Saturday 18 November 2017

चारोळी संग्रह - चौकार

आला श्रावण श्रावण
घेऊन आनंदाचे क्षण
पाहून हिरवळ चहूकडे
तृप्त झाले माझे मन

आपल्या माघारी ही
आपलं गुण गान व्हावं
जातीधर्माच्या पल्याड
अशी आपली मैत्री असावं

वाचन करावे रोज म्हणजे
डोळ्याला मिळतो व्यायाम
खुप माहिती तर मिळतेच
सोबत मेंदुला मिळतो आयाम

पटसंख्या किती ही असो
शाळा बंद व्ह्ययलाच नको
सारे शिकूया पुढे जाऊया
ब्रीद शिक्षणाचे विसरायला नको

सोबत असते तुझी तेंव्हा
रात्र अशी सहज संपते
पण नसतेस जेंव्हा तू
रातभर जागरण होते

प्रत्येकाचे असते एक स्वप्न
असावे सुंदर आपले घरटे
त्याचसाठी सारी धडपड
शक्य नाही करणे ते एकटे

कीर्तनात रंगले गुरुजी
हातात त्यांच्या टाळ
त्यागून सारा मोह त्यांनी
गळ्यात घातली माळ

भेटले चार जुने मित्र
काढल्या जुन्या आठवणी
बोलताना एकमेकांच्या
डोळ्यात आले पाणी

कुणाची स्तुती केली की
ते लगेचच मित्र बनतात
त्यांच्या उणीवा दाखविल्या की
कैलेंडर सारखे चित्र बदलतात

शेतकऱ्यांच्या नशिबात पहा
नेहमी रांगच रांग लिहिले आहे
नोटबंदीमुळे बेहाल झाले होते
पीक विमासाठी मरण पाहिले आहे

जीवनात येतील अनंत अडचणी
पण मुळीच घाबरायचे नाही
आपलीच कल्पना सर्वोत्तम
इतरांचे मुळीच वापरायचे नाही

पूर्वीच्या काळी दप्तरात
पाटी न कलम असायचे
दप्तराचे ओझे नाही की
पायात चप्पल ही नसायचे

सूर्य गेला अस्ताला
अंधार झाला सारीकडे
चंद्र निघाले फिरायला
प्रकाश पसरला सगळीकडे

जो शिकवितो तो गुरु
जो ज्ञान देतो तो गुरु
आंधळ्याची काठी होऊन
सर्वाना आधार देतो तो गुरु

हातात धरून लेखनी
गिरवित असतो अक्षर
जीवनाचे धडे मिळती
जर झालो मी साक्षर

मी सुध्दा एका
शाळेचा शिक्षक आहे
विद्यार्थ्याच्या आयुष्याचा
मी रक्षक आहे

अन्न, वस्त्र निवारा
जीवनाचा सहारा
याचसाठी लोकांचा
होतो कोंडामारा

रोजच्या भेटी
प्रेम वाढवी
वर्तणुकीचे नवे
धडे शिकवी

आज जगात उरली नाही
कोणाजवळ आस्था-करूणा
देवा सगळ्याना सुखी ठेवा
हीच एक करतो प्रार्थना

म्हातारपणी आधार म्हणून     
मुलाची काळजी घेतली जाते
मुलगी मात्र आई-बाबाची
लहानपणापासून सावली बनते

डोक्यात काय आहे ?
हे कागदावरी उतरावे
लेखणी माझी देखणी
त्याशिवाय कसे कळावे ?
  
हसणे आणि मदत करणे
यात साम्य काय आहे ?
हसल्यामुळे आपले दुःख विसरतो
तर मदत केल्यामुळे इतरांचे

जीवन बदलण्यासाठी
सर्वानाच वेळ मिळते
पण वेळ बदलण्यासाठी
पुन्हा जीवन कोठे मिळते ?

