Sunday 21 February 2016



* नागोराव सा. येवतीकर



* क्रांती बुध्देवार 



91 74989 64901
  आजच्या काळाची गरज आहे.शरीरातील काही अवयव ज्यावेळी आपले दैनंदिन कार्य करण्यास अकार्यक्षम होतात त्यावेळी शरीराला कार्यरत असणार्या नवीन कार्यक्षम अवयवाची गरज असते.आजकाल त्वचा, डोळे, किडनी, लिव्हर, पँक्रियाज, फुप्फुसे , ह्दय यांचे रोपण सहजशक्य झाले आहे.तद्न्य डॉक्टरस् आहेत.फक्त त्या अवयवाचा म्रृत्यु होण्यापूर्वी ते रूग्णापर्यंत पोहचणे जरूरी आहे.त्यासाठी बरेचदा ग्रीन लाईन मधून ते अवयव पोहचवले जातात.मध्यंतरी बंगलोर, पुणे येथे अश्या पद्धतीचा वापर करण्यात आला होता आणि त्यामुळे दोन जीव वाचले होते.माझ्या एका मैत्रिणीने तिच्या मुलीला किडनी दिली असून दोघीही उत्तम जीवनयापन करत आहेत .माझ्या दुसर्या मैत्रिणीच्या यजमानांना किडनी रोपण होउन २० वर्षे झालीत.नंतर त्यांना ब्लड कँन्सर झाला मग स्टेम सेल  रोपण झाले.बोन मँरो रोपण केला.आता ते नॉर्मल आहेत.  डोळ्यावरील पांढर्या फुल्यांवर केरँटाप्लास्टी म्हणजे कॉर्निया काढून त्याचे रोपण करतात.मग रोग्याला नवी दृष्टी मिळते. केसरोपण टकलावर होते.कोडावर जर तो डाग पसरणारा नसेल तर त्वचारोपण करतात.मग ती त्वचा हळूहळू नॉर्मल होते.फक्त तो पांढरा डाग दोन वर्षांपासून वाढलेला नसावा.      यामुळे पेशंटला निरोगी जीवन जगता येते.त्याची ईच्छाशक्ती प्रबळ होते.म्ह्णून ज्यांची जगण्याची शाश्वती नसते त्यांनी अवयवदान जरूर करावे म्ह्णज ते नव्या शरीरात जगू शकतात अंशतः कां होईना! जगलेल्यांचे आशिर्वाद सतत त्यांच्या आत्म्याला तृप्ती देत राहतात.नातेवाईकांना दुसर्याचा जीव वाचवल्याचे मौलीक समाधान देतात.दिवाळीत माझे चुलत मेहुणे गेले.त्यांनी देहदान केले.सुप्रसिद्ध कवी, लेखक विंदा करंदीकर यांनी पण देहदान केले.याचा उद्देश म्हणजे मेडिकलच्या विद्यर्थियांना अभ्यास करता यावा.
चला आपणही संकल्प करु - अंजना कर्निक

'अवयवदान -एक सामाजिक बांधिलकी'




