Wednesday, 4 March 2026

देविदास वाडेकर - 5 मार्च ( Devidas Wadekar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. 

आजच्या कार्यक्रमात आपण प्रा. देविदास वाडेकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

प्रा. देविदास दत्तात्रय वाडेकर 
प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर हे मराठी साहित्यविश्वातील अभ्यासू प्राध्यापक, संशोधक आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात. आपल्या सखोल अध्ययन, प्रभावी अध्यापनशैली आणि साहित्यिक लेखनामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या नि वाचकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहेत.
प्रा. देविदास वाडेकर यांचा जन्म २५ मे १९०२ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला. लहानपणापासूनच वाचनाची आवड आणि साहित्याची ओढ असल्यामुळे त्यांनी उच्च शिक्षण मराठी विषयात घेतले. पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयासह इतर महाविद्यालयात त्यांनी तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे अध्यापन केले. त्यांची शिकवण्याची पद्धत साधी, समजण्यास सोपी आणि उदाहरणांनी परिपूर्ण अशी होती. विद्यार्थ्यांना विषयाची गोडी लावणे हे त्यांच्या अध्यापनाचे वैशिष्ट्य होते.
साहित्य, संस्कृती, समाजप्रबोधन आणि विचारपर लेखन यांद्वारे त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. विविध वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि व्याख्यानमालेतून त्यांनी आपले विचार मांडले.
त्यांच्या लेखनात सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि संस्कारक्षम विचार यांचा प्रभाव दिसून येतो. ते केवळ शिक्षक नव्हते, तर मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. प्रा. वाडेकर यांनी इंग्रजी विषयांचे ज्ञान मराठीत आणण्यासाठी मराठी परिभाषेवर प्रचंड काम केले. मराठी तत्त्वज्ञान महाकोश हा त्रिखंडात्मक प्रकल्प १९७४ मध्ये संपादित केला, जो तत्त्वज्ञान क्षेत्रातील मैलाचा दगड मानला जातो. त्यांनी लिहिलेल्या आत्मकथेचे नाव माझी वाटचाल असे आहे. 
मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रात पुढे गेले.
प्रा. देविदास वाडेकर यांचे ५ मार्च १९८५ रोजी निधन झाले. 
प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर हे ज्ञान, संस्कार आणि साहित्यप्रेम यांचे प्रतीक होते. त्यांच्या अध्यापन आणि लेखनातून समाजाला दिशादर्शन मिळाले. त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरते.
आज प्रा. देविदास वाडेकर यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, प्रा. देविदास वाडेकर यांचा जन्म २५ मे १९०२ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला. 

दुसरा प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर हे कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे अध्यापन केले.
बरोबर उत्तर आहे, प्रा. देविदास वाडेकर हे तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे अध्यापन केले.

तिसरा प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर यांना लहानपणापासून कश्याची आवड होती ?
बरोबर उत्तर आहे, प्रा. देविदास वाडेकर यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती.

चौथा प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर यांनी लिहिलेल्या आत्मकथेचे नाव काय आहे ?
बरोबर उत्तर आहे, प्रा. देविदास वाडेकर यांनी लिहिलेल्या आत्मकथेचे नाव माझी वाटचाल असे आहे. 

शेवटचा पाचवा प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर यांनी मराठी तत्त्वज्ञान महाकोश हा त्रिखंडात्मक प्रकल्प कोणत्या वर्षी संपादित केला ?
बरोबर उत्तर आहे - १९७४ मध्ये प्रा. देविदास वाडेकर यांनी मराठी तत्त्वज्ञान महाकोश हा त्रिखंडात्मक प्रकल्प संपादित केला.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Tuesday, 3 March 2026

राष्ट्रीय सुरक्षा दिन - 4 मार्च ( National Safety Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 

कसे आहात ? मजेत ना !

 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. 

आजच्या कार्यक्रमात आपण राष्ट्रीय सुरक्षा दिन या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

🇮🇳 National Safety Day - राष्ट्रीय सुरक्षा दिन


दरवर्षी ४ मार्च रोजी भारतात ‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’ साजरा केला जातो. कामाच्या ठिकाणी, रस्त्यावर, उद्योगधंद्यात तसेच दैनंदिन जीवनात सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

१९७२ साली National Safety Council (NSC) या संस्थेची स्थापना झाली. त्यानिमित्ताने ४ मार्च हा दिवस ‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

या दिनाचे मुख्य उद्देश म्हणजे कामगार आणि नागरिकांमध्ये सुरक्षा नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे, औद्योगिक अपघात कमी करणे, रस्ते सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षिततेवर भर देणे, आपत्कालीन परिस्थितीत योग्य उपाययोजना करण्याचे प्रशिक्षण देणे.

