Friday, 2 September 2022

Active Teachers Award 2022

कै. सायन्ना गुरुजी येवतीकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त राज्यस्तरीय

*ऍक्टिव्ह टीचर्स अवॉर्ड 2022*

या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षकांची यादी

01) राजेश बाबुराव शिंदे, माहूर
02) रवी ढगे, नांदेड
03) राजेंद्र शेळके, बुलढाणा
04) समाधान बोरुडे, जालना
05) राजू गौतम भद्रे, नांदेड
06) राजेंद्र बनसोड, गोंदिया
07) ज्योती रत्नपारखी वालझाडे, नाशिक
08) सारिका आचमे, नांदेड
09) सारिका मद्दलवार, नांदेड
10) नीलम गायकवाड, पुणे
11) वसंत लुंगारे, नांदेड
12) श्रीमती विद्या भडके  अहमदनगर
13) बबन शिंदे, कळमनुरी
14) करतारसिंग ग्यानसिंग अलावत, चंद्रपुर
15) सुभाष वसराम चव्हाण, नागपूर
16) खुशाल किसन डोंगरवार, भंडारा
17) संजय रामचंद्र पवार, रायगड
18) श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड
19) सौ. स्मिता राजेश पाबरेकर, रायगड
20) श्रीमती उषा बाप्पासाहेब ढेरे, बीड
21) बालाजी पेटेकर खतगावकर, नांदेड
22) शरदचंद्र श्रीकृष्ण चटे
23) गायकवाड एन. एस. नांदेड
24) शीतल दिनकर भालेकर, नांदेड
25) चंद्रकांत गायकवाड, मुखेड
26) कविता नरवडे, जालना
27) धनाजी राठोड, हिंगोली
28) अतुल वानखेडे, यवतमाळ
29) जयवंतराव काळे, नांदेड 
30) श्रीराम महाजन, मुंबई
31) उद्धव बडे, बीड
32) लता सुरेश कदम, नायगाव
33) परमेश्वर तिडके, लोहा
34) सुनील वाघुंबरे, अहमदनगर 
35) सुलभा नामदेव सरवदे
36) गुलाब सिसले, यवतमाळ 
37) सौ. दीपाली कुलकर्णी, मुखेड
38) नागोराव डोंगरे, उमरी
39) दिलीप धामणे, हिंगोली
40) अरुण देऊ खांबाळकर, ठाणे
41) संजय खरात, सातारा 

या सर्व स्पर्धकांमधून पाच विजेते निवड करण्यात आले आहेत. त्यांना प्रत्येकी 1001 ( एक हजार एक ₹ ) पारितोषिक आणि डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या पुरस्काराची घोषणा दिनांक 04 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता करण्यात येईल. 


अंगणवाडी ऍक्टिव्ह टीचर्स अवॉर्ड 2022

लता सुरेश कदम, नायगाव

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्राथमिक शिक्षक ऍक्टिव्ह टीचर्स अवॉर्ड 2022

श्री संजय खरात, सातारा

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पदवीधर शिक्षक ऍक्टिव्ह टीचर्स अवॉर्ड 2022

श्री गुलाब सिसले, यवतमाळ

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

माध्यमिक शिक्षक ऍक्टिव्ह टीचर्स अवॉर्ड 2022

श्री सुनील वाघुंबरे, अहमदनगर

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

साहित्यिक शिक्षक ऍक्टिव्ह टीचर्स अवॉर्ड 2022

श्री उद्धव बडे, बीड

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संयोजक :- सुरेश येवतीकर, वरिष्ठ व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, औरंगाबाद


आयोजक :- नासा येवतीकर, 9423625769


सर्व शिक्षक मित्रांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार आणि विजेत्यांचे मनस्वी अभिनंदन ......! 

Wednesday, 10 August 2022

रक्षाबंधन ( rakhi )