           'दान' हा शब्द उचारला की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दोन गोष्टी येतात- एक 'कन्यादान' आणि दुसरी मंदिरा-मंदिरात आवर्जून आढळणारी 'दानपेटी'! ह्या जगात खूप गोष्टींचं दान करता येतं, त्या सर्वांच्या खोलात मी नाही शिरणार. कन्या दान करायला आणि देवासमोरील पेटीत दान टाकण्याइतकी संपत्ती जवळ जवळ सर्व माणसांकडे असते. ही संपत्ती प्रत्येक माणूस कधी ना कधी ऐपतीनुसार दान करत असतो. दान करता येईल अशा अजूनही एका अमूल्य संपत्तीचा ठेवा प्रत्येक माणसाजवळ आहे, जो संपूर्णतः त्याच्याच मालकीचा आहे. त्या संपत्तीच्या दानाबद्दल आज माहीती देणार आहे, म्हणजेच अवयव दानाबद्दल माहीती देणार आहे. ह्या जगात एकवेळ कन्यादान अथवा देवासमोर दान करण्याची ऐपत नसणारी माणसं भेटतील, पण 'अवयवदान' करण्याची ऐपत नसणारा माणूस जगात शोधून सापडणार नाही. हे दान चालणारा-बोलणारा, संवेदना असलेला जिवंत माणूस तर करू शकतोच पण संवेदनाहीन मृत देहही अवयव दान करू शकतो.
                संपूर्णतः स्वतःची मालकी असलेली संपत्ती म्हणजे आपले शरीर! त्यातील एकेक अवयवावर फक्त आपलाच अधिकार. गरीब असो वा श्रीमंत, राजा असो वा रंक, काळा असो वा गोरा, हिंदू असो वा मुस्लीम, स्त्री असो वा पुरूष त्या ईश्वराने प्रत्येकाला ही संपत्ती समान वाटलेली आहे. ह्या शरीरास हिरे-मोत्यांहून मुल्यवान असे विविध अवयव दिलेले  आहेत, ते अवयव कोणताही सज्ञान मनुष्य गरजू व्यक्तीला दान करू शकतो.
                 आपण ह्या जगी रिकाम्या हाती येतो आणि रिकाम्या हातीच जगाचा निरोप घेतो. घरदार, शेतीवाडी, गाडी-बंगला, पैसा-दागदागिने सारे मागे ठेऊन जातो. आपल्या ह्या संपत्तीची आपल्या पश्चात योग्य विल्हेवाट व्हावी म्हणून मृत्युपत्र करणारी खूप माणसं भेटतात, पण अमूल्य अशी शरीरसंपत्ती जी फक्त मानव जन्मातूनच प्राप्त होते, तिची आपण खुशाल राख करतो किंवा माती करून टाकतो. आपण आयुष्यभर कमावलेली पै अन् पै सत्कारणी लागावी म्हणून सर्व तरतूद करून ठेवतो, वाटण्या करून टाकतो. पण ह्या शरीराचा, शरीरातील प्रत्येक अवयवाचा  जिवंतपणी अथवा मृत्यू झाल्यावर कुणाला उपयोग होईल असा पुसटही विचार डोक्यात येत नाही. ह्या नाशवंत देहाची माती होते एवढेच आपल्या मनावर बिंबवलेले असते आणि आपणही त्याच वाटेने जातो. आज एकविसाव्या शतकात विज्ञानाच्या बळावर ह्या शरीरसंपत्तीचा योग्य वापर करता येणे शक्य झाले आहे ते अवयवदानातून! डोळे, त्वचा, यकृत, मुत्रपिंड, फुफ्फुस, ह्रदय, रक्त, अस्थीमज्जा असे शरीराचे नाना अवयव प्रत्यारोपण करता येत आहेत आणि त्यापासून पीडित जीवांना सुखाचे दिवस बघायला मिळत आहेत किंवा त्या माणसाला नवा जन्म प्राप्त होत आहे,  म्हणजे मरणाऱ्या व्यक्तीने जो अवयव दान केला तो दुसऱ्या शरीरात जीवंत राहतोय.
