Saturday 3 June 2017

निकालात मुलींच अग्रेसर का ?

नुकतेच बारावीचा निकाल जाहिर झाला. त्यात नेहमीप्रमाणे मुलींची निकालाची टक्केवारी मुलांच्या निकालापेक्षा जास्त दिसून आली. असे का ? शाळेच्या प्राथमिक स्तरापासून जर अवलोकन करण्यात आले तर एक बाब प्रकर्षाने दिसून येते की वर्गात मुलांपेक्षा मुलीं जास्त प्रमाणात अग्रसर दिसून येतात. दिलेले प्रत्येक काम मन लावून पूर्ण करतात. वेळेत आपला अभ्यास पूर्ण करतात.सांगितलेले काम चोख पूर्ण करतात. याउलट मुले वागतात, असे का ? या प्रश्नाचे उत्तर शोधणे खुप गरजेचे आहे असे वाटते. याचा शोध लावताना अनेक बाबी डोळ्यासमोर आल्या जसे की अभ्यासावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मित्र परिवार. मुलांचा मित्र परिवार अर्थात मुलीं पेक्षा जास्त असतो. त्याचा जास्तीत जास्त वेळ मित्रासोंबत खेळ खेळण्यात, चित्रपट पाहण्यात, गप्पा मारण्यात वाया जातो. या उलट मुलीं सोबत घडते. आपला जास्तीत जास्त वेळ मुलीं घरात घालवितात आणि त्या वेळात त्यांच्या हातात पुस्तकाशिवाय इतर काही नको वाटते. मुलींना थोडा सुद्धा अपमान सहन करावे असे वाटत नाही तर मुले किती ही अपमान सहज पचवितात. त्यांना त्याचे काही वाटत नाही.  शिक्षा झाले तरी त्यांना काही वाटत नाही. शहाण्याला शब्दाचा मार हे मुलांना कुठे ही लागू पडत नाही.
त्याचसोंबत मुलांना घरात मिळत असलेली वागणूक ही सुद्धा परिणाम करणारी बाब आहे. आज काल असे दिसून येते की, मुलांचे सर्व काही मागण्या ताबडतोब पूर्ण केल्या जातात. त्या प्रमाणात मुलींच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत. त्यामुळे मुलीं शिक्षणा द्वारे घरातील पालकांचे लक्ष आपल्या कडे वेधुन घेण्याचा प्रयत्न करतात. मुलींची महत्वाकांक्षा खुप मोठी असते आणि ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. मुलींच्या शिक्षणावर सरकारच्या विविध योजना हे ही मुलींच्या टक्केवारीत वाढ होण्या मागे एक प्रमुख कारण आहे असे म्हणण्यास हरकत नसावी. बेटी बचाओ आणि बेटी पढाओ सारख्या योजना आज शासन मुलीं जन्मल्या पासून अवलंबित आहेत. मुलींच्या शिक्षणावर विविध प्रकारच्या योजना तयार करून त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देताना मुलांच्या शिक्षणाकडे साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होत असल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. प्राथमिक शाळेपासून विद्यार्थ्याच्या मनात मुलगा-मुलगी असा भेद निर्माण केल्या जातो. मुलगी म्हणून तिला वेगळ्या प्रकारे आणि मुलगा म्हणून ह्याला वेगळ्या प्रकारचे वागणूक पालक आणि शिक्षकां कडून दिल्या जाते. त्याचा काही अंशी परिणाम मुलांच्या लहान मनावर होत असतो. ज्याचे कोणी ही विचार करीत नाही. पहिल्या वर्गात शिकणाऱ्या यशराज आणि शिवानी दोघांनी समान चूक केल्यावर गुरुजींनी यशराजला हातावर एक छडी मारली आणि शिवानी ला जवळ घेत बेटा असे चूक करू नये म्हणत पाठीवर हलका सा धपाटा देऊन बसविले. सहा वर्षाचा यशराजचे मन समजू शकले नाही की, दोघांची चूक सारखी राहून शिक्षा समान का नाही. घरी आल्या नंतर त्याने आपल्या वडिलांजवळ तशी तक्रार केली. मग वडिलांनी पण त्याला समजावून सांगताना म्हटले की, ती मुलगी आहे म्हणून सर तसे केले असतील. म्हणजे मुलांच्या डोक्यात अगदी लहानपणा पासून मुलगा-मुलगीचा भेद चालू असतो. त्यामुळे त्याच्या लहान मनावर वेगळाच परिणाम होतो. एक सातव्या वर्गातील मुलगा ज्याला शासना कडून काहीच मिळत नाही तो वैतागुन काय म्हणतो, सर सर्व काही मोफत मुलींनाच का दिल्या जातो, आम्हाला मुलांना का दिले जात नाही. आम्ही काय पाप केलो. अश्या प्रश्नाला गुरुजीं किंवा पालक काय उत्तर देणार.
निकालाची टक्केवारी वाढ करण्यात ह्या बाबी कदाचित काही महत्वाची भूमिकेत नसतील ही मात्र विद्यार्थ्याच्या मनावर कुठे तरी आघात करीत असतील. त्याच सोंबत मुलगा असो वा मुलगी त्यांची अभ्यासाची तयारी हेच निकालामधून प्रदर्शित होत असते.
नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...