सुरक्षेचे काही प्रकार, जसे की, औद्योगिक सुरक्षा, रस्ते सुरक्षा, अग्निसुरक्षा, घरगुती सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा

मग यात शाळा व विद्यार्थ्यांची भूमिका काय असावी ? शाळांमध्ये सुरक्षा शपथ घेणे, जनजागृतीसाठी रॅली काढणे, पोस्टर स्पर्धा आयोजित करणे आणि प्रात्यक्षिके आयोजित करणे. विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळावे, रस्त्यावरून चालताना उजव्या बाजूने चालावे आणि रस्त्यावर अपघात झाल्यास 108 या टोल फ्री क्रमांकावर फोन लावावे, हे तुम्हांला चांगलेच माहित आहे. अग्निसुरक्षा नियम समजून घ्यावे, कुठे आग लागली असेल तर 101 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा. तसेच काही आपत्कालीन क्रमांकांची माहिती ठेवणे देखील आवश्यक आहे. जसे की, पोलीसांना फोन लावण्यासाठी 100 डायल करावे, राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक आहे 112 तर चाईल्ड हेल्पलाईन नंबर आहे 1098.

“सुरक्षा प्रथम” हा संदेश या दिवसातून दिला जातो. अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन आणि जागरूकता आवश्यक आहे. सुरक्षित समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिन आपल्याला चांगली सवय लावण्याची प्रेरणा देतो. नियम पाळल्यास आणि सजग राहिल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात. त्यामुळे सुरक्षितता हीच यशस्वी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे मुलांनो तुम्ही सर्व नियम लक्षात ठेवून वागाल ना ! व्वा ! खूप छान ! मला माहित आहे, तुम्ही एक जागरूक आणि सजग नागरिक बनून सर्व नियम लक्षात ठेवून वागणार आहात. 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती छान वाटली ना ! नक्की कळवा. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 


पहिला प्रश्न - रस्त्यावर अपघात झाल्यास कोणत्या टोल फ्री क्रमांकावर फोन लावावे ?

बरोबर उत्तर आहे, रस्त्यावर अपघात झाल्यास 108 या टोल फ्री क्रमांकावर फोन लावावे.


दुसरा प्रश्न - रस्त्यावरून चालताना कोणत्या बाजूने चालावे ?

बरोबर उत्तर आहे, रस्त्यावरून चालताना उजव्या बाजूने चालावे.


तिसरा प्रश्न - १९७२ साली कोणत्या संस्थेची स्थापना झाली ?

बरोबर उत्तर आहे, १९७२ साली National Safety Council (NSC) या संस्थेची स्थापना झाली.


चौथा प्रश्न - कुठे आग लागली असेल तर कोणत्या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा ?

बरोबर उत्तर आहे, कुठे आग लागली असेल तर 101 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा


आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - चाईल्ड हेल्प लाईन नंबर सांगा पाहू.

बरोबर उत्तर आहे - 1098 हा चाईल्ड हेल्प लाईन नंबर आहे.


चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची पण.... नमस्कार. 🙏


( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )


संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

जागतिक वन्यजीव दिन - 03 मार्च ( World Wildlife Day )

🌿 World Wildlife Day - जागतिक वन्यजीव दिन
दरवर्षी ३ मार्च रोजी ‘जागतिक वन्यजीव दिन’ साजरा केला जातो. पृथ्वीवरील वन्य प्राणी व वनस्पती यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याबाबत जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. जैवविविधता ही मानवजातीच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
२० डिसेंबर २०१३ रोजी United Nations General Assembly यांनी ३ मार्च हा दिवस ‘जागतिक वन्यजीव दिन’ म्हणून घोषित केला. ३ मार्च १९७३ रोजी CITES (वन्य जीव आणि वनस्पतींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील करार) स्वीकारण्यात आला होता. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीव आवश्यक आहेत. अन्नसाखळी टिकवून ठेवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. औषधनिर्मिती, संशोधन आणि पर्यटनासाठी वन्यजीव उपयुक्त ठरतात. जैवविविधतेमुळे पृथ्वीवरील जीवन समृद्ध राहते.
वनतोड, बेकायदेशीर शिकार, प्रदूषण आणि हवामान बदल यांमुळे अनेक प्राणी व वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वाघ, गेंडा, हत्ती यांसारख्या प्रजाती संकटग्रस्त ठरत आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूक राहावे, झाडे लावावी व त्याचे संवर्धन करावे, प्लास्टिकचा वापर कमी करावे आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. 
जागतिक वन्यजीव दिन आपल्याला निसर्गाशी असलेले नाते जपण्याची आठवण करून देतो. वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. “निसर्ग वाचवा, भविष्य वाचवा” “वन्यजीव वाचवा, पृथ्वी वाचवा” हा संदेश या दिवशी दिला जातो, कारण वन्यजीवांचे रक्षण करणे म्हणजे आपल्या भविष्यासाठी निसर्ग वाचवणे !

