नीट झाले नाही म्हणून तर कुठे बांधकामाचा हिशोब नीट जुळत नाही म्हणून! शिक्षक आत्महत्यांची अशी कितीतरी कारणे देता येतील, पण यातला एकही उदाहरणात शिक्षकांनी चांगले शिकवले नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली आणि म्हणून आत्महत्या झाली असे कुठेही दिसत नाही. सगळीच कारणे खरं तर 'नॉन-टिचिंग' या सदरात मोडणारी! अशा अशैक्षणिक कारणांमुळे शिक्षकांना आत्महत्या करावी लागत असेल तर तो यंत्रणेचा तो पराभव नाही का? निवडणूक आणि जनगणना याव्यतिरिक्त कुठलीही अशैक्षणिक कामे शिक्षकांना दिली जात नाहीत असा दावा प्रशासन करत असले तरी तो सपशेल चुकीचा आहे. खरं तर खिळ्यापासून विळ्यापर्यंत आणि अगदी झाडुपासून पोषण आहारातल्या लाडूपर्यंत सगळी कामे हाकत गुरुजी कधीच वैतागून गेलाय!
संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेवर काम करणारा प्रत्येक शिक्षक सध्या  यातल्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तणावाखाली आहे. उघड कुणी बोलत नसल्यामुळे सगळे आलबेल असल्याची वरकरणी बतावणी सध्या बेमालूमपणे सुरु आहे. मात्र प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीतले एकूणच शैक्षणिक वातावरण सध्या प्रचंड प्रदूषित आहे एवढे नक्की! असे असले तरी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांमुळे शाळा मात्र आजही विनातक्रार व्यवस्थित सुरु आहेत. शिक्षकांचे एकूणच काम आणि त्यासाठी चाललेली शिक्षकांची प्रामाणिक धडपड यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न येवतीकर यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. प्राथमिक शिक्षण क्षेत्रात सध्या काम करणाऱ्या आणि या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या प्रत्येकाने, विशेषतः तरुण वर्गाने किमान एकदा तरी जरूर वाचावे असे हे पुस्तक 'ई साहित्य'च्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. 
- वैभव तुपे, नाशिक

नासा येवतीकर लिखित ई बुक

*शाळा आणि शिक्षक*

https://drive.google.com/file/d/1jTECtl3fiFmh-vO_ZJldspQj7kOHW0Vm/view?usp=drivesdk

वरील लिंकवर किंवा खालील pdf मध्ये अगदी मोफत वाचन करता येईल आणि download देखील करता येईल.


*पुस्तक परिचय*

नैतिक मूल्ये सांगणारा कथासंग्रह कुलदीपक
कथा लिहिण्यासाठी एक छोटीशी घटना देखील पुरेशी ठरते. आपले अनुभव आणि स्वतःजवळ असलेल्या शब्दसंपत्ती यांच्या बळावर लेखक कथेला वळणदार रंग देत असतात. अश्याच छोट्या छोट्या घटना बघून या कथासंग्रहात कथा लिहिण्याचे काम नासा येवतीकर यांनी केले आहे. त्यांच्या या पुस्तकाविषयी ओळख या लेखातून देण्याचा प्रयत्न केले आहे.
नासा येवतीकर हे धर्माबाद येथील कन्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. त्यांनी यापूर्वी काव्यांगण या नवोपक्रमात शाळेच्या फळ्यावर वेगवेगळ्या कवींच्या ' रोज एक कविता ' हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवला होता. हा उपक्रम मुलांमध्ये  कवितेची आवड निर्माण करणारा आहे. आमचे भावी वाचक, भावी साहित्यिक ,भावी रसिक हे  आजचे बालवाचक आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कथा, कवितांची गोडी निर्माण करणे अत्यावश्यक आहे, असे त्यांचे मत आहे.
ना.सा. येवतीकर हे स्वतः स्तंभलेखक असून महाराष्ट्रातील बहुसंख्य वर्तमानपत्रात त्यांचे लेखन प्रकाशित होत असते. त्यांचा शिक्षणक्षेत्र लेखनावर विशेष भर आहे.
लाॅकडाऊनच्या काळात त्यांनी सोशल मीडियाद्वारे कथालेखन, पत्रलेखन, कवितालेखन, ऑडिओ वगैरे वगैरे अनेक उपक्रम राबवलेत ! यामुळे बर्‍याच नवोदितांना साहित्य क्षेत्रात लेखन करण्याची संधी मिळाली. आज ना. सा. येवतीकर हे साहित्यिकांच्या यादीत सामावले आहेत. त्यांचे कुलदीपक कथासंग्रह हे नववे ई पुस्तक आहे. यापूर्वी त्यांचे वैचारिक लेखसंग्रह संवेदना, जागृती, मी एक शिक्षक, शाळा आणि शिक्षक, रोज सोनियाचा दिनू, हिंदू सण, हरवलेले डोळे कथासंग्रह आणि सारीपाट कवितासंग्रह असे एकूण आठ ई बुक प्रकाशित झाले आहेत. लेखक  'शब्द हीच संपत्ती 'मानणारे आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे
मी होतो एक साधा माणूस
आज नासा कवी बनलो
शब्दाने दिली खूप संपत्ती
हेच साऱ्यांना सांगत गेलो.
शिक्षक आणि लेखक ही भूमिका एकमेकांना पूरक असते. लेखनामुळे, सकारात्मक विचारशक्ती वृद्धिंगत दृष्टीकोन बदलतो, विस्तारित होतो. कल्पनेचा उपयोग, शब्दांचा उपयोग शिकवण्यात होतो.
ई -साहित्य हे सुप्रसिद्ध प्रकाशन असून त्यांचे काम अफाट आहे. आमच्याकरिता ई -साहित्य प्रकाशन नेहमी प्रेरणा देणारी आहे.
कुलदीपक पुस्तकातील प्रत्येक कथा ही नीतीमूल्य जपणारी, इतरांना मदत करायला शिकविणारी, संस्कारी, सुस्वभावी आदर्श अशी आहे .
'रमेशचे शौर्य'  कथेत रमेश पोहण्याची कला शिकल्यामुळे आपल्या दोन मित्रांना पूरातून वाचवतो. शौर्य आणि धैर्याकरिता त्याला पुरस्कार मिळतो. नामा अनाथ असला तरी विनयशील, दयाळू, कष्टाळू स्वभावामुळे गावातील लोकांची मन जिंकून घेतो. त्यामुळे बिनविरोध सरपंच होतो.
'सर्कस ' या कथेत लहान मुलांच्या आवडत्या सर्कसमधील गमती जमती खूपच सुंदररित्या मांडल्या आहेत. ही कथा वाचतांना लहानपणीच्या अनेक आठवणींना उजाळा मिळतो.
'फेसबुक फ्रेंड ' या कथेमध्ये फेसबुकवर मित्र ऑनलाईन कसे फसतात ? याची कहाणी मांडली आहे. माणसाला भुलवून टाकणाऱ्या अनेक जाहिराती सध्या फेसबुकवर बघायला मिळतात. त्यापासून सावध राहण्याचा सल्ला या कथेतून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसून येतो. सैन्यात वीर मरण झालेल्या एका शहिदांच्या कुटुंबाची कहाणी 'व्यर्थ न हो बलिदान ' या कथेत आहे. माझ्यासोबत आई असते असे म्हणण्यापेक्षा मी आई सोबत राहतो हे सांगणारी कथा म्हणजे 'आईचे घर ' आहे. कुठलीही वस्तू  चोरीला गेल्यानंतर त्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली तरी ती वस्तू सहजासहजी आपल्याला मिळत नाही, त्यासाठी काय खटाटोप करावा लागतो याचा अनुभव 'सायकल गेली चोरीला ' या कथेत विषद केला आहे. 'रेल्वेतील शाळेत' रेल्वेत काही बाही विक्री करणाऱ्या मुलांना गुरुजी शाळेचा लळा कसा लावतात शाळाबाह्य असलेल्या मुलाला शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणतात ? हे वाचनीय आहे. 'गावाची आठवण' मध्ये गावाचे सुंदर चित्रण आहे. मित्राने संकटकाळात मदत केली तर त्याची परतफेड मित्र कसा करतो हे 'परत फेड ' ही कथा सांगते .
आजकाल लहान मुलांमध्ये मोबाईलवर गेम खेळण्याची फार वाईट सवय लागली आहे. 'ब्लू व्हेल 'कथेत मोबाईल वरील गेम खेळून स्वतः चे जीवन संपवितो ही भयानकता सांगितली आहे. 'कुलदीपक '..मुलगाच पाहिजे म्हणून हट्ट करणाऱ्या सासूबाईची ही मुखपृष्ठ कथा अत्यंत वाचनीय आहे. आनंदाची मैत्री, टोकाचे पाऊल, गोष्ट एका आंबेगावाची, भिजवणारा पाऊस, पाच रुपये अशा छान छान कथा यात आहेत.
त्यांनी या कथासंग्रहमध्ये भ्रष्टाचार, मोबाईलवरील खेळांच्या दुष्परिणामावर वाचकांना सजग केले असून मातेची जबाबदारी,
बालकामगारांच्या शिक्षणावर प्रकाश टाकलाय.
या पुस्तकातील कथांमधून जीवनातील नैतिक मूल्ये, चारित्र्य, सद्गुण, सकारात्मकता हे संस्कार मोती सहज मिळतात. एकूणच या कथासंग्रहातील एकूण 17 कथा ह्या मुलांसाठी संस्कारक्षम असून सर्वच वयोगटातील वाचकांसाठी वाचनीय असून वाचल्यावर मानसिक समाधान देणारे आहेत. सदरील कथासंग्रह ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विनामूल्य उपलब्ध आहे. लेखकांशी संपर्क करून सदरील पुस्तकांची pdf मागविता येऊ शकते. या 'कुलदीपक' नंतर  'कुलज्योती ' नावाचे पुस्तक सरांनी प्रकाशित करावे असे मी सुचवते आणि पुढील लेखनास शुभेच्छा देते. 

पुस्तकाचे नाव - कुलदीपक ई कथासंग्रह
लेखकाचे नाव :- नासा येवतीकर, 9423625769
प्रकाशन दिनांक :- 19 फेब्रुवारी
प्रकाशक :- ई साहित्य प्रकाशन
किंमत :- विनामूल्य लिंक http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/kuldeepak_nasa_yeotikar.pdf
पृष्ठे :- 119

पुस्तक परिचय 
मीना खोंड, हैद्राबाद, 7799564212
*'' हिंदू सणांची परिपूर्ण माहिती देणारे पुस्तक "*

