Wednesday, 4 March 2026

देविदास वाडेकर - 5 मार्च ( Devidas Wadekar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. 

आजच्या कार्यक्रमात आपण प्रा. देविदास वाडेकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

प्रा. देविदास दत्तात्रय वाडेकर 
प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर हे मराठी साहित्यविश्वातील अभ्यासू प्राध्यापक, संशोधक आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात. आपल्या सखोल अध्ययन, प्रभावी अध्यापनशैली आणि साहित्यिक लेखनामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या नि वाचकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहेत.
प्रा. देविदास वाडेकर यांचा जन्म २५ मे १९०२ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला. लहानपणापासूनच वाचनाची आवड आणि साहित्याची ओढ असल्यामुळे त्यांनी उच्च शिक्षण मराठी विषयात घेतले. पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयासह इतर महाविद्यालयात त्यांनी तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे अध्यापन केले. त्यांची शिकवण्याची पद्धत साधी, समजण्यास सोपी आणि उदाहरणांनी परिपूर्ण अशी होती. विद्यार्थ्यांना विषयाची गोडी लावणे हे त्यांच्या अध्यापनाचे वैशिष्ट्य होते.
साहित्य, संस्कृती, समाजप्रबोधन आणि विचारपर लेखन यांद्वारे त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. विविध वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि व्याख्यानमालेतून त्यांनी आपले विचार मांडले.
त्यांच्या लेखनात सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि संस्कारक्षम विचार यांचा प्रभाव दिसून येतो. ते केवळ शिक्षक नव्हते, तर मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. प्रा. वाडेकर यांनी इंग्रजी विषयांचे ज्ञान मराठीत आणण्यासाठी मराठी परिभाषेवर प्रचंड काम केले. मराठी तत्त्वज्ञान महाकोश हा त्रिखंडात्मक प्रकल्प १९७४ मध्ये संपादित केला, जो तत्त्वज्ञान क्षेत्रातील मैलाचा दगड मानला जातो. त्यांनी लिहिलेल्या आत्मकथेचे नाव माझी वाटचाल असे आहे. 
मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रात पुढे गेले.
प्रा. देविदास वाडेकर यांचे ५ मार्च १९८५ रोजी निधन झाले. 
प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर हे ज्ञान, संस्कार आणि साहित्यप्रेम यांचे प्रतीक होते. त्यांच्या अध्यापन आणि लेखनातून समाजाला दिशादर्शन मिळाले. त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरते.
आज प्रा. देविदास वाडेकर यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, प्रा. देविदास वाडेकर यांचा जन्म २५ मे १९०२ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला. 

दुसरा प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर हे कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे अध्यापन केले.
बरोबर उत्तर आहे, प्रा. देविदास वाडेकर हे तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे अध्यापन केले.

तिसरा प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर यांना लहानपणापासून कश्याची आवड होती ?
बरोबर उत्तर आहे, प्रा. देविदास वाडेकर यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती.

चौथा प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर यांनी लिहिलेल्या आत्मकथेचे नाव काय आहे ?
बरोबर उत्तर आहे, प्रा. देविदास वाडेकर यांनी लिहिलेल्या आत्मकथेचे नाव माझी वाटचाल असे आहे. 

शेवटचा पाचवा प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर यांनी मराठी तत्त्वज्ञान महाकोश हा त्रिखंडात्मक प्रकल्प कोणत्या वर्षी संपादित केला ?
बरोबर उत्तर आहे - १९७४ मध्ये प्रा. देविदास वाडेकर यांनी मराठी तत्त्वज्ञान महाकोश हा त्रिखंडात्मक प्रकल्प संपादित केला.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Tuesday, 3 March 2026

राष्ट्रीय सुरक्षा दिन - 4 मार्च ( National Safety Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 

कसे आहात ? मजेत ना !

 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. 

आजच्या कार्यक्रमात आपण राष्ट्रीय सुरक्षा दिन या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

🇮🇳 National Safety Day - राष्ट्रीय सुरक्षा दिन


दरवर्षी ४ मार्च रोजी भारतात ‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’ साजरा केला जातो. कामाच्या ठिकाणी, रस्त्यावर, उद्योगधंद्यात तसेच दैनंदिन जीवनात सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

१९७२ साली National Safety Council (NSC) या संस्थेची स्थापना झाली. त्यानिमित्ताने ४ मार्च हा दिवस ‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

या दिनाचे मुख्य उद्देश म्हणजे कामगार आणि नागरिकांमध्ये सुरक्षा नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे, औद्योगिक अपघात कमी करणे, रस्ते सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षिततेवर भर देणे, आपत्कालीन परिस्थितीत योग्य उपाययोजना करण्याचे प्रशिक्षण देणे.

