कोजागिरी पौर्णिमाचे महत्त्व -
पौराणिक कथेनुसार, एक सावकार होता, त्याला दोन मुली होत्या. सावकाराच्या दोन्ही मुली मनापासून पौर्णिमेचे व्रत करत असत. पण मोठी मुलगी हे व्रत अत्यंत श्रद्धेने आणि सर्व नियम पाळून करत असे. मात्र, लहान मुलगी व्रत अर्धवट ठेवत असे. त्यामुळे, तिच्या घरात जन्मलेली मुले जिवंत राहत नव्हती. हे पाहून ती खूप दुःखी झाली. एके दिवशी तिने एका ब्राह्मणाला यामागील कारण विचारले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला की, 'तू पौर्णिमेचे व्रत नियमाने करत नाहीस, म्हणूनच मुझी मुलं लगेच मरण पावतात. मात्र, जर तू पौर्णिमेचे व्रत श्रद्धेने पूर्ण केलीस, तर तुला संततीसुख लाभेल'. ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार, सावकाराच्या लहान मुलीने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी विधीपूर्वक उपवास केला. त्यानंतर, तिला एक लहान मुल झाला. मात्र, दुर्दैवाने त्या लहान बाळाचाही अल्पावधीतच मृत्यू झाला. या घटनेमुळे, ती निराश झाली. पण, बाळाला एका पाटावर ठेवून सावकाराच्या लहान मुलीने तिच्या मोठ्या बहिणीला घरी बोलावले. जेव्हा मोठी बहीण त्या पाटावर बसायला गेली, तेव्हा तिच्याजवळ असलेली हंडी सावकाराच्या लहान मुलीच्या मृत मुलाला लागला आणि अचानक रडू लागला. हे पाहून तिची मोठी बहीण आश्चर्यचकित झाली आणि आपल्या लहान बहिणीला म्हणाली की, 'जर मी या पाटावर बसले असते, तर हा मुलगा मेला असता ना?' तेव्हा सावकाराची लहान मुलगी म्हणाली, 'हा मुलगा पूर्वीच मृत होता. मात्र, तुझ्या चांगल्या कर्मांमूळेच माझा मुलगा जिवंत झाला'. तेव्हापासून, अशी प्रथा सुरू झाली की, जो भाविक भक्तीभावाने कोजागिरी पौर्णिमाचे उपवास करेल, त्याला चांगले फळ मिळेल.
कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का पितात ?
कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पितात. ही परंपरा अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. पौराणिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांमधून अमृताचा वर्षाव होतो. त्यामुळे, दूध आणि इतर पौष्टिक पदार्थांना दैवी गुणांनी युक्त मानले जाते. इतकंच नाही, तर मसाला दुधातील औषधी गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर असते आणि पित्तदोष कमी करण्यास मदत करतात, असे आयुर्वेदात सांगितले आहे.
संकलन - नासा येवतीकर