 नासा येवतीकर सर यांचे आठवे पुस्तक 'हिंदू सण' वर आधारित ई प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित आज होत आहे. यापूर्वी त्यांचे प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक मी एक शिक्षक, जागृती, शाळा आणि शिक्षक, संवेदना, रोज सोनियांचा दिनू हे वैचारिक, सारिपाट कवितासंग्रह आणि हरवलेले डोळे कथासंग्रह ई बुकच्या स्वरूपात प्रसिद्ध झाले आहेत. आज वटपौर्णिमा या सणानिमित्ताने नासा येवतीकर यांचे आठवे ई बुक हिंदू सण प्रकाशित होत आहे.
        एकच ध्यास , हिंदू सणाचा प्रचार, प्रसार 'हिंदु सण' हे छान व आकर्षक पुस्तक आहे. यात हिंदू धर्मातील सणाची निवड करण्यात आली. मुखपृष्ठ देखील छान असून यात दिवाळीला आपण आपल्या घरी रांगोळी टाकतो ती आहे यात पेटते दिवे आहे; या रांगोळीची रंगसंगती छान आहे. या पुस्तकात एकूण एकोणवीस लेख वाचन करयला मिळेल. प्रत्येक सणाची माहिती व तो सण कसा साजरा करावा, आपण सर्वजण पारंपरिक पध्दती ने सण साजरे करतो. सद्याची नवीन पिढी हिंदू सण विसरत चालले आहे, पण हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे. यात लिहिलेली माहीती कंटाळवाणी वाटणार नाही याची दक्षता लेखक नासा येवतीकर यांनी घेतली आहे. मला आवडलेल्या काही उल्लेखनीय लेखाची माहिती देण्याचा प्रयत्न करतो,  
          वटपौर्णिमा या सणाविषयी यात अश्वपती नावाचा राजा होता आणि त्याची मुलगी सावित्री याने अंध राजाचा मुलगा सत्यवान राजकुमार सोबत लग्न करण्याचे ठरवले. त्याचे राज्य नव्हते ते जंगलात राहत होते आणि सत्यवान हा एक वर्ष जगेल अशी शाश्वती होती तर हे सावित्रीने खर ठरू दिले नाही, पवनपुत्र हनुमान याच्या विविध हालचालीची माहिती दिले आहे, आणखी एक लेख जो गुरूची महती सांगणारा लेख पण समाविष्ट आहे. चित्रकार श्री विनायक काकूळते यांनी आपल्या हातानी फलक लेखन केलेली जिवंतपणा असलेली चित्र यात घेण्यात आली आहे. नासा सरांनी ही संपूर्ण माहिती आपल्या अनुभवातून व काही इंटरनेटचा वापर करून केली असे मनोगतामध्ये व्यक्त केलेले आढळून आले. प्रत्येक वाचकाने आवर्जून वाचण्यासारखे आहे. या लेख संग्रहातील अनेक लेख नवीन आहे. विद्यार्थी, पालक, वाचक यांना संदर्भ म्हणून हे ई बुक नक्की उपयोगी पडेल.
         हे पुस्तक शाळेत, घरी, मित्रांना शाळेतील मुलांसाठी व एखाद्याला काही कार्यक्रमानिमित्ताने भेट देण्यासारखे हे आहे. सदर पुस्तक pdf स्वरूपात मोफत पाठविल्या जाईल. अधिक माहिती आणि पुस्तक मागविण्यासाठी नासा येवतीकर यांच्या 9423625769 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावे.  "हिंदू सण" हे पुस्तक आपल्या वाचतांना आपणांस आनंद मिळेल अशी मला खात्री आहे. नासा येवतीकर सरांच्या आगामी लेखनास अनंत शुभेच्छा !!!

पुस्तकाचे नाव - हिंदू सण
लेखक- नासा येवतीकर (विषय शिक्षक)
प्रकाशन- ई साहित्य प्रतिष्ठान 
चित्रकार - विनायक काकुळते सिन्नर 

         शब्दांकन 
श्री.सुंदरसिंग साबळे ( स. शि.)
जि.प. व. प्रा.शाळा सिलेगाव
 ता. गोरेगाव, जि. गोंदिया 
 मो.क्र. :- 9545254856

पुस्तक परिचय

विविध विषयांना स्पर्श करणारा काव्यसंग्रह - सारीपाट
शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे कवी नासा येवतीकर यांनी "सारीपाट" या शीर्षकाखाली वेगवेगळ्या विषयांवर आपल्या भावना काव्य रुपाने व्यक्त केले आहेत. ठाणे येथील ई-साहित्य प्रतिष्ठान या प्रकाशनाने हा ई काव्यसंग्रह 01 मे म्हणजे महाराष्ट्र दिनी प्रसिद्ध केला आहे. मुखपृष्ठावर आपल्या देशातील प्राचीन खेळ सारीपाट यांचे चित्र रेखाटले आहे.
   नासा येवतीकर यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह असुन यापूर्वी वैचारिक मी एक शिक्षक, जागृती, शाळा आणि शिक्षक, संवेदना, कथासंग्रह हरवलेले डोळे असे एकूण पाच ई बुक प्रकाशित केले आहेत. शालेय जीवन जगत असताना त्यांना लिखाणात रुची निर्माण होऊन साहित्याची गोडी लागली. त्यांचा हा कविता लिखाण करण्याचा छंद पुढे कवितासंग्रहाच्या माध्यमातून प्रकाशित केले आहेत. सारीपाट या कवितासंग्रहात एकुण ९० कविता असून ग्रामीण जीवन, शाळा, तंत्रज्ञान, व्यसनमुक्ती, सण-उत्सव, पर्यावरण संवर्धन, नीतीमूल्य, मतदान, संस्कृती व संस्कार या विषयावर आधारित आहेत.
    यावरुन कवी मनाचे सखोल निरीक्षण व अभ्यासाचे दर्शन आपल्याला होते. कवितेची भाषा शैली सहज सोपी व सुलभ अशी असून वाचकांना सहज अर्थबोध होणारी असल्यामुळे सारीपाट वाचताना आनंद मिळतोच पण काही कवितेतील प्रत्येक वाक्यात आपणच असल्याचा भास निर्माण करुन देते.
  ई - साहित्य प्रतिष्ठानचे सुनील सामंत व अरुण देशपांडे यांनी  कवीबद्दल प्रस्तावनेतून यथार्थ वर्णन केले आहे. प्रसिद्ध बालसाहित्यिक व कवी अरुण वि. देशपांडे यांची प्रस्तावना लाभली आहे.
शेतात राबणारा शेतकरी राजा व त्यास साथ देणारा बळीराजा (बैल) भर पावसात व उन्हात राबत असतो. शेतकऱ्याला मदत करतो. काबाडकष्ठाने शेती फुलवितो व आपण आनंदाने खात असतो. पोळा या कवितेत ते म्हणतात

वर्षभरात राबून राबून
बळीराजाला देतो साथ
शेतात काम करून
देतो मदतीचा हात....

कुटुंबातील संवाद संपुष्टात येत आहेत. संवादातून भावना जडल्या जातात व मैत्रीने, सलोख्याने, प्रेमाने जिव्हाळा तयार होतोय. कुटुंबाच्या मदतीने पाल्यावर चांगले संस्कार केले जातात. यातून कुटुंब संवर्धन करण्यासाठी त्यांनी संदेश दिला आहे. 

हल्ली होतच नाही
प्रेमाचा संवाद कुटुंबात
सगळेच व्यस्त आहेत
आपाआपल्या कामात....

आराधना करणारे आपले हात, याच हाताने देवाप्रमाणे आपल्या आईवडिलांची निस्वार्थ सेवा करा. देव देवालयात नसून आपल्या कर्म कार्यात आहे. पंढरपूर काशी हे आपल्या घरातील वयोवृद्ध आई-वडीलच आहेत. यांचीच सेवा मनोभावे करावे हे आपल्या काव्यातून सांगतात

आई-बाबाची मनोभावे सेवा
हाच आपला खरा धर्म आहे
निस्वार्थ भावनेने केलेले काम
हेच आपले खरेखुरे कर्म आहे....

या हिरवळीवर आनंदाने पक्षी गाणी गातात. निळे आकाश, शीतल गारवा, फुलांचा दरवळणारा सुगंध, हिरवे हिरवे वृक्ष अशा प्रकारे निसर्गाचं वर्णन केले आहे.

वर निळे आकाश
खाली निळे पाणी
काठावरती झाडे
पक्षी गातात गाणी....

लालपरी कवितेत ते म्हणतात, 
गावोगावी जाऊन भेटणारी
सर्वांची आवडती लाडकी
बघता बघता पहा लालपरी
झाली एकाहत्तर वर्षांची....

अनेकांना सवलती देणारी ही लालपरी ( बस) आपणास प्रत्येक ऋतुंमध्ये सुखरूप नेऊन पोहचविते. याच्या ७१ व्या वाढदिवस साजरा होत असतांना, ते काव्यातून शुभेच्छा देतात. वाड्यावस्तीतून, खेड्यापाड्यातून, दरीखोऱ्यातून सुखरूप प्रवासी नेणारी, वेळेवर शाळेत विद्यार्थ्यांना पोहचविणारी या लालपरीला चांगले दिवस यावेत अशी प्रार्थना व्यक्त केली आहे.

दि.४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त या दिनाचे महत्त्व आपल्या कवीतेतून सांगतात.

तंबाखू खाल्याने वाटते
थोडी वेळेची मजा
सुखी संसाराला मग
आजीवन मिळते सजा....

सुखी संसाराची राखरांगोळी या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होत आहे. परिसरात थुंकणे, सिगारेट ओढत बसणे हे चुकीचे आहे. यामुळे इतरांना आजार जडला आहे. तंबाखू चोळू नका जीवनाला चुना लाऊ नका. हा जन्म पुन्हा येणार नाही. असे ते आपल्या काव्यातून सांगतात. 

भारताच्या स्वातंत्र्यासाठी
ज्यांनी दिली प्राणाची आहुती
भगतसिंग सुखदेव राजगुरू
यांच्या विचाराने झाली क्रांती....

आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले. त्यांना विसरून चालणार नाही. थोर क्रांतिकारक यांना वंदन करून यांची यशोगाथा पुढील पिढीला स्मरणात ठेवण्यासाठी यांचे स्वातंत्र्य दिनी वंदन करावे. कवी या कवितेत शुरविरांचे स्वातंत्र्याविषयी असलेले धडपड, त्याग याचे वर्णन केले आहे.

तोच खरा शिक्षक या कवितेत

मुलांच्या हृदयात जाऊन
त्यांच्या संवेदना जाणून
घेऊन जो शिकतो
तोच खरा शिक्षक....

मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जो प्रयत्नशील असतो. संवेदना जाणुन घेतो, योग्य दिशा प्राप्त करून देतो. मुलांच्या भावनांचा सखोल विचार करून ज्ञानार्जनाचे पवित्र कार्य करणाराच खरा शिक्षक होय. त्यांच्या या ज्ञानरुपी कार्याला ते काव्यातून वंदन करतात.

पुस्तक हे ज्ञानाचे भांडार आहे. पुस्तकाशी मैत्री करावे, प्रेम करावे, यातील ज्ञानातूनच आपले स्वप्न साकार होतात. आपल्या ज्ञानाची कक्षा रुंदावते. पुस्तकासाठी घरात एक ग्रंथालय असावा. ही कल्पना कवी या कवितेतून मांडले आहे.

पुस्तक म्हणजे ज्ञानाचा झरा
पुस्तक म्हणजे मित्र खरा....

वरुण राजाला उद्देशून शेतकऱ्यांची व्यथा या कवितेत कवीने मांडली आहे.

विश्वास तुझ्यावर ठेवून
केलो फार मोठी चूक
पश्र्चाताप करतो आता
मिळत नाही बघ सुख....

पाऊसाच्या विश्वासावरच शेतकरी काबाडकष्ट करीत असतो. दुष्काळ पडला तेव्हा आपला शेतकरी जगूच शकत नाही. कर्जबाजारी  होऊन आत्महत्या करुन घेतो.

पुस्तकाचे नाव सारीपाट हे त्यांच्या या काव्यातून व्यक्त होते. 

जीवन हे सारीपाट आहे
त्यात सुख आणि दुःख आहे
जीवनात सर्वस्व हवे हवे
दुखःचा ससेमिरा नको आहे...

जीवन म्हणजे दुःखाचे डोंगर आहे. यातून सुखाचा क्षणांचा शोध घेता आलं पाहिजे. दु:खाशिवाय सुखाचे महत्व कळणार नाही. जीवन म्हणजे एक सारीपाट आहे. ज्यात अनेक प्रसंग अनुभवास येतात. त्या सर्व भावना त्यांनी कवितेच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. 
अशा प्रकारे कवी नासा येवतीकर यांच्या कविता आपल्या मनाला कधी अस्वस्थ करतात तर कधी आनंद देतात तर कधी आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतात. यातील प्रत्येक कविता ही हृदयस्पर्शी असून कवीमनाचा हळवेपणा, संवेदनशीलपणा या काव्यसंग्रहातून प्रतिबिंबित होतो. त्या दृष्टीने या कविता खूपच वाचनीय आहेत. नासा येवतीकर यांच्या या पहिल्याच काव्यसंग्रहास खूप खूप शुभेच्छा !