         अवयव दान म्हणजे नेमके काय दान करायचे ह्याबद्दल पुरेशी जनजागृत्ती नाही. शिकलेली माणसेही ह्या दानाबद्दल खूपच अनभिज्ञ आहेत तर अडाणी माणसे ह्याबद्दल काय निर्णय घेणार. शरीरातील रक्त हाही अहोरात्र फिरणारा एक अवयवच, आज रक्तदान सर्वश्रुत आहे. थॅलेसेमीया असणाऱ्या बालकाला, अपघातात जखमी झालेल्या जीवलगाला रक्ताची गरज विचारा. प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव होवून जेव्हा होणाऱ्या बाळाच्या आईची प्राणज्योत मालवते तेव्हा आपल्याला रक्तदानाचे महत्त्व कळते. त्वचा दान केली तर अॅसिड हल्ल्यात विद्रूप झालेल्या एखाद्या मुलीला तिचं सौंदर्य परत मिळू शकतं. अस्थीमज्जा दान केली तर कॅन्सर असलेला एखादे बालक शंभर वर्षे जग बघू शकते. नेत्रदानाने आंधळ्याच्या जीवनातील अंधार कायमचा दूर होईल. दोन्ही मुत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांना डायलिसिसच्या त्रासातून मुक्तता मिळेल. काही अवयव जीवंतपणी दान करता येतात उदा.रक्त, मुत्रपिंड(किडनी) तर ज्या अवयवांवर माणसाचे जीवन सर्वस्वी अवलंबून असते ते अवयव हे मृत्यू झाल्यानंतर दान करता येतात. उदा.यकृत, हृदय,मेंदू ई. कारण मृत्यू झाल्यानंतर प्रत्येक अवयव विघटन पावण्याचा कालावधी भिन्न आहे. त्यामुळे मृत्यूपश्चात शरीरातील बरेचसे अवयव हे योग्य कालावधीत दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपीत केल्यास त्यांचे कार्य अगदी पूर्ववत चालू ठेवतात आणि दुसऱ्या शरीरास 'जीवन दान' देतात.
            अवयवदानाबद्दल आपण जवळच्या नातेवाइकांकडे इच्छा व्यक्त करू शकतो, स्वतःच्या मृत्यूपत्रात तसा स्पष्ट उल्लेख करू शकतो. सज्ञान माणूस विविध अवयव जतन करायची सुविधा उपलब्ध असलेल्या संस्थे
त, दवाखान्यात आपल्या हयातीत कधीही नोंदणी करू शकतो. मृत्यूपश्चात नातेवाईकांनी संबधीत संस्थेला वेळेवर कळवावे लागते. मेंदू निकामी झालेल्या,कोमात असलेल्या व्यक्तीचेही अवयव नातेवाईकांची इच्छा असेल तर दान करता येतात. रक्तदान तर वर्षातून तीनवेळा करता येते. एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयास आपले संपूर्ण शरीरही दान करू शकतो. भविष्यात निष्णात डॉक्टर तयार होण्यासाठी हातभार लावू शकतो. अवयवदानाबद्दल सर्व क्षेत्रातून जनजागृती होणे गरजेचे आहे, मानवी अवयव जतन-संवर्धन-प्रत्यारोपण संबधीत तंत्रज्ञान अजून विकसित करण्यासाठी प्रत्येक देशाने पुरेसी आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. तसेच उपलब्ध तंत्रज्ञान सर्वांमुख होणे गरजेचे आहे.
               माझा विश्वास आहे,अवयवदान करून प्रत्येक माणूस 'मरावे परि कीर्तीरूपी उरावे' ही उक्ती सार्थ ठरवू शकतो.
---------------
डॉ.सखाराम दगडू भगत
गाव-निनावी,
पोस्ट-पिंपळगाव डुकरा,
ता.-इगतपुरी,
जि.-नाशिक
पिनकोड-४२२५०२
मो.नं.९५२७५५७०६९

