Showing posts with label पुस्तक. Show all posts
Showing posts with label पुस्तक. Show all posts

Wednesday, 24 June 2020

स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक

लॉकडाऊनच्या काळात वाचलेले एक अप्रतिम पुस्तक 

लक्ष्मीबाई टिळक यांचे स्मृतिचित्रे हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्य विश्वातील एक अजरामर साहित्यकृती होय. साहित्यिक नारायण वामन टिळक यांची पत्नी म्हणजे लक्ष्मीबाई. नाशिक जवळच्या जलालपुर हे त्यांचे जन्मगाव तर लक्ष्मीबाई यांचे बालपणीचे नाव मनकर्णिका असे होते आणि सर्वचजण लाडाने त्यांना मनू असे म्हणत. स्मृतिचित्रे या पुस्तकात लक्ष्मीबाई यांनी आपले माहेर, सासर आणि टिळकांसोबत घालवलेल्या अनेक आठवणी यात सांगितलेल्या आहेत. यात एकूण चार भाग असून पहिल्या भागात त्यांच्या संसारात अनेक अडचणी कसे आ वासून उभे होते याची माहिती मिळते. दुसऱ्या भागात नारायण टिळक हे ख्रिस्ती धर्म स्विकारतात त्यास लक्ष्मीबाई च्या मनात कशी घालमेल होते आणि शेवटी ते ही ख्रिस्ती धर्म स्विकारतात याचा अनुभव सांगितलं आहे. तिसऱ्या भागात नारायण टिळक यांचा मृत्यू कसा होतो ? हे अनुभव वाचायला मिळते तर शेवटच्या भागात टिळकांच्या नंतर लक्ष्मीबाई आणि त्यांचा पुत्र दत्तू यांचे जीवन अनुभव वाचण्यास मिळतात. पुस्तकात एकूण 512 पाने असून कोल्हापूरच्या रिया पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकातून जीवनात येणाऱ्या अनेक संकटांना तोंड कसे देत जावे ? दानधर्माचे महत्व, त्यांच्या पोटचा एकच लेकरू होता मात्र घर नेहमीच गोकुळ सारखे भरून राहत. दिल्याने काही गोष्टी संपतात असे वाटते मात्र उलट मानवता जोडत जाते आणि साखळी वाढत जाते हे सर्व या पुस्तकाचे वाचन केल्यावर कळते. महाराष्ट्राला बालकवी त्र्यंबक बापूजी ठोबरे मिळाले ते या लक्ष्मीनारायण जोडीमुळे. बालकवी लहानपणी यांच्याच घरी होते ज्यावेळी ते खूप आजारी होते असा उल्लेख या पुस्तकात वाचण्यास मिळतो. जलालपूर, नाशिक, नागपूर, सातारा, पुणे, वणी, महाबळेश्वर, माथेरान येथील अनुभव वाचण्यासारखे आहेत. शेवटी ते मुंबईला गेले आणि मुंबईहून कराचीला असा जीवनप्रवास पाहायला मिळतो. जीवनात अनेक खस्ते खात खात त्यांनी आपला संसार नेटाने चालविला. प्रत्येक स्त्रियांनी जरूर हे पुस्तक वाचावं कारण ज्या प्रकारे लक्ष्मीबाई यांनी संकटात आपली नौका चालविली ते खरोखरच प्रेरणादायी आहे. अक्षरशत्रू असलेली लक्ष्मीबाई आपल्या पतीच्या प्रेरणेने आणि मुलाच्या सहकार्याने एवढं सुंदर साहित्याची भेट आपल्या सर्व वाचकांना दिली आहे. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. 

- नागोराव सा. येवतीकर

लेखन प्रेरणा दिवस

मुलांनो, चला लिहू या...! "वाचाल तर वाचाल... लिहाल तर घडाल!" आपण रोज बोलतो, हसतो, खेळतो, शिकतो. आपल्या मनात अनेक विचार ...