Wednesday, 22 July 2020

लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने काव्य सुमनांजली

लोकमान्य टिळक 
रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव
तेथे जन्मले केशव पण बाळ हे टोपणनाव

शिक्षक वडीलांचे नाव होते गंगाधर पंत
त्यांच्या जीवनात नव्हते कशाचेही खंत

शालेय जीवनात आवडीचा विषय गणित
चुकीचे आदेश ते कोणाचेही नाही मानीत

पुण्यात भेटले त्यांना गोपाळ आगरकर
मराठा केसरी वृत्तपत्रातून केला लोकजागर

इंग्रजा विरोधी लोकांत करण्या जनजागृती
सुरू केली त्यांनी गणेशोत्सव शिवजयंती

त्यांचे क्रांतीकारी विचार होते खूप जहाल
म्हणूनच ते वागले नाही कधीच मवाळ

मंडालेत त्यांना कारावास भोगावा लागला
गीतारहस्य ग्रंथ तिथेच लिहिण्यात आला

सूर्याचे पिल्लू पदवी दिली त्यांच्या गुरूंनी
लोकमान्य ही उपाधी दिली भारतीयांनी

सिंहगर्जना केली आणि दिला त्यांनी मंत्र
स्वराज्य मिळविण्या सांगितला अनोखे तंत्र

प्रखर विरोध केला जुलमी गोऱ्या इंग्रजाना
असंतोषाचे जनक पदवी मिळाली त्यांना

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे तेच खरे रत्न
स्वातंत्र्यासाठी त्यांनी केले अनेक प्रयत्न

तेवीस जुलै रोजी त्यांची असते जयंती
वंदितो त्यांच्या कार्याला लावूनी पणती

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
9423625769

1 comment:

  1. खूप छान कविता कोटी कोटी प्रणाम

    ReplyDelete

अक्षय्य तृतीया ( Akshayya Trutiya )

      अक्षय तृतीया : शुभ मुहूर्त हिंदू संस्कृतीत मुहूर्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य करायचे म्हणजे त्यासाठ...