Sunday 29 November 2015

सुप्रभात....
फ...फजीतीचा....😆😆😆
     विचार मंथनच्या या सदरात ...आपली झालेली फजीती किंवा जीवनात वावरताना आपणास एखादा दुसऱ्याच्य झालेल्या फजीतीचा कीस्सा..तसेच एैकीव फजीतीचे किस्से ऑडीओ किंवा..लीखीत स्वरुपात पाठवायचे आहे..ह्या कार्यक्रमाचा उद्देश फक्त निखळ हस्याचा आनंद लुटणे हा असेल..यातील बाबी विनोद म्हणुनचं घ्याव्यात तसेच कोणीही इतरांच्या भावना दुखावतील असे कोणतेही क्रृत्य करु नये..तर
व्हा तयार...हसण्यासाठी व हसवण्यासाठी...

आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी 10AM ते 7 PM...
=======================================================
विचारमंथन: २९/११/२०१५
© जागृती निखारे.
विषय: फ-:फजिती
          तर सांगायची गोष्ट अशी की, फजिती ची गंमत सांगायची कशी? मोठ्ठा गहन प्रश्न ;हसूं कसं करून घ्यायचं हो सगळ्यांसमोर! बरें असो. हंसू द्या सार्याना ,दिवस आनंदी  जाउ द्या.
    तर सांगायची गंमत अशी , गोष्ट तशी छोटी गंमत मात्र मोठी! मी नवीन नवीन गाणे शिकले.आमच्या महिला विकास मंडळात भावगीत स्पर्धा होत असतं.(आमचे हे मंडळ म्हणजे  पु.लं.चे.अतिविशाल महिलामंडळ) .तर मी पण मैत्रिणींच्या आग्रहाखातर स्पर्धेत भाग घेतला.मंडळातर्फे छानपैकी रोज प्रँक्टीस व्हायची. छान बसले माझे भावगीत.शब्द होते: दूर कुठे चंदनाचे बन जळते..... तुला कळते रे मला कळते...दू..र.
     मग काय आला ना स्पर्धेचा दिवस, जमली सारी थोर मंडळी, परिक्षक ! १०० महिलांनी हॉल गच्च भरला होता.एवढ्या सगळ्या महिलांसमोर गाणे😳.बापरे! १ नंबर झाला , असे करता करता माझा नंबर आला .गाणे सुरू झाले ,वा! सुरही मस्त लागला होता. दोन कडवी झाली, तिसरे कडवे आठवेना: मागे मैत्रिण बसली होती.म्युझिक चालू असतांना मान मागे करून तिला पुढचे कडवे विचारले , तिने पहिल्या शब्दाचा क्लु दिला.मग गाणे पुढे सरकले.ईतकी गर्दी आणि माझी गर्दीसमोर गायची पहिली वेळ! अशी फजिती झाली.
      पण आता मॉबची भिती गेली मनातून!
======================================================