"अवयव दान- सामाजिक बांधिलकी"
  'मरावे परी किर्ती रूपे उरावे'असं म्हणण्याऐवजी आता 'मरावे परी देह रूपी उरावे' असं म्हणण्याचा काळ आला आहे. बदल हा निसर्गनियम आहे. म्हणूनच काळानुसार बदलणे ही आजची काळाची गरज आहे. आजची माणसाची  जीवन जगण्याची पध्दत बदलली. त्यामुळे माणसाचे आयुष्य हे पाण्याचा बुडबुडा बनलेय. आजचा दिवस तेवढा माझा!हेच अंतिम सत्य बनलय.अशा वेळी आपल्या हातात जेवढे आयुष्यत्या आयुष्याचे सोने कसे करता हे माणसाने पहायला हवे.
     आज मानवी जीवन हे खूप धावपळीचे झाले. त्यातून उदभवणारे वेगवेगळे आजार,पावलोपावली घडणारे अपघात,यातून  कायमचे अपंगत्व,त्यातून येणारे नैराश्य ह्या नित्याच्याच बाबी बनल्यात. अशावेळी आपण माणूस म्हणून सामाजिक जबाबदारी काय स्वीकारतो,हे महत्वाचे ठरते.
  'तनु लाभली ही तुला माणसा,
  दे तिला आता चंदनाचा वसा'
याप्रमाणे आपल्याला समाजासाठी जे जे दान करता येइल ते ते दान करावं. काळाबरोबर दानाच्याही संकल्पना बदलल्या आहेत. मानवी मृत्यूनंतर ज्याच्या त्याच्या धर्मपरंपरेनुसार मानवी देहाचे दहन किंवा दफन केल्या जाते. आणि तो देह कायमस्वरूपी संपवल्या जातो. ज्या देहासोबत आपण गरजवंताला आवश्यक असणाऱ्या अवयवांची राख करतो.परंतु आज आपण अवयवदान,देहदान या रुपाने दुसर्याचे आयुष्य वाचवून स्वत:ला अमरत्व बहाल करु शकतो. कालपरवा बुलढाण्यात  घडलेली घटना माणुसकीचा झरा अजूनही कसा जिवंत आहे,याचे उदाहरण आणि एक नवीन पाऊलवाट निर्माण करणारे आहे. एका मुलाचा अपघात झाल्यानंतर तो वाचणार नाही,हे डॉक्टराकडून कळाल्यानंतर त्याच्या आईने ताबडतोब त्या मुलाचे काही अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यातून चार जणाना जीवदान मिळाले. तेवढ्या दु:खाच्या प्रसंगी त्या आईने दाखविलेला धिरोदात्तपणा पाहून आपण अचंबित होतो. अनेकाना आलेल्या अपंगत्वातून बाहेर काढण्यासाठी,त्याला जीवदान देण्यासाठी आपले अवयव दान किंवा देहदान अतिशय महत्वाचे ठरते.जी गोष्ट अनेकांचे जीव वाचवणार आहे ती बाब जाळणे किंवा गाडून टाकणे हे कालबाह्य करावे लागणार आहे. काही अशा रुढीपरंपरा 'जुने जाऊद्या मरणालागूनी 'याप्रमाणे संपवाव्या लागणार आहेत. ज्या समाजात आपण घडलो त्या लोकांसाठी देहदान किंवा अवयव दान करुन आपण सामाजिक बांधिलकी जपणे हे आपले आद्यकर्तव्य समजायला हवे. आपल्या मृत्यूपूर्वी देहदान किंवा अवयवदानासाठी आपण संबंधित संस्थेला संमतीपत्र देवून ठेवायला हवे. मृत्यूनंतर काही तासाच्या आत ते आपले शरीर नेवून सत्कारणी लावतात.
    मेडिकल कॉलेजला शिक्षण घेऊन भावी डॉक्टर निर्माण होत असतात. तएकवेळ तिथे भेट दिली तेव्हा कळाले की या मेडिकलच्या विद्यार्थ्याना अभ्यास करण्यासाठी मानवी देह मिळत नाहीत. अशावेळी आपण मृत्यूनंतर एवढे अनमोल देह का संपवतो,याचे आश्चर्य वाटते. असं म्हणतात,आपण जन्माला येताना काय घेऊन आलो?जे अनमोल देह आपण घेऊन आलो तोच जर समाजासाठी ठेवून गेलो तर केवढी मोठी सामाजिक बांधिलकी आपल्याकडून जपल्या जाईल !
  शेवटी एवढेच म्हणेन," मिळाले जे सर्व,ते करोनिया दान,
सोडियेला प्राण,कृतार्थतेने"
याप्रमाणे कृतार्थ मृत्यू हवा असेल तर सामाजिक बांधिलकी जपायलाच हवी.
   - संगीता देशमुख,वसमत

