Thursday 1 April 2021

बेरोजगारी

बेरोजगारी 
सर्वात जास्त बेरोजगारी कोठे भारतात आढळून येते. वास्तविक पाहता काम करण्यासाठी येथे येथे उद्योगधंदे, कारखाने आणि आणि शेती आहे. मात्र येथील प्रत्येक नागरिक गलेलठ्ठ पगारीची नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करत राहतो. एवढं प्रयत्न करत राहतो की त्यात त्याचे कमावण्याचे वय निघून जाते. शरीराला आळस प्रिय बनलेला असतो मग कोणतेही काम करावेसे वाटत नाही. थोडं काम केल्यावर भरपूर पगार मिळाव असे त्याला वाटते. नोकरी मिळाली नाही म्हणून तो हताश होतो, नाराज होतो, स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतो आणि गैरमार्गाला लागतो. गुटखा खाणे, दारू पिणे ई. गैर मार्गामुळे तो पूर्णतः वाया जातो. त्याऐवजी स्वतःच्या डोक्यातील कल्पना व विचाराने छोटा-मोठा उद्योग चालू करून चार पैसे मिळवले तर बेरोजगारी समाप्त होऊ शकते. मात्र मोठे स्वप्न आणि मोठी आशा यामुळे नेहमीच निराशा पदरात पडते. यावर बेरोजगार युवकांनी विचार करावे.

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...