विचारमंथन: फ- फजिती
©जागृती निखारे.
        वर्षापूर्वीची गोष्ट! माझ्या धाकट्या मामाच्या मुलाचे लग्न होते कोपरगावला.लग्न सकाळी लावले.जेवायला वेळ होता.माझ्या ताईचे  नातेवाईक कोपरगावला राहतात, त्यांना भेटून यावे असे आमचे ठरले.मी, ताईआणि आमची मावस बहिण अशा तिघीही निघालो.सभागृहापासून कोपरगाव जाण्यास  १५/२०मिनिटे लागतात असे कळले.रस्ता क्रॉस केला जी रिक्षा दिसली, तिला थांबवून पत्ता दिला.रिक्षेत बसलो रिक्षा सुरू झाली. १५/२० मिनिटे उलटली तरी आमचा पत्ता मिळेना.आम्ही बहिणी हंसत , खेळत रस्ता पाहत पाहत मार्गक्रमण करत होतो.तेवढ्यात मी ताईला म्हटले ,अग ताई , कोपरगांव अगदी प्रति शिर्डीसारखेच दिसतेय. मग द्वारकामाईकडे लक्ष गेले.रिक्षावाला म्हणाला, तुम्ही शिर्डीलाच आलात ताई! अरे बाबा आम्हाला कोपरगाव जायचे आहे.मग तो म्ह्णाला तुम्ही उलट्या दिशेचा रिक्षा पकडला.आम्ही बाहेरूनच साईबाबांचे दर्शन घेतले तोच ऑटो रिक्षा घेऊन निघालो.आणि कोपरगांवला त्याने बरोबर पत्त्याजवळ सोडले.पण  वाट चुकवली पुज्य साईंनी ,आम्हाला दर्शन देण्यासाठी! उलट्या वाटेची रिक्षा पकडल्यामुळे फजिती झाली खरी पण त्यामुळे साईदर्शन झाले आणि शिर्डीचे चवदार पेरूही खायला मिळाले.आणि त्यातून निर्माण झालेले हास्यविनोद मन प्रफुल्लीत करून गेले.काल बरोबर वर्ष झाले.
 अहो होऊ द्या फजिती, त्यातूनच फुलू द्या हास्यदरबार!
चुकलेल्या वाटा आणि झालेली फजिती जीवनात आनंद यात्रा आणतात.
=======================================================
मी नुकताच 10 वी पास होऊन कॉलेजला जायला लागलो होतो..मला चीत्रपट पाहायची खुप आवड होती..त्या वेळी आमच्या गावी एकच चीत्रपटगृह होतं..त्यतही सीटींग आरेज्मेंट नंबरने राहात नसे..तीकीटावर सीटचे नंबर रहायचे नाहीत..
कोणीही कोठेही बसायचे..मी एकटाच चीत्रपट पाहाण्यास गेलेला होतो..चीत्रपट सुरु झालेला होता..लाइट्स बंद झालेल्य होत्या..चीत्रपटाच्या अंधुक प्रकाशात चाचपडत मी सीट शोधत होतो..गेटकीपर कुठल्यातरी कामात असावा अन्यथा ते बॅटरी घेऊन सीट दाखवण्यास येत असे..एक रीकामी सीट दीसली..अंधुक प्रकाशात हे ही दीसलं की बाजुच्या सीटवर काही मुली बसलेल्या आहेत...मन आनंदलं..मी हळुवार पणे रीकाम्या खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न केला..थोड्या स्टाइलमधेच...आणी मी दानकन आपटलो..कारण खुर्चीला खालचा पृष्टभाग नव्हताच..तुटला होता..फक्त खुर्चीचे दोन हात व मागचा पाठ टेकवण्याचाच भाग होता
मी आपटलेला पाहुन मुलींचा बाजुलाच बसलेला हसायला लागला..मला समजलं की स्टाइल मारण्याच्या नादात माझा पोपट झाला होता..मी सरळ उठलो व मागे न पाहाता सरळ चीत्रपटगृहाच्या बाहेर पडलो..नंतर कॉलेजमधे पण ही गोष्ट समजली..कारण त्या मुली माझ्याच कॉलेजच्या होत्या..त्यातील काही मुली आजही माझ्या मीत्र आहेत..आम्ही एकत्र जमल्यानंतर ह्या गोष्टी आठऊन खुप हसतो..
अशी माझी फ..फजीती(चा) झाली होती...

 उत्कर्ष देवनीकर
=======================================================
एकदा कुत्र्यात अनं गाढवात पैंज लागते कि जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावाच्या पलीकडच्या सिंहासनावर बसेन तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन.
ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले , कुत्र्याला वाटले मिच जिंकेन कारण गाढवापेक्षा मी जोरात धाऊ शकतो ,
पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते.
शर्यत सुरु झाली.
कुत्रा जोरात धाऊ लागला; पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली. असेच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , प्रत्येक सिग्नल वर घडत राहिले.
कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला तर बघतो तर काय गाढव त्याच्या आधीच पोहचले होते तिकडे.
अन त्यांनी शर्यत जिंकून ते 'राजा' झाले होते.
अन ते बघून निराश झालेला कुत्रा बोलला कि....

 "जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते."

तात्पर्य काय ???
तर सामाजिक,धार्मिक आणि उद्योगधंदा यांच्या  बाबतीत....

१.आपल्या माणसांना विश्वासात घ्या.
२.आपल्या माणसांना पुढे जाण्यास सहकार्य करा,
    त्याना प्रोत्साहन द्या.
३.नाहीतर उद्या बाहेरची गाढ़व आपल्यावर राज्य
    करतील.
४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा ....🙏🙏
पतीचे श्लोक : नक्की वाचा..अफलातून आहे
=======================================================
मना सज्जना केर वारे करावे
पहाटे भल्या रोज पाणी भरावे
धुवावी अशी घासघासून लादी
पसारा नको आवरा नीट गादी

मना सज्जना तोच राणी उठावी
तिची त्याक्षणी जीभ वेगे सुटावी
चहा पाजुनी थंड डोके करावे
पती चांगला नाव ऐसे मिळावे

त्वरेने पुन्हा भात पोळी करावी
विळी घेउनी योग्य भाजी चिरावी
डबा रोजचा एक जैसा नसावा
शिरा न्याहरीला जरूरी असावा

प्रभाते मनी बायकोला भजावे
तरी स्वल्प पैसेच खर्चा मिळावे
पगारास हाती तिच्या सोपवावे
कमावून जास्ती तिला तोषवावे

तिचे पाय रात्री जरासे चुरावे
माका तेल ते चोळुनी जे मुरावे
निजायास गादी उशी शाल द्यावी
अशी चाकरी नित्य संपन्न व्हावी

नको रे मना बोल ते बायकोचे
असे की जणू बाण छातीत टोचे
तिच्या ह्या जिव्हा कोण घाले लगाम
अश्या शूरवीरा हजारो सलाम

अशी बायको ही कशी आवरावी
तिची भ्रष्ट बुध्दी कशी सावरावी
कुणी थोर तो काय सांगेल युक्ती
तया पावलांची शिरी लावु माती

कसा जीवघेणा अघोरीच त्रास
सुखाचा ठरे त्यापरी स्वर्गवास
तुम्हा सांगतो नीट ध्यानी धरावे
मरावे परी लग्न कधी न  करावे