*राखी एक अतुट बंधन*

कुटुंबात आई वडिलांनंतर भाऊ बहिणीचे नाते अत्यंत महत्वाचे समजले जाते. आईच्या नंतरचे स्थान म्हणजे  बहिणीचे आहे. आपल्या भावाची खरी काळजी घेणारी ती बहीणच असू शकते. फार पूर्वीपासून या भाऊ आणि बहिणीचे नात्यावर आधारित गोष्टी रुपात बोलले जात आहे. कोणतेही जात असो, धर्म असो किंवा पंथ भाऊ बहिणीचे प्रेम प्रकर्षाने दिसून येते. त्याच भाऊ बहिणीचे एकमेकावरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन हा सण होय.
हा सण साजरा करण्यामागे पौराणिक दंतकथा सांगितली जाते. एकदा श्रीकृष्णाच्या करंगळीला दुखापत झाली आणि रक्तस्राव होऊ लागला. त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला बहिण सुभद्रा आणि पाच पांडवाची धर्मपत्नी द्रोपदी उभे होत्या. हे पाहून सुभद्रा कुठे चिंधी सापडते काय म्हणून इकडे तिकडे शोध सुरु केली होती. त्याच वेळी द्रोपदीने मागेपुढे कसलेही विचार न करता आपल्या अंगावरील भरजरी साडीचा पदर टर्रकन पाडून श्रीकृष्णाच्या करंगळीला बांधली तो दिवस म्हणजे रक्षाबंधन. तेंव्हा श्रीकृष्णानी द्रोपदीला वचन दिले की संकट काळात माझी आठवण कर मी मदतीला नक्की येईन. तसे वचन त्यांनी पाळले देखील. ज्यावेळी भर सभेत दुःशासन द्रोपदीचे वस्त्रहरण करण्यासाठी अंगावर हात टाकला त्यावेळी द्रोपदी मनोमन आपला भाऊ श्रीकृष्ण यांच्या धावा केल्या तेंव्हा श्रीकृष्णानी द्रोपदीला वाचविले. महाभारतातील हा प्रसंग आपणास चांगली शिकवण देतो की, बहिणीने भावाला साथ द्यावी आणि भावाने बहिणीची संकट काळात संरक्षण करण्याचे वचन नेहमी लक्षात ठेवावी.
आज देशात मुलींचे अपहरण, मुलींवर होत असलेले बलात्कार, विनयभंग आणि मुलींचे छेडछाड या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यास विविध कारण देखील आहेत. महिलांना सायंकाळी सहाच्यानंतर घराबाहेर पडणे मुश्किल बनले आहे. तेंव्हा या उत्सवाच्या निमित्ताने समाजात एक चांगला संदेश जायला हवे. आपली अर्धांगिनी म्हणजे बायकोला सोडून बाकी सर्व माझ्या बहिणी आहेत ही भावना प्रत्येकांच्या मनात निर्माण होणे आवश्यक आहे. पर स्त्री माते समान हे धोरण राजे शिवाजी महाराजाच्या कारकिर्दीत सर्वानी पाळले याचा इतिहास आपण वाचन करतो मात्र प्रत्यक्षात आपली वागणूक शून्य असते. आपण स्वतः आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.

शाळेत असताना भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा रोज शपथेप्रमाणे घेतो. मात्र त्याचे अनुकरण प्रत्यक्षात करीत नाही. एका रक्ताचे भाऊ बहिणीनी प्रमाने रहावे यात काही वाद नाही मात्र समाजातील इतर मुलींदेखील माझ्या बहिणी आहेत असे जोपर्यंत समाजातील मुले म्हणणार नाहीत तोपर्यंत रक्षाबंधन सण खऱ्या अर्थाने साजरी केली असे होणार नाही. अगदी लहान वयापासून मुलांना आपल्या प्रत्येक बहिणीचे संरक्षण करण्याची जबाबदारी शिकविणे गरजेचे आहे. समाजातील अनिष्ठ प्रथा बंद करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या घरातील मुलांवर योग्य संस्कार टाकणे ही काळाची गरज आहे घराघरात भाऊ ज्या प्रकारे आपल्या बहिणीची काळजी घेतो तशी परिसरातील, गावातील, शहरातील, राज्यातील नव्हे देशातील मुलींची काळजी भावाने घेणे आवश्यक आहे. एखाद्या विवाहित स्त्रीला आपल्या पतीचा खुप मोठा आधार असते. स्वामी समर्थ यांच्या उक्तीनुसार 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ' पती सदैव पत्नीच्या पाठीशी प्रत्यक्षात नसून देखील असल्याचा विश्वास असतो. तसे प्रत्येक मुलींना आपल्या भावाचा विश्वास निर्माण व्हावे असे वातावरण तयार करायलाच हवे.
आपल्या पारंपरिक पध्दतीनुसार असे विविध सण येतात, आपण मोठ्या आनंदात साजरी करतो. सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते पण तो आनंद दीर्घकाळ टिकून राहत नाही. कारण आपल्या मधलाच एक भाऊ दुसऱ्या एका बहिणीवर अत्याचार करतो. निर्भया सारखे प्रकरण घडते. तिचे जीवन बरबाद करून टाकतो. क्षणभराच्या सुखासाठी राक्षस बनतो आणि तिच्या संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी करतो. हे कुठे तरी थांबले पाहिजे आणि हे निश्चितपणे थांबू शकते. त्यासाठी प्रत्येक भावाने एक शपथ घ्यायला हवी की ' मी कोणत्याही स्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहणार नाही. सर्व मुली माझ्या आई- बहिणी समान आहेत. हे परमेश्वरा माझ्या डोक्यात शुध्द आणि चांगले विचार येऊ दे.' असा विचार करून जो भाऊ रक्षाबंधन साजरी करीत आहे त्याच्या मनात यावर्षी एक वेगळीच भावना असेल एवढे मात्र निश्चित. आज समाजात सर्वत्र दु:शासन तयार होत आहेत तेंव्हा परत एकदा श्रीकृष्ण निर्माण होणे गरजेचे आहे, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती पो. येताळा
  ता. धर्माबाद जि. नांदेड
  9423625769