चांगल्या बाबी लक्षात ठेवू
तर इतर विसरून जाऊ या
चला जीवनाचा आनंद
सर्वासोबत घालवू या

जन्माने कुणीही श्रीमंत
अथवा गरीब असत नाही
परिश्रमानेच मिळते सर्व
दैवाचा खेळ नसतो काही

दैव जर कळले असते
जीवनात काही चव नसते
योगायोग जे म्हटले जाते
ते कुठे बघायला मिळते ?

     ll वंदे मातरम ll
मी हिंदुस्थानमध्ये जन्मलो
त्याचा मला अभिमान आहे
ज्याला पाहून गर्व वाटे ती 
तिरंगा माझी शान आहे

किती दिस झाले पाऊस पडेना
नजरा खिळल्या आकाशाकडे
शेतात पेरुनी बियाणे बळीराजा
काळजीने पाहतो भविष्याकडे

मित्र असावेत मित्रासारखे
नकोत नुसत्या नाती
सुखात आपल्यासोबत अन
संकटात पळून जाती

कदाचित मित्र नसते तर पहा
या जगात काय झाले असते ?
मदत काय असते ही कल्पना
या स्वार्थी जगाला कळलेच नसते

निसर्गाची ही
किमया भारी
पाऊस पाडी
सुगी गेल्यावरी

तिची मनधरणी करण्या
घेऊन जातो तो गजरा
आज काय विशेष आहे ?
मनात शंका करते ती जरा ...!

तीचे आणि त्याचे
रोज होतात वाद
विनाकारण भांडण
थोडे होतात संवाद

ब्ल्यूव्हेलच्या गेमने बघा
घेतले अनेक किशोरांचे बळी
मुलांना ठेवा यापासून दूर
मोबाईल म्हणजे एक अळी

पुरस्काराने माणूस मोठा होतो
की पुरस्कार त्याला मोठा करते
काम तर सदैव करत असतो
मात्र त्यामुळे अजुन प्रेरणा मिळते

सूर्य उगवतो तसा मावळतो
त्याचे काम तो नित्य करतो
मला ही माझे हक्क सांगते
माझे कर्तव्य मी पूर्ण करतो

मन उदास वाटेल तेंव्हा
आवडेल ते काम करा
आनंदी जीवन जगण्यासाठी
इतराना सर्वस्वी मदत करा

सूर्य गेला पहा अस्ताला
खेळू पाण्याच्या लाटासंगे
संधीप्रकाशात सूर्याच्या
आपल्या दोघांचा खेळ रंगे

विविध रंगी फुलपाखरु
उडत बसले फुलांवरी
लाल पिवळ्या फुलातील
मधाचे शोषण करी

मोर आपला राष्ट्रीय पक्षी
त्याचे पंख किती नक्षीदार
पावसाळ्यात नाचतो छान
पिसारा फुलवितो डौलदार

कडक ऊन खडतर रस्ता
सोबतीला नाही कुणी
चालून चालून भेटली सावली
पण मिळत नाही पाणी

विविध रंगात रंगुनी
मी चाललो दूर देशा.
आठवण मला करू नको
असेन मी सगळ्याच दिशा

कित्येक दिवसानंतर आज
अंगणी तुझे आगमन झाले
नखशिखांत भिजलो मी
आनंदाने वेडी झाले

वेड लावले मला
या सोशल मीडियाने
दिवस-रात्र एकच काम
बंद झाले बोलणे

कागद आणि पेन
कविता झाली तयार 
मोबाईल अन चहा
अजुन काय हवे यार ?

पोळ्याचा सण आला
घेऊन पाऊस पाऊस
असा दिसभर पड
नको जाऊस जाऊस

जगात सर्व काही मिळते
ते अडीच अक्षरी प्रेमाने
सुखी समृद्ध जीवन जगू
एकमेकांच्या सहकार्याने

तुला पाहताना माझे
काळीज कसे धडकते
तुला कदाचित माहित नाही
दिसेना तु तर काळजी लागते

बाहेर पाऊस पडताना
काळजीत मी पडतो ....
डोळे घेतले मिटून तरी
तुझाच चेहरा दिसतो....

वचन दिला आहे त्याने
एक दिस नक्की येणार आहे
आज ती खुप निराश होऊन
अजुन वाट पाहत आहे

करू नका अशी मस्ती
जीवन नाही आहे स्वस्त
हसत खेळत आनंदी जगू
जीवनगाणे गाऊ मस्त

जगात कुठे ही गेलो तरी
सर्वत्र एकच सृष्टी असते
जीवन किती सुंदर आहे
हे पाहण्यासाठी दृष्टी लागते

कोण म्हणतय की,
अश्रू वजनदार नसतात
मन खुप हलके होतात जेंव्हा
डोळ्यातून अश्रू गळतात

पर्वता वरुन घसरलेला
पुन्हा प्रयत्न करून चढतो
पण नजरेतून उतरलेला
पुन्हा कसा उभा राहतो ?

बदलून जाईल नशीब
जर असेल काही संकल्प
करावे कष्ट भरपूर कारण
जीवन आहे अल्प

आजकाल रात्री झोप नाही
दिवसा तर दुरची गोष्ट
आठवण येता तुझी
मला होते खुप कष्ट

सामन्यात हरलेला व्यक्ती
पुन्हा जिंकू शकेल पण
मनाने खचलेला व्यक्ती
कसा उभारु शकेल ?

मित्रत्वा मध्ये कधीच नको
माफ करा आणि धन्यवाद
हेच ते दोन शब्द आहेत
ज्यामुळे मित्रात होते विसंवाद

लहानथोर सर्वाना लागली
बाप्पाच्या आगमनाची तयारी
नवचैतन्य पसरले मनामनात
जेंव्हा बाप्पा आले घरी

तु सुखकर्ता तु दुःखहर्ता
तुच आहेस विघ्नविनाशी
सर्वाना सुख-समृध्दी दे
हीच प्रार्थना तुजपाशी

प्रिय,
तुझ्या सर्व आशाआकांक्षा
पूर्ण होवो हीच सदिच्छा
उदंड आयुष्य लाभो
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

वहीत लिहिलो तसा मनात ही
माझे विचार मांडत गेलो
कोणी भेटले नाही मला की
मी स्वतःशी भांडत गेलो

प्रेमाची साक्ष मिळेल
करा वहीची छानणी
शेवटचे पान उघडले
तर कळेल प्रेमकहाणी

मी जेंव्हा जेंव्हा शेजाराच्या
राज्यात प्रवासाला जातो
त्या वेळी आपल्या राज्यातील
रस्त्यांना शिव्या देतो

।। जय महाराष्ट्र ।।

आपला सहवास सदा
आठवण येईल पुन्हा
खुप दुःख होत आहे
निरोप तुम्हाला देताना

आई तुझ्यामुळे माझ्या
जीवनाला आकार आहे
तूच माझ्या जीवनाची
खरी शिल्पकार आहे

आई तुझ्यामुळेच माझ्या
जीवनात अर्थ आहे
तुझ्याविना जगु कसा
जीवन माझे स्वार्थ आहे

चेहरे नेहमीच खरे
बोलतात असे काही नाही
नात्याची खरी ओळख
संकटाशिवाय होत नाही

म्हणून संकट आले की
घाबरून जायचे नसते
अश्या वेळी न बोलावता
येणारेच खरे नाते असते

माझ्या जीवनाचा सहारा
नेहमी प्रोत्साहन देणारा
चूका स्पष्ट सांगणारा
तोच माझा मित्र खरा

माझ्या दुःखाने कोणी हसेल
तर काही ही हरकत नाही
पण माझ्या हसण्याने कोणी
दुःखी होता कामा नाही

आजचा दिवस कधीच
उद्या पाहायला मिळत नाही
म्हणून वेळेचे भान ठेवा
गेलेली वेळ परत येत नाही

पैसे असतील जवळ तर
कोणी साथ सोडत नाही
मात्र .......................
पैसे नसतील तर कोणी
साधी ओळख ही देत नाही

काम करता करता
लागते जोराची भूक
डब्याचे रक्षण करण्या
झाडाला करतो हूक

देवा तुझे नाव घेतो
फक्त संकटाच्या वेळी
तूझी मात्र साथ सदा
लाभते मला वेळोवेळी

आठवणी दाटून येती
सर्व मित्र एकत्र भेटले की
जसे डोळे भरून येती
लेक सासरला चालले की