‪+91 99704 46447‬

अवयव दान सामाजीक बांधिलकी

दान म्हटले की विषेशतः आठवते ते संपत्ती, अन्न, आणि फारफारतर शरिराचा संदर्भ घेतला तर नेत्र.जो तो दान वेळोवेळी करतोच आपापल्या ऐपती प्रमाणे परंतु कधी विचार केलात मित्रांनो आपल्या जवळ अशी संपत्ती आहे जिचे मोल कोणासही लावता येणे अशक्य (IMPOSSIBLE)आहे. निसर्गाचा मिळालेला अमुल्य ठेवा म्हणजे आपले शरिर.
वर बोललोच आपण त्यानुसार शरिराचा नेत्र हाच अवयव पहिले अन् ब-याच जणांना समोर येतो परंतु अशा ब-याच गोष्टी आहेत ज्या आपण निकटवर्तीयांनाच नाही तर इतरांनाही देउ शकतो. अनेक दुर्धर आजार असे आहेत ज्याला जगातील कोणत्याही चिकित्सा पद्धतीने बरे करता येणे कठीण आहे परंतु विज्ञानात अशी प्रगती झाली आहे की आज एखादा अवयव निकामी असेल तर त्यास प्रत्यारोपित करून कार्यान्वित करता येते.
जसे
रक्त (Blood)
थँलिसेमिया असणारे रुग्ण, अपघाती व्यक्ती, एखादा रुग्ण ज्याची शल्यचिकित्सा होणार असेल, अँनेमिया सारखे रुग्ण
डोळे (Eyes)
नेत्रहिन व्यक्ती, डोळ्यातील कॉर्नीया
यकृत (Liver)
पचन संस्थेचे रुग्ण,
प्लिहा (May b pancreas)
डायाबिटीस सारखा आजार नियंत्रीत ठेवण्यास ह्या अवयवाचा महत्वाचा सहभाग, As it produces Natural Insuline in Body.
त्वचा (Skin)
आपण नेहमीच म्हणतो, ऐकतो प्लास्टिक सर्जरी , परंतु हीच त्वचा आपण दान ही करू शकतो ती Psoriasis (त्वचा रोग), पांढरे चट्टे, तसेच अँसिड हल्ला झालेले दुर्देवी, यांना नव चैतन्य जीवन मिळु शकते
हृदय (Heart)
हे आपण दान करून अनेक आजारांना इलाज नाही असे आजार असलेले रुग्ण वाचवू शकतो.
मेंदु (Brain)
ह्यातील इतके छोटे भाग आहेत जे प्रत्यारोपित करून अनेक आजारात गुणकारी परिणाम देतात.
Stem cell (मराठीत नाही आठवले)
अनेक प्रकारचे कर्क रोग, तसेच एकुण चौतीस (As per my knowledge त्याहीपेक्षा जास्तच) असे आजार आहेत ज्यात हे गुणकारी (अर्थातच शेवटचा) उपाय आहे.
आजकाल प्रसूती नंतर लगेच (जास्तीत जास्त अर्धा तास)नाळमधुन असणारे रक्त (50मिलीलिटर) रक्त घेऊन ते योग्य प्रक्रियेने साठवून ते वापरतात. If DNA MATCHES THEN CAN USE IN BLOOD RELATIONS ALSO AND IT HELPS.
मज्जा (Bone Marrow)
हा देखील स्टेम सेल प्रमाणे कार्य करतो.
Helps in Osteoporosis, as well as many types of cancer related to bones, blood also.
देह (Body)
एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयास शिक्षण म्हणून वापरासाठी संपुर्ण देह दान करता येते.