Monday, 8 August 2022

क्रांती दिन ( kranti din )

                 ।। क्रांती दिन ।।

नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस सालाला
चले जाव हा नारा दिला इंग्रज सरकारला

सर्व भारतीयांना दिली स्वातंत्र्यतेची हाक
क्रांतीच्या मशाली पेटल्या गावोगावी लाख

करू किंवा मरू संदेश दिला गांधीजीनी
अहिंसेचा मार्ग स्वीकारला नागरिकांनी

हजारो आंदोलकांनी दिली प्राणाची आहुती
देशासाठी शहीद झालेल्याची पसरली कीर्ती

इंग्रजी सत्तेविरुद्ध संपूर्ण देश उठला पेटून
सामील झाले सारेच धर्म जात वंश सोडून

महात्मा गांधीजीना केले अटक इंग्रजानी
उद्रेक झाला सर्वत्र देश पेटविला लोकांनी

या दिनामुळेच स्वातंत्र्याची उगवली पहाट
साऱ्या देशभर पसरली स्वातंत्र्याची लाट

अश्या हुतात्म्यांचा आज आहे स्मृतिदिन
आंदोलनाला म्हणती ऑगस्ट क्रांती दिन

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, 
कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Monday, 11 July 2022

सोपे की अवघड ( mulanshi gappa )

मुलांशी गप्पा भाग - 1
सोपे व अवघड प्रश्न

आज शाळेतल्या मुलांना काही प्रश्न विचारल्यावर बहुतांश मुलांनी उत्तरे दिली. त्यात अर्धे बरोबर होते तर अर्धे चुकलेले होते. मुलांना यावर एक संशोधनात्मक प्रश्न विचारलं की, काही प्रश्नाचे उत्तर तुम्ही बरोबर दिलात ते कसे काय ? सर्व मुलांनी एका सुरात उत्तरं दिली, ' सर, ते सोपे प्रश्न होते.' त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलं की, काही प्रश्नांचे उत्तर चुकले ते कसे काय ?यावर मुलं म्हणाली, ' सर, ते अवघड प्रश्न होते. ' यावर मी मुलांना बोलते करण्यासाठी पुढचा प्रश्न विचारलं की, प्रश्न सोपे आहे की अवघड कश्यावरून ठरवता ? त्यावर वर्गातील चुणचुणीत आणि हुशार मुलीने उत्तर दिलं की, ' ज्या प्रश्नांचे उत्तर आम्हाला माहीत असते ते सोपे आणि जे माहीत नसते ते अवघड.' तिच्या उत्तरावर तिला शाबासकी देऊन तिलाच प्रतिप्रश्न विचारलं की, ' काही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला माहित होते आणि काही माहीत नव्हते, याचा अर्थ काय ? ' त्यावर ती मुलगी म्हणाली, ' ज्या प्रश्नांचे आम्ही उत्तर दिलोय ते प्रश्न आम्हांला कधी ना कधी विचारले जायचे त्यामुळे ते पाठ झाले किंवा माहीत झाले. ' तिची जिज्ञासा जाणून घेण्यासाठी पुढचा प्रश्न विचारलं की, ज्या प्रश्नांचे उत्तर माहीत नाही ते कसे मिळवाल ? यावर ती जरा विचारात पडली. काय उत्तर सांगावं याचा ती विचार करू लागली. पूर्ण विचार करून ती म्हणाली, ' सर, वाचन करावे लागते.' यावर मी म्हणालो, अगदी बरोबर, आपणाला जास्तीची माहिती मिळविण्यासाठी वाचन करावे लागते. वेगवेगळी पुस्तकं, मासिकं आणि वर्तमानपत्र वाचावे लागतात. त्यामुळे आपणाला खूप काही माहिती मिळते. शाळेत जे काही ज्ञान मिळते त्याही पलीकडचे ज्ञान मिळवायचे असेल तर अवांतर वाचन करत राहावे लागते.
 तसेच सर्व प्रश्न सारखेच असतात, ज्या प्रश्नांचे उत्तर आपणाला माहीत असतात ते सोपे वाटतात तर ज्या प्रश्नांचे उत्तर आपणाला माहीत नसतात ते अवघड वाटतात. सर्वच प्रश्न सोपे वाटावे असे जर वाटत असेल तर खूप वाचन करावे आणि आपल्या डोक्यात खूप माहिती साठवून ठेवावी. ही क्रिया एका तासात, एका दिवसात, एका महिन्यात किंवा एका वर्षात पूर्ण होणारी नाही. त्यासाठी अविरत आणि निरंतर वाचन करणे आणि आपल्या माहितीमध्ये वाढ करत राहणे आवश्यक आहे. मनुष्य हा आजीवन विद्यार्थी आहे असे का म्हणतात ? तर ते यामुळेच. तेव्हा मुलांनो ज्ञान समृद्धी मिळविण्यासाठी काय कराल ? यावर मुलांनी जल्लोषात उत्तर दिलं ' वाचन ' आजपर्यंत जी व्यक्ती जीवनात आपले नाव कमावले आहे ते फक्त वाचन केल्यामुळे. तेव्हा भरपूर वाचन करून आपण ही समृद्ध होऊ या ....!  

