Thursday, 25 June 2020

आयुष्य

आयुष्य

विधिलिखित लिहिलेलं
असते प्रत्येकाचे आयुष्य
किती जगेल केंव्हा मरेल
कोण करील यावर भाष्य

हसत खेळत जगत राहावे
मिळाले आहे जेवढे आयुष्य
कशाचीच चिंता केली नाही
तरच होईल जीवन दीर्घायुष्य

आज आहे तर उद्या नाही
अशी परिभाषा आयुष्याची
जिवंतपणी सत्कर्म केलो तर
काळजी नसते भविष्याची

कोरोना रोगाने दिली सर्वाना
ओळख करून आयुष्याची
महामारीच्या साथ आजाराने
खात्री वाटत नाही जीवनाची

मृत्यूनंतर सर्व चांगले म्हणावे
हीच कमाई आहे आयुष्यात
सोबतीला नसतात कोणीही
सारेच रिकाम्या हाताने जातात

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

1 comment:

वेळेला महत्व देणारे श्री बाबुराव भोजराज सर ( Baburao Bhojraj Sir )

वेळेला महत्व देणारे बाबुराव भोजराज सर समाजात शिक्षकांचे स्थान खूप मोठे आहे. शिक्षकांविषयी म्हटले आहे की, "शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत...