Wednesday 18 January 2023

शृंगार मनाचे काव्यसंग्रह प्रकाशनानिमित्ताने कविसंमेलन संपन्न ( Kavisammelan )


उद्धात व व्यापक मानवी शृंगाराची जगावेगळी संकल्पना रेखाटणारा शृंगार मनाचे काव्यसंग्रह - श्रीपाल सबनीस
नांदेड : ( प्रतिनिधी ) धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कूलचे मराठी विषयाचे शिक्षक तथा कवी पांडुरंग आडबलवाड लिखित शृंगार मनाचे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध विचारवंत, समीक्षक, साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.  प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी कादंबरीकार देविदास फुलारी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण कवी कथाकार शंकर वाडेवाले यांची उपस्थिती होती. शृंगार मनाचे काव्यसंग्रहाचे प्रकाशन करून श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले संत व महापुरुष हे मानवतावादी विचाराचे असून त्यांनी कोणतीही जात-धर्म न मानता जग कल्याणार्थ आपले आयुष्य झिजविले परंतु जातीनिहाय व्यवस्थेने प्रत्येक महापुरुषांना जातीतच बांधले. कवी पांडुरंग अडबलवाड यांनी आपल्या शृंगार मनाचे काव्यसंग्रहात महापुरुष हे सर्व समावेशक असतात यांची बेरीज केली असून त्यांच्या आदर्श कार्याची उद्धात व्यापक मांडणी,  मानवी शृंगाराची जगावेगळी संकल्पना कवीनी हृदयाशी कवटाळली आहे असे प्रतिपादन केले. 
सुख शांती समाधान मनमंदिरी शृंगार
स्थितप्रज्ञ चारित्र्याचे व्हावे जीवन आगार 
या काव्याचा उल्लेख करून विवेचित केले. या काव्यसंग्रहास श्रीपाल सबनीस यांनी प्रस्तावना दिली असून प्रस्तावितेत कवी पांडुरंग अडबलवाड यांचे आत्मा व परमात्मा यांच्या अंतरंगापर्यंत थेट भेटणारा अव्वल असे सूत्राचा शृंगार मनाचे काव्यसंग्रह मराठी भाषेला प्रदान केल्याचे म्हणत हार्दिक अभिनंदन केले आहे. पुढील प्रकाशित होणाऱ्या काव्यसंग्रहास शुभेच्छा दिल्या आहेत. संस्थेचे सचिव एडवोकेट विश्वनाथराव पाटील बन्नाळीकर यांनी प्रास्ताविक केले तर कवी पांडुरंग अडबलवार यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रकाशन सोहळ्यास अध्यक्ष रामचंद्र पाटील बन्नाळीकर, विश्वस्त श्रीनिवासराव रत्नाळीकर, सहसचिव सुरेश गंजेवार, डॉक्टर कमलकिशोर काकाणी, दिनेश सारडा, इनानी, सौ. ललिता सबनीस, सौ. सरोजा पाटील, सौ. शालिनी अडबलवाड, सौ. मंगला जोशी. मुअ. सन्मुख बेंबरेकर, मुअ. माधव मठपती, ज्येष्ठ पत्रकार जी.पी. मिसाळे, स्तंभलेखक ना.सा.येवतीकर, यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. येथील संगीत शिक्षक माधव वडगावे व बनसोडे यांच्या संचानी हु. गोविंदराव पानसरे गीत व स्वागत गीत गाईले.
काव्यसंग्रह प्रकाशनानंतर ग्रामीण कवी शंकर वाडेवाले यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन घेण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर ग्रामीण कादंबरीकार दिगंबर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. कवी व्यंकटेश काटकर, ज्ञानोबा जोगदंड,  विजय चव्हाण, प्रल्हाद घोरबांड, तिप्पलवाड एन. एम., बालाजी कळसे, आनंद यडपलवार, मनमोहन कदम, वीरभद्र मिरेवाड, व्यंकट गंदपवाड, बालाजी पेटेकर,  आबा पांचाळ, पांडुरंग कोकुलवार, गोविंद कवळे, प॑डित पाटील बेळीकर, नासा येवतीकर, शंकर कांबळे जिगळेकर, सिद्धार्थ वाघमारे आणि जी. पी. मिसाळे आदींनी आपल्या उत्तम कविता सादर केल्या. या कार्यक्रमाला धर्माबाद शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी पचलिंग आणि अरुण भुसलवाड यांनी केले तर ज्योती पडगलवार यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हुतात्मा पानसरे मेमोरियल स्कुलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

1 comment:

  1. अतिशय दिमाखादार प्रकाशन सोहळा व अप्रतिम कविसंमेलनाचे आयोजन.

    ReplyDelete

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...