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पूर्ण लेख वाचन केल्याबद्दल धन्यवाद .....! 

आपल्या प्रतिक्रिया व्हाट्सअप्प द्वारे जरूर कळवावे. 

Wednesday, 15 June 2022

भूक लघुकथा ( bhook )

भुकेले पोट - (लघु कथा)
 
एक दहा वर्षांचा मुलगा राधाच्या गेटजवळ खेळत होता. राधा बाहेर आली आणि ओरडली " हे काय आहे रे ?" 
"मावशी, मी तुमच्या बागेला स्वच्छ करू का?" 
"नाही, करू नको, काही गरज नाही." 
मुलगा हात जोडून अगदी करुणाजनक स्थितीमध्ये, "कृपया करून घ्या ना, मी ते चांगले स्वच्छ करीन." 
"बरे, ठीक आहे, किती पैसे घेशील ?" 
"पैसे वगैरे काही नको, मला खायला द्या." "ओह! ठीक आहे." "गरीब भुकेला दिसतोय, मी तुला प्रथम जेवण देतो."  राधा म्हणाली
"ए पोरा ! अगोदर जेवून घे, मग काम कर." "नाही, मावशी, सर्वप्रथम मी काम करतो, मग  मला खायला दे." 
"ठीक आहे!" असे म्हणत राधा तिच्या कामाला गेली. 
एका तासांनंतर, "मावशी, पहा आपल्या बागेची स्वच्छता चांगली आहे की नाही". 
"ओह, वाह! तु उत्तम सफाई केली आहेस, आणि साहित्य देखील एकत्र गोळा केले आहेस
" इथे बस, मी जेवण आणतो. " राधाने त्याला जेवण दिले. तेवढ्यात तो आपल्या खिशातून एक चिंधी काढली आणि त्यात बांधून घेऊ लागला. " मी एका भुकेल्या मुलाला काम दिले आहे, अरे इथेच खा जर तुला अजून लागत असेल तर मी अजून देईन" 
"नाही मावशी, माझ्या घरी माझी आई आजारी आहे, सरकारी हॉस्पिटलमधून मोफत औषध मिळाले,  परंतु डॉ. म्हणाले की जेवल्याशिवाय गोळ्या-औषध घेता येणार नाही." 
हे ऐकून राधा रडू लागली .. आणि स्वत: च्या हातांनी, त्या मुलाची दुसरी आई बनून त्यास जेवू घातले.  मग ... तिच्या आईसाठी भाकरी तयार केली .. आणि त्याच्याबरोबर घरी जाऊन त्याच्या आईकडे भाकरी दिली आणि ती म्हणाली ... "बहीण, तू खूप श्रीमंत आहेस .. तु तुझ्या मुलाला जे काही दिले आहे ते आम्ही आमचा मुलांनाही देऊ शकलो नाही स्वावलंबी जीवनाची शिकवण .....✍🏻 

( मला आवडले म्हणून आपल्याशी share केले ) 
आपण समाजातील / गटांना अशा लहान आणि शैक्षणिक गोष्टी सांगून समृद्ध भारत घडवू या. 

