Wednesday, 17 March 2021

17/03/2021

मृत्यू 

माणसात जीव असेपर्यंत
चालतो सरळ व्यवहार
जीव निघून गेला की
गळ्यात घालतात पुष्पहार

ना कोणती धडपड असते
ना असते कोणती हालचाल
चौघे घेऊन जाती स्मशानात
माणसांचे होतात काय हाल

जिवंतपणी पाहून घ्यावा
मेलेल्या माणसांची अवस्था
येत नाही सोबत कोणी ही
ठेवू नये कशावर ही आस्था

मिळवलेल्या धन संपतीपेक्षा
गिणती होते केलेल्या कर्माची
मृत्यूनंतर आपल्या माघारी 
आठवण राहते ती कामाची

- नासा येवतीकर, येवती, ता. धर्माबाद, 9423625769

No comments:

Post a Comment

वेळेला महत्व देणारे श्री बाबुराव भोजराज सर ( Baburao Bhojraj Sir )

वेळेला महत्व देणारे बाबुराव भोजराज सर समाजात शिक्षकांचे स्थान खूप मोठे आहे. शिक्षकांविषयी म्हटले आहे की, "शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत...