Thursday 31 May 2018

जागतिक दुध दिवस

दूध म्हणजे पूर्ण अन्न

नुकतेच जन्म घेतलेल्या मुलांसाठी दूध हेच पोषक अन्न आहे. सुरुवातीच्या दुधात रोग प्रतिकारक पदार्थही असतात त्यामुळे मूल जन्मल्याबरोबर दूध पाजविण्याचा सल्ला डॉक्टरमंडळी देतात. दूध म्हणजे सस्तन प्राण्याच्या मादीच्या स्तनांतून स्त्रवणारा एक पांढरा द्रव पदार्थ आहे. दूध निर्मिती करणे हा सस्तन प्राण्यांचा विशेष गुणधर्म आहे. सस्तन प्राणी आपल्या पिलाना स्तनांमधून दूध पाजून मोठे करतात. एखाद्या महिलेला स्तनातून दूध येत नसल्यास त्या लेकराला गाईचे दूध पाजविले जाते म्हणून गाईला आईच्या नंतरचे स्थान दिल्या जाते. गाईचे दूध पचायला हलके असते आणि त्यात मेदाम्ले, प्रामुख़्याने प्रथिन आणि लॅक्टोजचे (शर्करा) कलिली मिश्रण असते याशिवाय सोडियम पोटॅशियम, कॅलशियमचे क्षार, आणि सूक्ष्म प्रमाणात फॉस्फरस पेंटाऑक्साइड, अ आणि ड जीवनसत्व असतात. दूध हा मानवाच्या आहारातील महत्वाचा अन्न बनले आहे. त्याचसोबत दुधातून कॅल्शियम मिळत असल्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी दूध पिणे आवश्यक असल्याचे बोलले जाते. पहिलवान मंडळी व्यायाम केल्यावर तांब्याभरून दूध पित असत असे पूर्वीचे लोकं बोलायचे. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. आज चहा करायला कपभर दूध मिळणे अवघड आहे तर तांब्याभर दूध पिण्याची गोष्ट वेगळी.  त्याचबरोबर दुधामधील प्रथिने आणि मेदाम्लामुळे लहान मुलांसाठी देखील ते पोषक असते. लहान मुलांना दुधात गरम भाकर चुरून दिल्यास मोठ्या आनंदात ते मूल जेवण करते. माणूस जेव्हा शेती करायला प्रारंभ केला त्याचवेळी त्याला पशुपालनाचे महत्व कळाले होते. म्हणून शेतात काम करणाऱ्या प्राण्यासोबत प्रामुख्याने गायी पाळण्यात येत असत. त्या खालोखाल शेळी, मेंढी, म्हैस यांचे देखील पालन होऊ लागले आणि या प्राण्यापासून दूध मिळवले जाऊ लागले.  प्रत्येक व्यक्तीच्या घरी दूध देणाऱ्या प्राण्यांचा समावेश होता. खाऊन उरल्यानंतर शिल्लक राहिलेले दूध टिकवून ठेवण्यासाठी त्या दुधापासून दही बनवण्याची पद्धत सुमारे दोन हजार वर्षापूर्वीची आहे. त्याचसोबत दूधापासून लोणी, चीज, क्रिम, खवा, पनीर आणि  आईसक्रीम इत्यादी पदार्थे तयार केले जातात ज्यांचा रोजच्या जेवणात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. फार पूर्वीच्या आकडेवारीनुसार भारतामधील पशूंची संख्या जगात पहिल्या क्रमांकाची आहे. त्यामुळे भारतात सर्वाधिक दूध उत्पादन होते, यास धवल क्रांती असे सुद्धा म्हटले जाते.  दुभत्या जनावरांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी प्रत्येक दुभत्या जनावरामागे सर्वाधिक दूध उत्पादन हॉलंडमध्ये होते. दूध हे एक पूर्ण अन्न असून आजारी असलेल्या लोकांना दुधात हळद टाकून दिल्या जाते. लहान मुलाना रोज सकाळी एक कपभर दूध पिण्याचा सल्ला मोठी मंडळी देतात. पण आजची मूल दुधापेक्षा चहाला अधिक महत्व देतात. गावोगावी डेअरीच्या माध्यमातून दुधाचे संकलन सध्या केल्या जात आहे. यात काही कंपनी खूप मोठे कार्य केले आहेत ज्यात प्रामुख्याने डॉ. वर्गीज कुरियन यांचे अमूल कंपनी आज ही अग्रेसर आहे. ग्रामीण भागात पूर्वी दूध देणाऱ्या जनावरांची संख्या भरपूर होती मात्र आज तशी परिस्थिती राहिली नाही. ग्रामीण भागात आज दूध देणाऱ्या गायीचे प्रमाण खूप कमी झाले आहे त्यामुळे जेथे दुधाचा महापूर वाहत होता तिथे कपभर चहासाठी दूध मिळणे खूप अवघड झाले आहे. काही शहरी गावात याच दुधाच्या व्यवसायाने अनेकांना जगण्याचे मार्ग दाखविले आहे, हे ही सत्यच आहे. मात्र बरेच दूध विक्रेते दुधात पाणी मिसळून भेसळ करतात त्यामुळे लोकांना शुध्द दूध मिळणे फारच अवघड आहे. सध्या शहरात दुधाचे प्रति लिटर 50 ते 60 रु. याप्रमाणे विकले जाते.  दूध का कर्ज चित्रपटात एका सापाने आपले दुधाचे कर्ज कसे दिले हे दाखविले आहे मात्र विज्ञान सांगते की, साप दूध पित नाही. तसेच काही मंडळी दुधाचा अभिषेक देखील करतात. त्यात खास करून गायीच्या दुधाचा वापर करतात मात्र ते दूधच मिळत नसेल तर काय करणार ? त्यावेळी नुसत्या पाण्याचा अभिषेक देखील केला जातो. आज जागतिक दूध दिन आहे त्यानिमित्ताने दुधाचे महत्व आपण सर्वांनी जाणून घेणे आवश्यक आहे. 

संकलन 
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...