Translate : नासा येवतीकर, धर्माबाद

Friday, 18 February 2022

राजे शिवाजी ( Raje Shivaji )

चला, राजे शिवाजी होऊ या ....!


महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलेला काळ म्हणजे छत्रपती राजे शिवाजी महाराजांचा काळ होय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला राजे शिवाजी महाराज यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या नावाचा जयजयकार आज ही घराघरातून केला जातो. सर्वधर्मसमभाव म्हणजे काय असते ? याची शिकवण त्यांनी आम्हांला दिली आहे. त्यांच्या राज्यकारभारात प्रत्येक जातीचा, धर्माचा आणि पंथाच्या व्यक्तीला समान हक्क, अधिकार आणि कर्तव्य होते. त्यांच्यासमोर प्रत्येक व्यक्ती हा समान होता. परस्त्री त्यांना माते समान होती. ही सारी शिकवण त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांनी त्यांच्या मनावर लहानपणापासून बिंबवले होते. रामायण आणि महाभारतातल्या साहसी व शूरवीर गोष्टी सांगून त्यांना जिजाऊ यांनी धाडसी बनविले होते. आजच्या काळातील प्रत्येक आईला राजमाता जिजाऊ बनणे आवश्यक आहे. आज आजूबाजूला अनैतिक कृत्य होतांना पाहून आपण माणूस आहोत याची घृणा वाटते. एवढं हिंसक आणि पशु प्रमाणे कृत्य आजकाल घडत आहे. आज घराघरांत एक जिजाऊ पाहिजे आहे शिवबा सारखा मुलगा घडविण्यासाठी. आपल्या सहकारी मावळ्यांवर असलेलं त्यांचे प्रेम आणि विश्वास, ज्याच्या बळावर त्यांनी स्वराज्य स्थापन केले. तगड्या मुघलांच्या विरोधात पाच पन्नास मावळे घेऊन युद्ध करणे म्हणजे साधी व सोपी गोष्ट नव्हे. त्यासाठी हिंमत लागते आणि तेवढा आत्मविश्वास देखील लागतो. शक्तीपेक्षा युक्ती कधी ही श्रेष्ठ असते याचे अनेक उदाहरणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात पाहण्यास मिळतात. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतांना एकवार त्यांच्या चरित्रात जाऊन पहावं, एकदा आपण ही शिवाजी होऊन पहावं. त्यांनी राज्यातील लोकांची इतकी काळजी घेतली होती की, प्रत्येक व्यक्ती राजावर निस्सीम प्रेम करत होते. निसर्गाची काळजी घेताना त्यांनी वाळलेली झाडे तोडावी असा आदेश दिला होता. तसेच शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान होणार नाही याची काळजी देखील त्यांनी घेतली. जनतेचे इतके हितचिंतक राजे यापूर्वी कधी झाले नाही आणि पुढे होणार देखील नाहीत. राजे शिवाजी यांचे बालपण आणि तरुणपण या दोन काळात त्यांनी संघर्षमय जीवन जगले. त्यांना आईचे प्रेम भरपूर मिळाले. त्यांच्या आईमुळे राजे शिवाजी घडले. परिस्थिती माणसाला शिकविते आणि घडविते हे देखील राजे शिवाजी यांच्या चरित्रावरून आपणांस कळते. जिवाभावाचा माणूस आपणाला सोडून गेल्यावर काय दुःख होते हे बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे या सारख्या मावळ्यांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराज किती शोकसागरात बुडाले होते, हे डोकावून पाहिल्यावर कळते. शिवाजी महाराजांचे पुस्तक वाचून किंवा त्याच्यावरील सिनेमा पाहून त्यांची प्रतिमा हृदयात घ्यायला हवं आणि तसे कार्य करायला हवं. हरहर महादेवची गर्जना म्हणजे काम फत्ते करण्याची हमी होती. तेच कार्य आपणाला घेऊन जायचं आहे. चला तर मग प्रत्येकजण शिवाजी महाराज होण्याचा प्रयत्न करूया, हीच शपथ शिवजयंतीच्या निमित्ताने घेतली तर त्यांना खरी आदरांजली ठरेल.