सुरक्षेचे काही प्रकार, जसे की, औद्योगिक सुरक्षा, रस्ते सुरक्षा, अग्निसुरक्षा, घरगुती सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा

मग यात शाळा व विद्यार्थ्यांची भूमिका काय असावी ? शाळांमध्ये सुरक्षा शपथ घेणे, जनजागृतीसाठी रॅली काढणे, पोस्टर स्पर्धा आयोजित करणे आणि प्रात्यक्षिके आयोजित करणे. विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळावे, रस्त्यावरून चालताना उजव्या बाजूने चालावे आणि रस्त्यावर अपघात झाल्यास 108 या टोल फ्री क्रमांकावर फोन लावावे, हे तुम्हांला चांगलेच माहित आहे. अग्निसुरक्षा नियम समजून घ्यावे, कुठे आग लागली असेल तर 101 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा. तसेच काही आपत्कालीन क्रमांकांची माहिती ठेवणे देखील आवश्यक आहे. जसे की, पोलीसांना फोन लावण्यासाठी 100 डायल करावे, राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक आहे 112 तर चाईल्ड हेल्पलाईन नंबर आहे 1098.

“सुरक्षा प्रथम” हा संदेश या दिवसातून दिला जातो. अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन आणि जागरूकता आवश्यक आहे. सुरक्षित समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिन आपल्याला चांगली सवय लावण्याची प्रेरणा देतो. नियम पाळल्यास आणि सजग राहिल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात. त्यामुळे सुरक्षितता हीच यशस्वी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे मुलांनो तुम्ही सर्व नियम लक्षात ठेवून वागाल ना ! व्वा ! खूप छान ! मला माहित आहे, तुम्ही एक जागरूक आणि सजग नागरिक बनून सर्व नियम लक्षात ठेवून वागणार आहात. 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती छान वाटली ना ! नक्की कळवा. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 


पहिला प्रश्न - रस्त्यावर अपघात झाल्यास कोणत्या टोल फ्री क्रमांकावर फोन लावावे ?

बरोबर उत्तर आहे, रस्त्यावर अपघात झाल्यास 108 या टोल फ्री क्रमांकावर फोन लावावे.


दुसरा प्रश्न - रस्त्यावरून चालताना कोणत्या बाजूने चालावे ?

बरोबर उत्तर आहे, रस्त्यावरून चालताना उजव्या बाजूने चालावे.


तिसरा प्रश्न - १९७२ साली कोणत्या संस्थेची स्थापना झाली ?

बरोबर उत्तर आहे, १९७२ साली National Safety Council (NSC) या संस्थेची स्थापना झाली.


चौथा प्रश्न - कुठे आग लागली असेल तर कोणत्या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा ?

बरोबर उत्तर आहे, कुठे आग लागली असेल तर 101 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा


आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - चाईल्ड हेल्प लाईन नंबर सांगा पाहू.

बरोबर उत्तर आहे - 1098 हा चाईल्ड हेल्प लाईन नंबर आहे.


चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची पण.... नमस्कार. 🙏


( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )


संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

जागतिक वन्यजीव दिन - 03 मार्च ( World Wildlife Day )

🌿 World Wildlife Day - जागतिक वन्यजीव दिन
दरवर्षी ३ मार्च रोजी ‘जागतिक वन्यजीव दिन’ साजरा केला जातो. पृथ्वीवरील वन्य प्राणी व वनस्पती यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याबाबत जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. जैवविविधता ही मानवजातीच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
२० डिसेंबर २०१३ रोजी United Nations General Assembly यांनी ३ मार्च हा दिवस ‘जागतिक वन्यजीव दिन’ म्हणून घोषित केला. ३ मार्च १९७३ रोजी CITES (वन्य जीव आणि वनस्पतींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील करार) स्वीकारण्यात आला होता. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीव आवश्यक आहेत. अन्नसाखळी टिकवून ठेवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. औषधनिर्मिती, संशोधन आणि पर्यटनासाठी वन्यजीव उपयुक्त ठरतात. जैवविविधतेमुळे पृथ्वीवरील जीवन समृद्ध राहते.
वनतोड, बेकायदेशीर शिकार, प्रदूषण आणि हवामान बदल यांमुळे अनेक प्राणी व वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वाघ, गेंडा, हत्ती यांसारख्या प्रजाती संकटग्रस्त ठरत आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूक राहावे, झाडे लावावी व त्याचे संवर्धन करावे, प्लास्टिकचा वापर कमी करावे आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. 
जागतिक वन्यजीव दिन आपल्याला निसर्गाशी असलेले नाते जपण्याची आठवण करून देतो. वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. “निसर्ग वाचवा, भविष्य वाचवा” “वन्यजीव वाचवा, पृथ्वी वाचवा” हा संदेश या दिवशी दिला जातो, कारण वन्यजीवांचे रक्षण करणे म्हणजे आपल्या भविष्यासाठी निसर्ग वाचवणे !

संकलन : नासा येवतीकर 

देविदास वाडेकर - 5 मार्च ( Devidas Wadekar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.  आजच्या कार्यक्रमात आपण...