Saturday, 10 August 2019

वेळेचे नियोजन

*आपण केलात का वेळेचे नियोजन ?*

वेळ ही एक अशी वस्तू आहे जे की कोणासाठी ही थांबत नाही. मग तो श्रीमंत असो की गरीब सर्वांसाठी वेळ सारखाच असतो. जो वेळेची कदर करतो वेळ त्याची कदर करते. जो वेळेला ओळखतो त्याला नंतर वेळ ओळखते. गेलेली वेळ किती ही पैसा खर्च केला तरी परत मिळत नाही. म्हणून म्हटले जाते time is money अर्थात वेळ म्हणजे पैसा आहे. पण जेव्हा आपण आजूबाजूला रिकामटेकडे माणसं पाहतो त्यावेळी खूप दुःख वाटते. दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण नष्ट झालेला जपान आज उद्योगविश्वात अग्रेसर आहे याचे कारण म्हणजे त्यांनी वेळेला महत्व देतात. प्रत्येकजण तिथे काही ना काही काम करीत असतो आणि वेळेवर काम पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. त्याउलट आपल्याकडे घडते. आपल्या देशात शाळा सोडल्यास कोणी ही वेळे कडे लक्ष देत नाहीत. देशात शाळा तेवढ्या घड्याळाच्या वेळेनुसार भरतात आणि सुटतात. विद्यार्थी आणि शिक्षक त्या वेळेचे पालन करतात. इतरत्र मात्र वेळेचे काही बंधन नसते. त्यामुळे त्यांना वेळेशी काही देणे घेणे नसते. शाळेतून मिळालेला वक्तशीरपणा हे मूल्य पुढे चालून ही मंडळी का विसरून जातात हेच मुळी कळत नाही. बहुतांश ठिकाणी वेळेवर कार्यक्रम सुरू होत नाही. कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक आणि प्रेक्षक वेळेपूर्वी हजर राहतात मात्र कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मात्र हमखास एक तास उशिरा येतात. त्यामुळे किती धावपळ होते आणि कार्यक्रमात किती समायोजन करावे लागतात हे त्या संयोजकांनाच कळते. बऱ्याच लग्नपत्रिकेत जी मुहूर्ताची वेळ टाकलेली असते त्यावेळी लग्न लावले जात नाहीत. त्यामुळे लग्नाला आलेल्या मंडळींची खूप पंचायत होते. उशिराने धावणाऱ्या रेल्वेमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो तर एक मिनीट उशीर झाल्यामुळे जेंव्हा रेल्वे हुकते त्यावेळी आपणास आपली वेळ आठवते. काही कारणामुळे वेळेवर परीक्षा केंद्रावर न गेल्यामुळे विद्यार्थी परीक्षेला मुकले अशी बातमी वाचण्यास मिळते तेंव्हा त्या वेळेचे महत्व कळते. भारतात काही जणांकडे फुरसत नाही तर काही जणांकडे वेळ काढण्यासाठी टाईमपास केला जातो. जर आपल्याकडे रिकामा वेळ असेल तर आपण काय करता ? याच्या उत्तरावर आपली प्रगती अवलंबून आहे. चला आपला प्रत्येक क्षण न क्षण कामाला आणू या. त्यासाठी आपले स्वतः चे एक वेळापत्रक तयार करू या. म्हणजे वेळेचे योग्य नियोजन करता येईल.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Wednesday, 31 July 2019