आमचे दैवत आहेत छत्रपती

आम्हांला नाही कुणाची भीती


- नागोराव सा. येवतीकर

स्तंभलेखक तथा विषय शिक्षक

कन्या शाळा धर्माबाद

9423625769

Sunday, 21 November 2021

शाळेचा पहिला दिवस ( 1st Day School )

प्रिय शिक्षक मित्रांनो, 
 🙏 नमस्कार

आपल्यासाठी एक खास उपक्रम आहे. आपण सध्या शिक्षक म्हणून कार्य करीत असाल किंवा सेवानिवृत्त देखील झाला असाल. 
पण आपली शिक्षक म्हणून नेमणूक झाल्यावर शिक्षक म्हणून

शाळेचा पहिला दिवस
याविषयी काही आठवणी आपणांस इतरांना सांगायचं आहे. चला तर मग आपल्या आठवणी 500 शब्दमर्यादेत मला खालील क्रमांकावर whatsapp वर पाठवा. 

● आपल्या आठवणी text स्वरूपात पाठवावे. 

● सोबत त्यावेळेचा एखादा फोटो असेल तर पाठवावे. 

● पासपोर्ट आकाराचा आपला फोटो पाठवावे. 

● आपल्या सर्वांच्या सहकार्याने जमल्यास संकलित सर्व लेखांचा एक सुंदर पुस्तक काढू या.


◆ आपण या उपक्रमास भरभरून प्रतिसाद द्याल ह्या अपेक्षेसह आपल्या लेखाची प्रतीक्षा आहे. 

आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

आपल्या शिक्षक मित्रांपर्यत ही पोस्ट जरूर पाठवावे. Share plz
•••••••••••••••••••••••••••••••••••••
माझ्या नोकरीची पहिली शाळा