- जय जय पतीवीर Samarth.
संकलन - नासा येवतीकर
=======================================================
मित्रांनो,प्रसंग माझ्या B.sc. शिकत असतानाचा आहे,जेव्हा आमच्या क्लास मध्ये आम्ही केवळ 5 students ते ही सर्व मुलेच
....आणि सगळेच्या सगळे घट्ट मित्र होतो,एवढे की बाहेरगावी राहाणाऱ्या दोन मित्रांच्या रूमवर आम्ही क्लास पूर्वी अन् क्लास नंतर
दिवसच नाही तर रात्र रात्र सुद्धा असायचो.... आमच्यापैकी एक हा संस्थाचालक चा मुलगा होता अन् घरमालक हा त्या
शाळेचे क्लर्क होते त्यामुळे रूम सहज मिळाल्या अन् आमची guarranty ही स्वतः घरमालकाला च  घ्यावी लागली ...
तसे आम्ही सुस्वभावी,अभ्यासू मुले होतोत पण विनोदाचि एकही संधी कोणीही गमावत नसे,मग तेंव्हा वेळेचे ही भान नसे,
           असाच एक प्रसंग,रात्री अंदाजे 9 च्या आसपासची वेळ होती,अभ्यासुन गुणवाण मंडळी सर्व अभ्यास करीत असताना
 अचानक लाइट गेली अन् सर्वत्र अंधार झाला... शांत स्वभावाचा खराखूरा भाडेकरू शिवशंकर आतल्या रूम(3 room) मध्ये गेला,
अन त्याची गम्मत घ्यावी म्हणून मी त्याच्या मागे गेलो,पण अंधारात काही दिसेना,मी त्याला शोधत होतो,हे त्याच्या लक्षात
आले होते जणू म्हणून तो दबा धरून बसला,काहीतरी हाताला लागले की त्याला मारायचे अन् बाहेरच्या रूम मध्ये धावत येऊन
आनंद घ्यायचा असा पोरखेळ सुरू होता,हे पाहून माझ्या इतर मित्रांनी ही त्यात सहभाग घेतला अन् जो तो आत जायचा जो
हाताला लागेल त्याला मारून बाहेर हसत सुटू लागला ....पण शिवशंकर कोणाला दिसयचा नाही अंधारात ....
 एव्हाना आमचा गोंधळ संपूर्ण गल्लीत ऐकू येऊ लागला असेन,पण याचे आमच्या पैकी नक्कीच कोणालाही भान
नव्हतेच मुळी ...आम्ही आमच्यात रममान झालेले होतो.
मग मी एक शक्कल लढवली त्याला पकडण्याची,एक घोंगडी हातात घेऊन दरवाज्यास वाट पाहत स्तब्ध उभा होतो,
थोडावेळ कोणीही हालचाल केली नसल्यामुळे खेळ संम्पला या विचाराने  शिव बाहेर आला अन् लागलीच मी ती
घोंगडी त्याच्या अंगावर टाकली अन् आनंदाने त्याला धरून ओरडत होतो "पकडलो,पकडलो " सर्व जन एकाच
बाहेरच्या रूम मध्ये जमा होऊन त्याच्या कडे धावत होती,पण एकाएकी सर्वजण शांत झाली,काय झाले यांची
मला काही कल्पना नव्हती...मी एकटाच ओरडत होतो,बिचारा शिव घोंगडीत होता,माझ्या तोंडावर अचानक
प्रकाश पडत असल्याचे मला जाणवले,नीट पाहिले तर खिडकी उघडून घरमालक जाधव काका कंदील हातात घेऊन
जणू "गदर" मधिल सन्नी देओल सारखे माझ्याकडे पाहत होते,मी आसपास एकटा नाही म्हणून नजर फिरवली तर
पाहतो तर काय सर्वजण कोपरा धरून बसलेले ....अन् मग मी ही घोंगडी काढत बाजूला झालो शिव सुद्धा sarakalaa
मग तेथून.... jadhaav काकांनी ही काहीही न बोलता तेथून बाजूलाच लागून असलेल्या स्वग्रुही परतले ......
ते निघून जाताच शिवशंकर कडे असलेला आता पर्यंतचा रोख माझ्यावर परतला ...तेवढ्यात लाइट आली अन् सबंध रात्र
म ग घडलेल्या प्रसंगाची पुन्हा punha चर्चा रंगली अन् माझी गम्मत कशी झाली हे सांगून रात्रभर हशा पिकला .....
त्यनंतर कित्येक दिवस घोंगडी, कंदील अन् "पकडलो,पकडलो " यांचीच रूमवर चर्चा होती ...
           अशा गमती,फजीती,मजा अन् आनंदाचे क्षण असे कित्येक प्रसंग माझ्या मित्रांच्या सहवासात आले,आज
आम्ही सर्वजण वेगवेगळया क्षेत्रात settled आहोत,आजही सर्व प्रसंग लहान सहान गोष्टी जशाच्या तशा आठवतो आणि
आनंद lutato.... आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने मला माझ्याशी घडलेला एक विनोदी प्रसंग share करण्याची
संधी साहित्य मंथन ने दिली त्याबद्दल आभार,हा अनुभव share करून आपल्या चेहऱ्यावर थोडसं  का होईना
हसू आणता यावे,एवढाच काय तो आग्रह....
     साहित्य मंथन अंतर्गत विचार मंथन स्पर्धेसाठी "फ ....फजीतीचा " साठी मी ------
संदीप धोंडगे पाटील,नांदेड.

( पुन्हा एकदा माझ्या मित्रांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी त्यांच्या ग्रूप मध्ये ही पोस्ट करू का,
त्याना ही आनंद पुन्हा  मिळेल )
=======================================================

|| कभी कभी ||
=========
कभी कभी हसीं गुन्हा
करने को जी चाहता है--
रूबरू हो जावु उनसे
के मरने को जी चाहता है-!!

सिले सिले होट मगर
कुछ कहने को जी चाहता है--
आँखों आंको में बतलादु
के बहने को जी चाहता है--!!

राह अंजानी सही
पहचानने को जी चाहता है;-
हमसफ़र बन जाओ अगर
साथ चलने को जी चाहता है--!!

हर घडी हर लमहा
इंतज़ार करने को जी चाहता है--
वोह बेखबर ही सही
के प्यार करने को जी चाहता है--!!
******सुनिल पवार-----/