उधार चुकते करत चला
ते कर्ज वाढतच राहते
त्याचा विचार नाही केला
तर एक दिवस जीव घेते

तू सोडून जरी गेलीस
तरी स्वप्न पाहतो तुझी
दिवस सरले कित्येक तरी
आठवें प्रीत तुझी माझी

तू रूपवती तू लावण्यवती
तू आहेस सौंदर्याची खाण
रूप तुझे डोळ्याने पाहता
हरपते माझे सर्वस्वी भान

मेघ बरसले धरतीवर
हिरवळ दाटले चहुकडे
मन प्रसन्न होते पाहून
हिरव्यागार निसर्गाकडे

शाळा समृध्द करूया
भरून शाळा सिध्दी
अ गटात नेण्या शाळा
मिळू द्या सर्वाना बुध्दी

आपली माणसे
आपलीच नाती
जग सारे आपल्या
मैत्रीचे गाणे गाती

स्वप्नात चालणाऱ्यांनो
वास्तवात जरा जगा
स्वप्न सत्यात येईल
असे वास्तवाकडे बघा

तुला हवे असलेला उमेदवार दे निवडून
मग तुला बोलता येईल मुद्दे पकडून
पैसे घेऊन जर तुम्ही कराल मतदान
काय अपेक्षा करणार त्या नेत्यांकडून

दीप जळतात उजेडासाठी
माणूस जगतो कुटुंबासाठी
आपल्यापरीने झिजतात
दोघेही दुसऱ्यांच्या सुखासाठी

बायकोचे नेहमी ऐकले की फायदाच होतो
एखादी नकळत विसरली की कायदाच होतो
नवरा आणि बायको संसाराचे दोन चाकं
लग्नाच्या वेळी सोबतीचा वायदाच होतो

सर्वत्र चालू आहे नवरात्रीची धूम
पोर पोरी नाचून करतात बूम बूम
नवरात्रीच्या दिवसात लोकांची मौज
रात्र रात्र जागून डोळे होतात ठुम

नवरात्र संपतो अन येतो दसरा
जीवनताले सारे दुःख विसरा
मित्रात नेहमी खुश राहण्यास
आपला चेहरा सदा ठेवा हसरा

रिकाम्या वेळी येते तुझी खुप आठवण
विचारांचे काहूर व्याकूळ होई मन
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
किती रम्य ते दिवस जेंव्हा होतो लहान

माझ्या जीवनात नाहीत सरळ रेषा
मी नेहमी पळत राहतो दाहीदिशा
शोधत राहतो मी अनेक पाऊलवाटा
कधी मिळते फूल कधी रुततो काटा

काल सासरी जाता जाता
तिने मागे वळून पाहिले
कंठ आले दाटून अन्
डोळ्यात अश्रू उभे राहिले

        ।। कोजागिरी ।।
चंद्राच्या शुभ्र शीतल छायेत
आज एकत्रित होऊ चला
मध्यरात्री दुधात चंद्र पाहुनी
कोजागिरी साजरी करू चला

आश्विन पौर्णिमेच्या शुभ्र प्रकाशात
चांदणे उतरले पहा सारे जमिनीवरी
दुध, साखर, काजू, आणि चारोळी
एक करून साजरी करूया कोजागिरी

चंद्राचा शुभ्र आणि मंद प्रकाश
दुधासोबत असे गोडवा साखरेचा
नात्यात वाढू द्या विश्वास अन
सोबत असू द्या सदैव प्रेमाचा

संकटकाळात पहा सारेच
कसे दूर दूर पळतात
मोठ्यानाही छोटे मंडळी
रागावून डोळे दाखवितात

नव्याने श्रीमंत झालेल्याच्या
घरी अजिबात जाऊ नका
कारण प्रत्येक वस्तुची ते
तुम्हाला किंमत सांगत सुटतात

हृदयाने म्हटले डोळ्याला
कमी बघत जा जरा
कारण तुझ्या घायाळ नजरेने
लाखो युवा मरुन जातील

यावर डोळ्याने म्हटले हृदयाला
कमी विचार करत जा जरा
कारण तुझ्या अति विचाराने
रडून माझे डोळे होतात लाल

दिवाळीला ज्ञानाचे दिवे लावून
विचारांचा प्रकाश सर्वत्र पसरवू या
रोज एक तास पुस्तक वाचनाने
वाचनसंस्कृती निर्माण करू या

।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
लांब पसरलेला निळेशार
समुद्र जसा असतो शांत
अश्याच लोकांच्या मनात
मुळीच नसते काही भ्रांत

ज्यांचे मन आणि काम आहे
महासागरासारखे प्रशांत
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो
ज्यांचे नाव आहे " श्रीकांत "

ऐन सुगीच्या हंगामात
येतो परतीचा पाऊस
पीकं येऊ देईना घरी
देतो बळीराजाला त्रास

मनातील विचार करा व्यक्त
लिहा तुम्ही खुप पानोपानी
आवडेल वाचण्यास आम्हा
लेखणी आहेच तुमची देखणी

नका करू आतिषबाजी
दारूगोळा फटाक्याची
यावर्षी करू या संकल्प
प्रदुषणमुक्त दिवाळीची

दिवाळी आहे आनंदाचा सण
कोणाच्या आनंदात नको विरजण
एक वेळा विचार करू सर्वजन
फटाक्याने का करावे प्रदूषण ...?

मातीतून बनते पणती
कापसाची होते वात
मिळते साथ तेलाची
फुलते नवीन ज्योत

दिवाळी सण मोठा
नाही आनंदाला तोटा
मिळेल इष्ट सर्व काही
मन करू नका छोटा

त्या फुलावरती बसली पहा
रंगबिरंगी पंखाची फुलपाखरु
मी एकटक पाहतच राहतो
जशी गोठ्यात वाट पाहते वासरु

मोबाईल पडले हातात की
जगाशी माझे देणे घेणे नसते
दिवसभर बघत राहते चित्र
कंटाळा आला की गेम खेळते

सण मोठा दिवाळीचा
लहान मुलांच्या आवडीचा
नव्या नव्या कपड्याचा
गोडधोड फराळाचा

घरासमोरील अंगणात
विविध रंगाची रांगोळी
पाहून मन हर्षोल्हासित
आनंदून गेली दिवाळी

बागेत फिरताना दृष्टीस पडले
पाहून मनाला पडली भूल
माझ्या बागेत आज फुलले
लाल रंगाचे गुलाबाचे फूल

भावावर खुप प्रेम करणारी
बहिण म्हणजे आईची छाया
उदंड आयुष्य तुला लाभो
ओवाळीते माझ्या भाऊराया

विसरून जाऊ नको समजून 
घे वेड्या बहिणीची ही माया
सदैव तुझ्या सोबत आहे मी
प्रेम जाऊ देऊ नको असे वाया

नेहमी नवे नवे मित्र जोडत असतो
स्वभावाशी न जुळणाऱ्यांना सोडत असतो
सर्वाना कसलेच सहकार्य न करणारे
प्रेमाने न वागणाऱ्यांना तोडत असतो
तोंडावर खुप गोड बोलणारे पण
चुगळी करणाऱ्यांना मोडत असतो

बाहेर खुप पाऊस पडत होता
मनात आठवणी दाटून येत होते
काळ्याकुट्ट आभाळाकडे पाहतांना
जीवन देखील अंधाराचे वाटत होते

ती रोज आपल्या वेळेवर येत होती
आपल्या वेळेवर रोज जात होती
एक दिवस आली नाही वेळेप्रमाणे
तेंव्हा तिची खरी किंमत कळाली होती

मूल्ये सर्वासाठी महत्वाचे
त्याशिवाय जीवन निरर्थक
राजकीय लोकांनी जपली
मूल्ये तर जीवन होईल सार्थक

आम्ही सर्व एकच आहोत
असे म्हणतांना दिसते एकता
बोलण्या वागण्यात असेल फरक
तर कशी टिकेल एकात्मता ?

आम्हाला भूकेची नसते चिंता
ना अन्नाची असते काळजी
मिळेल ते अन्न वाटून घेतो
शिळे असेल वा असेल ताजी

।। हास्य ।।

आम्हाला नाही कशाची पर्वा
कळले आम्हाला हे रहस्य
दुसरे तिसरे काही नसून
जीवन म्हणजे निखळ हास्य

माणूस पैश्याने श्रीमंत नाही तर
स्व साहित्यांने समृद्ध झाला पाहिजे
घरात धन दौलत नसेल तरी चालेल
मातृभाषेच्या शब्दाने संपन्न झाला पाहिजे

प्रेम आणि वाद यांचे
एक अतुट नाते आहे
कोणाचे रडगाणे आहे तर
कोणी गीत गाते आहे

सोडला सर्व अहं भाव
तेंव्हा नाही होणार वाद
एकमेका समजून घेतलो
तरच होतो चांगला संवाद

एकलकोंडे विचारात राहून
अर्थ कसे कळेल जगण्याचा
इतरांशी प्रेमाने राहून बघा
कळेल आशय पूर्ण आयुष्याचा

इंद्रधनूच्या सात रंगात
कळले मला जगणे
प्रत्येक रंग सांगतो
कसे असावे वागणे

🍃🌾🌸🌾🍃🍃🌾🌸🌾🍃

मैं उसे रोज याद करता हूँ
जो मेरे ख्वाब में आती हैं ।
मैं रोज उसकी फरियाद करता हूँ
जो मेरे लिए रोजा रखती हैं ।

🎆🎇💥🎆🎇💥🎆🎇

दिल में अगर चाह हैं तो
राह जरूर मिलती हैं
कोशिश करोगे बार बार तो
मंजिल जरूर मिलती हैं

गम भुलाने के लिए
हमने किससे सहारा माँगी
जिसे भूला देना चाहा
वही याद आने लग

उसके आने का इंतजार
हम आज भी करते है
नाजाने वो कब आयेगी
इसी आस में रहते है

हम उसके इंतजार में
आँखे बिछाये बैठे है
वो ना आई इसलिए
खोये खोये रहते हैं

हमारा ये कसूर है की
हम कुछ कहते नहीं
और जब हम कहते है तो
हमारे पास कोई रुकते नहीं ।

हमें प्यार जताना ना आया तो क्या हुआ
हम आज भी उसे बेहद याद करते है ।
हमें उसे मनाना ना आया तो क्या हुआ
हम आज भी हमारे दिल को मनाते है ।

बदसूरत चेहरे कभी
दगा नहीं करते और .....
खुबसूरत चेहरे कभी
जान लगा नहीं देते

बात दिल की जब जुबाँ पे आकर रुक जाती है,
क्योंकि ....
तुम सामने होती हो तो सिर्फ आँखे बात करती है

जिधर भी जाओ तुम आपके साथ  हमारा साया है
क्योंकि
बहोत दिन पहले हमने आपके दिल में घर बसाया है

.     *।। चलते - चलते ।।*

हम आज भी उन्हें याद करते है
जो दिल के करीब है ।
हम आज भी उन्हें साथ देते है
जो धन से गरीब है ।

तुम आज भी हमें हरवक्त याद करते होंगे
क्योंकि हम है ही ऐसे बंदे तुम कैसे भूलोगे

तेरी मुस्कुराहट ही बहुत कुछ है मेरे जीने के लिए
एक तेरी झलक ही बहुत कुछ है मेरे मरने के लिए
मैं हरदिन हरपल बस तुझे याद करता रहता हूँ
एक तेरा चेहरा ही बहुत कुछ है मेरे जाने के लिए
मैं खोया खोया सा रहता हूँ अक्सर रातों में
एक तेरी बिंदिया ही बहुत कुछ हैं मेरे सोने के लिए

गम भुलाने के लिए अक्सर लोग हंसी का सहारा लेते है
हम अक्सर अपना गम भुलाने के लिए  पहारा करते है

रब का दिया सब कुछ है मेरे पास
एक तुझे छोड के
जरा तो खयाल कर क्या मिलेगा तुझे
मेरा दिल तोड के

✍ नागोराव सा. येवतीकर
      मु. येवती ता. धर्माबाद
http://nasayeotikar.blogspot.com

1 comment:

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...