पुस्तकाचे नाव :- सारीपाट काव्यसंग्रह
कवीचे नाव :- नासा येवतीकर, 9423625769
प्रकाशन :- ई साहित्य प्रतिष्ठान, ठाणे

महादेव शरणप्पा खळुरे
८७९६६६५५५५

Wednesday, 6 March 2024

जागतिक महिला दिन ( World Women's day )

जागतिक महिला दिनानिमित्त ......
कर्तृत्ववान महिलांची संघर्षगाथा 

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बिवी

देशातील कोणत्याही उच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश, इतकच नाही तर आशिया खंडातील कोणत्याही देशाच्या सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीश होणाऱ्या पहिल्या महिला, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य म्हणून काम केले आणि तामिळनाडूच्या राज्यपाल म्हणून स्वत:ची छाप उमटवलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे न्यायाधिश फातिमा बिवी. त्या हुशार होत्या आणि त्यांच्या नावावर अनेक विक्रम देखील होते. त्यांच्या जीवनाकडे पाहिले तर दिसून येते की, इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिकुल परिस्थितीत देखील कसे यश मिळवता येते. जगतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या जीवनावर टाकलेला एक प्रकाश.
फातिमा बीवी यांचे पूर्ण नाव मीरा साहिब फातिमा बीवी असे आहे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1927 रोजी रोजी केरळ मधल्या पतनमतिट्टा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मीर साहिब, तर आईचे नाव खदीजा बीबी असे होते.
त्यांचे शालेय शिक्षण पथनामथिट्टा येथील कॅथलिक हायस्कूल येथे झाले. त्यानंतर तिरुअनंतपुरमच्या विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतली. पुढे तिरुवनंतपुरम या शहरातील लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. पदवीच्या पहिल्या वर्षी तिच्या वर्गातल्या फक्त पाच मुलींपैकी ती एक होती. दुसऱ्या वर्षी फातिमासह फक्त तीन मुली उरल्या होत्या. मात्र, त्यावेळी कोणालाच माहीत नव्हते की, फातिमा नावाची ही सामान्य मुलगी भविष्यात इतिहास घडवेल.
6 ऑक्टोंबर 1989 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून निवड झाली. भारतातून एवढ्या मोठ्या पदावर जाणाऱ्या त्या पहिल्या पहिल्या महिला होत्या. 29 एप्रिल 1992 रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या. दरम्यान त्यांनी 1997 ते 2001 या काळात तमिळनाडूच्या राज्यपाल म्हणून देखील काम पाहिलं. 
न्यायदानासारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात महिलांना इतका सहज आणि मुक्त प्रवेश नव्हता. त्या काळात फातिमा बिवी यांनी पुरुषी वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात महिलांसाठी संधीची कवाडं उघडली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार आणि अत्यंत बुध्दीमान असलेल्या फातिमा बिवी यांनी एलएलबीमध्ये विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकावले होते. १९५० मध्ये कोल्लम जिल्हा न्यायालयातून फातिमा बिवी यांनी त्यांच्या कायदा क्षेत्रातील करियरला सुरुवात केली. फातिमा बिवी यांची प्रखर बुध्दीमत्ता बघून त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात करियर करावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. आपल्या वडिलांचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. 1950 मध्ये बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. त्या वेळी या परीक्षेत अव्वल ठरणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात फातिमा यांनी वकील म्हणून नोंदणी केली आणि केरळच्या कनिष्ठ न्यायव्यवस्थेत त्यांची प्रॅक्टिस सुरू केली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यापूर्वी फातिमा बीबी न्यायिक सेवांमध्ये कार्यरत होत्या.
14 नोव्हेंबर 1950 रोजी वकील म्हणून त्यांनी काम सुरू केलं. मे 1958 मध्ये तिची केरळ सब-ऑर्डिनेट ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये मुन्सिफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1968 मध्ये त्यांची सबऑर्डिनेट जज म्हणून आणि 1972 मध्ये मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून, 1974 मध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली. 1980 मध्ये प्राप्तिकर अपील न्यायाधिकरणाच्या न्यायिक सदस्य आणि 8 एप्रिल 1983 रोजी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 06 ऑक्टोबर 1989 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 24 एप्रिल 1998 रोजी त्या निवृत्त झाल्या.
भारताचे तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा हे फातिमा बिवी यांच्याविषयी म्हणाले, "संविधान आणि कायद्यांच्या कामकाजाचा त्यांचा अनुभव आणि अंतर्दृष्टी ही मौल्यवान संपत्ती आहे."
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतरही फातिमा बीबी या तामिळनाडूच्या राज्यपाल होत्या. 25 जानेवारी 1997 मध्ये तमिळनाडूच्या राज्यलपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 
आपल्या एका मुलाखती दरम्यान फातिमा बीवी यांनी म्हटलं होतं की, सध्या बार आणि बेंच या दोन्ही ठिकाणी अनेक महिला आहेत. पण त्यांचा सहभाग कमी आहे. त्यांचे प्रतिनिधित्व पुरुषांच्या बरोबरीचे नाही. महिलांनी हे क्षेत्र उशिरा निवडल्याचेही एक मोठं कारण त्यामागे आहे. महिलांना न्यायव्यवस्थेत समान प्रतिनिधित्व मिळण्यासाठी वेळ लागेल.
फातिमा यांनी 'द वीक'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, न्यायाधीशांच्या श्रेणीत महिलांची संख्या वाढवण्याची गरज आहे आणि उच्च न्यायव्यवस्थेत महिलांची संख्या वाढवण्यासाठी आरक्षणाचाही विचार करणे आवश्यक आहे.
ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गौरवशाली कार्यकाळात न्यायमूर्ती फातिमा बीवी अतिशय संयमी आणि नेहमी संतुलित होत्या. ती जेव्हा जेव्हा कोणत्याही मुद्द्यावर निर्णय घ्यायला बसायची तेव्हा त्या केसशी संबंधित प्रत्येक लहान-मोठी गोष्ट तिला माहीत असायची. त्या खटल्याचा संपूर्ण इतिहास वाचून ती कोर्टात येत असे.
भारतात ज्या काळात पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा होता, त्या काळात फातिमा यांनी न्यायाधीश होण्याचं स्वप्न पाहिलं होते. जे त्यांनी पूर्ण देखील केलं. 1950 रोजी भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला महिला न्यायाधीश मिळण्यासाठी 39 वर्षांचा कालावधी लागला. 39 वर्षांनंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयात फातिमा बीवी यांना पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून सन्मान मिळाला.
फातिमा बिवी यांच्या जीवनात काही वादग्रस्त निर्णय देखील झाले. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला क्लीन चिट दिल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. त्यामुळे केंद्र सरकारने देखील रोष व्यक्त केला. दरम्यान त्याच वेळी तत्कालीन केंद्रीय कायदा मंत्री अरुण जेटली यांनी त्यांचा राजीनामा देखील मागितला होता. 
त्यानंतरच्या निवडणुकांनंतर जयललिता यांचे विधानसभेतील बहुमत स्वीकारल्याच्या वादग्रस्त परिस्थितीत आणि करुणानिधी ज्यांनी त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती, यांच्या अटकेमुळे पुन्हा एकदा वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर मात्र फातिमा यांनी त्यांचे पद सोडले. जयललिता यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाचा बचाव केला. तामिळनाडूच्या तत्कालीन राज्यपाल फातिमा बीवी यांनी 14 मे 2001 रोजी जयललिता यांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. 
केंद्रीय मंत्रिमंडळाने आपल्या घटनात्मक दायित्वाचे पालन न केल्यामुळे राज्यपालांना परत बोलावण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे करण्याचा निर्णय घेतल्यानंतर फातिमा बीवी यांनी राजीनामा सादर केला. माजी मुख्यमंत्री, एम. करुणानिधी आणि दोन केंद्रीय मंत्री, मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांच्या अटकेनंतरच्या घटनाक्रमाचे स्वतंत्र आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन न केल्यामुळे केंद्र सुश्री फातिमा बीवी यांच्यावर नाराज होते. आंध्र प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल डॉ. सी. रंगराजन यांनी त्यांच्या राजीनाम्यानंतर तामिळनाडूचे कार्यकारी राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला. राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी मद्रास विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून देखील काम पाहिलं. त्याचबरोबर त्यांनी केरळ मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या  सदस्य म्हणूनही काम केले होते.
देशभरातील महिलांसाठी फातिमा बीवी या आदर्श राहिल्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या प्रकरणात निकाल दिला. राज्याच्या राज्यपाल या नात्याने त्यांनी राजीव गांधी हत्या प्रकरणातील चार दोषी कैद्यांनी दाखल केलेला दयेचा अर्ज फेटाळला. कैद्यांनी राज्यपालांकडे दयेचे अर्ज पाठवले होते, ज्यात तिला घटनेच्या कलम १६१ (माफी देण्याचा राज्यपालांचा अधिकार) अधिकार वापरण्याची विनंती केली होती.
2018 साली 'स्क्रोल' वेबसाईटशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, "महिलांसाठी बंद असलेलं दार मी उघडलं. न्यायव्यवस्थेच्या उच्च स्तरावर महिला प्रतिनिधित्त्वाची संख्या फारच वाईट आहे. भारतातल्या एकूण लोकसंख्येत निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. मग त्यानुसार भारतीय न्यायव्यवस्थेत निम्म्या जागा महिलांसाठी का नाहीत?" असा सवाल त्या करतात.
गेल्या 71 वर्षांचा विचार केला तर 256 न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात निवडले गेले आणि त्यात केवळ 11 म्हणजे 4.2 टक्के महिला न्यायाधीशांची निवड झालीय. सर्वोच्च न्यायालयात सध्या असलेल्या 34 न्यायाधीशांमध्ये केवळ चार महिला न्यायाधीश आहेत. एकाचवेळी चार महिला न्यायाधीश असण्याचा खरंतर हा विक्रमच आहे. तर भारतातील विविध राज्यांमधील एकूण 25 उच्च न्यायालयांमध्ये 677 न्यायाधीशांपैकी 81 महिला न्यायाधीश आहेत. या 25 पैकी चार उच्च न्यायालयांमध्ये एकही महिला न्यायाधीश नाही. यूकेमध्ये 32 टक्के महिला न्यायाधीश आहेत आणि अमेरिकेत 34 टक्के महिला न्यायाधीश आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयात तीन महिला न्यायाधीश आहेत म्हणजेच एकूण संख्येच्या 15 ते 20 टक्के.
गेल्या डिसेंबरमध्ये भारताचे अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की, लैंगिक अत्याचारासंबंधी खटल्यांमध्ये अधिक समतोल साधणारा विचार करण्यासाठी अधिकाधिक महिला न्यायाधीशांची निवड होणं आवश्यक आहे.
सन १९९० मध्ये फातिमा बिवी यांना डी. लिट आणि महिला शिरोमणी सारखे सन्माननीय पुरस्कार मिळाले. त्यांना भारत ज्योती पुरस्कार आणि यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल (USIBC) जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. 2023 मध्ये त्यांना केरळ प्रभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, जो केरळ सरकारने दिलेला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे.
भारताच्या न्यायव्यवस्थेत लिंगभेदाच्या पलिकडे जाऊन बुध्दीमत्ता, अनुभवाच्या जोरावर आपला ठसा उमटवणाऱ्या आणि महिलांना या क्षेत्राची दारं खुली करणाऱ्या फातिमा बिवी यांचं नाव अजरामर झालं आहे. फातिमा बीवी यांचे 23 नोव्हेंबर 2023 रोजी वयाच्या 96 व्या वर्षी केरळमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यावेळी केरळचे तत्कालीन आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी म्हटलं की, फातिमा बीवी या एक बहाद्दुर महिला होत्या. त्यांच्या नावावर आजवर कित्येक रेकॉर्ड नोंदवण्यात आलेत. त्यांनी आपल्या जगण्यातून दाखवून दिलं आहे की, दृढ इच्छाशक्तीवरुन कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते. आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन .....!