=======================================================
प्रसंग साधा पण
क्षण फजितीचा!
जानेवारी 1970 ची घटणा आहे. त्यावेळी मला इंदापुर तालुक्यात निमगाव-केतकी येथे नोकरीला लागुन  आडीच महिणे झाले होते.
त्यादिवशी वडील आजारी असल्याची तार आली होती. व घाईने मी गावी जाण्यास निघालो होतो व बऱ्याच ठिकाणी गाडी बदलावी लागत होती. इंदापुरहुन टेंभुर्णीला आल्यावर करमाळा गाडीने करमाळा येथे पोचलो त्याचवेळी  करमळा ते "अनगर" असा बोर्ड असलेली गाडी निघु लागली होती व मी गाडी थांबवून आंत कंडक्टर शेजारी बसलो व गाडी फाकटा बाहेर पडतांनाच एक अहमदनगरचे तिकीट द्या अशी मागणी केली. त्या बरोबर कंडक्टरने बेल वाजवुन गाडी थांबवली व मला उतरण्याचा इशारा केला. मी मात्र चकीत झालो. त्याला विनंती केली कीं मला अहमदनगरहुन पुढे लवकर जायचे आहे व माझे जाणे फार जरुर आहे आणि जागा असुन तुम्ही माझी अडवणुक करत आहात. मी उतरणार नाही उलट तुमच्या विरुद्ध तक्रार करीन.
प्रसंग जरा गंभीर बनत होता. म्हणून एक सुज्ञ माणसाने मला समजावले तुम्ही या भागात नवीन दिसता त्यामुळे तुमचा गैरसमज होतोय ही गाडी अहमदनगरला जाणारी नसुन "अनगर"ला जातेय जे या भागातले एक मोठे गांव आहे.
माझी चुक माझ्या लक्षात आली आणि  कंडक्टरला "साॅरी" बोलुन खाली उतरलो.
वडील अजारी असल्याने मनस्थिती बिघडलेली असतांना हा प्रखार घडला आणि "फजीती" झाली.

रामराव जाधव.
=======================================================
एकदा की नाही 🚶
पाटलाच्या बोटात💍 आंगठी चमकत होती ।

परंतु 💎खडा चमकतच न्हवता मी विचारलं
 🚶पाटिल लगिन ठरलंकि काय ।

🚶पाटिल म्हनाले नाय रे मर्दा ।

मी ईचारलं मग ही💍 आंगठी कसलि रे ।

🚶पाटिल म्हनाले २३०९० रूपयेची 💍आंगठी हाय ती।

मग मी विचारलं 💎खडा असा कारे ।

🚶पाटिल म्हनाले 💍आंगठी ९० रुपयाची हाय।

आणि त्यातला 💎खडा २३००० रुपयाचा हाय।

मी इचारलं कस काय रं।

 🚶तो म्हणाला मला मुत खडा झाला होता तो अॉफरेशन करुन बाहेर काढला त्याचा खर्च २३०००, रुपये आला ।

आता सांग एवढा म्हागाचा 💎खडा टाकून द्यायचा कारे।

 म्हनुन 💍आंगटी ९०,रूपयाची बनवली आणि तो खडा त्यात बशीवला ।
हाय किनाय डोकं😁।

ह्या 🚶पाटलाच ।


😍😄😃😀☺😜😝😛😜😜😜😜😜😜😜😝😛

=======================================================

फ :- फजितीचा

माझ्या जीवनातील अनुभव सांगतो शालेय जीवनात इयत्ता सातवी मध्ये असताना आमच्या शाळेत स्नेह संमेलन आयोजित केले होते.
आमच्या वर्ग शिक्षकांनी संमेलनासाठी एक "नाटक "बसविले होते नाटकाचे नाव " सुर्याला आले पडसे " आणि मला भुमिका मिळाली नारदमुनीची 😂 विशेष सांगायचे म्हणजे 26 जानेवारी महिन्यात थंडीचा दिवस आणि हे मुनी महाराज फक्त पंच नेसलेले रात्रीचा समय होता थंडीचा कडाका वाढलेला सुर्य सोबत असुन ही थंडी आवरत नव्हती नाटकाला सुरूवात झाली आधीच थंडीमुळे सर्व अंग कापत होते आणि समोर प्रेक्षक पाहून जास्तच हलायला सुरूवात झाली मग काय जे पाठ डायलॉग विसरून मनाचे सुरू झाले..
पण त्यामुळे समोरच्यांना काय म्हणायचे कळत नव्हते.
थंडीमुळे दात कुडकुडत होते.
आणि फ:- फजितीला सुरूवात झाली लोक हसत होते काही कुतूहलाने हसत होते एवढ्या थंडीत नारद उघडा यालाच पडसे येणार शेवटी तेच "नारायण नारायण "
😂😂😂😂😂😂

गजानन पवार 

1 comment:

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...