बरेच काही आहे पण वेळेअभावी आवरते घेत आहे.
शेवटचे इतकेच की आपण समाजाचे काही देणे लागतो त्यामुळे शक्य तितक्या प्रकारे शरिर दान करून अनेक रुग्णांना जीवनात जगण्यास नवी उम्मेद देऊ शकतो.फक्त मृत्युनंतर शक्य तितक्या लवकर अशा संस्थांना कळविले असता ते लवकरात लवकर तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचे अवयव गरजवंताला पोहचवितात, कारण प्रत्येक अवयवाचा मृत्युनंतर चा कार्यकाळ मर्यादित व वेगवेगळा असतो.
संजय पाटील

91 93247 42706‬
       विषय -- अवयवदान--
     एक सामाजिक बांधिलकी
====================
    🌹प्रेषक== कुंदा पित्रे🌹
====================
खरचं आज समाजात अनेक प्रवाह येऊन मिसळत आहेत सामाजिक प्रश्नाची चळत वाढतेच आहे. संततिनियमना पासुन ते लिव्ह इन रिलेशनशिपपर्यत मजल आज गाठली गेलेय. ही काळाची गरज म्हणायची की फक्त आपलीच कातडी वाचवायची ! हा मुद्दा मोठा गहन आहे.
माणूस जेव्हा साठीच्या पुढे झुकायला लागतो त्यावेळी त्याच्यात अनेक बदलाव येतात.कोणी अध्यात्माकडे वळतो. कोणी परोपकारी भावनेने मदत करू लागतो.कोणी आपल्या ज्ञानाचा फायदा करून देतो.पण काहीना जग मिथ्या वाटू लागते.जवळच्यांचे मृत्यु,जवळच्या माणसांनी दखल न घेणं यातून त्या व्यक्तिच्या सभोवती एक दाट वलय निर्माण होते.तो एकटा पडतो .सामाजिक कार्यात सहभाग घेणंही अशक्य होऊन बसते.
अशावेळी  त्याने अवयव दानाचे कायदेशीर कागद पत्र करावेत.जो विश्वासू आहे त्याच्याकडे सुपुर्त करावेत .
खरे तर अवयव दान अजुन लोकांच्या अंगवळणी पडलेले नाही.
आताच बाहेर गावाहून आणून दोन ह्रदयरोपणे झाली.अगदी कालच वाचले त्या व्यक्तिने हाडे दिली.अगदी दोन दिवसापुर्वी एकाच्या अंगावरून ट्रक गेला त्याचे दोन तुकडे झाले.त्यास्थितीत त्याने अवयव दान केले.अर्थात त्याचे डोळे उपयोगी पडले.ही खरी सामाजिक बांधिलकी.
दान म्हटलं अनेक प्रकारची दाने आहेत.पैशाने आपण किती श्रीमंत आहोत उदार आहोत हेहि दाखविण्याचा अट्टाहास असतो.पण हे सारे आपण इथेच सोडून जातो.आपल्याबरोबर कांहीच येत नाही.सगळ्या दानात अवयव दान हे वरच्या पंक्तित बसते.
आज मेडिकलशास्त्र एव्हढे प्रगत झाले आहे. की,मृत्यु होताच अगदी कातडी पासुन ह्रदयापर्यत सारे अवयव घेण्यासारखे असतील तर ते घेऊन बाॅडी परत सारखी करून तुम्हाला पुढच्या विधीसाठी दिली जाते.
जसं सत्पात्री दान,अन्नदान,भर दुपारी अभ्यागताला जेऊ घालणे, गरीबाला मदत ! हे महत्वाचे त्याहीपेक्षा अंधाला डोळे,ह्रदरोग्याला ह्रदय,रक्ताची गरज असणा-याला रक्त,केस त्वचा ,हाडे असे कितीतरी उपयोग मानवाच्या शरिराचे होतात . ज्या व्यक्तिने दान केलेय त्याला,व ज्या व्यक्तिला त्या अवयवाचा फायदा झालाय ती व्यक्ति आयुष्यभर दुवा देईल.आणि हेच संचित माणसाने कमवायचे असते.
ईश्वर भक्ति ही नाम संकिर्तनात आहे.तसेच सहेदी दुस-यास उपयोगी पडणे हेच ------
ख-या मानवतचे लक्षण आहे.
म्हणुन म्हणावेसे वाटते---
कधी कधी घेऊन जा असंच
कोणालाही दुःख न देता
ईश्वराचं देणं देऊन जा तसंच
गरजूंना सुख दे जाताजाता !!
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
कुंदा पित्रे