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलन करण्यात आले आहे. )

संकलन - नासा येवतीकर, स्तंभलेखक
9423625769

 ---------------------------------------------
राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मूर्मू 

 कठोर परिश्रमातून पुढे आलेली माणसे समजूतदार असतात त्यांच्या जाणिवा प्रगल्भ झालेल्या असतात, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात मानाची पदे लाभूनही काही माणसं साधी, सरळ मार्गी जमिनीवर पाय ठेवून व्यवस्थित चालणारी असतात. कसल्याही पद्धतीचा अहंकार नाही. साधी राहणी व उच्च विचारसरणी असते, नेहमी समाजाचं कल्याण व्हावं अशी अपेक्षा ठेवणारे व्यक्ती समाजात मोठी होत असतात. सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या  देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्याचा लेखाजोखा या लेखात घ्यायचा आहे.. त्यानिमित्ताने केलेला हा लेखन प्रपंच..... 
भविष्याचा अचूक वेध घेत वाटचाल करणाऱ्या व्यक्ती बोटावर मोजण्या इतक्याच असतात. अशा व्यक्तीमध्ये अग्रणीय नाव असणारे व्यक्तिमत्व म्हणजे उपेरबेडच्या संघर्ष कन्या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मूर्मू ह्या आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश प्रजासत्ताक झाला आणि प्रजेच्या हाती सत्ता सुरू झाली त्यामुळे राष्ट्रपतीपद उदयास आले, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मूर्मू या कर्तुत्वान महिला आहेत. काही माणसं स्व कर्तृत्वावर मोठी झाली आहेत. त्यांचा जीवन प्रवास खडतर होता, संघर्षाच्या आणि संकटाच्या वाटा त्यांच्यासाठी काटेरी होत्या, नेहमी त्यांची सत्वपरीक्षा घेत होत्या, तरीही या संघर्ष कन्येने संपूर्ण संकटावर मात केली, प्रचंड ध्येयवाद, दुर्दम्य इच्छा शक्ती, अथक परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर त्यांनी मोठी झेप घेतली आणि त्या देशाच्या राष्ट्रपती झाल्या. संघर्षाच्या वाटेवर चालून त्यांनी फुलाच्या पायघड्या तयार केल्या. त्यामुळे त्यांचा सुगंध सर्वत्र आज दरवळत आहे. हे मला अभिमानाने सांगावे वाटते, ही गोष्ट आपल्या तरुण-तरुणींना प्रेरणादायी ठरली आहे, संकटाची मालिका त्यांच्यावर येऊन घरातील तीन व्यक्ती मृत्यू पावले पण त्या थोड्या सुद्धा खचल्या किंवा डगमगलेल्या नाहीत. जीवनातील वास्तवता लक्षात घेऊन ध्येयवादी प्रवृत्तीने कार्य करणाऱ्या व येणाऱ्या अडचणीला हसत हसत त्या तोंड देत आहेत. वास्तवता स्वप्न ,सृष्टी व हास्यरस या तिन्ही गोष्टीचे एकत्र मिश्रण म्हणजे ज्ञान होय, हे जीवनाचे गणित आज मान्य आहे. जीवनात अनेक सुखाचे क्षण येतात ते सूर्याच्या कोवळ्या किरणासारखे सतेज असतात, नंतर भडक होतात तसे त्यांची जीवन तेजोमय झालेले आपल्याला दिसते. महामहीम द्रौपदी मूर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओरिसातील मयूरभंज जिल्ह्यात संथाळ या आदिवासी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नारायण दुडू होते. महाविद्यालयीन शिक्षण भुवनेश्वर मधील रमादेवी महिला महाविद्यालयात  झाले. पुढील काळात त्या सहाय्यक लिपीक झाल्या. त्यानंतर त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. राजकारणात त्या 1997 मध्ये प्रवेश केल्या. सुरुवातीला नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या, त्यानंतर रायरंगपूरच्या आमदार झाल्या. पुढे त्यांना बीजेडी सरकार मध्ये मंत्रिपद मिळाले आणि नीलकंठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास होत नाही असे म्हणतात. 
तसे त्या झारखंडच्या पहिल्या महिला नवव्या राज्यपाल म्हणून 18 मे  2015  ते 12 जुलै 2021मध्ये  कार्यरत होत्या.  त्यानंतरच्या काळात त्या भरघोस मतांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. त्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत. हा विजय संपूर्ण आदिवासी समाजासाठी व भारतीयांसाठी परिवर्तनवादी ठरला. शिक्षणात किती सामर्थ्य असते हे या विजयाने दाखवून दिले.  म्हणून शिक्षण शिका, शिक्षण नाही शिकले तर इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात. श्रमाला फळ मिळाले, भेदभावांचा अंत झाला. जातीयता येथे नष्ट झाली. कर्तृत्वला फळे आली. जे कर्तृत्व करतात ते खरोखरच यशोशिखरावर जातात, अशी जनसामान्यांमध्ये चर्चा होऊ लागली, म्हणूनच कर्तृत्ववान महिलांची संघर्षगाथा आपण अभ्यासत व  शिकत आहोत. व्यक्ती कोणत्या जातीत जन्मला हे महत्त्वाचे नसून त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आम्हाला आजही प्रेरणादायी आहेत. म्हणून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे सुद्धा आम्हाला कळाले म्हणून महिला दिनाच्या निमित्ताने अशा गुणवंत व कर्तृत्ववान महिलांचे प्रेरणादायी विचार आपण समाजासमोर ठेवावेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण पुढे जावेत, त्यासाठी लेखन, वाचन, चिंतन, संभाषण फार महत्त्वाचे आहे. घरामधील त्यांची मुले, पती वेगवेगळ्या कारणामुळे मृत्यू पावले. त्यांनी त्यांचे दफन घरामध्येच केले आणि त्या ठिकाणी आज विद्यालय बांधण्यात आले. एका बाजूला आपण अंधश्रद्धा पाळतो तर दुसऱ्या बाजूला त्या घराला विद्यामंदिर म्हणून नावारूपाला आणले, हे येथे सांगावयाचे आहे. आपल्या जीवनभराच्या प्रवासात त्यांनी कधीही कोणावर रागावलेल्या नाहीत.
  पाठीमागचा इतिहास पाहिल्यानंतर त्यांची कर्तृत्व अतिशय मोठी आहेत. इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हे कार्य केलेले आहे. वास्तविकता त्यांच्याकडून आपला शिकता येईल. कष्टकऱ्यांच्या, कामकरी लोकांच्या जीवनाची गाथा काय असते ? हे त्यांनी सांगितलेलं आहे. जाणिवांची प्रगती आणि समाजाची पुनर्वस्था, पुनर्रचना यासाठी शिक्षण हे एक मूलभूत साधन आहे. म्हणून शिक्षण शिका ? असे त्यांना सांगायचे आहे. त्या नेहमी पुस्तके जवळ ठेवतात आणि वाचन करत असतात. हे या ठिकाणी आवर्जून सांगावे वाटते. 
 आजकालचे तरुण म्हणतात 'आम्हाला वेळ मिळत नाही. वाचन  करण्यासाठी ज्या पदावर आज त्या आहेत ते पद सांभाळून सुद्धा वाचन करीत असतात हे वाखाणण्याजोगी गोष्ट आहे, *यत्र  नार्यस्तु पुजन्यते ।रमते तत्र देवता।* जिथे स्त्रिया पूजनीय होतात, तेथे देवत्व प्राप्त होते असा संस्कृत श्लोक म्हटला जातो. ते सर्व वास्तविक आहे ज्यांना आईचे बहिणीचे महत्त्व कळाले ते यशस्वी झाले, पत्नी ही क्षणाची असून अनंत काळाची माता आहे. असे विचारवंतांनी म्हटलेले आहे.म्हणून महिलांचा नेहमी आदर करायला शिका. महिला या कोमल आहेत पण कमकुवत नाहीत. याची जाणीव असू द्या. प्राचीन काळातील महिला आणि आजची 21 व्या शतकातील महिला यामध्ये जमीन-अस्मानचे फरक आहे.
त्यासाठी महिला या अबला नसून सबला आहेत .हे तुम्ही लक्षात घ्या. आज सर्वत्र शैक्षणिक वातावरण तयार झालेले आहे, त्यामुळे खूप मुली शिक्षण शिकत आहेत,  मोठमोठे पद पादाक्रांत करीत आहेत. शिक्षण, क्रिकेट, ऑलिंपिकच्या स्पर्धा, गिर्यारोहण, राजकारणातील सर्वच पदे या सर्व क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर आहेत. आठ मार्च महिला दिनाच्या निमित्ताने शूरवीर, रणरागिणी, दुर्गा, संघर्षचा महामेरू असणाऱ्या महिलांना हार्दीक शुभेच्छा ......! 

- प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत
अध्यक्ष : विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी, ता. मुखेड
---------------------------------------------
महिलांचा सन्मान कोणामुळे होत आहे. ..?
आज आठ मार्च जागतिक महिला दिन त्या दिनानिमित्त सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिला ही जगातील सर्वात उंच शिखर आहे व ती कायम राहणार आहे यात काही शंका नाही आणि ती कायमच रहावे. शेवटी ती नारीशक्ती आहे म्हणूनच होऊन गेलेल्या  नारीशक्तींच्या पोटी महा विभूतींनी जन्म घेऊन या साऱ्या जगाचा उद्धार केला आहे अशा त्या होऊन गेलेल्या महान नारिशक्तींना व महाविभूंतीना सर्वप्रथम मी वंदन करते व त्यांच्या कार्यापुढे मी नतमस्तक होते. आधीच्या महिलांमध्ये व आताच्या महिलांमध्ये  फरक  बघितले तर जमीन आसमानचा फरक बघायला मिळत आहे. तो फरक म्हणजेच आधीच्याही महिला हुशार होत्या,  देखण्या  होत्या , कष्टाळू होत्या , संस्कारी होत्या,  त्यांना आपल्या  भारतीय संस्कृतीची जाणीव होती पण, त्या स्वतंत्रपणे जगू शकत नव्हत्या , त्यांना  शिक्षण घेता येत नव्हते, बाहेर पडण्याची त्यांना  परवानगी मिळत नव्हती म्हणून  चार भिंतीच्या आड राहून चूल आणि मुल सांभाळत , निमूटपणे होणारा अन्याय, अत्याचार सहन करत नरकासमान जीवन जगत होत्या  कारण त्या सक्षम बनल्या नव्हत्या. पण कुठेतरी  त्या  आपल्या  संस्कृती मात्र विसरत नव्हत्या  ही त्यांच्यात असलेली सर्वात मोठी  महानता होती म्हणून आजही त्यांच्यात असलेल्या काही गुणांचा आदर केला जातो आणि म्हटले जाते जुने, सोने असते पण का बरं असं म्हणण्याची आज वेळ येत आहे. ...? हा भारी मोठा प्रश्न समाजासमोर उभा आहे. आणि आजच्या महिलांमधील फरक बघितले तर आजच्या  महिला सुंदर दिसत आहेत, हुशार आहेत, मेहनती आहेत सोबत सुशिक्षित झालेल्या  आहेत आणि खास करून सर्वच क्षेत्रात पोहोचल्या  आहेत, पुरूषांच्या खांद्याला, खांदा लाऊन जगून दाखवत आहेत मग एवढे सारे त्यांच्यात गुण असताना सुद्धा जुन्या रितीरिवाजाला किंवा जुन्या महिलांना  का बरं महत्व दिल्या  जाते....?  आजच्याच महिलां विषयी बोलायला पाहिजे म्हणजेच कुठेतरी त्यांची उणीव भासत आहे हे नाकारता येत नाही. 
       भलेही आधीही महिला होत्या पण त्यांना पाहिजे तो सन्मान मिळत नव्हता कारण त्याकाळची परिस्थिती भयानक होती महिलांचे जगणे नरकासमान झाले होते आणि त्यांना  ह्या नरकातून बाहेर काढण्यासाठी, आताच्या महिलांना  सुशिक्षित  करण्यासाठी महाविभूती असलेले क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या अर्धांगिनीला म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीआईला घरीच शिक्षण देऊन सुशिक्षित केले तो काळ कसा असेल या विषयी आजच्या महिलांनी त्या दोन्ही महाविभूंतीना वाचणे गरजेचे आहे. जेव्हा सावित्रीआई घराबाहेर पडायची तेव्हा त्या माऊलीला किती संघर्ष करावा लागत होता बघून कदाचित निसर्ग सुद्धा रडत असेल तिचे जगणे पाहून आपण कल्पना सुध्दा करू शकत नाही आणि ती माऊली मात्र अफाट संघर्ष करून जगत होती  ते जगणे स्वतः साठी नव्हते तर सर्वच नारीशक्तींसाठी जगणे होते या विषयी कोणी विचार करावे....?  आजच्या  महिला एवढ्या  स्वार्थी झालेल्या  आहेत की, त्यांना  फक्त त्यांचे मुले आणि नवरा हवा असतो, मौजमजा, मैत्रींनींशी गप्पा मारणे, अर्धे कपडे घालून  फिरणे, टिंगल,टवाळी करणे, नाचगाणे, प्रसिद्धी  मिळविण्याची हाव, प्रस्थापितांच्या पाया पडून गुलाम बणून राहण्याची सवय,  अजून बरेच काही  बाकी कोणाशीही काहीही देणेघेणे नसते पण,  त्यात सुद्धा अशा काही महिला नि:स्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या आहेत व करून दाखवत आहेत त्यांचा अभिमान वाटतो.  पण, त्या माऊलीने स्वतः विषयी विचार न करता महिलांना कशाप्रकारे घडवता येईल यासाठी शेणाचे गोळे सुद्धा आपल्या  अंगावर घेतले ती कोणती नारीशक्ती असेल....?  आणि तिच्याच संघर्षातून आजच्या  महिला आनंदाने जगत आहेत याचा सुद्धा विसर पडत आहे ही जगातील पहिली व वास्तव शोकांतिका आहे.
      त्या भयानक  काळात जर त्या माऊलीने अफाट संघर्ष केला नसता तर आजच्या या सुशिक्षित असणाऱ्या बुध्दी गहाण ठेवून जगणाऱ्या  महिलांना खरंच सन्मान मिळाला असता का. ..?  पण शोकांतिका म्हणावे लागेल की, आजच्या महिला एवढ्या  सुशिक्षित असताना व समजदार  आणि जगातील सर्वात उंच शिखर असणाऱ्या महिलांना  सर्व काही कळून  सुद्धा अज्ञानी बनून जगत आहेत. हे कोणीही नाकारू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजेच आजकाल बघितले तर  जेथे,तेथे, पुरस्काराचे बाजार भरलेले दिसत आहेत त्यात क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या नावाचा पुरस्कार पैशाने विकत घेतल्या जाते  आणि पैशाने विकत  दिल्या जाते  तो पुरस्कार पैशाने विकत घेताना क्रांतीज्योती सावित्रीआई फुले का बरं देणाऱ्या, घेणाऱ्याला  आठवत नाही . ..? आजही त्या माऊलीला भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही या विषयीची पूर्णपणे माहीती  असताना सुद्धा त्याकडे आजच्या  महिला  दुर्लक्ष करत आहेत पण का दुर्लक्ष करत आहे हा एक  भारी मोठा प्रश्न आहे. जेव्हा सावित्रीआईच्या त्यागामुळे आजच्या महिला दररोज सन्मानाच्या मानकरी बनत आहेत मग क्रांतीज्योती सावित्रीआईला भारतरत्न सर्वोच असलेला पुरस्कार मिळवून देण्यासाठी का बरं पुढे होत नाही. ..? असे अनेक प्रश्न पडताना दिसत आहेत.  क्रांतिज्योती सावित्रीआई फुले अजूनही पूर्णपणे महिलांना कळली नाही आणि कळणारही नाही कारण तिला वाचण्यासाठी आजच्या तिच्याच लेकींकडे सेंकदाचा वेळ नाही. बाकी व्यर्थ गोष्टींच्या मोहात पडून मौजमजा करण्यासाठी व प्रसिद्धी मिळविण्यासाठी  भरपूर वेळ आहे ही आजची सत्य परिस्थिती निर्माण झालेली बघायला मिळत आहे.
      आज आणि उद्या होणारा व भविष्यात कधीही  महिलांचा सन्मान होत राहील पण, ही प्रथम देण सावित्री आईचीच आहे कारण त्याच माऊलीने चंदनासारखे झिजून या महिलांना त्या योग्यतेचे बनवले आहे  म्हणून आजच्या  महिला सन्मानाच्या मानकरी होत आहेत पण दु:ख एका गोष्टीचं वाटतं की, आजच्याच महिलांमुळे त्यांच्यात असलेल्या वागणुकीमुळे होऊन गेलेल्या सर्वच नारीशक्तींचा अपमान होत आहे. हे, कधी व कोणाला कळेल की, नाही माहीत नाही पण, एवढ्या तरी खालच्या दर्जाला जाऊन नारीशक्तीचा अपमान करू नये कारण ही भारतभूमी आहे आणि त्या माऊलींनी आपली भारतीय संस्कृती पूर्णपणे शेवटपर्यंत टिकवून ठेवली होती आणि अजरामर झाल्या. पण, आता मात्र त्याच संस्कृतीची वाट लावून जगत असणाऱ्या महिलांना काय म्हणावे...?


सौ.संगीता संतोष ठलाल 
मु.कुरखेडा जि.गडचिरोली 
७८२१८१६४८५
--------------------------------
महिला दिनाच्या निमित्याने 

           महिला दिनानिमीत्यानं विचार मांडतांना एक विचार हाही मनात येतो. खरं तर तो संभ्रमाचे विचार आहे. कारण आज महिलांकडे पाहिलं तर महिला सक्षम आहे. त्याची उदाहरणं द्यायची झाल्यास नक्कीच देता येतील. कारण आज कैसर विल्यमसारखी महिला अंतराळात पोहोचलेली आहे. प्रतिभा पाटील सारखी महिला देशाच्या राष्ट्रपती बनल्या. किरण बेदी सारखी महिला राजकारणात सक्रिय झाली. तसंच इंदिरा गांधींसारखी महिला भारताची पंतप्रधान झाली. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील महिलांच्या सक्षमीकरणांची. यावरुन वाटतं की खरंच महिला सक्षम आहे. 
         आजचा काळही असाच महिलांच्या सक्षमीकरणाला अनुकूल आहे. आज महिलांनी आपला स्वतःचा विकासच केला नाही तर ती आयतोब्या असलेल्या व स्वतःला पुरुष समजणा-या माणसाला पोषतो. आजही ठोंब्यासारखा बलदंड असलेला पुरुष हातपाय गळल्यागत महिलांसमोर गुलामागत वागतो व आजही घरातील स्नुषा चांगल्या निघाव्या,  म्हणून विधात्याकडे साकडे घालणा-या भरपूर सासवा जगात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजही महिला पुरुषांना आपल्या पत्नीच्या हातचे कळसुत्री बाहुले म्हणून घरात वावरावं लागतं. संसार करावा लागतो. त्यामुळं महिला सक्षमच वाटते. 
         काल ठीक आहे की महिला सक्षम नव्हती. तिला साधा शिक्षणाचा अधिकार नव्हता. सतत तिच्यावर अत्याचार होत होता. बलात्कार तर वारंवार व्हायचा. घरात, दारात आणि बाहेरही. पुर्वीच्या काळातील महिलांवरील अत्याचाराबाबत सांगायचं झाल्यास पुर्वी बालविवाह व्हायचा. वधू कमी वयाची व वर जास्त वयाचा. यात वर वयानं कितीतरी मोठा असल्यानं मरुन जायचा. मग त्या घरात त्या वधूची साडेसाती सुरु व्हायची. साडेसाती म्हणजे एकाच घरातील सारी मंडळी या तरुण असलेल्या विधवेवर अत्याचार करीत सुचायची. तो बलात्कारच असायचा. परंतू त्यावर आवाजही उठवता येत नव्हता महिलांना. कारण ती सक्षम नव्हती. तसेच कायदेही तसे सक्षम नव्हते. विधवा विवाह बंदी होती. 
          आज काळ बदलला आहे. महिलांना शिकता येतं. उच्च शिक्षण घेता येतं. महिलांना आपला बालविवाह रोकता येतो. त्यांना विधवा विवाह करण्याची अनुमती आहे. विनाघुंघट कुठेही जाता येतं. कुठंही केव्हाहीपर्यंत विहार करता येतं. एवढंच नाही तर एक पती असतांना तो जर बरोबर वागत नसेल तर वेळप्रसंगी बदलवता येतो किंवा पती असतांनाही बिनधास्तपणे पर पुरुषांसोबत हिंडता येतं. कारण त्यांना कायद्याच्या संरक्षणाचं कवच आहे. मग असे असतांना त्या महिला स्वतःला का कमकुवत समजतात तेच कळत नाही. त्याचं कारण आहे येथील संस्कृती. आपली संस्कृती महान आहे. त्या संस्कृतीला विशिष्ट असं वलय आहे. महिलांबाबतीत सांगायचं म्हणजे ही संस्कृती सक्षम आहे महिला बाबतीत. या भारतीय स्री संस्कृतीला त्यांचा पुर्वइतिहास माहित आहे. तो पुर्वइतिहास म्हणजे दुर्गा, काली अवतारांची. त्यातच त्यांना हेही माहीत आहे की या संस्कृतीनं गार्गी, मैत्रेयीच्या रुपात शास्त्रार्थही केला होता व त्या महिला संस्कृतीनं पुरुषांच्या बरोबरीला खांद्याशी खांदा लावला. महिला कमकुवत नाहीच आणि कोणीही तिला कमकुवत समजून घेवून भूल करु नये. ती कमकुवत सारखी वागते तेही आपल्यासाठीच. तिलाही वाटते की हा देश माझा आहे. माझ्या देशाचा अपमान होईल मी जर अशी संस्कृतीला धरुन वागले नाही तर. हाच हेतू ठेवून महिला वर्ग वागत होता काल. आजही वागतात. परंतू त्या महिला वर्गाच्या तशा वागण्याचा फायदा हा मध्यंतरीच्या पुरुष जातीनं घेतला व त्यांच्यावर विशेष अशी बंधनं घातली व त्यांना गुलामागत वागवलं. यात त्यांनी पुर्ण संस्कृती स्रियांना सोपवून दिली. त्यांनी काय खावं,  काय प्यावं याबाबतही बंधनं घातली. डोक्यावर पदर असावा. लुगडंच घालावं अशी बंधनं. 
           आज ब-याच महिला पुढे गेल्या आहेत. राजकारण, अर्थकारण  व देशाची धुरा सांभाळत आहेत. आज महिलांनी ओळखलं आहे की आपण जर आवाज उचलला नाही आणि असेच दबत राहिलो तर येथील पुरुष वर्ग आपल्यावर विनाकारणचा अत्याचार करतो. म्हणून त्या सक्षम बनल्या आहेत. आजही ज्या घरी मुली विवाह करुन जातात. त्या घरी मुली आपल्या मनानुसार नवरोबाला वागायला लावतात. जर नवरोबा तसे वागत नसतील तर त्यांना इंगाही दाखवायला त्या मागे राहात नाहीत किंवा पाहात नाहीत. जर नवरोबा व सासूसासरे चांगले असतील तर मुली चांगल्या वागतात. सांस्कृतीक परंपरेनं वागतात. परंतू जर नवरोबा चांगले नसतील तर मात्र अशावेळी त्या संस्कृत्यांनाही गहाण टाकतात. त्यानंतर कोणी नावबोटं ठेवो की अजून काही त्या घाबरत नाहीत. त्या मुली डोक्यावर पल्लूही ठेवत नाहीत. कोणतीच व्रतवैकल्ये पाळत नाहीत. 
           महत्वपुर्ण गोष्ट ही की महिला ही आज कमकुवत नाही. तिला कोणीही कमकुवत समजू नये. ती कालही कमकुवत नव्हती. कालही ती दुर्गा रुपात वावरुन माजलेल्या महिषासूराचा विध्वंस करीत होती. आजही ती अशाच माजलेल्या महिषासूराचा विध्वंस करण्यास सक्षम आहे. तरीपण आजही अशा काही  स्रिया आपण पाहतो की त्यांना पाहिलं की महिला कमकुवत जाणवते. अशा महिला आजही देशात ब-याच आहेत की ज्या आजही अत्याचार सहन करतांना दिसतात. आजही त्यांच्या डोक्यावर पदर दिसतो. घुंघटही दिसतो. आजही त्या महिलांवर घरादारात अत्याचार होत असतो. त्यांना मनमोकळे पणानं वागता येत नाही. ब-याच स्रियांना आजही कुठेही केव्हाही मनमोकळे पणानं फिरता येत नाही. सतत भिती आणि भितीच तसंच भितीदायक वातावरणही दिसतं. त्यांच्या आचरणातून आजही त्यांचं दुय्यम स्थान दिसून येतं. 
           आज महिला दिन आहे. महत्वाचं म्हणजे आजपासून तरी महिलांनाही चांगलं वागवावं. त्यांनाही सामाजिकता  प्रदान करावी. त्या मान ठेवतात म्हणून त्यांच्याकडून जबरदस्तीनं प्रथांचं पालन करुन घेवू नये. तेव्हाच महिलादिनाचं सार्थक होईल एवढंच सांगावेसे वाटते. 
            
 - अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
--------------------------------

सुखाची पखरण ती

      'जन्मा येण्या कारण ती   प्रितीचे अभिसारण ती
      जीवन फुलविणारी, सुखाची पखरण ती,
      भाळावरचं गोंदण ती, नवरत्नांचं कोंदण ती 
     विसावण्या या जगताला गे मिळालेलं आंदण ती'...
      अशी 'ती'....हीन ,दीन, दुबळी, लाचार कधीच नव्हती.आजही नाही. विशाल आकाशासारखे हृदय असणारी, धरेसारखी क्षमाशील, नदीसारखी अविरत वाहणारी ,अंधा-या रात्रीचा दिवा होणारी, जीवननौकेला दीपस्तंभाप्रमाणे दिशा दाखविणारी,  जीवनातल्या रणरणत्या उन्हांत वाऱ्याची झुळूक होऊन दाह शमविणारी, कधी कामिनी तर कधी दामिनी होणारी, आत्मिक बळ देणारी ,स्वतंत्र बुद्धिमत्ता व अस्तित्व असलेली अशी 'ती' होती आणि आजही आहे.
        अध्यात्मिक, सांस्कृतिक, बौद्धिक वारसा धैर्याने चालविणारी 'ती' .आयुष्यातील कोणत्याही  प्रसंगी धीराने, संयमाने वाट काढत, विनातक्रार पुढे चालत राहणारी 'ती'. राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीचा वसा चालविणारी 'ती'.' ती' कधीच गौण नव्हती. आजही नाही
        संपूर्ण विश्वात स्त्रीत्व हे ओतप्रोत भरलेलं आहे. भारतीय संस्कृतीला माया, ममता,प्रेम, वात्सल्याने 'ती'जोजवत आली आहे.आदर ,विनय,संयम ,कर्तव्य,सहनशीलता या  मूल्यांच्या संस्काराचं सिंचन करत आली आहे. आणि म्हणूनच स्त्रीत्वाचं प्रतिनिधित्व करणारे ३६५ हि दिवस खरे तर तिचेच आहेत.तिची प्रतिष्ठा ,मान,सन्मान अपरंपार आहे. संपूर्ण विश्वाची ती प्राण आहे .
     'म' म्हणजे महान. जीवनातील कोणत्याही पैलूंचा विचार केला तरी त्या दृष्टीने ती महान असणारी.'हि' म्हणजे हिम्मतवान . डोंगराएवढं संकट कोसळल तरी कधीही हिंमत न हरणारी. 'ला' म्हणजे लाजवंती.समाजातील निंदनीय कृत्यांची लाज बाळगणारी अशी 'ती'. आदिशक्ती, प्रभूची भक्ती. झाशीची राणी, मावळ्यांची भवानी. प्रयत्नांना लाभलेली उन्नती आणि आजच्या युगाची प्रगती म्हणजे 'ती'. 
       भारतीय परंपरेत स्त्री-पुरुष दोघांनाही समान दर्जा दिलेला आहे. वीज असली पण दिवा लावला नाही तर विजेचे अस्तित्व कळणार नाही आणि दिवा असला पण वीजप्रवाह नसेल तर दिव्याचा उपयोग नाही. उजेडाकरीता दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहे .स्त्री-पुरुषाचे गुण मिश्रित झाले पाहिजेत अशीच निसर्गाची मांडणी आहे. याचा अर्थ 'स्त्रैण पुरुष' किंवा 'पुरुषी स्त्री'  असा होत नाही. तर स्त्री मधील वात्सल्य ,करुणा,समर्पण ,त्याग ,लज्जा,सहनशीलता क्षमाशीलत्व हे गुण आणि पुरुषामधील विवेक ,कर्तृत्व ,पौरुष ,निर्भयता इ. परिस्थितीनुसार ,प्रसंगानुरूप परस्परांनी आत्मसात करून उत्तम मानव  म्हणून जगणे अपेक्षित आहे.म्हणूनचआपण भगवंताला देखील अर्धनारीनटेश्वर असे म्हणतो.
         पण...पण....काळाच्या ओघात कालचक्र उलट दिशेने फिरू लागले आणि समाजपुरुषाने स्वतःचा पुरुषी अहंकार मिरवत तिला दुय्यम स्थान देण्यास सुरुवात केली.स्त्रीजन्म म्हणजे पाप. तिला शिकण्याचा अधिकार नाही.'चूल आणि मूल' इतक मर्यादित क्षेत्र ठेवल. सोयीनुसार तिला रक्षित,संरक्षित ठरवली.वेळप्रसंगी दुर्लक्षितही केली .तर कधी देवता म्हणून देव्हाऱ्यात बसवली.
        निसर्गाने दोघांच्या शरीरामध्ये बदल ठेवलेला आहे.पुरुषाला शारीरिक शक्ती तर स्त्रीला मानसिक व प्रजननशक्ती निसर्गानेच प्रदान केलेली आहे. शारीरिक शक्तीच्या जोरावर पुरुष स्त्रीवर अत्याचार करू लागला .अनेक अनिष्ट रूढी-परंपरांचे साखळदंड तिच्या पायात बांधले. अनेक मर्यादांचं वेसण तिच्या दैनंदिन जगण्याला घातलं. आकाशात मुक्तपणे भरारी घेण्याचा तीने कधी प्रयत्न केलाच तर तिला त्याने नको ती दूषणे लावली. भ्रम, भय ,चारित्र्यहनन करुन तिचे पंखच त्याने छाटले आणि तिच्या अस्तित्वाला जणू ग्रहणच लागले.
       बदल ह्या निसर्गनियमानुसार त्यावेळच्या समाजात 'ती'च्या दृष्टीने अनुकूल असे बदल घडून लागले .समाजसुधारकांमुळे वैचारिक क्रांती घडून आली. 'स्त्री एक माणूस आहे आणि माणूस म्हणून तिच्याशी माणसासारखं वागलं पाहिजे हि साधी गोष्ट समाजास समजू नये'? या विचारधारेच्या अनुषंगाने तिला तिचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी थोर समाजसुधारकांनी त्यावेळच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन अनिष्ट रूढी-परंपरांवर प्रहार केले. तिच्या पायातील त्या अनिष्ट रूढी परंपरांचे साखळदंड मोठ्या ताकदिनीशी तोडण्यात त्यांना यश आले. एखाद्याच्या डोळ्यावरची पट्टी काढावी तसंच थोर समाजधुरीनांनी समाजपुरुषाच्या डोळ्यांवरचे झापड स्वकर्तृत्वाने बाजूला सारत स्त्रीचं खरं अस्तित्व दाखवून दिलं. तिला पुन्हा एकदा ज्ञानाच्या वाटा दाखवून तिच्या अंधाऱ्या जीवनात उजेड पेरला. स्वत्वाची जाणीव करून देत तिच्या पंखात बळ भरलं. 
       मागे वळून न पाहता 'ती' ही मग आकाशात  गरुडभरारी घेऊ लागली.जीवनकलेच्या विकासासाठी आवश्यक घर तिच्यामुळे तयार होते हे हळूहळू समाजपुरुषाच्या लक्षात येऊ लागले. आणि तिला पुन्हा एकदा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्याने प्राप्त झाला जो निसर्गाने तिला जन्मतः दिलेलाच होता.

           - आरती डिंगोरे, नाशिक
--------------------------------

अधोरेखित

अधोरेखित शब्दाचा अर्थ नव्याने उलगडत जातोय. मुलगी जन्माला आली की सगळ्यांनाच आनंद होतो असे नाही. दिसायला सुंदर आणि रंग गोरा असला की, नवरा चांगला मिळेल हो, असे ऐकायला मिळते. म्हणजे मुलीने जन्माला येताना सुंदर असायलाच हवे हे अधोरेखित होते. पुढे मुलींसाठी असे अधोरेखित करणारे प्रसंग आणि गोष्टी वारंवार घडतच राहतात. वयात आलेल्या मुलींनी मोठ्याने हसायचे नाही. मुलांशी जास्त बोलायचे नाही. संध्याकाळी घरी लवकर यायचे. ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात.
         लहानपणापासूनच सगळ्या कामांची सवय करावी लागते नाही तर लग्न झाल्यावर सासुची बोलणी खावी लागतील हे तिच्या मनावर अधोरेखित केले जाते. बाईपणाच्या साच्यात ती स्वत:ला घडवत जाते. जेव्हा ती सासरी येते तेव्हा आणखी नवीन गोष्टी आणि बंधने तिच्यासाठी अधोरेखित करून ठेवलेल्या असतात. माणसांमध्ये बोलायचे नाही. व्यवहाराचे तुला काही कळत नाही. फक्त चूल-मूल हेच तुझे क्षेत्र. त्याच्यामध्येच तू स्वत:ला गुंतवायचे. तिलाही मग सवय होउन जाते. आखून दिलेल्या चौकटीत जगण्याची आणि राहण्याची.आहे त्यातच ती सुख मानायला शिकते. चौकट मोडण्याचा ती प्रयत्न करत नाही. चौकट पुन्हा मग अधोरेखित होत जाते. आयुष्याचे गणित मग सोडवायला शिकते. बेरीज आणि वजाबाक्यांचा ताळा करत राहते. भागाकार केला तर बाकी काही राहत नाही.
           अनेक अडचणी येतात. जीव नकोसा होतो. तरी ती हसतमुखाने सारे काही करत राहते. घातलेल्या बंधनांना ऋणानुबंध समजून जपत राहते. सासरच्या गोष्टी माहेरी सांगत नाही. माहेरच्या गोड आठवणी मनातून काढत नाही. जगण्याची गोडी वाढवत राहते. चूल आणि मुलांमध्ये जीव रमवत राहते. लेकरांचे करताना अस्तित्व स्वत:चे विसरून जाते. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेते. मिळालेल्या सुखाची ओंजळ भरून घेते. न मिळालेल्या गोष्टींना विसरून जाते. मुलीची मग स्त्री केव्हा होते हे तिच्या मनाला कोडे पडते. एका जागी उगवलेली ती नवीन जागी सहजपणे रूजते. बाईपणाचे जिणे पुन्हा अधोरेखित होउन जाते.