पावसाळ्याचे दिवस होते. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. सकाळी सातची वेळ आणि मी साखर झोपेत होतो. तशी घरातील फोनची घंटी वाजली ट्रिन ट्रिन, बाबानी फोन उचलले. तिकडून माझे मोठे बंधू बोलत होते त्यांनी म्हटले की, मला शिक्षकांची नोकरी लागली. हे ऐकून मला खुप आनंद झाला पण थोड्या वेळात कळले की, किनवट तालुका मिळाला. हे ऐकल्याबरोबर मी खिन्न झालो. किनवटला मी नोकरी करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती. कारण किनवट म्हणजे पूर्ण जंगली परिसर, त्यातल्या त्यात नक्षलवादी विजयकुमार यांच्या सर्व कारवाया मी वाचून होतो. घरापासून 200 किमी दूर या सर्व बाबीचा विचार करताना अंगावर काटा उभा राहायचा. त्यामुळे किनवट तालुक्यात नोकरी करणार नाही यावर मी ठाम राहिलो. पाच-सहा दिवस उलटले. घरातल्या सर्वानी माझी समजूत काढली. जाऊन फक्त रुजू होऊन ये त्यानंतर आपण एका महिन्यात बदली करू असा विश्वास दाखविला त्यामुळे मी जाण्यास तयार झालो. अखेर 10 ऑगस्ट रोजी किनवटला जाण्यास सकाळी निघालोत दुपारी बारा-एक वाजेपर्यंत किनवटला पोहोचलोत आणि पंचायत समिती मध्ये पत्र दिलोत. सोबत बाबा होतेच. त्यादिवशी ऑफिस मध्ये गटशिक्षणाधिकारी साहेब नसल्यामुळे लॉजवर रात्र काढावे लागले. त्या ठिकाणी माझा वर्गमित्र चंद्रकांत नोमुलवारची भेट झाली तेंव्हा थोडे बरे वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ऑफिस गाठले. त्या दिवशी दुपारी अनंतवाडी संकुलातील प्राथमिक शाळा अजनी या शाळेचे आदेश मिळाले. त्याच ऑफिसमध्ये एक दोघांना या शाळेविषयी आणि केंद्राविषयी विचारणा केली असता ते गाव कोणालाही माहित नव्हते. माझं काळीज धस्स केलं. इथल्या लोकांना हे गाव माहित नाही, कोणत्या जंगलात आहे की, असा विचार मनात डोकावला. तेंव्हा स्वतः गटशिक्षणाधिकारी साहेब श्री शिवाजीराव खुडे यांनी त्या गावाची माहिती दिली, अंनतवाडीला कुपटी असे म्हणतात हे त्यांनी सांगितले आणि बस स्टैंडला जा तेथे तुम्हाला गाडी मिळेल त्या गाडीने तुमच्या शाळेच्या फाट्यावर उतरा. मी आणि बाबा निघालो. बस स्टैंडवर बरोबर अडीच वाजता दत्तमांजरी बस लागली. त्या बसमध्ये बसलो आणि बस शाळेच्या रस्त्याने झाडे मागे टाकित, धुरळा उडवित जाऊ लागली. मी प्रत्येक गाव आणि परिसर पाहू लागलो तसे मला धडकी भरु लागली. लोकांचे राहणीमान, त्यांचे बोलणे, वागणे सर्व वेगळे वाटत होते. कारण मी यापूर्वी कधी ही हा भाग बघितला नव्हता. अखेर माझ्या शाळेचे गाव आले. आम्ही खाली उतरणार तोच त्या शाळेचे मुख्याध्यापक बसमध्ये चढले. त्यांनी परत त्याच बसमध्ये बसायला सांगितले. त्यापुढच्या वझरा शे.फ. गावात आम्ही उतरलो. आमची सर्व कहाणी सांगितली. ते खरंच आम्हांला देवमाणूस वाटला कारण त्यांनी त्या दिवशी त्यांच्या घरीच राहायला आणि झोपायला जागा दिली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 ऑगस्टला मुख्याध्यापक, बाबा आणि मी सकाळी सकाळी शाळेवर जाण्यास निघालो. तोच हा सुवर्ण दिवस, ज्या दिवशी माझ्या नोकरीला सुरुवात झाली. सर्व परिसर पाहून माझ्या मनात विलक्षण भीती भरली होती. मुख्य रस्त्यापासून दोन किमीमध्ये शेताशेतातून त्या शाळेला रस्ता होता. आजुबाजुला जंगल, खुप भीती वाटत होती. मनात पक्का निर्धार केलो की, काही झाले तरी येथे नोकरी करायचे नाही. आत्ता नाही तर पुढील वेळी आपणांस नक्की नोकरी मिळेल. अर्धा तासाच्या पायपीटनंतर शाळेत पोहोचलो. जेमतेम 50 कुटुंब असलेले ते गाव. सर्व घरे सागवानच्या लाकडापासून बांधलेले, मातीचा लेप, एक किंवा दोन घरे पक्की होती. शाळा नशिबाने एकच खोली होती पण पक्की होती. सर्व चिमुकली मुले मुख्याध्यापकांची वाट पाहत उभी होती. ती मुले मला वेगळीच दिसू लागली. आपल्याकडची गोरी गोमटी आणि टापटीप स्थिती मधील मुले माझ्या डोळ्यासमोर होती. बाबांना आणि मला ती मुले निरखुन पाहू लागली. तो दिवस असा तसा संपला. सायंकाळी बाबा गावाकडे निघुन गेले. मी मुख्याध्यापकाच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहिलो. दोन दिवसांनी स्वातंत्र्य दिवस होता. तो दिवस झेंडावंदन करून घरी जाण्याचा नियोजन बाबांनी सांगून गेले होते म्हणून मी झेंडावंदन झाले की दुपारच्या बसने माझ्या गावी घरी आलो. घरी यायला रात्र झाली. घरी आल्यावर रात्रभर रडत बसलो आणि निर्णय दिला की मी त्या शाळेवर नोकरी करणार नाही. दोन दिवस घरी राहण्याची सुटी घेतलो होतो. पण पाच दिवस संपले मी शाळेला गेलोच नाही. पाचव्या दिवशी रात्री परत घरातील सर्वानी मला समजावून सांगितले. नोकरीचे मला काही वाटत नव्हते. माझ्या अभ्यासावर आणि मेहनतीवर मला विश्वास होता. मी कसे ही करून नोकरी मिळवू शकतो याची खात्री होती. ( पण आज वाटत आहे की, मी खरंच खूप मोठी चूक करणार होतो. ) पण बाबांना ही मिळालेली नोकरी सुटु नये असे वाटत होते. सात दिवसानंतर परत एकदा बाबामाझ्या सोबत आले. त्यांनी मला एक खोली घेऊन दिली, सर्व साहित्य घेऊन दिले, त्यांनी दोन दिवस माझ्यासोबत राहिले. मी एकदा तिथे रूळलो की बाबा परत गावी निघून गेले. हळूहळू मला त्या शाळेचा आणि परिसराचा लळा लागला आणि मी त्या दुर्गम शाळेत पाच वर्ष सेवा दिली. त्या शाळेने मला जीवनातील अनेक कडू-गोड अनुभव दिले. त्या गावातील मंडळी मला आज ही आठवतात, आमचे अध्यक्ष रमेश, जायभाये परिवार, अंगणवाडीचे भंडारे ताई, माझे मुख्याध्यापक डी. बी. शेख, बालाजी रेनगुंटवार, जगन्नाथ दिंडे, माधव बाभळे, मोरेश्वर गायधने, अहमद मुल्ला, तेंव्हाचे केंद्राचे मुख्याध्यापक व्ही. बी. सोरते, अशोक गायकवाड, संजय कांबळे, संजय कळसकर, मारोती चोंडीकर, केरबा उमाटे,मंगेश हानवते, दिगंबर शेंगेपलू, स्व. सुभाष कराड, असे अनेक चांगले जिवाभावाचे मित्र दिले. माहूर शहरात ज्यांच्या घरी किरायाने राहत होतो ते सुभाष जाधव आणि परिवार यांचा स्नेहही स्मरणात आहेच. कुपटी गावात ज्यांनी मला त्यांच्या कुटुंबात एका परिवारातील सदस्यांसारखे प्रेम दिले ते संपूर्ण टेकाळे परिवार, ज्यांच्या घरी किरायाने होतो ते डॉ. सातव परिवार आणि कदम परिवार यांनी खरा आधार दिला. रिकामा वेळ गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्यात घालवत असे. त्या सर्व मित्रांची आज ही आठवण कायम स्मरणात आहे. यापैकी कोणाला ही विसरणे अशक्य आहे. आज मला राहून राहून वाटते की, कदाचित तेंव्हा मी त्या शाळेला धुडकावलो असतो तर आज मी जसा आपणास दिसतो आहे तसा राहिलो नसतो, नक्की वेगळाच भेटलो असतो. माझ्या पहिल्या शाळेची ही आठवण मी जीवनभर विसरु शकत नाही. आज 12 ऑगस्ट रोजी माझ्या नोकरीला 21 वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने केलेली एक आठवण
  1. - नागोराव सा. येवतीकर
    प्राथमिक शिक्षक
    मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड

  2. •••••••••••••••••••••••••••••••••••
19/11/2001

... शाळेचा पहिला दिवस.!
जि प नांदेड ची प्रा शा करोडी ची ऑर्डर मिळाली आणि आनंदाने मोठ्या दादाने 18 तारखेस उमरखेड येथे रूम घेऊन दिली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी नागचौकात येऊन शाळेला जाण्यासाठी काही ऑटो, जीप मिळते का पहायला लागलो,तर कळले तिकडे जाण्यासाठी आपल्याला दोनच साधन आहेत. एक तर पायी किंवा सायकलवर! त्यावेळी मोटार सायकल थोडी दुर्मिळच होती.
... पर्याय नव्हता , सायकल टॅक्सी दुकानाशिवाय!
  ...खरी मजा इथून सुरू झाली.
.... टॅक्सी दुकानवाला ओळख नसल्यामुळे सायकल द्यायला तयार नाही.! ... आणि ओळखीचे तर कुणीच नव्हते पूर्ण शहरात!
      काय करावे कळेना... शेवटी त्यांना माझी नेमनुक ऑर्डर, मार्कमेमो असली सगळी कागदपत्रे त्यांना दाखविली...शेवटी हो नाही म्हणता म्हणता ते दुकानदार तयार झाले! पण त्यांनी अट घातली,की एक मार्कमेमो त्यांनी ठेऊन घेतला, सायकल संध्याकाळी परत आणून दिल्यावर परत देणार!..आणि 8 तासाचे 20 रुपये  लागतील असे सांगितले... मला पर्याय नव्हता..

.... ती टॅक्सी त्यादिवशी नेली ... परत शाळा सुटल्यावर परत केली.. त्यावेळी मी जॉईन झालेल्या शाळेतील माझे ज्येष्ठ सहकारी श्री पठाण सर यांनी त्या सायकल वाल्यास ओळख करून दिली आणि माझा मार्क मेमो परत घेतला...

... त्या दिवशी आमचे मोठे बंधू गजूदादास ही हकीकत STD बूथ वरून फोन करून सांगितली आणि रोज 20 रुपये म्हणजे खूप खर्च होईल !
  ... दादा दुसऱ्या दिवशी आले आणि ही सायकल घेऊन दिली !... सायकलचा प्रश्न तर सुटला आणि त्यापेक्षा रेंजर सायकल वापरण्यास मिळण्याचा आनंद खूप झाला!!

.... खरं सांगतो त्यानंतर मोटारसायकल , कार  घेतल्या बदलल्या पण जो आनंद 20 नोव्हेंबर2001 रोजी मिळाला तसला आनंद पुन्हा नाही!! 

...ही सायकल ,आणि मी जॉईन झाल्यानंतर पहिल्यांदा ज्या बॅच ला शिकविले ती बॅच आठवणीत असते नेहमीच!!

.......इतर वाहनांच्या पावत्या कुठे पडल्या असतील, पण 20 वर्षांपासून जपून ठेवलीय ही पावती !!
    .... या पावतीसोबत माझ्या जि प मधील सेवेला 20 वर्ष पूर्ण !!! 😊😊

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...