श्रावण पाळा ; आरोग्य सांभाळा

श्रावण पाळा ; आरोग्य सांभाळा

मराठी वर्षातील पाचवा महिना म्हणजे श्रावण महिना होय. वैशाखाच्या प्रचंड गरमीतून आषाढाच्या सरीमुळे सर्वांची सुटका होते. शुष्क वातावरणाचे सर्वत्र हिरवेगार होण्यास सुरुवात होते. त्याच वेळी श्रावण मासास प्रारंभ होते. याच विषयी बालकवी आपल्या कवितेत श्रावणमासी, हर्ष मानसी असे सुंदर वर्णन केले आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे. या महिन्यात बहुतांश लोकं देव देव करण्याकडे वळतात. मांसाहार खाणारे ह्या महिन्यात वर्ज्य करतात. काही लोकं या महिन्यात केस कापणे देखील टाळतात. पूर्ण महिनाभर हिंदू धर्मातील मंडळी कोणतेही अधर्म होऊ नये याची काळजी घेतात. यामागे धार्मिकसोबत काही वैज्ञानिक कारणे आहेत. जसे की या महिन्यात मांसाहार वर्ज्य करणे. श्रावण महिन्यात संपूर्ण दिवसभर वातावरण ढगाळ असते, बहुतांश वेळा सूर्याचे दर्शन होत नाही. त्यामुळे माणसाचे चयापचय क्रिया मंदावते आणि विविध आजार बळावू शकतात. त्यातल्या त्यात मांसाहार करणे म्हणजे पोटासाठी कठीण आहे म्हणून ते खाणे टाळले पाहिजे. फार पूर्वी केस कापण्याची क्रिया घरोघरी व्हायचे. या महिन्यात पाऊस खूप पडत होता आणि कापलेले केस घरात राहून अन्नात मिसळले जाण्याची भीती होती म्हणून या महिन्यात फार पूर्वीपासून केस कर्तन करणे टाळले जात होते. पण आज कोणी ही आपल्या घरी केस कर्तन करत नाहीत, तर दुकानात जाऊन ते केस कर्तन करतात. त्यामुळे श्रावण महिन्यात ही नेहमी प्रमाणे केस कर्तन केले जात आहे. पूर्वीच्या काळी श्रावण महिन्यात खूप पाऊस असायचा. पूर्वीचे लोकं असे म्हणायचे की, पाऊस असा पडायचा की लोकांना हगायाला किंवा मुतायला देखील बाहेर पडता येत नव्हते. अति पावसामुळे पिण्याचे पाणी खराब होत असत व त्यामुळे जुलाब, हगवण किंवा कावीळ सारखे आजार बळावू शकतात. म्हणून दिवसभर खा - खा न करता एकवेळचे जेवण करणे किंवा दोन - तीन वेळा जेवण केल्यास साधे जेवण करण्यावर भर देत असत. पावसामुळे लोकांना शेतात किंवा अन्यत्र कोठे ही जाता येत नसत त्यामुळे गावातच ही मंडळी एकत्र येत असत आणि त्यातलाच एखादा ज्याला छानवाचन करता येत असे तो रामायण, महाभारत, किंवा अन्य धार्मिक पुस्तकाचे वाचन करीत याला पारायण असे म्हटले जाई. रात्रीच्या वेळी देखील काही वृद्ध मंडळी एकत्र येऊन पोथी वाचन ऐकण्याचे काम करीत. या महिन्यात सोमवारी शिवलिंगाचे म्हणजे महादेवाचे पूजन केल्या जाते तर शनिवारच्या दिवशी बलोपासक हनुमंताची पूजा केली जाते. सोमवारी आणि शनिवारी महिला भगिनी उपवास करतात तर काही पुरुष मंडळी फक्त शनिवारचा उपवास धरतात. तर काही मंडळी महिनाभर एकवेळचे जेवण धरतात. त्यामागे दुसरे तिसरे काही कारण नसून या महिन्यात माणसांची अन्न पचविण्याची शक्ती कमी असते म्हणून असे करणे आपल्या शरीरासाठी योग्य आहे. या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि शेवटी दीप अमावस्याने सुरुवात झालेला महिना पिठोरी अमावस्येला पोळा या सणाने या महिन्याची समाप्ती होते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक,
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Saturday, 13 July 2019

अक्षर मानव शिबीर

*अक्षर मानव नांदेड जिल्हा शिबिर*

रविवार, २१ जुलै २०१९
वेळ - सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत.

माणसांमाणसांतले जात, धर्म, लिंग, प्रदेश किंवा इतर सगळेच भेद बाजूला ठेवून माणसं निव्वळ माणूस म्हणून एकत्र यायला हवीत. त्यांच्यात निखळ मानवी संवाद व्हायला हवा. कारण, एकमेकांशी झालेल्या संवादातून मानवी जगण्याचे असंख्य प्रश्न सुटु शकतात अशी *अक्षर मानव* ची धारणा आहे. अक्षर मानव ही कुठल्याच एका विचारधारेची किंवा राजकीय संघटना नसुन, मानवी जगण्याशी संबंधित असणाऱ्या शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, शेती, संविधान, कला, साहित्य यासारख्या ३२ मुलभुत विभागात काम करते. अक्षर मानव राज्य भरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात विस्तारलेली आहे. माणसं सतत एकत्र यावीत आणि त्यांचा बौद्धिक स्तर उंच व्हावा याकरीता विविध प्रकारचे संमेलन, कार्यशाळा, परिसंवाद यांचे आयोजन करते. यातुन एका नैतिक, सुखी आणि आदर्श मानवी समाजाची रचना करणं हाच एकमेव अक्षर मानव संघटनेचा उद्देश आहे.
      सदर शिबीराला मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक आणि अक्षर मानवचे विश्वस्त *मा. राजन खान सर* , अक्षर मानवचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत डांगे, मराठवाडा कार्याध्यक्ष सुरेश शिरसिकर, राज्य संघटक जावेदा जिंदगी, राज्य शिक्षण विभाग प्रमुख सतिश इंदापूरकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिबीराला उपस्थित राहण्याकरिता कसलीही अट नाही. प्रवेश शुल्क नाही. कुठल्याही वयाचा, कोणत्याही क्षेत्रातला माणूस इथं येऊ शकतो.
            अक्षर मानव म्हणजे काय ? अक्षर मानव का सुरु करावं लागले ? स्त्री-पुरुष असा भेद न करता माणूस म्हणून आपण एक आहोत हे जाणून घ्यायचंय का ? माणूस म्हणून जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं? माणसाला पुरक अशा सर्व क्षेत्रांच उत्थान करायचं असेल तर त्याकरिता कोणती पावलं उचलायला लागतील आणि सुखी, शांत जगायचं म्हणजे नेमकं कसं जगायचं ब्बाँ?
यासारख्या अनेक प्रश्नांची उकल सदर शिबीराच्या माध्यमातून होणार आहे.
          *याकरिता नाव नोंदणी आवश्यक असुन,* जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन  डॉ. प्रताप, उलीगडे माधव,  निर्भय गायकवाड, शशिकांत केंद्रे, देवानंद चव्हाण, आश्विनी वाघमारे, प्रज्ञा कुलकर्णी मॅडम, इम्रान मांजमकर, लक्ष्मण शिंदे सर, प्रा. बालाजी कोंपलवार, नासा येवतीकर, गोविंदवार सर, उमेश कस्तुरे, बालाजी विजापूरे, डॉ.देवानंद, ओमकुमार कुरुडे, दिगंबर कल्लेपवार यांनी केले आहे.

*शिबीर स्थळ -*
स्वामी रामानंद तीर्थ स्मारक आणि संशोधन केंद्र सभागृह,
पीपल्स कॉलेज परिसर,
स्नेह नगर, नांदेड

*संपर्क व नाव नोंदणी -:*

डॉ प्रताप -
9423747664
आश्विनी वाघमारे-
7020671878
दिंगबर कल्लेपवार-
9767173688
माधव-
7350845785

Sunday, 7 July 2019

लोकसंख्या दिवस

लोकसंख्या शिक्षणात शिक्षकांची भूमिका

सध्या भारताची लोकसंख्या 1 अब्ज 34 कोटी झालेली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीनच्या खालोखाल असलेला आपला भारत देश येत्या काही वर्षात पहिल्या क्रमांकावर येईल, ही बाब निश्चितच अभिमानास्पद नाही. या लोकसंख्या वाढीमुळे देशातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लोकांची वस्ती वाढून जंगल कमी होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोलपणा पूर्णपणे ढासळत चालला आहे. भारतातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती आहे. परंतु या शेतीवर देखील घरांचे अतिक्रमण वाढत आहे. अन्नधान्य उत्पादन लोकसंख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात होत आहे. अर्थात लोकसंख्या वाढीमुळे राष्ट्रीय विकासाच्या साधनांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन राष्ट्रीय विकासाला खीळ बसत आहे. मानवी कल्याणासाठी निर्माण होत असलेल्या प्रत्येक योजना असफल होताना दिसत आहेत. महागाईचा डोंगर आकाशाला गवसणी घालत आहे. यामुळे देशातील सर्वसामान्य मानव जातीचा जीवन जगण्याचा स्तर खालावत चालला आहे. याबाबतीत आज खरंच चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे यास अनेक कारणे आहेत. आज ही समाज छोटे कुटुंब ठेवण्यास तयार नाहीत. हम दो हमारे दो हे शासनाचे ब्रीद आहे मात्र याबाबतीत जनता अजूनही अनभिज्ञ आहे. गरीब आणि अशिक्षित लोकांना छोट्या कुटुंबाचे महत्व अजून ही कळाले नाही. गरिबांच्या घरातील मुले कुटुंबाच्या कमाईमध्ये भर टाकतात, मदत करतात. जितकी जास्त मुले तितकी जादा कमाई करता येते, त्यामुळे मुले म्हणजे त्यांना एकप्रकारे वरदानच वाटतात. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त स्त्रिया अशिक्षित आणि निरक्षर आहेत. मुले म्हणजे देवघराची फुले असे ते समजतात. त्याचसोबत जन्मलेली सर्व अपत्ये जगतातच याची देखील त्यांना खात्री नसते म्हणून ही मंडळी दोनच्या वर अपत्यांना जन्म देतात. ही अवस्था अशीच चालू राहिली तर भारतातील लोकांचे जीवन जगणे असह्य होईल यात शंका नाही. ही बाब त्या प्रौढ माणसांना समजावून सांगणे, पटवून देणे अवघड आहे. परंतु भावी काळात प्रौढ बनणारी आजच्या शाळकरी मुलांना या लोकसंख्या वाढीच्या समस्येबाबत जाणीव करून दिल्यास ही मुले भावी काळात छोटे कुटुंब ठेवण्याकडे लक्ष देतील.
शाळेतील मुलांना शिकविण्याची जबाबदारी अर्थात शिक्षकांची असते. आज लोकसंख्या वाढत चालल्यामुळे जनता कोणकोणत्या संकटाचा मुकाबला करीत आहे ? याची जाणीव मुलांना अगदी सहज देता येईल. त्यासाठी एखादा स्वतंत्र विषय ठेवण्यात यावे असे काही नाही. अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या घटकातून मुलांना याबाबत अवांतर माहिती दिल्यास त्यांच्यात सजगता निर्माण होईल. लोकसंख्या वाढ झाल्यामुळे समाजात कश्याप्रकारे असमतोलपणा निर्माण झाले आहे हे चित्र विद्यार्थ्यांसमोर उभे केल्यास भविष्यात काही अंशी तरी ते नक्की विचार करतील. याबाबतीत एक चलचित्र जे की दूरदर्शन वाहिनीवर दाखविले जात असे ते आठवते. एका फिश टॅकमध्ये दोन मासे होते आणि त्यांना खाण्यासाठी भरपूर धान्य होते. काही दिवसांनी त्यात काही मासे वाढले आणि त्यामुळे अगोदर जे धान्य भरपूर होते असे वाटत होते ते बरोबर होऊ लागले. पुन्हा काही दिवसांनी त्यात मासे वाढले आणि धान्य कमी पडू लागले. त्यानंतर असा एक दिवस आला की, फिश टॅकमध्ये मासे भरपूर वाढले आणि धान्य मिळविण्यासाठी प्रत्येक मासा धावपळ करू लागला. त्यात त्या फिश टॅकचा स्फोट झाला. सारे मासे जमिनीवर पडले आणि काही क्षणात मृत्युमुखी पडले. यातून मुलांना खूप चांगला संदेश देता येऊ शकते. असे काही माहितीपट मुलांना दाखविले तर त्यांच्या डोक्यावर अनुकूल परिणाम होईल. आज समाजात अशिक्षित कुटुंबात पाच अपत्य दिसून येतात तसे सुशिक्षित कुटुंबात देखील दिसून येते. तेंव्हा प्रश्न पडतो की या शिक्षणाचा काय फायदा झाला ? शालेय जीवनात त्यांना लोकसंख्या शिक्षण बाबत मार्गदर्शन मिळाले नाही त्यामुळे ते चांगले शिकलेले असून देखील छोटे कुटुंब ठेवू शकले नाहीत. जास्त अपत्य असणाऱ्या घरातील सुखसोईचे चित्र आणि कमी अपत्य असणाऱ्या घरातील सुखसोईचे चित्र या दृश्यावरून मुलांच्या मनावर या समस्येच्या बाबतीत फार मोठे प्रतिबिंब शिक्षकांना टाकता येईल. लोकसंख्या शिक्षण प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षकांनी हे काम स्व इच्छेने मनावर घेऊन प्रामाणिकपणे केल्यास पुढील दहा वर्षात चित्र थोड्या फार प्रमाणात बदललेले दिसेल. विद्यार्थी गुरुजींची आज्ञा कधीच मोडत नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी लोकसंख्या शिक्षणात स्वतः ला झोकून द्यावे तरच देशाचा अर्थात आपला विकास शक्य आहे.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

Saturday, 6 July 2019

लोकसंख्या दिवस

लोकसंख्या शिक्षणात शिक्षकांची भूमिका

सध्या भारताची लोकसंख्या 1 अब्ज 34 कोटी झालेली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीनच्या खालोखाल असलेला आपला भारत देश येत्या काही वर्षात पहिल्या क्रमांकावर येईल, ही बाब निश्चितच अभिमानास्पद नाही. या लोकसंख्या वाढीमुळे देशातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लोकांची वस्ती वाढून जंगल कमी होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोलपणा पूर्णपणे ढासळत चालला आहे. भारतातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती आहे. परंतु या शेतीवर देखील घरांचे अतिक्रमण वाढत आहे. अन्नधान्य उत्पादन लोकसंख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात होत आहे. अर्थात लोकसंख्या वाढीमुळे राष्ट्रीय विकासाच्या साधनांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन राष्ट्रीय विकासाला खीळ बसत आहे. मानवी कल्याणासाठी निर्माण होत असलेल्या प्रत्येक योजना असफल होताना दिसत आहेत. महागाईचा डोंगर आकाशाला गवसणी घालत आहे. यामुळे देशातील सर्वसामान्य मानव जातीचा जीवन जगण्याचा स्तर खालावत चालला आहे. याबाबतीत आज खरंच चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे यास अनेक कारणे आहेत. आज ही समाज छोटे कुटुंब ठेवण्यास तयार नाहीत. हम दो हमारे दो हे शासनाचे ब्रीद आहे मात्र याबाबतीत जनता अजूनही अनभिज्ञ आहे. गरीब आणि अशिक्षित लोकांना छोट्या कुटुंबाचे महत्व अजून ही कळाले नाही. गरिबांच्या घरातील मुले कुटुंबाच्या कमाईमध्ये भर टाकतात, मदत करतात. जितकी जास्त मुले तितकी जादा कमाई करता येते, त्यामुळे मुले म्हणजे त्यांना एकप्रकारे वरदानच वाटतात. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त स्त्रिया अशिक्षित आणि निरक्षर आहेत. मुले म्हणजे देवघराची फुले असे ते समजतात. त्याचसोबत जन्मलेली सर्व अपत्ये जगतातच याची देखील त्यांना खात्री नसते म्हणून ही मंडळी दोनच्या वर अपत्यांना जन्म देतात. ही अवस्था अशीच चालू राहिली तर भारतातील लोकांचे जीवन जगणे असह्य होईल यात शंका नाही. ही बाब त्या प्रौढ माणसांना समजावून सांगणे, पटवून देणे अवघड आहे. परंतु भावी काळात प्रौढ बनणारी आजच्या शाळकरी मुलांना या लोकसंख्या वाढीच्या समस्येबाबत जाणीव करून दिल्यास ही मुले भावी काळात छोटे कुटुंब ठेवण्याकडे लक्ष देतील.
शाळेतील मुलांना शिकविण्याची जबाबदारी अर्थात शिक्षकांची असते. आज लोकसंख्या वाढत चालल्यामुळे जनता कोणकोणत्या संकटाचा मुकाबला करीत आहे ? याची जाणीव मुलांना अगदी सहज देता येईल. त्यासाठी एखादा स्वतंत्र विषय ठेवण्यात यावे असे काही नाही. अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या घटकातून मुलांना याबाबत अवांतर माहिती दिल्यास त्यांच्यात सजगता निर्माण होईल. लोकसंख्या वाढ झाल्यामुळे समाजात कश्याप्रकारे असमतोलपणा निर्माण झाले आहे हे चित्र विद्यार्थ्यांसमोर उभे केल्यास भविष्यात काही अंशी तरी ते नक्की विचार करतील. याबाबतीत एक चलचित्र जे की दूरदर्शन वाहिनीवर दाखविले जात असे ते आठवते. एका फिश टॅकमध्ये दोन मासे होते आणि त्यांना खाण्यासाठी भरपूर धान्य होते. काही दिवसांनी त्यात काही मासे वाढले आणि त्यामुळे अगोदर जे धान्य भरपूर होते असे वाटत होते ते बरोबर होऊ लागले. पुन्हा काही दिवसांनी त्यात मासे वाढले आणि धान्य कमी पडू लागले. त्यानंतर असा एक दिवस आला की, फिश टॅकमध्ये मासे भरपूर वाढले आणि धान्य मिळविण्यासाठी प्रत्येक मासा धावपळ करू लागला. त्यात त्या फिश टॅकचा स्फोट झाला. सारे मासे जमिनीवर पडले आणि काही क्षणात मृत्युमुखी पडले. यातून मुलांना खूप चांगला संदेश देता येऊ शकते. असे काही माहितीपट मुलांना दाखविले तर त्यांच्या डोक्यावर अनुकूल परिणाम होईल. आज समाजात अशिक्षित कुटुंबात पाच अपत्य दिसून येतात तसे सुशिक्षित कुटुंबात देखील दिसून येते. तेंव्हा प्रश्न पडतो की या शिक्षणाचा काय फायदा झाला ? शालेय जीवनात त्यांना लोकसंख्या शिक्षण बाबत मार्गदर्शन मिळाले नाही त्यामुळे ते चांगले शिकलेले असून देखील छोटे कुटुंब ठेवू शकले नाहीत. जास्त अपत्य असणाऱ्या घरातील सुखसोईचे चित्र आणि कमी अपत्य असणाऱ्या घरातील सुखसोईचे चित्र या दृश्यावरून मुलांच्या मनावर या समस्येच्या बाबतीत फार मोठे प्रतिबिंब शिक्षकांना टाकता येईल. लोकसंख्या शिक्षण प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षकांनी हे काम स्व इच्छेने मनावर घेऊन प्रामाणिकपणे केल्यास पुढील दहा वर्षात चित्र थोड्या फार प्रमाणात बदललेले दिसेल. विद्यार्थी गुरुजींची आज्ञा कधीच मोडत नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी लोकसंख्या शिक्षणात स्वतः ला झोकून द्यावे तरच देशाचा अर्थात आपला विकास शक्य आहे.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

Tuesday, 2 July 2019

सुट्टीतील कविता

नमस्कार मित्रांनो,

या उन्हाळी सुट्टीत लिहिलेल्या कविता

खालील कविता स्टोरी मिरर स्पर्धेसाठी पाठविण्यात आलेल्या आहेत.  जास्तीत जास्त वाचकांनी खालील लिंक वर भेट देऊन कविता वाचन केल्यास ह्या कविता स्पर्धेत सर्वोत्तम होऊ शकते.

1 *कविता - जिव्हाळा*
https://storymirror.com/read/poem/marathi/05j8an0z/jivhaalaa/detail

2 *कविता - माझी शाळा*
https://storymirror.com/read/poem/marathi/ubr2mdgk/maajhii-shaalaa/detail

3 *कविता - वीजमरण*
https://storymirror.com/read/poem/marathi/15o6oi3r/viijmrnn/detail

4 *कविता - सिक्सर किंग*
https://storymirror.com/read/poem/marathi/un01ouqj/siksr-king/detail

5 *कविता - माझा परिवार*
https://storymirror.com/read/poem/marathi/7q2swrnm/maajhaa-privaar/detail

6 *कविता - गाव*
https://storymirror.com/read/poem/marathi/a27et5vz/gaav/detail

7 *कविता - सखी*
https://storymirror.com/read/poem/marathi/c1fr0fmi/skhii/detail

8 *कविता - प्रश्न*
https://storymirror.com/read/poem/marathi/oz7nf67n/prshn/detail

9 *कविता - माझी कविता*
https://storymirror.com/read/poem/marathi/9cj4e1d1/maajhii-kvitaa/detail

10 *कविता - भारतीय*
https://storymirror.com/read/poem/marathi/sj7geez9/bhaartiiy/detail

11 *कविता - खरे-खोटे*
https://storymirror.com/read/poem/marathi/16z3zicb/khre-khotte/detail

12 *कविता - महागडे शिक्षण*
https://storymirror.com/read/poem/marathi/1ip2u418/mhaagdde-shikssnn/detail

13 *कविता - मुलींचे लग्न*
https://storymirror.com/read/poem/marathi/ermvpq2b/muliicn-lgn/detail

14 *कविता - लग्न*
https://storymirror.com/read/poem/marathi/uee6jrjc/lgn/detail

15 *कविता - राजकुमार*
https://storymirror.com/read/poem/marathi/sekyrr7i/raajkumaar/detail

16 *कविता - प्रिये*
https://storymirror.com/read/poem/marathi/55qjxyo5/priye/detail

17 *कविता - आम्ही मुले*
https://storymirror.com/read/poem/marathi/ien64xn6/aamhii-mule/detail

18 *कविता - विसरू नको*
https://storymirror.com/read/poem/marathi/hhr92aia/visruu-nko/detail

19 *कविता - आशा*
https://storymirror.com/read/poem/marathi/elhud6b3/aashaa/detail

20 *कविता - निवडणूक*
https://storymirror.com/read/poem/marathi/6d38ae6h/nivddnnuuk/detail

21 *कविता - अमूल्य वोट*
https://storymirror.com/read/poem/marathi/p7uc835b/amuuly-vott/detail

22 *कविता - औंदा मतदान करायचं*
https://storymirror.com/read/poem/marathi/pzccuh1p/aundaa-mtdaan-kraaycn/detail

23 *कविता - मतदान*
https://storymirror.com/read/poem/marathi/fs3bfao1/mtdaan/detail

24 *कविता - बेफिकीर*
https://storymirror.com/read/poem/marathi/j84dfxhm/bephikiir/detail

25 *कविता - खेळ आणि शिक्षण*
https://storymirror.com/read/poem/marathi/rwpjhqmu/khel-aanni-shikssnn/detail

26 *कविता - विश्वास*
https://storymirror.com/read/poem/marathi/np5iiglj/vishvaas/detail

27 *कविता - शहिदांना नमन*
https://storymirror.com/read/poem/marathi/9mwl8crx/shhidaannaa-nmn/detail

28 *कविता - शहिदांचे स्मरण*
https://storymirror.com/read/poem/marathi/sjksbiui/shhidaance-smrnn/detail

29 *कविता - कुटुंब*
https://storymirror.com/read/poem/marathi/p1i5d2an/kuttunb/detail

30 *कविता - पसारा*
https://storymirror.com/read/poem/marathi/nwktgunw/psaaraa/detail

31 *कविता - पाऊस पाणी*
https://storymirror.com/read/poem/marathi/msl7kz96/paauus-paannii/detail

32 *कविता - निशाणा*
https://storymirror.com/read/poem/marathi/p5ly3kwq/nishaannaa/detail

33 *कविता - जीवनात*
https://storymirror.com/read/poem/marathi/y3q65edk/jiivnaat/detail

34 *कविता - साथ*
https://storymirror.com/read/poem/marathi/isrvfpnn/saath/detail

35 *कविता - जीवन एक सारीपाट*
https://storymirror.com/read/poem/marathi/p6lohdav/jiivn-ek-saariipaatt/detail

36 *कविता - काळ-वेळ*
https://storymirror.com/read/poem/marathi/wcihp7wj/kaal-vel/detail

37 *कविता - दिवस असेच सरायचे*
https://storymirror.com/read/poem/marathi/nf1vi7ai/divs-asec-he-sraayce/detail

38 *कविता - आई म्हणजे काय असते ?*
https://storymirror.com/read/poem/marathi/3x6a0e9t/aaii-mhnnje-kaay-aste/detail

39 *कविता - आई असावी जिजाऊसारखी*
https://storymirror.com/read/poem/marathi/0vz0tcuz/aaii-asaavii-jijaauusaarkhii/detail

40 *कविता - प्राणी ओळख*
https://storymirror.com/read/poem/marathi/823ttcpy/praannii-olkh/detail

41 *कविता - सुट्टीतील मजा*
https://storymirror.com/read/poem/marathi/houcnjlb/suttttiitiil-mjaa/detail

42 *कविता - तिची कहाणी*
https://storymirror.com/read/poem/marathi/2gzrs79s/ticii-khaannii/detail

43 *कविता - दारू*
https://storymirror.com/read/poem/marathi/juoyuvqx/daaruu/detail

44 *कविता - मानवाची प्रगती*
https://storymirror.com/read/poem/marathi/7qq1b47m/maanvaacii-prgtii/detail

45 *कविता - एक तरी झाड*
https://storymirror.com/read/poem/marathi/zs9xe7ae/ek-trii-jhaadd-laav/detail

46 *कविता - मेहंदी*
https://storymirror.com/read/poem/marathi/54hpdsf0/mehndii/detail

वरील कविता आवडल्यास आपल्या मित्रांना share करावे. धन्यवाद ......!

*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769

लेखन प्रेरणा दिवस

मुलांनो, चला लिहू या...! "वाचाल तर वाचाल... लिहाल तर घडाल!" आपण रोज बोलतो, हसतो, खेळतो, शिकतो. आपल्या मनात अनेक विचार ...