91 94214 18827‬
अवयव दान सामाजिक बांधिलकी.....

दोन महिन्यापुर्वीची गोष्ट आम्ही आमच्या व्याह्यांकडे अंतयात्रेला गेलो होतो गावाला....
त्याच्या भावाचा ब्रेन हॅमरेज होऊन मृत्यु झाला होता...एका बाजुला महिला बसलेल्या दिसल्या... तिथे जाऊन बसली... संवादात एक दुसरीला सांगत होती... अगं काय यांची पध्दत, देवाच्या दारात जातांना असले जाणे योग्य का? पुढच्या जन्मी आंधळेच होऊन जन्माला येतील ना हे... मोठ्या लोकांचे काय हे थेरं.... चौकशी अंती कळले की ब्रेन हॅमरेज झाल्याने डॉ.च्या सल्याने दोन्ही किडनी यकृत डोळे मोठे आतडे दान दिले गेले होते... अन अजुन विशेष म्हणजे प्रेत यात्रा स्मशान भुमीत न जाता मेडिकल कॉलेजला जाणार होती...
किती धाडसी निर्णय होता तो. गौरवास्पदच...
आपले दुःख बाजुला ठेवुन अवयव दान करणे ..किती धाडसी नी जुन्या रुढीला फाटा देऊन अंधश्रध्दा बाजुला फेकुन सरळ प्रेत मेडीकलच्या मुलांना शिकविण्यासाठी देणे...गौरवास्पदच....
   अनुभव डोळ्यासमोर झाला अन मनाने कुठे तरी वेध घेतला.. अरे असे जर आपण केले तर? अन माझी इच्छा घरात मुलांना बोलुन दाखवली...माझेही जे अवयव योग्य असतील तर ते खुशाल दान करा... अन घरात स्फोटच झाला मिस्टरांचा.. मुर्खासारखे काय बडबडतेस... अतृप्त आत्मा  राहील...मी शांत राहीली....शांत झाल्यावर परिस्थिती समजावुन सांगितली.. मी पारशी लोकांच्या  अंतविधीची माहीती देत मरणोत्तरही इतरांच्या उपयोगी पडावे तेव्हा खऱ्या अर्थाने जीवनाचे सार्थक होईल......
  उपदेश करणे सोपे असते पण स्वतःपासुन सुरुवात करुन खऱ्या अर्थाने समाज नविन विचारांच्या दिशेने पाऊल उचलेल.... चला साहीत्यमंथन ग्रुप पासुन सुरुवात करुया...
अवयव दान करा नी समाजाचे ऋण फेडा....सुनीता पाटील ...नाशिक


📚 साहित्य मंथन whatsapp ग्रूप आयोजित रविवार विचार मंथन स्पर्धेत

* अवयव दान : एक सामाजिक बांधिलकी *

 या विषयी मांडण्यात आलेल्या विचारांचा जाहिर करण्यात आलेला निकाल.

* प्रथम - नासा येवतीकर, धर्माबाद
* द्वितीय - संगीता देशमुख, वसमत
* तृतीय - सुलभा कुलकर्णी, मुंबई

 सर्वांचे विचार खूपच छान आहेत.
~~~~~~ΦΦΦΦΦΦΦΦ~~~~~~~~~~~~~ΦΦΦΦΦΦΦΦ~~~~~~~













No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...