© सौ.गौरी ए.शिरसाट
विक्रोळी, मुंबई
--------------------------------
जागतिक महिला दिनानिमित्त कविता
--------------------------------
आजची नारी

आज काळ बदलला
रूढी परंपरा झुगारून
स्त्रीने वेगळी ओळख 
निर्माण करत दिले पटवून

उच्च शिक्षणातील
पुरुषांची असणारी मक्तेदारी
बनली त्यातही ती 
त्यांची भागीदारी

केला तिने खूप
धगधगता प्रवास
तेव्हा कुठे पाहायला
मिळाला हा दिवस

चाकोरीबद्ध जीवनाला
देत थोडे धक्के
समाजात वेगळे स्थान
केले तिने पक्के

बदलली जगण्याची दिशा
लोपुनी जुने स्वरूप
स्त्री बनली आदिशक्ती
खुलून आले नवे रूप

हातात घेतला 
सारा कारभार
संसाराला लावत
आपलाही हातभार

नाही असे 
कोणते क्षेत्र
सगळीकडे तिचे
असतात नेत्र

प्रगती केली
मोठी झाली
स्वतःची स्वतंत्र
ओळख निर्माण केली

सौ.प्रिती दबडे
पुणे
9326822998
--------------------------------
ती
ती असताना सभोवताली
परिसर होतो गंधीत सारा
ती नसल्यावर घरात नुसता
अस्ताव्यस्त फक्त पसारा

गोकुळ भासते घरात सार्या
तीचा सभोवती वावर प्यारा
ती नसताना चार भिंतीचा
तुरुंग केवळ वाटे  सारा

ती असल्यावर सत्यवान मी
मृत्यूला ही तिचा दरारा
ती नसल्यावर वाहात राहते
नयनातून या अश्रूधारा

कौतुक तिचे एकच दिवस
नको सदैव मनी धरा
आकाशाला काय कळाव्या
कळा किती सोशिते धरा
      अरविंद कुलकर्णी पुणे
--------------------------------
वैधव्य
वैधव्य आलं त्यात तुझा काय दोष सखी ?
अविचार करून असं होऊ नकोस ग दुःखी.
जन्म मरण काय आपल्या हातात असतं का बाई?नियतीच्या पुढे कुणाचेही काहीही चालत नाही. त्याची बायको गेली म्हणून तो कुढत का बसतो? तिच्या दहाव्याच्या आत दुसरी मिळते का बघतो. मी म्हणत नाही तू बोहल्यावर चढ पुन्हा,
जरी चढलीस तरी थोडाच ठरणार का गुन्हा?
अग बाई! जग वाटतं तितकं नसतं चांगलं, म्हणून म्हणते नको काढूस तू गळ्यातलं डोरलं .
लाव कुंकू ठसठशीत गजराही माळ केसात, 
भर बांगड्या हातात आणि पैंजण जोडवी पायात
हवे तसे रहा सखे, हो स्वत:च स्वतःची राणी ,
झालं गेलं विसरून तू गा नव्याने गाणी.
माणूस आहे तू ही समजावं एकदा मनाला, दाखवून दे अस्तित्व तुझे तूच सा-या जगाला. ठेवशील आदर्श जिजाऊ,अहिल्येचा तू मनी
होतील नतमस्तक सारे तुझ्यापुढे मनोमनी.
आरती डिंगोरे, नाशिक
--------------------------------
*जागतिक महिला दिन*

*जा* गृत तू जननी
*ग* ती तू काळाची
*ति* च आहे पत्नी-बहिण
*क* धी आई बाळाची

*म* हती तुझी सर्वत्र
*हि* त करते सर्वांचे
*ला* जवते आज पुरुषांनाही
     पद भुषविते गर्वाचे
     
     स्वतःला सिध्द कर                                  *दि* पक तूच वंशाचा                                                                   
     जग निश्चित म्हणेल                                     *न* कोशी आदर सर्वांचा

- प्रल्हाद विश्वनाथराव घोरबांड        
     नांदेड9011352061 .
--------------------------------

कविता - ती कोण आहे ?
- नासा येवतीकर, 9423625769

ती रोज सकाळी, सर्वांच्या अगोदर उठते
आम्ही सर्व असतो झोपेत, तिच्या कामाला सुरू होते

ती रोज सर्वांसाठी, चवदार स्वयंपाक करते
आम्ही त्याला नावे ठेवतो, तरी ती कानाडोळा करते

ती रोजच आम्हा सर्वांची, एवढी देखभाल ठेवते
आमच्याकडून कसलीच, तिची कधी ही अपेक्षा नसते

सकाळपासून झोपेपर्यंत, ती खूप राब राब राबते
ती आजारी पडते जेव्हा , आम्हांला खरी किंमत कळते


मग ती कोण आहे ? आई आहे ताई आहे
ती कुणाची मावशी तर कुणाची बायको आहे

--------------------------------
मणीपुरच्या प्रकरणात मन अस्वस्थ........
अन् जन्म एका कवितेचा ........

बासणात गुंडाळा तुमची महासत्ता......

बस झाली तुमची भाषणं
कृती मात्र शुन्य...
तुमच्या तोंडाला लागलयं महासत्तेचं रक्त...
आता तुम्हाला इथे शांतता नकोच असते...
शांतता असली तर
तुमचं जातीय राजकारण
कसं फोफावेल बांडगुळासारखं...
तुम्हीचं उखरत राहता
पुन्हा पुन्हा धर्माच्या चमच्याने रोज नवी भांडणं...
कित्येकांचं रक्त जमिनीत
मुरतं अगदी त्यांच्यासकट...
कुणा घरचा आधार जातो
कोणाची  रोजी रोटी
पण पक्ष मात्र पुढं जात राहतो अव्याहतपणे...
कुठतरी भर रस्त्यावर
नग्न केल्या जातात कोणाच्या
तरी भगिनी आणि काढली
जाते त्यांची नग्न धिंड .......
हे असं बघतलं की खरच
वाटत नाही 
की आपण देवीसमान पुजतो महिलांना
धिंड त्यांची काढली जाते की आमच्या देशाची ?
आम्ही हळहळणार
नाही आहोत का ?
आमच्या मनाला डागण्या लागणार नाहित का ?
आम्ही पेटुन उठणार नाहित का ?
आम्ही सराईतपणे काही दिवसाने विसरुन जाणार .......
आक्रोश मंदावेल आमचा ...
काही दिवस व्हिडीओ होतील
फेसबुक इंस्टाग्रामवर व्हायरल
व होतीलही डिलीट
पण त्या बहिणींच्या
मनावरच्या ओरखड्यांचे काय ?
ते ओरखडे डिलीट करायचं
आहे का एखादे डिव्हाइस...?
नाही ना?
मग तुमची महासत्ता बासणात गुंडाळून ठेवा........

गोपाल वसंतराव खाडे 
बाबरे कॉलनी कारंजा लाड, वाशीम

जागतिक महिला दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा ........!

संपादन :- नासा येवतीकर, धर्माबाद


Monday, 4 March 2024

काटकसर ( katakasar )

काटकसर म्हणजे बचत 

काटकसर म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे पैश्याची बचत किंवा काटकसर. फक्त पैश्याचीच बचत किंवा काटकसर करता येते अन्य दुसऱ्या कोणत्याही वस्तूची आपणांस बचत वा काटकसर करता येत नाही का ? यावर देखील विचार करायलाच हवं. आपण पावलोपावली पैश्याची बचत कशी करावी ? याविषयी इतरांना सांगतो किंवा इतरांकडून ऐकतो. म्हणूनच त्या गोष्टीवर जास्त लक्ष ठेवून पैश्याची बचत करत असतो. पैश्याची जास्तच काटकसर करणाऱ्या व्यक्तीला ' कंजूष ' या नावाने देखील संबोधले जाते. माणसाच्या वृत्तीत कंजूषपणा असायलाच हवं. नाहीतर काटकसर करण्याची वृत्ती कशी निर्माण होईल ? असेल तर दिवाळी अन् नसेल तेव्हा शिमगा ही वृत्ती काही कामाची नाही. कोणत्याही बाबीची काटकसर करून बचत केल्याने त्याचा फायदा भविष्यात नक्की होतो किंवा फायदा व्हायलाच पाहिजे म्हणून काटकसर करू नये तर ती सवय आपणांस लागायला हवी. पैश्याची बचती सोबत अजून आपणाला कोणकोणत्या बाबीची बचत करता येऊ शकते, यावर थोडा विचार करू या....
निसर्गाकडून जे मुबलक प्रमाणात मिळते परंतु ठराविक कालावधी नंतर ते संपून जाण्याची शक्यता आहे अश्या बाबी काटकसरीने वापरले पाहिजे. उदाहरणार्थ पेट्रोल. पेट्रोल मानवनिर्मित नाही तर निसर्गनिर्मित आहे. पेट्रोलचा साठा मर्यादित स्वरुपातील आहे. म्हणून पेट्रोलवरील वाहने वापरतांना काळजीपूर्वक वापरायला पाहिजे. गरज नसेल त्या ठिकाणी गाडीच्या ऐवजी सायकल किंवा पायी हा पर्याय वापरून आपण पेट्रोलची बचत करू शकतो. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याजवळ पैसा असून देखील पेट्रोल मिळणार नाही असे चित्र बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून एक जागरूक नागरिक या नात्याने पेट्रोलची बचत करणे व काटकसरीने त्याचा वापर करणे आपले कर्तव्य आहे. 
त्यानंतरची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पाणी. पाणी हे देखील निसर्गनिर्मित बाब आहे. 100 वर्षांपूर्वी पासून आजपर्यंत चा इतिहास अभ्यास केला तर लक्षात येईल की, पाणी कसे कमी कमी होत गेले आहे. नदीच्या काठावर वसलेली आपली माणसे त्या नदीला कधी गिळंकृत केली हे कळालेच नाही. आपणाला पाणी विविध माध्यमातून मिळते. ते सर्वच माध्यम हे निसर्गाचे आहेत. कुण्या प्रयोगशाळेत किंवा अन्य कोठे पाणी तयार करता येत नाही. पावसाळ्यात मुबलक दिसणारे पाणी उन्हाळ्यात तोंडचे पाणी पळवून नेते. म्हणूनच पाण्याची बचत किंवा त्याचा काटकसरीने वापर करणे देखील खूप गरजेचे आहे. पाण्याची निर्मिती करू शकत नाही मात्र बचत करू शकतो, ही भावना मनात निर्माण होणे आवश्यक आहे. 
आपण काही गोष्टी वापरतांना अजिबात विचार करत नाही. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे विजेचा वापर. बटण दाबले की दिवा लागतो, पंखा फिरतो, टीव्ही चालू होते. त्यामुळे आपले काम सारे बटणावर चालत असते. पण बटण दाबण्यापूर्वी आपण विचार करतो का ? की खरंच या वेळेला पंख्याची किंवा दिव्यांची गरज आहे का ? काही मंडळी तर घरातले दिवे आणि पंखे सदानकदा चालूच ठेवतात. शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात असे चित्र खूप वेळा बघायला मिळते. त्यामुळे विनाकारण वीज खर्च होतो की नाही ? वीज जरी मानवनिर्मित असेल तरी वीज तयार करण्यासाठी जो खटाटोप करावा लागतो ते खूपच महागडे आहे. एक युनिट वीज तयार करण्यासाठी काय काय करावे लागते हे एक वेळा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला हवं, तेव्हाच त्या विजेचा वापर कळायला मार्ग सुचेल असे वाटते. 
जगात अन्नावाचून मरणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. जगात असेही लोकं आहेत ज्यांना एकवेळचे पोटभर जेवायला मिळत नाही तर दुसरीकडे अन्न वाया घालविण्याऱ्याची संख्या देखील भरपूर आहे. एखादं सण, समारंभ, लग्न, उत्सव किंवा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अन्न वाया जात असलेले चित्र आपण नेहमीच पाहतो. यात काही बदल करता येईल का ? यावर विचार होणे आवश्यक आहे. हे झालं सार्वजनिक किंवा जास्त लोकांच्या बाबतीत पण कुटुंबात किंवा ठराविक लोकांच्या मर्यादेत असतांना देखील अन्न वाया टाकल्या जाते, हे योग्य नाही. विशेष करून महिलांनी या विषयी जागरूक राहून किती अन्नाची गरज आहे तेवढाच स्वयंपाक करावे. बहुतेक वेळा घरातील लोकांचा अंदाज न घेता स्वयंपाक केल्याने उरलेला अन्न फेकून देण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. वारंवार असे होऊ नये याची काळजी महिलांनी घ्यायला हवे. माणसाकडून अन्नधान्याची निर्मिती होते. पण त्याची निर्मिती करतांना शेतकऱ्यांना किती हालअपेष्टा सहन कराव्या लागतात याची जाण आपणांस असायला हवी. म्हणूनच अन्नाची नासाडी होणार नाही याची महिला सह पुरुषांनी देखील काळजी घ्यायला हवी. अन्नाचा देखील काटकसरीने वापर करायला हवं.
निसर्गनिर्मित असो व मानवनिर्मित असो प्रत्येक वस्तूची बचत करायला शिकणे आणि काटकसरीने वापर करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असायला हवं. 
आजच्या दिवशी तसा संकल्प करून काटकसर करायला प्रारंभ करू या. 
मनस्वी शुभेच्छा ........!

