Sunday 15 November 2015

** शाळेची वेळ वाढविल्याने गुणवत्ता वाढेल . . . . . . . ?
लेख वाचून काही सुधारणा असेल तर कळवा plz

🔷आठ तास शाळा 🔷

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचा कालावधी सहावरून आठ तास करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. राज्य सरकारतर्फे नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या अहवालात ही गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
यावर आधारित
नागरिकांकडून २३ नोव्हेंबरपर्यंत सूचना, अभिप्राय आणि शिफाराशी मागवण्यात आल्या आहे
नुकत्याच पाठीमागे राज्यातील २७ हजार ७२६ गावांपैकी २५ हजार १०८ गावांतील शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात चर्चासत्रे घेण्यात आली. 

मित्रांनो ही चर्चा जरूर घेण्यात आली पण माझ्या माहिती प्रमाणे ही चर्चा सत्रे म्हणजे नुसती सह्यांची मोहीम पार पडली असे म्हणल्यास वावगे वाटू नये

खर पाहता मूळ मुद्दा बाजूला करुन शासनाची भूमिका जरा संशयास्पद वाटल्यास विशेष वाटायला नको

शासकीय शाळेची वेळ वाढवून म्हणजेच शाळेच्या वेळेत वाढ करुन शासन नक्की काय साध्य करु पाहत आहे ?  समजेना...

शासन असे सांगत आहे की 2 तास वेळ वाढवून त्या वेळात मुलांना कृतियुक्त अध्यापन केले जाईल,
आनंददायी शिक्षण दिले जाईल असे पालकांना भुरळ घालनारे मुद्दे पालकांसमोर मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही कारण या पाठीमागे वेगळाच उद्देश् दिसू लागला आहे तशी चर्चा सुजान नागरिक व् शिक्षकांमधे ऐकायला मिळत आहे

या विषयावर माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत

🔷 शाळेची वेळ वाढवून विद्यार्थ्यांना  आनंददायी शिक्षक दिले जाईल
म्हणजे आता जे शिक्षण दिले जात आहे ते आनंददाई नाही का ?

🔷 शाळेची वेळ वाढवायची हा मुद्दा उपस्थित करून, यास शिक्षक विरोध करणार हे माहीत असल्यामुळे पालक आणि शिक्षक यांच्यामधे दुफळी  निर्माण करण्याचा हां डाव तर नाही ना ?

🔷शिक्षक मुलांना जास्त वेळ शिकवायला नको म्हणतात म्हणजे शिक्षक कामचुकार आहेत असा चुकीचा संदेश समाजात  पसरवण्याचा डाव तर नाही ना ?

🔷मूल फ़क्त शाळेतच शिकते का ?

🔷जर प्रगत शैक्षणिक सारखा उपक्रम राबवून मूल विशिष्ठ पद्धतीने जर पाच महिन्यात शिकत असेल तर वेळ कशासाठी वाढवायची ?

🔷असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून शिक्षकांना मूळ उद्देशापासून भरकटविण्याचा हा प्रयत्न तर नाही ना ?
🔷 शाळेची वेळ वाढवत असताना RTE चा विचार करणार आहे की नाही ?

🔷मुलांच्या वयाचा विचार करणार आहे की नाही ?

🔷शाळेत शिकणारे मूल हे मशीन आहे की काय ? 


असे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत
पण आता आपल्या सारख्या विचारी लोकांनी पुढाकार घेऊन योग्य ती भूमिका घेतली पाहिजे
नाहीतर काळ सोकावल्याशिवाय राहणार नाही

शासन शिक्षकांना असणारी अशैक्षणिक कामे कमी (बंद)करायची सोडून शिक्षकांमधे नैराश्याचे वातावरण तयार करत आहे

वेळ वाढवून गुणवत्ता सुधारेल हे जर मत शासनाचे असेल तर तो निव्वळ त्यांचा फ़ार्स ठरेल यात शंका नाही
त्यामुळे आता आपणाला शिक्षक व पालकांमधे जागृती करावी लागणार आहे.
तसेच प्रत्येक शिक्षकाने आपले ठोस म्हणणे व् विरोध दर्शविणे महत्वाचे आहे नाहीतर आपले काही म्हणने नहीं असे गृहीत धरून शाळेची वेळ वाढवली तर आश्चर्य वाटायला नको.

तरी सर्व पालक शिक्षक व् विद्यार्थी यांनी आपले म्हणणे खालील मेल वर पाठवावे.
schoolennep@gmail.com


        विक्रम अडसुळ
             संयोजक ( ATM)
Active teacher's mharashtra 
           व् सदस्य (ATF)
Active teacher's forum maharshtra



1 comment:

  1. खुप चांगला लेख आहे येवतीकर सर
    आपल्याला पडलेले प्रश्न सर्व शिक्षकांना पडलेले आहेत

    ReplyDelete

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...