संकलन : नासा येवतीकर 

Saturday, 28 February 2026

जागतिक नागरिक संरक्षण दिवस - 01 मार्च ( World Civil Defence Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आजच्या कार्यक्रमात आपण जागतिक नागरी संरक्षण दिन यां विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

🌍 World Civil Defence Day
जगभरात दरवर्षी १ मार्च रोजी ‘जागतिक नागरी संरक्षण दिन’ साजरा केला जातो. नैसर्गिक आपत्ती, अपघात, युद्धस्थिती किंवा अन्य संकटांच्या काळात नागरिकांचे संरक्षण करणे आणि त्यांना सुरक्षिततेबाबत जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
हा दिवस International Civil Defence Organization (ICDO) या संस्थेच्या पुढाकाराने साजरा केला जातो. १ मार्च १९७२ रोजी या संस्थेची अधिकृत स्थापना झाली. त्यानिमित्ताने हा दिवस ‘जागतिक नागरी संरक्षण दिन’ म्हणून घोषित करण्यात आला.
नागरी संरक्षण म्हणजे आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे जीवित व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी केलेली तयारी व उपाययोजना. यात भूकंप, पूर, आगी, चक्रीवादळ, महामारी, दहशतवादी हल्ले इत्यादी संकटांचा समावेश होतो.
या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे, नागरिकांना प्रथमोपचार व सुरक्षिततेचे प्रशिक्षण देणे, आपत्तीच्या काळात स्वयंसेवकांचे योगदान अधोरेखित करणे, शाळा, महाविद्यालये व कार्यालयांत सुरक्षा सराव (Mock Drill) आयोजित करणे.
भारतात नागरी संरक्षण कार्य गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली चालते. विविध राज्यांमध्ये स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाते. आपत्तीच्या वेळी बचावकार्य, प्रथमोपचार, अन्न-वाटप, लोकांना सुरक्षित स्थळी हलविणे अशी महत्त्वाची कामे केली जातात. राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाईन 112 अशी आहे. रस्त्यावर अपघात झाल्यास 108 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलाविता येते. 
विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे मूलभूत ज्ञान घेणे, शाळेतील सरावात सहभागी होणे आणि संकटाच्या काळात शांतता राखणे आवश्यक आहे. जागरूक नागरिक हा सुरक्षित समाजाचा पाया असतो.
जागतिक नागरी संरक्षण दिन आपल्याला सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देतो. संकटे कधीही येऊ शकतात, परंतु योग्य प्रशिक्षण, सज्जता आणि सामूहिक प्रयत्न यांच्या बळावर आपण त्यांचा सामना करू शकतो. म्हणूनच या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - जगभरात दरवर्षी १ मार्च हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, जगभरात दरवर्षी १ मार्च रोजी ‘जागतिक नागरी संरक्षण दिन’ साजरा केला जातो.

दुसरा प्रश्न - ICDO चे full form सांगा. 
बरोबर उत्तर आहे, International Civil Defence Organization

तिसरा प्रश्न - रस्त्यावर अपघात झाल्यास कोणत्या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावे ?
बरोबर उत्तर आहे, रस्त्यावर अपघात झाल्यास 108 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावे.

चौथा प्रश्न - ICDO या संस्थेची अधिकृत स्थापना केव्हा झाली ?
बरोबर उत्तर आहे, १ मार्च १९७२ रोजी ICDO या संस्थेची अधिकृत स्थापना झाली.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक काय आहे ?
बरोबर उत्तर आहे - राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाईन क्रं. 112 अशी आहे. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 2 मार्च ( Ram Shevalkar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आजच्या कार्यक्रमात आपण साहित्यिक राम शेवाळकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
             प्रा. राम शेवाळकर
राम बाळकृष्ण शेवाळकर हे साहित्यिक, उत्तम कीर्तनकार आणि प्रभावी वक्ते होते. राम शेवाळकर यांचा जन्म २ मार्च १९३१ रोजी अमरावतीतील अचलपूर याठिकाणी झाला. त्यांचे वडील विदर्भात ‘कीर्तनकेसरी’ म्हणून प्रसिद्घ होते. राम शेवाळकर हे आपल्या वडिलांच्या अनुकरणातून लहान वयातच कीर्तने पाठ करून ती सादर करीत. त्यामुळे त्यांच्यात सभाधीटपणा आणि अमोघ वाणी आली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले. त्यांची आई गोपिका यांचे राम शेवाळकर यांच्यावर जीवापाड प्रेम होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अचलपूर येथेच झाले.
पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेड येथील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली. लहानपणापासूनच ते काव्यरचना करीत होते. ‘असोशी’ (१९५६) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर ‘रेघा’(१९६७) आणि ‘अंगारा’ (१९८९) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. निसर्गातील चैतन्याचा आणि सृजनशक्तीचा आविष्कार त्याच्या निरनिराळ्या रूपांतून पाहणे, त्यांना शब्दरूप देणे, हे त्यांच्या कवितेचे लक्षणीय वैशिष्ठ्य होय.
१९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात राम शेवाळकरांचा सहभाग होता.
 ‘पाणियावरी मकरी’ (२००८) हे त्यांचे आत्मचरित्र. त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांत अमेरिकाचा पुरस्कार  ‘मॅन ऑफ द ईयर’ (१९९७), बॉस्टन येथील संस्थे मार्फत साहित्य धुरंधर पुरस्कार,  (१९९७), दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानाचा कुसुमाग्रज पुरस्कार (१९९९) आदींचा समावेश आहे. अशा या थोर साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांचे ३ मे २००९ रोजी नागपूर येथे निधन झाले.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - राम शेवाळकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, राम शेवाळकर यांचा जन्म २ मार्च १९३१ रोजी अमरावतीतील अचलपूर याठिकाणी झाला.

दुसरा प्रश्न - राम शेवाळकर यांना अमेरिकाचा कोणता पुरस्कार मिळाला ?
बरोबर उत्तर आहे, राम शेवाळकर यांना अमेरिकाचा  ‘मॅन ऑफ द ईयर’ पुरस्कार मिळाला. 

तिसरा प्रश्न - राम शेवाळकर यांचा पहिला काव्यसंग्रह कोणता ?
बरोबर उत्तर आहे, असोशी’ (१९५६) हा राम शेवाळकर यांचा पहिला काव्यसंग्रह.

चौथा प्रश्न - १९९४ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरले होते ?
बरोबर उत्तर आहे, १९९४ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गोव्यातील पणजी येथे भरले होते.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - राम शेवाळकर यांचे निधन कोठे झाले ?
बरोबर उत्तर आहे - राम शेवाळकर यांचे ३ मे २००९ रोजी नागपूर येथे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Friday, 27 February 2026

दिनविशेष माहिती - 28 फेब्रुवारी ( National Science Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण राष्ट्रीय विज्ञान दिन यांविषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

सी. व्ही. रमन आणि ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’
भारतीय विज्ञानविश्वात डॉ. सी. व्ही. रमन यांचे नाव अत्यंत गौरवाने घेतले जाते. त्यांनी भौतिकशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण शोध लावला, जो आज “रमन इफेक्ट” या नावाने ओळखला जातो. त्यांच्या या ऐतिहासिक शोधाच्या स्मरणार्थ भारतात २८ फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून साजरा केला जातो.
२८ फेब्रुवारी १९२८ रोजी डॉ. रमन यांनी प्रकाशाच्या विखुरण्याविषयी (Scattering of Light) महत्त्वाचा शोध लावला. एखाद्या पारदर्शक पदार्थातून प्रकाश जात असताना त्याच्या तरंगलांबीमध्ये (wavelength) सूक्ष्म बदल होतो, हे त्यांनी सिद्ध केले. या घटनेला “रमन इफेक्ट” असे नाव देण्यात आले.
या शोधामुळे पदार्थांची रचना आणि गुणधर्म समजून घेण्यास मोठी मदत झाली. आजही रसायनशास्त्र, वैद्यकीय संशोधन, औषधनिर्मिती आणि भौतिकशास्त्रात रमन इफेक्टचा उपयोग केला जातो.
डॉ. रमन यांच्या या अद्वितीय संशोधनासाठी त्यांना १९३० साली भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. विज्ञान क्षेत्रातील हा सन्मान मिळविणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले.
डॉ. रमन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केलेल्या शोधाच्या स्मरणार्थ भारत सरकारने १९८६ पासून २८ फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून घोषित केला. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि संशोधन संस्था येथे विज्ञान प्रदर्शन, प्रकल्प स्पर्धा, व्याख्याने आणि विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
या दिनाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे आणि संशोधनाची प्रेरणा देणे हे आहे.
डॉ. सी. व्ही. रमन यांचा “रमन इफेक्ट” हा शोध भारतीय विज्ञानाच्या इतिहासातील सुवर्णक्षण मानला जातो. त्यांच्या कार्यामुळे भारताचा जागतिक स्तरावर मान उंचावला. “राष्ट्रीय विज्ञान दिन” हा दिवस विज्ञानाचा प्रसार होण्यासाठी आणि नव्या पिढीला संशोधनाची प्रेरणा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून केव्हापासून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला ?
बरोबर उत्तर आहे, १९८६ पासून २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला

दुसरा प्रश्न - नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण होते ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. सी. व्ही. रमन हे नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ.

तिसरा प्रश्न - डॉ. सी. व्ही. रमन यांनी शोध लावलेल्या प्रयोगाचे नाव काय ? 
बरोबर उत्तर आहे, रमन इफेक्ट डॉ. सी. व्ही. रमन यांनी शोध लावलेल्या प्रयोगाचे नाव होते. 

चौथा प्रश्न - डॉ. सी. व्ही. रमन यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार देण्यात आला ? 
बरोबर उत्तर आहे, १९३० यावर्षी डॉ. सी. व्ही. रमन यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - रमन इफेक्टचा शोध केव्हा लावण्यात आला ?
बरोबर उत्तर आहे - २८ फेब्रुवारी १९२८ रोजी रमन इफेक्टचा शोध लावण्यात आला.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Wednesday, 25 February 2026

दिनविशेष माहिती - 27 फेब्रुवारी ( Kusumagraj )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

कुसुमाग्रज
कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक अजरामर कवी, नाटककार व साहित्यिक होते. त्यांचे खरे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे होते. मराठी काव्य आणि नाटक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या लेखनातून देशप्रेम, मानवतावाद, स्वातंत्र्याची ओढ आणि सामाजिक जाणीव व्यक्त होते.
कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे बालपण नाशिक येथे गेले. लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती. शिक्षण घेत असतानाच त्यांनी लेखनास सुरुवात केली.
कुसुमाग्रजांनी कविता, नाटके, कथा, कादंबऱ्या अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले. त्यांची काही प्रसिद्ध साहित्यकृती विशाखा काव्यसंग्रह, नटसम्राट प्रसिद्ध नाटक, हिमरेषा, आंधळा
त्यांच्या कवितांमध्ये स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि मानवतेचा संदेश दिसून येतो. विशाखा या काव्यसंग्रहामुळे ते विशेष प्रसिद्ध झाले. त्यांना तात्यासाहेब या नावानेही ओळखले जाते. 
कुसुमाग्रज हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते सामाजिक जाणीव असलेले विचारवंत होते. त्यांनी समाजातील अन्याय, विषमता आणि अंधश्रद्धांविरुद्ध आवाज उठविला. त्यांच्या लेखनातून मानवतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश मिळतो.
त्यांना मराठी साहित्यातील सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार इ.स. १९८७ मध्ये प्राप्त झाला. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे ते दुसरे साहित्यिक होते. तसेच त्यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले.
कुसुमाग्रज यांचे निधन १० मार्च १९९९ रोजी झाले.  ‘कुसुमाग्रज’  यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी, 2013 रोजी घेण्यात आला.
कुसुमाग्रज हे मराठी साहित्याचे तेजस्वी नक्षत्र होते. त्यांच्या लेखनातून समाजाला प्रेरणा, दिशा आणि जागृती मिळाली. मराठी भाषेचा गौरव वाढविण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे.
आज मराठी भाषा गौरव दिन त्यानिमित्ताने सर्वाना खूप खूप शुभेच्छा आणि कवी कुसुमाग्रज यांना विनम्र अभिवादन 🙏

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - कुसुमाग्रज खरे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, कुसुमाग्रज खरे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे होते. 

दुसरा प्रश्न - कुसुमाग्रज लिखित प्रसिद्ध नाटकाचे नाव सांगा.
बरोबर उत्तर आहे, कुसुमाग्रज लिखित प्रसिद्ध नाटकाचे नाव आहे नटसम्राट 

तिसरा प्रश्न - कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

चौथा प्रश्न - कुसुमाग्रज यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले ?
बरोबर उत्तर आहे, सन १९८७ मध्ये कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला ?
बरोबर उत्तर आहे - कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

देविदास वाडेकर - 5 मार्च ( Devidas Wadekar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.  आजच्या कार्यक्रमात आपण...