- नासा येवतीकर, स्तंभलेखक

Friday, 16 February 2024

छत्रपती शिवाजी महाराज ( Chatrpati Shivaji Maharaj )

शिवजयंती निमित्ताने प्रासंगिक लेख

महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान :- छत्रपती शिवाजी महाराज

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, सर्वांचे स्फूर्तिस्थान आणि रयतेचा जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही असा एक ही व्यक्ती राज्यात शोधून ही सापडणार नाही. आपल्या राज्यातच नाहीतर देशातील अनेक राज्यात व जगातील काही देशांत शिवाजी महाराजांचे कार्य अनेकांना स्फूर्ती व प्रेरणा देत असते. शिवाजी महाराजांकडे इतर साम्राज्यांच्या तुलनेत छोटी पण सुसज्ज आणि शिस्तबद्ध अशी फौज होती. या फौजेमध्ये मुख्यत्वे मराठा आणि कुणबी जातीचे मावळे समाविष्ट होते. शिवाजी महाराज जाणून होते की मुघलांच्या प्रचंड दारुगोळा व तोफखान्यांनी सज्ज असलेल्या फौजेला पारंपारिक युद्धपद्धतीने हरवणे कठीण होते. त्यामुळे महाराजांनी आपली स्वतःची अशी युद्धनीती विकसित केली, ज्यास ' गनिमी कावा' म्हणून ओळखले जाते. आजूबाजूच्या भौगोलिक प्रदेशाची माहिती आणि येथील दऱ्याखोऱ्यांचे सखोल ज्ञान यावर वेगवान फौज आणि शत्रूला अनपेक्षित हल्ले अशा पद्धतींचा वापर शिवरायांनी केला. ही युद्धनीती अतिशय यशस्वी ठरली. मुघलांच्या मोठमोठ्या फौजा शिवरायांच्या छोटेखानी फौजांसमोर निष्प्रभ ठरल्या. शिवाजी महाराजांच्या गनिमी कावाचा अनेक इतिहास संशोधक आजही अभ्यास करतात, यावरून शिवरायांची युद्धनीतीचे महत्व अधोरेखित होते.
पारतंत्र्याच्या काळात स्वतःचे राज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहणे आणि पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण शिवाजी महाराजांनी सवंगडी असलेल्या मावळ्यांना सोबत घेऊन श्री चे राज्य निर्माण केले आणि इतिहास घडविला. एक आदर्श राजा कसा असतो ? आज्ञाधारक पुत्र कसा असावा ? रयतेचा जाणता राजामध्ये कोणते गुण असावेत ? याचे उत्तम उदाहरण म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राकडे पाहतो. सोळाव्या शतकात होऊन गेलेले राजे शिवाजीचे कार्य आज एकविसाव्या शतकात देखील तेवढेच प्रेरक आणि मार्गदर्शक ठरतात. त्यांनी आपल्या जीवनात अनेक चढ-उतार पाहिले, सुखदुःखाचा अनुभव घेतला, जवळच्या व्यक्तीचा विरह सहन केला, अनेक लढाया त्यांनी आपल्या बुद्धीचातुर्य व सहकार्याने जिंकले आहेत.
शहाजी भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या पोटी पुणे  जिल्ह्यातील  जुन्नर  शहराजवळील वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी एका तेजस्वी बाळाचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यात जन्म झाला म्हणून त्या बाळाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. शहाजी महाराजांना नेहमी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असे त्यामुळे त्यांनी राजमाता जिजाऊ आणि बाळ शिवाजी यांची राहण्याची व्यवस्था पुण्यात केली. राजमाता जिजाऊ यांच्या सान्निध्यात चंद्रकलेप्रमाणे बाळ शिवाजी मोठे होत होते. राजमाता जिजाऊ ह्या एक धाडसी आणि स्वाभिमानी स्त्री होती. त्यामुळे त्यांनी बाळ शिवाजीला लहानपणापासून साहसी व धाडसी लोकांच्या कथा व गोष्टी सांगत असत. प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरू मानल्या जातात. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात. मुलांना संस्कारी व धाडसी करायचे असेल तर प्रत्येक स्त्रियांनी राजमाता जिजाऊ यांचे जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेवायला हवे. लहान मुलांना आई जसे शिकवेल तसे ते मूल घडत राहते. म्हणून जीवनात येणारे सुख, दुःख, सोपे, अवघड, कठीण प्रसंगाचे अनुभव लहान मुलांना द्यायला हवे. पण आजकालच्या माता स्वतः अनेक कष्ट व दुःख सहन करतात पण आपल्या लेकराला काडीचा त्रास होऊ देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये त्या विषयीच्या जाणिवा निर्माण होत नाहीत. माता जिजाऊ यांनी आपले स्वतःचे एक राज्य असावे अशी मनोमन इच्छा होती, तशी ती आपली इच्छा त्यांनी शिवाजी महाराजांकडे व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी बाळ शिवाजीला घोड्यावर बसणे, तलवार चालविणे यासारख्या युद्धकला शिकविल्या. आपल्यापेक्षा मोठ्या लोकांसोबत कसे वागावे ? महिलांसोबत आपले वर्तन कसे असावे ? जीवनातल्या सूक्ष्म घटनांचा त्यांच्या बालमनावर संस्कार केले. याच विचारातून शिवाजी महाराजांनी आपल्या बाळ सवंगड्यासह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. खरोखरच तो किती धाडसी निर्णय होता. आपल्या मावळ्यांच्या सहकार्याने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून घेतला. पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळील अनेक महत्त्वाचे किल्ले ताब्यात घेतले. तसं बघायला गेलं तर शत्रू पक्षात कितीतरी सैनिक होते आणि त्यामानाने राजे शिवाजी यांच्याकडे फार तुल्यबळ सैन्य. पण शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे सैन्य यांच्यात जो आत्मविश्वास आणि धमक होती ती शंभर सैनिकाला पुरून उरणारी होती. म्हणूनच त्यांनी अनेक किल्ले जिंकू शकले. त्यांच्या मावळ्यांच्या यादीत सारेच शूर आणि वीर होते. त्यापैकी काही शूर वीर मावळ्यांचा सेनापतीचा उल्लेख केल्याशिवाय शिवाजी महाराजांचे कार्य पूर्णत्वास गेल्यासारखे वाटत नाही.
शिवाजी महाराज यांच्या शूर वीर मावळ्यांच्या यादीत प्रथम नाव स्मरते ते म्हणजे तानाजी मालुसरे यांचे. 

तानाजी यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या लग्नाची जोरदार तयारी चालू होती. त्याचवेळी कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करण्याची वेळ आली. त्यावेळी तानाजी यांनी आधी लगीन कोंढण्याचे मग रायबाचे असे सगळ्यांना सांगून लढाईसाठी निघून गेले. कोंढण्यावर शत्रूशी चार हात करतांना तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्याची बातमी महाराजांच्या कानावर गेले त्यावेळी महाराज निःशब्द झाले. त्यांच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडले ते म्हणजे ' गड आला पण सिंह गेला.' तानाजी मालुसरे यांच्यासारखे अनेक मावळ्यांची महाराजवर खूप निष्ठा आणि प्रेम होते म्हणून तर आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले. महाराजांचे जीव वाचले पाहिजे म्हणून स्वतःचे जीव अर्पण करणाऱ्याच्या यादीत बाजीप्रभू देशपांडे यांचे स्मरण करणे अगत्याचे ठरते. 

लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे असे म्हणून पन्हाळगडावरून विशालगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घोडखिंडीत बाजीप्रभू यांनी शत्रूला रोखून धरले. जोपर्यंत महाराज गडावर सुखरूप पोहोचत नाहीत तोपर्यंत त्यांनी शत्रूशी चार हात केले. महाराज गडावर पोहोचल्याची तोफ ऐकल्यावरच त्यांनी आपला जीव सोडला. किती ती निष्ठा ! असे जिवाभावाचे मावळे मिळविणे हे खरंच भाग्याची गोष्ट आहे. अफजलखान यांच्या वधाच्या वेळी महाराजांचे अंगरक्षक जिवा महाल तात्काळ धावून गेला म्हणूनच म्हटले जाते होता जीवा म्हणून वाचला शिवा. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे इस्लामी पद्धतीने अंत्यसंस्कार करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली. यावरून शिवाजी महाराजांची आपल्या शत्रूबद्दल असलेला आदर लक्षात येते. शिवाजी महाराजांच्या जीवनात असे अनेक प्रसंग आले ज्यात त्यांच्या मावळ्यांनी आपले जीव अर्पण करून महाराजांचे जीव वाचविले. अनेक शत्रू राज्यांना त्यांनी सळो की पळो करून सोडले. लाखाचा पोशिंदा जगाला पाहिजे असे सर्वांची मनोकामना असायची आणि त्याच विचारातून प्रत्येकजण स्वयंस्फूर्तीने कामाला लागत होते. महाराजांच्या सैन्यात सर्व जाती-धर्माचे व विविध पंथाच्या लोकांचा समावेश होता. सर्वधर्मसमभाव या वृत्तीने महाराजांचे सैनिक कार्य करत असत. राज्यातल्या प्रत्येक व्यक्ती विषयी महाराजांच्या मनात प्रचंड आस्था होती. कोणत्याही व्यक्तीची पिळवणूक होऊ नये, झाडांची कत्तल करू नका, शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान करू नका, स्त्रियांचा सन्मान करा अश्या प्रकारचे आदेश ते आपल्या सैन्याला देत असत यावरून महाराजांची दृष्टी आपल्या लक्षात येऊ शकते. शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी आठ मंत्री असलेले अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. हे मंत्री राजांना राज्यकारभारविषयक कामाविषयी सल्ले देत असे. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. शहाजीराजे व जिजाबाई यांची मुद्रा पारशी भाषेत होती, पण शिवाजी महाराजांनी राजमुद्रेसाठी संस्कृत भाषेचा वापर केला. शिवाजी महाराज दिसायला लहान मूर्ती जरी असली तरी त्यांची कीर्ती खूप महान होती. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा सर्वत्र शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. १६८०च्या एप्रिल महिन्यात वयाच्या ५० व्या वर्षी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम !

- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती पो. येताळा
ता. धर्माबाद जि. नांदेड
पिन - 431809
मोबाईल क्रमांक - 9423625769
Mail ID - nagorao.yeotikar@gmail.com

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...